जीवनकोंडी


संपादन : 

परेश जयश्री मनोहर मूळचा भटक्या आहे , मनाच्या कोअरमध्ये कार्यकर्ता .... भारत ज्ञान विज्ञान समुदाय संघटनेसोबत गेली वीस वर्षं काम करतोय . सामाजिक कामाला वाहिलेल्या टाटा ट्रस्टच्या Deta Driven Governance टीममध्ये प्रोग्रॅम मॅनेजर म्हणून नोकरी करतो . भवताल बघत असतो , अस्वस्थ असतो , व्यक्त होतो आणि कामही करतो .


राज्यात जवळपास २०० साखर कारखाने….

ऑक्टोबर ते एप्रिल असा ६-७ महिन्यांचा गळीत हंगाम ….

त्या काळात कारखान्यातील परिसरात ऊसाच्या फडांवर लाखो मजूरकुटुंब पोटापाण्यासाठी आपली घरं, शेती, गावं सोडून येतात. या हंगामात स्त्रियांना सोसाव्या लागणाऱ्या आरोग्य समस्या, मुलांच्या शिक्षण समस्या, आर्थिक समस्या असे अनेक गंभीर प्रश्न या स्थलांतरित मजुरांसमोर आ वासून उभे असतात. जीवनकोंडीच जणू! याच समस्यांचा सखोल अभ्यास गेल्या ५ वर्षांत टाटा ट्रस्टस्तर्फे ‘टीम आशा’ने सोमेश्वर साखर कारखाना परिसरात केला. त्या आधारेच अनेक जटील प्रश्नांची चर्चा या पुस्तकात केलेली आहे.

शिक्षण, कामगार, मानव अधिकार, शेती अशा क्षेत्रांतील कार्यकर्ते, अभ्यासक, विचारवंत आणि धोरणकर्ते यांच्यापर्यंत हा विषय पोचवून ऊसतोडणी मजुरांची जीवनकोंडी सुटावी यासाठीच हा एक विधायक प्रयत्न….


250.00 Add to cart

रेड लाइट डायरीज…ख़ुलूस


समीर रावसाहेब गायकवाड सोलापूर येथे वास्तव्यास. उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी हे मूळ गाव. शिवाजी विद्यापीठातून प्रथम क्रमांकाने एम.ए. (मराठी) उत्तीर्ण झाल्यानंतर सेट-नेट परीक्षांमध्ये उत्तीर्ण होऊनही प्राध्यापकी पेशा न स्वीकारता शेती, व्यवसायावर उदरनिर्वाह. विविध विषयांवर लिहिताना भिन्न साहित्यप्रकारात लेखन. विख्यात दैनिकांत, नियतकालिकांत विपुल स्तंभलेखन. सातत्यपूर्वक ब्लॉगलेखन. वेश्यांच्या जीवनाचे अप्रकाशित पैलू समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न, संलग्न माहिती विविध सरकारी यंत्रणांना पुरवतानाच या समस्येकडे समाजाचे भान वळवण्यासाठी समाज माध्यमांत हेतूतः लेखन. साहित्यनिर्मिती करत असतानाच सामाजिक जाणिवांतून घटनांवर पोटतिडकीने परखड भाष्य.  

रेडलाइट एरिया म्हटलं की, अनेकांची नाकं मुरडली जातात…. ‘कुलटा’, ‘किटाळ’, ‘वेश्या’, ‘रंडी’… असे अनेक शब्द वापरून तिथल्या स्त्रियांना हिणवलं जातं. पण व्यापकदृष्ट्या, समाजाच्या वासना शमवणाऱ्या या स्त्रियांच्या नशिबी काय येतं… दुःख- दैन्य आणि नरकासम भोगवटा !

अशी अनेक आयुष्यं जवळून बघितलेल्या समीर गायकवाड यांनी या स्त्रियांनाच या पुस्तकाच्या नायिका केलं आहे. त्यांनी या स्त्रियांची घुसमट, त्यांच्या इच्छा-आकांक्षा, त्यांची परिस्थिती- शरणता, हतबलता, त्यांचे हुंकार, त्यांच्या आर्त हाका, त्यांच्या भावभावना आणि त्यांची तगमग हे सारं या पुस्तकात संवेदनशीलरीत्या टिपलं आहे.

खुलूस म्हणजे निर्मळ सच्चेपण, आस्था आणि निष्ठा… या स्त्रियांचं जगणं त्याच सच्चेपणाने चितारणारं हे पुस्तक…. रेड लाइट डायरीज… खुलूस !


300.00 Add to cart

हां ये मुमकिन हे!

एका डॉक्टरचा बिहारमधला स्तिमित करणारा संघर्ष


डॉ. तरू जिंदल यांचा जन्म १९८३ सालचा. बालपणीच तरू यांच्या मनात सेवेची आणि कष्टाची बीजं रोवली गेली. थोरल्या भावाच्या प्रेरणेने त्यांनी वैद्यकीय शिक्षण घ्यायचं ठरवलं आणि २०१३ साली मुंबईतून लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज आणि सायन हॉस्पिटल येथून स्त्रीरोगशास्त्रात एम.एस. ही पदवी संपादन केली. लहान वयातच त्यांनी गांधीजींचं आत्मचरित्र पुन:पुन्हा वाचून काढलं. एम.बी.बी.एस.चं शिक्षण चालू असतानाच त्यांनी ग्रामीण आणि आदिवासी भागांना भेटी देऊन तिथल्या लोकांच्या आरोग्याच्या गरजा आणि समस्या समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या कष्टाला सखोल अभ्यासाची जोड दिली. एम.बी.बी.एस. आणि एम.एस.च्या वर्षांत त्यांनी कधीही ‘डिस्टिंक्शन'ची पातळी सोडली नाही. त्यांना 'ग्लोबल विमेन अचिव्हर अॅडवॉर्डस्’, ‘मोस्ट इन्स्पायिंरग वुमन ऑफ द इअर अॅावॉर्ड – फॉर व्हॅल्युएबल कॉन्ट्रीब्युशन इन हेल्थकेअर'ने सन्मानित करण्यात आलं आहे. दुर्दैवाने मेंदूत गाठ निर्माण झाल्याने त्यांना उपचारांसाठी बिहारहून परतावं लागलं. सध्या त्यावर उपचार घेता घेता डॉक्टर्स व परिचारिकांना स्तनपान विषयातील अद्ययावत माहितीचं प्रशिक्षण देण्यासाठी ‘सल्लागार’ म्हणून त्या काम करत आहेत.

अनुवाद :
अनुवाद, चित्रकला आणि लेखन-वाचन यांमध्ये विशेष रस असलेल्या रमा यांनी माधुरी पुरंदरे यांनी पुस्तकं मराठीतून इंग्रजीत भाषांतरित केली आहेत. त्यांना फ्रेंच , इंग्रजी आणि मराठी भाषांमधली ललित साहित्याची पुस्तकं अनुवादित करायला आवडतात. लहान मुलांसाठीही त्या लेखन करतात. आजवर त्यांनी वीसपेक्षा जास्त कलाकृतींची भाषांतरं केली असून त्यांना 'डेली हंट'ने आयोजित केलेल्या कथास्पर्धेत पारितोषिकही मिळालं आहे.


प्रसूती कक्षाच्या आत बसलेली कुत्री, शेजारीच पसरलेला बायो-मेडिकल कचऱ्याचा ढीग, दुर्गंधी पसरवणारं स्वच्छतागृह, बाळंत स्त्रियांना टाके घालणाऱ्या तिथल्याच झाडूवाल्या, स्टाफरुममध्ये एकमेकींच्या हातांना मेंदी लावणाऱ्या लेडी डॉक्टर्स…

हे दृश्य होतं बिहारमधल्या मोतिहारी जिल्हा रुग्णालयातलं आणि दृश्य बघत होती यात बदल घडवू पाहणारी प्रसूतिशास्त्रतज्ज्ञ डॉ. तरु जिंदल !

भ्रष्ट व्यवस्था, निष्क्रिय डॉक्टर्स, कुपोषणासारख्या समस्या अशा अनेक आघाड्यांवर लढत देऊन अविश्वसनीय बदल घडवून आणणाऱ्या एका तरुण डॉक्टरची प्रेरणादायी संघर्षकथा… हां, ये मुमकिन है ।


325.00 Add to cart

कोरडी शेतं… ओले डोळे

आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवा… अंधारात असलेली एक सामाजिक समस्या


दीप्ती राऊत या पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. लोकांच्या प्रश्नांवर त्या वैशिष्ट्यपूर्ण वार्तांकन करतात. ‘ग्राउंड रिपोर्टस्’च्या माध्यमातून विविध समाजसमूहांचे अंधारातील जगणं प्रकाशात आणणं, शासकीय व्यवस्थेतील कच्चे दुवे मांडणं आणि सामाजिक बदलासाठी खारीचा वाटा उचलणं हे त्यांचे स्वप्न आहे. त्यांना दै. लोकसत्तामध्ये वार्ताहर म्हणून तसेच आयबीएन-लोकमत या वृत्तवाहिनीत नाशिक ब्युरो चीफ, आणि दिव्य मराठी या दैनिकात विशेष प्रतिनिधी या माध्यमातूनवार्तांकनाचा अनुभव आहे. त्या ‘नॅशनल टेलिव्हिजन अ‍ॅवॉर्ड', ‘रामनाथ गोएंका अ‍ॅवॉर्ड', ‘मटा गौरव सन्मान', ‘वरुणराज भिडे उत्कृष्ट पत्रकार', इत्यादी पुरस्कारांनी सन्मानित आहेत.

महाराष्ट्राला गेली २५ वर्षं शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा प्रश्न भेडसावतो आहे. सुरुवातीपासून आजपर्यंत रोजच्या बातम्यांपासून विधी मंडळाच्या अधिवेशनापर्यंत, रोजच्या राजकारणापासून ते निवडणुकांच्या राजकारणापर्यंत हा विषय धगधगता राहिला. पण आजही आत्महत्या होत आहेत… या गंभीर समस्येची ‘जाणारा जातो पण मागे जे राहतात त्यांचं काय?’ ही बाजूही तितकीच भीषण आहे.

अनुभवी आणि संवेदनशील पत्रकार दीप्ती राऊत यांनी याच प्रश्नाचा सखोल अभ्यास केला. राज्यभर फिरून त्यांनी अशा अनेक महिलांशी संवाद करत प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेतली. आत्महत्याग्रस्त कुटुंबांची वाताहत प्रत्यक्ष बघितली. परिस्थितीपुढे हतबल झालेल्या अबला त्यांना भेटल्या आणि संकटाशी मुकाबला करत, त्यातून मार्ग काढत जाणाऱ्या अनेक योद्ध्याही त्यांना भेटल्या.

सामान्य जनता विचारही करू शकणार नाही अशी ही रोजची लढाई रोजच हरणाऱ्या शेकडो शेतकरी विधवांची होरपळ दाखवणारं आणि दु:खाला जिद्दीने सामोरं जाऊन लढणाऱ्यांची उदाहरणं जगासमोर आणणारं पुस्तक कोरडी शेतं…ओले डोळे !


160.00 Add to cart

लढा टाकलेल्या स्त्रियांचा

परित्यक्ता आंदोलनाचा वेध आणि स्त्री-पुरुष समतेचा शोध


एम. के. रुस्तुमजी हे टेल्को कंपनीचे अत्यंत वरिष्ठ व्यवस्थापक होते. व्यवस्थापनशास्त्रावर त्यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांना जगभर प्रचंड मागणी आहे. इंग्लंड, अमेरिका, जर्मनी, स्पेन, जपान, ब्राझिल, झेकोस्लाव्हाकिया व इस्राइल या देशांमध्ये त्यांची पुस्तकं लोकप्रिय झाली आहेत. त्यांच्या पश्चातही अजूनही त्यांची पुस्तकं विक्रीचे नवेनवे विक्रम करत आहेत. कारण व्यवस्थापन क्षेत्राचा अनुभव असलेल्या अनुभवी माणसांनी क्वचित व्यवस्थापनावरील पुस्तकं लिहिली. 'उद्योग व्यवसायातील मानवीसंबंध' या विषयांवर 'फर्स्ट ड्यूक ऑफ एडिनबर्ग्स कॉन्फरन्स’मध्ये रुस्तुमजींनी सहभाग घेतला होता. त्यानंतर भारत सरकारने त्यांची 'नवल टाटा कमिटी ऑन शेअरिंग द गेन्स ऑफ प्रॉडक्टिव्हिटी' या समितीवर मालकांचे प्रतिनिधी म्हणून खास नेमणूक केलेली होती. त्याशिवाय अत्यंत महत्त्वाच्या अशा व्यवस्थापन क्षेत्रातील संस्थांमध्ये त्यांचा सल्लागार म्हणून सहभाग होता.

नवर्‍याने सोडलेल्या बायकांचा प्रश्न आपल्या समाजात खूप जुना आहे. अगदी पुराणकाळापासून सीता, अहिल्या यांसारख्या परित्यक्तांची उदाहरणं आपल्या परिचयाची आहेत. आजही आपल्या समाजात परित्यक्तांसाठी `टाकलेली’, `सोडलेली’, `बैठीली’ असे अत्यंत अपमानकारक शब्द सहजपणे वापरले जातात.
घटस्फोट न देता-घेता इच्छेविरुद्ध हाकललेली विवाहित स्त्री म्हणजे `परित्यक्ता’. `ज्याची-त्याची वैयक्तिक किंवा कौटुंबिक बाब’ असं म्हणून टाळला जाणारा हा प्रश्न वास्तविक एक गंभीर सामाजिक समस्या आहे. अलीकडील काळात हा प्रश्न ऐरणीवर आणला तो समता आंदोलनाने. या आंदोलनाच्या माध्यमातून स्त्रियांच्या समस्यांसाठी दिलेल्या लढ्यांचा विविधांगी आढावा या पुस्तकात घेतला आहे. त्याशिवाय परित्यक्तांच्या बोलक्या कहाण्या, परित्यक्ता होण्यामागची कारणं, स्त्री-पुरुष समानतेसाठी आवश्यक असे पोषक विचार आणि रचनात्मक व संघर्षात्मक कार्यामधून टिपलेल्या नोंदी या सर्वाचा लेखाजोखा या पुस्तकात वाचायला मिळेल.
पुस्तकाच्या लेखिका अ‍ॅड. निशा शिवूरकर या हाडाच्या कार्यकर्त्या असून त्यांनी या प्रश्नावर गेली अनेक वर्षं अनेक स्तरांवर झपाटल्यागत काम केलं आहे. या प्रश्नाची धग जवळून पाहिल्यामुळे त्यांच्या लिखाणात व्यापक असा सहानुभाव आहे. माणूस म्हणून आपल्या जाणिवा रुंदावणारं हे पुस्तक शिवूरकरांनी ओघवत्या आणि थेट शैलीमध्ये लिहिलं आहे.
सामाजिक भान देणारा एक अभ्यासपूर्ण दस्तऐवज… अर्थात लढा `टाकलेल्या’ स्त्रियांचा


300.00 Add to cart

विंचवाचं तेल

पारधी समाजातली मी… माझी ही ज्वलंत जिंदगानी


प्रशांत रूपवते हे सुमारे दीड दशकापेक्षा जास्तकाळ पत्रकारितेत कार्यरत आहेत. त्यांनी १९९६पासून वृत्तपत्रामध्ये लेखनास सुरुवात केली. त्यांनी मास कम्युनिकेशनमध्ये पदव्युत्तर पदवीमध्ये सेंट झेविअर्स महाविद्यालयातून पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. ‘आपलं महानगर’ या दैनिकामध्ये स्तंभलेखनास प्रारंभ केल्यानंतर ते दैनिक ‘महानगर’मध्ये पत्रकार म्हणून रुजू झाले. त्यापूर्वी ते ‘दैनिक लोकमत’मध्ये कार्यरत होते. २००२-०३मध्ये भूम-परांडा इथे झालेल्या पारधी हत्याकांड निमित्त ‘संपर्क’ संस्थेने बालकृष्ण रेणके यांच्या अध्यक्षतेखाली स्थापिलेल्या ‘सत्यशोधन समिती’मध्ये त्यांचा सहभाग होता. तसंच, अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मौजे शिंदे या गावातील दलितांवर टाकण्यात आलेल्या बहिष्कार प्रकरणी ‘डॉ. आंबेडकर राईटस लॉ नेटवर्क या संस्थे’ने स्थापलेल्या २००४-०५ यावर्षीच्या सत्यशोधन समितीमध्ये त्यांचा सहभाग होता. त्यांनी २००४ ते २०१३ या दरम्यान, मुंबई उच्च न्यायालय, टाडा, सत्र न्यायालय आणि दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयांमधील खटल्यांचं वार्तांकन केलं आहे. सध्या मुक्त पत्रकार म्हणून त्यांचे विविध विषयांवर लेखन सुरू असून विशेषत: जातपंचायती व ओबीसी धर्मांतर या संबंधाने त्यांचा अभ्यास सुरू आहे. ‘पदोन्नती आणि आरक्षण’ या पुस्तकाचं संपादन आणि लेखन त्यांनी केलं आहे.
सुनीता भोसले यांनी घरच्या परिस्थितीमुळे सहावीपर्यंतच शिक्षण घेतलं. त्यांनी वयाच्या अकराव्या वर्षी ‘मानवी हक्क अभियान’ अधिवेशनाद्वारे सामाजिक कामात प्रवेश केला आणि ‘भारिप बहुजना’द्वारे त्या सामाजिक कामात सहभागी झाल्या. त्यांनी ‘भारिप बहुजन महासंघा’चे दीड वर्ष काम केलं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा ‘मानवी हक्क अभियाना’त कार्यकर्ती म्हणून सामाजिक काम केलं आहे. गायरान जमिनी, अ‍ॅट्रोसिटी, पोलीस अत्याचार या संदर्भातही त्यांनी कार्य केलं आहे. त्यांनी ‘महाराष्ट्र राज्य आदिवासी फासेपारधी समाज संघटना’ याची महिला प्रमुख म्हणून काम पाहिलं आहे. २०११मध्ये त्यांनी ‘क्रांती’ संस्थेची स्थापना केली. शिवाय पारधी क्षेत्रात शिक्षण, आरोग्य, बालविवाह प्रतिबंध, अ‍ॅट्रोसिटी, पारधी विकास आराखड्यावर त्यांनी काम केलं आहे.

‘विंचवाचं तेल’ म्हणजे ‘गुन्हेगारी जमाती’विरुद्ध वापरलं जाणारं जहाल अस्त्र. बाहेर याला ‘सूर्यनारायण तेल’ म्हणूनही ओळखतात. पोलीस खातं आरोपीने केलेले, न केलेले गुन्हे कबूल करावेत यासाठी ‘थर्ड डिग्री’मध्ये या तेलाचा वापर करतं.
आरोपीच्या लिंगाला हे तेल लावलं जातं. त्यामुळे लिंगाला सूज येते आणि प्रचंड दाह होतो. तुमची सृजनताच मारून टाकायची… उद्ध्वस्त करायची…
पोलीस डिपार्टमेंटचं हे विंचवाचं तेल या समाजव्यवस्थेने… या संस्कृतीने साऱ्या बहुजन समष्टींसाठी विशेषत: दलित भटक्या-विमुक्तांविरुद्ध नाना रूपात वापरलंय… तर याच समष्टीतील ही पोर… सुनीता भोसले… पारधी या ‘गुन्हेगार’ असा शिक्का बसलेल्या जमातीत तिचा जन्म झाला. पारधी असल्याचे भोग तिलाही सुटले नाहीत. पण पोर बहाद्दर… तिने या ‘विंचवावर’ जालीम उपाय शोधला… तो म्हणजे भारतीय संविधानाचा! जयभीमच्या नाऱ्याचा!
समस्त पारधी समष्टीत भिनलेलं विष उतरवण्याचा प्रयत्न वयाच्या अकराव्या वर्षापासून करणाऱ्या या कार्यकर्तीची ही ज्वलंत जिंदगानी… विंचवाचं तेल !


300.00 Add to cart

माझा धनगरवाडा


खडतर संघर्ष करत त्यातून मार्ग काढत शिक्षक झालेले धनंजय धुरगडे यांनी आपल्या लेखनातून व्यक्तिगत जीवनसंघर्षाबरोबर धनगर समाजाच्या अनेक पदरी जीवनाचा बारकाईने उलघडा केलेला आहे. त्यांचं 'माझा धनगरवाडा’ हे आत्मकथन वाचल्यावर याची साक्ष पटते. यात धनगरांच्या प्रथा, परंपरा, रूढी, चालीरीती, नातेसंबंध, श्रद्धा व संस्कृती अशा कितीतरी अंगांनी धनगरी जीवनाचं दर्शन त्यांनी घडवलेलं आहे. सातारा जिल्ह्यातील पाडळी या लहान गावात ९ मार्च १९७३ रोजी धुरगुडे यांचा जन्म झाला. त्यानंतर त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डी.ई.ई ही पदवी प्राप्त केली आणि सध्या ते शासकीय तांत्रिक विद्यालय, कराड येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. 'माझा धनगरवाडा' या त्यांच्या पहिल्या साहित्यकृतीला 'संयुक्त राष्ट्रसंघ संलग्न संस्था' व 'इंटरनॅशनल जस्टीश फेडरेशन' आणि 'आयनॉक्स नॅशनल युनिव्हर्सिटी' यांच्या संयुक्त विद्यामाने दिला जाणारा 'आशियाई सामाजिक सांस्कृतिक पुरस्कार-२०१७' हे पारितोषिक मिळालं आहे.

शेळ्या-मेंढ्यांसोबत आपला कुटुंबकबिला घेऊन पोटासाठी रानोमाळ भटकणारा एक धनगर आपल्या पोरांना शिकवायचं असा निश्चय करतो, आणि बापाचं हे स्वप्न उराशी घेऊन धनगरवाड्यातलं एक कोकरू बिचकत बिचकत शाळेत जाऊ लागतं…
वादळवारा असो, वा सतत बदलणारा मुक्काम असो, काबाडकष्ट करून ते आपलं शालेय शिक्षण पूर्ण करतं. नंतर शहरामध्ये जाऊन उच्च शिक्षण घेतं. शिक्षणासाठी प्रसंगी मोलमजुरी करून ‘बापाचं स्वप्न पूर्ण करायचंच’ असा निर्धार करतं आणि स्वत:च स्वत:ला प्रेरित करत राहतं!
आत्मभान जागृत झालेल्या एका धनगराचं हे विलक्षण आत्मकथन… या कथनात लेखक धनंजय धुरगुडे धनगर समाजाच्या रूढी-चालीरीती आणि जीवनपद्धती यांचं जिवंत चित्रण करतात. त्यांचे पारंपरिक धनगरी खेळ, गजीनृत्य व सण-उत्सव यांचं शब्दचित्र रेखाटतात, आणि शिक्षणामुळे झालेला आपला विकास सांगत धनगर समाजाचं वास्तववादी दर्शन घडवतात.
एका धनगराने अस्सल धनगरी शैलीत प्रथमच चितारलेला हा – माझा धनगरवाडा!


500.00 Add to cart

शिक्षणकोंडी

स्थलांतरित मुलांना शिक्षणहक्क मिळवून देणाऱ्या कार्यकर्त्यांची डायरी



साखर उद्योग ही महाराष्ट्रातली महत्त्वाची सहकारी चळवळ. आज महाराष्ट्रात जवळपास २०० साखर कारखाने आहेत. साधारणपणे १५ जिल्ह्यांतून ऊसतोडणी कामगार स्थलांतर करून कुटुंबकबिल्यासह या कारखान्यांमध्ये कामाला येतात. त्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणात खंड पडतो. या मुलांना शालेय प्रवाहात आणण्याचं काम टाटा ट्रस्टतर्फे पुणे जिल्ह्यातील सोमेश्वर सहकारी कारखान्यामध्ये राबवलं जात आहे.

आतापर्यंत ६ ते १४ वयोगटातील २६४८ मुलांचं सर्वेक्षण करण्यात आलं असून त्यातील १८२८ मुलांना शाळेतही दाखल करण्यात आलं आहे. स्थलांतरामुळे मुलांच्या शिक्षणामध्ये येणाऱ्या समस्या ओळखून त्यावर उपाययोजना करत या शिक्षणकोंडीवर तोडगा काढण्यात ‘टीम आशा’ला यश येत आहे. हे काम करत असताना ‘टीम आशा’च्या कार्यकर्त्यांना अनेक बोलके अनुभव आले.

खेळण्या-बागडण्याच्या वयामध्ये आई-वडलांच्या मदतीसाठी कामाला जुंपून घेणारी लहानगी पोरं या कार्यकर्त्यांना भेटली… शाळेचा गणवेश, दप्तर, डबा घेऊन शिकायला जावं असं स्वप्नं बघणारी पोरं भेटली… कोणत्याही अडचणीवर मात करून पोरांना शाळेत पोचवणारे त्यांचे पालकही भेटले…

अशाच सगळ्या जिवंत, सळसळत्या अनुभवांचा हा कोलाज म्हणजेच ‘टीम आशा’च्या कार्यकर्त्यांची ही बोलकी डायरी… अर्थात शिक्षणकोंडी !


In Maharashtra, every year, more than 1.5 million sugarcane workers migrate to southern Maharashtra and Karnataka. Education is one of the major issues cane workers face, but there is no special provision for cane workers children in the policy. The sugarcane workers children are forcibly engaged with work with their parents like fetching water, bundling sugarcane, taking care of their younger siblings. This book is a dairy of the volunteers of Asha team sharing their experiences with the students and children of cane workers. its about the problems and stories they face while taking education and at the workplace.


125.00 Add to cart

होरपळ


‘होरपळकार’ म्हणून ल.सि. जाधव यांचं नाव महाराष्ट्राला सुपचिरित आहे. होरपळ हे त्यांचं पहिलं आत्मकथन खूप गाजलं आणि त्याचे चार भाषांमध्ये अनुवादही झाले. त्यानंतर त्यांनी होरपळचा पुढचा भाग – ‘सूळकाटा’ या नावे लिहिला आणि त्यालाही वाचकांनी चांगला प्रतिसाद दिला. आत्मकथनाबरोबर त्यांनी कादंबरी, कविता लेखनही केलं. त्यांनी बालसाहित्याची निर्मितीही केली. त्यांच्या पुस्तकांना राज्य शासनाच्या पुरस्काराबरोबरच अनेक मान्यवर संस्थांचे पुरस्कार प्राप्त झाले. वंचित समाजात जन्माला आल्यामुळे वाट्याला आलेलं दुःख, अवहेलना व झालेला अन्याय त्यांनी आपल्या लेखनातून संयतपणे मांडला. त्यामुळे त्यांचं लेखन आक्रस्ताळं न होता अंतर्मुख करणारं असतं. कायम लिहित्या असणाऱ्या या लेखकाचं जून २०१९मध्ये अकस्मात निधन झालं.

सोलापूर येथील मातंग वस्तीत ल.सि. जाधव यांचं बालपण गेलं. कुशाग्र बुद्धिमत्तेच्या बळावर त्यांनी पदव्युत्तर पातळीवरचं शिक्षण घेतलं आणि भारतीय स्टेट बँकेतून अधिकारी म्हणून ते सेवानिवृत्त झाले. ‘होरपळ’ या आपल्या आत्मकथनात त्यांनी मातंग समाजाचे व्यावसायिक व सामाजिक जीवन, त्यांच्या अंधश्रद्धा व त्यांचे दैन्य, अत्यंत अभावग्रस्त स्थितीतही माणुसकी जपण्याची त्यांची धडपड या सगळ्यांचे पूर्वग्रहरहित दृष्टीने तसेच सहृदयतेने चित्रण केले आहे. निसर्गातील विविधतेचा ते तरल संवेदनशीलतेने अनुभव घेतात, हे त्यांचं असाधारण वैशिष्ट्य म्हणावं लागेल. हीच संवेदनशीलता ते समाजातील घटना अथवा व्यक्तिजीवनातील दारुणता चित्रित करतानाही प्रकट करतात. त्यांची व्यापक जीवनदृष्टी, सामाजिकतेची प्रगल्भ समज, प्रसंग वा भावस्थितीचे प्रत्ययकारी चित्रण करण्याचं त्यांचं सामर्थ्य, प्रसादपूर्ण ओघवती भाषाशैली आणि निसर्गाचा अनुभव घेणारी तरल संवेदनशीलता या साऱ्या गुणांमुळे हे आत्मकथन केवळ दलित आत्मकथनातच नव्हे, तर एकंदरीतच मराठी आत्मकथनपर वाङ्मयात मोलाची भर घालणारं आहे.
साहित्यकृतीचा आल्हाददायक अनुभव देणारं तसेच वाचकांच्या सामाजिक जाणिवा समृद्ध करणारं आत्मकथन होरपळ…


250.00 Add to cart

सूळकाटा


‘होरपळकार’ म्हणून ल.सि. जाधव यांचं नाव महाराष्ट्राला सुपचिरित आहे. होरपळ हे त्यांचं पहिलं आत्मकथन खूप गाजलं आणि त्याचे चार भाषांमध्ये अनुवादही झाले. त्यानंतर त्यांनी होरपळचा पुढचा भाग – ‘सूळकाटा’ या नावे लिहिला आणि त्यालाही वाचकांनी चांगला प्रतिसाद दिला. आत्मकथनाबरोबर त्यांनी कादंबरी, कविता लेखनही केलं. त्यांनी बालसाहित्याची निर्मितीही केली. त्यांच्या पुस्तकांना राज्य शासनाच्या पुरस्काराबरोबरच अनेक मान्यवर संस्थांचे पुरस्कार प्राप्त झाले. वंचित समाजात जन्माला आल्यामुळे वाट्याला आलेलं दुःख, अवहेलना व झालेला अन्याय त्यांनी आपल्या लेखनातून संयतपणे मांडला. त्यामुळे त्यांचं लेखन आक्रस्ताळं न होता अंतर्मुख करणारं असतं. कायम लिहित्या असणाऱ्या या लेखकाचं जून २०१९मध्ये अकस्मात निधन झालं.

प्रसिद्ध लेखक ल.सि. जाधव यांच्या गाजलेल्या ‘होरपळ’ या आत्मकथनाचा ‘सूळकाटा’ म्हणजे पुढचा भाग. संयत व प्रवाही भाषाशैली, बारीक तपशिलांतून प्रसंग उभे करण्याची हातोटी आणि आपल्या समाजाप्रतीची कळकळ अशी होरपळ या आत्मकथनाची सगळी वैशिष्ट्यं सूळकाटातही दिसून येतात.
या आत्मकथनाचा गाभा प्रामुख्याने त्रिस्तरीय आहे. पहिला स्तर हा मातंग समाजाची दुःख, त्यांना सोसावे लागणारे चटके आणि त्याबद्दल लेखकाला असलेली कळकळ याबद्दलचा आहे. दुसरा स्तर हा लेखकाचा तरुण मुलगा अकाली गेल्याने घनव्याकूळ करणाNया दुःखाचा आहे. तर, लेखनाची निर्मितीप्रक्रिया आणि घरात तसेच समाजात लेखकाचं असलेलं स्थान याबद्दल केलेलं परखड भाष्य हा तिसरा आणि महत्त्वाचा स्तर…
हे संपूर्ण आत्मकथन एकाच वेळी वैयक्तिक व त्याच वेळी सामाजिक अशा दोन्ही पातळ्यांवरचं दुःख व्यक्त करत राहतं. ते केवळ दुःख व्यक्त करून थांबत नाही, तर त्याहीपलीकडे जाऊन, या सगळ्याकडे उदार दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करतं आणि म्हणूनच वेगळ्या उंचीवर पोचतं.
सलत राहणारा, सलता सलता अंतर्मुख करणारा, जीवनविषयक अंतर्दृष्टी देणारा… सूळकाटा !


250.00 Add to cart

वॉर्ड नंबर पाच, केईएम


डॉक्टर आणि लेखक म्हणून डॉ. रवी बापट सुपरिचित आहेत. त्यांनी मुंबईच्या जी.एस. मेडिकल कॉलेजमध्ये बराच काळ प्राध्यापकी केली असून ते केईएम रुग्णालयात जठरांत्र शल्यचिकित्सा विभागात कार्यरत. त्यांनी जठरांत्र शल्यचिकित्सेसाठी ‘कॉमनवेल्थ मेडिकल फेलोशिप(१९७५)’ मिळवून ग्लासगो रॉयल इन्फर्मरीमध्ये प्रा. एल.एच. ब्लुमगार्ट यांच्या हाताखाली शिक्षण घेतले. ते महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू होते. तसंच हाफकिन जीवऔषध निर्माण महामंडळाचे अध्यक्ष होते. त्यांना महत्त्वाचे राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले असून त्यांच्या लेखनाला राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

ही सारी कहाणी आहे केईएम हॉस्पिटलमधील ‘वॉर्ड नंबर पाचची’. वैद्यकीय व्यवसायात असताना डॉ.बापट यांना आलेले अनुभव, उपचारादरम्यान भेटलेले विविध प्रकारचे रुग्ण, डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉईज…
डॉक्टरने रुग्णाकडे केवळ शास्त्रीय दृष्टिकोनातून आणि पुस्तकी ज्ञानातून पाहणं पुरेसं नाही. रुग्णाचं मन, त्याचा स्वभाव, त्याच्या भोवतालचं वातावरण हे समजून घेवून त्यांच्याशी संवाद साधून मगच उपचार करणं डॉ.बापट यांना गरजेचं वाटलं. शरद पवार ते सतीश राजे, दादा कोंडके ते दत्तू मिस्त्री, रुग्ण कुणीही असो त्याची पत-प्रतिष्ठा न पाहता शल्यचिकित्सक डॉक्टर बापटांनी सारख्याच आपुलकीने उपचार केले. अशा सर्व अनुभवांविषयी…


350.00 Add to cart

काँक्रीटची वनराई

प्रगत, सुनियोजित, सुंदर शहरांचं स्वप्न…


सुलक्षणा महाजन यांचा जन्म १९५१ साली मुंबई येथे झाला. त्यांचं शालेय शिक्षण नाशिक येथील गव्हर्नमेंट गर्ल्स स्कूलमध्ये झालं. त्यांनी १९७२ साली सर जे.जे. कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, मुंबई, येथून बॅचलर ऑफ आर्किटेक्चरमधील पदवी प्राप्त केली. शिवाय १९७४ साली आय.आय.टी. पवई येथून इंडस्ट्रियल डिझाइनमधे पदविका प्राप्त केली. महाराष्ट्र नगररचना खातं, ठाणे आणि भाभा अॅसटॉमिक रिसर्च सेंटर, मुंबई, या सरकारी आस्थापनांमध्ये त्यांनी अर्किटेक्ट म्हणून नोकरी केली. घेरझी इस्टर्न लिमिटेड, मुंबई आणि एपिकॉन्स कन्सल्टंट, ठाणे या खाजगी क्षेत्रांमधील कंपन्यांमध्ये वास्तुरचनांसाठी कन्सल्टंट म्हणूनही त्यांनी काम केलं. ‘नगर नियोजन’ या विषयावर मिशिगन विद्यापीठात, तर ‘हॅबिटाट’ या जागतिक संस्थेच्या ‘सस्टेनेबल सिटीज प्रकल्पा’तर्फे महाराष्ट्रातील आठ शहरांचा अभ्यास त्यांनी केला. ‘मुंबई ट्रान्सफॉर्मेशन सपोर्ट युनिट’मध्ये मुंबई संबंधीचे संशोधन त्या करत असून ‘विचार रचना संसद,’ प्रभादेवी, मुंबई, येथे पर्यावरण वास्तुरचना आणि नगर नियोजन या विषयाचं अध्ययन करत आहेत. या विषयांवर त्यांची पुस्तकं प्रकाशित असून त्या लोकसत्ता, सकाळ या दैनिकांतून सातत्याने लेखन करतात.

काँक्रीटचं जंगल’ म्हटलं की डोळयासमोर उभ्या राहतात आक्राळविक्राळ, कशाही-कुठेही बांधलेल्या इमारती! पण कोणतंही शहर किंवा नगर म्हणजे फक्त उत्तुंग, दाटीवाटीने फोफावलेल्या इमारती आणि भावनाशून्यपणे घडयाळाच्या काटयावर पळणारी माणसं, एवढंच असतं का? शहरांबाबतच्या समाजातील अशा प्रकारच्या प्रचलित नकारात्मक समजुती आणि विस्तारणारं नागरीकरण हा प्रचंड विरोधाभास लेखिकेलाही चक्रावून टाकतो.
या विरोधाभासाचा शोध घेण्याचा, त्यामागची गृहितकं तपासण्याचा, नागरीकरणाची प्रक्रिया समजून घेण्याचा आणि समजावून देण्याचा सकारात्मक व प्रामाणिक प्रयत्न म्हणजेच हे पुस्तक!
लेखिकेच्या दृष्टिकोनातून राज्याच्या आणि राष्ट्राच्या विकासासाठी शहरं निश्चितच महत्त्वाची भूमिका बजावतात. उत्तम सोयी-सुविधांनी युक्त शहरांच्या निर्मितीसाठी आपल्याला गरज आहे ती दूरदृष्टी ठेवून केलेल्या नियोजनाची. ज्याप्रमाणे एखादी वनराई फुलवायला, ती वृध्दिंगत करायला एका कुशल माळयाची व त्याच्या प्रेमळ संगोपनाची गरज असते त्याचप्रमाणे आजच्या काँक्रीटच्या जंगलाचं वनराईत रूपांतर करण्यासाठी आज गरज आहे ती द्रष्टया लोकनेत्यांची आणि व्यापक दृष्टीकोन असणाऱ्या कुशल प्रशासकांची.
या दृष्टीने या पुस्तकातील चर्चा व मुद्दे वाचकांना व संबंधितांना आजच्या बकाल काँक्रीटच्या जंगलाचं रूपांतर सुंदर व नियोजनपूर्ण ‘वनराई’मध्ये करण्यास नक्कीच उद्युक्त करतील.


250.00 180.00 Add to cart

केवळ मानवतेसाठी

आपलं अवघं आयुष्य मानवसेवेला समर्पित करून सेवा-केंद्रांचं अभूतपूर्व जाळं विणणार्‍या अब्दुल सत्तार इदी यांचं आत्मचरित्र


अब्दुल सत्तार इदी यांच्या ध्वनिमुद्रित कथनाचे शब्दांकन व संकलन करून त्याला 'केवळ मानवतेसाठी' या ग्रंथरूपात साकार करणाऱ्या दुराणी यांचा जन्म १९५३ साली लाहोर येथे झाला. ‘माय फ्युडल लॉर्ड’ हे त्यांचे गाजलेले आत्मचरित्र अठरा भाषांमध्ये अनुवादित झालेले आहे.

अनुवाद :
श्रीकांत लागू यांचा जन्म ७ ऑगस्ट १९३५ रोजी पुणे येथे झाला. त्यांनी रुपारेल महाविद्यालय, मुंबई येथून १९५९ साली बी.ए.(अर्थशास्त्र) ही पदवी प्राप्त केली आहे. व्यवसायाने ते ‘लागू बंधू हिरे-मोती’ या पेढीचे संचालक होते. मोबाईलचा शोध लागण्याच्या आधीपासून ‘माणसं जोडणं’ हे त्यांचं व्यसन होतं. कोणतीही गोष्ट पाहिली, वाचली किंवा भावली तर त्यात मित्रमंडळींना सहभागी करून आनंद वाटणं ही त्यांची वृत्ती होती. सागरसफरीत आनंद लुटणारं, आकाश निरीक्षणात गुंगून जाणारं व धरतीवरील गिरीशिखरं पादाक्रांत करण्याचा रोमहर्षक अनुभव घेणारं श्रीकांत लागू हे एक हा दिलदार–दिलखुलास व्यक्तिमत्त्व होतं. त्यांनी रंगायन, अविष्कार व रुपवेध या संस्थांच्या ‘शांतता कोर्ट चालू आहे’, ‘आम्ही जिंकलो आम्ही हरलो’, ‘उद्ध्वस्त धर्मशाळा’, ‘तुघलक’ या नाटकांमध्ये भूमिका केल्या तसंच नभोवाणीवरील अनेक श्रुतिकांमध्येही त्यांचा सहभाग होता. विविध पुस्तकांचे त्यांनी अनुवाद केले. त्यांच्या लेखांचे संग्रही प्रकाशित झाले. 2013 साली त्यांचं निधन झालं आणि मराठीतला एक कलंदर, हरहुन्नरी लेखक हरपला.


अब्दुल सत्तार इदी यांचा जन्म भारतातला. पण फाळणीमुळे किशोरवयातच ते कराचीला स्थलांतरित झाले. गरीब, गरजू आणि आपत्तीग्रस्तांसाठी केलेल्या अभूतपूर्व मदत-कार्यामुळे तिसऱ्या जगतामधील जनतेत त्यांना मसिहाच समजलं जातं. मूळच्या सेवाभावीवृत्तीमुळे १९४८ मध्ये त्यांनी मिठादर येथे धर्मादाय दवाखाना सुरू केला. अल्पावधीतच आपत्कालीनप्रसंगी मदत कार्यासाठी पाकिस्तानात सर्वत्र रुग्णवाहिका व मालवाहू वाहनांच्या सेवेचं जाळं विणलं. त्याचबरोबर शिस्तबध्द सेवाकर्मींची मोठी फळी उभी केली. कालांतराने त्यात हेलिकॉप्टर सेवेचीही भर पडली. पूर, भूकंप किंवा रेल्वे अपघातासारखी कोणतीही आपत्ती असो, इदी फाऊंडेशनचे स्वयंसेवक सरकारी यंत्रणेआधीच मदतीचा हात घेऊन घटनास्थळी पोहोचलेले असतात. झुल्फिकार अली भुट्टो असो किंवा नवाज शरीफ वा आसिफ अली झरदारी असो सर्वच राज्यकर्त्यांनी वेळोवेळी इदींच्या सेवाकेंद्रांची मदत घेतली. इदींनी केलेल्या त्यांच्या सेवाकार्याच्या प्रचंड विस्तारामुळे आणि त्यांच्या धर्मनिरपेक्ष सेवाभावामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय कीर्तीही लाभली आहे. सेवाकार्य व मानवता ही मूल्यं आचरणात आणून मानवसेवेसाठी इदींनी स्वत:ला सर्व कुटुंबासह जणू वाहूनच घेतलं! रस्त्यात त्यांनी अक्षरश: भीक मागून विलक्षण अशा भीक अभियानाच्या प्रयोगातून संस्थेसाठी प्रचंड निधी जमा केला. शासनाची दंडेलशाही, धर्मांधांचा विरोध आणि दहशतवाद्यांचा दबाव याला सामोरं जात, त्यांनी आपलं कार्य जिद्दीने पुढे नेलं. त्याचंच हे चित्तवेधक व प्रेरणादायी आत्मकथन… केवळ मानवतेसाठी…!


195.00 Add to cart

गुड मुस्लीम बॅड मुस्लीम

इस्लाम, अमेरिका आणि दहशतविरोधी युद्ध यांबाबतचं साक्षेपी विवेचन


जगातिक ख्यातीचे राजकीय समीक्षक, विचारवंत आणि मानववंशशास्त्रज्ञ म्हणून महमूद ममदानी यांचा लौकिक आहे. हॉवर्ड विद्यापीठातून १९७४ साली पीएच.डी केलेल्या महमूद ममदानी यांनी अनेक विषयांवर संशोधनपर व समीक्षापर लेखन केलं असून ‘आफ्रिकन अँड इंटरनॅशनल पॉलिटिक्स, कोलोनिअलिझम् अँड पोस्ट-कोलोनिअलिझम् अँड द पॉलिटिक्स ऑफ नॉलेज प्रॉडक्शन' या विषयावरील त्यांचा अभ्यास जागतिक चर्चाविश्वात विशेष दखलपात्र ठरला आहे. कोलम्बिया युनिव्हर्सिटीत हर्बट लेहमन प्रोफेसर म्हणून आणि युगांडांच्या ‘मॅकॅरेरे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल रिसर्च' संस्थेचे संचालक व प्राध्यापक म्हणून पदं भूषवलेल्या ममदानी यांचा जागतिक स्तरावरील आघाडीच्या ‘पुरोगामी विचारवंतां’मध्ये समावेश होतो.

अनुवाद:
मुंबई विद्यापीठात अनेक वर्षं मराठी भाषा विषयाच्या अध्यापक म्हणून पुष्पा भावे कार्यरत होत्या. त्यांना महाराष्ट्रातील आघाडीच्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व समीक्षक म्हणून मान्यता प्राप्त झाली आहे. त्यांनी दलित व आशियातील अल्पसंख्यांकांच्या समस्यांबाबत विविध परिसंवाद व नियतकालिकांतील लेखनाद्वारे सातत्याने अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे. ‘पाकिस्तान-इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस अँड डेमॉक्रसी' या संघटनेच्या त्या कार्यकारी सदस्य होत्या. ‘आशिया-युरोपमधील शांततेचे प्रश्न' या विषयावरील चीनमधील परिषदेत व त्याचप्रमाणे श्रीलंकेत अल्पसंख्यांकाच्या समस्येच्या निवारणार्थ गेलेल्या शिष्टमंडळात, प्रतिनिधी म्हणून त्यांचा सहभाग होता. मानवी हक्कांसाठी कार्यरत असलेल्या ‘सेहर' संस्थेसाठी त्यांचे योगदान असून नागरी स्वातंत्र्य चळवळीतही त्यांचा सहभाग होता.
गंभीर वृत्तीचे अनुवादक, संपादक व लेखक म्हणून मिलिंद चंपानेरकर विख्यात आहेत. त्यांनी आजवर ‘लोककवी साहीर लुधियानवी' (मूळ लेखक : अक्षय मनवानी), ‘त्या दहा वर्षांतील गुरू दत्त' (मूळ लेखक - सत्य सरन), ‘सुन मेरे बंधू रे - एस.डी. बर्मन यांचं जीवनसंगीत' (मूळ लेखक - सत्या सरन), ‘वहिदा रेहमान... हितगुजातून उलगडलेली', (मूळ लेखक- नसरीन मुन्नी कबीर), ‘ए.आर. रहमान : संगीतातील वादळ' (मूळ लेखक - कामिनी मथाई), ‘भारतातील डाव्या चळवळीचा मागोवा’ (मूळ लेखक - प्रफुल्ल बिडवई), ‘गुड मुस्लीम बॅड मुस्लीम' (मूळ लेखक - महमूद ममदानी, सह-अनुवादक - पुष्पा भावे) यांसारख्या महत्त्वाच्या पुस्तकांचा अनुवाद केला असून ‘यांनी घडवलं सहस्रक' आणि ‘असा घडला भारत' या महद्ग्रंथांसाठी सह-संपादन, संशोधन व लेखन केलं आहे. त्यांनी दैनिक ‘इंडियन एक्स्प्रेस'साठी १९९१-२००० या कालावधीमध्ये पत्रकारिता केली आहे. गेली तीन दशकं त्यांनी विविध मराठी दैनिक आणि नियतकालिकांमधून समाजाभिमुख साहित्य, नाट्य व चित्रपटविषयक समीक्षापर लेखन आणि त्याचप्रमाणे, सामाजिक-राजकीय विषयांवर विश्लेषणात्मक लेखन केलं आहे. त्यांना ‘लोकशाहीवादी अम्मीस...दीर्घपत्र' या अनुवादित पुस्तकासाठी सर्वोत्कृष्ट अनुवादाचा २०१६ सालचा ‘साहित्य अकादमी' पुरस्कार प्राप्त झाला आहे.


चांगला’ मुसलमान कोण? ‘वाईट’ मुसलमान कोण? – हे कुणी ठरवलं? कसं ठरवलं? का ठरवलं? मुळात ‘गुड मुस्लीम’, ‘बॅड मुस्लीम’ या संकल्पनांचा व ‘राजकीय ओळखीं’चा उद्भवच कसा झाला? अशा अनेक प्रश्नांच्या अंगाने ‘शीत युद्धा’नंतरच्या काळातील जागतिक राजकारणाचं अभ्यासपूर्ण व मार्मिक विश्लेषण करणाऱ्या ‘गुड मुस्लीम-बॅड मुस्लीम’ या महमूद ममदानी लिखित मूळ इंग्रजी पुस्तकाचा हा अनुवाद.
महमूद ममदानी हे एक जागतिक कीर्तीचे अभ्यासक आणि मानववंश शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या मते, पाश्चात्त्यांनी जाणीवपूर्वक अशा स्वरूपाच्या सुलभ व्याख्या केल्या की, पाश्चात्त्य संकल्पनांनी संस्कारित तो म्हणजे ‘गुड मुस्लीम’ आणि आधुनिक-पूर्व विचारांना धरून ठेवणारा वा कडव्या विचारांचा तो ‘बॅड मुस्लीम’. एकंदरीतच, १९६०च्या दशकातील व्हिएतनाम युध्द ते ‘९/११’च्या घटनेनंतरचा काळ या दरम्यान अमेरिका व त्यांच्या पाश्चात्य मित्रराष्ट्रांनी आपल्या राजकीय उद्दिष्टांसाठी मुस्लीम समाजसमूहांची ‘धार्मिक ओळख’ आणि ‘राजकीय ओळख’ यांची कशी हेतुपुरस्सर सरमिसळ केली आणि त्याचे किती विपरीत परिणाम संभवले, त्याचा उलगडा ममदानी या पुस्तकाद्वारे करू पाहतात. प्रदीर्घ संशोधन व विश्वासार्ह संदर्भांच्या आधारे त्यांनी हे पुस्तक सिध्द केलं आहे.
जागतिक राजकारणातील अनेक अज्ञात गोष्टींवर, घटनांवर नव्याने प्रकाश टाकून अनेक गैरसमजुती दूर करू पाहणारं आणि जागतिक शांततेच्या दृष्टीने सर्वांनाच विचारप्रवृत्त करू पाहणारं असं हे पुस्तक…
‘गुड मुस्लीम बॅड मुस्लीम!


395.00 Add to cart

जपूयात निरागस बालपण

बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय


डॉ. मीनाक्षी नलबले-भोसले या १९९०च्या दहावी व १९९२च्या बारावी परीक्षेत महाराष्ट्रात सर्वप्रथम आल्या आहेत. त्यांनी मुंबईच्या प्रतिष्ठित सेठ जी. एस. मेडिकल कॉलेज व के.ई.एम. हॉस्पिटल इथून एम.बी.बी.एस. आणि एम.एस. जनरल सर्जरीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी मुंबईतील बाई जेरबाई चिल्ड्रेन्स हॉस्पिटल, या प्रख्यात हॉस्पिटलमधून एम.सी.एच.पेडियाट्रिक सर्जरीचं प्रशिक्षण घेतलं. त्यांनी बी.जे. मेडिकल कॉलेज व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे इथे १३ वर्षं बालशस्त्रक्रियातज्ज्ञ म्हणून काम केलं असून मुंबईच्या जे.जे. हॉस्पिटलमध्ये सहयोगी प्राध्यापक व पेडियाट्रिक सर्जरी विभागप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. त्या बाललैंगिक अत्याचारावर पॉक्सो कायद्याअंतर्गत पालक-शिक्षकांसाठी व्याख्यानांद्वारे मार्गदर्शन करतात. शिवाय सदर विषयावर जनजागृतीसाठी मराठी व इंग्रजीमधून पुस्तिकांचं लेखन करतात. अत्याचारग्रस्त बालकांवर प्रत्यक्ष उपचार व आवश्यक शस्त्रक्रिया करण्याचा त्यांना अनुभव असून लैंगिक अत्याचार झालेल्या मुलांच्या उपचारासाठी तज्ज्ञ भारतीय डॉक्टरांच्या पथकामध्ये त्यांचा समावेश असतो.

आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्या लहानग्याचं बालपण जपणं खरोखर एक आव्हान झालं आहे. वाढता चंगळवाद, बदललेली जीवनशैली, परिसीमा गाठणाऱ्या मनोविकृती यांमुळे लैंगिक शोषणाच्या अनेक भीतीदायक केसेस शहरी आणि ग्रामीण भागात घडताना दिसत आहेत.
ससून हॉस्पिटलमध्ये बालशल्यविशारद म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. मीनाक्षी भोसले यांनी बाललैंगिक शोषणाच्या अनेक गंभीर केसेस हाताळल्या आहेत. मुलांवरील अत्याचारांचं वाढतं प्रमाण पाहून अशा दुर्घटना रोखण्याची गरज या संवेदनशील डॉक्टरला वाटली. शरीरावरच्या जखमा बऱ्या करता करता समुपदेशनाद्वारे, पुस्तिकेद्वारे, प्रबोधनात्मक कार्यक्रमांद्वारे डॉ. मीनाक्षी आज हा गंभीर प्रश्न घेऊन पालकांपर्यंत, एकंदर समाजापर्यंत पोहोचू पाहत आहेत. हे पुस्तकही या उपक्रमाचा भाग आहे. पुस्तकातील चार विभागांतून या प्रश्नाची पूर्ण व्याप्ती दिसून येईल…
1. अत्याचाराचे प्रकार
2. काही गंभीर सामाजिक समस्या व रूढी
3. अत्याचार होऊ नयेत म्हणून.. आणि
4. अत्याचाराची घटना घडल्यानंतर…
आपल्या मुलांना कोणत्याही प्रकारच्या लैंगिक अत्याचाराला तोंड द्यावं लागू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय सांगणारं… जपूयात निरागस बालपण


100.00 Add to cart

Power, Pen & Patronage

Media, Culture and the Marathi Society



Tikekar has always been a voice of sanity. As editor of Loksatta for over a decade, he reached the Marathi newspaper to a new high and left an indelible mark in journalism. By his advocacy of uncompromising ethics in public and personal life, his promotion of liberal values, and denunciation of media activism, he left behind a legacy of healthy and robust journalism for future generations of journalists and writers. In this selection of his occasional addresses and articles, he unravels with unambiguous clarity the malaise that has struck the society and media. He censures media for its doubletalk, its hysterical demeanor and denounces media persons’ hobnobbing with the high and mighty. He specifies causes for its growing conflict with judiciary. He faults the political and cultural forces for turning the Marathi society insular and retrograde. The book provides a rock-steady guide to classical journalism.


295.00 Add to cart
1 2