एक होती रितू…


रितू नंदाची अविस्मरणीय कहाणी


सत्या सरन या अनेक वर्षं पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. ‘मी’ या स्त्री-विषयक इंग्रजी नियतकालिकाच्या त्या संपादक आहेत. त्यांनी स्त्री-समस्यांवर व सिनेमाध्यमावर सातत्याने व्यापक अभ्यासपूर्ण लेखन केलं आहे. पत्रकारितेतील योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. ‘सुवर्णयुगा'तील हिंदी चित्रपट आणि चित्रपट-संगीत याबाबत विशेष रुची असलेल्या सत्या सरन यांनी अनेक लघुकथाही लिहिलेल्या आहेत.

अनुवाद :

‘रोहन प्रकाशन’च्या संपादन विभागात नीता कार्यरत असून संपादन, अनुवाद आणि लेखन क्षेत्रांत त्या गेली दहा वर्षं काम करत आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे आत्मचरित्र– ‘ड्रीम्स फ्रॉम माय फादर', ‘सुपरपॉवर?', ‘सिल्वा माइंड कंट्रोल' आणि ‘त्या दिवशी माझा मृत्यू झाला...' ही त्यांनी अनुवाद केलेली पुस्तकं. ‘सुपरपॉवर?' या त्यांच्या पुस्तकाला ‘नाशिक सार्वजनिक ग्रंथालया’चा सर्वोत्कृष्ट अनुवादाचा पुरस्कार मिळाला असून त्या कथालेखनही करतात. त्यांच्या कथांना पुरस्कारदेखील मिळाले आहेत.


रितू नंदा…..

राज कपूरची लाडकी लेक आणि उद्योजक राजन नंदा यांची प्रिय पत्नी…. पण एवढीच होती का रितूची ओळख ? तर नाही…

हे पुस्तक वाचल्यावर जाणीव होते की, रितूची ओळख कित्येक कोस या पलीकडची आहे.

सुप्रसिद्ध संपादिका व लेखिका सत्या सरन यांनी रितूच्या आयुष्याचा धांडोळा रसाळ भाषेत सखोलतेने घेतला आहे. शिवाय त्यांनी रितूचे कुटुंब सदस्य, जवळचे नातेवाईक, मित्र-मैत्रिणी, व्यवसायातले सहकारी, इलाज करणारे डॉक्टर्स आणि अनेक सुहृद यांना बोलतं करत तिचं असामान्य कर्तृत्व,

व्यक्तिमत्त्वातले अनेक पैलू, स्वभावातल्या बारीक छटा यांचा उलगडा केला आहे…. यातूनच समजतं….

मृदु मनाची रितू एक उत्तम गृहकर्तव्यदक्ष गृहिणी तर होतीच; पण त्याचबरोबर ती स्वतः एक कल्पक व मेहनती उद्योजिका होती आणि कठीण प्रसंगांना धैर्याने भिडणारी, आयुष्याला सामोरी जाणारी कणखर स्त्री होती.

तिचीच ही प्रेरणादायी कहाणी एक होती रितू…


300.00 Add to cart

नेहरू व बोस : समांतर जीवनप्रवास


दिल्ली येथील ‘अशोक विद्यापीठा'चे कुलगुरू रुद्रांग्शू मुखर्जी हे कुलगुरू होते. ते इतिहासाचे प्राध्यापक आहेत. कलकत्ता विद्यापीठात त्यांनी अध्यापनाचं कार्य केलं आहे. त्याचबरोबर प्रिन्स्टन विद्यापीठ, मँचेस्टर विद्यापीठ व कॅलिफोर्निया विद्यापीठ या ठिकाणी त्यांनी निमंत्रित व्याख्याता म्हणून शिकवलेलं आहे. कलकत्तास्थित ‘टेलिग्राफ' या वृत्तपत्राच्या संपादकीय पानांची संपादकीय जबाबदारीही त्यांनी सांभाळलेली आहे, आणि अजूनही या वृत्तपत्राचे सल्लागार संपादक म्हणून ते काम करतात. त्यांची अनेक संशोधनपर पुस्तकं प्रकाशित आहेत आणि ती गाजलीही आहेत.

अनुवाद :
तरुण कादंबरीकार, अनुवादक म्हणून अवधूत डोंगरे प्रसिद्ध आहेत. त्यांच्या आजवर चार कादंबऱ्या प्रकाशित झालेल्या असून कादंबरीलेखनासोबतच ते एकरेघ (ekregh.blogspot.in) हा ब्लॉगही लिहितात. पत्रकारी स्वरूपाचं लेखनही त्यांनी काही वर्तपानपत्रांतून व नियतकालिकांमधून केलं आहे. व्यवसाय म्हणून ते विविध प्रकारच्या अनुवादाची कामं करतात. त्यांच्या ‘स्वतःला फालतू समजण्याची गोष्ट’ या त्यांच्या कादंबरीला २०१४ सालचा ‘साहित्य अकादमी युवा पुरस्कार’ मिळाला आहे.


`जवाहरलाल नेहरूंएवढी हानी मला कोणीच पोचवलेली नाही’, असं सुभाषचंद्र बोस यांनी १९३९मध्ये लिहिलं होतं. नेहरूंकडे बोस यांनी शत्रू म्हणून पाहावं एवढे या दोन राष्ट्रवादी नेत्यांमधले संबंध बिघडले होते का? पण मग सुभाषचंद्रांनी आझाद हिंद सेनेतील एका पलटणीचं नाव जवाहरलाल यांच्यावरून का ठेवलं? आणि १९४५मध्ये सुभाषचंद्रांच्या अकाली निधनाची वार्ता ऐकल्यावर जवाहरलाल यांना अश्रू का अनावर झाले? शिवाय, `मी त्यांना लहान भाऊ मानायचो’, असे उदगार नेहरूंनी का काढले?
स्वातंत्र्य चळवळीच्या पार्श्वभूमीवर या दोन उत्तुंग व्यक्तिमत्त्वांच्या जडणघडणीचा शोध रुद्रांग्शू मुखर्जी यांनी या पुस्तकात सखोलतेने घेतला आहे. भिन्न राजकीय विचारधारांमुळे नेहरू व बोस यांच्यात न उमलू शकलेल्या मैत्रीचा अदमास हे पुस्तक बांधतं आणि त्याचसोबत या दोन व्यक्तिमत्त्वांमधीलभेदही अधोरेखित करतं. गांधी नेहरूंकडे आपला राजकीय वारस म्हणून बघत होते, तर सुभाषचंद्रांना मार्गभ्रष्ट पुत्र मानत होते.
आधुनिक भारताच्या घडणीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान असलेल्या दोन परस्परविरोधी व्यक्तिमत्त्वांची लक्षवेधक कहाणी… नेहरू व बोस समांतर जीवनप्रवास !


350.00 Add to cart

अनफर्गेटेबल जगजित सिंग

गझल गायकीच्या दुनियेतील तरल स्वर


सत्या सरन या अनेक वर्षं पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. ‘मी’ या स्त्री-विषयक इंग्रजी नियतकालिकाच्या त्या संपादक आहेत. त्यांनी स्त्री-समस्यांवर व सिनेमाध्यमावर सातत्याने व्यापक अभ्यासपूर्ण लेखन केलं आहे. पत्रकारितेतील योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. ‘सुवर्णयुगा'तील हिंदी चित्रपट आणि चित्रपट-संगीत याबाबत विशेष रुची असलेल्या सत्या सरन यांनी अनेक लघुकथाही लिहिलेल्या आहेत.

अनुवाद:
"पत्रकारितेचा अभ्यासक्रम करताना, त्यात 'अनुवाद' हा विषय शिकताना आपल्याला अनुवाद बऱ्यापैकी जमतो असं उल्का राऊत यांना वाटलं. त्यानंतर त्यांनी काही कथा अनुवाद करून पाहिल्या. 'रोहन प्रकाशन'ने प्रकाशित केलेलं 'ऋतुशैशव' (आमचं बालपण) हे त्यांचं पहिलं अनुवादित पुस्तक होय. त्यानंतर राऊत यांनी अनेक महत्त्वाच्या पुस्तकांचे अनुवाद केले आणि ते गाजलेदेखील. त्यांना लहानपणापासून वाचनाची आवड असून त्या शास्त्रीय संगीताच्या मैफलींना आवर्जून जातात. तसंच चित्रप्रदर्शनंदेखील पाहतात. कविता करणं हा त्यांचा छंद आहे. आवडलेल्या इंग्रजी पुस्तकांचा मराठी वाचकांसाठी अनुवाद करणं हा त्यांच्या आनंदाचा भाग आहे.


जगजित म्हटलं की, कानात आवाज घुमतात गझलांचे…मनाचा ठाव घेणाऱ्या, मन शांत करून जाणाऱ्या आवाजातल्या अनेक गझला ! नेमक्या भावना व्यक्त करत, काही अनपेक्षित सुरावटी गात, कधी पाश्चात्त्य वाद्यांचा आधार घेत जगजितने गझल गायकीचा चेहरामोहराच बदलून टाकला.
सत्या सरन यांनी लिहिलेल्या जगजितच्या या चरित्रात त्याचा विद्यार्थीदशेपासूनचा, स्ट्रगलर ते लोकप्रिय गायक असा प्रवास उल्का राऊत यांनी मराठीत रसाळपणे उलगडला आहे. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायकीने जगजित मैफिलीचं वातावरण भारून टाकत असे. रसिकांच्या डोळ्यांतून अश्रुधारा बरसवणारा जगजित एखादा चुटकुला सांगून त्याच मैफलीत रसिकांना हसायलाही भाग पाडत असे. जगजितचे असे अनेक पैलू या पुस्तकात विविध प्रसंगांतून खुलून येतात. नियतीने जगजित-चित्राला अनेक बरे-वाईट रंग दाखवले. ते दोघं कधी या नियतीला गायनाचा, आध्यात्माचा आधार घेत धिरोदात्तपणे सामोरे गेले, तर कधी कोलमडून गेले.
एक मित्र, मुलगा, वडील, गायक, चित्राचा साथी, नवगायकांसाठी मसीहा अशा अनेक भूमिकांमधून पुस्तकात भेटत जाणारा…अन्फर्गेटेबल जगजित सिंग.


250.00 Add to cart

लालबहादुर शास्त्री

राजकारणातील मर्यादापुरषोत्तम


चंद्रिका प्रसाद श्रीवास्तव यांचा जन्म ८ जुलै १९२० रोजी झाला. लखनौ येथून एम.ए. व एलएल.बी. पदवी त्यांनी प्रथम वर्गात संपादन केली. आय.ए.एस. झाल्यावर केंद्र सरकारच्या वाणिज्य खात्यात रुजू झाल्या. १९५३ पासून त्यांनी नौकानयन खात्यात विविध पदांवर काम केलं. १९६१मध्ये शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती. १९६४ ते १९६६ या काळात पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांचे संयुक्त सचिव, अर्थात या काळातील सर्व महत्त्वाच्या राजकीय घटनांचे साक्षीदार. ऐतिहासिक ताश्कंद शिखर परिषदेच्या वेळी ते शास्त्रींच्या समवेत उपस्थित होते. नौकानयनविषयक अनेक भारतीय व जागतिक संघटनांचे ते सदस्य आहेत. १९७२मध्ये भारत सरकारने त्यांचा ‘पद्मभूषण' हा किताब देऊन त्यांचा गौरव केला. स्वीडन, नॉर्वे व स्पेन या देशांच्या सरकारांनी त्यांना विविध किताब देऊन सन्मानित केले आहे. इंग्लंडच्या राणीने के.सी.एम.जी. हा किताब देऊन त्यांचा बहुमान केला आहे.

अनुवाद : 
'रोहन'चे एक ‘कलंदर’ लेखक. पत्रकारिता, अनुवाद, सदर लेखन ते ललित लेखनामध्ये अनेक वर्षं मुशाफिरी केलेला ‘ज्येष्ठ लेखक’ म्हणून परिचित होते. त्यांना व्यासंगी पत्रकारितेचा चार दशकाहून अधिक अनुभव होता. तसंच त्यांना पालिका बैठकीपासून आंतरराष्ट्रीय शिखर परिषदांचे वृत्तांत देण्यापर्यंतचा समृद्ध अनुभव होता. दैनिक सकाळ, तरुण भारत व केसरी या वृत्तपत्रांतून काम केल्यानंतर ते महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्रात दाखल झाले. महाराष्ट्र टाइम्सचे दिल्ली प्रतिनिधी म्हणून त्यांनी ११ वर्षं काम केलं. तेथून त्यांनी लिहलेली 'राजधानीतून' ही वार्तापत्रं विशेष गाजली. त्यानंतर अनेक वर्षं त्यांनी ‘मटा’चे कार्यकारी संपादक म्हणून काम केलं. 'कलंदर' या टोपण नावाने 'कानोकानी' हे त्याचं सदरही विशेष लोकप्रिय झालं. अनुवाद क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केली असून त्यामध्ये इंदिरा गांधी (पुपुल जयकर), शेषन (के. गोविंदन कुट्टी), इंदिरा अंतिम पर्व (पी. सी. अलेक्झांडर), लता मंगेशकर (हरीश भिमानी), फॅन्टॅस्टिक फेलूदा (सत्यजित रे पुस्तकांची मालिका), लाल बहादूर शास्त्री (पी. एन. धर), कस्तुरबा : एक शलाका (अरुण गांधी), आर. डॉक्युमेंट (आयर्विंग वॉलेस) यांचा समावेश होतो. हे सर्व अनुवाद त्यांना उत्कृष्ट तर होतेच, परंतु ते लोकप्रियही झाले. सर्वोत्कृष्ट अनुवादासाठी साहित्य अकादमी, राज्य सरकार व अनुवाद सुविधा केंद्र यांचे पुरस्कार त्यांना लाभले. 'कानोकानी' या पुस्तकाला मसापचा चि. वि. जोशी पुरस्कार लाभला.


काश्मीरमध्ये आंदोलनाचा उद्रेक झाला असताना प. नेहरूंनी शास्त्रींना तेथे तातडीने पाठविले होते. श्रीनगर येथे गोठवणारी थंडी असल्याने प. नेहरूंनी स्वत:चा ओव्हरकोट शास्त्रींना दिला. जणू पुढील जबाबदारी शास्त्रींच्या खांद्यावर येणार याचेच ते सूचक होते ! पंतप्रधान म्हणून शास्त्रींनी आपला स्वतंत्र, तेजस्वी ठसा उमटवला. १९६२च्या चीन युद्धातील मानहानिकारक पराभवाच्या पार्श्‍वभूमीवर,१९६५च्या भारत-पाक युद्धात शास्त्रींनी देशास खंबीर व यशस्वी नेतृत्व दिले आणि देशाची प्रतिमा झळाळून निघाली. ‘जय जवान, जय किसान’च्या मंत्राने सारा देश भारावून गेला. ताश्कंद शिखर परिषदेत मुत्सद्देगिरीने पावले टाकून त्यांनी अखेर अयुब खानना झुकविले. शास्त्रींनी यशाचे अत्युच्च शिखर गाठले, पण आकस्मिक त्यांचे अवतारकार्य संपुष्टात आले !

…तीच ही कहाणी तीस वर्षांनंतर दप्तरमुक्त झालेल्या अनेक सत्य घटनांच्या साक्षीने लिहिलेली प्रभावी, प्रेरक नि पारदर्शक व आजही भारावून टाकणारी जीवनगाथा!


Biography of Shri.Lal Bahadur Shastri


320.00 Add to cart

फील्ड मार्शल सॅम माणेकशा

भारतीय लष्कराचा मानबिंदू


मेजर जनरल (निवृत्त) शुभी सूद यांचा जन्म सिमला इथे झाला. त्यांचं बालपणही तिथेच गेलं. शालेय शिक्षणानंतर त्यांनी पुण्याजवळच्या खडकवासला इथल्या नॅशनल डिफेन्स अॅलकॅडमीमध्ये (एन.डी.ए.) प्रवेश घेतला. हा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर त्यांना ८ गुरखा रायफलच्या ४ बटालियनमध्ये कमिशन मिळालं. या बटालियनमध्ये असताना त्यांनी जम्मू-काश्मीरमधील राजौरी भागातल्या ‘झांगर’ भागात केलेल्या कारवाईत भाग घेतला. मणिपूर आणि नागालँडमधल्या मोहिमेतही ते सहभागी झाले होते. सप्टेंबर १९६८ मध्ये त्यांची लेफ्टनंट जनरल माणेकशा यांचे विशेष साहायक म्हणून नियुक्ती झाली. माणेकशा त्या वेळी लष्कराच्या पूर्व विभागाचे प्रमुख होते. लष्करप्रमुख म्हणून सूत्रं हाती घेतल्यानंतर माणेकशांनी सूद यांना विशेष मदतनीस म्हणून दिल्लीला नेलं. त्या वेळी कॅप्टन असलेल्या सूद यांना १९७१च्या युद्धाच्या काही दिवस आधी बढती मिळाली व ते मेजर झाले. लष्करप्रमुखांचे डेप्युटी मिलिटरी असिस्टंट (DMA) म्हणून त्यांची नियुक्ती झाली. यामुळे १९७१च्या युद्धाच्या वेळच्या महत्त्वाच्या घडामोडी त्यांना अगदी जवळून पाहता आल्या. चेंबर्ले येथील स्टाफ कॉलेज कोर्ससाठी ते १९७२मध्ये इंग्लंडमध्ये गेले. नंतर ८व्या गुरखा रायफलच्या बटालियनचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. ‘हायरकमांड’ आणि ‘नॅशनल डिफेन्स कॉलेज कोर्स’ हे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांची नियुक्ती जम्मू-काश्मीरमधील २६ इन्फन्ट्री डिव्हिजनचे कमांडर म्हणून करण्यात आली. १२ कोअरचे प्रमुख असताना ३१ मार्च १९९८ रोजी ते लष्करी सेवेतून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर जनरल सूद यांनी ‘ए.वी.आई.एस.टेंट ए कार' या कंपनीत मुख्याधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली. २००३ मध्ये ते या पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर ते लिखाणाकडे वळले. १९०४ मध्ये ल्हासा इथे असलेल्या कर्नल, सर एफ.ई. यंगहज्बंड यांच्या तिबेट मोहिमेविषयी सूद यांनी लिहिलेलं ‘यंगहज्बंड-ट्रबल्ड कॅपेन' हे पुस्तक डिसेंबर २००४ मध्ये प्रसिद्ध झालं.

अनुवाद :
पत्रकारितेच्या क्षेत्रांत सुमारे ३० वर्षांहून अधिक काळ भगवान दातार कार्यरत आहेत. त्यांनी लोकसत्ता, केसरी, लोकमत, तरुणभारत, पुढारी, प्रभात आदी दैनिकात विविध पदांवर काम केलं आहे. तरुणभारत, पुणेच्या संपादकपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली. विविध घटनांच्या वृत्तांकनासाठी पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, जम्मू-काश्मीर, कर्नाटक आदी राज्यांचा त्यांनी दौरा केला असून लोकसभेच्या कामकाजाचे वृत्तांकनही त्यांनी केलं आहे. त्यांनी रामजन्मभूमी प्रकरणाच्या वेळी अयोध्येत उपस्थित राहून वार्तांकन केलं होतं. त्यांनी संरक्षण मंत्रालयाचा वॉर करस्पाँडन्टचा अभ्यासक्रम महू, नासिराबाद, जोधपूर, दिल्ली आणि कोचीन येथून पूर्ण केला आहे. त्यांची ‘टु द लास्ट बुलेट’, ‘शेवट नसलेलं युद्ध’, ‘बी किंमग इंडियन’ ही अनुवादित पुस्तके गाजली. ‘खिल्ली’ हे राजकीय विडंबनपर लेखांचं स्वतंत्र विनोदी पुस्तक आणि आयएस अधिकाऱ्यांच्या कामाबद्दल ‘कलेक्टिव्ह एनर्जी’ या पुस्तकाचं संपादन केलं आहे. ‘सरदार वल्लभभाई पटेल' व ‘फील्ड मार्शल सॅम माणेकशा' ही त्यांनी अनुवादित केलेली पुस्तकं वाचकप्रिय आहेत.


चाळीस वर्षांच्या कारकीर्दीत पाच युध्दांना सामोरं जाणाऱ्या आणि संपूर्ण कारकीर्दीत वादाचा किंवा अपकीर्तीचा डाग लागू न देणाऱ्या भारताच्या या आठव्या लष्करप्रमुखाचं हे प्रेरणादायी व रोमहर्षक चरित्र!
भारताचे माजी लष्करप्रमुख सॅम माणेकशा यांच्या व्यक्तिमत्त्वाचं आणि विशेषत: त्यांच्यामधील नेतृत्वगुणांच्या सर्व पैलूंचं दर्शन लेखक मेजर जनरल शुभी सूद यांनी या पुस्तकातून घडवलं आहे. शुभी सूद हे माणेकशा यांचे निकटवर्ती सहकारी. त्यांच्या सोबत काम करताना आलेल्या अनुभवांमधून माणेकशांचे व्यक्तिमत्त्व व कार्य-कर्तृत्व याचं चित्रण त्यांनी या पुस्तकात संशोधनपूर्वक व अतिशय समतोलपणे केलं आहे.
युध्दरणनितीची उत्तम जाण, अभ्यास, व्युहरचनेतील मुत्सद्देगिरी, सेनानीला लागणारा निर्भीडपणा, मूल्यांवरील निष्ठा, उच्चपदी असताना देखील त्यांच्याकडे असणारी विनोदबुध्दी आणि कोणत्याही वयोगटातल्या माणसाशी त्यांचं सहृदय वर्तन अशा माणेकशांच्या सर्व पैलूंवर लेखकाने पुस्तकात प्रकाश टाकला आहे.


275.00 Add to cart

यांनी घडवलं सहस्रक (१००१ – २०००)

गेल्या १००० वर्षांतील १००० प्रभावशाली व्यक्‍तींचा वेध…


संपादन :

गंभीर वृत्तीचे अनुवादक, संपादक व लेखक म्हणून मिलिंद चंपानेरकर विख्यात आहेत. त्यांनी आजवर ‘लोककवी साहीर लुधियानवी' (मूळ लेखक : अक्षय मनवानी), ‘त्या दहा वर्षांतील गुरू दत्त' (मूळ लेखक - सत्य सरन), ‘सुन मेरे बंधू रे - एस.डी. बर्मन यांचं जीवनसंगीत' (मूळ लेखक - सत्या सरन), ‘वहिदा रेहमान... हितगुजातून उलगडलेली', (मूळ लेखक- नसरीन मुन्नी कबीर), ‘ए.आर. रहमान : संगीतातील वादळ' (मूळ लेखक - कामिनी मथाई), ‘भारतातील डाव्या चळवळीचा मागोवा’ (मूळ लेखक - प्रफुल्ल बिडवई), ‘गुड मुस्लीम बॅड मुस्लीम' (मूळ लेखक - महमूद ममदानी, सह-अनुवादक - पुष्पा भावे) यांसारख्या महत्त्वाच्या पुस्तकांचा अनुवाद केला असून ‘यांनी घडवलं सहस्रक' आणि ‘असा घडला भारत' या महद्ग्रंथांसाठी सह-संपादन, संशोधन व लेखन केलं आहे. त्यांनी दैनिक ‘इंडियन एक्स्प्रेस'साठी १९९१-२००० या कालावधीमध्ये पत्रकारिता केली आहे. गेली तीन दशकं त्यांनी विविध मराठी दैनिक आणि नियतकालिकांमधून समाजाभिमुख साहित्य, नाट्य व चित्रपटविषयक समीक्षापर लेखन आणि त्याचप्रमाणे, सामाजिक-राजकीय विषयांवर विश्लेषणात्मक लेखन केलं आहे. त्यांना ‘लोकशाहीवादी अम्मीस...दीर्घपत्र' या अनुवादित पुस्तकासाठी सर्वोत्कृष्ट अनुवादाचा २०१६ सालचा ‘साहित्य अकादमी' पुरस्कार प्राप्त झाला आहे.


या ग्रंथामुळे मराठी समाजाच्या बुद्धिमान नवपिढ्यांना गेल्या हजार वर्षांतील जगभराच्या तत्त्वज्ञांची, शास्त्रज्ञांची, समाजशास्त्रज्ञांची, समाजसुधारकांची, राज्यकर्त्यांची, फिरस्त्यांची ओळख होईल. आपलाही ठसा आपल्या आजच्या समाजजीवनावर उठवण्याची उमेद येईल. अर्थात आताच्या ज्ञान-स्फोटाच्या दिवसात आपला ठसा उमटवणं हे किती कर्मकठीण आहे, हे ध्यानात घेऊनही असं म्हणावंसं वाटतं की जुन्या समस्यांची पुनर्मांडणी करत नवीन उत्तरं शोधण्याच्या प्रयत्नात ‘यांनी घडवलं सहस्रक, १००१-२०००’ यासारख्या बृहद्-कोशाचं महत्त्व प्रत्येकाला वाटेल.


555.00 Add to cart

अणुविश्वातील ध्रुव : डॉ. अनिल काकोडकर



अणुविश्वात डॉ. अनिल काकोडकर यांचं नाव मोठ्या आदराने घेतलं जातं, ते त्यांनी केलेल्या भरीव कार्यामुळे. `ध्रुव’सारखी अणुभट्टी कार्यान्वित करणं असो, किंवा पोखरण अणुचाचण्या असोत – डॉ. काकोडकरांनी अशा कितीतरी महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये बहुमूल्य कामगिरी बजावली. एवढंच नव्हे, तर भारत-अमेरिका यांच्यातल्या अणुकराराच्या मसुद्यात देशहिताच्या दृष्टीने आवश्यक ते बदल करून घेण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.

अणुऊर्जेबरोबरच तंत्रज्ञान-संशोधन या विषयावरही त्यांनी सखोल चिंतन केलं. त्यातूनच भारताला तंत्रज्ञान व संशोधन क्षेत्रात भरारी घ्यायची असेल, तर शिक्षण-व्यवस्थेत आमूलाग्र बदल करणं आवश्यक आहे हे त्यांनी ओळखलं. त्यानुसार त्यांच्या संकल्पनेतून `सिलेज’, `शिक्षण पंढरी’ यांसारखे अनेक उपक्रम राबवले गेले. तसंच एपीजे अब्दुल कलाम यांच्या ‘व्हिजन २०२०’नंतर भारताच्या भविष्यकाळातल्या गरजा व विकास विशद करणारं `व्हिजन २०३५’ डॉक्यूमेंटही त्यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने तयार केलं. सध्या त्यानुसार अनेक उपक्रम व प्रकल्प राबवले जात आहेत.
अणुविश्वाबरोबरच तंत्रज्ञान-संशोधन आणि शिक्षण या क्षेत्रांत `ध्रुव’पद प्राप्त करणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीची व कार्याची ओळख करून देणारं हे चरित्र!


140.00 Add to cart

नोबेल कथा

नोबेल’ची पार्श्वभूमी आणि विविध क्षेत्रांत नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या व्यक्तींचा परिचय व त्यांच्या असामान्य कार्याचा वेध…


पेशाने शास्त्रज्ञ असलेल्या डॉ. प्रबोध चोबे यांचं पदवीपूर्व शिक्षण पवई येथील आय.आय.टी.मधून झालं. पुढे त्यांनी स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यू यॉर्क येथून ‘ऑरगॅनोमेटॅलिक रसायनशास्त्र’ या विषयात डॉक्टरेट मिळवली. गेल्या दोन दशकांहून जास्त काळ ते एका मोठ्या बहुराष्ट्रीय रासायनिक कंपनीच्या संशोधन केंद्राची धुरा वाहत आहेत. डॉ. चोबे यांचा आवडता छंद म्हणजे आपल्या लेखनातून व व्याख्यानांमधून कोणताही शास्त्रीय विषय मराठीमधून सहज समजेल अशा भाषेत, सोप्यात सोपा करून मांडणं. आजवर त्यांची पाच पुस्तकं व विविध मराठी नियतकालिकांमधून ६००च्या वर लेख प्रसिद्ध झालेले आहेत. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लावणं, विज्ञानाबद्दल- नवीन संशोधनाबद्दल त्यांचा उत्साह वाढवणं, देशासाठी भरीव संशोधन करायला त्यांना उद्युक्त करणं, प्राध्यापकांना संशोधन विषयात मार्गदर्शन करणं असे विविध उपक्रम डॉ. चोबे आवडीने करतात. डॉ. चोबे यांची व्याख्यानं त्यांच्या रसायनशास्त्रामधील आधुनिक विषयांवरील सखोल व्याख्यानांइतकीच लोकप्रिय आहेत व त्यासाठी ते भारतभर अविरतपणे फिरत असतात. डॉ. चोबे यांना आजवर अनेक सन्मान मिळाले आहेत. त्यांच्या पुस्तकाला राज्य पुरस्कारही मिळाला आहे. शालेय जीवनात त्यांना ‘प्रेसिडेंट्स स्काऊट’ हा सर्वोच्च सन्मान तत्कलीन राष्ट्रपती व्ही.व्ही. गिरी यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन येथे प्रदान करण्यात आला होता.

अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी केलेल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल निरनिराळया क्षेत्रांमधील असामान्य व्यक्तींना गेली ११२ वर्षे नोबेल पुरस्कार दिला जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर दिला जाणारा हा पुरस्कार अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो.
या पुस्तकामध्ये डॉ. चोबे यांनी सुरुवातीला आल्फ्रेड नोबेल यांचं व्यक्तिमत्त्व, त्यांचं संशोधन व संशोधनादरम्यान त्यांनी दिलेला लढा हे सर्व उद्बोधकपणे रेखाटलं आहे. या पुरस्काराची पार्श्वभूमी आणि त्यांचा रंजक इतिहासही त्यांनी दिला आहे. त्यानंतर वैद्यकशास्त्र, रसायनशास्त्र, पदार्थविज्ञान, अर्थशास्त्र आणि शांतता अशा विविध क्षेत्रांत नोबेल पारितोषिकप्राप्त निवडक ४७ दिग्गजांचा व्यक्तिपरिचय आणि त्यांच्या संशोधनाची व कार्याची तपशीलवार माहिती सहज सुंदर शैलीत पुस्तकातील प्रकरणांमधून वाचायला मिळते.
‘नोबेल लॉरेट्सचे असामान्य गुण कोणते?’ व ‘भारतामध्ये नोबेल पारितोषिक मिळवण्याच्यादृष्टीने पोषक वातावरण निर्माण करता येईल का?’ याबाबतचे विचारही डॉ. चोबे लेखात मांडतात.
‘नोबेल’ विजेत्यांच्या या कथा सर्वच वयोगटातील व्यक्तींचं कुतूहल शमवून त्यांच्या ज्ञानात अनमोल भरही घालतील…


295.00 Add to cart

पर्वतपुत्र शेर्पा

हिमालयातील खरे खुरे साहसवीर


उमेश झिरपे म्हणजे भारतात गिर्यारोहण क्षेत्रामध्ये लक्षणीय कामगिरी करणाऱ्या गिर्यारोहकांमधलं आघाडीचं नाव. एव्हरेस्ट मोहीम, अष्टहजारी शिखरांवरच्या मोहिमा, माउंट ल्होत्से, माउंट मकालू, माउंट चो ओयू, माउंट धौलागिरी, माउंट मनास्लू, माउंट कांचनजुंगा अशा अत्यंत आव्हानात्मक गिर्यारोहण मोहिमा त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली `गिरिप्रेमी'संस्थेच्या अनेक सदस्यांनी पूर्ण केल्या आहेत.माउंट प्रियदर्शनी, माउंट भ्रीग, माउंट मंदा, माउंट शिवलिंग, माउंट नून अशा अवघड शिखरांवरच्या मोहिमा त्यांनी स्वत: यशस्वीपणे केल्या आहेत. तर १९ हजार ६०० फूटांवरील माउंट थेलूवर त्यांनी एकट्याने चढाई केली आहे. निष्णात गिर्यारोहक असणारे उमेश झिरपे सुप्रसिद्ध लेखक व उत्तम वक्तेही आहेत. त्यांची या विषयावरची पुस्तकंही प्रसिद्ध आहेत. ‘गार्डियन गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग' या गिर्यारोहण प्रशिक्षण संस्थेची त्यांनी स्थापना केली. महाराष्ट्र शासनाने गिर्यारोहणातल्या त्यांच्या कामगिरीचा सन्मान म्हणून श्री शिवछत्रपती पुरस्काराने त्यांना गौरवलं आहे.

शिखर खुणावत असतं…

पण मधे असतात अनेक अडथळे… गोठवणारी थंडी, बर्फाखाली गेलेल्या वाटा, खोल-खोल दऱ्या आणि घळी, विरळ होत जाणारा ऑक्सिजन, खड्या चढणी आणि निसरडे उतार, लहरी निसर्ग…!

या सगळ्यावर मात करायला दोनच गोष्टी गिर्यारोहकाला साथ देत राहतात… एक म्हणजे उद्दिष्ट गाठायची जिद्द आणि दुसरी म्हणजे साहसी सोबती शेर्पा अर्थात गिर्यारोहणाची खरी ‘लाइफ लाइन’ !

बर्फातल्या वाटा मोकळ्या करणारे, घळींवर शिड्या टाकणारे, अडकलेल्या गिर्यारोहकांच्या ‘रेस्क्यू’ला धावणारे, त्यांना सकस आहार मिळावा म्हणून स्वत: रांधून खाऊ घालणारे, मणामणांचं ओझं उचलून नेणारे शेर्पा ! हिमालय त्यांना जसा कळतो, तसा इतर कुणालाही कळत नाही आणि म्हणूनच ते गिर्यारोहकांचे खरे पार्थ ठरतात. हिमालयाचे हे खरेखुरे साहसवीर गिर्यारोहकांच्या यशस्वी मोहिमांमध्येही आनंद घेतात. मुख्य म्हणजे आजकाल शेर्पा इतर व्यवसायांतही मुसंडी मारत असून त्यांतही त्यांची कामगिरी उत्तुंग होत आहे.

सुप्रसिद्ध आणि अनुभवी गिर्यारोहक उमेश झिरपे यांनी या पुस्तकात शेर्पांच्या या खडतर जीवनाचे विविध पैलू रंजकपणे उलगडले आहेत.

शेर्पा म्हणजे केवळ ‘सामान उचलणारे’ नव्हेत, हे सांगून हिमालयातल्या या खऱ्या खुऱ्या साहसवीरांची वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी अधोरेखित करणारं पुस्तक पर्वतपुत्र शेर्पा…!


Sherpa is the lifeline of mountaineering. Agile and fit Sherpas help mountaineers while trekking. They are versatile and are well capable to handle many tasks. They cook, carry your luggage, they clean the ice to make path for mountaineers, they help them in each respect. A veteran mountaineer himself and a disciplined manager of the groups of mountaineers, Umesh Jhirpe has written about Sherpa community, their way of life, culture, religious beliefs, food, and many other things.


225.00 Add to cart

शौर्य संच

कुशल लष्करी डावपेच आणि अपरिमित शौर्य यांची ओळख करुन देणारी दोन पुस्तकं…


मेजर जनरल (निवृत्त) शुभी सूद यांचा जन्म सिमला इथे झाला. त्यांचं बालपणही तिथेच गेलं. शालेय शिक्षणानंतर त्यांनी पुण्याजवळच्या खडकवासला इथल्या नॅशनल डिफेन्स अॅलकॅडमीमध्ये (एन.डी.ए.) प्रवेश घेतला. हा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर त्यांना ८ गुरखा रायफलच्या ४ बटालियनमध्ये कमिशन मिळालं. या बटालियनमध्ये असताना त्यांनी जम्मू-काश्मीरमधील राजौरी भागातल्या ‘झांगर’ भागात केलेल्या कारवाईत भाग घेतला. मणिपूर आणि नागालँडमधल्या मोहिमेतही ते सहभागी झाले होते. सप्टेंबर १९६८ मध्ये त्यांची लेफ्टनंट जनरल माणेकशा यांचे विशेष साहायक म्हणून नियुक्ती झाली. माणेकशा त्या वेळी लष्कराच्या पूर्व विभागाचे प्रमुख होते. लष्करप्रमुख म्हणून सूत्रं हाती घेतल्यानंतर माणेकशांनी सूद यांना विशेष मदतनीस म्हणून दिल्लीला नेलं. त्या वेळी कॅप्टन असलेल्या सूद यांना १९७१च्या युद्धाच्या काही दिवस आधी बढती मिळाली व ते मेजर झाले. लष्करप्रमुखांचे डेप्युटी मिलिटरी असिस्टंट (DMA) म्हणून त्यांची नियुक्ती झाली. यामुळे १९७१च्या युद्धाच्या वेळच्या महत्त्वाच्या घडामोडी त्यांना अगदी जवळून पाहता आल्या. चेंबर्ले येथील स्टाफ कॉलेज कोर्ससाठी ते १९७२मध्ये इंग्लंडमध्ये गेले. नंतर ८व्या गुरखा रायफलच्या बटालियनचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. ‘हायरकमांड’ आणि ‘नॅशनल डिफेन्स कॉलेज कोर्स’ हे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांची नियुक्ती जम्मू-काश्मीरमधील २६ इन्फन्ट्री डिव्हिजनचे कमांडर म्हणून करण्यात आली. १२ कोअरचे प्रमुख असताना ३१ मार्च १९९८ रोजी ते लष्करी सेवेतून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर जनरल सूद यांनी ‘ए.वी.आई.एस.टेंट ए कार' या कंपनीत मुख्याधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली. २००३ मध्ये ते या पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर ते लिखाणाकडे वळले. १९०४ मध्ये ल्हासा इथे असलेल्या कर्नल, सर एफ.ई. यंगहज्बंड यांच्या तिबेट मोहिमेविषयी सूद यांनी लिहिलेलं ‘यंगहज्बंड-ट्रबल्ड कॅपेन' हे पुस्तक डिसेंबर २००४ मध्ये प्रसिद्ध झालं.

अनुवाद :
पत्रकारितेच्या क्षेत्रांत सुमारे ३० वर्षांहून अधिक काळ भगवान दातार कार्यरत आहेत. त्यांनी लोकसत्ता, केसरी, लोकमत, तरुणभारत, पुढारी, प्रभात आदी दैनिकात विविध पदांवर काम केलं आहे. तरुणभारत, पुणेच्या संपादकपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली. विविध घटनांच्या वृत्तांकनासाठी पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, जम्मू-काश्मीर, कर्नाटक आदी राज्यांचा त्यांनी दौरा केला असून लोकसभेच्या कामकाजाचे वृत्तांकनही त्यांनी केलं आहे. त्यांनी रामजन्मभूमी प्रकरणाच्या वेळी अयोध्येत उपस्थित राहून वार्तांकन केलं होतं. त्यांनी संरक्षण मंत्रालयाचा वॉर करस्पाँडन्टचा अभ्यासक्रम महू, नासिराबाद, जोधपूर, दिल्ली आणि कोचीन येथून पूर्ण केला आहे. त्यांची ‘टु द लास्ट बुलेट’, ‘शेवट नसलेलं युद्ध’, ‘बी किंमग इंडियन’ ही अनुवादित पुस्तके गाजली. ‘खिल्ली’ हे राजकीय विडंबनपर लेखांचं स्वतंत्र विनोदी पुस्तक आणि आयएस अधिकाऱ्यांच्या कामाबद्दल ‘कलेक्टिव्ह एनर्जी’ या पुस्तकाचं संपादन केलं आहे. ‘सरदार वल्लभभाई पटेल' व ‘फील्ड मार्शल सॅम माणेकशा' ही त्यांनी अनुवादित केलेली पुस्तकं वाचकप्रिय आहेत.


रचना बिश्त-रावत, मेजर जनरल शुभी सूद
भारताला आपलं स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी आजवर १९४७, १९६२, १९६५, १९७१, १९९९ अशी अनेक युद्धं लढावी लागली.
या लढायांत असंख्य लष्करी अधिकारी, जवानांनी आपलं असीम शौर्य सिद्ध केलं. देशासाठी बजावलेल्या या कामगिरीसाठी त्यांतील अनेकांना आजवर विविध सन्मानांनी गौरवण्यात आलं आहे.
अशा काही निवडक सैनिकांच्या वीरतेच्या कहाण्यांची ही २ पुस्तकं…
युद्धभूमीवरील डावपेच व प्रत्यक्ष लढायांच्या तपशिलांसह !


400.00 Add to cart

Mountain-Men SHERPA

True Daredevils of Himalaya



Mountains are the source of inspiration for those who brave the bone chilling temperature, endless snowfields, bottomless crevasses, thin layer of oxygen, steep rock walls and unpredictable weather, and make their way to the top of the world.
This journey to the top of the world is next to impossible without the support of Sherpas, sons and daughters of the great Himalayas.. true lifelines of high altitude mountaineering.
Sherpas pave the road in snowfields, bridge the gap on crevasses with ladders, cook the healthiest meals for mountaineers in possibly the harshest weather on the higher altitudes.
They are the rescuers, they are the guides, they are friends, they are the Sherpas!
They know Himalaya better than anyone else.
Nowadays, Sherpas have ventured into several other fields and are triumphing it like never before. Umesh Zirpe, the renowned mountaineer, who has spent significant time with Sherpas, has shed a light on the lives of such Sherpas who have carved their ways from extreme destitute to reaching remarkable heights of glories. Experience the interesting world of Mountain-Men Sherpa.


250.00 Add to cart

आमचं बालपण



अनुवाद : 
"पत्रकारितेचा अभ्यासक्रम करताना, त्यात 'अनुवाद' हा विषय शिकताना आपल्याला अनुवाद बऱ्यापैकी जमतो असं उल्का राऊत यांना वाटलं. त्यानंतर त्यांनी काही कथा अनुवाद करून पाहिल्या. 'रोहन प्रकाशन'ने प्रकाशित केलेलं 'ऋतुशैशव' (आमचं बालपण) हे त्यांचं पहिलं अनुवादित पुस्तक होय. त्यानंतर राऊत यांनी अनेक महत्त्वाच्या पुस्तकांचे अनुवाद केले आणि ते गाजलेदेखील. त्यांना लहानपणापासून वाचनाची आवड असून त्या शास्त्रीय संगीताच्या मैफलींना आवर्जून जातात. तसंच चित्रप्रदर्शनंदेखील पाहतात. कविता करणं हा त्यांचा छंद आहे. आवडलेल्या इंग्रजी पुस्तकांचा मराठी वाचकांसाठी अनुवाद करणं हा त्यांच्या आनंदाचा भाग आहे.


बालपणीच्या नीलरंगी विश्वामध्ये पुन्हा एकदा रमून गेलेल्या आर.के.लक्ष्मण यांना भुताच्या गोष्टी सांगून त्यांची भंबेरी उडवणारा माळीबुवा आठवतोय. तर एम.एस.सुब्बलक्ष्मींच्या आठवणींना चिंच, मिरच्या आणि मीठ कुटून त्याच्या छोटयाछोटया गोळ्यांना काडया खुपसून बनवलेल्या कँडीची आंबटगोड चव आहे. या पुस्तकामध्ये सहा कलावंत आपल्या शैशवातील आठवणींना उजाळा देत आहेत. मोठेपणी ज्या कलाक्षेत्रात विपुल यश कमावलं त्या कलेविषयी गोडी कशी निर्माण झाली याचं हृदगत ते तुम्हाला सांगत आहेत. केलुचरण महापात्रांनी नृत्याचे धडे घ्यायला सुरुवात केली तीच मुळी मुलीच्या वेषामध्ये, तर हुसेननी आपली चित्रकारी प्रथम आजमावली ती सिनेमाच्या पोस्टरवर! तेंडुलकरांचे शिक्षकच वर्गात आपण पाहिलेल्या चित्रपटांच्या गोष्टी रंगवून सांगत, अमजद अली खान सरोदवर चित्रपटगीतं वाजवून आपल्या वर्गमित्रांना खूष करत. या विख्यात कलाकारांच्या बालपणीची वर्णनं वाचून तुमच्या देखील मनात विचार आल्याशिवाय राहणार नाही, ‘‘अरे, मीही ह्या सर्वांपेक्षा फारसा वेगळा नाही. कदाचित मलादेखील जमेल की…’’


125.00 Add to cart

थोरा-मोठ्यांचं बालपण संच

३ पुस्तकांचा संच


डॉ. गणेश राऊत यांनी इतिहास या विषयात पीएचडी प्राप्त केली आहे. त्यांचा अध्यापन क्षेत्रात १७ वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या ते एच.व्ही.देसाई महाविद्यालय, पुणे येथे इतिहास विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. ते ‘बालभारती’चे सदस्य असून विविध इयत्तांची पाठ्यपुस्तकं आणि अभ्यासक्रम-आखणी यांमध्ये त्यांचा सहभाग आहे. राऊत हे मुक्त पत्रकार म्हणूनही कार्यरत असून त्यांची पत्रकारितेबद्दलची दोन पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. तसंच, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणेच्या पत्रकारितेच्या पदव्युत्तर कोर्समध्ये मार्गदर्शक म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांनी इतिहासविषयक ९ संदर्भग्रंथांचं लेखन आणि १६ पुस्तकांचं संपादन केलं आहे. त्यांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे प्रकाशित ‘दत्तक गावांचा इतिहास’ या पुस्तकाच्या दोन खंडांचं संकलन आणि संपादन केल आहे. महाराष्ट्रात त्यांची इतिहास विषयावर १५००हून अधिक व्याख्यानं झाली आहेत. तसंच, मोडी लिपी, हेरिटेज वॉक, किल्ले दर्शन अशा कार्यक्रमांच्या आखणीमध्ये त्यांचा सहभाग असतो.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबादमधून सृजन पाल सिंग यांनी शिक्षण घेतलं असून त्यांना 'चतुरस्र विद्यार्थी' म्हणून सुवर्णपदक मिळालं आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या भागांमध्ये पारदर्शक व्यवस्था उभारण्याच्या कामात ते 'बॉस्टन कन्सल्टिंग ग्रुप'सोबत काम करत आहेत. स्वित्झर्लंडमधील सेंट गॅलन सिम्पोसियम यांच्या 'ग्लोबल लीडर ऑफ टुमॉरो' या किताबासाठी त्यांचं नामांकन करण्यात आलं होतं . सृजन भारतातल्या ग्रामीण भागांत जाऊन तिथे कायमस्वरूपी विकासात्मक व्यवस्था तयार करता यावी, यासाठी विविध संस्थांसोबत काम करतात . महत्त्वाच्या नियतकालिकांमधून त्यांचे लेख प्रकाशित झाले असून ते सध्या गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या प्रकल्पात काम करत आहेत.
"पत्रकारितेचा अभ्यासक्रम करताना, त्यात 'अनुवाद' हा विषय शिकताना आपल्याला अनुवाद बऱ्यापैकी जमतो असं उल्का राऊत यांना वाटलं. त्यानंतर त्यांनी काही कथा अनुवाद करून पाहिल्या. 'रोहन प्रकाशन'ने प्रकाशित केलेलं 'ऋतुशैशव' (आमचं बालपण) हे त्यांचं पहिलं अनुवादित पुस्तक होय. त्यानंतर राऊत यांनी अनेक महत्त्वाच्या पुस्तकांचे अनुवाद केले आणि ते गाजलेदेखील. त्यांना लहानपणापासून वाचनाची आवड असून त्या शास्त्रीय संगीताच्या मैफलींना आवर्जून जातात. तसंच चित्रप्रदर्शनंदेखील पाहतात. कविता करणं हा त्यांचा छंद आहे. आवडलेल्या इंग्रजी पुस्तकांचा मराठी वाचकांसाठी अनुवाद करणं हा त्यांच्या आनंदाचा भाग आहे.

आपण भविष्यात कोण होऊ, काय करू

याची बीजं बरेचदा आपल्या बालपणातल्या,

अत्यंत संवेदनशील मनावर रुजलेली असतात.

मोठ्या व्यक्तीच्या बालपणाची रंजक पद्धतीने

ओळख करून देऊन, प्रेरणा देणारा…

३ पुस्तकांचा संच

कलामांचं बालपण

अभ्यासावरचं कलामांचं प्रेम, शिक्षकांविषयी असलेला आदर,

आई-वडलांविषयी असलेला जिव्हाळा, जिज्ञासूवृत्ती,

कष्टाळूवृत्ती, ध्यास आणि आध्यात्मिक प्रवृत्ती…

एका तपस्वी संशोधकाच्या अनुभवांचं विश्व

बालपणीच्या किश्श्यांमधून उलगडून दाखवणारं पुस्तक…

थोरांचं बालपण

या पुस्तकात राजकारण, विज्ञान, पर्यावरण, कला, साहित्य,

समाजसेवा, अध्यात्म व क्रीडा या विविध क्षेत्रांतील;

४० व्यक्तिमत्त्वांचं बालपण त्यांच्या लहानपणचे प्रभाव

टाकणारे काही प्रसंग, काही आठवणी देत चितारलं आहे.

आमचं बालपण

या पुस्तकामध्ये सहा कलावंत आपल्या शैशवातील

आठवणींना उजाळा देत आहेत. मोठेपणी ज्या कलाक्षेत्रात

विपुल यश कमावलं त्या कलेविषयी गोडी कशी निर्माण

झाली याचं हृदगत ते तुम्हाला सांगत आहेत.


325.00 Add to cart

मेट्रोमॅन श्रीधरन

कोकण रेल्वे, दिल्ली मेट्रो अशा महाकाय प्रकल्पांचे शिल्पकार ई.श्रीधरन यांचा कर्तृत्वपट


लेखक व पत्रकार असलेल्या अशोकन यांनी वीसहून अधिक वर्षं या क्षेत्रांत काम केलं आहे. सध्या ते 'देशाभिमानी' या वृत्तपत्रामध्ये काम करतात. चित्रकलेचा छंद ते गांभीर्याने जोपासतात.

अनुवाद :
तरुण कादंबरीकार, अनुवादक म्हणून अवधूत डोंगरे प्रसिद्ध आहेत. त्यांच्या आजवर चार कादंबऱ्या प्रकाशित झालेल्या असून कादंबरीलेखनासोबतच ते एकरेघ (ekregh.blogspot.in) हा ब्लॉगही लिहितात. पत्रकारी स्वरूपाचं लेखनही त्यांनी काही वर्तपानपत्रांतून व नियतकालिकांमधून केलं आहे. व्यवसाय म्हणून ते विविध प्रकारच्या अनुवादाची कामं करतात. त्यांच्या ‘स्वतःला फालतू समजण्याची गोष्ट’ या त्यांच्या कादंबरीला २०१४ सालचा ‘साहित्य अकादमी युवा पुरस्कार’ मिळाला आहे.


भारताच्या नागरी वाहतूकसेवेचा चेहरामोहरा पालटून टाकणार्‍या एका निष्ठावान अभियंत्याची…ई.श्रीधरन यांची ही कर्तृत्वगाथा !
अनेक आव्हानात्मक प्रकल्पांतील त्यांच्या कार्यशैलीमुळे श्रीधरन यांचं नाव पारदर्शकता, काटेकोरपणा आणि कार्यक्षमता या गुणांशी समानार्थी बनलं.
अशक्यप्राय वाटणाऱ्या प्रकल्पांना श्रीधरन यांचा `मिडास टच’ लाभला आणि `कोकण रेल्वे’, `दिल्ली मेट्रो’ यांसारखे अवाढव्य प्रकल्प जलदगतीने साकारले गेले. कोची मेट्रो प्रकल्पाची धुराही त्यांच्याकडे आली. भारतीय रेल्वे सेवा, `कलकत्ता मेट्रो प्रकल्प’ यांतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
असे अवघड प्रकल्प कार्यक्षमतेने साकारताना त्यांचा दिवसातील काम करण्याचा अवधी असायचा फक्त आठ तास…त्यांच्या कार्यशैलीचं हे आणखी एक वैशिष्ट्य!
अत्याधुनिक तंत्रज्ञानाला इच्छाशक्ती आणि पराकोटीची कर्तव्यनिष्ठा यांची जोड मिळाली तर `मिरॅकल्स’ घडू शकतात, असा विश्वास देणारा हा प्रेरक कर्तृत्वपट मेट्रोमॅन श्रीधरन…


250.00 Add to cart

KARENAMA

 



ADVANCESS IN SCIENCE AND MEDICINE HAVE FACILITATED SIGNIFICANT IMPROVEMENT IN HEALTHCARE. TODAY PEOPLE LIVE LONGER AND HEALTHIER. MEDICINES HAVE BECOME AN INTEGRAL AND VITAL PART OF OUR LIVES. YET. FEW OF US WONDER WHAT GOES INTO THEIR DEVELOPMENT AND MANUFACTURING. THE YOUNG LAD WHO HAD ONCE PRAYED TO THE LORD THAT PEOPLE USE MEDICINES FROM HIS FAMILY SHOP AND RECOVER, IS TODAY THE CHAIRMAN & MANAGING DIRECTOR OF INDOCO REMEDIES LTD., A FIVE HUNDRED CRORE PHARMACEUTICAL COMPANY. KARENAMA’ IS THE STORY OF SURESH KARE’S STRUGGLE IN TRANSFORMING INDOCO FROM A SICK PHARMA COMPANY INTO A UNIVERSALLY KNOWN AND PROFESSIONALLY DRIVEN ORGANIZATION. THE BOOK COMPRISES OF SHORT STORIES AND INCIDENTS IN SURESH’S LIFE THAT MOULDED HIS PERSONALITY AND MADE HIM THE VISIONARY THAT HE IS TODAY. IT TALKS OF HOW A BOY FROMA SMALL TOWN IN GOA, ARMED WITH HIS FATHER’S PRINCIPLES AND MOTHER’S VALUES, MADE IT BIG IN MUMBAI. *KARENAMA’ TELLS THE STORY OF ONE MAN’S SUCCESS AND THE SUCCESS OF HIS ENTERPRISE THAT WOULD INSPIRE MANY AN ENTREPRENEUR, PROFESSIONAL OR EVEN THE AVID READER.


295.00 Add to cart

KARENAMA (Hard Bound)

 



ADVANCESS IN SCIENCE AND MEDICINE HAVE FACILITATED SIGNIFICANT IMPROVEMENT IN HEALTHCARE. TODAY PEOPLE LIVE LONGER AND HEALTHIER. MEDICINES HAVE BECOME AN INTEGRAL AND VITAL PART OF OUR LIVES. YET. FEW OF US WONDER WHAT GOES INTO THEIR DEVELOPMENT AND MANUFACTURING. THE YOUNG LAD WHO HAD ONCE PRAYED TO THE LORD THAT PEOPLE USE MEDICINES FROM HIS FAMILY SHOP AND RECOVER, IS TODAY THE CHAIRMAN & MANAGING DIRECTOR OF INDOCO REMEDIES LTD., A FIVE HUNDRED CRORE PHARMACEUTICAL COMPANY. KARENAMA’ IS THE STORY OF SURESH KARE’S STRUGGLE IN TRANSFORMING INDOCO FROM A SICK PHARMA COMPANY INTO A UNIVERSALLY KNOWN AND PROFESSIONALLY DRIVEN ORGANIZATION. THE BOOK COMPRISES OF SHORT STORIES AND INCIDENTS IN SURESH’S LIFE THAT MOULDED HIS PERSONALITY AND MADE HIM THE VISIONARY THAT HE IS TODAY. IT TALKS OF HOW A BOY FROMA SMALL TOWN IN GOA, ARMED WITH HIS FATHER’S PRINCIPLES AND MOTHER’S VALUES, MADE IT BIG IN MUMBAI. *KARENAMA’ TELLS THE STORY OF ONE MAN’S SUCCESS AND THE SUCCESS OF HIS ENTERPRISE THAT WOULD INSPIRE MANY AN ENTREPRENEUR, PROFESSIONAL OR EVEN THE AVID READER.


295.00 Add to cart
1 2 3