रामचंद्र गुहा

भारतातले ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ, संशोधक आणि स्तंभलेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी येल, स्टॅनफोर्ड आणि ऑस्लो या विद्यापीठांमधून तसंच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स इथे प्राध्यापक म्हणून काम केलं आहे. पर्यावरणाचा इतिहास, भारतीय क्रिकेटचा सामाजिक इतिहास, भारतीय लोकशाही यांसारख्या विविध विषयांवर त्यांनी मूलभूत लेखन केलं आहे. त्यांच्या पुस्तकांचे आणि निबंधांचे विविध भाषांमध्ये अनुवाद झाले असून ‘न्यू यॉर्क टाइम्स’ने सर्वोत्तम नॉन फिक्शन भारतीय लेखक म्हणून त्यांना नावाजलं होतं. तसंच ‘टाइम’ मासिकाने त्यांची भारतीय लोकशाहीचा सर्वांत नामवंत इतिहासकार असं म्हणून नोंद घेतली होती. आजवर त्यांना अनेक राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय पारितोषिकांनी सन्मानित केलं असून २००९ मध्ये त्यांना पद्मभूषण सन्मानाने गौरवण्यात आलं.

लेखकाची पुस्तकं

आधुनिक भारताचे विचारस्तंभ


भारतातले ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ, संशोधक आणि स्तंभलेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी येल, स्टॅनफोर्ड आणि ऑस्लो या विद्यापीठांमधून तसंच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स इथे प्राध्यापक म्हणून काम केलं आहे. पर्यावरणाचा इतिहास, भारतीय क्रिकेटचा सामाजिक इतिहास, भारतीय लोकशाही यांसारख्या विविध विषयांवर त्यांनी मूलभूत लेखन केलं आहे. त्यांच्या पुस्तकांचे आणि निबंधांचे विविध भाषांमध्ये अनुवाद झाले असून ‘न्यू यॉर्क टाइम्स’ने सर्वोत्तम नॉन फिक्शन भारतीय लेखक म्हणून त्यांना नावाजलं होतं. तसंच ‘टाइम’ मासिकाने त्यांची भारतीय लोकशाहीचा सर्वांत नामवंत इतिहासकार असं म्हणून नोंद घेतली होती. आजवर त्यांना अनेक राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय पारितोषिकांनी सन्मानित केलं असून २००९ मध्ये त्यांना पद्मभूषण सन्मानाने गौरवण्यात आलं.

अनुवाद :

१९६५ सालापासून सुमारे २५ वर्षं लाल निशाण पक्ष व कामगार चळवळीत शारदा साठे यांचा सक्रिय सहभाग आहे. १९७५ सालापासून त्या स्त्री मुक्ती चळवळीत कार्यरत आहेत. स्त्री मुक्ती संघटनेच्या त्या संस्थापक सदस्य असून संघटनेच्या ‘प्रेरक ललकारी’ या मुखपत्राच्या त्या मुख्य संपादक आहेत. त्यांनी स्वतंत्र लेखनाबरोबरच विविध विषयांवरील पुस्तकांचा मराठीत अनुवाद केला आहे.


रामचंद्र गुहा यांचं नवं पुस्तक
‘भारत’ ही संकल्पना उलगडणारा ग्रंथ
MAKERS OF MODERN INDIA आता मराठीत
राममोहन रॉय, सय्यद अहमद खान, जोतीराव फुले, ताराबाई शिंदे, बाळ गंगाधर टिळक, रवींद्रनाथ ठाकूर, गोपाळ कृष्ण गोखले, महम्मद अली जीना, भीमराव आंबेडकर, ई.व्ही. रामस्वामी, राममनोहर लोहिया, एम.एस. गोळवलकर, मोहनदास गांधी, कमलादेवी चट्टोपाध्याय, जवाहरलाल नेहरू, जयप्रकाश नारायण, चक्रवर्ती राजगोपालाचारी, व्हेरियर एल्विन, हमीद दलवाई या १९ विचारवंतांच्या व्यक्तिरेखा व वैचारिक भूमिका यांचा एकाच ग्रंथातून परिचय करून देणारं व त्यातून भारताची वैचारिक जडणघडण स्पष्ट करणारं पुस्तक.


800.00 Add to cart