









रोहनचे सर्जनशील लेखक...
'रोहन'ची पुस्तकं जाणून घ्या...
पॉल गोगँ एक कलंदर कलाकार
मॉडर्न आर्टचा जनक पॉल गोगँ…. एक जगप्रसिद्ध प्रतिभावान कलाकार….. सिम्बॉलिझम, सिंथेटिझम, क्लाइझोजिनम अशा चित्रकलेतील विविध शैली त्याने विकसित केल्या आहेत. चित्रकलेसोबतच त्याने शिल्पकला (Sculpture), काष्ठशिल्प (Woodcraft), सिरॅमिक या माध्यमांतूनही त्याने प्रचंड निर्मिती केली आहे. अनेक समकालीन चित्रकारांमध्ये गोगँने स्वतःची वैशिष्ट्यं राखली आणि एवढंच नव्हे तर, पिकासोसारख्या कलाकारावरही गोगँच्या चित्रकलेचा प्रभाव दिसून येतो.
या पुस्तकात लेखिका डॉ. माधवी मेहेंदळे यांनी गोगँच्या एकंदर कलाप्रवासाचा आणि कलावैशिष्ट्यांचा मागोवा घेतला आहे. त्यातील अनेक पैलू उलगडले आहेत. कलाविश्वातील त्याच्या मुशाफिरीसोबतच पुस्तकात त्याच्या वैयक्तिक जीवनाचा, नातेसंबंधांचा, व्यक्तिमत्त्वाचा आणि मनस्वी स्वभावाचाही धांडोळा घेतला आहे. ताहिती बेटावरील वास्तव्य हा गोगँच्या आयुष्यातील जिव्हाळ्याचा विषय… त्याचेही तपशील पुस्तकात सापडतील.
पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे गोगँच्या कलावैशिष्ट्यांची वाचकांना प्रचिती यावी यासाठी पुस्तकात अनेक तपशिलांसह समाविष्ट केलेली रंगीत चित्रं. चित्रकलेच्या इतिहासात ‘माइल स्टोन’ ठरलेल्या कलाकाराचा सर्वांगीण धांडोळा घेणारं पुस्तक पॉल गोगँ : एक कलंदर कलाकार
मी जयुराणा
…माझी ‘मनोहरी’ कहाणी
शब्दांकन :
बापू आणि मालिनी यांची ‘मॅनलीवुमन’ असलेली जयुराणा आणि मनोहर यांची जयु… तिच्या आठवांचा हा जागर ! ‘हजारो फुलं बहरू दे’ हा स्त्री चळवळीचा नारा बुलंद करणाऱ्या जयुराणा म्हणजे एक अजब रसायन आहे. आरामात राम नाही आणि दामही नाही, असं म्हणत त्यांनी केलेल्या कष्टाचा, श्रमाचा गंध या आत्मकथनात दरवळत राहतो. माणसांशी गोडवा टिकवणारी माणुसकी, प्रेम आणि प्रामाणिकपणाला सतत महत्त्व देणारी जगण्याची तत्त्वं समान असणारं सासर-माहेर मिळाल्यामुळे त्यांचं जगणं सुखकर कसं झालं याचा हा आलेख खरोखरच मनोहारी आहे.
वाद, भांडण, भीतीच्या पल्याड जाऊन केवळ प्रेम आणि विश्वास यांवरच आपण जिंकू शकतो, ती प्रेमभावना निरागस ठेवत, समजून घेत निबिड अंधारातही उजेडाची प्रकाशरेषा उमटवू शकतो! ही प्रकाशरेषा म्हणजे अस्सल जगण्याचा स्रोत यावर अपार विश्वास ठेवत त्यांनी अखंडपणे माणसं जोडली. दोन महिन्यांच्या माधुरीचा इवलासा जीव भुर्र उडून गेल्यावरचा काळीज-कल्लोळ आणि आत्मिक पूर्तता झालेला सुधारक पुरुष मनोहर यांचा स्वेच्छा मरणाचा निर्धार ऐकल्यावर झालेला जीवाचा थरकाप त्यांनी धीरोदात्तपणे पेलला. जीवे साहिलेल्या या टोकाच्या मरण वेणांनंतर दुःख-गुंत्यातून स्वतःला पार करत त्या सुखाचा धागा शोधत राहिल्या. माणसं जोडतच राहिल्या. या जयुराणाचा जीवनविषयक व्यापक दृष्टिकोन आत झिरपत सहजपणे त्यांच्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचतोय… माणूसमळा जपला जातोय…
डॉ. गीताली वि.म.
दि रेड हेअर्ड वुमन
अनुवाद :
पौंगडावस्थेत असताना लाल केसांची एक आकर्षक बाई सेमचं लक्ष वेधून घेते. आणि मग तो तिच्या विचाराने पुरता झपाटला जातो…. मनातल्या विचारचक्रात तीच आणि तीच! सेमचे वडील तत्पूर्वी गुढरित्या परागंदा झालेले असतात. शिक्षणासाठी पैशांची जमवाजमव करण्यासाठी सेम इस्तंबूलजवळ विहीर खणणाऱ्या मास्टर महमूत यांच्या हाताखाली काम करत असतो. सेमच्याच एका चुकीमुळे झालेल्या अपघातात महमूत दगावतो का…?
आता कथानक वेगळंच वळण घेतं….
कादंबरीचं कथानक जसजसं पुढे सरकतं, तसतसे नात्यातले गुंते गहन होत जातात. राजा इडिपसची ग्रीक पुराणकथा आणि रुस्तम व सोहराबर पर्शियन पुराणकथा यांची समांतर पातळीवर या गुंत्याशी लेखक सांगड घालत राहतो.
त्यामुळे या कादंबरीला वेगळे आयाम प्राप्त होतात….. वाचकांची उत्कंठा पानागणिक वाढत जाते. पुराणकथांची सांगड घालण्याचं प्रयोजन त्यांचं कुतूहल वाढवत जातं….. कोण होती ती लाल केसांची बाई? महमूतविषयीचं वास्तव काय होतं ? ग्रीक पुराणकथा पेरण्याचं प्रयोजन कोणतं?
नोबल पारितोषिकविजेते लेखक ओरहान पामुक यांची बेस्टसेलर कादंबरी…
मनसमझावन
या अनेकपदरी कथेचं कथानक चिन्मय, त्याचे आई-वडील, मैत्रीण, सामाजिक कार्यकर्ते अशा व्यक्तीपासून लालबाबाचा दर्गा, त्याचा शेजारचा म्हसोबा, दखनी भाषा यांनी वेगवेगळ्या कोनांतून केलेल्या कथनांद्वारे उलगडत जातं. ट्विटरवरचं चिन्मयचं अकाऊंट, व्हॉट्सअॅप, ‘लोकमत’ इतकेच नव्हे, तर कारसेवेसाठी बाभूळगावातून गेलेली एक वीट हेदेखील आपापल्या कथनांमधून स्वतःचं अंतर्विश्व उघड करतात.
एक रहस्यकथा सांगता सांगता भोवतालच्या गुंतागुंतीच्या सामाजिक परिस्थितीची उकल करण्याचा प्रयत्न ही कादंबरी करते. ती वाचताना उत्तरोत्तर वाढत चाललेल्या धार्मिक कट्टरपणाच्या उन्मादी वातावरणात आपण कोणत्या मूल्यांचा वारसा हरवून बसतो आहोत, याचं भान वाचकाला येतं.. ‘हिंदू’, ‘मुस्लिम’ या कप्पेबंद अस्मितांच्या पलीकडे जाणाऱ्या सामायिक, सांस्कृतिक धाग्यांनी बनलेल्या ‘भारतीयत्वा’ चा शोध ही कादंबरी घेते. हिंदू-मुस्लिम सहजीवनाची कल्पना मूळच्या सोशिक, उदार, सहिष्णु अशा पारंपरिक लोकधर्माला अनुसरल्याने प्रत्यक्षात येईल की त्यासाठी आधुनिक मूल्यांचा अंगीकार करणं गरजेचं आहे, असा कळीचा प्रश्न लेखकाने या कादंबरीत उपस्थित केला आहे.
डॉ. नीतीन रिंढे
सॉक्रेटिस कधी मरत नसतो
भावानुवाद :
हिंदी साहित्यविश्वातील आणि विशेषतः काव्यप्रांतातील एक महत्त्वाचे नाव म्हणून माधव कौशिक यांच्याकडे पाहिलं जातं. गझल, भावकविता, खंडकाव्य इत्यादी काव्यप्रकारांत त्यांनी केलेले लेखन महत्त्वाचे मानले जाते. जवळ जवळ पंचवीस कवितासंग्रह त्यांच्या नावावर आहेत. पौराणिक कथानकांतून समकालीन वास्तवाचे आणि भावभावनांचे चित्रण करण्याचे त्यांचे कसब निश्चितच अव्वल असे आहे. कविता या वाङ्मयप्रकारासोबतच त्यांच्या गद्यलेखनाचा आणि बालसाहित्याचाही विशेषत्वाने उल्लेख करावा लागेल.
कथाकार म्हणून त्यांनी मोजके लेखन केले असले तरी त्यांच्या कथा या वेगळेपणाने उठून दिसणाऱ्या आहेत. त्या लघुकथा या प्रकारात मोडणाऱ्या कथा आहेत. जगण्यातील सामान्य घटना, सामान्य माणसांच्या जीवनातील अनवट प्रसंगातून, घटनांतून उभे राहणारे पेचप्रसंग आणि त्यातून जीवन समजून घेण्याचा माधव कौशिकांचा प्रयत्न अधिक आश्वासक आणि अर्थपूर्ण वाटतो.
मराठीतील प्रथितयश कथाकार, कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे यांनी या कथांचा केलेला मराठी भावानुवाद भाषिक अडसरांना बाजूला सारत मानवी जीवनाच्या गाभ्यापर्यंत घेऊन जाण्यात यशस्वी झालेला आहे.
मराठी वाचकांना वेगळी अनुभूती देणारा कथासंग्रह….
बारीक बारीक आवाज वाढत चाललेत
बारीक बारीक आवाज वाढत चाललेत या स्नेहा अवसरीकर यांच्या पहिल्यावहिल्या कथासंग्रहात माणसामाणसांतल्या नात्यांचे विविध अविष्कार पाहायला मिळतात.
कुठे काका-पुतण्यातल्या पारंपारिक नात्याच्या पलीकडे जाणारं, आपल्या पुतण्याबरोबरचं आत्मीय नातं जपणारे केशवकाका तर कुठे स्वतःच्या एकाकी आयुष्याचं प्रतिबिंब एका कबुतराच्या पिल्लात पाहून त्याच्याशी नातं जोडणाऱ्या वृंदाताई. कधी आपल्या दिवंगत सावत्र सासूचा केवळ फोटो पाहून तिच्याशी नातं जुळवलेली नंदी तर कधी स्वतःच्या अस्तित्वाचं भान आल्यावर स्वतःशीच नातं जोडणारी ‘मी’.
नवऱ्याला आलेल्या त्याच्या मैत्रिणीच्या मेल्स वाचून हादरून गेलेली एखादी सुभद्रा अखेर कुठलीच नाती संपूर्णपणे आपली असणार नाहीत, हे समजून घेते तर एखादी रश्मी काही नाती निर्घृणपणे तोडावी लागतात, याचं भान ठेवून ईश्वरबरोबरच आपलं नातं मर्यादित अंतरावर राखण्याची शहाणीव दाखवते. एकीकडे युनियनद्वारे संपूर्ण भारतातल्या रेडिओ स्टेशन्सवर काम करणाऱ्या स्टाफशी नातं जोडू पाहणारी राधिका तर दुसरीकडे रेडिओतल्या आपल्या सहकाऱ्याबरोबर निर्माण झालेलं अबोल, अस्फुट नातं मनातच ठेवत त्याच्यापासून दूर होणारी इशा ….
आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर उमलणाऱ्या आणि मिटणाऱ्या…. अशा या तरल नात्यांच्या कथा वाचकांच्या मनात त्यांच्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगांच्या स्मृती जाग्या करतील.
सुबोध जावडेकर
गोल्पे विभोर
विश्वाच्या उत्पत्तीच्या रंजक इतिहासापासून भविष्यात विश्व कसं असेल इथपर्यंत
अनुवाद :
बाणी बसू या बंगालमधील एक प्रतिथयश लेखिका, कवयित्री, समीक्षक आणि अनुवादिका आहेत. त्या अनेक वर्षं इंग्रजीच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. बसू यांच्या आजवर अनेक कादंबऱ्या, कथासंग्रह आणि लहान मुलांसाठीचं लेखन प्रसिद्ध झालं आहे. ‘खनामिहिरेर ढिपी’ या त्यांच्या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला आहे. प्रत्येक लेखकाची स्वतःची अशी वेगळी शैली असते. बसू यांच्या साहित्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं लेखन कधीही एकसूरी वाटत नाही. त्यांच्या लेखनात भाषेची आणि कल्पनेची पुनरुक्ती दिसत नाही. त्या जेव्हा लेखन करतात तेव्हा त्यांच्या मनात वाचकांच्या इच्छापूर्तीचा विचार नसतो. वाचकांना आवडेल, असं लेखन करणं त्यांना अमान्य नाही; पण निव्वळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्या मार्गाचा अवलंब त्या करत नाहीत. ‘गल्पेर बागान’ आणि ‘गोल्पे विभोर’ या दोन्ही कथासंग्रहात याचा प्रत्यय येतो. कथांमधील परावर्तित झालेली त्यांची विचारांची सखोलता, सूक्ष्मता आणि तरलता यामुळे वाचकाला लेखिकेच्या प्रतिभासंपन्नतेचं आणि संवेदनक्षम मनाचं दर्शन घडतं. वाचकांना गुंतवून ठेवणारे आणि बंगाली, संस्कृतीची मोहवती झलक देणारे दोन कथासंग्रह… गल्पेर बागान व गोल्पे विभोर
गल्पेर बागान
विश्वाच्या उत्पत्तीच्या रंजक इतिहासापासून भविष्यात विश्व कसं असेल इथपर्यंत
अनुवाद :
बाणी बसू या बंगालमधील एक प्रतिथयश लेखिका, कवयित्री, समीक्षक आणि अनुवादिका आहेत. त्या अनेक वर्षं इंग्रजीच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. बसू यांच्या आजवर अनेक कादंबऱ्या, कथासंग्रह आणि लहान मुलांसाठीचं लेखन प्रसिद्ध झालं आहे. ‘खनामिहिरेर ढिपी’ या त्यांच्या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला आहे. प्रत्येक लेखकाची स्वतःची अशी वेगळी शैली असते. बसू यांच्या साहित्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं लेखन कधीही एकसूरी वाटत नाही. त्यांच्या लेखनात भाषेची आणि कल्पनेची पुनरुक्ती दिसत नाही. त्या जेव्हा लेखन करतात तेव्हा त्यांच्या मनात वाचकांच्या इच्छापूर्तीचा विचार नसतो. वाचकांना आवडेल, असं लेखन करणं त्यांना अमान्य नाही; पण निव्वळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्या मार्गाचा अवलंब त्या करत नाहीत. ‘गल्पेर बागान’ आणि ‘गोल्पे विभोर’ या दोन्ही कथासंग्रहात याचा प्रत्यय येतो. कथांमधील परावर्तित झालेली त्यांची विचारांची सखोलता, सूक्ष्मता आणि तरलता यामुळे वाचकाला लेखिकेच्या प्रतिभासंपन्नतेचं आणि संवेदनक्षम मनाचं दर्शन घडतं. वाचकांना गुंतवून ठेवणारे आणि बंगाली, संस्कृतीची मोहवती झलक देणारे दोन कथासंग्रह… गल्पेर बागान व गोल्पे विभोर
मुडकं कुंपण
समाजातील दांभिकतेवर भाष्य करणाऱ्या… हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना-प्रसंगांमधून गावजीवनाचं, त्यातल्या स्त्री-जीवनाचं अस्सल चित्रण करणारी कादंबरी…. मुड़क कुपण