यशवंतराव चव्हाण संच

३ बहुमोल पुस्तकांचा संच


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री तसेच स्वातंत्र्य चळवळीत सहभागी असलेले आदरणीय द्रष्टे व मुत्सद्दी नेते यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची मूलभूत पायाभरणी केली. सामान्य कुटुंबातून आलेले चव्हाण हे जनसामान्यांचे पुढारी म्हणून ओळखले जातात. त्यांना स्वतःच्या बलस्थानांची आणि मर्यादांची पुरेपूर जाणीव असल्याने त्यांनी तत्त्वनिष्ठ व्यवहारवादाचे पालन केले. लोकशाहीच्या शक्तीवर त्यांचा अतूट विश्वास असल्यामुळे त्यांनी न्यायपूर्ण समाजाच्या बांधणीसाठी आवश्यक असलेल्या धोरणांबाबत पुढाकार घेऊन त्यांना पाठिंबा दिला. चव्हाण एक समतोल विचारवंत, सिद्धहस्त लेखक, प्रतिभावान वक्ते, चाणाक्ष मुत्सद्दी तसेच द्रष्टे प्रशासक होते व त्यांनी लोकहिताच्या अनेक धोरणांवर आपला ठसा उमटवला. अनलंकृत शैलीत त्यांनी केलेलं लेखन हे मनाला स्पर्श करून जातंच, शिवाय ते आपल्याला समाजकारण, राजकारण यांचं सखोल भानही देतं.

महाराष्ट्राच्या लोकप्रिय सुपुत्राचा परिचय, त्यांनी केलेल्या राजकीय क्षेत्रातील योगदानाची माहिती आजच्या पिढीला विशेषत: तरुणांना व्हावी या दृष्टीने यशवंतरावांच्याच लेखणीतून साकार झालेली तीन पुस्तकं- ‘कृष्णाकांठ’, ‘भूमिका’ व ‘ॠणानुबंध’ रोहन प्रकाशनातर्फे पुनर्प्रकाशित करण्यात आली आहेत.
कृष्णाकांठ म्हणजे यशवंतरावांचा बालपणापासून त्यांच्या राजकीय जडणघडणीपर्यंतचा लक्षवेधक प्रवास! त्यांचं बालपण, स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचा सहभाग, पहिला तुरुंगवास, त्यांचं वकिलीचं शिक्षण, वेणूताईंबरोबरची विवाहगाठ आणि राजकारणातील त्यांचा प्रवेश अशा रोमांचक आणि प्रेरणादायी अनुभवांचा पट यशवंतराव त्यांच्या सहज-सुंदर शैलीतून कृष्णाकांठद्वारे उलगडतात.
‘भूमिका’ हे पुस्तक म्हणजे यशवंतरावांच्या कारकिर्दीचं पुढचं पर्व म्हणता येईल. यशवंतरावांचे राजकीय, सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक प्रश्नांसंबंधीचे विचार या पुस्तकातील विविध लेखांतून वाचायला मिळतात.
यशवंतरावांचा चिंतनाचा प्रमुख विषय जरी राजकारण हा असला तरी गतकाळाकडे वळून बघताना वैयक्तिक जीवनातील काही आठवणी, व्यक्ती व प्रसंग त्यांच्या मनात घर करून राहिले होते. काही जवळची माणसं, स्थळं, भावना व विचार यांच्याशी यशवंतरावांचा एक ऋणानुबंध निर्माण झाला होता. त्या साऱ्याचं ओघवतं शब्दांकन म्हणजे ‘ऋणानुबंध’ हे पुस्तक!


$10.40 Add to cart

हां ये मुमकिन हे!

एका डॉक्टरचा बिहारमधला स्तिमित करणारा संघर्ष


डॉ. तरू जिंदल यांचा जन्म १९८३ सालचा. बालपणीच तरू यांच्या मनात सेवेची आणि कष्टाची बीजं रोवली गेली. थोरल्या भावाच्या प्रेरणेने त्यांनी वैद्यकीय शिक्षण घ्यायचं ठरवलं आणि २०१३ साली मुंबईतून लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज आणि सायन हॉस्पिटल येथून स्त्रीरोगशास्त्रात एम.एस. ही पदवी संपादन केली. लहान वयातच त्यांनी गांधीजींचं आत्मचरित्र पुन:पुन्हा वाचून काढलं. एम.बी.बी.एस.चं शिक्षण चालू असतानाच त्यांनी ग्रामीण आणि आदिवासी भागांना भेटी देऊन तिथल्या लोकांच्या आरोग्याच्या गरजा आणि समस्या समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या कष्टाला सखोल अभ्यासाची जोड दिली. एम.बी.बी.एस. आणि एम.एस.च्या वर्षांत त्यांनी कधीही ‘डिस्टिंक्शन'ची पातळी सोडली नाही. त्यांना 'ग्लोबल विमेन अचिव्हर अॅडवॉर्डस्’, ‘मोस्ट इन्स्पायिंरग वुमन ऑफ द इअर अॅावॉर्ड – फॉर व्हॅल्युएबल कॉन्ट्रीब्युशन इन हेल्थकेअर'ने सन्मानित करण्यात आलं आहे. दुर्दैवाने मेंदूत गाठ निर्माण झाल्याने त्यांना उपचारांसाठी बिहारहून परतावं लागलं. सध्या त्यावर उपचार घेता घेता डॉक्टर्स व परिचारिकांना स्तनपान विषयातील अद्ययावत माहितीचं प्रशिक्षण देण्यासाठी ‘सल्लागार’ म्हणून त्या काम करत आहेत.

अनुवाद :
अनुवाद, चित्रकला आणि लेखन-वाचन यांमध्ये विशेष रस असलेल्या रमा यांनी माधुरी पुरंदरे यांनी पुस्तकं मराठीतून इंग्रजीत भाषांतरित केली आहेत. त्यांना फ्रेंच , इंग्रजी आणि मराठी भाषांमधली ललित साहित्याची पुस्तकं अनुवादित करायला आवडतात. लहान मुलांसाठीही त्या लेखन करतात. आजवर त्यांनी वीसपेक्षा जास्त कलाकृतींची भाषांतरं केली असून त्यांना 'डेली हंट'ने आयोजित केलेल्या कथास्पर्धेत पारितोषिकही मिळालं आहे.


प्रसूती कक्षाच्या आत बसलेली कुत्री, शेजारीच पसरलेला बायो-मेडिकल कचऱ्याचा ढीग, दुर्गंधी पसरवणारं स्वच्छतागृह, बाळंत स्त्रियांना टाके घालणाऱ्या तिथल्याच झाडूवाल्या, स्टाफरुममध्ये एकमेकींच्या हातांना मेंदी लावणाऱ्या लेडी डॉक्टर्स…

हे दृश्य होतं बिहारमधल्या मोतिहारी जिल्हा रुग्णालयातलं आणि दृश्य बघत होती यात बदल घडवू पाहणारी प्रसूतिशास्त्रतज्ज्ञ डॉ. तरु जिंदल !

भ्रष्ट व्यवस्था, निष्क्रिय डॉक्टर्स, कुपोषणासारख्या समस्या अशा अनेक आघाड्यांवर लढत देऊन अविश्वसनीय बदल घडवून आणणाऱ्या एका तरुण डॉक्टरची प्रेरणादायी संघर्षकथा… हां, ये मुमकिन है ।



$4.55 Add to cart

विंचवाचं तेल

पारधी समाजातली मी… माझी ही ज्वलंत जिंदगानी


प्रशांत रूपवते हे सुमारे दीड दशकापेक्षा जास्तकाळ पत्रकारितेत कार्यरत आहेत. त्यांनी १९९६पासून वृत्तपत्रामध्ये लेखनास सुरुवात केली. त्यांनी मास कम्युनिकेशनमध्ये पदव्युत्तर पदवीमध्ये सेंट झेविअर्स महाविद्यालयातून पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. ‘आपलं महानगर’ या दैनिकामध्ये स्तंभलेखनास प्रारंभ केल्यानंतर ते दैनिक ‘महानगर’मध्ये पत्रकार म्हणून रुजू झाले. त्यापूर्वी ते ‘दैनिक लोकमत’मध्ये कार्यरत होते. २००२-०३मध्ये भूम-परांडा इथे झालेल्या पारधी हत्याकांड निमित्त ‘संपर्क’ संस्थेने बालकृष्ण रेणके यांच्या अध्यक्षतेखाली स्थापिलेल्या ‘सत्यशोधन समिती’मध्ये त्यांचा सहभाग होता. तसंच, अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मौजे शिंदे या गावातील दलितांवर टाकण्यात आलेल्या बहिष्कार प्रकरणी ‘डॉ. आंबेडकर राईटस लॉ नेटवर्क या संस्थे’ने स्थापलेल्या २००४-०५ यावर्षीच्या सत्यशोधन समितीमध्ये त्यांचा सहभाग होता. त्यांनी २००४ ते २०१३ या दरम्यान, मुंबई उच्च न्यायालय, टाडा, सत्र न्यायालय आणि दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयांमधील खटल्यांचं वार्तांकन केलं आहे. सध्या मुक्त पत्रकार म्हणून त्यांचे विविध विषयांवर लेखन सुरू असून विशेषत: जातपंचायती व ओबीसी धर्मांतर या संबंधाने त्यांचा अभ्यास सुरू आहे. ‘पदोन्नती आणि आरक्षण’ या पुस्तकाचं संपादन आणि लेखन त्यांनी केलं आहे.
सुनीता भोसले यांनी घरच्या परिस्थितीमुळे सहावीपर्यंतच शिक्षण घेतलं. त्यांनी वयाच्या अकराव्या वर्षी ‘मानवी हक्क अभियान’ अधिवेशनाद्वारे सामाजिक कामात प्रवेश केला आणि ‘भारिप बहुजना’द्वारे त्या सामाजिक कामात सहभागी झाल्या. त्यांनी ‘भारिप बहुजन महासंघा’चे दीड वर्ष काम केलं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा ‘मानवी हक्क अभियाना’त कार्यकर्ती म्हणून सामाजिक काम केलं आहे. गायरान जमिनी, अ‍ॅट्रोसिटी, पोलीस अत्याचार या संदर्भातही त्यांनी कार्य केलं आहे. त्यांनी ‘महाराष्ट्र राज्य आदिवासी फासेपारधी समाज संघटना’ याची महिला प्रमुख म्हणून काम पाहिलं आहे. २०११मध्ये त्यांनी ‘क्रांती’ संस्थेची स्थापना केली. शिवाय पारधी क्षेत्रात शिक्षण, आरोग्य, बालविवाह प्रतिबंध, अ‍ॅट्रोसिटी, पारधी विकास आराखड्यावर त्यांनी काम केलं आहे.

‘विंचवाचं तेल’ म्हणजे ‘गुन्हेगारी जमाती’विरुद्ध वापरलं जाणारं जहाल अस्त्र. बाहेर याला ‘सूर्यनारायण तेल’ म्हणूनही ओळखतात. पोलीस खातं आरोपीने केलेले, न केलेले गुन्हे कबूल करावेत यासाठी ‘थर्ड डिग्री’मध्ये या तेलाचा वापर करतं.
आरोपीच्या लिंगाला हे तेल लावलं जातं. त्यामुळे लिंगाला सूज येते आणि प्रचंड दाह होतो. तुमची सृजनताच मारून टाकायची… उद्ध्वस्त करायची…
पोलीस डिपार्टमेंटचं हे विंचवाचं तेल या समाजव्यवस्थेने… या संस्कृतीने साऱ्या बहुजन समष्टींसाठी विशेषत: दलित भटक्या-विमुक्तांविरुद्ध नाना रूपात वापरलंय… तर याच समष्टीतील ही पोर… सुनीता भोसले… पारधी या ‘गुन्हेगार’ असा शिक्का बसलेल्या जमातीत तिचा जन्म झाला. पारधी असल्याचे भोग तिलाही सुटले नाहीत. पण पोर बहाद्दर… तिने या ‘विंचवावर’ जालीम उपाय शोधला… तो म्हणजे भारतीय संविधानाचा! जयभीमच्या नाऱ्याचा!
समस्त पारधी समष्टीत भिनलेलं विष उतरवण्याचा प्रयत्न वयाच्या अकराव्या वर्षापासून करणाऱ्या या कार्यकर्तीची ही ज्वलंत जिंदगानी… विंचवाचं तेल !


$3.90 Add to cart

टेलिकॉम क्रांतीचं महास्वप्न

माझा प्रवास… 



अनुवाद :
१९६५ सालापासून सुमारे २५ वर्षं लाल निशाण पक्ष व कामगार चळवळीत शारदा साठे यांचा सक्रिय सहभाग आहे. १९७५ सालापासून त्या स्त्री मुक्ती चळवळीत कार्यरत आहेत. स्त्री मुक्ती संघटनेच्या त्या संस्थापक सदस्य असून संघटनेच्या ‘प्रेरक ललकारी’ या मुखपत्राच्या त्या मुख्य संपादक आहेत. त्यांनी स्वतंत्र लेखनाबरोबरच विविध विषयांवरील पुस्तकांचा मराठीत अनुवाद केला आहे.


सत्यनारायण गंगाराम पित्रोदा… ओडिशा राज्यातल्या तितिलगड या छोट्याशा गावातला हा तरुण ‘स्वप्नभूमी’ अमेरिकेत गेला काय आणि झपाट्याने विस्तारत जाणार्‍या तंत्रज्ञानाच्या अवकाशात त्याच्या हाती सोनं लागलं काय! सत्यनारायणचा ‘सॅम’ झाला आणि जागतिक पेटंट्सच्या मालकीमुळे कोट्याधीश बनला…
पण गांधीवादी विचारांचा पगडा असलेल्या सॅमना मात्र आपलं ज्ञान आणि गाठीशी असलेला अनुभव आपल्या मायभूमीसाठी वापरावा अशी आस लागली. आणि म्हणून ते भारतामध्ये परतले, तेच एक ‘महाध्येय’ घेऊन… भारतात ‘टेलिकॉम-क्रांती’ घडवण्याचं ! तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचंही त्यांना समर्थ पाठबळ लाभलं… आणि मग केवळ एक रुपया वेतनावर अविरत कष्ट करणारे सॅम आणि देशाच्या कानाकोपर्‍यात दिसणारे ‘एसटीडी/पीसीओ बूथ’ म्हणजे एक अतूट समीकरणच होऊन गेलं…!
राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर मात्र सॅम यांचं जगच हादरलं. भ्रष्टाचाराचे आरोप, त्यातच आलेला हृदयविकाराचा झटका आणि आर्थिक कफल्लकता यांमुळे ते खोल गर्तेत बुडाले, पण तरी निराश न होता फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पुन्हा राखेतून उसळून वर आले…!

भारतीय टेलिकॉम-क्रांतीचं महास्वप्न प्रत्यक्षात आणणार्‍या सॅम पित्रोदा यांची ही प्रेरक आत्मकथा !


$6.44 Add to cart

माझं तालमय जीवन : झाकीर हुसेन


नसरीन मुन्नी कबीर यांची हिंदी चित्रपटविश्वाबद्दलची सोळाहून अधिक पुस्तकं प्रकाशित झाली असून त्यांनी यूकेतल्या ‘चॅनेल फोर’साठी टीव्ही मालिकांची निर्मिती केली आहे. या चॅनेलसाठी त्या सल्लागार म्हणून काम करतात. तसंच त्या ‘ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूट बोर्डा’च्या माजी गव्हर्नर होत्या. सध्या त्या लंडनमध्ये वास्तव्यास असतात.

अनुवाद :

मराठीतल्या आघाडीच्या तरुण लेखकांमध्ये प्रणव सखदेव यांचं नाव घेतलं जातं. त्यांनी अग्रगण्य मराठी दैनिकांत पत्रकार म्हणून काम केलं असून ते मराठी प्रकाशन क्षेत्रामध्ये संपादक व अनुवादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कथा आणि कविता मान्यवर नियतकालिकांमधून प्रकाशित होत असतात. ‘पायऱ्यांचा गेम आणि इतर कविता’ हा कवितासंग्रह, 'निळ्या दाताची दंतकथा’, ‘नाभितून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य' हे कथासंग्रह, व ‘काळेकरडे स्ट्रोक्स', ‘96 मेट्रोमॉल’ या कादंबऱ्या असं त्यांचं साहित्य प्रकाशित झालं आहे. त्यांना अनुवाद-प्रकल्पासाठी २०१५-१६ सालची ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ची अभ्यासवृत्तीही मिळाली आहे. त्यांना लेखनासाठी महत्त्वाची पारितोषिकं मिळाली असून इंग्रजीतल्या गाजलेल्या पुस्तकांचा अनुवाद त्यांनी केला आहे. फिक्शन लेखन करणं ही त्यांची पॅशन असून त्यातून समकालातल्या प्रश्नांचा भिडणं हे त्यांना महत्त्वाचं वाटतं. आजच्या तरुणांची मानसिकता, त्यांचे प्रश्न, विखंडित जगणं व तंत्रज्ञानाचा वाढता वापर या सगळ्याचं प्रतिबिंब त्यांच्या लेखनात पडलेलं दिसून येतं.


तबलावादक, संगीतकार आणि तालतज्ज्ञ झाकीर हुसेन हे जागतिक पातळीवरचं ख्यातकीर्त व्यक्तिमत्त्व. उस्ताद अल्लारखाँ यांचे सर्वांत मोठे सुपुत्र. त्यांनी वयाच्या सातव्या वर्षी पहिल्यांदा जाहीर वादन केलं आणि त्यानंतर ते संगीत क्षेत्रातला ‘चमत्कार’ समजले गेले! त्यानंतर कौशल्यपूर्ण वादनाने आणि बुद्धिमत्तेमुळे ते भारतीय शास्त्रीय संगीतातल्या वादकांसाठी तसंच नर्तकांसाठी एक ‘सर्जनशील’ साथीदार झाले. याबरोबरच झाकीर यांनी आपल्या सर्जकतेतून जाझ आणि जागतिक संगीतातही आपला ठसा उमटवला. त्यांनी अनेक प्रसिद्ध वादकांसोबत जगभरात कार्यक्रम केले तसंच एकलवादनही केलं. जॉन मॅकलॉघ्लिन, एल. शंकर आणि टी.एच. विनयक्रम यांच्यासोबत त्यांनी ‘शक्ती बँड’ स्थापन करून संगीत क्षेत्रात इतिहास रचला. त्यांनी जगविख्यात दिग्दर्शकांच्या चित्रपटांसाठी पार्श्वसंगीत दिलं, तसंच काही चित्रपटांत अभिनयही केला. नसरीन मुन्नी कबीर यांनी झाकीर हुसेन यांच्याशी साधलेल्या या प्रदीर्घ संवादात आपण झाकीर यांची जीवनकहाणी त्यांच्याच तोंडून ऐकतो. त्यांचं बालपण कसं होतं, माहीममध्ये त्यांनी व्यतीत केलेली सुरुवातीची वर्षं, असामान्य प्रतिभेच्या वडिलांकडून त्यांनी वयाच्या चवथ्या वर्षापासून घेतलेले तबलावादनाचे धडे, पं. रवी शंकर, उस्ताद अली अकबरखॉँ आणि उस्ताद विलायतखॉँ यांसारख्या प्रतिभावंतांसोबत काम करताना आलेले अनुभव, आठवणी आणि किस्से यांतून संगीताचं अनोखं विश्व आपल्यासमोर येतं. यात झाकीर आपल्याला त्यांच्या आयुष्याचं तत्त्वज्ञान, संगीताबद्दलची त्यांची समज, गुरू-शिष्य नातं आणि तबलावादनावर असलेलं त्यांचं निस्सीम प्रेम याबद्दल कधी मिश्किलपणे तर कधी समर्पित भावनेने बोलतात. एक विख्यात कलावंत म्हणून अमेरीका व भारत या दोन्ही देशांत आयुष्य व्यतीत करण्याची कसरत त्यांनी कशी साधली आहे याविषयीही ते मोकळेपणाने सांगतात.


$3.84 Add to cart

खरं सांगायचं तर…

AN UNSUITABLE BOY (मराठी अनुवाद)


हिंदी फिल्म इंडस्ट्रीत तसंच रसिक प्रेक्षकांना करण जोहर हे नाव माहीत नसणं विरळा! दिग्दर्शन, निर्मिती आणि चित्रपट लेखन या तीनही क्षेत्रांत करणने आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. त्याचे वडील म्हणजे सिनेसृष्टीतील ख्यातनाम निर्माते यश जोहर! त्यांच्या मृत्यूनंतर ‘धर्मा प्रॉडक्शन्स’ची धुरा व वडलांचा वारसा करण पुढे नेत आहे. ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या चित्रपटासाठी आदित्य चोप्रा यांचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून करणने इंडस्ट्रीत पदार्पण केलं. ‘कुछ कुछ होता है' हा त्याने दिग्दर्शित केलेला पहिलाच चित्रपट ब्लॉक ब्लस्टर ठरला. त्याने आजवर सहा चित्रपटांचं दिग्दर्शन केलं असून वीसहून अधिक चित्रपटांची निर्मिती केली आहे. २०१५ साली आलेल्या ‘बॉम्बे वेल्वेट' या अनुराग कश्यप दिग्दर्शित चित्रपटातून त्याने अभिनयाच्या क्षेत्रात रूपेरी पडद्यावर पदार्पण केलं. अनेक क्षेत्रांत सहज वावरत असणारा करण ‘कॉफी विथ करण' या सेलिब्रिटी चॅट ‘शो’चं सूत्रसंचालन करतो. फॅशन डिझायिंनग हा त्याचा जिव्हाळ्याचा विषय असून त्याने ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे', ‘मोहब्बतें' आणि ‘दिल तो पागल है' या चित्रपटांसाठी कॉस्च्यूम डिझायनिंग केलं आहे. ‘करण’ हे फिल्म इंडस्ट्रीतील एक अत्यंत लोकप्रिय व्यक्तिमत्त्व असून, या इंडस्ट्रीचा जणू तो प्रवक्ताच आहे! २००७ साली वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमतर्फे निवडण्यात आलेल्या २५० ‘ग्लोबल यंग लीडर्स’मध्ये करणची निवड करण्यात आली आहे.

अनुवाद :
‘रोहन प्रकाशन’च्या संपादन विभागात नीता कार्यरत असून संपादन, अनुवाद आणि लेखन क्षेत्रांत त्या गेली दहा वर्षं काम करत आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे आत्मचरित्र– ‘ड्रीम्स फ्रॉम माय फादर', ‘सुपरपॉवर?', ‘सिल्वा माइंड कंट्रोल' आणि ‘त्या दिवशी माझा मृत्यू झाला...' ही त्यांनी अनुवाद केलेली पुस्तकं. ‘सुपरपॉवर?' या त्यांच्या पुस्तकाला ‘नाशिक सार्वजनिक ग्रंथालया’चा सर्वोत्कृष्ट अनुवादाचा पुरस्कार मिळाला असून त्या कथालेखनही करतात. त्यांच्या कथांना पुरस्कारदेखील मिळाले आहेत.


खरं सांगायचं तर…मी करण जोहरचे चित्रपट फार कधी फॉलो केले नाहीत. दुसरं असं की, या पूर्वी चित्रपटविषयक जी पुस्तकं मी प्रकाशनासाठी निवडली त्याचे विषय होते – ‘लिजेंड’ म्हणता येतील असे कलाकार…गुरुदत्त, एस.डी.बर्मन, साहिर लुधियानवी, वहिदा रहेमान…!

अशा पार्श्वभूमीवर करणचं पुस्तक माझ्या निवडीत कसं काय बसलं? करणचे चित्रपट मला आकर्षित करत नव्हते, मात्र ‘कॉफी विथ करण’ त्याच्याविषयीचं कुतूहल मनात निर्माण करत होतं. स्टार अ‍ॅक्टर्स घेऊन ‘कॉफी’चे एपिसोड्स धीटपणे कन्डक्ट करण्याची हातोटी, हजरजबाबीपणा, नर्मविनोदी शैली असे त्याच्यातील गुण त्याच्या तल्लख बुद्धीची चुणूक दाखवत होते. म्हणूनच नंतर ‘AN UNSUITABLE BOY’ हे त्याचं आत्मचरित्र उत्सुकतेने वाचलं आणि मला असं जाणवलं की, करण प्रभावीपणे व्यक्त होऊ शकतो. त्याच्याकडे स्वत:चे विचार आहेत, ते स्पष्टपणे मांडण्याएवढा धीटपणा आहे, मोकळेपणा आहे, स्वत:कडे तो पारदर्शीपणे पाहू शकतो, आपल्या खासगी जीवनाविषयीही तो खुलेपणे बोलू शकतो. हातून घडलेल्या चुका तो प्रांजळपणे शेअर करतो. जीवनात नात्यांना अनन्यसाधारण महत्त्व देणा-या करणच्या जीवनविषयक काही स्वत:च्या व्याख्या आहेत…आपल्या दिग्दर्शक ते निर्माता या प्रवासाचा आढावा तो घेतो, पण त्रयस्थपणे. बहुतेक आत्मचरित्रात यशापयशाचेच पाढे वाचलेले असतात. मात्र या आत्मकथनाचा मुख्य सूर ‘खरं सांगायचं तर…’ अशा रोखठोक स्वरूपाचा आहे… आणि म्हणूनच या पुस्तकाचे प्रयोजन!
– प्रदीप चंपानेरकर
(प्रकाशक)

———-

“पूर्वी मी यशाला फार महत्त्व द्यायचो. आता वाटतं, एखादा सिनेमा पडला तर पडला. पुढचा चालेल.
आता एका अर्थाने, यश आणि अपयश याबाबतीत
माझ्या भावना बधीर झाल्या आहेत.”

“माझे सिनेमे तुम्हाला आवडले नाहीत तर त्याबद्दल माझं काहीच म्हणणं नसतं. तुम्हाला माझं काम आवडलंच पाहिजे किंवा मी तुम्हाला आवडलोच पाहिजे, असं माझं अजिबात म्हणणं नाही.”

“रोज सकाळी माझ्या ऑफिसमध्ये अत्यंत उत्साहाने आणि एनर्जीने मी जातो. एकापाठोपाठ एक अविरत काम करण्याची माझी उमेद असते. मी आयुष्य नावाच्या ट्रेडमिलवर सतत धावतो आहे. त्याचे गिअर्स माझ्या डोक्यात आहेत, तर लिव्हर्स माझ्या हातात आहेत.”

“मी जाणीवपूर्वक काही गोष्टी आत्मसात केल्या. मला सगळ्यांच्यात मिळून मिसळून राहायचं होतं. मला सर्वांपासून वेगळा राहणारा, लांब राहणारा चित्रपट दिग्दर्शक-निर्माता बनायचं नव्हतं. मला `सोशलाईट’ दिग्दर्शक बनायचं होतं.”

“मला जे मैदानात खेळांमध्ये करता आलं नाही त्याची कसर मी स्टेज गाजवून पुरेपूर भरून काढली. मी स्पर्धांमधला सर्वोत्तम वक्ता बनलो.”

“आज मागे वळून पाहिलं आणि आयुष्याला निश्चित वळण देणा-या घटना कोणत्या असा विचार केला तर मी बोर्डींग स्कूलमधून परत येणं, माझ्या आईने त्यावरून मला खणखणीतपणे सुनावलेले चार शब्द आणि स्पर्धेत पटकावलेला तो पहिलावहिला पुरस्काराचा कप या तीन गोष्टी सांगाव्या लागतील.”

“मी जसा आहे त्याच्याही पलीकडे सभ्यपणा आणि माणुसकी या दोन महत्त्वाच्या गोष्टी माझ्याजवळ आहेत. त्यामुळे मी आता लोकांच्या बोलण्याकडे काही लक्ष देत नाही.”

“व्यभिचार हे आयुष्यातलं वास्तव आहे. ज्यामध्ये, व्यभिचाराला संधी होती पण ते अजिबात बळी पडले नाहीत, असं एक लग्न, एक वैवाहिक नातं मला दाखवावं.”


$3.25 Add to cart

माझा धनगरवाडा


खडतर संघर्ष करत त्यातून मार्ग काढत शिक्षक झालेले धनंजय धुरगडे यांनी आपल्या लेखनातून व्यक्तिगत जीवनसंघर्षाबरोबर धनगर समाजाच्या अनेक पदरी जीवनाचा बारकाईने उलघडा केलेला आहे. त्यांचं 'माझा धनगरवाडा’ हे आत्मकथन वाचल्यावर याची साक्ष पटते. यात धनगरांच्या प्रथा, परंपरा, रूढी, चालीरीती, नातेसंबंध, श्रद्धा व संस्कृती अशा कितीतरी अंगांनी धनगरी जीवनाचं दर्शन त्यांनी घडवलेलं आहे. सातारा जिल्ह्यातील पाडळी या लहान गावात ९ मार्च १९७३ रोजी धुरगुडे यांचा जन्म झाला. त्यानंतर त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डी.ई.ई ही पदवी प्राप्त केली आणि सध्या ते शासकीय तांत्रिक विद्यालय, कराड येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. 'माझा धनगरवाडा' या त्यांच्या पहिल्या साहित्यकृतीला 'संयुक्त राष्ट्रसंघ संलग्न संस्था' व 'इंटरनॅशनल जस्टीश फेडरेशन' आणि 'आयनॉक्स नॅशनल युनिव्हर्सिटी' यांच्या संयुक्त विद्यामाने दिला जाणारा 'आशियाई सामाजिक सांस्कृतिक पुरस्कार-२०१७' हे पारितोषिक मिळालं आहे.

शेळ्या-मेंढ्यांसोबत आपला कुटुंबकबिला घेऊन पोटासाठी रानोमाळ भटकणारा एक धनगर आपल्या पोरांना शिकवायचं असा निश्चय करतो, आणि बापाचं हे स्वप्न उराशी घेऊन धनगरवाड्यातलं एक कोकरू बिचकत बिचकत शाळेत जाऊ लागतं…
वादळवारा असो, वा सतत बदलणारा मुक्काम असो, काबाडकष्ट करून ते आपलं शालेय शिक्षण पूर्ण करतं. नंतर शहरामध्ये जाऊन उच्च शिक्षण घेतं. शिक्षणासाठी प्रसंगी मोलमजुरी करून ‘बापाचं स्वप्न पूर्ण करायचंच’ असा निर्धार करतं आणि स्वत:च स्वत:ला प्रेरित करत राहतं!
आत्मभान जागृत झालेल्या एका धनगराचं हे विलक्षण आत्मकथन… या कथनात लेखक धनंजय धुरगुडे धनगर समाजाच्या रूढी-चालीरीती आणि जीवनपद्धती यांचं जिवंत चित्रण करतात. त्यांचे पारंपरिक धनगरी खेळ, गजीनृत्य व सण-उत्सव यांचं शब्दचित्र रेखाटतात, आणि शिक्षणामुळे झालेला आपला विकास सांगत धनगर समाजाचं वास्तववादी दर्शन घडवतात.
एका धनगराने अस्सल धनगरी शैलीत प्रथमच चितारलेला हा – माझा धनगरवाडा!


$6.50 Add to cart

होरपळ


‘होरपळकार’ म्हणून ल.सि. जाधव यांचं नाव महाराष्ट्राला सुपचिरित आहे. होरपळ हे त्यांचं पहिलं आत्मकथन खूप गाजलं आणि त्याचे चार भाषांमध्ये अनुवादही झाले. त्यानंतर त्यांनी होरपळचा पुढचा भाग – ‘सूळकाटा’ या नावे लिहिला आणि त्यालाही वाचकांनी चांगला प्रतिसाद दिला. आत्मकथनाबरोबर त्यांनी कादंबरी, कविता लेखनही केलं. त्यांनी बालसाहित्याची निर्मितीही केली. त्यांच्या पुस्तकांना राज्य शासनाच्या पुरस्काराबरोबरच अनेक मान्यवर संस्थांचे पुरस्कार प्राप्त झाले. वंचित समाजात जन्माला आल्यामुळे वाट्याला आलेलं दुःख, अवहेलना व झालेला अन्याय त्यांनी आपल्या लेखनातून संयतपणे मांडला. त्यामुळे त्यांचं लेखन आक्रस्ताळं न होता अंतर्मुख करणारं असतं. कायम लिहित्या असणाऱ्या या लेखकाचं जून २०१९मध्ये अकस्मात निधन झालं.

सोलापूर येथील मातंग वस्तीत ल.सि. जाधव यांचं बालपण गेलं. कुशाग्र बुद्धिमत्तेच्या बळावर त्यांनी पदव्युत्तर पातळीवरचं शिक्षण घेतलं आणि भारतीय स्टेट बँकेतून अधिकारी म्हणून ते सेवानिवृत्त झाले. ‘होरपळ’ या आपल्या आत्मकथनात त्यांनी मातंग समाजाचे व्यावसायिक व सामाजिक जीवन, त्यांच्या अंधश्रद्धा व त्यांचे दैन्य, अत्यंत अभावग्रस्त स्थितीतही माणुसकी जपण्याची त्यांची धडपड या सगळ्यांचे पूर्वग्रहरहित दृष्टीने तसेच सहृदयतेने चित्रण केले आहे. निसर्गातील विविधतेचा ते तरल संवेदनशीलतेने अनुभव घेतात, हे त्यांचं असाधारण वैशिष्ट्य म्हणावं लागेल. हीच संवेदनशीलता ते समाजातील घटना अथवा व्यक्तिजीवनातील दारुणता चित्रित करतानाही प्रकट करतात. त्यांची व्यापक जीवनदृष्टी, सामाजिकतेची प्रगल्भ समज, प्रसंग वा भावस्थितीचे प्रत्ययकारी चित्रण करण्याचं त्यांचं सामर्थ्य, प्रसादपूर्ण ओघवती भाषाशैली आणि निसर्गाचा अनुभव घेणारी तरल संवेदनशीलता या साऱ्या गुणांमुळे हे आत्मकथन केवळ दलित आत्मकथनातच नव्हे, तर एकंदरीतच मराठी आत्मकथनपर वाङ्मयात मोलाची भर घालणारं आहे.
साहित्यकृतीचा आल्हाददायक अनुभव देणारं तसेच वाचकांच्या सामाजिक जाणिवा समृद्ध करणारं आत्मकथन होरपळ…


$3.25 Add to cart

सूळकाटा


‘होरपळकार’ म्हणून ल.सि. जाधव यांचं नाव महाराष्ट्राला सुपचिरित आहे. होरपळ हे त्यांचं पहिलं आत्मकथन खूप गाजलं आणि त्याचे चार भाषांमध्ये अनुवादही झाले. त्यानंतर त्यांनी होरपळचा पुढचा भाग – ‘सूळकाटा’ या नावे लिहिला आणि त्यालाही वाचकांनी चांगला प्रतिसाद दिला. आत्मकथनाबरोबर त्यांनी कादंबरी, कविता लेखनही केलं. त्यांनी बालसाहित्याची निर्मितीही केली. त्यांच्या पुस्तकांना राज्य शासनाच्या पुरस्काराबरोबरच अनेक मान्यवर संस्थांचे पुरस्कार प्राप्त झाले. वंचित समाजात जन्माला आल्यामुळे वाट्याला आलेलं दुःख, अवहेलना व झालेला अन्याय त्यांनी आपल्या लेखनातून संयतपणे मांडला. त्यामुळे त्यांचं लेखन आक्रस्ताळं न होता अंतर्मुख करणारं असतं. कायम लिहित्या असणाऱ्या या लेखकाचं जून २०१९मध्ये अकस्मात निधन झालं.

प्रसिद्ध लेखक ल.सि. जाधव यांच्या गाजलेल्या ‘होरपळ’ या आत्मकथनाचा ‘सूळकाटा’ म्हणजे पुढचा भाग. संयत व प्रवाही भाषाशैली, बारीक तपशिलांतून प्रसंग उभे करण्याची हातोटी आणि आपल्या समाजाप्रतीची कळकळ अशी होरपळ या आत्मकथनाची सगळी वैशिष्ट्यं सूळकाटातही दिसून येतात.
या आत्मकथनाचा गाभा प्रामुख्याने त्रिस्तरीय आहे. पहिला स्तर हा मातंग समाजाची दुःख, त्यांना सोसावे लागणारे चटके आणि त्याबद्दल लेखकाला असलेली कळकळ याबद्दलचा आहे. दुसरा स्तर हा लेखकाचा तरुण मुलगा अकाली गेल्याने घनव्याकूळ करणाNया दुःखाचा आहे. तर, लेखनाची निर्मितीप्रक्रिया आणि घरात तसेच समाजात लेखकाचं असलेलं स्थान याबद्दल केलेलं परखड भाष्य हा तिसरा आणि महत्त्वाचा स्तर…
हे संपूर्ण आत्मकथन एकाच वेळी वैयक्तिक व त्याच वेळी सामाजिक अशा दोन्ही पातळ्यांवरचं दुःख व्यक्त करत राहतं. ते केवळ दुःख व्यक्त करून थांबत नाही, तर त्याहीपलीकडे जाऊन, या सगळ्याकडे उदार दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करतं आणि म्हणूनच वेगळ्या उंचीवर पोचतं.
सलत राहणारा, सलता सलता अंतर्मुख करणारा, जीवनविषयक अंतर्दृष्टी देणारा… सूळकाटा !


$3.25 Add to cart

केवळ मानवतेसाठी

आपलं अवघं आयुष्य मानवसेवेला समर्पित करून सेवा-केंद्रांचं अभूतपूर्व जाळं विणणार्‍या अब्दुल सत्तार इदी यांचं आत्मचरित्र


अब्दुल सत्तार इदी यांच्या ध्वनिमुद्रित कथनाचे शब्दांकन व संकलन करून त्याला 'केवळ मानवतेसाठी' या ग्रंथरूपात साकार करणाऱ्या दुराणी यांचा जन्म १९५३ साली लाहोर येथे झाला. ‘माय फ्युडल लॉर्ड’ हे त्यांचे गाजलेले आत्मचरित्र अठरा भाषांमध्ये अनुवादित झालेले आहे.

अनुवाद :
श्रीकांत लागू यांचा जन्म ७ ऑगस्ट १९३५ रोजी पुणे येथे झाला. त्यांनी रुपारेल महाविद्यालय, मुंबई येथून १९५९ साली बी.ए.(अर्थशास्त्र) ही पदवी प्राप्त केली आहे. व्यवसायाने ते ‘लागू बंधू हिरे-मोती’ या पेढीचे संचालक होते. मोबाईलचा शोध लागण्याच्या आधीपासून ‘माणसं जोडणं’ हे त्यांचं व्यसन होतं. कोणतीही गोष्ट पाहिली, वाचली किंवा भावली तर त्यात मित्रमंडळींना सहभागी करून आनंद वाटणं ही त्यांची वृत्ती होती. सागरसफरीत आनंद लुटणारं, आकाश निरीक्षणात गुंगून जाणारं व धरतीवरील गिरीशिखरं पादाक्रांत करण्याचा रोमहर्षक अनुभव घेणारं श्रीकांत लागू हे एक हा दिलदार–दिलखुलास व्यक्तिमत्त्व होतं. त्यांनी रंगायन, अविष्कार व रुपवेध या संस्थांच्या ‘शांतता कोर्ट चालू आहे’, ‘आम्ही जिंकलो आम्ही हरलो’, ‘उद्ध्वस्त धर्मशाळा’, ‘तुघलक’ या नाटकांमध्ये भूमिका केल्या तसंच नभोवाणीवरील अनेक श्रुतिकांमध्येही त्यांचा सहभाग होता. विविध पुस्तकांचे त्यांनी अनुवाद केले. त्यांच्या लेखांचे संग्रही प्रकाशित झाले. 2013 साली त्यांचं निधन झालं आणि मराठीतला एक कलंदर, हरहुन्नरी लेखक हरपला.


अब्दुल सत्तार इदी यांचा जन्म भारतातला. पण फाळणीमुळे किशोरवयातच ते कराचीला स्थलांतरित झाले. गरीब, गरजू आणि आपत्तीग्रस्तांसाठी केलेल्या अभूतपूर्व मदत-कार्यामुळे तिसऱ्या जगतामधील जनतेत त्यांना मसिहाच समजलं जातं. मूळच्या सेवाभावीवृत्तीमुळे १९४८ मध्ये त्यांनी मिठादर येथे धर्मादाय दवाखाना सुरू केला. अल्पावधीतच आपत्कालीनप्रसंगी मदत कार्यासाठी पाकिस्तानात सर्वत्र रुग्णवाहिका व मालवाहू वाहनांच्या सेवेचं जाळं विणलं. त्याचबरोबर शिस्तबध्द सेवाकर्मींची मोठी फळी उभी केली. कालांतराने त्यात हेलिकॉप्टर सेवेचीही भर पडली. पूर, भूकंप किंवा रेल्वे अपघातासारखी कोणतीही आपत्ती असो, इदी फाऊंडेशनचे स्वयंसेवक सरकारी यंत्रणेआधीच मदतीचा हात घेऊन घटनास्थळी पोहोचलेले असतात. झुल्फिकार अली भुट्टो असो किंवा नवाज शरीफ वा आसिफ अली झरदारी असो सर्वच राज्यकर्त्यांनी वेळोवेळी इदींच्या सेवाकेंद्रांची मदत घेतली. इदींनी केलेल्या त्यांच्या सेवाकार्याच्या प्रचंड विस्तारामुळे आणि त्यांच्या धर्मनिरपेक्ष सेवाभावामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय कीर्तीही लाभली आहे. सेवाकार्य व मानवता ही मूल्यं आचरणात आणून मानवसेवेसाठी इदींनी स्वत:ला सर्व कुटुंबासह जणू वाहूनच घेतलं! रस्त्यात त्यांनी अक्षरश: भीक मागून विलक्षण अशा भीक अभियानाच्या प्रयोगातून संस्थेसाठी प्रचंड निधी जमा केला. शासनाची दंडेलशाही, धर्मांधांचा विरोध आणि दहशतवाद्यांचा दबाव याला सामोरं जात, त्यांनी आपलं कार्य जिद्दीने पुढे नेलं. त्याचंच हे चित्तवेधक व प्रेरणादायी आत्मकथन… केवळ मानवतेसाठी…!


$2.54 Add to cart

सह्याद्रीचे वारे


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री तसेच स्वातंत्र्य चळवळीत सहभागी असलेले आदरणीय द्रष्टे व मुत्सद्दी नेते यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची मूलभूत पायाभरणी केली. सामान्य कुटुंबातून आलेले चव्हाण हे जनसामान्यांचे पुढारी म्हणून ओळखले जातात. त्यांना स्वतःच्या बलस्थानांची आणि मर्यादांची पुरेपूर जाणीव असल्याने त्यांनी तत्त्वनिष्ठ व्यवहारवादाचे पालन केले. लोकशाहीच्या शक्तीवर त्यांचा अतूट विश्वास असल्यामुळे त्यांनी न्यायपूर्ण समाजाच्या बांधणीसाठी आवश्यक असलेल्या धोरणांबाबत पुढाकार घेऊन त्यांना पाठिंबा दिला. चव्हाण एक समतोल विचारवंत, सिद्धहस्त लेखक, प्रतिभावान वक्ते, चाणाक्ष मुत्सद्दी तसेच द्रष्टे प्रशासक होते व त्यांनी लोकहिताच्या अनेक धोरणांवर आपला ठसा उमटवला. अनलंकृत शैलीत त्यांनी केलेलं लेखन हे मनाला स्पर्श करून जातंच, शिवाय ते आपल्याला समाजकारण, राजकारण यांचं सखोल भानही देतं.

माझा गेल्या तीस वर्षांचा जो अनुभव आहे त्यावरून मी असे पाहिले आहे की, कुठल्याही राजकीय पक्षामध्ये थोडेच लोक असतात. बहुसंख्य जनता ही पक्षाच्या बाहेर असते, असे माझे स्वत:चे मत आहे. आणखी ती जनता काही अमक्याच एका पक्षाशी बांधली गेलेली असते असेही नाही. आपला मार्ग युक्त आहे आणि चांगला आहे, हे या जनतेला पटविण्याची जबाबदारी त्या त्या पक्षावर असते. जो पक्ष हे करतो तो राजकारणामध्ये यशस्वी होतो असा आत्तापर्यंतचा अनुभव आहे आणि हाच अनुभव याच्यापुढेही राहणार आहे असे मी मानतो.”

-यशवंतराव चव्हाण


$3.90 Add to cart

हितगुजातून उलगडलेली वहिदा रेहमान

एका प्रतिभासंपन्न अभिनेत्रीचा चित्रपट व जीवनप्रवास तिच्याच शब्दांत


नसरीन मुन्नी कबीर यांची हिंदी चित्रपटविश्वाबद्दलची सोळाहून अधिक पुस्तकं प्रकाशित झाली असून त्यांनी यूकेतल्या ‘चॅनेल फोर’साठी टीव्ही मालिकांची निर्मिती केली आहे. या चॅनेलसाठी त्या सल्लागार म्हणून काम करतात. तसंच त्या ‘ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूट बोर्डा’च्या माजी गव्हर्नर होत्या. सध्या त्या लंडनमध्ये वास्तव्यास असतात.

अनुवाद :
गंभीर वृत्तीचे अनुवादक, संपादक व लेखक म्हणून मिलिंद चंपानेरकर विख्यात आहेत. त्यांनी आजवर ‘लोककवी साहीर लुधियानवी' (मूळ लेखक : अक्षय मनवानी), ‘त्या दहा वर्षांतील गुरू दत्त' (मूळ लेखक - सत्य सरन), ‘सुन मेरे बंधू रे - एस.डी. बर्मन यांचं जीवनसंगीत' (मूळ लेखक - सत्या सरन), ‘वहिदा रेहमान... हितगुजातून उलगडलेली', (मूळ लेखक- नसरीन मुन्नी कबीर), ‘ए.आर. रहमान : संगीतातील वादळ' (मूळ लेखक - कामिनी मथाई), ‘भारतातील डाव्या चळवळीचा मागोवा’ (मूळ लेखक - प्रफुल्ल बिडवई), ‘गुड मुस्लीम बॅड मुस्लीम' (मूळ लेखक - महमूद ममदानी, सह-अनुवादक - पुष्पा भावे) यांसारख्या महत्त्वाच्या पुस्तकांचा अनुवाद केला असून ‘यांनी घडवलं सहस्रक' आणि ‘असा घडला भारत' या महद्ग्रंथांसाठी सह-संपादन, संशोधन व लेखन केलं आहे. त्यांनी दैनिक ‘इंडियन एक्स्प्रेस'साठी १९९१-२००० या कालावधीमध्ये पत्रकारिता केली आहे. गेली तीन दशकं त्यांनी विविध मराठी दैनिक आणि नियतकालिकांमधून समाजाभिमुख साहित्य, नाट्य व चित्रपटविषयक समीक्षापर लेखन आणि त्याचप्रमाणे, सामाजिक-राजकीय विषयांवर विश्लेषणात्मक लेखन केलं आहे. त्यांना ‘लोकशाहीवादी अम्मीस...दीर्घपत्र' या अनुवादित पुस्तकासाठी सर्वोत्कृष्ट अनुवादाचा २०१६ सालचा ‘साहित्य अकादमी' पुरस्कार प्राप्त झाला आहे.


प्रतिभा, आगळं सौंदर्य आणि व्यक्तिरेखा समजून घेऊन त्यात जीव ओतण्याची असामान्य क्षमता व बुध्दिमत्ता या बळावर वहिदा रेहमानने चित्रपटसृष्टीत आपलं विशेष स्थान निर्माण केलं. आपल्या सहा दशकांच्या कारकिर्दीच्या पहिल्या टप्प्यात (१९५५-७५) गुरू दत्त, विजय आनंद ते सत्यजित राय यांसारख्या महान दिग्दर्शकांच्या चित्रपटांतून तिने आव्हानात्मक भूमिका साकार केल्या आणि एकप्रकारे ती पर्यायी स्त्री-प्रतिमांसाठी अवकाश निर्माण करणारी अभिनेत्री ठरली. ‘प्यासा’, ‘गाइड’, ‘अभिजान’, ‘मुझे जीने दो’, ‘तीसरी कसम’, ‘खामोशी’ आदी चित्रपटांतील तिच्या सघन-सजीव व्यक्तिरेखा अविस्मरणीय व कायमस्वरूपी ठसा उमटवणार्‍या ठरल्या… आजकालच्या ‘रंग दे बसंती’ किंवा ‘दिल्ली-६’ पर्यंत तो ठसा कायम आहे.
‘आज फिर जीने की तमन्ना है’ म्हणत पडद्यावर स्त्री-स्वातंत्र्याचा उद्धोष करणारी ही अभिनेत्री पडद्यामागील जीवनाबाबत नेहमीच मितभाषी राहिली. लेखिका नसरीन मुन्नी कबीर यांनी या ज्येष्ठ-श्रेष्ठ अभिनेत्रीला तिच्या भूमिकांबाबत, तिच्या व्यक्तित्वाबाबत आणि तिच्या जीवनप्रवासाबाबत बोलतं केलं आणि त्या बहुस्पर्शी संवादावर आधारित ‘कॉन्व्हर्सेशन्स विथ वहिदा रेहमान’ हे इंग्रजी पुस्तक साकार केलं. त्याच इंग्रजी पुस्तकाचा मिलिंद चंपानेरकर यांनी सिध्द केलेला हा मराठी अनुवाद- वहिदा रेहमान…हितगुजातून उलगडलेली!


$3.84 Add to cart

स्पर्धा काळाशी

भाषणे व मुक्त संवाद


भारतीय राजकारणात गेल्या ६० वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेले नेते. महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार अतिशय महत्वाची भूमिका बजावत आले आहेत. त्यांनी त्यांच्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत अनेक महत्वाची पदं भूषवली आहेत. ती म्हणजे- तीनदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीपद, संरक्षण मंत्री आणि केंद्रीय कृषिमंत्री. १९९९मध्ये त्यांनी राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. २००५ ते २००८ शरद पवार BCCIचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. २०१० ते २०१२ या काळात त्यांनी ICCचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं. गेली अनेक वर्षं राजकारणाशिवाय सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात ते उल्लेखनीय काम करत आहेत. ते अतिशय जाणकार वाचक असून राजकारण, समाजकारणाशिवाय मराठी साहित्यातील नवीन लेखन नेहमी वाचत असतात.

आर्थिक सुधारणा आणि उदारीकरण कार्यक्रमास १९९१ साली आम्ही जो प्रारंभ केला त्या संदर्भात शरदजींच्या असलेल्या बांधीलकीचे मला या ठिकाणी स्मरण होते. किंबहुना आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण घडवून आणण्यासाठी १९८०च्या दशकात राजीव गांधी यांनी उचललेल्या अनेक धाडसी पावलांना शरदजींनी पाठिंबाच दर्शविला होता.
महाराष्ट्राच्याही पलीकडे राजकारण आणि सार्वजनिक जीवनाच्या प्रांतात — राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यापक अनुभव शरदजींच्या गाठीशी आहे. प्रस्तुत ग्रंथात संकलित केलेल्या त्यांच्या विचारांमध्ये त्या अनुभवांचे प्रतिबिंब स्वाभाविकपणेच डोकावते. अनेक बाबतीतील त्यांच्या भूमिकेशी सुसंवादी अशीच माझी भूमिका असते. विशेषत: आर्थिक धोरण, सातत्यशील विकास आणि आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक बाबी यांचा निर्देश या संदर्भात करता येईल. आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाचे उपयोजन राष्ट्रीय विकासासाठी करण्याबाबत दृढबांधीलकी असणार्‍या आमच्या काही अत्यंत प्रगल्भ नेत्यांमध्ये शरदजींची गणना होते. एक आर्थिक महासत्ता म्हणून भारत उदयास येऊ शकतो, या त्यांच्या मताशी मी सहमत आहे.
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग


$4.88 Add to cart

स्पर्धा काळाशी (डिलक्स आवृत्ती)

भाषणे व मुक्त संवाद


भारतीय राजकारणात गेल्या ६० वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेले नेते. महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार अतिशय महत्वाची भूमिका बजावत आले आहेत. त्यांनी त्यांच्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत अनेक महत्वाची पदं भूषवली आहेत. ती म्हणजे- तीनदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीपद, संरक्षण मंत्री आणि केंद्रीय कृषिमंत्री. १९९९मध्ये त्यांनी राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. २००५ ते २००८ शरद पवार BCCIचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. २०१० ते २०१२ या काळात त्यांनी ICCचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं. गेली अनेक वर्षं राजकारणाशिवाय सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात ते उल्लेखनीय काम करत आहेत. ते अतिशय जाणकार वाचक असून राजकारण, समाजकारणाशिवाय मराठी साहित्यातील नवीन लेखन नेहमी वाचत असतात.

आर्थिक सुधारणा आणि उदारीकरण कार्यक्रमास १९९१ साली आम्ही जो प्रारंभ केला त्या संदर्भात शरदजींच्या असलेल्या बांधीलकीचे मला या ठिकाणी स्मरण होते. किंबहुना आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण घडवून आणण्यासाठी १९८०च्या दशकात राजीव गांधी यांनी उचललेल्या अनेक धाडसी पावलांना शरदजींनी पाठिंबाच दर्शविला होता.
महाराष्ट्राच्याही पलीकडे राजकारण आणि सार्वजनिक जीवनाच्या प्रांतात — राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यापक अनुभव शरदजींच्या गाठीशी आहे. प्रस्तुत ग्रंथात संकलित केलेल्या त्यांच्या विचारांमध्ये त्या अनुभवांचे प्रतिबिंब स्वाभाविकपणेच डोकावते. अनेक बाबतीतील त्यांच्या भूमिकेशी सुसंवादी अशीच माझी भूमिका असते. विशेषत: आर्थिक धोरण, सातत्यशील विकास आणि आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक बाबी यांचा निर्देश या संदर्भात करता येईल. आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाचे उपयोजन राष्ट्रीय विकासासाठी करण्याबाबत दृढबांधीलकी असणार्‍या आमच्या काही अत्यंत प्रगल्भ नेत्यांमध्ये शरदजींची गणना होते. एक आर्थिक महासत्ता म्हणून भारत उदयास येऊ शकतो, या त्यांच्या मताशी मी सहमत आहे.
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग


$6.50 Add to cart

कारेनामा



औषधं आपल्या सर्वांनाच कधी ना कधी घ्यावी लागतात. पण औषधं तयार होण्यामागचा खटाटोप आपल्याला माहीत नसतो. सुरेश कारे हे इंडोको रेमेडीज या औषध कंपनीचे प्रमुख. लहानपणापासून घरात औषधांच्या आसपासच ते वाढले. ‘‘आमच्या औषधांमुळे लोकांना बरं वाटू दे’’, अशी प्रार्थना करत लहानाचा मोठा झालेला सुरेश कारे नावाचा मुलगा आज इंडोको या पाचशे कोटींपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या कंपनीचा प्रमुख आहे. इंडोको ही भारतातली एक अग्रगण्य औषध कंपनी बनली ती वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत सुरेश कारे यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांमुळे आणि कल्पकतेमुळे. सुरेश कारे यांच्या स्वयंस्फूर्त कर्तृत्वाचा आलेख रसिल्या शब्दांमध्ये मांडणारं ‘कारेनामा’ हे पुस्तक उद्योजकता व कल्पकता यांच्या जोरावर भरारी घेणार्‍या एका माणसाची कहाणी सांगतं. गोव्याच्या प्रसन्न आणि निर्मळ संस्कृतीचा वारसा घेऊन आलेल्या सुरेश कारे यांच्या जडणघडणीचा हा प्रवास वाचकांना नक्कीच प्रेरणा देणारा ठरेल.

 

$3.84 Read more

कारेनामा (डिलक्स आवृत्ती)



औषधं आपल्या सर्वांनाच कधी ना कधी घ्यावी लागतात. पण औषधं तयार होण्यामागचा खटाटोप आपल्याला माहीत नसतो. सुरेश कारे हे इंडोको रेमेडीज या औषध कंपनीचे प्रमुख. लहानपणापासून घरात औषधांच्या आसपासच ते वाढले. ‘‘आमच्या औषधांमुळे लोकांना बरं वाटू दे’’, अशी प्रार्थना करत लहानाचा मोठा झालेला सुरेश कारे नावाचा मुलगा आज इंडोको या पाचशे कोटींपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या कंपनीचा प्रमुख आहे. इंडोको ही भारतातली एक अग्रगण्य औषध कंपनी बनली ती वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत सुरेश कारे यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांमुळे आणि कल्पकतेमुळे. सुरेश कारे यांच्या स्वयंस्फूर्त कर्तृत्वाचा आलेख रसिल्या शब्दांमध्ये मांडणारं ‘कारेनामा’ हे पुस्तक उद्योजकता व कल्पकता यांच्या जोरावर भरारी घेणार्‍या एका माणसाची कहाणी सांगतं. गोव्याच्या प्रसन्न आणि निर्मळ संस्कृतीचा वारसा घेऊन आलेल्या सुरेश कारे यांच्या जडणघडणीचा हा प्रवास वाचकांना नक्कीच प्रेरणा देणारा ठरेल.

 

$3.84 Read more