₹300.00
द एलओसी
नियंत्रण रेषेच्या दोन्ही बाजूंनी भारतीय व पाकिस्तानी सैन्यासोबत केलेल्या सहप्रवासाची कहाणी
डॉ. हॅपीमॉन जेकब यांनी भारतीय परराष्ट्र धोरण, संरक्षण, काश्मीर समस्या आणि भारत पाकिस्तान संबंध या विषयांवर अनेक पुस्तकं आणि अभ्यासपूर्ण लेख लिहिलेले आहेत. ते दिल्लीच्या 'स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये 'डिप्लोमसी अँड डिसआर्मामेंट' या विषयाचे सहयोगी प्राध्यापक म्हणून २००८ पासून कार्यरत आहेत. 'द हिंदू 'या दैनिकाचे स्तंभलेखक म्हणून आणि त्याचप्रमाणे, 'ग्रटर काश्मीर' या वृत्तपत्रांसाठी त्यांनी अनेक विद्वत्तार्ण लेख लिहिले आहेत. त्याचप्रमाणे, 'द वायर' या वृत्त संकेतस्थळावर ते सातत्याने राष्ट्रीय विषयावरील कार्यक्रमांचं संयोजन करत असतात. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये शांततापूर्ण संबंध राहावेत, या उद्देशाने 'ट्रॅक-२' संवादांच्या माध्यमांतून ते गेली अनेक वर्षं प्रयत्नशील आहेत. 'चाओ फ्रया इंडिया पाकिस्तान डायलॉग', 'पगवाश इंडिया - पाकिस्तान डायलॉग' आणि 'ओटावा डायलॉग ऑन इंडिया - पाकिस्तान न्युक्लीअर रिलेशन्स' या तीन परिषदांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. आंतरराष्ट्रीय स्तरावरावर ख्यातकीर्त असलेल्या जेकब यांनी महत्त्वाच्या विषयांवर विद्वत्तापूर्ण पुस्तकं लिहिलेली आहे.
अनुवाद:
गंभीर वृत्तीचे अनुवादक, संपादक व लेखक म्हणून मिलिंद चंपानेरकर विख्यात आहेत. त्यांनी आजवर
‘लोककवी साहीर लुधियानवी' (मूळ लेखक : अक्षय मनवानी), ‘त्या दहा वर्षांतील गुरू दत्त' (मूळ लेखक - सत्य सरन), ‘सुन मेरे बंधू रे - एस.डी. बर्मन यांचं जीवनसंगीत' (मूळ लेखक - सत्या सरन), ‘वहिदा रेहमान... हितगुजातून उलगडलेली', (मूळ लेखक- नसरीन मुन्नी कबीर), ‘ए.आर. रहमान : संगीतातील वादळ' (मूळ लेखक - कामिनी मथाई), ‘भारतातील डाव्या चळवळीचा मागोवा’ (मूळ लेखक - प्रफुल्ल बिडवई), ‘गुड मुस्लीम बॅड मुस्लीम' (मूळ लेखक - महमूद ममदानी, सह-अनुवादक - पुष्पा भावे) यांसारख्या महत्त्वाच्या पुस्तकांचा अनुवाद केला असून ‘यांनी घडवलं सहस्रक' आणि ‘असा घडला भारत' या महद्ग्रंथांसाठी सह-संपादन, संशोधन व लेखन केलं आहे. त्यांनी दैनिक ‘इंडियन एक्स्प्रेस'साठी १९९१-२००० या कालावधीमध्ये पत्रकारिता केली आहे. गेली तीन दशकं त्यांनी विविध मराठी दैनिक आणि नियतकालिकांमधून समाजाभिमुख साहित्य, नाट्य व चित्रपटविषयक समीक्षापर लेखन आणि त्याचप्रमाणे, सामाजिक-राजकीय विषयांवर विश्लेषणात्मक लेखन केलं आहे. त्यांना ‘लोकशाहीवादी अम्मीस...दीर्घपत्र' या अनुवादित पुस्तकासाठी सर्वोत्कृष्ट अनुवादाचा २०१६ सालचा ‘साहित्य अकादमी' पुरस्कार प्राप्त झाला आहे.
हॅपीमॉन जेकब यांनी २०१८मध्ये भारत पाकिस्तान या दोन देशांमधील ‘ताबा नियंत्रण रेषे’च्या अर्थात ‘एलओसी’च्या दोन्ही बाजूंनी प्रवास केला. भारतीय आणि पाकिस्तानी सैन्यदलासोबत त्यांनी केलेला सहप्रवास, दोन्हीकडील अनेक निवृत्त व सेवेतील लष्करी अधिकाऱ्यांसोबत केलेल्या चर्चा, आणि सीमाभागातील ‘शस्त्रसंधी उल्लंघन’-ग्रस्त लोकांशी साधलेला संवाद यांबद्दलचे तपशील हॅपीमॉन यांनी या पुस्तकातून दिले आहेत.
दोन देशांमध्ये लोकसहभागाने शांतता प्रस्थापित व्हावी हा हॅपीमॉन यांचा मूळ उद्देश आहे. पूर्वग्रहांचे अडथळे पार करून दोन्ही देशांच्या लष्करासह सर्व प्रकारच्या लोकांशी संवाद साधण्याचं अवघड असं काम गेली कित्येक वर्षं ते करत आहेत, त्याचप्रमाणे अनेक ‘ट्रॅक टू’ संवादांतील सहभागाद्वारे शांतता प्रयत्नाच्या प्रक्रियेत सातत्याने सहभागी राहिले आहेत. ते आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्यातकिर्त अभ्यासक आहेत.
दीर्घ अनुभव आणि वस्तुनिष्ठ दृष्टिकोन यांतून नवी अंतर्दृष्टी देणारं पुस्तक द एलओसी.
Reviews
There are no reviews yet.