प्रेरणादायी व्यक्ती कथा संच
अमर चित्र कथा
रोहन प्रकाशन घेऊन येत आहे अमर चित्र कथा आता मराठीत
१. वीर सावरकर
२.महात्मा गांधी
३. रवींद्रनाथ टागोर
४. सुभाषचंद्र बोस
अमर चित्र कथा
रोहन प्रकाशन घेऊन येत आहे अमर चित्र कथा आता मराठीत
१. वीर सावरकर
२.महात्मा गांधी
३. रवींद्रनाथ टागोर
४. सुभाषचंद्र बोस
अमर चित्र कथा
रोहन प्रकाशन घेऊन येत आहे अमर चित्र कथा आता मराठीत
१. अल्बर्ट आईन्स्टाईन
२. विक्रम साराभाई
३. ए. पी. जे अब्दुल कलाम
४. जे. आर. डी टाटा
अमर चित्र कथा
रोहन प्रकाशन घेऊन येत आहे अमर चित्र कथा आता मराठीत
१. गणपती
२. हुशार बिरबल
३. सोनेरी मुंगूस
४. हत्तींच्या गोष्टी
अमर चित्र कथा
रोहन प्रकाशन घेऊन येत आहे अमर चित्र कथा आता मराठीत
१२ पुस्तकांचा संच
१. पौराणिक व जातक कथा
२. वैज्ञानिक व उद्योजक गाथा
३. प्रेरणादायी व्यक्ती कथा
अमर चित्र कथा
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला रवींद्रनाथ टागोर यांच्यामुळे बंगाली साहित्यविश्वात आमूलाग्र बदल घडून आले. टागोर हे प्रतिभावान कवी, चित्रकार, कादंबरीकार आणि मोठे समाजसुधारक होते. त्यांना फक्त पुस्तकी शिक्षण पटत नसे, म्हणूनच विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल निर्माण करण्यासाठी त्यांनी आश्रम व्यवस्थेवर आधारित एक शाळा ‘शांतिनिकेतनमध्ये’ सुरु केली. साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळालेल्या या असामान्य व्यक्तीचे हे प्रेरणादायी जीवनचरित्र !
अमर चित्र कथा
“जय हिंद! “या सुभाषचंद्र बोस यांच्या युद्धाच्या आरोळीने भारतीयांच्या मनात आशा निर्माण केली. जपानी युद्धकैद्यांच्या छावण्यांमधील भारतीय सैनिक तसेच देशातील स्वातंत्र्यप्रेमी तरुण त्यांच्या आवाहनामुळे प्रेरित झाले होते. संपत्ती आणि सुखसोयींसह जन्माला आलेला हा तेजस्वी विद्वान जन्मजात नेलाही होता. त्यांच्या कल्पना आणि प्रयत्नांनी भारताला ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळवून दिले.
अमर चित्र कथा
मोहनदास करमचंद गांधी… यांचा आदर्शवाद आणि सत्याप्रतीची ठाम निष्ठा याची थट्टा करण्यात आली. त्यांचा साधेपणा आणि विनयशील वृत्ती याकडेही नेहमी उपहासाने पाहिलं गेलं. महात्मा गांधींनी अशा गोष्टींना कधीही प्रत्युत्तर दिलं नाही. त्यांच्यासमोर दांडगी ब्रिटिशसत्ता पार झुकली. या पुस्तकात महात्मा गांधी यांच्या जीवनकर्तृत्त्वाचा आढावा घेतला आहे. बालवयात एका विचारी आणि शांतस्वभाव असलेल्या मुलाचं व्यक्तिमत्त्व बघता बघ पार बदललं. अत्यंत समर्थ, सक्षमवृत्ती आणि निर्धाराचं ते चालतं बोलतं प्रतीक बनले. लक्षावधी लोकांच्या हृदयात स्वातंत्र्याची ज्योत चेतवून त्यांनी भारताचा स्वातंत्र्यलढा बळकट केला.
अमर चित्र कथा
ब्रिटिश राजसत्तेला हादरवून सोडणारे जे महान क्रांतिकारक भारतभूमीत जन्मले, त्यांमध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. शीयं सहनशीलता, त्याग आणि अपार बुध्दिमत्ता व प्रतिभा या गुणांचे अभूतपूर्व दर्शन त्यांच्या जीवनात घडले. अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये सावरकरांना काळया पाण्याची शिक्षा भोगण्यास ब्रिटिश सत्तेने भाग पाडले. अत्यंत भयावह अशा या शिक्षेला सावरकर कसे सामोरे गेले, त्याची अत्यंत प्रेरणादायक अशी ही चित्रकथा.
अमर चित्र कथा
डॉ. विक्रम साराभाई हे त्या दुर्मिळ लोकांपैकी एक होते ज्यांच्याकडे सर्व काही होते. अत्यंत हुशार आणि उद्योगपतींच्या श्रीमंत कुटुंबात जन्मलेले, आराम आणि विलासी जीवन जगण्यात समाधान मानू शकले असते. त्याऐवजी त्यांनी आपल्या या गोष्टींचा उपयोग स्वातंत्र्यानंतर भारताच्या उदयास मदत करण्यासाठी केला. प्रख्यात शास्त्रज्ञ, उद्योगपती, संस्था निर्माते, मुत्सद्दी, समाजसुधारक आणि दूरदर्शी डॉ. साराभाई चांचा विचार होता की, विज्ञान आणि शिक्षण भारताला भविष्यात झेप घेण्यास मदत करू शकतात. आपल्या सहकारी भारतीयांच्या क्षमतेबद्दल कधीही शंका घेऊ नये, डॉ. साराभाई यांनी अशा वेळी एक अंतराळ कार्यक्रम तयार करण्याचा प्रयत्न केला जेव्हा भारत अजूनही एक नवीन राष्ट्र होता. कृषी, मत्स्यपालन, हवामानशास्त्र, शिक्षण आणि दळणवळण विकसित करण्यासाठी त्यांनी अणुऊर्जा आणि अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर केला. दरम्यान त्यांनी आयआयएम ए. पीआरएल आणि भारताच्या लखलखत्या आकाशावर प्रकाशाचा दीपस्तंभ उभारला इस्रो.
उबदार, सर्वसमावेशक, उदार, मोहक, चिरंतन आशावादी आणि नेहमी विनम्र असलेल्या डॉ साराभाईंनी स्वतः पूर्णपणे जमिनीवर राहून भारताला अंतराळ युगात पुढे नेले…
अमर चित्र कथा
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम है एक वैज्ञानिक, लेखक, कवी, शिक्षक, दूरदर्शी आणि भारताचे ११ वे राष्ट्रपती होते आणि त्याहीपेक्षा खूप काही होते. अलीकडील काळातील सर्वात प्रिय आणि प्रशंसनीय पुरुषांपैकी एक असलेले डॉ. कलाम हे दयाळू आणि सौम्य माणूस होते. ज्यांचा भारताच्या लोकांवर विशेषत: तरूणांच्या सामर्थ्यावर दृढ विश्वास होता. एक असा माणूस होता जो अकल्पनीय उंबीवर पोहोचला परंतु त्यांचे पाय हे नेहमी जमिनीवरच होते. ज्या माणसाने ज्याला स्पर्श केला त्या प्रत्येक गोष्टीत स्वतःची उत्कृष्टता आणि आणि नम्रता आणली. त्यानेच आपल्याला समर्पण आणि परिश्रम करण्याच्या शक्तीचे दर्शन दिले त्याने आपल्याला स्वप्नांची शक्ती दाखवून दिली. ते म्हणयचे, “स्वप्ने ती नाहीत जी आपण झोपेमध्ये पाहतो. स्वप्ने म्हणजे ती जी आपल्याला झोपू देत नाहीत.’ त्यांची जीवनकहाणी याचीच साक्ष देते.
अमर चित्र कथा
एक नामांकित राष्ट्रीय विमान सेवा, जगप्रसिद्ध वैज्ञानिक आणि वैद्यकीय संस्था, चहापासून ते ट्रक आणि सौंदर्यप्रसाधनांपासून ते सामान्य मीठापर्यंतच्या देशाच्या गरजा भागविणारे औद्योगिक साम्राज्य त्याने इतके कसे साध्य केले असेल ? फक्त आणि फक्त कठोर परिश्रम, नम्रता आणि परंपरेचे मूल्य, त्याचबरोबर होती प्रगतीची दुर्दम्य इच्छाशक्ती… शिवाय, त्याच्या या साहसाच्या स्वभावाची उंची कुशलतेने चालविलेल्या विमानांपेक्षा सुद्धा अधिक होती.
अमर चित्र कथा
अल्बर्ट खूपच लहान होता तेव्हा अभ्यासाबद्दल आवड नसल्यामुळे त्याचे पालक व शिक्षक निराश झाले. मुख्य म्हणजे, त्याला भाषणात अडचणी आल्या आणि दुर्लक्ष केले. अल्बर्टला शाळेत ज्या प्रकारचे शिक्षण मिळत होते त्याचा राग होता तारखा आणि मजकूर लक्षात ठेवणे इ. परंतु तो जसजसा मोठा होत गेला तसतसा लवकरच हे स्पष्ट झाले की, अल्बर्ट सामान्य व्यक्ती नव्हता. १९०५ हे साल त्याच्यासाठी “जादुई वर्ष” म्हणून ओळखले जाते, त्यावर्षी त्यांनी एक नव्हे तर चार नवीन संशोधन पेपर चार भित्र विषयांवर प्रकाशित केले. एका रात्रीत तो, त्याच्या पिढीतील सर्वात प्रसिद्ध वैज्ञानिक झाला.