संथ वाहते … ?

जीवनदायी ‘ नद्यांचे आजचे वास्तव



ज्यांनी मानवी संस्कृतीला आधार दिला , त्या नद्यांना आपण एकीकडे आई म्हणत म्हणत पूर्णपणे विद्रूप करून टाकले ; इतके की आता त्यांना खरा चेहराच उरला नाही . नद्या अशाप्रकारे बिघडल्याने आपल्यासाठी आपत्ती बनून राहिल्या आहेत . त्यांचे स्वास्थ्य बिघडल्याने पिण्याच्या पाणी , शेती , सभोवतालचे पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेवरही खोलवर परिणाम झाले आहेत . उत्तर महाराष्ट्रातील पांजरेपासून मराठवाड्यातील मांजरेपर्यंत आणि कोकणातील पाताळगंगेपासून चंद्रपूरच्या इरई नदीपर्यंत राज्यभर हेच चित्र पाहायला मिळत आहे . त्यांच्यामुळे निर्माण झालेल्या समस्या दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत आहेत . त्यामुळेच नद्या सुधारायच्या असतील तर काळजीपूर्वक आणि तातडीने पावले उचलावी लागतील ! भारतातील व जगभरातील नद्यांच्या हासाचा आढावा घेऊन लेखक अभिजित घोरपडे यांनी महाराष्ट्रातील नद्यांच्या आजच्या वास्तवाचा , प्रत्यक्ष त्यांच्या पात्रात उतरून सर्वंकष वेध घेतला आहे .


125.00 Add to cart

काँक्रीटची वनराई

प्रगत, सुनियोजित, सुंदर शहरांचं स्वप्न…


सुलक्षणा महाजन यांचा जन्म १९५१ साली मुंबई येथे झाला. त्यांचं शालेय शिक्षण नाशिक येथील गव्हर्नमेंट गर्ल्स स्कूलमध्ये झालं. त्यांनी १९७२ साली सर जे.जे. कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, मुंबई, येथून बॅचलर ऑफ आर्किटेक्चरमधील पदवी प्राप्त केली. शिवाय १९७४ साली आय.आय.टी. पवई येथून इंडस्ट्रियल डिझाइनमधे पदविका प्राप्त केली. महाराष्ट्र नगररचना खातं, ठाणे आणि भाभा अॅसटॉमिक रिसर्च सेंटर, मुंबई, या सरकारी आस्थापनांमध्ये त्यांनी अर्किटेक्ट म्हणून नोकरी केली. घेरझी इस्टर्न लिमिटेड, मुंबई आणि एपिकॉन्स कन्सल्टंट, ठाणे या खाजगी क्षेत्रांमधील कंपन्यांमध्ये वास्तुरचनांसाठी कन्सल्टंट म्हणूनही त्यांनी काम केलं. ‘नगर नियोजन’ या विषयावर मिशिगन विद्यापीठात, तर ‘हॅबिटाट’ या जागतिक संस्थेच्या ‘सस्टेनेबल सिटीज प्रकल्पा’तर्फे महाराष्ट्रातील आठ शहरांचा अभ्यास त्यांनी केला. ‘मुंबई ट्रान्सफॉर्मेशन सपोर्ट युनिट’मध्ये मुंबई संबंधीचे संशोधन त्या करत असून ‘विचार रचना संसद,’ प्रभादेवी, मुंबई, येथे पर्यावरण वास्तुरचना आणि नगर नियोजन या विषयाचं अध्ययन करत आहेत. या विषयांवर त्यांची पुस्तकं प्रकाशित असून त्या लोकसत्ता, सकाळ या दैनिकांतून सातत्याने लेखन करतात.

काँक्रीटचं जंगल’ म्हटलं की डोळयासमोर उभ्या राहतात आक्राळविक्राळ, कशाही-कुठेही बांधलेल्या इमारती! पण कोणतंही शहर किंवा नगर म्हणजे फक्त उत्तुंग, दाटीवाटीने फोफावलेल्या इमारती आणि भावनाशून्यपणे घडयाळाच्या काटयावर पळणारी माणसं, एवढंच असतं का? शहरांबाबतच्या समाजातील अशा प्रकारच्या प्रचलित नकारात्मक समजुती आणि विस्तारणारं नागरीकरण हा प्रचंड विरोधाभास लेखिकेलाही चक्रावून टाकतो.
या विरोधाभासाचा शोध घेण्याचा, त्यामागची गृहितकं तपासण्याचा, नागरीकरणाची प्रक्रिया समजून घेण्याचा आणि समजावून देण्याचा सकारात्मक व प्रामाणिक प्रयत्न म्हणजेच हे पुस्तक!
लेखिकेच्या दृष्टिकोनातून राज्याच्या आणि राष्ट्राच्या विकासासाठी शहरं निश्चितच महत्त्वाची भूमिका बजावतात. उत्तम सोयी-सुविधांनी युक्त शहरांच्या निर्मितीसाठी आपल्याला गरज आहे ती दूरदृष्टी ठेवून केलेल्या नियोजनाची. ज्याप्रमाणे एखादी वनराई फुलवायला, ती वृध्दिंगत करायला एका कुशल माळयाची व त्याच्या प्रेमळ संगोपनाची गरज असते त्याचप्रमाणे आजच्या काँक्रीटच्या जंगलाचं वनराईत रूपांतर करण्यासाठी आज गरज आहे ती द्रष्टया लोकनेत्यांची आणि व्यापक दृष्टीकोन असणाऱ्या कुशल प्रशासकांची.
या दृष्टीने या पुस्तकातील चर्चा व मुद्दे वाचकांना व संबंधितांना आजच्या बकाल काँक्रीटच्या जंगलाचं रूपांतर सुंदर व नियोजनपूर्ण ‘वनराई’मध्ये करण्यास नक्कीच उद्युक्त करतील.


250.00 180.00 Add to cart

बाग एक जगणं

पुणे विद्यापिठाच्या 'संस्कृत प्रगत अध्ययन केंद्रा'त संस्कृत आणि 'ललित कला केंद्रा'त संस्कृत व आनुषंगिक विषयांचं सरोज देशपांडे यांनी अनेक वर्षं अध्यापन केलं. जिज्ञासू तसेच जाणकार अशा सरमिसळ वाचक-वर्गासाठी 'संस्कृत साहित्यशास्त्राची तोंडओळख' हे त्यांनी पुस्तकही लिहिलं आहे. अनुवाद करणं हा त्यांचा छंद असून त्यांनी आजवर अनेक महत्त्वाच्या पुस्तकांचे अनुवाद केले आहेत. ’अशी काळवेळ’ या मराठीत अनुवादित केलेल्या पुस्तकासाठी त्यांना २०१० साली साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.

बाग फुलवणं म्हणजे यात्रिंकपणे माती खणून रोप लावणं नव्हे. बाग गॅलरीतली असो वा अंगणातली, प्रत्येक रोपाशी, फुलाशी, वेलीशी भावनिक नातं कसं जुळू शकतं हे या पुस्तकात दिसतं. पानाफुलांशी, लहान मोहक पक्षीसृष्टीशी, गुलाबाच्या कलमांशी आणि कॅक्टससारख्या कातेरी झाडाशीदेखील लेखिकेचा मूक संवाद सुरू असतो.
लँडस्केप करताना एखद्या कलाकाराप्रमाणे लेखिका कल्पनेत चित्र रंगवते. मग लँडस्केप ही तिची प्रयोगशाळाच बनुन जाते!
नैनिताल असो की जपान, देशविदेशातील बागांचा अनुभव घेतानाही लेखिकेच्या भावविश्वात घरची बाग असतेच.
बाग फुलवताना झाडाच्या स्वभावावरून, प्रतिसादावरून जीवनाच्या विविध पैलूंकडे बघण्याची व्यापक दृष्टी लेखिकेला लाभत जाते. जोडीदाराबरोबरचं सहजीवन, माणसाचं पर्यावरणाशी असलेलं नातं जीवनाच्या मोठ्या कॅनव्हासवर बघताना बागेबरोबरचं हे जगणं अधिकाधिक समृध्द वाटू लागतं.
अतिशय संवेदनशीलतेने लिहीलेलं हे अनुभवकथन मनोवेधक तर आहेच, पण जाताजाता झाडारोपांच्या, फुलापानांच्या खासियती आणि निगराणी यांचा परिचय करून देणारंही ठरतं.
बागेशी जडलेल्या अनुबंधाचा मुक्त आविष्कार म्हणजे…
बाग एक जगणं…!


200.00 Add to cart

मुलांसाठी ओळख पर्यावरणाची



उद्या जगात सुखानं रहातायावं ही तुमची आमची सर्वांचीच इच्छा आहे त्यासाठी काय करायला हवं कसली काळजी घ्यायला हवी काय टाळायला हवं हे कळून घेणं आपलं कामच आहे .


95.00 Read more