वामनाचे चौथे पाउल

विज्ञान कथांच्या माध्यमातून भविष्याचा घेतलेला वेध



वामनाचे चौथे पाऊल

तीन पावलांत तिन्ही लोक पादाक्रांत करून, चौथे पाऊल कुठे ठेवू, असा प्रश्न वामनाचे बळीराजाला विचारला होता.

नेमका हाच प्रश्न आज विज्ञान माणसाला विचारत आहे. अवघे विश्व व्यापून टाकणाऱ्या विज्ञानाचे पुढचे पाऊल उद्या कुठे पडणार आहे?

या प्रश्नाचे उत्तर शोधायचा हा प्रयत्न . विज्ञानकथेच्या माध्यमातून भविष्याचा घेतलेला हा वेध.

पण या कथा विज्ञानाच्या नाहीत . विज्ञान सोपे करून समजावून सांगावे , यासाठी सांगितलेल्या तर नाहीच नाही.

या आहेत माणसाच्या कथा.

फार तर, उद्याच्या माणसाच्या म्हणा.

250.00 Add to cart

अणुविश्वातील ध्रुव : डॉ. अनिल काकोडकर



अणुविश्वात डॉ. अनिल काकोडकर यांचं नाव मोठ्या आदराने घेतलं जातं, ते त्यांनी केलेल्या भरीव कार्यामुळे. `ध्रुव’सारखी अणुभट्टी कार्यान्वित करणं असो, किंवा पोखरण अणुचाचण्या असोत – डॉ. काकोडकरांनी अशा कितीतरी महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये बहुमूल्य कामगिरी बजावली. एवढंच नव्हे, तर भारत-अमेरिका यांच्यातल्या अणुकराराच्या मसुद्यात देशहिताच्या दृष्टीने आवश्यक ते बदल करून घेण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.

अणुऊर्जेबरोबरच तंत्रज्ञान-संशोधन या विषयावरही त्यांनी सखोल चिंतन केलं. त्यातूनच भारताला तंत्रज्ञान व संशोधन क्षेत्रात भरारी घ्यायची असेल, तर शिक्षण-व्यवस्थेत आमूलाग्र बदल करणं आवश्यक आहे हे त्यांनी ओळखलं. त्यानुसार त्यांच्या संकल्पनेतून `सिलेज’, `शिक्षण पंढरी’ यांसारखे अनेक उपक्रम राबवले गेले. तसंच एपीजे अब्दुल कलाम यांच्या ‘व्हिजन २०२०’नंतर भारताच्या भविष्यकाळातल्या गरजा व विकास विशद करणारं `व्हिजन २०३५’ डॉक्यूमेंटही त्यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने तयार केलं. सध्या त्यानुसार अनेक उपक्रम व प्रकल्प राबवले जात आहेत.
अणुविश्वाबरोबरच तंत्रज्ञान-संशोधन आणि शिक्षण या क्षेत्रांत `ध्रुव’पद प्राप्त करणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीची व कार्याची ओळख करून देणारं हे चरित्र!


140.00 Add to cart

युरेका क्लब

संवादातून ओळख संशोधकांची आणि त्यांच्या संशोधनांची!


इन्स्ट्रुमेन्ट्स इंजिनिअरिंगमध्ये बीई केलेल्या गौरी यांनी पुणे विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. शालेय काळापासूनच त्या भारतीय शास्त्रीय नृत्याचं शिक्षण घेत असून त्या भरनाट्यम् शिकल्या आहेत. सध्या ती विविध वयोगटाला भरतनाट्यम शिकवण्याचा आनंद घेत आहेत.

गप्पांमधून, संवादामधून संशोधकांची, त्यांनी लावलेल्या शोधांची आणि त्यांच्या आयुष्यातील गमतीजमतींची माहिती ‘शेअर’ करण्याचा क्लब म्हणजे ‘युरेका क्लब’!
या क्लबची भन्नाट आयडियाही शाल्मली, ईशा, अनिकेत, प्रणव आणि विराज अशा तुमच्यासारख्या मुलांचीच! या मुलांबरोबर या क्लबमध्ये आहे, एक ताई. तिने सायन्समधून एम.एस्सी. केलंय. मुलांच्या कलाने शिकवायची विलक्षण हातोटी तिच्याकडे आहे. मुलं तिच्याशी संशोधकांबद्दल बोलतात, प्रश्न विचारतात. कधी इंटरनेटचा वापर करून, तर कधी एनसायक्लोपीडिया वाचून शास्त्रज्ञांची माहिती गोळा करतात. इतकंच नाही, तर मोठ्या माणसांसारखी ‘प्रेझेंट’ही करतात! जिथे मुलं अडतात किंवा ताईला जास्तीची माहिती द्यावीशी वाटते तिथे ताई सहजसोप्या शब्दांत, न चिडता किंवा न ओरडता ती समजावून सांगते! आणि मग या संवादातून मिळत जाते युक्लिड, कोपर्निकस, आर्किर्मिडीज, न्यूटन, मेरी क्यूरी, आइनस्टाइन यांसारख्या २६ संशोधक आणि त्यांच्या शोधकार्याची माहिती!
ताई व मुलांच्या या ‘इनोव्हेटिव्ह’ गप्पांमधून तुम्हालाही उलगडत जातील अनेक संशोधनांमधली मर्मं आणि मग तुमच्याही तोंडून नकळत उद्गार बाहेर पडतील– ”युरेका… युरेका… युरेका क्लब!”


100.00 Add to cart

विज्ञानाच्या उज्ज्वल वाटा

भविष्यकालीन विज्ञानाचा वेध घेऊन विद्यार्थ्यांना केलेलं बहुमोल मार्गदर्शन



सहलेखक :
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबादमधून सृजन पाल सिंग यांनी शिक्षण घेतलं असून त्यांना 'चतुरस्र विद्यार्थी' म्हणून सुवर्णपदक मिळालं आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या भागांमध्ये पारदर्शक व्यवस्था उभारण्याच्या कामात ते 'बॉस्टन कन्सल्टिंग ग्रुप'सोबत काम करत आहेत. स्वित्झर्लंडमधील सेंट गॅलन सिम्पोसियम यांच्या 'ग्लोबल लीडर ऑफ टुमॉरो' या किताबासाठी त्यांचं नामांकन करण्यात आलं होतं . सृजन भारतातल्या ग्रामीण भागांत जाऊन तिथे कायमस्वरूपी विकासात्मक व्यवस्था तयार करता यावी, यासाठी विविध संस्थांसोबत काम करतात . महत्त्वाच्या नियतकालिकांमधून त्यांचे लेख प्रकाशित झाले असून ते सध्या गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या प्रकल्पात काम करत आहेत.

अनुवाद :
मराठीतल्या आघाडीच्या तरुण लेखकांमध्ये प्रणव सखदेव यांचं नाव घेतलं जातं. त्यांनी अग्रगण्य मराठी दैनिकांत पत्रकार म्हणून काम केलं असून ते मराठी प्रकाशन क्षेत्रामध्ये संपादक व अनुवादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कथा आणि कविता मान्यवर नियतकालिकांमधून प्रकाशित होत असतात. ‘पायऱ्यांचा गेम आणि इतर कविता’ हा कवितासंग्रह, 'निळ्या दाताची दंतकथा’, ‘नाभितून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य' हे कथासंग्रह, व ‘काळेकरडे स्ट्रोक्स', ‘96 मेट्रोमॉल’ या कादंबऱ्या असं त्यांचं साहित्य प्रकाशित झालं आहे. त्यांना अनुवाद-प्रकल्पासाठी २०१५-१६ सालची ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ची अभ्यासवृत्तीही मिळाली आहे. त्यांना लेखनासाठी महत्त्वाची पारितोषिकं मिळाली असून इंग्रजीतल्या गाजलेल्या पुस्तकांचा अनुवाद त्यांनी केला आहे. फिक्शन लेखन करणं ही त्यांची पॅशन असून त्यातून समकालातल्या प्रश्नांचा भिडणं हे त्यांना महत्त्वाचं वाटतं. आजच्या तरुणांची मानसिकता, त्यांचे प्रश्न, विखंडित जगणं व तंत्रज्ञानाचा वाढता वापर या सगळ्याचं प्रतिबिंब त्यांच्या लेखनात पडलेलं दिसून येतं.


भारताचे माजी राष्ट्रपती, ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि मुलांचे लाडके ‘शिक्षक’ ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि विख्यात तरुण लेखक सृजन पाल सिंग यांनी सखोल संशोधनातून हे पुस्तक साकारलं आहे. यात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या अतुलनीय कामगिरीने आपण काय साध्य केलं आहे व त्याचे आपल्या भविष्यावर काय परिणाम होणार आहेत, याची रंजक माहिती देण्यात आली आहे. या पुस्तकातून त्यांनी भविष्यकालीन विज्ञानाचा, त्यातील क्षेत्रांचा वेध घेऊन त्याविषयीचं व्यापक चित्र आजच्या विद्यार्थ्यांपुढे उभं केलं आहे. तसंच भविष्यात विज्ञानात मोठ्या प्रमाणावर विकसित होणार्‍या रोबोटिक्स, एरोनॉटिक्स (विमानविद्या), स्पेस सायन्स (अंतराळ विज्ञान), न्यूरोसायन्स (मेंदू विज्ञान) यांसारख्या ‘आउट ऑफ द बॉक्स’ करिअर्सचा सहजसोप्या भाषेत, पण सखोल परिचय करून दिला आहे.


250.00 Add to cart

इस्रो : झेप नव्या क्षितिजाकडे

मी अनुभवलेलं एक अभूतपूर्व स्वप्न


रामभद्रन आरवमुदन हे पुरस्कारप्राप्त वरिष्ठ शास्त्रज्ञ असून ते भारतीय अंतराळ कार्यक्रमाच्या स्थापनेपासून या कार्यक्रमाशी संलग्न राहिलेले आहेत. त्यांनी श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन स्पेस सेंटरचं तसंच बंगळुरू इथल्या इस्रो सॅटेलाइट सेंटरचं संचालकपद भूषविलं आहे.

 

सहलेखक :

गीता आरवमुदन या प्रसिद्ध पत्रकार, लेखिका असून त्यांनी बरीच पुस्तकं तसंच इतर विपुल लेखन केलं आहे. 'डिसअॅपियरिंग डॉटर्स : द ट्रॅजेडी ऑफ फीमेल फ्योटिसाइड’, 'अबाउंड : इंडियन वूमेन @ वर्क’, 'व्हॉइसेस इन माय ब्लड' ही त्यांची काही लोकप्रिय पुस्तकं आहेत.

अनुवाद : 

मराठीतल्या आघाडीच्या तरुण लेखकांमध्ये प्रणव सखदेव यांचं नाव घेतलं जातं. त्यांनी अग्रगण्य मराठी दैनिकांत पत्रकार म्हणून काम केलं असून ते मराठी प्रकाशन क्षेत्रामध्ये संपादक व अनुवादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कथा आणि कविता मान्यवर नियतकालिकांमधून प्रकाशित होत असतात. ‘पायऱ्यांचा गेम आणि इतर कविता’ हा कवितासंग्रह, 'निळ्या दाताची दंतकथा’, ‘नाभितून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य' हे कथासंग्रह, व ‘काळेकरडे स्ट्रोक्स', ‘96 मेट्रोमॉल’ या कादंबऱ्या असं त्यांचं साहित्य प्रकाशित झालं आहे. त्यांना अनुवाद-प्रकल्पासाठी २०१५-१६ सालची ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ची अभ्यासवृत्तीही मिळाली आहे. त्यांना लेखनासाठी महत्त्वाची पारितोषिकं मिळाली असून इंग्रजीतल्या गाजलेल्या पुस्तकांचा अनुवाद त्यांनी केला आहे. फिक्शन लेखन करणं ही त्यांची पॅशन असून त्यातून समकालातल्या प्रश्नांचा भिडणं हे त्यांना महत्त्वाचं वाटतं. आजच्या तरुणांची मानसिकता, त्यांचे प्रश्न, विखंडित जगणं व तंत्रज्ञानाचा वाढता वापर या सगळ्याचं प्रतिबिंब त्यांच्या लेखनात पडलेलं दिसून येतं.


डॉ. विक्रम साराभाई यांनी ६०च्या दशकात काही तरुण इंजिनिअर्सना आणि शास्त्रज्ञांना आपल्या चमूत घेऊन एक बीज रोवलं होतं. त्यात रामभद्रन आरवमुदन हा पंचविशीचा तरुणही होता. त्यांच्यापुढे आव्हान ठेवलं होतं ते एक रॉकेट लाँचिंग केंद्र उभारण्याचं. आणि या तरुणांनी हे आव्हान स्वीकारून अशक्य वाटणारं हे काम शक्य करून दाखवलं होतं. न केवळ भारतीयांसाठी, तर जगासाठीही ते एक आश्चर्य होतं… आणि मग द्रष्टे शास्त्रज्ञ डॉ. विक्रम साराभाई यांचं स्वप्न साकारू लागलं – ‘भारतीय अंतराळ संशोधन केंद्रा’चं अर्थात ‘इस्रो’चं!

या पुस्तकात आरवमुदन ‘इस्रो’ कशी घडत गेली याचे तपशील देऊन त्यासाठी हातभार लागलेल्या व्यक्तिमत्त्वांच्या कहाण्याही सांगतात. तसंच ‘इस्रो’ने राबवलेले प्रकल्प कसे साकारत गेले, त्यासाठी किती प्रयत्न करावे लागले, किती कष्ट घ्यावे लागले, किती अपयशं झेलावी लागली याची रोचक माहितीही ते देतात. रॉकेट लॉंचिंग स्टेशन ते ‘चांद्रयान’ आणि ‘मंगलयान’ यांसारखे गुंतागुंतीचे प्रकल्प राबवणाऱ्या ‘इस्रो’चा हा वटवृक्ष कसा उभारत गेला याचं रंजक कथन पुस्तकातून आपल्यापुढे येतं.

स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून या संस्थेसाठ़ी आपलं तन-मन-धन अर्पिणाऱ्या एका वरिष्ठ शास्त्रज्ञाने सांगितलेली ही ‘मेड इन इंडिया’ कहाणी…इस्रो : झेप नव्या क्षितिजाकडे !


250.00 180.00 Add to cart

टेलिकॉम क्रांतीचं महास्वप्न

माझा प्रवास… 



अनुवाद :
१९६५ सालापासून सुमारे २५ वर्षं लाल निशाण पक्ष व कामगार चळवळीत शारदा साठे यांचा सक्रिय सहभाग आहे. १९७५ सालापासून त्या स्त्री मुक्ती चळवळीत कार्यरत आहेत. स्त्री मुक्ती संघटनेच्या त्या संस्थापक सदस्य असून संघटनेच्या ‘प्रेरक ललकारी’ या मुखपत्राच्या त्या मुख्य संपादक आहेत. त्यांनी स्वतंत्र लेखनाबरोबरच विविध विषयांवरील पुस्तकांचा मराठीत अनुवाद केला आहे.


सत्यनारायण गंगाराम पित्रोदा… ओडिशा राज्यातल्या तितिलगड या छोट्याशा गावातला हा तरुण ‘स्वप्नभूमी’ अमेरिकेत गेला काय आणि झपाट्याने विस्तारत जाणार्‍या तंत्रज्ञानाच्या अवकाशात त्याच्या हाती सोनं लागलं काय! सत्यनारायणचा ‘सॅम’ झाला आणि जागतिक पेटंट्सच्या मालकीमुळे कोट्याधीश बनला…
पण गांधीवादी विचारांचा पगडा असलेल्या सॅमना मात्र आपलं ज्ञान आणि गाठीशी असलेला अनुभव आपल्या मायभूमीसाठी वापरावा अशी आस लागली. आणि म्हणून ते भारतामध्ये परतले, तेच एक ‘महाध्येय’ घेऊन… भारतात ‘टेलिकॉम-क्रांती’ घडवण्याचं ! तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचंही त्यांना समर्थ पाठबळ लाभलं… आणि मग केवळ एक रुपया वेतनावर अविरत कष्ट करणारे सॅम आणि देशाच्या कानाकोपर्‍यात दिसणारे ‘एसटीडी/पीसीओ बूथ’ म्हणजे एक अतूट समीकरणच होऊन गेलं…!
राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर मात्र सॅम यांचं जगच हादरलं. भ्रष्टाचाराचे आरोप, त्यातच आलेला हृदयविकाराचा झटका आणि आर्थिक कफल्लकता यांमुळे ते खोल गर्तेत बुडाले, पण तरी निराश न होता फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पुन्हा राखेतून उसळून वर आले…!

भारतीय टेलिकॉम-क्रांतीचं महास्वप्न प्रत्यक्षात आणणार्‍या सॅम पित्रोदा यांची ही प्रेरक आत्मकथा !


495.00 Add to cart

नोबेल कथा

नोबेल’ची पार्श्वभूमी आणि विविध क्षेत्रांत नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या व्यक्तींचा परिचय व त्यांच्या असामान्य कार्याचा वेध…


पेशाने शास्त्रज्ञ असलेल्या डॉ. प्रबोध चोबे यांचं पदवीपूर्व शिक्षण पवई येथील आय.आय.टी.मधून झालं. पुढे त्यांनी स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यू यॉर्क येथून ‘ऑरगॅनोमेटॅलिक रसायनशास्त्र’ या विषयात डॉक्टरेट मिळवली. गेल्या दोन दशकांहून जास्त काळ ते एका मोठ्या बहुराष्ट्रीय रासायनिक कंपनीच्या संशोधन केंद्राची धुरा वाहत आहेत. डॉ. चोबे यांचा आवडता छंद म्हणजे आपल्या लेखनातून व व्याख्यानांमधून कोणताही शास्त्रीय विषय मराठीमधून सहज समजेल अशा भाषेत, सोप्यात सोपा करून मांडणं. आजवर त्यांची पाच पुस्तकं व विविध मराठी नियतकालिकांमधून ६००च्या वर लेख प्रसिद्ध झालेले आहेत. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लावणं, विज्ञानाबद्दल- नवीन संशोधनाबद्दल त्यांचा उत्साह वाढवणं, देशासाठी भरीव संशोधन करायला त्यांना उद्युक्त करणं, प्राध्यापकांना संशोधन विषयात मार्गदर्शन करणं असे विविध उपक्रम डॉ. चोबे आवडीने करतात. डॉ. चोबे यांची व्याख्यानं त्यांच्या रसायनशास्त्रामधील आधुनिक विषयांवरील सखोल व्याख्यानांइतकीच लोकप्रिय आहेत व त्यासाठी ते भारतभर अविरतपणे फिरत असतात. डॉ. चोबे यांना आजवर अनेक सन्मान मिळाले आहेत. त्यांच्या पुस्तकाला राज्य पुरस्कारही मिळाला आहे. शालेय जीवनात त्यांना ‘प्रेसिडेंट्स स्काऊट’ हा सर्वोच्च सन्मान तत्कलीन राष्ट्रपती व्ही.व्ही. गिरी यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन येथे प्रदान करण्यात आला होता.

अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी केलेल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल निरनिराळया क्षेत्रांमधील असामान्य व्यक्तींना गेली ११२ वर्षे नोबेल पुरस्कार दिला जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर दिला जाणारा हा पुरस्कार अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो.
या पुस्तकामध्ये डॉ. चोबे यांनी सुरुवातीला आल्फ्रेड नोबेल यांचं व्यक्तिमत्त्व, त्यांचं संशोधन व संशोधनादरम्यान त्यांनी दिलेला लढा हे सर्व उद्बोधकपणे रेखाटलं आहे. या पुरस्काराची पार्श्वभूमी आणि त्यांचा रंजक इतिहासही त्यांनी दिला आहे. त्यानंतर वैद्यकशास्त्र, रसायनशास्त्र, पदार्थविज्ञान, अर्थशास्त्र आणि शांतता अशा विविध क्षेत्रांत नोबेल पारितोषिकप्राप्त निवडक ४७ दिग्गजांचा व्यक्तिपरिचय आणि त्यांच्या संशोधनाची व कार्याची तपशीलवार माहिती सहज सुंदर शैलीत पुस्तकातील प्रकरणांमधून वाचायला मिळते.
‘नोबेल लॉरेट्सचे असामान्य गुण कोणते?’ व ‘भारतामध्ये नोबेल पारितोषिक मिळवण्याच्यादृष्टीने पोषक वातावरण निर्माण करता येईल का?’ याबाबतचे विचारही डॉ. चोबे लेखात मांडतात.
‘नोबेल’ विजेत्यांच्या या कथा सर्वच वयोगटातील व्यक्तींचं कुतूहल शमवून त्यांच्या ज्ञानात अनमोल भरही घालतील…


295.00 Add to cart

कलाम संच

किशोरांसाठी मार्गदर्शक असा ३ पुस्तकांचा सप्रेम भेट संच



अनुवाद :
मराठीतल्या आघाडीच्या तरुण लेखकांमध्ये प्रणव सखदेव यांचं नाव घेतलं जातं. त्यांनी अग्रगण्य मराठी दैनिकांत पत्रकार म्हणून काम केलं असून ते मराठी प्रकाशन क्षेत्रामध्ये संपादक व अनुवादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कथा आणि कविता मान्यवर नियतकालिकांमधून प्रकाशित होत असतात. ‘पायऱ्यांचा गेम आणि इतर कविता’ हा कवितासंग्रह, 'निळ्या दाताची दंतकथा’, ‘नाभितून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य' हे कथासंग्रह, व ‘काळेकरडे स्ट्रोक्स', ‘96 मेट्रोमॉल’ या कादंबऱ्या असं त्यांचं साहित्य प्रकाशित झालं आहे. त्यांना अनुवाद-प्रकल्पासाठी २०१५-१६ सालची ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ची अभ्यासवृत्तीही मिळाली आहे. त्यांना लेखनासाठी महत्त्वाची पारितोषिकं मिळाली असून इंग्रजीतल्या गाजलेल्या पुस्तकांचा अनुवाद त्यांनी केला आहे. फिक्शन लेखन करणं ही त्यांची पॅशन असून त्यातून समकालातल्या प्रश्नांचा भिडणं हे त्यांना महत्त्वाचं वाटतं. आजच्या तरुणांची मानसिकता, त्यांचे प्रश्न, विखंडित जगणं व तंत्रज्ञानाचा वाढता वापर या सगळ्याचं प्रतिबिंब त्यांच्या लेखनात पडलेलं दिसून येतं.


डॉ. कलामांनी जे विकसित भारताचं स्वप्न पाहिलं होतं त्याचं तपशीलवार विवेचन या तीनही पुस्तकात वाचायला मिळेल. कलामांच्या  विचारांचा प्रसार-प्रचार जास्तीत जास्त भारतीयांपर्यंत खास करून तरूण पिढीपर्यंत व्हावा म्हणून त्यांना वाहिलेली ही शब्दांजली…


475.00 Add to cart

Colours In Nature

Understanding the science behind the brilliant colours in nature


Pramod Kale worked with the Indian Space Research Organization (ISRO) for over thirty two years during which he held various leadership positions.During his career Pramod has been conferred with many awards and recognition. Some of them include the Shri Hari Om Ashram Prerit Vikram Sarabhai Award 1975, the Padmashri in 1984, the R.L. Wadhwa Gold Medal of the Institution of Electronics and Telecommunications Engineers in 1990 and most recently the Aryabhatta Award of the Astronautical Society of India in 2006.After retirement from ISRO, he worked for a few years with the corporate industry and now devotes his time as an educationist, promoting science education for children from different strata of society and also spends time with social work and community service.

This book ‘Colours in nature’ has been written with an idea that the students, teachers and general public should find it readable and should feel motivated to explore and study the subject ‘light’ further and deeper. It provides colourful and relevant images that would make the reader think about the beauty in the nature, the diversity in nature and reflect on the simple and yet sometimes deeper meaning in everything the reader sees.


195.00 Add to cart

Sky Hunt With Telescopes



A mere sight of the sky studded with shining Stars, the Nakshatras, the Constellations gives us immense pleasure. Many questions pop-up in the inquisitive minds of the amateur star gazers, but those set off quickly for want of information and not-easy-to-access equipments. Here is a book which has been designed with an objective to help amateur star gazers to identify and locate the Stars and Nakshatras with or without telescope. It provides the perfect and precise astronomical information in simple and easy to understand language for a lay reader.
All information is accompanied with coloured photographs and speaking illustrations. With such help any casual or occasional star gazer can turn into a studious, consistent and knowledgeable observer.
This first of its kind book provides information about various stars, their location, their changing colours, shapes, their time to rise and set off; time and months to watch several Nakshatras, Constellations, Nebula, Binary Stars to Milky Way… everything existing in amazing universe.
This book is expected to be a real guide and companion for all amateur star gazers to go for a knowledgeable ride into amazing universe ….
Sky Hunt With Telescopes!!


250.00 Add to cart

करामत धाग्या-दोऱ्यांशी

वस्त्रांच्या रंगीबेरंगी दुनियेचा बहुपदरी मागोवा व त्यातील विज्ञान


डॉ. वर्षा जोशी यांनी मुंबई विद्यापीठातून बी.एस्सी., भौतिकशासत्रात एम.एस्सी. केलं असून, अमेरिकेतील पर्डू विद्यापीठातून एम.एस., शिवाय पुणे विद्यापीठातून एम.फिल आणि पीएच.डी. केलं आहे. डॉ. वर्षा जोशी यांची भौतिकशास्त्र विषयावरची सोळा पुस्तकं आजवर प्रकाशित झाली आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी मराठी व इंग्रजीतून सर सी.व्ही. रामन यांच्या जीवनावर व संशोधन कार्यावर आधारित पुस्तकं लिहिली आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर व संशोधन कार्यावर आधारित पुस्तकं आणि प्रौढ साक्षरांसाठी पुस्तिकाही मराठीत लिहिली आहे. ‘वाद्यांमधील विज्ञान’, ‘स्वयंपाकघरातील विज्ञान’, ‘सौंदर्यप्रसाधनांच्या दुनियेत’, ‘१२व्या शतकातील खाद्यसंस्कृती’, ‘साठीनंतरचा आहार व आरोग्य’, ‘करामत धाग्या-दोऱ्यांची' अशी त्यांची विज्ञानावर आधारित पुस्तकं प्रकाशित असून त्यांच्या आजवर अनेक आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. त्यांच्या पुस्तकांना अनेक मान्यवर पुरस्कारांनी आणि सन्मानांनी गौरवण्यात आलं आहे.

वस्त्र ही माणसाच्या मूलभूत गरजांपैकी एक ! वस्त्रांचा वापर आपण शरीर-संरक्षणाबरोबरच आपलं व्यक्तिमत्त्व अधिक खुलवण्यासाठी, आणि इतरांवर प्रभाव पाडण्यासाठीही करतो. आपल्या रोजच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनलेली ही वस्त्रं नेमकी कशी बनतात, याचे ‘धागे-दोरे’ या पुस्तकात विख्यात पदार्थविज्ञानतज्ज्ञ डॉ. वर्षा जोशी यांनी रंजकपणे उलगडून दाखवले आहेत.

कोणत्या मोसमात कोणती वस्त्रं वापरायची, हे ते वस्त्र ज्या धाग्यांपासून तयार होतं त्यांच्या गुणधर्मावर अवलंबून असतं. हे गुणधर्म कोणते, त्या धाग्यांची रचना कशी असते, त्यापासून वस्त्रं कशी विणली जातात, ती कशी रंगवली जातात, त्यावर छपाई कशी केली जाते, कोणत्या प्रक्रिया होतात, आदी अनेक गोष्टींची रंजक माहिती या पुस्तकात सहजसोप्या भाषेत देण्यात आली आहे.

ई-टेक्स्टाइलसारख्या आधुनिक काळातल्या चलाखतंतूंचा म्हणजेच ‘स्मार्ट फायबर्स’ चाही अंतर्भाव यात करण्यात आला आहे. तसंच समृद्ध अशा भारतीय वस्त्रपरंपरेचा वेधक मागोवाही घेण्यात आला आहे. याशिवाय निरनिराळ्या वस्त्रांची निगा कशी राखावी, अशा उपयुक्त माहितीचाही पुस्तकात समावेश करण्यात आला आहे.
वस्त्रांचा इतिहास कथन करणारं, त्याविषयीचं कुतूहल शमवणारं आणि त्यामागचं विज्ञान उलगडून दाखवणारं पुस्तक…
करामत धाग्या-दोर्‍यांची!


250.00 Add to cart

अणूऊर्जा एक पर्याय

शास्त्रीय माहितीसह अणुऊर्जेचा उलट-सुलट बाजूंनी केलेला सर्वांगीण विचार 


सौरव झा यांनी प्रेसिडेंसी कॉलेज, कोलकाता आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली येथून अर्थशास्त्र आणि ‘डिबेटेड पॉलिटिक्स’ या विषयांमधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. झा यांनी स्वत:ची काही संशोधनाची कामं सुरू केल्यामुळे त्यांना पी.एच.डी.चा अभ्यासक्रम अर्धवट सोडावा लागला. जागतिक पातळीवरच्या ऊर्जा विषयावर त्यांनी मुबलक लिखाण केलं आहे आणि त्याबाबत त्यांचं संशोधनही चालू आहे. त्यांनी ‘ऊर्जा’ या विषयावर सल्ला देणारी, ‘एनर्जी इंडिया सोल्युशन’ या नावाने एक संस्था सुरू केली आहे.

अनुवाद :
डॉ. वर्षा जोशी यांनी मुंबई विद्यापीठातून बी.एस्सी., भौतिकशासत्रात एम.एस्सी. केलं असून, अमेरिकेतील पर्डू विद्यापीठातून एम.एस., शिवाय पुणे विद्यापीठातून एम.फिल आणि पीएच.डी. केलं आहे. डॉ. वर्षा जोशी यांची भौतिकशास्त्र विषयावरची सोळा पुस्तकं आजवर प्रकाशित झाली आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी मराठी व इंग्रजीतून सर सी.व्ही. रामन यांच्या जीवनावर व संशोधन कार्यावर आधारित पुस्तकं लिहिली आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर व संशोधन कार्यावर आधारित पुस्तकं आणि प्रौढ साक्षरांसाठी पुस्तिकाही मराठीत लिहिली आहे. ‘वाद्यांमधील विज्ञान’, ‘स्वयंपाकघरातील विज्ञान’, ‘सौंदर्यप्रसाधनांच्या दुनियेत’, ‘१२व्या शतकातील खाद्यसंस्कृती’, ‘साठीनंतरचा आहार व आरोग्य’, ‘करामत धाग्या-दोऱ्यांची' अशी त्यांची विज्ञानावर आधारित पुस्तकं प्रकाशित असून त्यांच्या आजवर अनेक आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. त्यांच्या पुस्तकांना अनेक मान्यवर पुरस्कारांनी आणि सन्मानांनी गौरवण्यात आलं आहे.


जगभरातील आणि विशेषत: भारतातील विजेची वाढती मागणी लक्षात घेता वीजनिर्मिती हा कळीचा मुद्दा ठरला आहे. साहजिकच विविध ऊर्जास्त्रोतांच्या शक्यताशक्यतेची पडताळणी करणे आवश्यक बाब ठरली आहे. उपलब्ध पर्यायांपैकी अणुऊर्जेच्या पर्यायाची सरकारकडून गंभीर दखल घेतली गेल्याचं दिसत आहे. मात्र या पर्यायाविषयी उलट-सुलट मतं व्यक्त केली जात आहेत. विशेषत: फुकुशिमाच्या घटनेनंतर या पर्यायाविषयी जनतेत मोठा संभ्रम निर्माण होऊन हा पर्याय अधिकच वादग्रस्त झाला आहे. अशा पार्श्वभूमीवर सौरव झा यांचं हे पुस्तक अतिशय महत्त्वाचं ठरतं.
पुस्तकात अणुऊर्जेसंबंधी उलट-सुलट व साधक-बाधक चर्चा करून लेखकाने त्रयस्थ भूमिकेतून या पर्यायाविषयी माहिती करून दिली आहे.
अणुऊर्जेची शास्त्रीय माहिती, त्याचं तंत्रज्ञान, त्याचं अर्थशास्त्र याविषयी माहिती देऊन लेखकाने फुकुशिमा व चेर्नोबिल घटना, नैसर्गिक संपत्तीची उपलब्धता, भूराजकारण आणि अणुऊर्जेविषयीचं धोरण यांचाही पुस्तकात उहापोह केला आहे. समस्येचं गांभीर्य लक्षात घेऊन दिलेली ही माहिती सुस्पष्टपणे आणि सुबोध शैलीत मांडली आहे. तसेच सुरक्षा व कचरा व्यवस्थापन (न्युक्लिअर वेस्ट) यांसारख्या लोकमानसात काळजीचा सूर निर्माण करणाऱ्या मुद्यांचीही दखल घेऊन लेखकाने या समस्यांवर नवे उपाय सुचवले आहेत.
भारत-अमेरिका अणुकरार, अणुऊर्जा आणि इतर ऊर्जास्त्रोत यांचं नजीकच्या काळातलं भवितव्य आणि होमी भाभांचे स्वप्न सत्यात उतरण्याची शक्यता याबद्दल कुतूहल असलेल्या सर्वांसाठी हे पुस्तक उद्‍बोधक ठरावे.


270.00 Add to cart

आहाराविषयी सारे काही

आपल्या आरोग्यानुसार आपल्या आहाराची काळजी घेणारे पुस्तक


मुंबई विद्यापीठाच्या रसायनशास्त्राच्या पदवीधर असलेल्या वसुमती धुरू यांचा ‘आहारशास्त्रा’चा विशेष अभ्यास आहे. या विषयात त्यांनी पदविकाही संपादन केली आहे. चायनीज कुकरी हा त्यांचा आवडता विषय. इतकेच नव्हे, तर चायनीज कुकरीचे वर्गही त्या चालवत. त्यामुळे त्यांच्या व्यासंगाला अनुभवाची जोड मिळाली. विविध विषयांवर त्यांनी आजवर अनेक पुस्तकं लिहिली आहेत. अभ्यासपूर्ण लेखन हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य राहिले आहे.

आहारतज्ज्ञांनी किंवा डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आहार घेण्याची आपली कितीही इच्छा असली, तरी पोषणमूल्यांचे क्लिष्ट ‘गणित’ सोडवून एखादा पदार्थ करताना कॅलरीज, कोलेस्टेरॉल, प्रथिनं आदींचं संतुलन साधणं कठीण जातं. त्यात त्या पदार्थाची चव किंवा वैशिष्टय राखण्याची कसरत करणं म्हणजे महाकठीणच काम!
हे लक्षात घेऊनच ज्येष्ठ आहारतज्ज्ञ वसुमती धुरू यांनी या पुस्तकात पाककला व आहारशास्त्र यांचा सुयोग्य मेळ साधला आहे. सर्व प्रकारच्या विविध पाककृती पध्दतशीरपणे देऊन त्या खाली त्या पदार्थाच्या प्रत्येक वाटपातून प्रत्येकाला किती प्रमाणात प्रथिनं, खनिजं, जीवनसत्त्वं, तंतू, कॅलरीज इ. पोषणमूल्यं लाभतील याचा ‘रेडीमेड’ तक्ताच दिला आहे. तसेच हा पदार्थ कोणत्या आजारासाठी वा व्याधीसाठी पथ्यकारक ठरेल वा कुपथ्यकारक ठरेल, कुणी तो आवर्जून खावा, कुणी तो कमी प्रमाणात खावा, कुणी तो वर्ज्य करावा याचीही माहिती तिथल्यातिथेच दिली आहे. या पुस्तकाची हीच वैशिष्टये आहेत, म्हणूनच हे पुस्तक इतर पाककृती व आहारशास्त्रावरील पुस्तकांपेक्षा संपूर्णपणे आगळंवेगळं ठरावं.
थोडक्यात, गृहिणींना पाककलेसोबतच आहारशास्त्रावरही सहजपणे पकड घेण्यास समर्थ करणारं व भान देणारं पुस्तक आहाराविषयी सारे काही…


225.00 Add to cart

स्वयंपाकघरातील विज्ञान

विविधांगी शास्त्रीय माहिती, मार्गदर्शन व अनेक उपयुक्त सूचना


डॉ. वर्षा जोशी यांनी मुंबई विद्यापीठातून बी.एस्सी., भौतिकशासत्रात एम.एस्सी. केलं असून, अमेरिकेतील पर्डू विद्यापीठातून एम.एस., शिवाय पुणे विद्यापीठातून एम.फिल आणि पीएच.डी. केलं आहे. डॉ. वर्षा जोशी यांची भौतिकशास्त्र विषयावरची सोळा पुस्तकं आजवर प्रकाशित झाली आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी मराठी व इंग्रजीतून सर सी.व्ही. रामन यांच्या जीवनावर व संशोधन कार्यावर आधारित पुस्तकं लिहिली आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर व संशोधन कार्यावर आधारित पुस्तकं आणि प्रौढ साक्षरांसाठी पुस्तिकाही मराठीत लिहिली आहे. ‘वाद्यांमधील विज्ञान’, ‘स्वयंपाकघरातील विज्ञान’, ‘सौंदर्यप्रसाधनांच्या दुनियेत’, ‘१२व्या शतकातील खाद्यसंस्कृती’, ‘साठीनंतरचा आहार व आरोग्य’, ‘करामत धाग्या-दोऱ्यांची' अशी त्यांची विज्ञानावर आधारित पुस्तकं प्रकाशित असून त्यांच्या आजवर अनेक आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. त्यांच्या पुस्तकांना अनेक मान्यवर पुरस्कारांनी आणि सन्मानांनी गौरवण्यात आलं आहे.

स्वयंपाकघर एक प्रयोगशाळा…
विविध उपकरणे आणि रसायने यांनी समृद्ध अशा या ‘प्रयोगशाळेत’ आपण दररोज अनेक पदार्थ करत असतो. कळत-नकळत कित्येक वैज्ञानिक-क्रिया साधत असतो. पदार्थ उत्तमरीत्या जमणं वा बिघडणं यामागची कारणं विज्ञानातच असतात!
धान्य-कडधान्यं, भाज्या, तेल-तूप, चहा-कॉफी, मसाले आदी जिनसांबाबत शास्त्र काय सांगते?
प्रत्येक कृतीमध्ये काय शास्त्र असते?
विविध पदार्थांच्या कृतीमध्ये कोणत्या वैज्ञानिक प्रक्रिया दडलेल्या असतात?
आहारातील रुचकरपणा राखून त्यातील पोषणमूल्ये कशी वाढवता येतील?
विविध उपकरणांची निगा राखून त्यांचा सुयोग्य वापर कसा करता येईल?
डॉ.वर्षा जोशी यांनी ही सर्व माहिती या पुस्तकात मनोवेधकरीत्या सांगून अनेक उपयुक्त सूचनाही दिल्या आहेत.
आहाराबाबत विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन आणि आरोग्यविषयक जाणिवा विकसित करून मार्गदर्शन करणारे पुस्तक…
स्वयंपाकघरातील विज्ञान!


295.00 Add to cart

स्वयंपाकशाळा

पदार्थ रुचकर होण्यासाठी व त्यातील पोषणमूल्य जपण्यासाठीचे शास्त्रीय धडे


डॉ. वर्षा जोशी यांनी मुंबई विद्यापीठातून बी.एस्सी., भौतिकशासत्रात एम.एस्सी. केलं असून, अमेरिकेतील पर्डू विद्यापीठातून एम.एस., शिवाय पुणे विद्यापीठातून एम.फिल आणि पीएच.डी. केलं आहे. डॉ. वर्षा जोशी यांची भौतिकशास्त्र विषयावरची सोळा पुस्तकं आजवर प्रकाशित झाली आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी मराठी व इंग्रजीतून सर सी.व्ही. रामन यांच्या जीवनावर व संशोधन कार्यावर आधारित पुस्तकं लिहिली आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर व संशोधन कार्यावर आधारित पुस्तकं आणि प्रौढ साक्षरांसाठी पुस्तिकाही मराठीत लिहिली आहे. ‘वाद्यांमधील विज्ञान’, ‘स्वयंपाकघरातील विज्ञान’, ‘सौंदर्यप्रसाधनांच्या दुनियेत’, ‘१२व्या शतकातील खाद्यसंस्कृती’, ‘साठीनंतरचा आहार व आरोग्य’, ‘करामत धाग्या-दोऱ्यांची' अशी त्यांची विज्ञानावर आधारित पुस्तकं प्रकाशित असून त्यांच्या आजवर अनेक आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. त्यांच्या पुस्तकांना अनेक मान्यवर पुरस्कारांनी आणि सन्मानांनी गौरवण्यात आलं आहे.

स्वयंपाक म्हणजे कला आणि विज्ञान यांचा सुरेख मेळ घालून केलेली कृती, हे एकदा पटलं की, त्यामध्ये वेगवेगळे प्रयोग करता येतात आणि विविधप्रकारे नावीन्यही आणता येतं. थोडा वैज्ञानिकदृष्ट्या विचार केला तर, एखादा पदार्थ जास्तीतजास्त चविष्ट कसा होईल याचा विचार करता येईल आणि एखादा पदार्थ बिघडण्यामागचं कारणही समजून येईल. डॉ. वर्षा जोशी यांनी या पुस्तकाद्वारे अत्यंत सोप्या भाषेत स्वयंपाकघराची ‘शास्त्रीय सफर’ घडवून आणली आहे.
पुस्तकात तीन विभाग आहेत…
पहिल्या भागात… जेवणातील पदार्थ किंवा सणासुदीला बनवले जाणारे पदार्थ यांच्या घडण्या-बिघडण्यातलं गुपित, भाज्या करताना घ्यायची काळजी, स्वयंपाक करताना होणाऱ्या चुका, बिघडलेले पदार्थ सुधारता येतील अशा युक्त्या

दुसऱ्या भागात… रोजच्या आहारातल्या विशिष्ट ऋतुत मिळणाऱ्या आणि महत्त्वाच्या अशा भाज्यांचं पोषणमूल्य, त्यांचं आहारातील महत्त्व

तिसऱ्या भागात… फळांचं आहारातील महत्त्व, फळांमधील पोषणमूल्यं, कोणत्या वयोगटाने व विशिष्ट आजार असलेल्या व्यक्तींनी कोणती फळं खावीत याबद्दल मार्गदर्शन

अगदी रोजचा वरण-भात करायचा म्हटला तरी तो रोज सारखाच होईल याची शाश्वती नसते. अशा वेळी थोडासा वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून स्वयंपाक केल्यास रुची, पोषणमूल्य, चुकांची दुरुस्ती असं सर्व काही साधता येईल. ‘आधुनिक युगातील सुगरण’ होण्यासाठी शास्त्रीय धडे देणारी… डॉ. वर्षा जोशींची स्वयंपाकशाळा!


180.00 Add to cart

सुरुवात एका सुरुवातीची

वेडीबाभळीपासून वीजनिर्मितीचा यशस्वी प्रयोग… या प्रयोगाची चित्तवेधक कथा!


विद्यार्थीदशेत राष्ट्रीय खेळाडू असणाऱ्या व शैक्षणिक प्रावीण्य असणाऱ्या प्रफुल्ल कदम यांना विद्यापीठ पातळीवरही वादविवाद , वक्तृत्व , प्रश्नमंजुषा स्पर्धेत विशेष पारितोषिकं मिळाली आहेत. विद्यापीठात शिक्षण घेत असतानाच राष्ट्रीय कार्याच्या हेतूने ग्रामपीठ चळवळीची सुरुवात त्यांनी केली. या चळवळीअंतर्गत विविध उपक्रम राबवले गेले. पाणी नियोजन हा त्यांचा अास्थेचा विषय असून महाराष्ट्र राज्याच्या पाणी नियोजनाची दिशा, सनियंत्रण, अंमलबजावणी, नियोजन यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री व विविध विभागाचे मान्यवर मंत्रीमहोदय यांचा समावेश असणाऱ्या 'महाराष्ट्र राज्य जलसंधारण सल्लागार परिषद' या उच्चस्तरीय समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तसंच प्रतिकूल परिस्थितीमध्ये रचनात्मक व संघर्षात्मक कार्य करणाऱ्या देशातील एका तरुणाला दिला जाणारा 'सरिता - महेश समाजरचना ' हा राष्ट्रीय पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार व रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते बी.जी. वर्गीस यांच्या हस्ते २००६ मध्ये दिल्ली येथे प्रदान करण्यात आला होता.

तसं पाहिलं तर हे पुस्तक नाही, एक प्रयोग आहे. या प्रयोगासाठी प्रयोगशाळा कशी सिद्ध केली गेली याचं ते आत्मचरित्रात्मक निवेदन आहे. बहुतेक आत्मचरित्रांमध्ये ‘आत्म’ म्हणजे ‘मी’ महत्त्वाची भूमिका बजावत असतो. परंतु प्रफुल्ल कदम यांच्या आत्मचरित्रात मुख्य भूमिका आहे ‘वेडीबाभळीची’. त्या नायिकेचा म्हणजे वेडयाबाभळीचा परिसर आहे ग्रामीण महाराष्ट्राचा. मात्र प्रयोग आहे जागतिक स्तरावर परिणाम घडविणारा. या आत्मचरित्राला उद्दिष्ट आहे ऊर्जाक्रांतीचे – जी जलक्रांती व कृषीक्रांती समवेतच साध्य होऊ शकते… …पूर्णपणे प्रतिकूल वातावरणातही प्रयोग करण्यासाठी लागते दुर्दम्य जिद्द. जिद्दीला भांडवल लागत नाही. उद्दिष्ट निश्चित असेल, विचार पक्का असेल आणि जिद्द असेल तर सर्व अडचणींवर मात करता येते. अगदी नकारात्मक विचार करणार्‍यांचा विरोधही मोडून काढता येतो आणि मतलबी मंडळींचे खेळही थोपविता येतात. खरं म्हणजे महाराष्ट्रात हजारो तरुण असे आहेत की ज्यांना काहीतरी करायचं आहे, परंतु दिशा नाही, कार्यक्रम नाही वा मार्गदर्शन नाही. त्यांना हे पुस्तक एक ‘गाईड’ ठरेल. -कुमार केतकर


120.00 Add to cart