शृंगार नायिका

विख्यात चित्रकार दीनानाथ दलाल यांनी रेखाटलेल्या शृंङगार नायिकांच्या रंगीत रेखाचित्रांसह



अनुवाद :


प्राचीन साहित्यामध्ये अनेक प्रकारच्या नायक-नायिकांचे वर्णन मिळते.
त्यापैकी कामशास्त्र, नाट्यशास्त्र व साहित्य शास्त्रामध्ये उल्लेखलेल्या
शृंङगार नायिकांचे वर्णन या पुस्तकात केले आहे.


2,900.00 Add to cart

अय्यंगार योग संच

 


बेल्लूर कृष्णमाचारी सुंदरराजन अय्यंगार अर्थात, जगविख्यात योगगुरू बी.के.एस. अय्यंगार यांनी 'अय्यंगार योग’ ही योगशास्त्रामधील एक वैशिष्ट्यपूर्ण पद्धती विकसित केली. 'योग’ हा आपल्या जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग आहे, असा नवा विचार रुजवण्यात आणि भारताबरोबर संपूर्ण जगभर योगविद्या लोकप्रिय करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. अय्यंगारांचा जन्म १४ डिसेंबर १९१८ रोजी कर्नाटकमधील बेल्लूर येथे झाला. योगशास्त्राचं सुरुवातीचं शिक्षण त्यांनी त्यांच्या मेहुण्यांकडून म्हैसूर येथे घेतलं. १९३७मध्ये योगशास्त्राचा प्रचार करण्यासाठी पुण्यात वास्तव्यास आल्यानंतर ते योग शिकवू लागले. जगभरातल्या अनेक नामांकित व प्रसिद्ध व्यक्तींनी त्यांच्याकडून योगाभ्यासाचे धडे घेतले आहेत. १९ जानेवारी १९७५ रोजी त्यांनी ‘राममणी अय्यंगार मेमोरिअल योग इन्स्टिट्यूट’ची स्थापना केली. येथे जनसामान्यांना योगासनाचे धडे दिले जातात. त्याचप्रमाणे हे एक महत्त्वाचं योगविद्या संशोधन केंद्रही आहे. अनेक देशी परदेशी विद्यार्थी इथे योगसाधनेसाठी येतात. संपूर्ण जीवन योगविद्येसाठी वाहून घेतलेल्या या योगतपस्व्याचा २० ऑगस्ट २०१४ रोजी वयाच्या ९६व्या वर्षी मृत्यू झाला.

गीता अय्यंगार यांना योगशास्त्राचा मौल्यवान वारसा, त्यांचे वडील विश्वविख्यात योगतज्ज्ञ श्री. बी. के. एस. अय्यंगार यांच्याकडून मिळाला. योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार हे आपल्या विशाल योगतत्त्वज्ञानाच्या कलात्मक आविष्कारासाठी सर्वश्रुत आहेत. गीता अय्यंगार यांचा योगाभ्यासाचा प्रारंभ बालपणापासूनच झाला. १९६२ पासून त्या ‘योग’ हा विषय शिकवत आहेत. त्या ‘तत्त्वज्ञान’ व ‘आयुर्वेद’ या विषयातील पदवीधर आहेत. त्यांच्या योगविषयक ज्ञानाला मिळालेल्या वैद्यकीय ज्ञानाच्या जोडीमुळे, त्या विद्यार्थ्यांना सर्वांगीण मार्गदर्शन करू शकतात. ‘रमामणि अय्यंगार मेमोरियल इन्स्टिट्युट’च्या त्या एक चालक होत्या. गीता अय्यंगार यांनी योगविषयाच्या प्रसारासाठी आणि प्रचारासाठी भारतात आणि विदेशात सर्वदूर प्रवास केलेला आहे. त्यांची या विषयावरील पुस्तकंही जगन्मान्य आहेत. या क्षेत्रात ज्या काही फार थोड्या स्त्रिया काम करू शकल्या त्या ‘योगशास्त्र’ विषयासंदर्भात त्यांचे नाव अतिशय आदराने व मानाने घेतलं जातं. त्यांच्या ‘स्त्रियांसाठी योग-एक वरदान’ या पुस्तकाच्या मूळ इंग्रजी आवृत्तीचे, या पूर्वी युरोपातील सहा विविध भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. स्वत: एक स्त्री असल्यामुळे स्त्रियांच्या आयुष्यातील अडीअडचणी, आव्हानं, शारीरिक व मानसिक चढउतार हे त्या उत्तमरीत्या जाणू शकतात. स्त्रियांविषयी आंतरिक तळमळ असल्यामुळेच त्यांनी हे पुस्तक अतिशय तपशिलात लिहिलं आहे.


संचातील ७ पुस्तकं
१) योगदीपिका – जगभरातील ४० भाषांमध्ये अनुवादित झालेलं योगाचार्य अय्यंगार यांचं आंतरराष्ट्रीय कीर्तीचं पुस्तक LIGHT ON YOGA चा मराठी अनुवाद

२) आरोग्य-योग  – आसन-प्राणायाम, धारणा-ध्यान

३) योग सर्वांसाठी – शरीर-व्याधी व ताणतणावांवर उपचार

४) योग एक कल्पतरू – योगसाधनेसाठी प्रेरणा देणारे आणि योगासनांचे महत्त्व पटवून ती आत्मसात करण्याचा सहज सुलभ मार्ग

५) पातंजल योगसुत्र – महर्षी पतंजली रचित योगसूत्रांची प्रारंभिक ओळख

६) योगाचार्य – बी.के.एस. अय्यंगार यांचं चरित्र

७) स्त्रीयांसाठी योग – स्त्रियांना जीवनातील प्रत्येक टप्प्यात साथ देणारा असा योगमार्ग …त्यासाठी सर्वांगीण मार्गदर्शन

 


रु. २१९०  ची पुस्तकं सवलतीत रु. १६९९ मध्ये (टपाल खर्चासह) घरपोच मिळवा!


1,799.00 Add to cart

असा घडला भारत

१९४७ पासूनच्या घटना-घडामोडींतून उलगडलेला स्वतंत्र भारत


संपादन :

गंभीर वृत्तीचे अनुवादक, संपादक व लेखक म्हणून मिलिंद चंपानेरकर विख्यात आहेत. त्यांनी आजवर ‘लोककवी साहीर लुधियानवी' (मूळ लेखक : अक्षय मनवानी), ‘त्या दहा वर्षांतील गुरू दत्त' (मूळ लेखक - सत्य सरन), ‘सुन मेरे बंधू रे - एस.डी. बर्मन यांचं जीवनसंगीत' (मूळ लेखक - सत्या सरन), ‘वहिदा रेहमान... हितगुजातून उलगडलेली', (मूळ लेखक- नसरीन मुन्नी कबीर), ‘ए.आर. रहमान : संगीतातील वादळ' (मूळ लेखक - कामिनी मथाई), ‘भारतातील डाव्या चळवळीचा मागोवा’ (मूळ लेखक - प्रफुल्ल बिडवई), ‘गुड मुस्लीम बॅड मुस्लीम' (मूळ लेखक - महमूद ममदानी, सह-अनुवादक - पुष्पा भावे) यांसारख्या महत्त्वाच्या पुस्तकांचा अनुवाद केला असून ‘यांनी घडवलं सहस्रक' आणि ‘असा घडला भारत' या महद्ग्रंथांसाठी सह-संपादन, संशोधन व लेखन केलं आहे. त्यांनी दैनिक ‘इंडियन एक्स्प्रेस'साठी १९९१-२००० या कालावधीमध्ये पत्रकारिता केली आहे. गेली तीन दशकं त्यांनी विविध मराठी दैनिक आणि नियतकालिकांमधून समाजाभिमुख साहित्य, नाट्य व चित्रपटविषयक समीक्षापर लेखन आणि त्याचप्रमाणे, सामाजिक-राजकीय विषयांवर विश्लेषणात्मक लेखन केलं आहे. त्यांना ‘लोकशाहीवादी अम्मीस...दीर्घपत्र' या अनुवादित पुस्तकासाठी सर्वोत्कृष्ट अनुवादाचा २०१६ सालचा ‘साहित्य अकादमी' पुरस्कार प्राप्त झाला आहे.


भारताचा प्रदीर्घ स्वातंत्र्यलढा यशस्वी होऊन १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. अनेकविध समस्यांचं ओझं घेऊन आणि मोठी स्वप्नं उराशी बाळगून आपल्या नव स्वतंत्र देशाने वाटचाल सुरू केली. पुढील ६५ वर्षांच्या प्रवासात अशा अनेक महत्त्वपूर्ण घटना-घडामोडी घडून गेल्या ज्यामुळे देशाची वाटचाल नियत झाली वा ज्यातून विविध क्षेत्रांतील वळणं दिसून आली. अशा घटनांचा मागोवा या ग्रंथात घेतला आहे.
स्वातंत्र्यानंतर सुरुवातीच्या काळात मूलभूत स्वरूपाच्या कोणत्या गोष्टी घडून आल्या? पुढील काळात राजकारण-समाजकारण कसं बदलत गेलं? अर्थ-उद्योग ते विज्ञान आदी क्षेत्रात कसे बदल संभवत गेले? कितपत विकास साध्य झाला आणि कशा बाबतीत अधोगती संभवली? आपल्या वाटचालीच्या दृष्टीने कोणत्या आंतरराष्ट्रीय घटना अनुकूल वा प्रतिकूल ठरल्या? चित्रकला, नाट्यक्षेत्र ते चित्रपटमाध्यम यातून बदलत्या परिस्थितीचं प्रतिबिंब किती परिणामकारकतेने प्रतीत झालं? क्रीडाविश्वात काय बदल घडले? अशा प्रश्नांची उत्तर देणाऱ्या व जनजीवन घडवणाऱ्या विविध क्षेत्रांतील घटना आणि त्याचप्रमाणे जनजीवन विस्कळीत करणाऱ्या मोठ्या नैसर्गिक आपत्ती-दुर्घटना आदींचाही वेध या ग्रंथातून घेतला आहे.
गतकाळातील घटनांचा जास्तीतजास्त तटस्थतेने मागोवा घेण्याचा आम्ही यत्न केला आहे. त्यामागे केवळ स्मृतींना उजाळा द्यावा इतका मर्यादित उद्देश नाही. ज्यांनी हा काळ पाहिला आहे, त्यांना या गतघटनांचं नव्याने आकलन व्हावं ही अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे उगवत्या पिढीला गतकाळाचं नेमकं भान यावं व समकालीन घटनांचा अन्वयार्थ लागावा, हे अभिप्रेत आहे. एकंदरीत, आपल्या भोवतालाचं समग्र भान देऊ पाहणारा असा हा महद्ग्रंथ असा घडला भारत !


1,690.00 Add to cart

यशवंतराव चव्हाण ६ पुस्तकांचा संच


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री तसेच स्वातंत्र्य चळवळीत सहभागी असलेले आदरणीय द्रष्टे व मुत्सद्दी नेते यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची मूलभूत पायाभरणी केली. सामान्य कुटुंबातून आलेले चव्हाण हे जनसामान्यांचे पुढारी म्हणून ओळखले जातात. त्यांना स्वतःच्या बलस्थानांची आणि मर्यादांची पुरेपूर जाणीव असल्याने त्यांनी तत्त्वनिष्ठ व्यवहारवादाचे पालन केले. लोकशाहीच्या शक्तीवर त्यांचा अतूट विश्वास असल्यामुळे त्यांनी न्यायपूर्ण समाजाच्या बांधणीसाठी आवश्यक असलेल्या धोरणांबाबत पुढाकार घेऊन त्यांना पाठिंबा दिला. चव्हाण एक समतोल विचारवंत, सिद्धहस्त लेखक, प्रतिभावान वक्ते, चाणाक्ष मुत्सद्दी तसेच द्रष्टे प्रशासक होते व त्यांनी लोकहिताच्या अनेक धोरणांवर आपला ठसा उमटवला. अनलंकृत शैलीत त्यांनी केलेलं लेखन हे मनाला स्पर्श करून जातंच, शिवाय ते आपल्याला समाजकारण, राजकारण यांचं सखोल भानही देतं.

 

यशवंतराव चव्हाण यांचे विचार व  साहित्य ६ पुस्तकांचा संच
१) कृष्णाकांठ
२) भूमिका
३) सह्याद्रीचे वारे
४) ऋणानुबंध
५) भारत समाज आणि राजकारण
६) माझ्या विद्यार्थी मित्रानो

रु १,९९५ चा संच सवलतीत १,५५५ मध्ये घरपोच.


1,555.00 Add to cart

समर्थ मालिका संच


३ पुस्तकांचा संच


मराठी साहित्य क्षेत्रातील रहस्य-गूढ आणि भयकथा लेखकांतलं अग्रगण्य नाव म्हणजे नारायण धारप! गूढ लेखनाला अनेकदा विज्ञानाची डूब देत ही त्यांनी लेखन केलं आहे. त्यांच्या विज्ञान कथा ही तेवढ्याच ताकदीच्या आणि रंजक असतात. नारायण धारप यांचे नियमित वाचक असणाऱ्यांना त्यांच्या लेखनातला थरार आणि औतुक्य निर्माण करण्याचं सामर्थ्य ठाऊक आहेच. त्यांचे लेखन पुन्हा पुन्हा वाचलं तरी जुनं वाटत नाही किंवा कथेचा शेवट माहीत असला, तरी ज्या वळणवाटांवरून ते वाचकांना शेवटपर्यंत नेतात, त्यामुळे त्यांच्या ताजेपणा तसाच राहतो. धारप यांचा विज्ञान विषयक वाचन त्यांची कल्पकता आणि कथा फुलवत नेण्याच्या तंत्रावची हुकुमत त्यांच्या लेखनात दिसून येते.

नारायण धारप यांची ‘समर्थ’ ही एक काल्पनिक व्यक्तिरेखा…

अशोक समर्थ हे एक प्रकारचे ‘पॅरानॉर्मल’ डिटेक्टिव्ह…

सर्वसामान्यांना छळणाऱ्या दुष्ट व अघोरी शक्तींचा आपल्या अलौकिक बुद्धिचातुर्याने ते पाडाव करतात.

त्यांच्या डावपेचात ते भौमितिक आकृत्या, रिंगणं, धुपारे अशा सुरक्षासाधनांचाही वापर करतात…


 

1,500.00 Add to cart

अमर चित्र कथा १२ पुस्तकांचा संच

 


अमर चित्र कथा


रोहन प्रकाशन घेऊन येत आहे अमर चित्र कथा आता मराठीत
१२ पुस्तकांचा संच


१. पौराणिक व जातक कथा

२. वैज्ञानिक व उद्योजक गाथा
३. प्रेरणादायी व्यक्ती कथा


 

1,307.00 Add to cart

फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथा रेड सेट

१२ पुस्तकांचा संच


सत्यजित रे या विश्वकीर्तीवंत दिग्दर्शकाने पथेर पांचाली, चारुलता, अरण्येर दिनरात्री, शोनार केल्ला आणि जलसाघर हे गाजलेले चित्रपट बनविले. सत्यजित रे यांचा १९२१—१९९२ हा कालखंड होता. १९९२ साली अ‍ॅकेडेमी ऑफ मोशन पिक्चर आर्टस अ‍ॅन्ड सायन्सने त्यांना जीवनगौरव म्हणून ‘ऑस्कर’ पुरस्कार दिला. त्याच वर्षी भारत सरकारनं ‘भारतरत्न’ देऊन त्यांचा सन्मान केला. सत्यजित रे हे एक नामवंत लेखकही होते. त्यांनी बंगालीत लिहिलेल्या लघु कथा, लघु कादंबऱ्या, कविता आणि लेख मुलांच्या ‘संदेश’ या मासिकात १९६१ साली प्रसिद्ध होऊ लागले आणि तेव्हापासून ते प्रचंड लोकप्रिय झाले. त्यांनी निर्माण केलेल्या व्यक्तिरेखांपैकी ‘गुप्तहेर फेलूदा’ व ‘शास्त्रज्ञ प्रोफेसर शंकू’ या साहित्यात अजरामर झाल्या आहेत व बंगाली जीवनाचा एक अविभाज्य भाग होऊन बसल्या आहेत.

अनुवाद :
'रोहन'चे एक ‘कलंदर’ लेखक. पत्रकारिता, अनुवाद, सदर लेखन ते ललित लेखनामध्ये अनेक वर्षं मुशाफिरी केलेला ‘ज्येष्ठ लेखक’ म्हणून परिचित होते. त्यांना व्यासंगी पत्रकारितेचा चार दशकाहून अधिक अनुभव होता. तसंच त्यांना पालिका बैठकीपासून आंतरराष्ट्रीय शिखर परिषदांचे वृत्तांत देण्यापर्यंतचा समृद्ध अनुभव होता. दैनिक सकाळ, तरुण भारत व केसरी या वृत्तपत्रांतून काम केल्यानंतर ते महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्रात दाखल झाले. महाराष्ट्र टाइम्सचे दिल्ली प्रतिनिधी म्हणून त्यांनी ११ वर्षं काम केलं. तेथून त्यांनी लिहलेली 'राजधानीतून' ही वार्तापत्रं विशेष गाजली. त्यानंतर अनेक वर्षं त्यांनी ‘मटा’चे कार्यकारी संपादक म्हणून काम केलं. 'कलंदर' या टोपण नावाने 'कानोकानी' हे त्याचं सदरही विशेष लोकप्रिय झालं. अनुवाद क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केली असून त्यामध्ये इंदिरा गांधी (पुपुल जयकर), शेषन (के. गोविंदन कुट्टी), इंदिरा अंतिम पर्व (पी. सी. अलेक्झांडर), लता मंगेशकर (हरीश भिमानी), फॅन्टॅस्टिक फेलूदा (सत्यजित रे पुस्तकांची मालिका), लाल बहादूर शास्त्री (पी. एन. धर), कस्तुरबा : एक शलाका (अरुण गांधी), आर. डॉक्युमेंट (आयर्विंग वॉलेस) यांचा समावेश होतो. हे सर्व अनुवाद त्यांना उत्कृष्ट तर होतेच, परंतु ते लोकप्रियही झाले. सर्वोत्कृष्ट अनुवादासाठी साहित्य अकादमी, राज्य सरकार व अनुवाद सुविधा केंद्र यांचे पुरस्कार त्यांना लाभले. 'कानोकानी' या पुस्तकाला मसापचा चि. वि. जोशी पुरस्कार लाभला.


विश्वविख्यात चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांनी फॅन्टॅस्टिक फेलूदाच्या मूळ रहस्यकथा बंगालीत लिहिल्या आहेत. गुप्तहेर फेलूदा, तोपशे, जटायू या मध्यवर्ती व्यक्तिरेखांभोवती चित्तथरारक व उत्कंठावर्धक अशा १२ कादंबर्‍या गुंफल्या आहेत. यात रहस्य आहे पण अनाकलनीय गूढ नाही, हिंसा आहे पण हिंस्त्रपणा नाही.
या कथा चित्तथरारक आहेत पण यात भडकपणा नाही. गुंतागुंतीच्या या खिळवून टाकणार्‍या कथा भारतातील विविध राज्यात, शहरात घडतात असं दाखवून सत्यजित रे यांनी रहस्य, साहस व पर्यटन यांचा रंजक मिलाफ साधला आहे. प्रथितयश अनुवादक अशोक जैन यांनी अनुवादित केलेल्या या कादंबर्‍या केवळ किशोरवयीनांनाच नव्हे तर आबालवृद्धांनाही खिळवून ठेवतील हे निश्चित!

 

० बादशहाची अंगठी ० गंगटोकमधील गडबड ० सोनेरी किल्ला
० दफनभूमितील गूढ ० कैलासातील कारस्थान ० रॉयल बेंगॉलचे रहस्य
० गणेशाचे गौडबंगाल ० केस-‘अ‍ॅटॅची’ केसची ० काठमांडूतील कर्दनकाळ
० मुंबईचे डाकू ० देवतेचा शाप ० मृत्यूघर



1,140.00 Add to cart

विश्राम गुप्ते त्रिधारा

चेटूक – ऊन – ढग


विश्राम गुप्ते हे मराठीतले आघाडीचे कादंबरीकार, समीक्षक आणि अनुवादक म्हणून प्रसिद्ध आहेत. धर्म, स्त्री-पुरुष नातेसंबंध, मानवी मन, कुटुंबव्यवस्था हे त्यांच्या चिंतनाचे विषय असून यांबद्दल ते आपल्या कादंबरी तसंच ललितेतर लेखनातून चिकित्सा करत असतात. अभिजात साहित्याबरोबरच मराठीतल्या नव्याने लिहणाऱ्या तरुण लेखकांचं लेखन ते आस्थेने वाचतात. त्याबद्दलही ते चिकित्सक दृष्टिकोन ठेवून टीकात्मक लिहितात. त्यांच्या पुस्तकांना राज्य शासनाच्या पुरस्कारांबरोबरच इतरही महत्त्वाचे पुरस्कार मिळाले आहेत.

प्रेम…

एक संकल्पना,

कौटुंबिक नातेसंबंध,

आणि

व्यक्तिगत जाणिवांचा

खोलवर शोध…

हे आहे

या त्रिधारेचे सूत्र.

अभिजात

कथनवैशिष्ट्यं असलेली

विश्राम गुप्ते लिखित

संग्राह्य कादंबरीत्रयी…


1,025.00 Add to cart

असा घडला भारत (जनआवृत्ती)

१९४७ पासूनच्या घटना-घडामोडींतून उलगडलेला स्वतंत्र भारत


संपादन :

गंभीर वृत्तीचे अनुवादक, संपादक व लेखक म्हणून मिलिंद चंपानेरकर विख्यात आहेत. त्यांनी आजवर ‘लोककवी साहीर लुधियानवी' (मूळ लेखक : अक्षय मनवानी), ‘त्या दहा वर्षांतील गुरू दत्त' (मूळ लेखक - सत्य सरन), ‘सुन मेरे बंधू रे - एस.डी. बर्मन यांचं जीवनसंगीत' (मूळ लेखक - सत्या सरन), ‘वहिदा रेहमान... हितगुजातून उलगडलेली', (मूळ लेखक- नसरीन मुन्नी कबीर), ‘ए.आर. रहमान : संगीतातील वादळ' (मूळ लेखक - कामिनी मथाई), ‘भारतातील डाव्या चळवळीचा मागोवा’ (मूळ लेखक - प्रफुल्ल बिडवई), ‘गुड मुस्लीम बॅड मुस्लीम' (मूळ लेखक - महमूद ममदानी, सह-अनुवादक - पुष्पा भावे) यांसारख्या महत्त्वाच्या पुस्तकांचा अनुवाद केला असून ‘यांनी घडवलं सहस्रक' आणि ‘असा घडला भारत' या महद्ग्रंथांसाठी सह-संपादन, संशोधन व लेखन केलं आहे. त्यांनी दैनिक ‘इंडियन एक्स्प्रेस'साठी १९९१-२००० या कालावधीमध्ये पत्रकारिता केली आहे. गेली तीन दशकं त्यांनी विविध मराठी दैनिक आणि नियतकालिकांमधून समाजाभिमुख साहित्य, नाट्य व चित्रपटविषयक समीक्षापर लेखन आणि त्याचप्रमाणे, सामाजिक-राजकीय विषयांवर विश्लेषणात्मक लेखन केलं आहे. त्यांना ‘लोकशाहीवादी अम्मीस...दीर्घपत्र' या अनुवादित पुस्तकासाठी सर्वोत्कृष्ट अनुवादाचा २०१६ सालचा ‘साहित्य अकादमी' पुरस्कार प्राप्त झाला आहे.


भारताचा प्रदीर्घ स्वातंत्र्यलढा यशस्वी होऊन १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. अनेकविध समस्यांचं ओझं घेऊन आणि मोठी स्वप्नं उराशी बाळगून आपल्या नव स्वतंत्र देशाने वाटचाल सुरू केली. पुढील ६५ वर्षांच्या प्रवासात अशा अनेक महत्त्वपूर्ण घटना-घडामोडी घडून गेल्या ज्यामुळे देशाची वाटचाल नियत झाली वा ज्यातून विविध क्षेत्रांतील वळणं दिसून आली. अशा घटनांचा मागोवा या ग्रंथात घेतला आहे.
स्वातंत्र्यानंतर सुरुवातीच्या काळात मूलभूत स्वरूपाच्या कोणत्या गोष्टी घडून आल्या? पुढील काळात राजकारण-समाजकारण कसं बदलत गेलं? अर्थ-उद्योग ते विज्ञान आदी क्षेत्रात कसे बदल संभवत गेले? कितपत विकास साध्य झाला आणि कशा बाबतीत अधोगती संभवली? आपल्या वाटचालीच्या दृष्टीने कोणत्या आंतरराष्ट्रीय घटना अनुकूल वा प्रतिकूल ठरल्या? चित्रकला, नाट्यक्षेत्र ते चित्रपटमाध्यम यातून बदलत्या परिस्थितीचं प्रतिबिंब किती परिणामकारकतेने प्रतीत झालं? क्रीडाविश्वात काय बदल घडले? अशा प्रश्नांची उत्तर देणाऱ्या व जनजीवन घडवणाऱ्या विविध क्षेत्रांतील घटना आणि त्याचप्रमाणे जनजीवन विस्कळीत करणाऱ्या मोठ्या नैसर्गिक आपत्ती-दुर्घटना आदींचाही वेध या ग्रंथातून घेतला आहे.
गतकाळातील घटनांचा जास्तीतजास्त तटस्थतेने मागोवा घेण्याचा आम्ही यत्न केला आहे. त्यामागे केवळ स्मृतींना उजाळा द्यावा इतका मर्यादित उद्देश नाही. ज्यांनी हा काळ पाहिला आहे, त्यांना या गतघटनांचं नव्याने आकलन व्हावं ही अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे उगवत्या पिढीला गतकाळाचं नेमकं भान यावं व समकालीन घटनांचा अन्वयार्थ लागावा, हे अभिप्रेत आहे. एकंदरीत, आपल्या भोवतालाचं समग्र भान देऊ पाहणारा असा हा महद्ग्रंथ असा घडला भारत !


1,000.00 Add to cart

अरुण टिकेकर ५ पुस्तकांचा संच

 


निश्चित अशी वैचारिक बैठक असलेले आणि अभ्यासक, संशोधक असा डॉ. अरुण टिकेकरांचा नावलौकिक आहे. अभ्यासपूर्ण आणि संशोधनात्मक लेखन हा टिकेकरांचा मुख्य लेखन-प्रांत असला तरी त्यांनी ललित लेखनासह लेखनाचे अनेक बंध लीलया पेलले आहेत. मात्र, तसं करताना मांडणीतली शिस्त, शब्दप्रयोगातला काटेकोरपणा आणि भाषेतला प्रभावीपणा कधीच कमी होऊ दिला नाही. सकस आशय हेही टिकेकरांच्या लेखनातलं वैशिष्ट्य राहिलं आहे. लेखन, संपादन, संशोधन यांसोबतच टिकेकरांनी आपली रसिकताही जोपासली. शास्त्रीय संगीतात ते मनापासून रमत असत. पं.कुमार गंधर्व हे त्यांचे आवडते गायक होते. क्रिकेट ही त्यांची विशेष आवड होती. आंतरविद्यापीठीय स्तरावरील सामन्यांत ते खेळलेही आहेत. मधुबाला ही त्यांची आवडती अभिनेत्री होती, तर गीता दत्त हिच्या गाण्यातला दर्द त्यांना भिडायचा. टिकेकरांचं व्यक्तिमत्त्व भारदस्त, तर चर्या अभ्यासकाची, गंभीर होती. स्वभावाने ते परखड, तर वृत्तीने अलिप्त होते... पण अशा प्रतिमेपलीकडचेही टिकेकर होते... निरागस, हळुवार, भावुक, चोखंदळ... आपल्या आवडत्या माणसांमध्ये मनापासून रमणाऱ्या टिकेकरांचं १९ जानेवारी २०१६ रोजी अकस्मात निधन झालं.

१) POWER, PEN AND PATRONAGE = Rs. 295

२) अक्षरनिष्ठांची मांदियाळी = रु. १९०

३) कालचक्र  = रु. २००

४) कलान्तर =  रु. २००

५) इति – आदि = रु. ५००


रु. १,३८५ ची पुस्तकं सवलतीत रु. ९९९ मध्ये (टपाल खर्चासह) घरपोच मिळवा!


999.00 Add to cart

व्योमकेश बक्षी रहस्यकथा संच

४ पुस्तकांचा सप्रेमभेट संच


शरदिन्दु बंद्योपाध्याय यांचा जन्म ३० मार्च १८९९मध्ये उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे झाला. त्यांचा पहिला काव्यसंग्रह १९१९ साली प्रसिद्ध झाला. त्या वेळी ते कलकत्ता (आताचे कोलकाता) येथील महाविद्यालयात शिकत होते. ते हॅरिसन रोड (आताचा महात्मा गांधी रोड) वरील एका मेसमध्ये राहात होते. मेसमधील त्यांची खोली हे व्योमकेश बक्षीचेही पहिले घर ठरले. कायदेशास्त्राचा त्यांनी अभ्यास केला आणि नंतर त्यांनी लेखनास वाहून घेतलं. पहिली व्योमकेश बक्षी कथा त्यांनी लिहिली ती १९३२ साली. तोवर ते नामवंत लेखक झालेले होते. १९३८ साली ते मुंबईला आले आणि 'बॉम्बे टॉकीज' व नंतर अन्य कंपन्यांसाठी पटकथा लेखन करू लागले. १९५२पर्यंत ते मुंबईत होते. मग पटकथालेखन त्यांनी थांबवलं आणि पुन्हा ललित लेखनाकडे वळण्याचा त्यांनी निर्धार केला. त्यांनी पुण्याला स्थलांतर केलं. त्यांनी बंगालीत भूतकथा, ऐतिहासिक प्रणयकथा आणि बालकथा देखील लिहिल्या आहेत. उर्वरीत आयुष्य त्यांनी पुण्यातच व्यतीत केलं आणि २२ सप्टेंबर १९७०मध्ये त्यांचं निधन झालं.

अनुवाद :
'रोहन'चे एक ‘कलंदर’ लेखक. पत्रकारिता, अनुवाद, सदर लेखन ते ललित लेखनामध्ये अनेक वर्षं मुशाफिरी केलेला ‘ज्येष्ठ लेखक’ म्हणून परिचित होते. त्यांना व्यासंगी पत्रकारितेचा चार दशकाहून अधिक अनुभव होता. तसंच त्यांना पालिका बैठकीपासून आंतरराष्ट्रीय शिखर परिषदांचे वृत्तांत देण्यापर्यंतचा समृद्ध अनुभव होता. दैनिक सकाळ, तरुण भारत व केसरी या वृत्तपत्रांतून काम केल्यानंतर ते महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्रात दाखल झाले. महाराष्ट्र टाइम्सचे दिल्ली प्रतिनिधी म्हणून त्यांनी ११ वर्षं काम केलं. तेथून त्यांनी लिहलेली 'राजधानीतून' ही वार्तापत्रं विशेष गाजली. त्यानंतर अनेक वर्षं त्यांनी ‘मटा’चे कार्यकारी संपादक म्हणून काम केलं. 'कलंदर' या टोपण नावाने 'कानोकानी' हे त्याचं सदरही विशेष लोकप्रिय झालं. अनुवाद क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केली असून त्यामध्ये इंदिरा गांधी (पुपुल जयकर), शेषन (के. गोविंदन कुट्टी), इंदिरा अंतिम पर्व (पी. सी. अलेक्झांडर), लता मंगेशकर (हरीश भिमानी), फॅन्टॅस्टिक फेलूदा (सत्यजित रे पुस्तकांची मालिका), लाल बहादूर शास्त्री (पी. एन. धर), कस्तुरबा : एक शलाका (अरुण गांधी), आर. डॉक्युमेंट (आयर्विंग वॉलेस) यांचा समावेश होतो. हे सर्व अनुवाद त्यांना उत्कृष्ट तर होतेच, परंतु ते लोकप्रियही झाले. सर्वोत्कृष्ट अनुवादासाठी साहित्य अकादमी, राज्य सरकार व अनुवाद सुविधा केंद्र यांचे पुरस्कार त्यांना लाभले. 'कानोकानी' या पुस्तकाला मसापचा चि. वि. जोशी पुरस्कार लाभला.


दूरदर्शनवर चोखंदळ प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा चाणाक्ष गुप्तहेर व्योमकेश बक्षी आता मराठीत… व्योमकेश बक्षी स्वत:ला गुप्तहेर म्हणवून घेत नाही; तर तो स्वत:ला ‘सत्यान्वेषी’ असं म्हणवून घेतो. कारण त्याच्याकडे आलेल्या प्रत्येक रहस्यमय प्रकरणातील अंतिम सत्याचा तो शोध घेतो. व्योमकेश प्रत्येक प्रकरणातील रहस्याचा ज्याप्रकारे तर्कसंगत उलगडा करतो ते पाहून थक्क व्हायला होतं. त्याचं बौद्धिक चापल्य, टप्प्याटप्प्याने रहस्य भेदत छडा लावण्याचं कौशल्य हे अत्यंत रोचक आहे. निखळ आनंद देणार्‍या या कथा वाचकाचं मन रिझवण्याबरोबरच त्याची मतीही गुंग करून टाकतील!



960.00 Add to cart

रस्किन बाँड संच

भावस्पर्शी व रोमांचक कथांचा गुलदस्ता


रस्किन बाँड या एक अँग्लो- इंडियन लेखकचा जन्म 19 मे १९34 रोजी कसौली इथे झाला. चार वर्षांचे असताना त्यांचे आई-वडील विभक्त झाले आणि वडिलांच्या मृत्यूनंतर वयाच्या दहाव्या वर्षी ते आपल्या आजीच्या घरी, देहरादूनला गेले. वयाच्या सोळाव्या वर्षी, त्यांनी पहिली लघुकथा लिहिली आणि त्याला पारितोषिकही मिळालं. तेव्हापासून त्यांची लेखणी अविरत साहित्यनिर्मिती करत राहिली. पुढे त्यांनी दोन वर्षांसाठी इंग्लंडला आपल्या मावशीकडे वास्तव्य केलं आणि तिथेच आपल्या पहिल्या कादंबरी लेखनाला सुरुवात केली. या कादंबरीला वाचक व समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. भारतात परतल्यानंतर त्यांनी विविध नियतकालिकांमध्ये लेखन केलं, तसंच काही नियतकालिकांचं संपादनही केलं. मोठ्यांबरोबरच लहान मुलांसाठीही भरपूर साहित्यनिर्मिती केली. आजवर त्यांच्या कथा - कादंबऱ्यांवर नामवंत दिग्दर्शकांनी चित्रपटही तयार केले आहेत. साहित्यातील भरीव योगदानासाठी त्यांना 'साहित्य अकादमी पुरस्कार', तसंच 'पद्म भूषण पुरस्कार' यांसारखे अनेक मान्यताप्राप्त पुरस्कार मिळाले आहेत.

 

अनुवाद :

नीलिमा भावे यांनी कथा, ललित लेख, वैचारिक लेखन, बाल साहित्य, संशोधनपर लेखन अशा विविध साहित्यप्रकारांत लेखन- मुशाफिरी केली असून त्यांनी बंगालीमधून मराठी अनुवादही केले आहेत. संपादनंही केली आहे. त्याशिवाय त्यांनी विविध नियतकालिकांमधून साहित्य व सामाजिक विषय लेखनही केलं आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनवरील चर्चांमध्ये त्यांनी सहभाग घेतला असून मुलाखतीही घेतल्या आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार आणि इतरही साहित्य संस्थांचे सन्माननीय पुरस्कार मिळाले आहेत.
अनुवाद, चित्रकला आणि लेखन-वाचन यांमध्ये विशेष रस असलेल्या रमा यांनी माधुरी पुरंदरे यांनी पुस्तकं मराठीतून इंग्रजीत भाषांतरित केली आहेत. त्यांना फ्रेंच , इंग्रजी आणि मराठी भाषांमधली ललित साहित्याची पुस्तकं अनुवादित करायला आवडतात. लहान मुलांसाठीही त्या लेखन करतात. आजवर त्यांनी वीसपेक्षा जास्त कलाकृतींची भाषांतरं केली असून त्यांना 'डेली हंट'ने आयोजित केलेल्या कथास्पर्धेत पारितोषिकही मिळालं आहे.


सुप्रसिद्ध अँग्लो-इंडियन लेखक रस्किन बाँड
यांची सगळी जडणघडण झाली ती भारतात. देहरादूनसारख्या हिमालयाच्या कुशीत वसलेल्या निसर्गरम्य प्रदेशात.
त्यामुळे साहजिकच हिमालयातला निसर्ग, तिथलं लोकजीवन, तिथली माणसं,
त्यांचे अनुभव आदी गोष्टी त्यांच्या कथांमधून शब्दरूप घेऊन येतात. त्यांच्या
कथा-कादंबर्‍यांची पन्नासहून अधिक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत! (खर्‍या अर्थाने साहित्य क्षेत्रातले ‘बाँड’च!) त्यांनी थरारकथा, भयकथा, गूढकथा, रहस्यकथा, प्रेमकथा आणि साहसकथा असे कथांचे विविध प्रकार हाताळले असले, तरी भावनाशील व संवेदनशील वृत्तीचा एक समान धागा त्यांच्या सगळ्या कथांमधून जाणवत राहतो. त्यातल्याच ३९ निवडक कथांच्या ६ पुस्तकांची ही पुस्तक-मालिका; खास तुमच्यासाठी !
तुम्ही या पुस्तक मालिकेतली एखादी जरी कथा वाचली ना, तरी तुम्ही ही सगळी पुस्तकं पुन्हा पुन्हा वाचून काढाल; एवढ्या या कथा इंटरेस्टिंग आहेत! या कथा वाचण्यात वाचून तुम्ही रममाण तर व्हालच, त्याचबरोबर तुमचा आजूबाजूच्या जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही ‘ब्रॉडर’ होईल…
तेव्हा, रस्किन बाँड यांच्या या कथा-दुनियेत तुमचं मनापासून वेलकम!


900.00 Add to cart
1 2 51