dithee

Reading Time: 11 Minutes (1,110 words)

फॉन्ट साइज वाढवा

२९ जून हा मराठीतले श्रेष्ठ लेखक दि.बा. मोकाशी यांचा स्मृतिदिवस. त्या निमित्ताने लेखक व विचक्षण वाचक, पुस्तकप्रेमी व संग्राहक पंकज भोसले यांनी दिबांच्या दुर्मीळ पुस्तकांवर, त्या पुस्तकांच्या शोधप्रवासावर, दिबांच्या लेखकीय वेगळेपणावर लिहिलेला हा दीर्घलेख…
वाचनसोयीसाठी आम्ही इथे हा लेख चार भागांत प्रकाशित करत आहोत. पुढील भागांची लिंक शेवटी दिलेली आहे.

४. ‘दिठी’उत्तर काळातील मोकाशी…

सुमित्रा भावेंचा दिठी मी सर्वाधिक उशिरा पाहिला. ‘आता आमोद सुनासि आले’ या कथेचा पहिला अंमल दहावीच्या सुट्टीत जून आरंभी मोसमीपूर्व धो-धो पावसात वाचल्यामुळे अंमळ अधिक पडला असल्यामुळे चित्रपट पाहण्याचे मुद्दाम खूप दिवस लांबवून ठेवले. दि.बा. मोकाशी आवडणाऱ्या प्रत्येकाची बहुतेक आवडती कथा ‘आता आमोद सुनासि आले’च असल्याचे बऱ्याच जणांशी चर्चेतून समोर आले होते. नॅशनल बुक ट्रस्ट विविध भाषांतील सर्वोत्तम लेखकांच्या मास्टरपीस कथांचा संग्रह काढते. दोन दशकांपूर्वी मराठी लघुकथांचा जो संग्रह भालंचंद्र फडके यांच्या संपादनाखाली काढला, त्यातही दि.बा. मोकाशी यांच्या ‘आता आमोद सुनासि आले’चा समावेश आहे. दूरदर्शनवर कथा रूपांतरण करणाऱ्या मालिकेत एक भाग या कथेवर आधारित होता. तो मी आवडीने पाहिला होता. पण संपूर्ण दीड-दोन तास लांबीचा चित्रपट पाहण्याची खूप भीती वाटत होती. या लेखाच्या निमित्ताने तो अनुभव घेतला. भरपूर उदोउदो झालेल्या या चित्रपटातील एकखांबी किशोर कदम यांच्या कामाखेरीज भावलेले थोडेच घटक होते. बाकी धोपट आणि भूमिकांत न शोभणाऱ्या काही ‘दिग्गजांची मांदियाळी’ या सरधोपट विशेषणापलीकडे या चित्रपटाविषयी फार मत बनवता आले नाही. तरी या चित्रपटामुळे आता आमोद सुनासि आले वाचण्याचे कष्ट मोठ्या प्रमाणावर घेतले गेले असतील असे वाटते तरी!

आस्तिकालाही आनंद देत नसेल इतका आनंद मला देऊळ देते. विशेषत: हेमाडपंथी देऊळ. त्यातल्या देवाचे मला महत्त्व नसते. देऊळ या वास्तूचे असते. माणसाची वास्तू जे, घर, त्याहून ते अगदी निराळे असते. घर हे सुख, दु:ख, रागलोभ, आनंदउत्सव, माया व मोह यांनी खडबडलेले असते. पण देऊळ हे साहित्यनिर्लेप आणि निर्विकार आनंदाची वास्तू मला वाटते.

-दि.बा. मोकाशी

ललित मासिकाच्या १९७३ सालच्या अंकामध्ये दि.बा. मोकाशींनी आपल्या लेखनावर आणि विशेषत: ‘आता आमोद सुनासि आले’ या कथेवर एक टिपण लिहून ठेवले होते. वारी आणि दिठीसंपृक्त वाचक-दर्शकांंसाठी ते मुद्दाम इथे विस्ताराने देत आहे –

‘माझ्या कथांचा विषय केवळ प्रेम नसतो. जन्म, मृत्यू, देव, विकृती, निराशा, अपघात, नुकसान, दारिद्रय, श्रीमंती अनेक विषय असतात. ज्या काही गोष्टी माझ्या कल्पनेला आनंदाने डिवचतात, त्यांत देवळे, नदीकाठ, पाऊस, संध्याकाळ या आहेत. एखादा स्वभाव मनात रेंगाळत राहिला नसेल, एवढी देवळे माझ्या मनात रेंगाळत राहिली आहेत. मी स्वत: नास्तिक आहे व देवळात जाऊन देवाला नमस्कार न करता यावे, इतका उद्धट आहे. पण आस्तिकालाही आनंद देत नसेल इतका आनंद मला देऊळ देते. विशेषत: हेमाडपंथी देऊळ. त्यातल्या देवाचे मला महत्त्व नसते. देऊळ या वास्तूचे असते. माणसाची वास्तू जे, घर, त्याहून ते अगदी निराळे असते. घर हे सुख, दु:ख, रागलोभ, आनंदउत्सव, माया व मोह यांनी खडबडलेले असते. पण देऊळ हे साहित्यनिर्लेप आणि निर्विकार आनंदाची वास्तू मला वाटते. तेथे गेल्यावर आपण जे खरे असतो, त्याचे भान येते. देवळात वाटणार्यात या निर्लेप आनंदाने मला माझी काही कथानके सुचली आहेत.

मला छोट्या व्यावसायिकांचे आकर्षण आहे. मी छोटा व्यावसायिक असल्याने ते असेल. या छोट्या व्यावसायिकांतही कष्टाने जगणारे मिस्त्री, लोहार, मॅकेनिक, सुतार, गवंडी, शेतकरी, मजूर यांच्याबद्दल मला विशेष वाटते. यांतून जे वारकरी पंथाचे आहेत. ते मला विशेष निकटचे वाटतात. ज्या लोकांकडे आपण आत्मीयतेने आणि आनंदाने पाहतो त्यांच्यातूनच कथेचे विषय मिळत असतात. ते चूक का बरोबर हा मुद्दा नाही किंवा त्यांतून श्रेष्ठ किंवा कनिष्ठ कथा होईल हा मुद्दा नाही. या लोकांविषयी लिहिण्यात मला आनंद वाटतो.
‘आता आमोद सुनासि आले, ही माझी कथा मला एका लोहार वारकऱ्यावरून सुचली. त्याचे दुकान स्टॅण्डवर असल्याने मी गावी उतरताच त्याच्याशी पहिला रामराम झडे. घरी जाऊन दुपारपर्यंत मी त्याच्याशी गप्पा मारीत बसे. ‘दिगंबर केव्हा आलास?’ हे त्याचे पहिले वाक्य असे. मी स्टुलावर बसून भाता हलवी व आमचा प्रेमसंवाद सुरू होई.
मला त्याच्या शांतपणाचे नेहमी कौतुक वाटे.त्याचे धावा बसविण्याचे काम सुरू असता मी त्याला हात देई किंवा तापवलेले लोखंड घणाने मारायचे असे तेव्हा मी घण मारी. तो नेहमी म्हणे ‘ देवाने आपल्याला भरपूर दिले आहे. आणि कमी दिले, तरी त्यात त्याचा हेतू असेल. तो म्हणे- ‘रात्री अंथरुणावर पडून ‘रामकृष्ण गोविंद’ म्हणताच आपल्याला झोप येते. काळजी वाटावे असे घरात काहीच नाही.’ पुष्कळदा तो ज्ञानेश्वरीतील ओव्या म्हणून दाखवे.आल्या गेल्या साधूसन्यासी भिकाऱ्याला देण्यासाठी त्याने बाजूला एक दगडी ठेवली होती. तो म्हणे- ‘दिगंबर, हे गरीब आहेत हा आमचाच दोष आहे. आणि जरी मागच्या जन्मीच्या पापाने ते या जन्मी गरीब असतील, तरी आपण त्यांचे दु:ख थोडेतरी कमी करायला हवे. तो म्हणे- ‘तू आणि मी किती सुखी आहोत. आपल्याला रस्त्यावर, धर्मशाळेत निजावे लागत नाही. तो म्हणे- ‘विठ्ठलाचे नाव आमच्या लोहारांच्या भट्टीसारखे आहे. भट्टीतला अग्नीच तोच. पण हिवाळ्यात सुख देतो. उन्हाळ्यात घाम काढतो. विठ्ठलाचे नाव तेच. पण तो ज्या वृत्तीने घेतो, तसे ते त्याला पावते किंवा पावत नाही.’
माझ्या या लोहार मित्राने (मला बाळ म्हणावे इतका तो माझ्याहून मोठा होता.) मला एके दिवशी समोरच्या वाण्याच्या माडीवर त्यांचे गुरुवारचे पोथीवाचन ऐकावयास बोलावले. आणि ते ऐकत असतानाच माझ्या ‘आमोद सुनासि आले’ या कथेचे बीज मनात पडले असावे.
माझ्या त्या मैत्रीने मला पुष्कळ दिले. कामाचे प्रेम दिले आणि समाधानी कसे व का रहावे, हेही शिकविले. पण मी गोष्ट लिहिली. तिचा आनंद झाला. काही वाचकांनाही झाला.पण मी लिहून दुसरे काय साधले? ज्याच्यामुळे मी कथा लिहिली त्याने ती वाचलीही नाही. कधी त्या कथेमुळे त्याच्या आयुष्यात मी काही घडवून आणले असेही नाही.
लिहिण्यातली ही हिरवळ आहे. एखादा भाव पकडणे. मग तो सुखाचा असो, दु:खाचा असो. भाव पकडता आला याचा आनंद. भाव पकडता आल्याने काय होते? ठाऊक नाही. समाधीच्या आनंदाबाबत सांगतात तसा तो आनंद असतो. समाधी लागल्याने काय होते? तेही सांगता येत नाही.’

हा लेख ‘माझे आवडते लेखक दि.बा.मोकाशी’ या शीर्षकसाध्यर्माचा निबंध नाही. दि.बा. मोकाशी यांच्या एका कथेवर पन्नास-साठ वर्षांनंतरही चित्रपट निघू शकतो, हे दिठी चित्रपटाच्या निमित्ताने पाहायला मिळाले. त्यांच्या कित्येक कथांना स्थल-काळाचे बंधन नसल्यामुळे त्या आजही आवडीने वाचल्या जाऊ शकतात हे मधल्या काही वर्षांत त्यांचे संग्रह पुन्हा वाचताना लक्षात आले. आपल्याकडे एखाद्या लेखकाचा भक्तपंथ तयार होतो आणि हा पंथ लेखकाला कित्येक वर्षे मोठा करण्याचा विडा उचलतो. हा पंथ उच्चरवात ‘लाडक्या व्यक्तिमत्वां’ना देव्हाऱ्यात ठेऊन त्याची पूजा करताना पुढील पिढ्यांमध्ये आपल्या विचारसरणीची ज्योत पसरवितो. सुदैवाने त्या ‘जनदेवतां’चे साहित्य आकळून घेऊनही एकाच लेखकात अडकून पडण्याच्या पंथात शिरण्याचा मोह मला कधीच झाला नाही. किंबहुना या पंथाच्या एकसुरी विचारांची गंमतच वाटत गेली. मोकाशी माझे आवडते लेखक असले, तरी इतरही शेकडो देशी-विदेशी लेखकांच्या कथाशैलीने मला तितकेच भारावून टाकले. जुन्या आणि नव्या मराठी वाचन पसाऱ्यात मनावर गोंदल्या जाणाऱ्या कथांची अनुभूती मात्र दि.बा. मोकाशींनी अंमळ अधिक दिली. या लेखकाच्या कथांसोबत वाढताना आपल्यातही त्याचे काही गुण-अवगुण उतरत गेले आहेत का, याची शोधप्रक्रिया इतर साहित्य वाचताना निरंतन सुरू राहीलच.

– पंकज भोसले


या दीर्घलेखाचे मागीत तीन भाग

D.B. Mokashi
मोकाशींच्या कथांसोबत वाढत जाताना… (१)

१. एक गमावलेले दुर्मीळ पुस्तक…

चावून चोथा झालेल्या विशेषणांनी नटलेल्या नवकथेच्या फौजेतल्या इतर कथाकारांहून म्हणूनच मोकाशींची कथा भिन्न ठरली. शिळी झाली नाही.

लेख वाचा…


मोकाशींच्या कथांसोबत वाढत जाताना… (२)

२. एक उशिराने कमावलेले दुर्मीळ…

हे पुस्तक आहे इयन फ्लेमिंगच्या जेम्स बॉण्ड कादंबरी मालिकेतील ‘डॉ.नो.’ या पुस्तकाचा मोकाशींनी केलेला अनुवाद./p>

लेख वाचा…


मोकाशींच्या कथांसोबत वाढत जाताना… (३)

३. मोकाशींची लेखन भूमिका

साधी भाषा हीच खरी, या निर्णयाला मी आलो. साध्या भाषेतून वाटेल तो आशय मांडता येईल, याचा मला आत्मविश्वास होता.

लेख वाचा…


रोहन-मुद्रेतील लक्षणीय सर्जनशील लेखन

अगस्ती इन अॅक्शन संच

३ थ्रीलर्स…


तिरकस राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक लिखाणासाठी तसेच चित्रपटविषयक लिखाणासाठी प्रसिद्ध. सकाळ, लोकसत्ता आणि आता महाराष्ट्र टाइम्स असा पत्रकारितेचा २८ वर्षांचा प्रवास. सध्या महाराष्ट्र टाइम्सच्या मुंबई आवृत्तीचे निवासी संपादक. चित्रपट समीक्षक तसेच रविवार पुरवणीचा समन्वयक म्हणून दीर्घकाळ काम. लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणीत ‘दोन फुल एक हाफ’ हे सदर ‘तंबी दुराई’ या नावाने १२ वर्षे लिहिलं, आणि ते सर्वदूर लोकप्रिय झालं आहे. त्याचे तीन खंड पद्मगंधा प्रकाशनतर्फे प्रकाशित झाले व त्यांना ‘राज्य शासनाचे सर्वोत्कृष्ट विनोदी लेखना’चे दोन पुरस्कार मिळाले. पुढे ‘तंबी दुराई' याच नावाने ‘दीड दमडी’ हे सदर महाराष्ट्र टाइम्समध्ये पाच वर्षे लिहिलं. ‘पावणे दोन पायाचा माणूस' ही कादंबरी प्रकाशित. पद्मगंधा, ऋतुरंग, आवाज, रूची, जत्रा अशा अनेक दिवाळी अंकांमध्ये सातत्याने लेखन केलं आहे. ‘एक हजाराची नोट', ‘ब्रेव्हहार्ट', ‘लोणावळा बायपास’. ‘माझी आई’ या आणि इतर चित्रपटांचे पटकथा-संवाद, गीत लेखन. ‘टिकल ते पॉलिटिकल’, ‘बंड्याचा फंडा’ इत्यादी मालिकांसाठी लेखन केलं आहे.

रोडमास्टर बाईकवरून मुंबईतल्या रस्त्यांवर आपले पिळदार दंड दाखवत अगस्ती सुसाट फिरू लागला की, समजावं… कुठेतरी काहीतरी घडलंय…अगस्ती इज इन अॅक्शन! टेक्नोसॅव्ही, सौंदर्याचा भोक्ता, फुडी आणि ऍडव्हेंचरस अगस्ती आपल्या तल्लख बुद्धिसामर्थ्याने आणि मनाचा ठाव घेण्याच्या कौशल्याने कल्पनाही करू शकणार नाही अशी काळोखी रहस्यं अशा प्रकारे उजागर करतो की, आपण थक्क होऊन म्हणतो, ‘हॅट्स ऑफ यार अगस्ती!’


360.00 Add to cart

हृषीकेश गुप्ते संग्रहिका

३ पुस्तकांत… २ लघुकादंबऱ्या, २ दीर्घ कथा


शिक्षणाने आणि व्यवसायाने केमिकल इंजिनिअर असलेले हृषीकेश गुप्ते हे मराठी साहित्यातले आजचे आघाडीचे तरुण सर्जनशील लेखक आहेत. रायगड जिल्ह्यातील नागोठणे या गावी त्यांच्या जन्म झाला आणि शिक्षणही तिथेच झाले. 2000 सालापासून त्यांनी लेखनाला सुरुवात केली आणि 2008 सालापासून त्यांचं लेखन विविध नियकालिकांमधून प्रसिद्ध झालं. मनातली भीतीची आदिम भावना, माणसाच्या लैंगिक प्रेरणा, त्याच्या भावभावनांची उलघाल ही त्यांच्या लेखनाची मुख्य आशयसूत्रं होतं. गूढ-अद्भुतता, चित्रमय, प्रासादिक व ओघवती भाषा या लेखनवैशिष्ट्यांमुळे त्यांचं लेखन खिळवून ठेवतं. 'दंशकाल’, 'चौरंग' या कादंबऱ्या, 'काळजुगारी’, 'हाकामारी' या लघुकादंबऱ्या आणि 'अंधारवारी’, ‘दैत्यालय’, 'घनगर्द’, 'परफेक्टची बाई, फोल्डिंगचा पुरुष' हे कथासंग्रह अशी त्यांची एकूण साहित्यसंपदा प्रकाशित आहे. विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांनी 'दिल, दिमाग और बत्ती’ या चित्रपटाचं आणि 'हजार वेळा शोले पाहिलेला माणूस’ या स्वलिखित कथेवर आधारित चित्रपटाचं दिग्दर्शनही केलं आहे.

स्थलकालाची रोचक, अद्भुत आणि रम्य सफर

घडवणारी, मराठी रूपककथांच्या दालनात

मोलाची भर घालणारी लघुकादंबरी… काळजुगारी

 

पारंपरिक कथांचे रचनाबंध वापरून

स्त्री-पुरुष संबंधांतले आदिम पदर उलगडणाऱ्या

दोन अनोख्या दीर्घ कथा…परफेक्टची बाई फोल्डिंगचा पुरुष

 

गूढ रहस्याच्या परिघाभोवती क्रौर्य आणि करुणेचे

अस्तर ल्यालेली, अंताला सार्वकालिक सामाजिक आशयाच्या

वेगळ्या उंचीला पोहोचवणारी लघुकादंबरी…हाकामारी


360.00 Add to cart

आर.के. नारायण संच

४ पुस्तकांचा सप्रेमभेट संच


आर.के. नारायण यांचा जन्म १० ऑक्टोबर १९०६ रोजी चेन्नई येथे झाला. त्यांचं बालपण चेन्नई येथे त्यांच्या आजोळी व्यतीत झालं. त्यांच्या वडिलांची ‘महाराजा हायस्कुल’, म्हैसूर येथे बदली झाल्यानंतर ते आपल्या कुटुंबासह म्हैसूर येथे वास्तव्यास आले. त्यांनी लेखनाची सुरुवात त्यांच्या १९३५ सालच्या ‘स्वामी अँड फ्रेंड्स’ या पुस्तकाने केली. ‘मालगुडी’ या काल्पनिक गावातील सर्वसामान्य माणसांचं आयुष्य सहज, ओघवत्या शैलीतून आणि मार्मिक विनोदातून चितारणं ही त्यांची खासियत ! त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. ‘गाइड’ या त्यांच्या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार आणि रॉयल सोसायटी ऑफ लिटरेचरतर्फे दिलं जाणारं ए.सी. बेन्सन मेडल प्राप्त झालं. अनेक विख्यात विद्यापीठांकडून त्यांना डी.लिट्. ही पदवी बहाल करण्यात आली. १९६४ साली त्यांना पद्मभूषण तर २००० साली पद्मविभूषण सन्मान प्राप्त झाला. १९८९मध्ये त्यांना राज्यसभेचं सभासदत्व बहाल करण्यात आलं. या महान लेखकाचा १३ मे २००१ रोजी वयाच्या ९४व्या वर्षी मृत्यू झाला.

अनुवाद :
पुणे विद्यापिठाच्या 'संस्कृत प्रगत अध्ययन केंद्रा'त संस्कृत आणि 'ललित कला केंद्रा'त संस्कृत व आनुषंगिक विषयांचं सरोज देशपांडे यांनी अनेक वर्षं अध्यापन केलं. जिज्ञासू तसेच जाणकार अशा सरमिसळ वाचक-वर्गासाठी 'संस्कृत साहित्यशास्त्राची तोंडओळख' हे त्यांनी पुस्तकही लिहिलं आहे. अनुवाद करणं हा त्यांचा छंद असून त्यांनी आजवर अनेक महत्त्वाच्या पुस्तकांचे अनुवाद केले आहेत. ’अशी काळवेळ’ या मराठीत अनुवादित केलेल्या पुस्तकासाठी त्यांना २०१० साली साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.

‘मालगुडी डेज’ आणि ‘स्वामी’ यांसारख्या दूरदर्शन मालिकांमुळे आर.के. नारायण प्रसिद्धीझोतात आले. त्यांच्या ‘द गाइड’ या कादंबरीवर आधारित असलेला ‘गाइड’ हा चित्रपट विशेष गाजला. आर.के. नारायण यांची खासियत म्हणजे अत्यंत सामान्य माणसाचं रोजच्या आयुष्याचं चित्रण सहज, ओघवत्या आणि मार्मिक विनोदातून रेखाटायची कला! त्यांच्या कथा एकाच वेळी मनाला स्पर्शूनही जातात आणि निखळ विनोदानी हास्याची कारंजीही उडवतात.

अशाच गाजलेल्या पुस्तकांपैकी काही निवडक पुस्तकांचा मराठी अनुवाद ‘रोहन प्रकाशन’तर्फे प्रसिद्ध करत आहोत.

संचात असलेली ४ पुस्तकं :

१. द इंग्लिश टीचर

२. द बॅचलर ऑफ आर्टस

३. मालगुडीचा नरभक्षक

४. महात्म्याच्या प्रतीक्षेत…


755.00 Add to cart

96 मेट्रोमॉल


मराठीतल्या आघाडीच्या तरुण लेखकांमध्ये प्रणव सखदेव यांचं नाव घेतलं जातं. त्यांनी अग्रगण्य मराठी दैनिकांत पत्रकार म्हणून काम केलं असून ते मराठी प्रकाशन क्षेत्रामध्ये संपादक व अनुवादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कथा आणि कविता मान्यवर नियतकालिकांमधून प्रकाशित होत असतात. ‘पायऱ्यांचा गेम आणि इतर कविता’ हा कवितासंग्रह, 'निळ्या दाताची दंतकथा’, ‘नाभितून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य' हे कथासंग्रह, व ‘काळेकरडे स्ट्रोक्स', ‘96 मेट्रोमॉल’ या कादंबऱ्या असं त्यांचं साहित्य प्रकाशित झालं आहे. त्यांना अनुवाद-प्रकल्पासाठी २०१५-१६ सालची ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ची अभ्यासवृत्तीही मिळाली आहे. त्यांना लेखनासाठी महत्त्वाची पारितोषिकं मिळाली असून इंग्रजीतल्या गाजलेल्या पुस्तकांचा अनुवाद त्यांनी केला आहे. फिक्शन लेखन करणं ही त्यांची पॅशन असून त्यातून समकालातल्या प्रश्नांचा भिडणं हे त्यांना महत्त्वाचं वाटतं. आजच्या तरुणांची मानसिकता, त्यांचे प्रश्न, विखंडित जगणं व तंत्रज्ञानाचा वाढता वापर या सगळ्याचं प्रतिबिंब त्यांच्या लेखनात पडलेलं दिसून येतं.

काळेकरडे स्ट्रोक्स’नंतरची प्रणव सखदेव यांची ही दुसरी कादंबरी. रूढार्थाने ‘काळेकरडे स्ट्रोक्स’ वास्तववादी कादंबरी आहे तर ‘96 मेट्रोमॉल’ ही अद्भुतिका! दोन्ही कादंबऱ्यांचे प्रोटॅगनिस्ट युवक असले, तरीही दोघांचे जीवनमार्ग पूर्णत: भिन्न आहेत, त्यांचं जग भिन्न आहे, त्यांतले घटना-प्रसंग, अनुभवविश्व भिन्न आहे. त्यामुळेच या दोन्ही कादंबऱ्या एकाच लेखकाच्या असल्या तरी त्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहणं भाग आहे!

‘96 मेट्रोमॉल’मधला मयंक एका काल्पनिक जगात प्रवेश करतो; हे जग असतं वस्तूंचं – आपण रोज वापरत असलेल्या वस्तूचं ! मयंकचा या वस्तूंशी जसजसा संबंध येऊ लागतो तसतसं त्या वस्तूच मयंकला वापरू लागतात! आणि यातूनच घडत जाते आजच्या उपभोगवादी जगण्यावर अद्भुतिकेतून भाष्य करणारी लघुकादंबरी…96 मेट्रोमॉल !


This novel is a work of fantasy. It speaks about the growing consumerism, self centered and individualistic approach


170.00 Add to cart

One Comment

    • नीतिन वैद्य

    • 2 years ago

    पंकजचे लेखन अप्रतिम . रोहनचे देणे म्हणावे इतके . घनदाट अरण्यातून फिरवून आणावे तसा अनुभव तो त्याच्या संदर्भांचा करण्यात घेऊन जातो तेव्हा येतो . डिकॅमेरॉन आणि चांदण्यातल्या गप्पा यातले काही सायुज्य जाणवावे तो क्षण साक्षात्कारी असावा . काशीबाईंचे लेखन अलिकडेच वाचले असल्याने त्यांचे खोलेंनी नोंदविलेले तपशील वाचताना त्या अनुभवाची काही पुनर्भेटही झाली .
    मोकाशींवरचे लेख वाचतानाही मजा आली . आपणही समांतर पावलं टाकली आहेत हे जाणवून आनंद वाटला .
    फक्त त्यात मी एवढ्या कथांत ‘काय रानटी माणसं आहेत’ या कथेचा काही संदर्भ येतोय का शोधत होतो . ओढाळ वयात ती फार आवडलेली , आता पुन्हा वाचेन .

    Hats off to Pankaj ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *