394 | 978-93-86493-47-7 | Ten Yancha Vangmayasiddhant | तेन यांचा वाङमयसिद्धांत | Dr. Suresh Dhaygude | D.D. Punde | डॉ. सुरेश धायगुडे | द.दी. पुंडे | प्रो . तेन यांनी आपला ‘ वाङ्मयसिद्धान्त ‘ फ्रेंचमध्ये १८६४ मध्ये मांडला . त्याचे १८६१ मध्ये इंग्रजीत भाषांतर झाले . गेली एकशेपन्नासाधिक वर्षे जगभरचे अभ्यासक या सिद्धान्ताची सातत्याने चर्चाचिकित्सा करीत आलेले आढळतात . विशेषत : ‘ वंश ‘ ( Race ) , ‘ वातावरण ‘ ( Milieu ) व ‘ वेला ‘ ( Moment ) ही तेनची तत्त्वत्रयी अभ्यासकांना निरनिराळ्या प्रकारांनी विचार करायला लावणारी आहे . या त्रयीखेरीज तेन यांनी इतरही महत्त्वपूर्ण विचार मांडलेले आहेत . महत्त्वाचे म्हणजे त्यांनी ‘ राष्ट्र व राष्ट्रीयते’चाही सुदीर्घ विचार केलेला आहे . आज भारतात आणि विशेषत : महाराष्ट्रात वाङ्मयाच्या सामाजिक अभ्यासाने जोर धरलेला आहे . दलित , ग्रामीण , भटके , आदिवासी , गिरिजन साहित्यकृतींनी वाङ्मयाच्या सामजिक समीक्षेची गरज अधोरेखित केलेली आहे . याशिवाय सध्या आपण ‘ भारतीय वाङ्मया’च्या संकल्पनेचाही गंभीरपणाने विचार करीत आहोत . त्यामुळे तेनच्या सिद्धान्ताचे नव्याने अवलोकन होणे गरजेचे झालेले आहे . प्रस्तुत पुस्तकाद्वारे तेनच्या सिद्धान्ताचे यथामूल व सुविहित भाषांतर प्रथमच मराठीत येत आहे . मराठीबरोबर हिंदी व इंग्रजीच्या अभ्यासकांनादेखील हे भाषांतर उपयोगाचे ठरेल . | Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 80 | 21.5 | 14 | 0.5 | 100 | Literature | ललित | 125 | TainYanchaVangamaysidhantaCover | Tain_CoverBC.jpg |
कालान्तर
सामाजिक आणि सांस्कृतिक पडझडीचा आलेख
अरुण टिकेकर
गेल्या पन्नास-साठ वर्षांत आपल्या समाजात झालेल्या पडझडीचे चित्रण करण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न. स्वातंत्र्याच्या कालखंडात महाराष्ट्राने काय गमावले, काय कमावले याचा आलेख काढणारा. त्यात कमावण्याच्या बाजूला थोडेच आणि गमावण्याच्या बाजूला भरपूर असल्याचेच आढळून आले. समाजबदल तर होत होता. तो केवळ बाह्यस्वरूपी होत आहे, का केवळ तंत्रज्ञानाने आपल्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत, की समाजमन वैज्ञानिक विचारांची कास धरून विवेकवादी होत आहे, धर्माचे अवडंबर कमी होत आहे की वाढत आहे, असे प्रश्नही मनात येऊ लागले…
प्रश्नांची उत्तरे शोधू गेल्यास ध्यानात येते की, ज्या प्रकारची पडझड झाली आहे ती स्वागतार्ह बदलापेक्षा कितीतरी अधिक आहे…
या कालखंडात आपण काय मिळवले आणि काय गमावले याची चर्चा तर सुरुवातीला केली पाहिजे. शिक्षणापासून ते वेगवेगळ्या व्यवसायापर्यंत, समाजकारणापासून ते राजकारणापर्यंत, व्यक्तिगत जीवनापासून ते सार्वजनिक जीवनापर्यंत विविध क्षेत्रांतील पडझडीची चर्चा करणे एवढाच या लेखसंग्रहाचा मर्यादित हेतू!
Reviews
There are no reviews yet.