इमोझील

मनोबल उंचावणाऱ्या कथा


आरती भार्ज (मुंबई), या जीवन प्रशिक्षक आणि एनएलपी (न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग) मास्टर प्रॅक्टिशनर आहेत. त्यांनी मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण प्राप्त केले आहे. त्या मानसिक विकास सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. कार्यशाळा आणि समुपदेशन ह्यात त्यांना व्यापक अनुभव आहे. त्या प्राणिक ऊर्जा उपचारक आणि ध्यान प्रशिक्षक आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन, व्याख्यात्या आणि व्यावसायिक प्रशिक्षक म्हणूनही त्यांची ओळख आहे. तसेच विशेष मुले, (स्पेशल चिल्ड्रेन) व्यसनमुक्ती आणि धान्यदान या क्षेत्रांतील स्वयंसेवी संस्थांमध्येही त्या कार्यरत आहेत.
डॉ . महेश अभ्यंकर ( मुंबई ) , हे वैद्यकीय सल्लागार आणि औषधनिर्माणतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत . वैद्यकीय व्यावसायिक , समुपदेशक आणि संशोधक म्हणून त्यांचा व्यापक अनुभव आहे . एक उत्कृष्ट वक्ता आणि अशिक्षक म्हणूनही त्यांची ओळख आहे . देश - विदेशी पंधराशेहून अधिक वैद्यकीय व्याख्याने त्यांनी आजवर दिली आहेत . अनेक कंपन्यांमध्ये ते धोरणात्मक आणि व्यवस्थापन सल्लागार म्हणून कार्यरत आहेत . तसेच समाजसेवी आणि सांस्कृतिक कार्यकर्ता म्हणून अनेक स्वयंसेवी संस्थांशी ते संलग्न आहेत .

मनोबल उंचावणाऱ्या कथा

करोनाच्या संकटकाळात जागतिक स्तरावरील मानवी जीवनाला एक नवीन वळण मिळाले . सर्व स्तरांतील जनतेपुढे नवी आव्हानं उभी राहिली. आणि त्याचबरोबर जीवनातील प्रत्येक आव्हान हे आत्मपरीक्षणाची एक संधी असते , हेही या काळात प्रकर्षाने जाणवून गेलं . जगातील जवळपास प्रत्येक व्यक्तीने कमी अधिक प्रमाणात मानसिक दोलायमान स्थिती अनुभवली. सामान्य दिसणाऱ्या लोकांनी ह्या असामान्य परिस्थितीला कसे तोंड दिले , अडखळत , धडपडत का असेना , पण या काळात त्यांनी नव्या दिशा शोधल्या , असे सर्व दर्शविणाऱ्या कहाण्या म्हणजेच ‘ इमोझील ‘ अर्थात मनोबल उंचावणाऱ्या कथा.

वैद्यकीय सल्लागार डॉ . महेश अभ्यंकर आणि मानसिक विकास सल्लागार आरती भार्ज ह्यांनी ह्या काळात केलेल्या समुपदेशनावर आधारित या बारा कथा आहेत . या कहाण्या कुठल्याही कठीण काळात मार्गदर्शक ठरतील अशा आहेत . SP ह्या कथांतील पात्रांकडून तुम्हाला नवी उमेद , आयुष्य जगण्यासाठी नवीन दिशा मिळत राहील . नवनिर्माण करण्याची शक्ती आपल्याकडे आहे याची जाणीव होईल.’

आपल्यातील सुप्त मानसिक बळ ओळखा आणि सजगतेने कार्यरत राहा …. ‘ हेच सूत्र आपलं मनोरंजन करता करता सांगणारा कथासंग्रह ‘इमोझील’.

आयुष्य एक निरंतर प्रवास, आशा, अपेक्ष, भावना आणि भास एक दिवस सूर्योदय आपला असेल मनात ठेवावा नेहमी हा विश्वास!


This book is a collection of stories about human resilience and ultimately emerging as a winner with a Zeal. These short stories about psychological issues, faced by people during lock down will inspire many to transform their situation. Each story depicts real life emotional issues and coping mechanisms that can inspire millions across the globe. There is hope and despair, love and break-ups, serenity and anxiety. Yet there is a ray of hope and awareness that transforms lives.


 

250.00 Add to cart

एक ड्रीम…,मायला


सामंतांच्या जगण्याचे किंवा साहित्याचे वर्गीकरण होऊ शकलेले नाही, कारण कुठल्याही एका बाटलीत भरावे आणि लेबल चिकटवावे असे हे रसायन नाही. त्यांची प्रत्येक कथा, कादंबरी समुद्र आणि मातीमध्ये जगलेल्या त्यांच्या वादळी जीवनाचे चित्र प्रतिबिंबित करते . तंत्रानुसार आधी पटकथा लिहिली जाते, मग ती' शूट  केली जाते. सामंतांच्या लेखणीत दडलेला कॅमेरा आधी 'शूट' करतो मग ते चित्र कागदावर मुद्रित होते. जरी ते स्वतःला' सामान्य माणूस ' म्हणत असले तरी, त्यांच्या साहित्यातील न वाचलेल्या, न पाहिलेल्या विश्वाने वाचकांना आणि समीक्षकांना नेहमीच चकित केले आहे.

फुल फोकसमध्ये तो बाप्या उभा आहे समोर चबुतऱ्यावर.  काय म्हणून ?” लोकमान्य टिळक ते, भडव्या.  ” तेच ते !शहरात शिरू शकतात ते ? लालूच्या गावाहून आलेल्या मालीशवाल्यांना माहिताय ते कोण आहेत, त्यांना असं गावाबाहेर का काढलंय ते ? “मला असं शहराबाहेर उभं राह्यचं नाहीय. इटस् टाईम आय एन्टर द गेम बॉईज ! मी राडा करणारेय, भेंच्योद. शहर वाचवू शकतील अशा सगळ्याच बाप्यांना हिजड्यांनी शहराबाहेर काढलंय. चबुतऱ्यावर चढवलंय. आता कोणीही कुठेही घुसावं आणि राडा करावा. सातपुतेला मारावं, गरोदर बायकांना मारावं, पोरांना, म्हाताऱ्यांना उडवावं. जाळावं. बॉम्बच्या माळा लावाव्यात. मान वर करून कोणी बघतसुद्धा नाही . चार लाख सदतीस हजार नऊशे ही चिल्लर झाली भेंच्योद . भुकेल्या कुत्र्यांना भुलवणारं खरकटं , आता खरा माल कमवायचाय मला !

200.00 Add to cart

एक होती रितू…


रितू नंदाची अविस्मरणीय कहाणी


सत्या सरन या अनेक वर्षं पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. ‘मी’ या स्त्री-विषयक इंग्रजी नियतकालिकाच्या त्या संपादक आहेत. त्यांनी स्त्री-समस्यांवर व सिनेमाध्यमावर सातत्याने व्यापक अभ्यासपूर्ण लेखन केलं आहे. पत्रकारितेतील योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. ‘सुवर्णयुगा'तील हिंदी चित्रपट आणि चित्रपट-संगीत याबाबत विशेष रुची असलेल्या सत्या सरन यांनी अनेक लघुकथाही लिहिलेल्या आहेत.

अनुवाद :

‘रोहन प्रकाशन’च्या संपादन विभागात नीता कार्यरत असून संपादन, अनुवाद आणि लेखन क्षेत्रांत त्या गेली दहा वर्षं काम करत आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे आत्मचरित्र– ‘ड्रीम्स फ्रॉम माय फादर', ‘सुपरपॉवर?', ‘सिल्वा माइंड कंट्रोल' आणि ‘त्या दिवशी माझा मृत्यू झाला...' ही त्यांनी अनुवाद केलेली पुस्तकं. ‘सुपरपॉवर?' या त्यांच्या पुस्तकाला ‘नाशिक सार्वजनिक ग्रंथालया’चा सर्वोत्कृष्ट अनुवादाचा पुरस्कार मिळाला असून त्या कथालेखनही करतात. त्यांच्या कथांना पुरस्कारदेखील मिळाले आहेत.


रितू नंदा…..

राज कपूरची लाडकी लेक आणि उद्योजक राजन नंदा यांची प्रिय पत्नी…. पण एवढीच होती का रितूची ओळख ? तर नाही…

हे पुस्तक वाचल्यावर जाणीव होते की, रितूची ओळख कित्येक कोस या पलीकडची आहे.

सुप्रसिद्ध संपादिका व लेखिका सत्या सरन यांनी रितूच्या आयुष्याचा धांडोळा रसाळ भाषेत सखोलतेने घेतला आहे. शिवाय त्यांनी रितूचे कुटुंब सदस्य, जवळचे नातेवाईक, मित्र-मैत्रिणी, व्यवसायातले सहकारी, इलाज करणारे डॉक्टर्स आणि अनेक सुहृद यांना बोलतं करत तिचं असामान्य कर्तृत्व,

व्यक्तिमत्त्वातले अनेक पैलू, स्वभावातल्या बारीक छटा यांचा उलगडा केला आहे…. यातूनच समजतं….

मृदु मनाची रितू एक उत्तम गृहकर्तव्यदक्ष गृहिणी तर होतीच; पण त्याचबरोबर ती स्वतः एक कल्पक व मेहनती उद्योजिका होती आणि कठीण प्रसंगांना धैर्याने भिडणारी, आयुष्याला सामोरी जाणारी कणखर स्त्री होती.

तिचीच ही प्रेरणादायी कहाणी एक होती रितू…


300.00 Add to cart

कनुस्मृती + १ कथा

 


गीतांजली भोसले यांचा जन्म सोलापूरचा , बालपण पुण्यातलं . त्यांनी मुंबई विद्यापीठातून बी.एस.डब्लू . आणि पुणे विद्यापीठातून मास कम्युनिकेशन या पदव्या संपादित केल्या आहेत . आय.टी. क्षेत्रात त्यांनी कॉन्टेन्ट रायटर आणि इंस्ट्रक्शनल डिजायनर म्हणून काही काळ नोकरी केली आणि तिथूनच त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली . पुणे विद्यापीठात त्यांनी सहअध्यापक म्हणून काम केलं आहे. गेल्या काही वर्षांपासून त्या बेल्जियम येथे स्थायिक आहेत . वेगवेगळ्या भाषा शिकण्याची त्यांना विशेष आवड आहे . ' अँटवर्प युनिव्हर्सिटी'मध्ये त्या फ्रेंच भाषा शिकत आहेत . सध्या वाचन आणि भटकंती हे त्यांचे छंद आहेत . विविध देशात फिरून , तिथले अनुभव घेणे , त्या देशातील संस्कृती अभ्यासणे आणि त्यावर लिहिणे यामध्ये त्या विशेष रमतात . त्यांच्या भटकंतीमध्ये इतर देशातील लहान मुलांची पुस्तकं बघत असतांना आपल्या देशातील बालसाहित्यातही काही नवं देण्याच्या उद्देशाने त्यांनी लिखाणाला सुरुवात केली .

कोणत्यातरी भुल्या बिसऱ्या काळातल्या नाहीत .. आज्जी – आजोबांनी सांगितलेल्याही नाहीत … या आहेत मोबाइल युगातल्या स्मार्ट मुला – मुलींच्या रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या ताज्या , खुसखुशीत आणि हॅपनिंग कथा ! साहसी … गुंतवून ठेवणाऱ्या …. कल्पनेच्या जगात घेऊन जाणाऱ्या … वेगळा विचार देणाऱ्या आणि नकळत तुम्हाला आयुष्याचं सार हलकेच सांगून जाणाऱ्या अशा या ६ स्मॅशिंग डॅशिंग कथा … 

कनुस्मृती

तिला नेहेमी पडणारं ते स्वप्न ….

गजरे माळलेल्या त्या दोघीजणी … तडफडत प्राण सोडणारी ती बाई …

हे सगळं आधीच घडून गेलय का ? हजारो वर्षांपूर्वी ?

काय खरं … काय खोटं तिला काहीच ठरवता येईना !

समर कॅम्प

तो कॅम्पचा शेवटचा दिवस होता हे तिच्या गावीही नव्हतं …. ७ दिवसांपूर्वी जो कॅम्प लवकरात लवकर संपावा म्हणून आभा प्रार्थना करत होती तो आज संपणार होता …. कॅम्प संपतोय या गोष्टीचं आभाला वाईट वाटत होतं आणि याच गोष्टीनी ती स्वतः अचंबित झाली होती ….


 

100.00 Add to cart

कमाल धमाल गोष्टी


3 पुस्तकांचा ८ गोष्टींचा संच


गीतांजली भोसले यांचा जन्म सोलापूरचा , बालपण पुण्यातलं . त्यांनी मुंबई विद्यापीठातून बी.एस.डब्लू . आणि पुणे विद्यापीठातून मास कम्युनिकेशन या पदव्या संपादित केल्या आहेत . आय.टी. क्षेत्रात त्यांनी कॉन्टेन्ट रायटर आणि इंस्ट्रक्शनल डिजायनर म्हणून काही काळ नोकरी केली आणि तिथूनच त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली . पुणे विद्यापीठात त्यांनी सहअध्यापक म्हणून काम केलं आहे. गेल्या काही वर्षांपासून त्या बेल्जियम येथे स्थायिक आहेत . वेगवेगळ्या भाषा शिकण्याची त्यांना विशेष आवड आहे . ' अँटवर्प युनिव्हर्सिटी'मध्ये त्या फ्रेंच भाषा शिकत आहेत . सध्या वाचन आणि भटकंती हे त्यांचे छंद आहेत . विविध देशात फिरून , तिथले अनुभव घेणे , त्या देशातील संस्कृती अभ्यासणे आणि त्यावर लिहिणे यामध्ये त्या विशेष रमतात . त्यांच्या भटकंतीमध्ये इतर देशातील लहान मुलांची पुस्तकं बघत असतांना आपल्या देशातील बालसाहित्यातही काही नवं देण्याच्या उद्देशाने त्यांनी लिखाणाला सुरुवात केली .

सध्याचा जमाना कितीही इंटरनेट आणि ऑनलाइन गेम्सचा असला तरी गोष्ट म्हटली की अजूनही तुमचे डोळे लुकलुकतात ना ? गोष्टींच्या अद्भुत जगात आजही तुम्ही मस्तपैकी रमता की नाही ? म्हणूनच तुमच्या इंटरेस्टचा विचार करून लेखिका गीतांजली भोसले सांगते आहे , खूप सारं मनोरंजन करणाऱ्या आणि थोडासा विचारही करायला लावणाऱ्या ८ कमाल धमाल गोष्टी … 

१. चमत्कारी केक 

२. जग्गू बग्गू

३. पिंकू आणि चिंकी

 


 

210.00 Add to cart

काम तमाम @ वाघा बॉर्डर


मराठीतील महत्त्वाचे 'लिहिते लेखक' असलेल्या सतीश तांबे यांची कथालेखक व संपादक अशी वाचकांना ओळख आहे. वास्तव व कल्पना यांची सरमिसळ, सूक्ष्म विचार आणि चिंतन-मनन यांची बांधेसूद रचना म्हणजे त्यांच्या कथा असतात. म्हणूनच ज्येष्ठ समीक्षक म.द. हातकणंगलेकर यांनी तांबे यांच्या कथांना ' नव (नव) कथांच्या पलीकडे जाणाऱ्या कथा' असं म्हटलं आहे. तांबे यांनी बीएस्सी केल्यानंतर एमए केलं. एमएला ते मराठी आणि सौंदर्यशास्त्र या विषयांमध्ये सर्वाधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाले. त्यांच्या लेखनाची सुरुवात कवितांपासून झाली. नंतर त्यांनी वृत्तपत्रांमधून स्तंभलेखन व सदरलेखन केलं. त्यांची ' साप्ताहिक दिनांक'मधील 'मोकळीक' , तसेच 'आपलं महानगर' या सायंदैनिकातील 'हळक्षज्ञ' आणि 'लगोरी' ही सदरं विशेष गाजली. कथांसोबतच त्यांनी एकांकिका लेखन केलं आहे. तसेच विचक्षण संपादक म्हणूनही काम केलं आहे. 'आजचा चार्वाक' ( १९८९ ते १९९८) हा दिवाळी अंक आणि ‘अबब! हत्ती' (१९९१ ते १९९६) हे लहान मुलांचं मासिक यांच्या संपादनात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या कथासंग्रहांना राज्य शासनाचे पुरस्कार मिळाले असून इतर महत्त्वाचे पुरस्कारही मिळालेले आहेत.

या कथा आपल्याला थेट भिडतात याचे कारणच मुळी त्या आपल्या परिचित परिसरातल्या आहेत. परंतु त्या परिचित वास्तवाला अनपेक्षित छेद देऊन आपल्याला काहीशा गूढ आणि काहीशा रहस्यमय अवास्तवाकडे घेऊन जातात. वाचताना धक्का बसतो, भीतीही वाटते आणि म्हणून उत्कंठाही वाढते. सतत कुठेतरी जाणवत राहते की या ‘अवास्तव वास्तवाला’ आणि त्यातील क्रौर्याला तसेच करुणेला आपल्या मनात खोल स्थान आहे… संशयाने आणि भीतीने, अनिश्चिततेने आणि अस्वस्थतेने आपले दैनंदिन जीवन कसे वेढलेले आहे हे या सर्व कथांमध्ये ठसठसत जाणवत राहते.

कुमार केतकर (प्रस्तावनेतून)

मराठी कथा-साहित्यात सतीश तांबे यांच्या कथेचं स्वतंत्र स्वयंभू घराणं आहे. त्याला महानगरी कथेच्या कोंदणात कोंबू नये. तिचं वळण बौद्धिक आहे. शैली ऐसपैस गजाली सांगणाऱ्या गोष्टींची आहे. तिचं अनुकरण सोपं नाही, कारण ती विशिष्ट विचार प्रक्रियेतून प्रसवलेली असते.

जयंत पवार


 

260.00 Add to cart

कूस


ज्ञानेश्वर प्रकाश जाधवर माणसांतील जगण्याच्या प्रेरणांचा शोध घेणं हा ज्ञानेश्वरचा आवडता छंद. या छंदासाठी तो हरतऱ्हेच्या माणसांना भेटायला उत्सुक असतो. त्यांचं जगणं समजून घ्यायला त्याला आवडतं. निसर्गातील प्राणी, पक्षी, झाडी, जंगल यांच्यातही तो रमतो, त्यांच्यासोबत वेळ घालवतो. वेगवेगळ्या अनुभवांच्या शोधात तो गावोगावी फिरत असतो. या फिरण्यात त्याला जे सापडतं ते त्याला कधी विसरून जावंसं वाटतं तर कधी गोष्ट रूपाने मांडावंसं वाटतं. स्वत:चं जगणं, सोबतच्यांचं जगणं आणि अवतीभवती घडणारे प्रसंग हे सर्व म्हणजेच त्याची पहिली कादंबरी - 'यसन' असं त्याचं म्हणणं. जगतांना मनात उद्भवणारे विचारच त्याला लिहिण्यास प्रवृत्त करतात. स्वत:च्या जगण्यासोबत समूह म्हणून जगण्यातला माणसाचा तळही तो तपासत असतो, त्याच्या नोंदी करत असतो. विविध मानवी समूहांच्या नोंदी करतांना तो खूप काही शिकत असतो, असं त्याला वाटतं. त्या शिकण्यातूनच 'यसन', 'लॉकडाउन', 'कूस' आणि 'चंबूगबाळं' या कादंबऱ्या तयार झाल्या. या कादंबऱ्यांसोबत अनेक एकांकिका, नाटकं, कथा त्याने लिहिल्या आहेत. त्याशिवाय शरद पवार फेलोशिप, यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबईचा युवा साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा श्री. ना. पेंडसे प्रथम प्रकाशन पुरस्कार, आपटे वाचन मंदिर पुरस्कार, कुंडलकृष्णाई प्रतिष्ठानचा पुरस्कार असे अनेक प्रतिष्ठित आणि मान्यवर संस्थांकडून दिले जाणारे पुरस्कार त्याला त्याच्या साहित्यासाठी मिळाले आहेत.

ऊस तोडणीसाठी स्थलांतरित होणाऱ्या मजुरांमध्ये निम्मे प्रमाण महिलांचे आहे. दोन जणांचा मिळूनच ‘कोयता’ होतो. ऊस तोडणीच्या काळात पाळीच्या दिवसातही महिला कष्टप्रद काम करतात. पाळीची कटकट नको म्हणून गर्भाशय काढून टाकण्याचा दुःसह मार्ग असंख्य महिलांनी असाहायपणे स्वीकारला. या महिलांनी जे भोगले त्याचे यथार्थ चित्रण ‘कूस’ या कादंबरीत आले आहे. हा विषय कथात्म साहित्यात आणताना ज्ञानेश्वर जाधवर यांनी आपल्याकडील अनुभवांचे आंतरिकीकरण करून तपशीलांना सघन असा अर्थ प्राप्त करून दिला आहे. या कादंबरीत सुरेखा या व्यक्तिरेखेचा संघर्ष प्रभावीपणे आला आहे. एका अर्थाने अशा असंख्य सुरेखा जगण्याच्या चरकात पिळून निघतात आणि त्यांच्या आयुष्याचेच चिपाड होते. एका सुरेखाची ही प्रातिनिधिक कहाणी म्हणजे जणू राबणाऱ्या बाईच्या वाट्याला आलेल्या अंतहीन यातनांचे दर्शन आहे. जिथे कादंबरी संपते तिथून ती वाचकांच्या मनात सुरू होते…

-आसाराम लोमटे, सुप्रसिद्ध साहित्यिक

ज्ञानेश्वर जाधवर यांनी पिढ्या न् पिढ्या कष्ट करणाऱ्या ऊस तोडणी मजुरांच्या कुटुंबांचं दैनंदिन जीवन, त्यांना करावा लागणारा संघर्ष, स्थानिक राजकारणी, मुकादम मजुरांमधील संवाद, कोपीमध्ये झालेलं बाळंतपण, जगण्याची प्रत, निवडणुका, अलीकडच्या काळात गर्भाशय काढून टाकण्याच्या घटना…. असा एक व्यापक पट ‘कस’ या कादंबरीत त्यांनी शब्दबद्ध केला आहे. ऊस तोडणीच्या कामात खाडा झाला की आर्थिक नुकसान होतं आणि पतलेली उचल फिटत नाही त्यामुळे नवऱ्याची मारझोड सुरू होते आणि अंतिमतः त्याची परिणती गर्भाशय काढण्यापर्यंत जाते! शहरी पांढरपेशी माणसाला विचार करायला लावणारं हे सत्य कादंबरीतून वाचताना अंगावर अक्षरशः शहारे आणतं. २१व्या शतकात समाजाचा आर्थिक स्तर उंचावला जात असताना ऊस तोडणी मजुरांच्या हालअपेष्टांनी भरलेल्या आयुष्यावर प्रकाश टाकणारी ही कादंबरी आपण अजूनही किती मागे आहोत तेच दर्शवते.

-शेखर गायकवाड, साखर आयुक्त, महाराष्ट्र राज्य


 

360.00 Add to cart

गोग्रॅमचा चितार

 

मराठी साहित्य क्षेत्रातील रहस्य-गूढ आणि भयकथा लेखकांतलं अग्रगण्य नाव म्हणजे नारायण धारप! गूढ लेखनाला अनेकदा विज्ञानाची डूब देत ही त्यांनी लेखन केलं आहे. त्यांच्या विज्ञान कथा ही तेवढ्याच ताकदीच्या आणि रंजक असतात. नारायण धारप यांचे नियमित वाचक असणाऱ्यांना त्यांच्या लेखनातला थरार आणि औतुक्य निर्माण करण्याचं सामर्थ्य ठाऊक आहेच. त्यांचे लेखन पुन्हा पुन्हा वाचलं तरी जुनं वाटत नाही किंवा कथेचा शेवट माहीत असला, तरी ज्या वळणवाटांवरून ते वाचकांना शेवटपर्यंत नेतात, त्यामुळे त्यांच्या ताजेपणा तसाच राहतो. धारप यांचा विज्ञान विषयक वाचन त्यांची कल्पकता आणि कथा फुलवत नेण्याच्या तंत्रावची हुकुमत त्यांच्या लेखनात दिसून येते.

विजयचे लक्ष वर गेले. त्याला अगदी डोक्यावर एक लाल व एक पिवळा असे चमचमणारे दोन बिंदू दिसले. ताऱ्यांना रंग नसतात व ग्रह चमचम करत नाहीत . हे चमचम करणारे दोन प्रकाशबिंदू हलत होते… खाली त्याच्याकडे येत होते.  कोणीतरी खूप मोठ्या आवाजात रेडिओ लावला असावा , असा आवाज येत होता . त्याच्या अवतीभवती घुमणारा तो विलक्षण आवाज तसाच चालू राहिला.. आणि विजयच्या डोळ्यांसमोर हे असे विविध रंगछटांनी चमकणारे काहीतरी त्याच्यापासून पाच फूटावरच हिरवळीवर टेकले … आणि लगेच त्याच्या नावाने हाका ऐकू येऊ लागल्या… विजय… विजय ! विख्यात भयकथा, गूढकथा आणि विज्ञानकथा लेखक नारायण धारप यांची कुमारवयीन वाचकांसाठी उत्कंठावर्धक कादंबरी…

गोग्रॅमचा चितार !


 

175.00 Add to cart

चतुर


मराठीतल्या आघाडीच्या तरुण लेखकांमध्ये प्रणव सखदेव यांचं नाव घेतलं जातं. त्यांनी अग्रगण्य मराठी दैनिकांत पत्रकार म्हणून काम केलं असून ते मराठी प्रकाशन क्षेत्रामध्ये संपादक व अनुवादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कथा आणि कविता मान्यवर नियतकालिकांमधून प्रकाशित होत असतात. ‘पायऱ्यांचा गेम आणि इतर कविता’ हा कवितासंग्रह, 'निळ्या दाताची दंतकथा’, ‘नाभितून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य' हे कथासंग्रह, व ‘काळेकरडे स्ट्रोक्स', ‘96 मेट्रोमॉल’ या कादंबऱ्या असं त्यांचं साहित्य प्रकाशित झालं आहे. त्यांना अनुवाद-प्रकल्पासाठी २०१५-१६ सालची ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ची अभ्यासवृत्तीही मिळाली आहे. त्यांना लेखनासाठी महत्त्वाची पारितोषिकं मिळाली असून इंग्रजीतल्या गाजलेल्या पुस्तकांचा अनुवाद त्यांनी केला आहे. फिक्शन लेखन करणं ही त्यांची पॅशन असून त्यातून समकालातल्या प्रश्नांचा भिडणं हे त्यांना महत्त्वाचं वाटतं. आजच्या तरुणांची मानसिकता, त्यांचे प्रश्न, विखंडित जगणं व तंत्रज्ञानाचा वाढता वापर या सगळ्याचं प्रतिबिंब त्यांच्या लेखनात पडलेलं दिसून येतं.

साहित्य अकादमी युवा पुरस्कार प्राप्त लेखकाची तिसरी कादंबरी…

चतुर

खरंतर गोष्ट आहे तशी साधी…

एका नवख्या लेखकाची इच्छा असते की,
मरण्याआधी त्याने लिहिलेल्या गोष्टींचं पुस्तक व्हावं.
पण तसं काही घडत नाही, तो मरतो..
मग त्याची बायको ठरवते, आपण करू त्याची इच्छा पूर्ण !
आणि तिला सापडतात त्याने लिहिलेल्या आणखी काही गोष्टी….
आता काय? तिला पडतो प्रश्न.
मूळ पुस्तकात या नव्या गोष्टी घालता घालता
ती स्वत:देखील लिहू लागते…..!
तर ही गोष्ट आहे तशी साधी –
मरणाची… आठवणींची… प्रेमाची… बालपणाची….
वयात येण्याची… मोठं होण्याची… तिची… त्याची….
आणि
काडेपेटीत अडकलेल्या एका चतुराची…!

240.00 Add to cart

चंद्राची सावली

 

मराठी साहित्य क्षेत्रातील रहस्य-गूढ आणि भयकथा लेखकांतलं अग्रगण्य नाव म्हणजे नारायण धारप! गूढ लेखनाला अनेकदा विज्ञानाची डूब देत ही त्यांनी लेखन केलं आहे. त्यांच्या विज्ञान कथा ही तेवढ्याच ताकदीच्या आणि रंजक असतात. नारायण धारप यांचे नियमित वाचक असणाऱ्यांना त्यांच्या लेखनातला थरार आणि औतुक्य निर्माण करण्याचं सामर्थ्य ठाऊक आहेच. त्यांचे लेखन पुन्हा पुन्हा वाचलं तरी जुनं वाटत नाही किंवा कथेचा शेवट माहीत असला, तरी ज्या वळणवाटांवरून ते वाचकांना शेवटपर्यंत नेतात, त्यामुळे त्यांच्या ताजेपणा तसाच राहतो. धारप यांचा विज्ञान विषयक वाचन त्यांची कल्पकता आणि कथा फुलवत नेण्याच्या तंत्रावची हुकुमत त्यांच्या लेखनात दिसून येते.

संतापाने ओरडत त्या माणसाने तिच्यावर झडप घातली आणि दोन्ही हातांनी तिचा गळा आवळला . त्याचे हात निघताच ती तशीच वेडीवाकडी खाली कोसळली … ती गतप्राण झाली होती . तिला उचलून घेऊन तो खडक उतरू लागला . रात्रीचा एक पक्षी कर्कश किंकाळी मारत त्याच्या जवळून गेला . त्याच्या हातून तिचं शरीर निसटलं . घाम फुटून तो खाली वाकला आणि शहारला … तिचे डोळे उघडे होते . त्यात आता बुबुळं नव्हती चंद्रप्रकाशात ते चकचकत होते . धीर सुटून त्याने तोंड फिरवलं आणि तिथून धूम ठोकली . नंतर अवाढव्य अशा ‘ छतारीया इस्टेटचा पिच्छा बुबुळं नसलेल्या तिच्या शरीराने सोडला का ? अघटित आणि अतर्क्य गोष्टींचा भयानक खेळ चंद्राची सावली ! विख्यात भयकथा , गूढकथा आणि विज्ञानकथा लेखक नारायण धारप यांची सर्वच वयाच्या वाचकवर्गाला गुंगवून टाकणारी कादंबरी !


 

125.00 Add to cart

चमत्कारी केक + १ कथा

 


गीतांजली भोसले यांचा जन्म सोलापूरचा , बालपण पुण्यातलं . त्यांनी मुंबई विद्यापीठातून बी.एस.डब्लू . आणि पुणे विद्यापीठातून मास कम्युनिकेशन या पदव्या संपादित केल्या आहेत . आय.टी. क्षेत्रात त्यांनी कॉन्टेन्ट रायटर आणि इंस्ट्रक्शनल डिजायनर म्हणून काही काळ नोकरी केली आणि तिथूनच त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली . पुणे विद्यापीठात त्यांनी सहअध्यापक म्हणून काम केलं आहे. गेल्या काही वर्षांपासून त्या बेल्जियम येथे स्थायिक आहेत . वेगवेगळ्या भाषा शिकण्याची त्यांना विशेष आवड आहे . ' अँटवर्प युनिव्हर्सिटी'मध्ये त्या फ्रेंच भाषा शिकत आहेत . सध्या वाचन आणि भटकंती हे त्यांचे छंद आहेत . विविध देशात फिरून , तिथले अनुभव घेणे , त्या देशातील संस्कृती अभ्यासणे आणि त्यावर लिहिणे यामध्ये त्या विशेष रमतात . त्यांच्या भटकंतीमध्ये इतर देशातील लहान मुलांची पुस्तकं बघत असतांना आपल्या देशातील बालसाहित्यातही काही नवं देण्याच्या उद्देशाने त्यांनी लिखाणाला सुरुवात केली .

सध्याचा जमाना कितीही इंटरनेट आणि ऑनलाइन गेम्सचा असला तरी गोष्ट म्हटली की अजूनही तुमचे डोळे लुकलुकतात ना ? गोष्टींच्या अद्भुत जगात आजही तुम्ही मस्तपैकी रमता की नाही ? म्हणूनच तुमच्या इंटरेस्टचा विचार करून लेखिका गीतांजली भोसले सांगते आहे , खूप सारं मनोरंजन करणाऱ्या आणि थोडासा विचारही करायला लावणाऱ्या ८ कमाल धमाल गोष्टी …

 

चमत्कारी केक

चमत्कारी केक नक्की करतो काय ? गाणं म्हणतो ? डान्स करतो ? सेल्फी काढतो की … तुम्हाला गायबच करून टाकतो ?

 

अदला – बदली

एक दिवशी तुम्ही झोपेतून उठलात आणि आरश्यात बघितलंत …. तुमच्या ऐवजी तुम्हाला आरश्यात एका बैलाचं किंवा शेळीचं प्रतिबिंब दिसलं तर ?


 

70.00 Add to cart

जग्गू बग्गू + २ कथा

 


गीतांजली भोसले यांचा जन्म सोलापूरचा , बालपण पुण्यातलं . त्यांनी मुंबई विद्यापीठातून बी.एस.डब्लू . आणि पुणे विद्यापीठातून मास कम्युनिकेशन या पदव्या संपादित केल्या आहेत . आय.टी. क्षेत्रात त्यांनी कॉन्टेन्ट रायटर आणि इंस्ट्रक्शनल डिजायनर म्हणून काही काळ नोकरी केली आणि तिथूनच त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली . पुणे विद्यापीठात त्यांनी सहअध्यापक म्हणून काम केलं आहे. गेल्या काही वर्षांपासून त्या बेल्जियम येथे स्थायिक आहेत . वेगवेगळ्या भाषा शिकण्याची त्यांना विशेष आवड आहे . ' अँटवर्प युनिव्हर्सिटी'मध्ये त्या फ्रेंच भाषा शिकत आहेत . सध्या वाचन आणि भटकंती हे त्यांचे छंद आहेत . विविध देशात फिरून , तिथले अनुभव घेणे , त्या देशातील संस्कृती अभ्यासणे आणि त्यावर लिहिणे यामध्ये त्या विशेष रमतात . त्यांच्या भटकंतीमध्ये इतर देशातील लहान मुलांची पुस्तकं बघत असतांना आपल्या देशातील बालसाहित्यातही काही नवं देण्याच्या उद्देशाने त्यांनी लिखाणाला सुरुवात केली .

सध्याचा जमाना कितीही इंटरनेट आणि ऑनलाइन गेम्सचा असला तरी गोष्ट म्हटली की अजूनही तुमचे डोळे लुकलुकतात ना ? गोष्टींच्या अद्भुत जगात आजही तुम्ही मस्तपैकी रमता की नाही ? म्हणूनच तुमच्या इंटरेस्टचा विचार करून लेखिका गीतांजली भोसले सांगते आहे , खूप सारं मनोरंजन करणाऱ्या आणि थोडासा विचारही करायला लावणाऱ्या ८ कमाल धमाल गोष्टी …

 

छापा – काटा

तुम्हाला तुमच्याकडचं भूभूचं किंवा मनीमाऊचं पिल्लू खूप खूप आवडतं . पण हे असं तुम्हाला वाटतं ना ! समज त्या पिल्लालाच विचारलं तर ?

 

जग्गू – बग्गू

एका सुगरण पक्षिणीनं एका घुबडाच्या पिल्लाला आपल्या घरट्यात घेतलं , त्याला आईसारखं प्रेम दिलं आणि वाढवलं तर खरं … पण मोठा झाल्यावर तो त्याच्याच भावांना , आईला तर नाही ना खाणार ?

 

सच्ची सारण्या

तुम्ही प्रामाणिक असाल .. अगदी खऱ्या खऱ्या मनाचे असल तर तुम्हाला जगात अगदी काहीही मिळू शकतं . नाही खरं वाटतं ? मग वाचा तर !

70.00 Add to cart
1 2 3 49