राज कपूर- दि मास्टर अॅट वर्क


मूळ लेखक:

शब्दांकन :

इंग्रजी साहित्यात पदवी शिक्षण पूर्ण केल्यावर प्रणिका शर्मा यांनी प्रकाशन व्यवसायात आपला प्रवास सुरू केला. क्रिएटिव्ह रायटिंग'मध्ये स्नातकोत्तर शिक्षण पूर्ण करण्यासाठी इंग्लंडमध्ये जाण्यापूर्वी त्या मास मीडिया व पत्रकारिता या क्षेत्रातही कार्य करत होत्या. सध्या त्या 'सागा फिक्शन' या 'मोबाइल रीडिंग अॅप'च्या सह-संस्थापक म्हणून कार्यरत आहेत.

अनुवाद :

गंभीर वृत्तीचे अनुवादक, संपादक व लेखक म्हणून मिलिंद चंपानेरकर विख्यात आहेत. त्यांनी आजवर ‘लोककवी साहीर लुधियानवी' (मूळ लेखक : अक्षय मनवानी), ‘त्या दहा वर्षांतील गुरू दत्त' (मूळ लेखक - सत्य सरन), ‘सुन मेरे बंधू रे - एस.डी. बर्मन यांचं जीवनसंगीत' (मूळ लेखक - सत्या सरन), ‘वहिदा रेहमान... हितगुजातून उलगडलेली', (मूळ लेखक- नसरीन मुन्नी कबीर), ‘ए.आर. रहमान : संगीतातील वादळ' (मूळ लेखक - कामिनी मथाई), ‘भारतातील डाव्या चळवळीचा मागोवा’ (मूळ लेखक - प्रफुल्ल बिडवई), ‘गुड मुस्लीम बॅड मुस्लीम' (मूळ लेखक - महमूद ममदानी, सह-अनुवादक - पुष्पा भावे) यांसारख्या महत्त्वाच्या पुस्तकांचा अनुवाद केला असून ‘यांनी घडवलं सहस्रक' आणि ‘असा घडला भारत' या महद्ग्रंथांसाठी सह-संपादन, संशोधन व लेखन केलं आहे. त्यांनी दैनिक ‘इंडियन एक्स्प्रेस'साठी १९९१-२००० या कालावधीमध्ये पत्रकारिता केली आहे. गेली तीन दशकं त्यांनी विविध मराठी दैनिक आणि नियतकालिकांमधून समाजाभिमुख साहित्य, नाट्य व चित्रपटविषयक समीक्षापर लेखन आणि त्याचप्रमाणे, सामाजिक-राजकीय विषयांवर विश्लेषणात्मक लेखन केलं आहे. त्यांना ‘लोकशाहीवादी अम्मीस...दीर्घपत्र' या अनुवादित पुस्तकासाठी सर्वोत्कृष्ट अनुवादाचा २०१६ सालचा ‘साहित्य अकादमी' पुरस्कार प्राप्त झाला आहे.


राहुल रैवल हे माझ्या वडलांचे घनिष्ट मित्र, माझे आवडते दिग्दर्शक आणि माझे आजोबा राज कपूर यांचे साहाय्यक-दिग्दर्शक. माझ्या आजोबांनी त्यांच्या अल्पशा पण दर्जात्मकदृष्ट्या श्रेष्ठ अशा जीवनकालात कोणता अनमोल कलात्मक वारसा मागे ठेवला आहे, याची जाणीव या पुस्तकाने मला करून दिली.

-रणबीर कपूर

राज कपूर यांच्या अवघ्या प्रतिभेची उकल करून दाखवणारं हे पुस्तक आहे. त्यांच्या चित्रपटांतील गीतं गाण्याचा बहुमान मला लाभला होता. त्यांची संगीताची सखोल समज आणि त्यांचं त्याबाबतचं आकलन असं सर्व मला नेहमीच अचंबित करत असे. गाणं कसं चित्रित केलं जाणार आहे आणि त्यांच्या गाण्याबाबत काय अपेक्षा आहेत, हे सर्व ते एक दिग्दर्शक या नात्याने अत्यंत खोलात जाऊन आम्हाला समजावून सांगत असत.

-लता मंगेशकर

राज कपूर यांचं वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन, त्यांचे चित्रपट आणि त्यांचं स्वतःचं एक विश्व याबाबत विस्मयकारक अंतर्दृष्टी देणारं असं हे पुस्तक… आणि त्यांच्यासोबत काम केलेल्या व्यक्तीनेच ते लिहिलेलं असल्याने ते वाचताना खिळवून ठेवतं.

-राजकुमार हिरानी

मला राहुल रवैल यांचा हेवा वाटतो… हे पुस्तक वाचल्यावर मला असं वाटून गेलं की, ‘मूव्ही मसीहा’ राज कपूर यांच्यासोबत काम करण्याची संधी मला आयुष्यात एकदा तरी मिळायला हवी होती. त्यांच्या आजूबाजूला राहिल्यानेच समृद्ध करणारे त्यांचे गुण, त्यांची उत्कटता राहुलजी आत्मसात करू शकले. राहुलजींच्या या प्रवासात जरूर सहभागी व्हा. मला खात्री आहे की, तुम्हीही माझ्यासारखाच आनंद अनुभवाल.

-रमेश सिप्पी

केवळ चित्रपट निर्माते किंवा चित्रपट माध्यमाचे विद्यार्थी यांच्यासाठीच नव्हे, तर ज्या कुणाला सर्जनशीलतेच्या क्षेत्रात खोलवर बुडून बारकावे समजून घ्यायचे असतील, त्या सर्वांसाठी हे एक ‘मास्टर क्लास’ पुस्तक ठरतं. मला या पुस्तकाने खिळवून ठेवलं.

-इम्तियाज़ अली



 

525.00 Add to cart

स्टोरी टेलर



स्टोरी’ टेलर’ हे पुस्तक म्हणजे एका मनस्वी दिग्दर्शकाचा सर्जनशील प्रवास होय. दिग्दर्शक म्हणून वीस वर्षांच्या कारकिर्दीत गजेंद्र अहिरे यांनी दिग्दर्शित केलेल्या साठ चित्रपटांपैकी

१२ निवडक चित्रपटांच्या निर्मितीमागच्या कथा हे पुस्तक सांगतं.

कथालेखन, निर्मात्याचा शोध, कलाकार निवड, प्रत्यक्ष चित्रीकरण, संकलन, प्रसिद्धी अशा अनेक आघाड्यांवर चित्रपट दिग्दर्शकासमोर असलेली आव्हानं या पुस्तकातून आपल्याला समजतात.

प्रत्येक चित्रपटाच्या निर्मितीशी अनेक रंजक किस्से आणि बरे-वाईट अनुभव यांचं नातं जुळलेलं असतं… ते किस्से, ते अनुभव सांगता सांगता गजेंद्र दिग्दर्शक म्हणून या सगळ्या सिनेमांच्या ‘मेकिंग ‘कडे पुन्हा एकदा बघतात आणि स्वतःला तपासतात. त्याचप्रमाणे या क्षेत्रातील आघाडीचे कलाकारही पुस्तकात या स्टोरी’ टेलर ‘विषयी मनमोकळेपणे बोलतात.

एकंदर सांगायचं तर, सिनेरसिक आणि अभ्यासक यांच्या हाती या पुस्तकाच्या निमित्ताने मोठा ऐवज पडणार आहे. तो ऐवज चित्रपटरसिकांना रंजक तर वाटेलच; पण त्याचबरोबर चित्रपटनिर्मिती क्षेत्रात येऊ इच्छिणारे आणि चित्रपटनिर्मितीच्या वेगवेगळ्या विभागांत प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी, तसेच या क्षेत्रातले नवोदित अशा सगळ्यांसाठी स्टोरी’ टेलर’ जणू संग्राह्य असं ‘गाइड’ही ठरणार आहे.



 

540.00 Add to cart

अफ़साना लिख रही हूँ

चित्रपट कथानक आणि गाणी यांच्यातील परस्पर मेळ उलगडणारे अफसाने


पं. गजाननबुवा जोशी, पं. एस.के. अभ्यंकर, पं. मधुकर जोशी, डॉ. आशा पारसनीस जोशी यांच्याकडे प्रा. डॉ. मृदुला दाढे-जोशी यांचं शास्त्रीय संगीताचं शिक्षण झालं असून त्यांनी मानसशास्त्र या विषयात पदवी (विशेष प्रावीण्यासहित) प्राप्त केली आहे. त्यानंतर संगीत विषयात एम.ए. करून त्या विद्यापीठात प्रथम आल्या. त्यांनी ‘हिंदी चित्रपट संगीतातील प्रयोगशील संगीतकार’ या विषयात एस.एन.डी.टी. विद्यापीठाची पीएच.डी. प्राप्त केली असून हिंदी चित्रपट गीतांची वैशिष्ट्यं सांगत, त्यांतील बारकावे उलगडून दाखवत गायनाचे सादर केलेले वैशिष्ट्यपूर्ण असे हजारो जाहीर कार्यक्रम त्यांनी केले आहेत. हिंदी चित्रपट गीतांवरचं त्यांचं लेखन केवळ गाण्याच्या चाली, शब्द एवढ्यापुरतं मर्यादित नसतं. तर त्यातलं ऑक्रेस्ट्रायझेशन, त्यातली वाद्यं, त्यांची वैशिष्ट्यं तसंच ते गाणं रचणाऱ्या संगीतकारांची वैशिष्ट्यं हे त्या नेमकेपणाने उलगडून सांगतात आणि त्याकडे पाहण्याचा एक सखोल दृष्टिकोन देतात. त्या संगीताबरोबरच विविध विषयावरील पुस्तकांचं वाचन करत असल्यामुळे त्याचे संदर्भ त्यांच्या लेखनात लीलया येतात. सध्या त्या मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागात प्राध्यापक म्हणून सध्या कार्यरत आहेत.

एक जमाना होता जेव्हा हिंदी चित्रपटांत ‘गाणी’ हा एक अविभाज्य घटक असे. काही चित्रपटांतील काही गाणी तर कथानक पुढे नेण्याचा भार उचलत… कथानकाचा भागच जणू!
अशी गीतं रचताना, ती संगीतबद्ध करताना व ती चित्रित करताना त्यात कथेचं प्रतिबिंब पडेल असं पाहिलं जाई.
चित्रपटसंगीताच्या अभ्यासिका डॉ. मृदुला दाढे यांनी या पुस्तकात आपल्या भावविश्वात अढळपद मिळवलेल्या अशा १५ चित्रपटांची निवड केली आहे. त्या चित्रपटांच्या कथेला समर्थ जोड देणाऱ्या गीतांचं चित्रपटातलं स्थान, त्यांची सौंदर्यस्थळं, त्यांची सांगीतिक बलस्थानं डॉ. मृदुला यांनी पारखी नजरेने पुस्तकात उलगडून दाखवली आहेत. गीतकाराची तरलता, संगीतकाराची सर्जनशीलता अनेक ‘अफसाने’ या रसग्रहणात आढळत जातील. चित्रपट कथानक आणि गाणी यांच्यातील मेळ उलगडणारं…
अफ़साना लिख रही हूँ! 



260.00 Add to cart

आपलं विश्व

विश्वाच्या उत्पत्तीच्या रंजक इतिहासापासून भविष्यात विश्व कसं असेल इथपर्यंत



“आपलं विश्व आणि त्याची नवलकथा’ या आगळ्यावेगळ्या सचित्र ग्रंथात सुकल्प कारंजेकर यांनी विश्वाच्या उत्पत्तीपासून त्याच्या भवितव्यापर्यंत विविधांगी विश्ववेध घेतलेला आहे. विश्वशास्त्रासारख्या अद्भुत विषयाचा हा सुबोध, पण अभ्यासपूर्ण परिचय आहे. त्याला विज्ञानाची बैठक आहे, पण त्यात कथनातील कोरडेपणा वा तंत्रशरणता नाही. केवळ विज्ञानाच्या नव्हे, तर साहित्य-तत्त्वज्ञानाच्या अंगानेसुद्धा हजारो वर्षांची विश्वकहाणी ते रंजक पद्धतीने मांडत जातात. या मांडणीत आंतरविद्याशाखीयतेचा प्रत्यय येतो. नाविन्यपूर्ण आणि दर्जेदार ग्रंथनिर्मितीवर भर देणाऱ्या ‘रोहन प्रकाशना’ने हाती ठेवलेली ही ‘सुकल्पित’ नवलकथा खचितच वाचक- विश्वाच्या पसंतीला उतरेल.

-राजा दीक्षित

सुप्रतिष्ठित प्राध्यापक (Emeritus Professor)
अध्यक्ष व प्रमुख संपादक, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ

 

विश्वाचा उगम कसा झाला असेल ?

विश्वाच्या या अफाट पसाऱ्यात आपलं स्थान काय ? हे प्रश्न हजारो वर्षांपासून माणसाच्या सोबत आहेत.

त्याची उत्तरंही वेगवेगळ्या संस्कृती सभ्यतांमध्ये उत्पत्तीकथांमार्फत द्यायचा प्रयत्न झाला, तर आधुनिक काळात माणसाने ही कोडी विज्ञानाच्या साहाय्याने सोडवली…. आणि अजूनही ही प्रक्रिया सुरूच आहे…..

थोडक्यात, विश्व समजून घेण्याचा माणसाचा प्रवास हजारो वर्षांपासूनचा आहे.

या प्रवासाचीच ही उद्बोधक गोष्ट….

कुमारांपासून मोठ्यांपर्यंत; सगळ्यांचं कुतूहल शमवणारं….

मायमराठीत, सोप्या पद्धतीने अनेक वैज्ञानिक संकल्पना समजावून सांगणारं…

रंजक आणि तितकीच सखोल माहिती देणारं…
आपल्याकडे असलंच पाहिजे असं ‘मस्ट रीड’ पुस्तक… आपलं विश्व


 

895.00 Add to cart

अनफर्गेटेबल जगजित सिंग

गझल गायकीच्या दुनियेतील तरल स्वर


सत्या सरन या अनेक वर्षं पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. ‘मी’ या स्त्री-विषयक इंग्रजी नियतकालिकाच्या त्या संपादक आहेत. त्यांनी स्त्री-समस्यांवर व सिनेमाध्यमावर सातत्याने व्यापक अभ्यासपूर्ण लेखन केलं आहे. पत्रकारितेतील योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. ‘सुवर्णयुगा'तील हिंदी चित्रपट आणि चित्रपट-संगीत याबाबत विशेष रुची असलेल्या सत्या सरन यांनी अनेक लघुकथाही लिहिलेल्या आहेत.

अनुवाद:
"पत्रकारितेचा अभ्यासक्रम करताना, त्यात 'अनुवाद' हा विषय शिकताना आपल्याला अनुवाद बऱ्यापैकी जमतो असं उल्का राऊत यांना वाटलं. त्यानंतर त्यांनी काही कथा अनुवाद करून पाहिल्या. 'रोहन प्रकाशन'ने प्रकाशित केलेलं 'ऋतुशैशव' (आमचं बालपण) हे त्यांचं पहिलं अनुवादित पुस्तक होय. त्यानंतर राऊत यांनी अनेक महत्त्वाच्या पुस्तकांचे अनुवाद केले आणि ते गाजलेदेखील. त्यांना लहानपणापासून वाचनाची आवड असून त्या शास्त्रीय संगीताच्या मैफलींना आवर्जून जातात. तसंच चित्रप्रदर्शनंदेखील पाहतात. कविता करणं हा त्यांचा छंद आहे. आवडलेल्या इंग्रजी पुस्तकांचा मराठी वाचकांसाठी अनुवाद करणं हा त्यांच्या आनंदाचा भाग आहे.


जगजित म्हटलं की, कानात आवाज घुमतात गझलांचे…मनाचा ठाव घेणाऱ्या, मन शांत करून जाणाऱ्या आवाजातल्या अनेक गझला ! नेमक्या भावना व्यक्त करत, काही अनपेक्षित सुरावटी गात, कधी पाश्चात्त्य वाद्यांचा आधार घेत जगजितने गझल गायकीचा चेहरामोहराच बदलून टाकला.
सत्या सरन यांनी लिहिलेल्या जगजितच्या या चरित्रात त्याचा विद्यार्थीदशेपासूनचा, स्ट्रगलर ते लोकप्रिय गायक असा प्रवास उल्का राऊत यांनी मराठीत रसाळपणे उलगडला आहे. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायकीने जगजित मैफिलीचं वातावरण भारून टाकत असे. रसिकांच्या डोळ्यांतून अश्रुधारा बरसवणारा जगजित एखादा चुटकुला सांगून त्याच मैफलीत रसिकांना हसायलाही भाग पाडत असे. जगजितचे असे अनेक पैलू या पुस्तकात विविध प्रसंगांतून खुलून येतात. नियतीने जगजित-चित्राला अनेक बरे-वाईट रंग दाखवले. ते दोघं कधी या नियतीला गायनाचा, आध्यात्माचा आधार घेत धिरोदात्तपणे सामोरे गेले, तर कधी कोलमडून गेले.
एक मित्र, मुलगा, वडील, गायक, चित्राचा साथी, नवगायकांसाठी मसीहा अशा अनेक भूमिकांमधून पुस्तकात भेटत जाणारा…अन्फर्गेटेबल जगजित सिंग.


270.00 Add to cart

माझं तालमय जीवन : झाकीर हुसेन


नसरीन मुन्नी कबीर यांची हिंदी चित्रपटविश्वाबद्दलची सोळाहून अधिक पुस्तकं प्रकाशित झाली असून त्यांनी यूकेतल्या ‘चॅनेल फोर’साठी टीव्ही मालिकांची निर्मिती केली आहे. या चॅनेलसाठी त्या सल्लागार म्हणून काम करतात. तसंच त्या ‘ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूट बोर्डा’च्या माजी गव्हर्नर होत्या. सध्या त्या लंडनमध्ये वास्तव्यास असतात.

अनुवाद :

मराठीतल्या आघाडीच्या तरुण लेखकांमध्ये प्रणव सखदेव यांचं नाव घेतलं जातं. त्यांनी अग्रगण्य मराठी दैनिकांत पत्रकार म्हणून काम केलं असून ते मराठी प्रकाशन क्षेत्रामध्ये संपादक व अनुवादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कथा आणि कविता मान्यवर नियतकालिकांमधून प्रकाशित होत असतात. ‘पायऱ्यांचा गेम आणि इतर कविता’ हा कवितासंग्रह, 'निळ्या दाताची दंतकथा’, ‘नाभितून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य' हे कथासंग्रह, व ‘काळेकरडे स्ट्रोक्स', ‘96 मेट्रोमॉल’ या कादंबऱ्या असं त्यांचं साहित्य प्रकाशित झालं आहे. त्यांना अनुवाद-प्रकल्पासाठी २०१५-१६ सालची ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ची अभ्यासवृत्तीही मिळाली आहे. त्यांना लेखनासाठी महत्त्वाची पारितोषिकं मिळाली असून इंग्रजीतल्या गाजलेल्या पुस्तकांचा अनुवाद त्यांनी केला आहे. फिक्शन लेखन करणं ही त्यांची पॅशन असून त्यातून समकालातल्या प्रश्नांचा भिडणं हे त्यांना महत्त्वाचं वाटतं. आजच्या तरुणांची मानसिकता, त्यांचे प्रश्न, विखंडित जगणं व तंत्रज्ञानाचा वाढता वापर या सगळ्याचं प्रतिबिंब त्यांच्या लेखनात पडलेलं दिसून येतं.


तबलावादक, संगीतकार आणि तालतज्ज्ञ झाकीर हुसेन हे जागतिक पातळीवरचं ख्यातकीर्त व्यक्तिमत्त्व. उस्ताद अल्लारखाँ यांचे सर्वांत मोठे सुपुत्र. त्यांनी वयाच्या सातव्या वर्षी पहिल्यांदा जाहीर वादन केलं आणि त्यानंतर ते संगीत क्षेत्रातला ‘चमत्कार’ समजले गेले! त्यानंतर कौशल्यपूर्ण वादनाने आणि बुद्धिमत्तेमुळे ते भारतीय शास्त्रीय संगीतातल्या वादकांसाठी तसंच नर्तकांसाठी एक ‘सर्जनशील’ साथीदार झाले. याबरोबरच झाकीर यांनी आपल्या सर्जकतेतून जाझ आणि जागतिक संगीतातही आपला ठसा उमटवला. त्यांनी अनेक प्रसिद्ध वादकांसोबत जगभरात कार्यक्रम केले तसंच एकलवादनही केलं. जॉन मॅकलॉघ्लिन, एल. शंकर आणि टी.एच. विनयक्रम यांच्यासोबत त्यांनी ‘शक्ती बँड’ स्थापन करून संगीत क्षेत्रात इतिहास रचला. त्यांनी जगविख्यात दिग्दर्शकांच्या चित्रपटांसाठी पार्श्वसंगीत दिलं, तसंच काही चित्रपटांत अभिनयही केला. नसरीन मुन्नी कबीर यांनी झाकीर हुसेन यांच्याशी साधलेल्या या प्रदीर्घ संवादात आपण झाकीर यांची जीवनकहाणी त्यांच्याच तोंडून ऐकतो. त्यांचं बालपण कसं होतं, माहीममध्ये त्यांनी व्यतीत केलेली सुरुवातीची वर्षं, असामान्य प्रतिभेच्या वडिलांकडून त्यांनी वयाच्या चवथ्या वर्षापासून घेतलेले तबलावादनाचे धडे, पं. रवी शंकर, उस्ताद अली अकबरखॉँ आणि उस्ताद विलायतखॉँ यांसारख्या प्रतिभावंतांसोबत काम करताना आलेले अनुभव, आठवणी आणि किस्से यांतून संगीताचं अनोखं विश्व आपल्यासमोर येतं. यात झाकीर आपल्याला त्यांच्या आयुष्याचं तत्त्वज्ञान, संगीताबद्दलची त्यांची समज, गुरू-शिष्य नातं आणि तबलावादनावर असलेलं त्यांचं निस्सीम प्रेम याबद्दल कधी मिश्किलपणे तर कधी समर्पित भावनेने बोलतात. एक विख्यात कलावंत म्हणून अमेरीका व भारत या दोन्ही देशांत आयुष्य व्यतीत करण्याची कसरत त्यांनी कशी साधली आहे याविषयीही ते मोकळेपणाने सांगतात.


295.00 Add to cart

आणखी कानोकानी

 

'रोहन'चे एक ‘कलंदर’ लेखक. पत्रकारिता, अनुवाद, सदर लेखन ते ललित लेखनामध्ये अनेक वर्षं मुशाफिरी केलेला ‘ज्येष्ठ लेखक’ म्हणून परिचित होते. त्यांना व्यासंगी पत्रकारितेचा चार दशकाहून अधिक अनुभव होता. तसंच त्यांना पालिका बैठकीपासून आंतरराष्ट्रीय शिखर परिषदांचे वृत्तांत देण्यापर्यंतचा समृद्ध अनुभव होता. दैनिक सकाळ, तरुण भारत व केसरी या वृत्तपत्रांतून काम केल्यानंतर ते महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्रात दाखल झाले. महाराष्ट्र टाइम्सचे दिल्ली प्रतिनिधी म्हणून त्यांनी ११ वर्षं काम केलं. तेथून त्यांनी लिहलेली 'राजधानीतून' ही वार्तापत्रं विशेष गाजली. त्यानंतर अनेक वर्षं त्यांनी ‘मटा’चे कार्यकारी संपादक म्हणून काम केलं. 'कलंदर' या टोपण नावाने 'कानोकानी' हे त्याचं सदरही विशेष लोकप्रिय झालं. अनुवाद क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केली असून त्यामध्ये इंदिरा गांधी (पुपुल जयकर), शेषन (के. गोविंदन कुट्टी), इंदिरा अंतिम पर्व (पी. सी. अलेक्झांडर), लता मंगेशकर (हरीश भिमानी), फॅन्टॅस्टिक फेलूदा (सत्यजित रे पुस्तकांची मालिका), लाल बहादूर शास्त्री (पी. एन. धर), कस्तुरबा : एक शलाका (अरुण गांधी), आर. डॉक्युमेंट (आयर्विंग वॉलेस) यांचा समावेश होतो. हे सर्व अनुवाद त्यांना उत्कृष्ट तर होतेच, परंतु ते लोकप्रियही झाले. सर्वोत्कृष्ट अनुवादासाठी साहित्य अकादमी, राज्य सरकार व अनुवाद सुविधा केंद्र यांचे पुरस्कार त्यांना लाभले. 'कानोकानी' या पुस्तकाला मसापचा चि. वि. जोशी पुरस्कार लाभला.

आणखी कानोकानी ‘ कलंदर’च्या खुमासदार शैलीतील लिखाणाचं पहिलं संकलन ‘ कानोकानी ‘ आणि आता हे दुसरं ‘ आणखी कानोकानी ‘ . या संग्रहात ‘ कलंदर’ने आचार्य अत्रे , पु.ल.देशपांडे , वि . स . खांडेकर , कुसुमाग्रज , जी . ए . कुलकर्णी , मंगेश पाडगावकर अशा प्रथितयश साहित्यिकांच्या संदर्भात खुसखुशीत लेख लिहून ‘ साहित्यिक खळखळाट ‘ निर्माण केला आहे , तर साहित्यक्षेत्रातील अनेक घटनांची , प्रसंगांची विडंबनात्मक उठाठेवही केली आहे . पुस्तकात कलंदराने आर . के . लक्ष्मण ते मधुबाला अशा कलाक्षेत्रातील अनेकांच्या गुणावगुणांवर मिस्किल लिखाण केले आहे , ‘ नाट्यवर्तुळाचा कानोसा घेतला आहे , मराठी भाषेबाबतची अनास्था चव्हाट्यावर आणली आहे आणि ‘ राजकीय कोलाहला’चा मार्मिक उपहासही केला आहे . पहिल्या ‘ कानोकानी’ला राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट विनोदी वाङ्मयाचा पुरस्कार प्राप्त झाला होता . त्या संग्रहातील तिरकस बाणांनी वाचकांची वाहवा मिळविली . आता ‘ आणखी कानोकानी’मधील आपल्या लक्ष्यांवर ‘ ना – दुखापत ‘ तत्त्वावर सोडलेली निर्विष क्षेपणास्त्रं ‘ विनोदी साहित्याचा अवकाश निश्चितच प्रकाशमान करतील .


100.00 Add to cart

लोकप्रिय चित्रतरिका

 


या लोकप्रिय अभिनेत्रीचं बालपण , त्यांची जडण – घडण , त्यांच्या व्यावसायिक व वैयक्तिक जीवनात आलेले चढ – उतार , यश – अपयश याचा पट वेधकरित्या उलगडून दाखवला आहे डॉ . शुभा चिटणीस यांनी , त्यांना प्रत्यक्ष भेटून , त्यांच्याशी संवाद साधून !


125.00 Add to cart

विरंगुळा

 


आपल्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात स्वत : साठी वेळ काढणं , छंद जोपासणं यासाठी वेळ असतो कुठे ? त्यामुळे अनेकांची सेवानिवृत्तीनंतर करायच्या कामांची मोठी यादीच तयार असते ! श्री.के. अक्षीकर यांनी सेवानिवृत्तीनंतर वेळेचा सुंदर विनियोग करून आपला आवडीचा छंद जोपासायचं ठरवलं ! त्यांचा हा छंद म्हणजे लेखन ! बारा लेखांच्या या संग्रहात दैनंदिन जीवनातील त्यांची सूक्ष्म निरीक्षणशक्ती , ओघवती लेखनशैली व परिपक्व वैचारिक बैठक याची प्रचीती येते .


100.00 Add to cart

खरं सांगायचं तर…

AN UNSUITABLE BOY (मराठी अनुवाद)


हिंदी फिल्म इंडस्ट्रीत तसंच रसिक प्रेक्षकांना करण जोहर हे नाव माहीत नसणं विरळा! दिग्दर्शन, निर्मिती आणि चित्रपट लेखन या तीनही क्षेत्रांत करणने आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. त्याचे वडील म्हणजे सिनेसृष्टीतील ख्यातनाम निर्माते यश जोहर! त्यांच्या मृत्यूनंतर ‘धर्मा प्रॉडक्शन्स’ची धुरा व वडलांचा वारसा करण पुढे नेत आहे. ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या चित्रपटासाठी आदित्य चोप्रा यांचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून करणने इंडस्ट्रीत पदार्पण केलं. ‘कुछ कुछ होता है' हा त्याने दिग्दर्शित केलेला पहिलाच चित्रपट ब्लॉक ब्लस्टर ठरला. त्याने आजवर सहा चित्रपटांचं दिग्दर्शन केलं असून वीसहून अधिक चित्रपटांची निर्मिती केली आहे. २०१५ साली आलेल्या ‘बॉम्बे वेल्वेट' या अनुराग कश्यप दिग्दर्शित चित्रपटातून त्याने अभिनयाच्या क्षेत्रात रूपेरी पडद्यावर पदार्पण केलं. अनेक क्षेत्रांत सहज वावरत असणारा करण ‘कॉफी विथ करण' या सेलिब्रिटी चॅट ‘शो’चं सूत्रसंचालन करतो. फॅशन डिझायिंनग हा त्याचा जिव्हाळ्याचा विषय असून त्याने ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे', ‘मोहब्बतें' आणि ‘दिल तो पागल है' या चित्रपटांसाठी कॉस्च्यूम डिझायनिंग केलं आहे. ‘करण’ हे फिल्म इंडस्ट्रीतील एक अत्यंत लोकप्रिय व्यक्तिमत्त्व असून, या इंडस्ट्रीचा जणू तो प्रवक्ताच आहे! २००७ साली वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमतर्फे निवडण्यात आलेल्या २५० ‘ग्लोबल यंग लीडर्स’मध्ये करणची निवड करण्यात आली आहे.

अनुवाद :
‘रोहन प्रकाशन’च्या संपादन विभागात नीता कार्यरत असून संपादन, अनुवाद आणि लेखन क्षेत्रांत त्या गेली दहा वर्षं काम करत आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे आत्मचरित्र– ‘ड्रीम्स फ्रॉम माय फादर', ‘सुपरपॉवर?', ‘सिल्वा माइंड कंट्रोल' आणि ‘त्या दिवशी माझा मृत्यू झाला...' ही त्यांनी अनुवाद केलेली पुस्तकं. ‘सुपरपॉवर?' या त्यांच्या पुस्तकाला ‘नाशिक सार्वजनिक ग्रंथालया’चा सर्वोत्कृष्ट अनुवादाचा पुरस्कार मिळाला असून त्या कथालेखनही करतात. त्यांच्या कथांना पुरस्कारदेखील मिळाले आहेत.


खरं सांगायचं तर…मी करण जोहरचे चित्रपट फार कधी फॉलो केले नाहीत. दुसरं असं की, या पूर्वी चित्रपटविषयक जी पुस्तकं मी प्रकाशनासाठी निवडली त्याचे विषय होते – ‘लिजेंड’ म्हणता येतील असे कलाकार…गुरुदत्त, एस.डी.बर्मन, साहिर लुधियानवी, वहिदा रहेमान…!

अशा पार्श्वभूमीवर करणचं पुस्तक माझ्या निवडीत कसं काय बसलं? करणचे चित्रपट मला आकर्षित करत नव्हते, मात्र ‘कॉफी विथ करण’ त्याच्याविषयीचं कुतूहल मनात निर्माण करत होतं. स्टार अ‍ॅक्टर्स घेऊन ‘कॉफी’चे एपिसोड्स धीटपणे कन्डक्ट करण्याची हातोटी, हजरजबाबीपणा, नर्मविनोदी शैली असे त्याच्यातील गुण त्याच्या तल्लख बुद्धीची चुणूक दाखवत होते. म्हणूनच नंतर ‘AN UNSUITABLE BOY’ हे त्याचं आत्मचरित्र उत्सुकतेने वाचलं आणि मला असं जाणवलं की, करण प्रभावीपणे व्यक्त होऊ शकतो. त्याच्याकडे स्वत:चे विचार आहेत, ते स्पष्टपणे मांडण्याएवढा धीटपणा आहे, मोकळेपणा आहे, स्वत:कडे तो पारदर्शीपणे पाहू शकतो, आपल्या खासगी जीवनाविषयीही तो खुलेपणे बोलू शकतो. हातून घडलेल्या चुका तो प्रांजळपणे शेअर करतो. जीवनात नात्यांना अनन्यसाधारण महत्त्व देणा-या करणच्या जीवनविषयक काही स्वत:च्या व्याख्या आहेत…आपल्या दिग्दर्शक ते निर्माता या प्रवासाचा आढावा तो घेतो, पण त्रयस्थपणे. बहुतेक आत्मचरित्रात यशापयशाचेच पाढे वाचलेले असतात. मात्र या आत्मकथनाचा मुख्य सूर ‘खरं सांगायचं तर…’ अशा रोखठोक स्वरूपाचा आहे… आणि म्हणूनच या पुस्तकाचे प्रयोजन!
– प्रदीप चंपानेरकर
(प्रकाशक)

———-

“पूर्वी मी यशाला फार महत्त्व द्यायचो. आता वाटतं, एखादा सिनेमा पडला तर पडला. पुढचा चालेल.
आता एका अर्थाने, यश आणि अपयश याबाबतीत
माझ्या भावना बधीर झाल्या आहेत.”

“माझे सिनेमे तुम्हाला आवडले नाहीत तर त्याबद्दल माझं काहीच म्हणणं नसतं. तुम्हाला माझं काम आवडलंच पाहिजे किंवा मी तुम्हाला आवडलोच पाहिजे, असं माझं अजिबात म्हणणं नाही.”

“रोज सकाळी माझ्या ऑफिसमध्ये अत्यंत उत्साहाने आणि एनर्जीने मी जातो. एकापाठोपाठ एक अविरत काम करण्याची माझी उमेद असते. मी आयुष्य नावाच्या ट्रेडमिलवर सतत धावतो आहे. त्याचे गिअर्स माझ्या डोक्यात आहेत, तर लिव्हर्स माझ्या हातात आहेत.”

“मी जाणीवपूर्वक काही गोष्टी आत्मसात केल्या. मला सगळ्यांच्यात मिळून मिसळून राहायचं होतं. मला सर्वांपासून वेगळा राहणारा, लांब राहणारा चित्रपट दिग्दर्शक-निर्माता बनायचं नव्हतं. मला `सोशलाईट’ दिग्दर्शक बनायचं होतं.”

“मला जे मैदानात खेळांमध्ये करता आलं नाही त्याची कसर मी स्टेज गाजवून पुरेपूर भरून काढली. मी स्पर्धांमधला सर्वोत्तम वक्ता बनलो.”

“आज मागे वळून पाहिलं आणि आयुष्याला निश्चित वळण देणा-या घटना कोणत्या असा विचार केला तर मी बोर्डींग स्कूलमधून परत येणं, माझ्या आईने त्यावरून मला खणखणीतपणे सुनावलेले चार शब्द आणि स्पर्धेत पटकावलेला तो पहिलावहिला पुरस्काराचा कप या तीन गोष्टी सांगाव्या लागतील.”

“मी जसा आहे त्याच्याही पलीकडे सभ्यपणा आणि माणुसकी या दोन महत्त्वाच्या गोष्टी माझ्याजवळ आहेत. त्यामुळे मी आता लोकांच्या बोलण्याकडे काही लक्ष देत नाही.”

“व्यभिचार हे आयुष्यातलं वास्तव आहे. ज्यामध्ये, व्यभिचाराला संधी होती पण ते अजिबात बळी पडले नाहीत, असं एक लग्न, एक वैवाहिक नातं मला दाखवावं.”


250.00 Add to cart

त्या दहा वर्षांतील गुरु दत्त

अबरार अल्वी यांच्या कथनातून गुरू दत्तच्या जीवनातील सर्जनशील क्षणांचा आणि दु:खद घटनांचा घेतलेला सूक्ष्म वेध


सत्या सरन या अनेक वर्षं पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. ‘मी’ या स्त्री-विषयक इंग्रजी नियतकालिकाच्या त्या संपादक आहेत. त्यांनी स्त्री-समस्यांवर व सिनेमाध्यमावर सातत्याने व्यापक अभ्यासपूर्ण लेखन केलं आहे. पत्रकारितेतील योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. ‘सुवर्णयुगा'तील हिंदी चित्रपट आणि चित्रपट-संगीत याबाबत विशेष रुची असलेल्या सत्या सरन यांनी अनेक लघुकथाही लिहिलेल्या आहेत.

अनुवाद :
गंभीर वृत्तीचे अनुवादक, संपादक व लेखक म्हणून मिलिंद चंपानेरकर विख्यात आहेत. त्यांनी आजवर ‘लोककवी साहीर लुधियानवी' (मूळ लेखक : अक्षय मनवानी), ‘त्या दहा वर्षांतील गुरू दत्त' (मूळ लेखक - सत्य सरन), ‘सुन मेरे बंधू रे - एस.डी. बर्मन यांचं जीवनसंगीत' (मूळ लेखक - सत्या सरन), ‘वहिदा रेहमान... हितगुजातून उलगडलेली', (मूळ लेखक- नसरीन मुन्नी कबीर), ‘ए.आर. रहमान : संगीतातील वादळ' (मूळ लेखक - कामिनी मथाई), ‘भारतातील डाव्या चळवळीचा मागोवा’ (मूळ लेखक - प्रफुल्ल बिडवई), ‘गुड मुस्लीम बॅड मुस्लीम' (मूळ लेखक - महमूद ममदानी, सह-अनुवादक - पुष्पा भावे) यांसारख्या महत्त्वाच्या पुस्तकांचा अनुवाद केला असून ‘यांनी घडवलं सहस्रक' आणि ‘असा घडला भारत' या महद्ग्रंथांसाठी सह-संपादन, संशोधन व लेखन केलं आहे. त्यांनी दैनिक ‘इंडियन एक्स्प्रेस'साठी १९९१-२००० या कालावधीमध्ये पत्रकारिता केली आहे. गेली तीन दशकं त्यांनी विविध मराठी दैनिक आणि नियतकालिकांमधून समाजाभिमुख साहित्य, नाट्य व चित्रपटविषयक समीक्षापर लेखन आणि त्याचप्रमाणे, सामाजिक-राजकीय विषयांवर विश्लेषणात्मक लेखन केलं आहे. त्यांना ‘लोकशाहीवादी अम्मीस...दीर्घपत्र' या अनुवादित पुस्तकासाठी सर्वोत्कृष्ट अनुवादाचा २०१६ सालचा ‘साहित्य अकादमी' पुरस्कार प्राप्त झाला आहे.


९-१० ऑक्टोबर, १९६४
मी ते दृश्य लिहून पूर्ण करेस्तोवर जवळपास मध्यरात्रीची वेळ झालेली होती. गुरू दत्त यांनी माझ्यासोबत जेवायला बसायचं कबूल केलं होतं, परंतु प्रत्यक्षात त्यांनी काही देखील खाल्लेलं नव्हतं. मला भूक लागलेली असल्याने मी मात्र यथेच्छ जेवलो. ज्या अर्थी गुरू दत्त मद्याचा प्याला लीलया हाती धरून होते, त्या अर्थी ते पिऊन खूप बेहोश झाले होते, अशातली गोष्ट नव्हती. परंतु त्यांची मनोऽवस्था मात्र निश्चितच भयानक होती. मला त्यांना संहिता वाचून दाखवायची होती, पण ते जराही ऐकून घेण्याच्या मनोऽवस्थेत नव्हते. खरंतर त्यातून मला संकेत मिळायला हवा होता. (अबरार अल्वी)

__

गुरू दत्तने अबरारना संहिता रतनकडे ठेवून जाण्यास सांगितलं. ”इफ यू डोन्ट माईंड आय वुड लाइक टू रिटायर,” असं म्हणून गुरू दत्त उठून उभे राहिले आणि आपल्या खोलीत गेले… ते गुरू दत्तचे अखेरचे शब्द ठरणार होते.

त्या दहा वर्षांतील गुरू दत्त
– गुरू दत्तचे निकटतम सहकारी व जिवलग मित्र अबरार अल्वी यांच्या कथनातून गुरू दत्तच्या व्यक्तिमत्त्वावर व त्याच्या अकाली मृत्यूसह त्याच्या जीवनातील विविध घटनांवर नव्याने प्रकाश
– अबरार-गुरू दत्त यांच्या १९५४-६४ दरम्यानच्या सहप्रवासातून साकार झालेल्या ‘प्यासा’, ‘कागज के फूल’ व ‘साहिब बीबी और गुलाम’सह सर्व चित्रपटांच्या निर्मितीप्रक्रियेचा सूक्ष्म वेध


295.00 Add to cart

लोककवी साहिर लुधियानवी

जनाभिमुख काव्य, गीतं व जीवनाचा मागोवा


लेखक अक्षय मनवानी हे पूर्वी काही काळ कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत होते . परंतु, त्यात फारसे समाधानी नसलेले मनवानी नंतर मुक्त लेखनाकडे वळले. त्यांनी भारतीय सिनेमा आणि सांस्कृतिक क्षेत्रावर विपुल लेखन केलं आणि ते 'द कॅराव्हान' , 'बिझनेस स्टैंडर्ड' , 'मॅन्स वर्ल्ड' आणि ‘मुंबई मिरर' आदी नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेलं आहे. आपल्या कार्यामुळे दंतकथा बनलेले असूनही ज्यांच्या कार्याचा फारसा गौरव झालेला नाही, अशा अनेकांच्या कार्याचं दस्तऐवजीकरण करून त्यांच्या वारशाचं जतन करण्यासाठी बरंच काही करणं आवश्यक आहे, असं लेखक मनवानी यांना मन:पूर्वक वाटतं. साहिर लुधियानवी यांचं जीवन आणि कार्य याबाबत संशोधन करून लिहिलेलं हे पुस्तक म्हणजे त्याच दृष्टीने केलेला प्रयत्न आहे.

अनुवाद :
गंभीर वृत्तीचे अनुवादक, संपादक व लेखक म्हणून मिलिंद चंपानेरकर विख्यात आहेत. त्यांनी आजवर ‘लोककवी साहीर लुधियानवी' (मूळ लेखक : अक्षय मनवानी), ‘त्या दहा वर्षांतील गुरू दत्त' (मूळ लेखक - सत्य सरन), ‘सुन मेरे बंधू रे - एस.डी. बर्मन यांचं जीवनसंगीत' (मूळ लेखक - सत्या सरन), ‘वहिदा रेहमान... हितगुजातून उलगडलेली', (मूळ लेखक- नसरीन मुन्नी कबीर), ‘ए.आर. रहमान : संगीतातील वादळ' (मूळ लेखक - कामिनी मथाई), ‘भारतातील डाव्या चळवळीचा मागोवा’ (मूळ लेखक - प्रफुल्ल बिडवई), ‘गुड मुस्लीम बॅड मुस्लीम' (मूळ लेखक - महमूद ममदानी, सह-अनुवादक - पुष्पा भावे) यांसारख्या महत्त्वाच्या पुस्तकांचा अनुवाद केला असून ‘यांनी घडवलं सहस्रक' आणि ‘असा घडला भारत' या महद्ग्रंथांसाठी सह-संपादन, संशोधन व लेखन केलं आहे. त्यांनी दैनिक ‘इंडियन एक्स्प्रेस'साठी १९९१-२००० या कालावधीमध्ये पत्रकारिता केली आहे. गेली तीन दशकं त्यांनी विविध मराठी दैनिक आणि नियतकालिकांमधून समाजाभिमुख साहित्य, नाट्य व चित्रपटविषयक समीक्षापर लेखन आणि त्याचप्रमाणे, सामाजिक-राजकीय विषयांवर विश्लेषणात्मक लेखन केलं आहे. त्यांना ‘लोकशाहीवादी अम्मीस...दीर्घपत्र' या अनुवादित पुस्तकासाठी सर्वोत्कृष्ट अनुवादाचा २०१६ सालचा ‘साहित्य अकादमी' पुरस्कार प्राप्त झाला आहे.


‘ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है…’, ‘जिन्हे ना़ज है हिंद पर वो कहाँ है…’, ‘वो सुबह कभी तो आएगी…’, `तुम न जाने किस जहाँ मे…’, `मांग के साथ तुम्हारा… , `औरत ने जनम दिया मर्दों को…, `फैली हुई है…’, `आसमाँ पे है खुदा…’, `मन रे तू काहे ना धीर धरे…’, `संसार से भागे फिरते हो…’, ‘अल्ला तेरो नाम…’, ‘अभी न जाओ छोडकर…’, यासारखी चित्रपट-गीतं असोत किंवा ‘परछाइयाँ’, ‘ताज महल’, ‘तरहे-नौ’ यांसारख्या कविता आणि ‘तल्खियाँ’, ‘आओ कि कोई ख्वाब बुनें’ यांसारखे कवितासंग्रह असोत, साहिर आपल्या कवितांमधून गीतांचं सर्जन करत राहिले आणि आपल्या गीतांमधून कवितांची प्रतिभा प्रसवत राहिले. कधी त्यांनी सामाजिक वास्तवावर कठोर भाष्य केलं, कधी जीवनाचं तत्त्वज्ञान सांगितलं, तर कधी स्त्री-पुरुष नातेसंबंधांमधले विविध पदर हळुवारपणे उलगडून दाखवले.
या प्रतिभासंपन्न कवीच्या व्यक्तिमत्त्वाचा, त्याच्या जीवननिष्ठांचा, गीत-कवितांचा आणि लेखन प्रेरणांचा सूक्ष्म वेध लेखक अक्षय मनवानी यांनी या पुस्तकात घेतला आहे. तसंच अमृता प्रीतमसह अनेकांचा साहिर यांच्यावर कसा प्रभाव पडला याचा शोधही घेतला आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या प्रेरणास्रोतांचाही वेध घेतला आहे. अनेक संबंधित व्यक्तींच्या भेटीगाठी घेऊन मनवानी यांनी विपुल संशोधन केलं आहे. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक मिलिंद चंपानेरकर यांनी या पुस्तकाचा तितक्याच समर्थपणे मराठी अनुवाद साकारला आहे.
आपल्या काव्यप्रतिभेने रसिकांच्या मनात कायमचं घर केलेल्या एका मनस्वी कवीची ही जीवनगाथा… लोककवी साहिर लुधियानवी


400.00 Add to cart

सून मेरे बंधु रे

एस.डी. बर्मन यांचं जीवन-संगीत


सत्या सरन या अनेक वर्षं पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. ‘मी’ या स्त्री-विषयक इंग्रजी नियतकालिकाच्या त्या संपादक आहेत. त्यांनी स्त्री-समस्यांवर व सिनेमाध्यमावर सातत्याने व्यापक अभ्यासपूर्ण लेखन केलं आहे. पत्रकारितेतील योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. ‘सुवर्णयुगा'तील हिंदी चित्रपट आणि चित्रपट-संगीत याबाबत विशेष रुची असलेल्या सत्या सरन यांनी अनेक लघुकथाही लिहिलेल्या आहेत.

अनुवाद :
गंभीर वृत्तीचे अनुवादक, संपादक व लेखक म्हणून मिलिंद चंपानेरकर विख्यात आहेत. त्यांनी आजवर ‘लोककवी साहीर लुधियानवी' (मूळ लेखक : अक्षय मनवानी), ‘त्या दहा वर्षांतील गुरू दत्त' (मूळ लेखक - सत्य सरन), ‘सुन मेरे बंधू रे - एस.डी. बर्मन यांचं जीवनसंगीत' (मूळ लेखक - सत्या सरन), ‘वहिदा रेहमान... हितगुजातून उलगडलेली', (मूळ लेखक- नसरीन मुन्नी कबीर), ‘ए.आर. रहमान : संगीतातील वादळ' (मूळ लेखक - कामिनी मथाई), ‘भारतातील डाव्या चळवळीचा मागोवा’ (मूळ लेखक - प्रफुल्ल बिडवई), ‘गुड मुस्लीम बॅड मुस्लीम' (मूळ लेखक - महमूद ममदानी, सह-अनुवादक - पुष्पा भावे) यांसारख्या महत्त्वाच्या पुस्तकांचा अनुवाद केला असून ‘यांनी घडवलं सहस्रक' आणि ‘असा घडला भारत' या महद्ग्रंथांसाठी सह-संपादन, संशोधन व लेखन केलं आहे. त्यांनी दैनिक ‘इंडियन एक्स्प्रेस'साठी १९९१-२००० या कालावधीमध्ये पत्रकारिता केली आहे. गेली तीन दशकं त्यांनी विविध मराठी दैनिक आणि नियतकालिकांमधून समाजाभिमुख साहित्य, नाट्य व चित्रपटविषयक समीक्षापर लेखन आणि त्याचप्रमाणे, सामाजिक-राजकीय विषयांवर विश्लेषणात्मक लेखन केलं आहे. त्यांना ‘लोकशाहीवादी अम्मीस...दीर्घपत्र' या अनुवादित पुस्तकासाठी सर्वोत्कृष्ट अनुवादाचा २०१६ सालचा ‘साहित्य अकादमी' पुरस्कार प्राप्त झाला आहे.


हिंदी चित्रपटसंगीताच्या सुवर्णयुगातील अग्रणी संगीतकार सचिन देव बर्मन यांना चित्रपटमाध्यमाची चांगली जाण होती;
गानदृश्य व्हिज्युअलाइज करण्याची आणि प्रसंगानुरूप गाणी स्वरबद्ध करण्याची क्षमता त्यांच्यात होती.
त्यांच्या अशा वैशिष्ट्यांमुळेच ते इतर समकालीन संगीतकारांपेक्षा खचितच अधिक चतुरस्र व सदाबहार संगीतकार ठरू शकले.
अशा त्यांच्या अनेक वैशिष्ट्यांचा शोधक नजरेने मागोवा घेणा‌र्‍या सत्या सरन लिखित मूळ इंग्रजी पुस्तकाचा मिलिंद चंपानेरकर यांनी
केलेला हा अनुवाद– `सुन मेरे बंधु रे’.
`ये रात ये चाँदनी तू कहाँ’, `जलते है जिसके लिए’, `गाता रहे मेरा दिल’ ते `कोरा कागज था ये मन मेरा’ यांसारखी
असंख्य आनंददायी प्रणयगीतं… `वक्त ने किया क्या हंसी सितम’, `जाये तो जाये कहाँ’ यांसारखी अविस्मरणीय विरहगीतं…
`ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है’ सारखी सामाजिक रोष व्यक्त करणारी गीतं ते `वहाँ कौन है तेरा’, `सुन मेरे बंधु रे’ सारखी
त्यांनी स्वत: गायलेली या मातीतली व तत्त्वज्ञानात्मक डूब असलेली गाणी…
त्यांच्या संगीतातील वैविध्याची साक्ष देणारी अगणित गीतं आहेत, परंतु अशा त्यांच्या गीतांची निर्मितीप्रक्रिया उलगडून दर्शवणारं आणि त्यामागच्या प्रेरणास्रोतांचा कल्पकतेने वेध घेणारं हे एकमेवच पुस्तक ठरावं.एस.डी.बर्मन यांच्या संगीताचा व त्यांच्या बालपणापासूनच्या व्यक्तिजीवनातील प्रेरणास्रोतांचा अन्वय लावणारं, त्यांची स्वभाववैशिष्ट्यं सांगणारं मराठी संगीत-रसिकांसाठी एक संग्राह्य असं पुस्तक `सुन मेरे बंधु रे…’


300.00 Add to cart

रहें ना रहें हम

चित्रपटसृष्टीला सुवर्णकाळ बहाल करणा-या संगीतकारांची वैशिष्टयं आणि त्यांच्या अजरामर गाण्यातील सौंदर्यस्थळं…


पं. गजाननबुवा जोशी, पं. एस.के. अभ्यंकर, पं. मधुकर जोशी, डॉ. आशा पारसनीस जोशी यांच्याकडे प्रा. डॉ. मृदुला दाढे-जोशी यांचं शास्त्रीय संगीताचं शिक्षण झालं असून त्यांनी मानसशास्त्र या विषयात पदवी (विशेष प्रावीण्यासहित) प्राप्त केली आहे. त्यानंतर संगीत विषयात एम.ए. करून त्या विद्यापीठात प्रथम आल्या. त्यांनी ‘हिंदी चित्रपट संगीतातील प्रयोगशील संगीतकार’ या विषयात एस.एन.डी.टी. विद्यापीठाची पीएच.डी. प्राप्त केली असून हिंदी चित्रपट गीतांची वैशिष्ट्यं सांगत, त्यांतील बारकावे उलगडून दाखवत गायनाचे सादर केलेले वैशिष्ट्यपूर्ण असे हजारो जाहीर कार्यक्रम त्यांनी केले आहेत. हिंदी चित्रपट गीतांवरचं त्यांचं लेखन केवळ गाण्याच्या चाली, शब्द एवढ्यापुरतं मर्यादित नसतं. तर त्यातलं ऑक्रेस्ट्रायझेशन, त्यातली वाद्यं, त्यांची वैशिष्ट्यं तसंच ते गाणं रचणाऱ्या संगीतकारांची वैशिष्ट्यं हे त्या नेमकेपणाने उलगडून सांगतात आणि त्याकडे पाहण्याचा एक सखोल दृष्टिकोन देतात. त्या संगीताबरोबरच विविध विषयावरील पुस्तकांचं वाचन करत असल्यामुळे त्याचे संदर्भ त्यांच्या लेखनात लीलया येतात. सध्या त्या मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागात प्राध्यापक म्हणून सध्या कार्यरत आहेत.

हिंदी चित्रपटसृष्टीचा अर्थात चित्रपटगीतांचा सुवर्णकाळ…

या कालखंडावर आपली नावं सुवर्णाक्षरांनी कोरणारे संगीतकार कोणते?
प्रत्येक संगीतकाराचा बाज वेगळा कसा? त्याची वैशिष्ट्यं कोणती?
त्यांची अजरामर गाणी कोणती?
त्या गाण्यांच्या चालींची, ऑर्केस्ट्रेशनची वैशिष्ट्यं कोणती?
त्यातील हरकतींचं, केलेल्या प्रयोगांचं महत्त्व काय?
त्यांतील कोणत्या जागा म्हणजे त्या गाण्यांची सौंदर्यस्थळं म्हणता येतील?
एकंदर सांगायचं तर, ही गाणी आपल्यावर
४०-५०-६० वर्षं कसं काय गारूड करू शकतात
हे नेमकेपणे सांगून, रसिकतेने केलेलं विश्लेषण म्हणजेच…
हिंदी चित्रपट संगीताच्या मर्मज्ञ
मृदुला दाढे-जोशी लिखित एक आस्वादात्मक पुस्तक
रहें ना रहें हम…



350.00 Add to cart

सुहाना सफर और…

कवी शैलेंद्र यांचा गीतमय जीवन-प्रवास


कथा, कादंबरी, ललित लेखन आणि चित्रपट आस्वाद अशा विविध क्षेत्रांत गेल्या तीस वर्षांपासून विजय पाडळकर यांनी लक्षणीय लेखन केलं आहे. त्यांची आजवर २५ स्वतंत्र आणि ६ अनुवादित पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. सत्यजित राय आणि गुलजार यांच्या चित्रपटांचा त्यांचा विशेष अभ्यास आहे. ‘माध्यमांतर-साहित्यातून चित्रपटाकडे' ही त्यांची चित्रपट अभ्यासाच्या दिशेचा वेध घेणारी सहा पुस्तकांची मालिका प्रकाशित झाली आहे. ‘महाराष्ट्र राज्य पुरस्कार’, ‘केशवराव कोठावळे पुरस्कार', ‘आपटे वाचन मंदिर इचलकरंजी पुरस्कार', ‘बी. रघुनाथ पुरस्कार' यांसारख्या अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. ते १९९६ सालच्या लातूर जिल्हा साहित्य संमेलनाचे आणि २०१० सालच्या ठाणे जिल्हा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, तसेच महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात परीक्षक म्हणूनही सहभागी होते. त्यांनी ‘पिंजरा' या लघुपटाची त्यांनी निर्मिती केली असून ते महाराष्ट्रात विविध ठिकाणी अभिजात जागतिक साहित्य, हिंदी सिनेसंगीत व चित्रपट रसास्वादावर त्यांनी व्याख्याने देतात.

हिंदी चित्रपटसृष्टीतला संगीताचा सुवर्णकाळ जेवढा संगीतकारांच्या अविस्मरणीय रचनांनी गाजला, तेवढाच तो प्रतिभावान गीतकारांच्या आशयसंपन्न काव्याने बहरला.
सामाजिक आणि वैचारिक पाश्र्वभूमीतून आलेल्या या गीतकारांनी प्रेमगीतं, युगुलगीतं आणि मानवी जीवनातल्या सर्वच भावभावना उत्कटतेने व्यक्त करणारी गीतं सर्जनशीलतेने लिहिली आणि त्याचबरोबर सामाजिक जाणिवांचा वेध घेणारी गीतंही संवेदनशीलतेने रचली.
अशा चतुरस्र गीतकारांमध्ये शैलेंद्र हे महत्त्वाचं नाव! ‘ओ सजना बरखा बहार आयी’, ‘दम भर जो उधर मूँह फेरे’, ‘पान खाएँ सैंया हमारो’, ‘जीना इसी का नाम है’, ‘आज फिर जिने की तमन्ना है’, ‘सुहाना सफर और…’ अशी वैविध्यपूर्ण आशयाची गीतं रचून त्यांनी रसिकांना सहजसोप्या शब्दांत विचारप्रवृत्त केलं, गीतांना तत्त्वज्ञानात्मक डूब देऊन प्रगल्भ केलं आणि तरल गीतांनी रिझवलंही…!
या पुस्तकात गीतकार शैलेंद्र यांच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक पैलूंची ओळख करून दिली आहे. तसंच त्यांच्या गीतांच्या चित्रणाची वैशिष्ट्यंही उलगडून सांगितली आहेत. ‘तीसरी कसम’ हा शैलेंद्र यांनी निर्मिलेला चित्रपट म्हणजे त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय… त्या चित्रपटाची पडद्यावरील आणि पडद्यामागील कहाणीही यात वाचायला मिळेल.
प्रसिद्ध चित्रपट-आस्वादक विजय पाडळकर यांनी घेतलेला शैलेंद्र यांच्या गीतमय जीवनप्रवासाचा हा विविधांगी वेध… ‘सुहाना सफर और…!’


Life and work of veteran lyricist in Bollywood – Shailendra! A reader can revisit the golden era of Bollywood music. Shailendra wrote all kinds of songs for successful films. It also tells about many behind the scene memories of various Hindi film songs. While reading about Shailendra, his life, struggles, how he carved his own niche in the industry, his passion of film making etc. This book is a kaleidoscope for film researchers and critics too.


300.00 Add to cart

हितगुजातून उलगडलेली वहिदा रेहमान

एका प्रतिभासंपन्न अभिनेत्रीचा चित्रपट व जीवनप्रवास तिच्याच शब्दांत


नसरीन मुन्नी कबीर यांची हिंदी चित्रपटविश्वाबद्दलची सोळाहून अधिक पुस्तकं प्रकाशित झाली असून त्यांनी यूकेतल्या ‘चॅनेल फोर’साठी टीव्ही मालिकांची निर्मिती केली आहे. या चॅनेलसाठी त्या सल्लागार म्हणून काम करतात. तसंच त्या ‘ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूट बोर्डा’च्या माजी गव्हर्नर होत्या. सध्या त्या लंडनमध्ये वास्तव्यास असतात.

अनुवाद :
गंभीर वृत्तीचे अनुवादक, संपादक व लेखक म्हणून मिलिंद चंपानेरकर विख्यात आहेत. त्यांनी आजवर ‘लोककवी साहीर लुधियानवी' (मूळ लेखक : अक्षय मनवानी), ‘त्या दहा वर्षांतील गुरू दत्त' (मूळ लेखक - सत्य सरन), ‘सुन मेरे बंधू रे - एस.डी. बर्मन यांचं जीवनसंगीत' (मूळ लेखक - सत्या सरन), ‘वहिदा रेहमान... हितगुजातून उलगडलेली', (मूळ लेखक- नसरीन मुन्नी कबीर), ‘ए.आर. रहमान : संगीतातील वादळ' (मूळ लेखक - कामिनी मथाई), ‘भारतातील डाव्या चळवळीचा मागोवा’ (मूळ लेखक - प्रफुल्ल बिडवई), ‘गुड मुस्लीम बॅड मुस्लीम' (मूळ लेखक - महमूद ममदानी, सह-अनुवादक - पुष्पा भावे) यांसारख्या महत्त्वाच्या पुस्तकांचा अनुवाद केला असून ‘यांनी घडवलं सहस्रक' आणि ‘असा घडला भारत' या महद्ग्रंथांसाठी सह-संपादन, संशोधन व लेखन केलं आहे. त्यांनी दैनिक ‘इंडियन एक्स्प्रेस'साठी १९९१-२००० या कालावधीमध्ये पत्रकारिता केली आहे. गेली तीन दशकं त्यांनी विविध मराठी दैनिक आणि नियतकालिकांमधून समाजाभिमुख साहित्य, नाट्य व चित्रपटविषयक समीक्षापर लेखन आणि त्याचप्रमाणे, सामाजिक-राजकीय विषयांवर विश्लेषणात्मक लेखन केलं आहे. त्यांना ‘लोकशाहीवादी अम्मीस...दीर्घपत्र' या अनुवादित पुस्तकासाठी सर्वोत्कृष्ट अनुवादाचा २०१६ सालचा ‘साहित्य अकादमी' पुरस्कार प्राप्त झाला आहे.


प्रतिभा, आगळं सौंदर्य आणि व्यक्तिरेखा समजून घेऊन त्यात जीव ओतण्याची असामान्य क्षमता व बुध्दिमत्ता या बळावर वहिदा रेहमानने चित्रपटसृष्टीत आपलं विशेष स्थान निर्माण केलं. आपल्या सहा दशकांच्या कारकिर्दीच्या पहिल्या टप्प्यात (१९५५-७५) गुरू दत्त, विजय आनंद ते सत्यजित राय यांसारख्या महान दिग्दर्शकांच्या चित्रपटांतून तिने आव्हानात्मक भूमिका साकार केल्या आणि एकप्रकारे ती पर्यायी स्त्री-प्रतिमांसाठी अवकाश निर्माण करणारी अभिनेत्री ठरली. ‘प्यासा’, ‘गाइड’, ‘अभिजान’, ‘मुझे जीने दो’, ‘तीसरी कसम’, ‘खामोशी’ आदी चित्रपटांतील तिच्या सघन-सजीव व्यक्तिरेखा अविस्मरणीय व कायमस्वरूपी ठसा उमटवणार्‍या ठरल्या… आजकालच्या ‘रंग दे बसंती’ किंवा ‘दिल्ली-६’ पर्यंत तो ठसा कायम आहे.
‘आज फिर जीने की तमन्ना है’ म्हणत पडद्यावर स्त्री-स्वातंत्र्याचा उद्धोष करणारी ही अभिनेत्री पडद्यामागील जीवनाबाबत नेहमीच मितभाषी राहिली. लेखिका नसरीन मुन्नी कबीर यांनी या ज्येष्ठ-श्रेष्ठ अभिनेत्रीला तिच्या भूमिकांबाबत, तिच्या व्यक्तित्वाबाबत आणि तिच्या जीवनप्रवासाबाबत बोलतं केलं आणि त्या बहुस्पर्शी संवादावर आधारित ‘कॉन्व्हर्सेशन्स विथ वहिदा रेहमान’ हे इंग्रजी पुस्तक साकार केलं. त्याच इंग्रजी पुस्तकाचा मिलिंद चंपानेरकर यांनी सिध्द केलेला हा मराठी अनुवाद- वहिदा रेहमान…हितगुजातून उलगडलेली!


295.00 Add to cart