सोळाव्या वर्षीच माउन्ट एव्हरेस्ट फत्ते!


[taxonomy_list name=”product_author” include=”350″]
अनुवाद: [taxonomy_list name=”product_author” include=”1152″]


दोन महिन्यांच्या कठोर परिश्रमानंतर २२ मे २०१० रोजी सोळा वर्षांचा अर्जुन वाजपेयी जगाच्या सर्वोच्च शिखरावर उभा होता! त्यावेळेस एव्हरेस्ट सर करणारा तो सर्वात तरुण (नॉन-शेरपा) गिर्यारोहक ठरला होता. अनेक वर्षं जोपासलेलं असं अशक्यप्राय स्वप्न अर्जुनने त्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीने पूर्ण केलं होतं…
हे अनुभवकथन थेट अर्जुनच्याच शब्दात असल्यामुळे ते वाचताना वाचकही त्याच्याबरोबर एव्हरेस्ट मोहिमेवर निघतो, त्याच्याबरोबर ते सर्व कठीण टप्पे पार करतो आणि अक्षरश: एका धाडसी गिर्यारोहकाचं आयुष्यच जगतो!
केवळ गिर्यारोहणात रस असणाऱ्यांसाठीच नव्हे तर सर्व तरुणांसाठी हे पुस्तक म्हणजे कठोर परिश्रम, चिकाटी आणि धाडस याचं सर्वोत्तम उदाहरण आहे. एक अतिशय सामान्य असा सोळा वर्षांचा गिर्यारोहक अशक्यप्राय स्वप्न धाडसाने आणि जिद्दीने कसं पूर्ण करतो याचं चित्तथरारक अनुभवकथन… ‘सोळाव्या वर्षीच माउन्ट एव्हरेस्ट फत्ते!’


95.00 Read more

सुरुवात एका सुरुवातीची

वेडीबाभळीपासून वीजनिर्मितीचा यशस्वी प्रयोग… या प्रयोगाची चित्तवेधक कथा!


प्रफुल्ल कदम


तसं पाहिलं तर हे पुस्तक नाही, एक प्रयोग आहे. या प्रयोगासाठी प्रयोगशाळा कशी सिद्ध केली गेली याचं ते आत्मचरित्रात्मक निवेदन आहे. बहुतेक आत्मचरित्रांमध्ये ‘आत्म’ म्हणजे ‘मी’ महत्त्वाची भूमिका बजावत असतो. परंतु प्रफुल्ल कदम यांच्या आत्मचरित्रात मुख्य भूमिका आहे ‘वेडीबाभळीची’. त्या नायिकेचा म्हणजे वेडयाबाभळीचा परिसर आहे ग्रामीण महाराष्ट्राचा. मात्र प्रयोग आहे जागतिक स्तरावर परिणाम घडविणारा. या आत्मचरित्राला उद्दिष्ट आहे ऊर्जाक्रांतीचे – जी जलक्रांती व कृषीक्रांती समवेतच साध्य होऊ शकते… …पूर्णपणे प्रतिकूल वातावरणातही प्रयोग करण्यासाठी लागते दुर्दम्य जिद्द. जिद्दीला भांडवल लागत नाही. उद्दिष्ट निश्चित असेल, विचार पक्का असेल आणि जिद्द असेल तर सर्व अडचणींवर मात करता येते. अगदी नकारात्मक विचार करणार्‍यांचा विरोधही मोडून काढता येतो आणि मतलबी मंडळींचे खेळही थोपविता येतात. खरं म्हणजे महाराष्ट्रात हजारो तरुण असे आहेत की ज्यांना काहीतरी करायचं आहे, परंतु दिशा नाही, कार्यक्रम नाही वा मार्गदर्शन नाही. त्यांना हे पुस्तक एक ‘गाईड’ ठरेल. -कुमार केतकर


120.00 Add to cart

अमावास्येचा पूर्णचंद्र

अर्थात ग्रहण भ्रमण


श्रीकांत लागू


अमावस्येचा पूर्णचंद्र म्हणजे देशा-विदेशातील विविध छटांमधील ग्रहणं बघण्यासाठी केलेली मनसोक्त भटकंती ! पुस्तकाचे लेखक श्रीकांत लागू यांनी पहिलं सूर्यग्रहण बघितलं होतं- वयाच्या आठव्या – नवव्या वर्षी. त्या वेळी निर्माण झालेल्या कुतूहलापोटी पुढील आयुष्यात लागूंनी अक्षरशः झपाटल्याप्रमाणे अनेक ठिकाणी जाऊन ग्रहणं अनुभवली. त्यांच्या दृष्टीने ग्रहण म्हणजे आकाशात घडणारं अद्भुत नाट्य. ते पाहून डोळ्याचं पारणं फिटतं पण मन मात्र भरत नाही. हुबळी, डायमंड हार्बर, कच्छ, झांबिया, द. आफ्रिका, टर्की, चीन, रामेश्वरम् अशा देश- देशातील अनेक ठिकाणी त्यांनी खग्रास सूर्यग्रहणाचा जणू पाठलागच केला! ते स्वत : खगोलशास्त्रज्ञ नाहीत किंवा अंतराळशास्त्रज्ञही नाहीत. तरीही एखाद्या निरागस पण जिज्ञासू वृत्तीच्या मुलाप्रमाणे ते ग्रहणाचं रोमांचपूर्ण वर्णन करतात. ग्रहणाच्या पहिल्या स्पर्शापासून ते ग्रहण सुटेपर्यंतच्या काळाचं वर्णन वाचताना वाचकाला स्वत: ग्रहण अनुभवत असल्याचा आनंद देऊन जातात. लागू देश-विदेशात भरपूर फिरले, मात्र नेहमीच्या पठडीतील पर्यटनासाठी म्हणून ते फिरले नाहीत. त्यांची भटकंती झाली ती कधी जलतरणस्पर्धेच्या निमित्ताने तर कधी नाट्यप्रयोगांसाठी, कधी कैलास-मानससरोवराची प्रदक्षिणा करायला, कधी एव्हरेस्ट बेसकँप सर करण्यासाठी तर कधी अद्भुत शांततेने आणि केवळ बर्फाने आच्छादलेला सातवा खंड – ‘अंटार्टिका’ अनुभवण्यासाठी मात्र या पुस्तकातील भटकंती आहे ती फक्त आणि फक्त ग्रहणं बघण्यासाठीची…



125.00 Add to cart

जपूयात निरागस बालपण

बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय


डॉ. मीनाक्षी नलबले-भोसले


आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्या लहानग्याचं बालपण जपणं खरोखर एक आव्हान झालं आहे. वाढता चंगळवाद, बदललेली जीवनशैली, परिसीमा गाठणाऱ्या मनोविकृती यांमुळे लैंगिक शोषणाच्या अनेक भीतीदायक केसेस शहरी आणि ग्रामीण भागात घडताना दिसत आहेत.
ससून हॉस्पिटलमध्ये बालशल्यविशारद म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. मीनाक्षी भोसले यांनी बाललैंगिक शोषणाच्या अनेक गंभीर केसेस हाताळल्या आहेत. मुलांवरील अत्याचारांचं वाढतं प्रमाण पाहून अशा दुर्घटना रोखण्याची गरज या संवेदनशील डॉक्टरला वाटली. शरीरावरच्या जखमा बऱ्या करता करता समुपदेशनाद्वारे, पुस्तिकेद्वारे, प्रबोधनात्मक कार्यक्रमांद्वारे डॉ. मीनाक्षी आज हा गंभीर प्रश्न घेऊन पालकांपर्यंत, एकंदर समाजापर्यंत पोहोचू पाहत आहेत. हे पुस्तकही या उपक्रमाचा भाग आहे. पुस्तकातील चार विभागांतून या प्रश्नाची पूर्ण व्याप्ती दिसून येईल…
1. अत्याचाराचे प्रकार
2. काही गंभीर सामाजिक समस्या व रूढी
3. अत्याचार होऊ नयेत म्हणून.. आणि
4. अत्याचाराची घटना घडल्यानंतर…
आपल्या मुलांना कोणत्याही प्रकारच्या लैंगिक अत्याचाराला तोंड द्यावं लागू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय सांगणारं… जपूयात निरागस बालपण



125.00 Add to cart

मुक्काम पोस्ट शहापूर!


शोभा भालेकर


ही कथा केवळ एका गावाची नाही!

ती आहे, रम्य आणि सुखद आठवणींची…

लहानशा गावात सहज मिसळून गेलेल्या एका कुटुंबाची ही कथा कुटुंबातल्या मुलीच्या आठवणींतून उलगडत जाते. जात, धर्म, पंथ या गोष्टींचा जाच होऊ न देता सुखं-दुःखं, मान-अपमान, सण-उत्सव, भांडण-तंटे अशा सगळ्या गोष्टी एकत्र येऊन वाटून घेत माणुसकी आणि आपलेपणा जिता-जागता ठेवणाऱ्या गावातल्या आयुष्याच्या या आठवणी निरलस वृत्तीचं दर्शन वाचकाला घडवतात. द्वेष आणि मत्सराचे वारे न लागलेल्या काळात, तांत्रिक सुविधांचा सुकाळ नसताना छोट्याशा गावातली माणसं एकमेकांना कशी धरून राहत होती, एकमेकांच्या चुकांसह किती सहजपणे एकमेकांना स्वीकारत होती, याची ही गोष्ट!

सादगी, निर्लेप वृत्ती आणि जिव्हाळा या गोष्टींच्या आधारावर सकस आणि सुंदर जीवन जगलेल्या गावाच्या पुन्हा पुन्हा वाचाव्याशा वाटणाऱ्या या आठवणी! मुक्काम पोस्ट शहापूर!



125.00 Add to cart

जेष्ठांसाठी ४ गोष्टी युक्तीच्या

कुटुंबातील सामंजस्याकरता…


[taxonomy_list name=”product_author” include=”435″]


आज बदललेल्या जीवनशैलीमुळे एकत्र कुटुंबाचं विभाजन होऊन विभक्त कुटुंबांचं प्रमाण वाढलं आहे. कोणाला वेळ द्यायला किंवा कोणाचा वेळ घ्यायलाही आपल्याकडे फुरसत नसते. तरीही, बरीच कुटुंबं अशी आहेत जी गुण्यागोविंदाने एकत्र राहाता आहेत, एकमेकांशी संवाद ठेवून आहेत. अशा एकत्र कुटुंबातील ज्येष्ठांसाठी भा. ल. महाबळ काही बोलक्या व्यक्तिरेखांमधून व प्रसंगांतून नात्यात जाणवणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी नकळत मार्गदर्शन करून जातात. घरात सशक्त व आनंदी वातावरण निर्माण व्हावं यासाठी घरातील सदस्य — विशेषत: ज्येष्ठ व्यक्ती विधायक व परिपक्व भूमिका बजावू शकतात. कुटुंबातील प्रत्येकाने विचारपूर्वक कृती केल्या व दुसऱ्याचा विचार केला तर कुटुंब कसं सुखी व समाधानी राहू शकतं हे लेखक विविध लेखांमधून पटवून देतात.

नुसतं वयाने ‘ज्येष्ठ’ न राहता वागण्यातून ‘ज्येष्ठ’ होण्यासाठी ज्येष्ठांसाठी चार गोष्टी युक्तीच्या….


140.00 Read more

शिक्षणकोंडी

स्थलांतरित मुलांना शिक्षणहक्क मिळवून देणाऱ्या कार्यकर्त्यांची डायरी


टीम आशा


साखर उद्योग ही महाराष्ट्रातली महत्त्वाची सहकारी चळवळ. आज महाराष्ट्रात जवळपास २०० साखर कारखाने आहेत. साधारणपणे १५ जिल्ह्यांतून ऊसतोडणी कामगार स्थलांतर करून कुटुंबकबिल्यासह या कारखान्यांमध्ये कामाला येतात. त्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणात खंड पडतो. या मुलांना शालेय प्रवाहात आणण्याचं काम टाटा ट्रस्टतर्फे पुणे जिल्ह्यातील सोमेश्वर सहकारी कारखान्यामध्ये राबवलं जात आहे.

आतापर्यंत ६ ते १४ वयोगटातील २६४८ मुलांचं सर्वेक्षण करण्यात आलं असून त्यातील १८२८ मुलांना शाळेतही दाखल करण्यात आलं आहे. स्थलांतरामुळे मुलांच्या शिक्षणामध्ये येणाऱ्या समस्या ओळखून त्यावर उपाययोजना करत या शिक्षणकोंडीवर तोडगा काढण्यात ‘टीम आशा’ला यश येत आहे. हे काम करत असताना ‘टीम आशा’च्या कार्यकर्त्यांना अनेक बोलके अनुभव आले.

खेळण्या-बागडण्याच्या वयामध्ये आई-वडलांच्या मदतीसाठी कामाला जुंपून घेणारी लहानगी पोरं या कार्यकर्त्यांना भेटली… शाळेचा गणवेश, दप्तर, डबा घेऊन शिकायला जावं असं स्वप्नं बघणारी पोरं भेटली… कोणत्याही अडचणीवर मात करून पोरांना शाळेत पोचवणारे त्यांचे पालकही भेटले…

अशाच सगळ्या जिवंत, सळसळत्या अनुभवांचा हा कोलाज म्हणजेच ‘टीम आशा’च्या कार्यकर्त्यांची ही बोलकी डायरी… अर्थात शिक्षणकोंडी !


In Maharashtra, every year, more than 1.5 million sugarcane workers migrate to southern Maharashtra and Karnataka. Education is one of the major issues cane workers face, but there is no special provision for cane workers children in the policy. The sugarcane workers children are forcibly engaged with work with their parents like fetching water, bundling sugarcane, taking care of their younger siblings. This book is a dairy of the volunteers of Asha team sharing their experiences with the students and children of cane workers. its about the problems and stories they face while taking education and at the workplace.


150.00 Add to cart

आपल्यासाठी आपणच

उत्तरायुष्य गुणवत्तापूर्ण जगण्यासाठी


[taxonomy_list name=”product_author” include=”389″]


वय वाढणं म्हणजे नक्की काय असतं? तर वयाबरोबर अनेक शारीरिक आणि मानसिक बदल होणं. या बदलांमुळे थोडंसं गोंधळल्यासारखं होतं. साठीनंतरच्या या टप्प्यात अनेक कौटुंबिक व सामाजिक समस्याही जाणवू लागतात आणि त्यावर समंजस भूमिका घेण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन मिळावं अशी एक गरज वाटू लागते.
आज आपली दैनंदिन जीवनशैली अमूलाग्र बदलली आहे. त्याचबरोबर आयुष्यमानही वाढलं आहे. वाढलेल्या आयुष्याचं नियोजन कसं करावं याचा विचारही ज्येष्ठांनी केलेला नसतो. त्यामुळे अनेक समस्या भेडसावतात.
या दृष्टीने या पुस्तकात ज्येष्ठांचे प्रश्न निर्माण होण्यामागची कारणं कोणती? वृध्दांच्या समस्यांवर काम करणार्‍या संस्था नक्की काय करतात? अशा प्रश्नांची चर्चा केली आहे. याशिवाय ‘वृध्दकल्याणशास्त्र’ या नवीन विद्याशाखेची ओळख करून दिली आहे. तसेच वृध्दनिवासाचे विविध पर्याय, वृध्दाश्रमांचे प्रकार व तेथील सोयी-सुविधांची माहितीही यात आहे.
वृध्दांच्या समस्या वृध्दांनीच सोडवाव्यात, त्यासाठी त्यांनी मानसिकता बदलावी व वृध्दकल्याणासाठी पुढाकार घ्यावा. म्हणजेच ‘आपल्यासाठी आपणच’ हा सर्वस्वी नवा विचार व सकारात्मक दृष्टिकोन या पुस्तकात लेखिकेने मांडला आहे.


175.00 Add to cart

सुखाने जगण्यासाठी

सकारात्मक दृष्टी देणारं मौलिक मार्गदर्शन


[taxonomy_list name=”product_author” include=”392″]


आजच्या आधुनिक युगात जगण्याचा वेग 4G पेक्षाही वेगवान झाला आहे ! परिणामी दैनंदिन जीवनातले ताणतणाव, धावपळ आणि घाईगडबडही कधी नव्हे इतकी वाढली आहे. अशावेळी आपल्यासमोर उभ्या ठाकलेल्या परिस्थितीचं नीट आकलन करून त्यातून मार्ग काढणारेच यशस्वी आणि पर्यायाने सुखी होतात. मात्र त्यासाठी आवश्यक असतं – निरोगी मन:स्वास्थ्य आणि मनोनियंत्रण !
हे जाणूनच विख्यात मानसतज्ज्ञ व समुपदेशक डॉ. विजया फडणीस यांनी या लेखसंग्रहात आपलं मन निरोगी राखण्याचे मौलिक मंत्र उदाहरणांसह सांगितले आहेत. तसंच विचार आणि भावना यांवर नियंत्रण ठेवून आपली वर्तणूक कशी ठेवावी याबद्दल अत्यंत
मौलिक अशा सूचना केल्या आहेत, तर काही ठिकाणी त्यासाठी आवश्यक अशा युक्त्या-कॢप्त्याही सांगितल्या आहेत. त्यांनी या लेखांमधून मानसशास्त्रीय संकल्पना अत्यंत सोप्या शब्दांत समजावून सांगितल्यामुळे वाचकांना आगळी अंतर्दृष्टीही मिळते.
स्वभावातीत त्रासदायक गोष्टी टाळून स्वविकास साधण्यासाठी, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी उपयुक्त असा लेखसंग्रह… सुखाने जगण्यासाठी !


175.00 Add to cart

तुमच्या आमच्या लेकी

त्यांचं आरोग्य…त्यांच्या समस्या मनमोकळ्या संवादातून सहज-सोपं समुपदेशन


[taxonomy_list name=”product_author” include=”390″]


आरोग्य-समस्या घेऊन येणारा पेशंट अनेक वेळा मानसिक दडपणाखाली असतो.
त्याच्या आरोग्य-तक्रारींचं मूळ कारण ही दडपणं तर नसावीत?
अशी शक्यता लक्षात घेऊन डॉ. लिली जोशी आपल्या पेशंटशी संवाद साधता साधता त्याचा विश्वास संपादन करतात आणि पेशंट त्यांच्यापाशी मन मोकळं करतो.
आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक समस्या सांगतो…आणि `डॉक्टर’ लिली जोशी यांच्याकडे येणार्‍या तरुणींसाठी किंवा रजोनिवृत्तीला आलेल्या स्त्रियांसाठीही त्या `लिलीताई’ होऊन जातात ! आरोग्य समस्यांचं मूळ कोठे आहे, याचा या डॉक्टरताना नेमका ठावठिकाणा लागतो.
वैद्यकीय उपचारांबरोबर केलेलं नेमकं समुपदेशन
लागू पडतं आणि या स्त्रिया शरीराने व मनाने तंदुरुस्त होऊन आयुष्याला भिडायला, आनंदी जीवन जगायला मोकळ्या होतात…!
डॉ. लिली जोशी यांनी त्यांच्या खास शैलीत असे विविध अनुभव बोलक्या कहाण्यांच्या स्वरुपात या पुस्तकात शब्दबद्ध केले आहेत. हे अनुभव वाचकांना एक प्रकारचं सामाजिक भान तर देतीलच पण त्याचबरोबर स्वत:च्या समस्यांची उत्तरंही देऊन जातील !
आजच्या जीवनात अनेक आघाड्यांवर सामना करणार्‍या, धडपडणार्‍या, अडखळणार्‍या तरुणींना, स्त्रियांना मार्गदर्शन करणार्‍या या…तुमच्या-आमच्या लेकी!


180.00 Add to cart

आऊट ऑफ द बॉक्स

क्रिकेट: भावलेलं, दिसलेलं आणि त्या पलीकडचं


हर्षा भोगले
अनुवाद : चंद्रशेखर कुलकर्णी


स्वतःचं स्वप्न साकार करू पाहणार्‍या काही वाचकांना या पुस्तकातून निश्‍चितच एक दिशा आणि प्रेरणा मिळेल याची मला खात्री आहेच, पण आपापल्या क्षेत्रात नेतृत्व कसं करावं आणि व्यावसायिक आयुष्यात आंतरराष्ट्रीय दर्जा कसा अंगी बाणवावा, याचेही काही मंत्र मिळून जातील.
— सचिन तेंडुलकर
टेलिव्हिजनच्या पडद्यावर जे दिसत असतं त्यापेक्षाही खूप काही तो तिथूनच आपल्याला दाखवतो. त्याने लेखणी चालवली तर कॉमेंण्ट्री बॉक्समधून त्याने जे सांगितलं त्याच्या कितीतरी पुढे तो आपल्याला घेऊन जातो. कॅमेर्‍याच्या साक्षीने उलगडणारी गोष्ट त्याच वेळी प्रभावीपणे सांगणं आणि त्याच कथानकावर वृत्तपत्रात लिहिताना चार पावलं पुढे जाऊन वेगळाच दृष्टान्त देणं या दोन्ही क्षमता असणारी माणसं भारतीय माध्यमांमध्ये फारच थोडी आहेत. हर्षा भोगलेचं वेगळेपण नेमकं यातच आहे.
— शेखर गुप्ता
खेळाबाबत प्रेम आणि ज्ञान यांच्या अपूर्व संगमाचे स्पष्ट प्रतिबिंब हर्षाच्या शैलीदार लिखाणात दिसते.


195.00 Add to cart

माझ्या विद्यार्थी मित्रांनो

स्व.यशवंतराव चव्हाण यांची दीक्षान्त समारंभातील भाषणे


[taxonomy_list name=”product_author” include=”456″]


मुत्सद्दी राजकारणी, विचारवंत आणि एक रसिक व्यक्तिमत्त्व म्हणून चिरपरिचित असलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते देशभरातील विविध विद्यापीठांचे दीक्षान्त समारंभ संपन्न झाले. तेथे केलेल्या शिक्षणाविषयीच्या चिंतनशील भाषणांचं संपादित पुस्तक म्हणजेच – `माझ्या विद्यार्थी-मित्रांनो…’
या पुस्तकातली सगळी भाषणं यशवंतरावांनी उच्च शिक्षण देणारया विद्यापीठांमध्ये दिलेली असली, तरीही त्यात ते प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचं महत्त्व ठळकपणे अधोरेखित करतात. शिक्षणाचा हेतू व्यक्तीचा विकास करणं एवढाच मर्यादित नसून त्यातून समाजाचाही विकास व्हायला हवा, ही त्यांची धारणा ते यात मांडतात. म्हणूनच समाजाच्या फार मोठ्या विभागाला शिक्षणाची गरज असल्याचं प्रतिपादन ते वेळोवेळी करतात, जे आजघडीलाही तितकंच लागू होतं.
शहरी व ग्रामीण शिक्षणातील तफावत, विकसित देशांसोबत जाण्यासाठी आवश्यक असणारे आधुनिक शिक्षण, उच्च शिक्षण घेतलेल्यांची समाजाप्रति असणारी जबाबदारी यांसारख्या अनेक महत्त्वाच्या विषयांची मांडणी यशवंतराव एखाद्या कसलेल्या शिक्षणतज्ज्ञाप्रमाणे करतात. विशेष म्हणजे ही मांडणी करताना स्नातक अर्थात नव-पदवीधरांविषयी म्हणजेच देशाच्या तरुण उच्चशिक्षित पिढीविषयी त्यांना वाटणारं प्रेम आणि आशावाद त्यांच्या शब्दाशब्दांतून व्यक्त होताना दिसतो.


195.00 Add to cart

पर्यटन एक संजीवनी

अनुभव देश-विदेशातील भन्नाट भटकंतीचा…


डॉ. लिली जोशी


वैद्यकीय व्यवसाय करत असतानाच डॉ. लिली जोशी यांनी विलक्षण आंतरिक ओढीने प्रवासाचा छंद अनेक वर्षं जपला आहे. मात्र हा प्रवास म्हणजे ठरावीक पध्दतीने, ठरावीक ठिकाणीच केलेला प्रवास नव्हे. थोडी ‘हटके’ ठिकाणं पाहण्याकडे त्यांचा कल असतो. उदाहरणच द्यायचं झाल्यास गाडीने केलेली स्कॉटलंडमधली भटकंती, रेडवूडच्या जंगलातली सफारी, महाकाय व्हिक्टोरिया फॉल्सला दिलेली भेट… आणि ग्रीस व इजिप्तसारख्या लोकप्रिय तरीही वैशिष्टयपूर्ण ठिकाणी केलेलं पर्यटन… पुस्तकात असलेली अशी विविधता वाचकाला वेगळी अनुभूती देत खिळवून ठेवते.
मात्र हे पुस्तक म्हणजे केवळ प्रवासवर्णन नक्कीच नाही. पुस्तकातील ‘गुगल’ किंवा ‘हार्वर्ड स्कूल’सारख्या व्यावसायिक स्थळांच्या भेटीतील अनुभव, चीन किंवा दक्षिण आफ्रिकेच्या सहलीमधल्या अनुभवांची वर्णनं त्या त्या देशातील आर्थिक व सामाजिक पैलूंवरही प्रकाश टाकतात. याचबरोबर काला पत्थर, अन्नपूर्णा बेसकँप, योसेमिटी इ. ट्रेकमधले थरारक अनुभव अंगावर अक्षरश: काटा उभा करतात. या अनुभवांबरोबरच लेखिकेने एक डॉक्टर म्हणून पर्यटनासाठी लागणाऱ्या फिटनेसबाबतही पुस्तकात चर्चा केली आहे.
पर्यटनातील अनुभव आपलं आयुष्य अनेक प्रकारे समृध्द करतात. नवनवीन भटकंती रोजच्या आयुष्यातला तोचतोचपणा नाहीसा करून नवा जोम, नवा उत्साह निर्माण करते. थोडक्यात काय तर, पर्यटन म्हणजे आयुष्यातला तेजस्वी सूर्यप्रकाश, चेतना देणारी संजीवनी… अर्थात् पर्यटन एक संजीवनी!




200.00 Add to cart

रत्नांचं झाड


पद्मजा फाटक (मजेत)


ताराबाई मोडक यांच्या चरित्रलेखनापासून ते समाजशास्त्रीय, वैज्ञानिक संशोधनपर लेखनाकडून कथालेखन व अनुभवपर लेखन- अशी वळणं घेत पद्मजा फाटक (मजेत) यांच्या ‘रत्नांचं झाड’ या अनोख्या ललित संग्रहाकडे आपण पोहोचतो.
या संग्रहात एकूण चौदा लेखांची वीण अतिशय सुंदरपणे गुंफली आहे. हा संग्रह म्हणजे केवळ तरल भावना आणि शब्दसौंदर्याने नटलेल्या लेखांचा संग्रह नव्हे; तर यामधील प्रत्येक लेखात विषयविविधता, मार्मिक भाष्य, अभिजात व कसदार भाषाशैली, मधूनच डोकावणारी तल्लख विनोदबुध्दी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जीवनाकडे बघण्याचा प्रगल्भ दृष्टिकोन अशा सर्वच गोष्टी अनुभवता येतात. त्यामुळे प्रत्येक लेखाचा विषय व धाटणी जरी वेगळी असली तरी त्यात दिलेले अनुभव, संवेदना आणि सहजपणे मांडलेला वैचारिक व चिंतनशील दृष्टिकोन हे या लिखाणाचे समान धागे ठरतात.
विविध रत्नांनी डवरलेलं हे झाड वाचकाला निश्चितच एक व्यापक जीवनानुभूती आणि एक वेगळं समाधान देईल!


200.00 Add to cart

ते आणि मी


शकुंतला पुंडे


ते’ आणि मी हे शकुंतला पुंडे ह्यांचं एक अनोखा अविष्कार असणारं आगळंवेगळं ललित पुस्तक. या पुस्तकातल्या ‘ते’शी लेखिकेचं एक भावनिक नातं तिच्या नकळत निर्माण होत गेलेलं आहे. ते नातं इतकं उत्कट, मधुर अन् जिवाभावाचं झालेलं आहे की, कोकणातला मुक्त, घनदाट, विस्तीर्ण निसर्ग असो वा शहरातल्या घराच्या गॅलरीतला बंदिस्त मंच किंवा गॅलरीबाहेरचा ‘हिरवा रंगमंच’ असो, हे नातं जणू तिच्या जगण्याचाच एक धागा होऊन जातं. ‘ते’ आणि लेखिका यांचं जगणं एकमेकांत गुंतलेलं, एकमेकांशी बांधलेलं, जणू सलग घट्ट वीण असलेल्या रेशमी वस्त्रासारखंच कसं होऊन जातं याचं एक मनोज्ञ दर्शन या पुस्तकात सर्वत्र, सतत घडत राहतं.
आपल्या बालपणापासून आजपर्यंत ‘ते’शी अलगद जुळत गेलेले भावबंध लेखिकेने सरळसाध्या तरीही वेधक अशा शैलीत मांडलेले आहेत. त्यामुळे वाचकही स्वत:च्या नकळत लेखिकेच्या आनंदविश्वाचा वाटेकरी होतो. ‘ते’ आणि मी हे पुस्तक वाचणं म्हणजे निखळ आनंदाचा अनुभव आहे अन् निखळ अनुभवाचा आनंदही आहे!


200.00 Add to cart

कालान्तर

सामाजिक आणि सांस्कृतिक पडझडीचा आलेख


अरुण टिकेकर


गेल्या पन्नास-साठ वर्षांत आपल्या समाजात झालेल्या पडझडीचे चित्रण करण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न. स्वातंत्र्याच्या कालखंडात महाराष्ट्राने काय गमावले, काय कमावले याचा आलेख काढणारा. त्यात कमावण्याच्या बाजूला थोडेच आणि गमावण्याच्या बाजूला भरपूर असल्याचेच आढळून आले. समाजबदल तर होत होता. तो केवळ बाह्यस्वरूपी होत आहे, का केवळ तंत्रज्ञानाने आपल्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत, की समाजमन वैज्ञानिक विचारांची कास धरून विवेकवादी होत आहे, धर्माचे अवडंबर कमी होत आहे की वाढत आहे, असे प्रश्नही मनात येऊ लागले…
प्रश्नांची उत्तरे शोधू गेल्यास ध्यानात येते की, ज्या प्रकारची पडझड झाली आहे ती स्वागतार्ह बदलापेक्षा कितीतरी अधिक आहे…
या कालखंडात आपण काय मिळवले आणि काय गमावले याची चर्चा तर सुरुवातीला केली पाहिजे. शिक्षणापासून ते वेगवेगळ्या व्यवसायापर्यंत, समाजकारणापासून ते राजकारणापर्यंत, व्यक्तिगत जीवनापासून ते सार्वजनिक जीवनापर्यंत विविध क्षेत्रांतील पडझडीची चर्चा करणे एवढाच या लेखसंग्रहाचा मर्यादित हेतू!


200.00 Add to cart
1 2 4