MN_Sep20

Reading Time: 10 Minutes (1,012 words)

दिल्ली या राजधानीच्या शहरात पत्रकारिता करणे हे एक मोठे आव्हान असते. कारण एकतर सध्या देशाचा कारभार तेथून चालतो. आणि त्यासाठी नानाविध राज्यांतील, प्रांतांतील, लोकप्रतिनिधी, राजकारणी, शासकीय अधिकारी यांचा तेथे वावर चालू राहतो. त्यांच्यात मिसळायचे, त्यांच्याकडून बातम्या मिळवायच्या हे काम तसे सोपे नाही. त्यासाठी इंग्रजी, हिंदी आदी भाषांवर चांगले प्रभुत्व असावयास हवे. अर्थात, दिल्लीत काम करत असलेले अनेक मराठी व अन्य भाषिक पत्रकार आपले कार्यक्षेत्र आपल्या राज्यापुरतेच मर्यादित ठेवतात. त्यांचे वावरणे हे त्यांच्या राज्यांतील लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांपुरतेच राहते. राजधानीच्या या शहरात विविध देशांच्या वकिलातीही असतात. त्यांच्या राजदूतांशी किंवा अन्य परदेशी अधिकाऱ्यांशी संबंध ठेवून, वाढवून परदेशांतील विविध बातम्या मिळवणाऱ्या पत्रकारांची संख्या तर, फारच कमी. पण गेली बरीच वर्षं दिल्लीत स्थायिक असलेले एक ज्येष्ठ पत्रकार विजय नाईक हे मात्र त्याला अपवाद म्हणावे लागतील. परराष्ट्र राजकारण हा त्यांचा एक आवडीचा विषय. त्यातूनच त्यांनी त्या विषयावर मराठीत काही पुस्तकेही लिहिली आहेत. ‘साऊथ ब्लॉक, दिल्ली’ हे त्यांचे पहिले पुस्तक मला आवडले होते. म्हणूनच त्यानंतर रोहन प्रकाशनातर्फे त्यांचे प्रसिद्ध झालेले ‘शिष्टाईचे इंद्रधनू’ हे पुस्तक आवर्जून वाचले.

नाईक यांनी पुस्तकाच्या मनोगतात, ‘शिष्टाईचे इंद्रधनू’ या पुस्तकाचे सारे सार अत्यंत योग्य शब्दात वर्णन केले आहे. राष्ट्रप्रमुख असो, राजदूत असो, की शिष्टाईच्या क्षेत्रात वावरणारा अन्य अधिकारी असो – अखेर सारी माणसेच. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. माणसांचे प्रकार मोजता येत नाहीत. तऱ्हाही अनेक. जगातील सुमारे शंभरपेक्षा अधिक नेत्यांच्या स्वभावातील लकबी, संभाषणचातुर्य, विद्वत्ता, धैर्य, विनोदप्रचुरता, चिकाटी, खंबीरपणा, मनमिळावू वृत्ती, भयचकितता, विक्षिप्तपणा, डँबिस वृत्ती, धसमुसळेपणा, रानटीपणा, क्रौर्य, बेफिकिरी, आदी स्वभाववैशिष्ट्यांचं मनोरम दर्शन या पुस्तकातून वाचकांना होतं.
राजनैतिक क्षेत्रात वावरणाऱ्या व्यक्तींच्या जीवनात जे निरनिराळ्या प्रकारचे चांगले, वाईट अनुभव, घटना, गोष्टी ऐकायला किंवा वाचायला मिळतात, त्यांवर खुलेपणाने लिहिण्याची पद्धत परदेशांत फार पूर्वीपासून प्रचलित आहे. वाचकांचाही त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो. अशाच विविध पुस्तकांतील घटना, अनुभव एकत्रित करून, त्यावर स्वत:ची टिप्पणी करून, नाईक यांनी आपल्या या पुस्तकात दिले आहेत. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी त्यांनी पुस्तकाचा संदर्भही दिला आहे. अनपेक्षितपणे निर्माण होणारे अफलातून प्रसंग व या घटना वाचताना मजा तर वाटतेच, पण दैनंदिन जीवनातील ताणतणावांना क्षणिक का होईना, पण आरामही मिळतो. या पुस्तकातील प्रसंग अगदी छोटे छोटे, गमतीदार पण माहितीपूर्ण आहेत. त्यांतून आपल्याला खूप नवीन माहितीही मिळते. त्यांतील मला आवडलेले दोन प्रसंग या ठिकाणी नमूद करावेसे वाटतात.

  • डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन उपराष्ट्राध्यक्ष पदावर असताना चीनच्या दौऱ्यावर गेले होते. ते शाकाहारी आहेत, हे चीनच्या अधिकाऱ्यांना माहिती होतं. पण भोजनाच्यावेळी भला मोठा मेन्यू असायचा. त्यावर सारे ताव मारायचे. पहिल्याच औपचारिक शाही भोजनाच्यावेळी समोर ठेवलेल्या एका पदार्थाचं नाव होतं ‘द ड्रॅगन अँड द टायगर’. प्रत्यक्षात ती संथ आचेवर शिजवलेली मांजर व तुकडे केलेला साप अशी डिश होती. ती पाहून राजदूत नेहरू यांच्या पत्नी श्रीमती आर. के. नेहरू यांना धक्काच बसला. पण चीनच्या दृष्टीने उपराष्ट्रपतींच्या सन्मानार्थ तयार करण्यात आलेल्या मेजवानीतील अनेक खास पदार्थांपैकी ते दोन पदार्थ होते. सर्वसाधारणत: शाकाहारी भोजनातील पहिल्या शाकाहारी पदार्थांची चव घेतल्यानंतर डॉ. राधाकृष्णन थांबायचे. तसंच इथेही झालं. समोरच्या टेबलावरील तब्बल २३ पदार्थांकडे पाहताना ते अक्षरश: कंटाळून गेले.
  • पाँडेचरी हे राज्य २८० वर्षांच्या वसाहतवादी शासनानंतर १९५४मध्ये भारतात विलीन झालं. परराष्ट्र खात्यातील पी.जे.राव नावाच्या अधिकाऱ्याची पाँडेचरीच्या कौन्सुल जनरलच्या कार्यालयात बदली झाली, व केवलिंसग हे तिथे भारताचे कौन्सुल जनरल होते. १९५५च्या सुमारास परराष्ट्रमंत्री स्वर्णसिंग पाँडेचरीच्या दौऱ्यावर गेले. काँग्रेसला त्या वेळी मद्याचं वावडं होतं. आणि केंद्रात काँग्रेसचेच सरकार होतं. ते लक्षात घेऊन, ‘मंत्रिमहोदयांचं आगमन होण्यापूर्वी एकेक पेग लावून घ्या,’ असे राव व अन्य सहकाऱ्यांना खुद्द केवलसिंग यांनीच सुचवलं. त्याबरोबर सारेजण दालनातील बारकडे धावले व्हिस्कीचे ग्लास भरून हॉलमध्ये आले. त्या सर्वांच्या दुर्दैवाने स्वर्णसिंग ठरलेल्या वेळेपेक्षा पंधरा मिनिटे आधीच आले. ते थेट हॉलमध्येच. राव त्या वेळी दरवाजापाशीच होते. बाकी साऱ्यांनी मंत्रिमहोदयांना पाहून आतल्या खोलीत पोबारा केला. मंत्र्यांचं स्वागत करायला राव पुढे गेले आणि स्वत:च्या हातातील ड्रिंककडे पाहत त्यांनी मंत्र्यांना विचारलं, ‘सर, मे आय गेट यू अ जिंजरेल?’ स्वर्णसिंग यांच्या चेहऱ्यावर हास्य झळकलं. राव यांच्या खांद्यावर हात ठेवत ते म्हणाले, ‘यस, माय यंग फ्रेंड, बट नॉट ‘युवर’ जिंजरेल. यू कॅन कॅरी ऑन युवर ड्रिंक.’ राव यांनी जिंजरेल व्हिस्कीसारख्या रंगाचा फायदा घेतला खरा, पण स्वर्णसिंग यांचं नाक इतकं तीक्ष्ण होतं की, राव प्रत्यक्ष काय पीत आहेत, हे त्यांना बरोबर समजलं होतं.
    अशा अनेक घटना, प्रसंग, कहाण्या विजय नाईक यांनी या पुस्तकात दिल्या आहेत. तसेच लेखाच्या शेवटी पुस्तकाचा संदर्भ दिल्याने अधिक तपशील वाचण्याची इच्छा असल्यास त्याचा योग्य संदर्भ मिळू शकतो. मला याचा चांगला उपयोग झाला. रवीन्द्रनाथ टागोर हे भारताचे सांस्कृतिक राजदूत म्हणून त्या काळात ओळखले जायचे. विविध देशांना ते भेटी देत असत. जवळजवळ ३५ पेक्षाही अधिक देशांचे दौरे त्यांनी त्या वेळी केले होते. त्याबाबतचे त्यांचे काही लेखन वाचनात आले. मला व माझी पत्नी जयंती दोघांनाही विविध देश पाहण्याची आवड त्यामुळे रवीन्द्रनाथ त्या काळात परदेश दौरे कशा पद्धतीने करत असतील याबद्दल मोठी उत्सुकता होती. नाईक यांच्या या पुस्तकात ‘टागोर मुसोलिनी’ या प्रकरणात टागोर यांच्या इटलीच्या भेटीचा उल्लेख आहे. तो संदर्भ ‘मिटिंग विथ मुसोलिनी, टागोर्स टूर्स इन इटली, १९२५ अँड १९२६’ या कल्याण कुंटू यांच्या पुस्तकातून घेण्यात आला आहे. बऱ्याच प्रयत्नांनंतर ते पुस्तक मी मिळवले. ते पुस्तक वाचल्यानंतर, आमच्या प्रवासालाही एक निराळं परिमाण मिळालं.
    तर असं हे पुस्तक आपल्याला ‘डिप्लोमॅटिक’ विश्वातील रंगतरंग दाखवत मनोरंजन करतं आणि बहुश्रुतही करतं.

-जयप्रकाश प्रधान

शिष्टाईचे इंद्रधनू : डिप्लोमॅटिक विश्वातील रंगतरंग / लेखक- विजय नाईक / रोहन प्रकाशन.

  • मला आवडलेली इतर काही पुस्तकं
    • असा घडला भारत / संपादन : मिलिंद चंपानेरकर, सुहास वुâलकर्णी / रोहन प्रकाशन
    • फैज अहमद फैज : एक प्यासा शायर / लेखक- प्रतिभा रानडे / राजहंस प्रकाशन.
    • नेहरू व बोस / लिखाक- रुद्रांग्शू मुखर्जी, अनुवाद : अवधूत डोंगरे / रोहन प्रकाशन.
    • दर कोस दर मुक्काम / लेखक- अशोक पवार / मनोविकास प्रकाशन.
    • साउथ ब्लॉक, दिल्ली / लेखक- विजय नाईक / रोहन प्रकाशन.
    • इंदिरा गांधी, आणीबाणी आणि भारतीय लोकशाही / लेखक- पी.एन.धर, अनुवाद : अशोक जैन / रोहन प्रकाशन.
    • आधुनिक भारताचे विचारस्तंभ / लेखक- रामचंद्र गुहा, अनुवाद : शारदा साठे / रोहन प्रकाशन.
    • स्टीव्ह आणि मी / लेखक- टेरी इरविन, अनुवाद : सोनिया सदाकाळ-काळोखे / राजहंस प्रकाशन.

पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल सप्टेंबर २०२०


हे पुस्तक खरेदी करण्यासाठी…

शिष्टाईचे इंद्रधनू

या पुस्तकात जसा टागोर व मुसोलिनी यांच्या भेटीचा रोचक वृत्तान्त आहे, तसंच औपचारिक प्रसंगी किंवा वाटाघाटी होताना गमतीशीर घटना कशा घडतात याचं खुमासदार शैलीत कथन आहे. अफगाणिस्तानसारख्या देशांत धोके पत्करून परदेश सेवेतील अधिकाऱ्यांना गंभीर प्रसंगांना कसं तोंड द्यावं लागतं, याबद्दलचं विवेचन जसं आहे, तसंच जॉर्ज बुश आणि व्लादिमीर पुतिन या दोन नेत्यांमधल्या कडू-गोड संबंधांचं वर्णनही आहे. डिप्लोमॅटिक वर्तुळात दीर्घकाळ वावरणाऱ्या एका मुरब्बी पत्रकाराने आपल्यासमोर धरलेला शिष्टाईच्या विश्वाचा कॅलिडोस्कोप म्हणजेच…शिष्टाईचे इंद्रधनू !

Shishtaiche-Indradhanu

225.00Add to cart


तुम्हाला हेही वाचायला आवडेल…

विस्तारवादी चीन व भारत

चढती कमान व वाढते तणाव


विजय नाईक यांचा जन्म १ जुलै, १९४५ रोजी अहमदनगर येथे झाला असून १९६७ साला पासून त्यांचे दिल्लीत वास्तव्य आहे. सध्या ते ‘सकाळ पेपर्स’चे सल्लागार-संपादक म्हणून कार्यरत आहेत. तत्पूर्वी ते ‘दै. गोमंतक’ व त्यानंतर ‘सकाळ’चे दिल्लीतील वार्ताहर व ब्यूरो चीफ म्हणून कार्यरत होते. त्यांनी राजकीय व आंतरराष्ट्रीय घटनांचे वार्तांकन करण्यासाठी अनेक देशांचे दौरे केलेले आहेत. भारतीय राजकारण, संरक्षण धोरण, आंतरराष्ट्रीय घडामोडी व शिष्टाई या विषयासंबंधी त्यांचं विशेष अध्ययन असून त्यावर त्याचं लिखाण सुरू असतं. १९७१ सालातील भारत-पाकिस्तान युद्धात ‘युद्धवार्ताहर’ म्हणून त्यांनी वार्तांकन केलं आहे. तसंच, त्यांनी ‘आयपीकेएफ’च्या श्रीलंकेतील तमिळ वाघांविरुद्ध लष्करी मोहिमेचे सात वेळा तेथे जाऊन वार्तांकन केलं आहे. ईशान्य भारतातील सशस्त्र बंडखोरी, पंजाबमधील ब्लू स्टार ऑपरेशन, कारगिलचे युद्ध आदी घडामोडींचं वार्तांकन त्यांनी केलं आहे. गेली चाळीस वर्षं ते संसदेच्या कामकाजाचं वार्तांकन करत आहेत. आफ्रिकेतील वसाहतवादाची सांगता झाल्यावर ‘सकाळ’च्या वतीनं दक्षिण आफ्रिकेला भेट देऊन तेथील घटनांचं वार्तांकन करणारे पहिले ‘मराठी पत्रकार’ म्हणून त्यांना ओळखलं जात. विजय नाईक हे ‘प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया'चे माजी सदस्य, ‘एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया’चे माजी सरचिटणीस, लोकसभा व राज्यसभेच्या पत्रकारविषयक सल्लागार समितीचे माजी अध्यक्ष, ‘इंडियन असोसिएशन ऑफ फॉरेन अफेअर्स करस्पॉन्डन्ट्स’ या संस्थेचे विद्यमान निमंत्रक, दक्षिण आशिया मुक्त पत्रकार संघटना व ‘कॉमनवेल्थ जर्नालिस्ट असोसिएशन’चे उपाध्यक्ष, दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल सेन्टर व हॅबिटॅट सेन्टरचे सदस्य अश्या विविध पदांवर त्यांनी काम केलं आहे. याशिवाय त्यांच्या पुस्तकांना राज्य पुरस्कारासारख्या अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे.

कॅन ड्रॅगन अँड एलिफन्ट डान्स टुगेदर?
भारत व चीन यांच्या दरम्यानचे संबंध गेली वीसेक वर्षं तसे सलोख्याचे होते. कारण याच काळात देवाण-घेवाण वाढली, व्यापारवृद्धी झाली, सीमावादाबाबत वाटाघाटी चालू राहिल्या. शी जिनपिंग व नरेंद्र मोदी यांच्या परस्परांच्या देशाला भेटी झाल्या. या पार्श्वभूमीवर चीनचे स्टेट कौन्सेलर व परराष्ट्र मंत्री वांग एका पत्रकारपरिषदेत म्हणाले होते की, चिनी ड्रॅगन व भारतीय गजराज यांनी एकमेकांबरोबर भांडायला नको, तर नृत्य करायला हवं…
आज मात्र परिस्थिती बदललेली दिसते आहे.

डिसेंबर १९७८मध्ये डेंग झाव पिंग यांनी चीनच्या कम्युनिस्ट पक्षाला त्यांच्या पारंपरिक वर्ग संघर्षाच्या वैचारिक बैठकीपासून अलग करून आर्थिक विकासाच्या विचारांकडे वळवलं… जगासाठी अधिक खुलं धोरण अवलंबत चीनने कृषी, उद्योग, लष्कर, विज्ञान व तंत्रज्ञान या चार क्षेत्रांच्या आधुनिकीकरणास प्राधान्य दिलं. विजय नाईक यांच्या पुस्तकात चीनच्या या आर्थिक सुधारणांच्या योजनांची माहिती असून,… चीन हा अमेरिकेनंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाची व्यवस्था कसा बनला, याची कारणमीमांसा व ऊहापोह केला आहे….
चीनचे विद्यमान अध्यक्ष शी जिनपिंग यांचा उदय कसा झाला, कम्युनिस्ट पक्षाच्या अगदी तळागाळापासून अखेर ते पक्षाचे महासरचिटणीस, नंतर चीनचे अध्यक्ष (२०१३) कसे झाले, याचा सुरेख विश्लेषणात्मक आलेख लेखकाने दिला आहे. ते आता चीनचं स्वप्न साकार करण्याच्या दिशेने चालले आहेत… चीन आता जागतिक सत्ताही बनला आहे…. अमेरिकेला आव्हान देण्याची चीनची अंतःस्थ महत्वाकांक्षा असून, आंतरराष्ट्रीय राजकारणात श्रेष्ठत्व प्राप्त करायचं आहे… या परिस्थितीचे भारत व चीनच्या संबंधांवर काय परिणाम होतील? चीनने निर्माण केलेल्या आव्हानाचा भारत कशाप्रकारे सामना करणार?… आशियातील चीनचं वर्चस्व भारत घटवू शकेल काय?
अशा अनेक प्रश्नांच्या चर्चेसह डोकलम, गलवान ते लडाख संबंधीचे वाढते तणाव अशा अनेक महत्त्वाच्या घडामोडींचा परामर्ष विजय नाईक यांनी त्यांच्या या पुस्तकात घेतला आहे… भारत व चीन दरम्यानच्या घटना व आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्यांची स्पंदन जाणून घेणाऱ्यांसाठी या पुस्तकाची मी नेहमीच शिफारस करेन.
गौतम बंबावाले
माजी सनदी अधिकारी
भारतीय राजदूत म्हणून चीनमध्ये नियुक्त (२०१७-१८


325.00 Add to cart

साऊथ ब्लॉक दिल्ली

शिष्टाईचे अंतरंग- परराष्ट्र व्यवहार आणि मुत्सद्देगिरीच्या विश्वाचा वेध


विजय नाईक यांचा जन्म १ जुलै, १९४५ रोजी अहमदनगर येथे झाला असून १९६७ साला पासून त्यांचे दिल्लीत वास्तव्य आहे. सध्या ते ‘सकाळ पेपर्स’चे सल्लागार-संपादक म्हणून कार्यरत आहेत. तत्पूर्वी ते ‘दै. गोमंतक’ व त्यानंतर ‘सकाळ’चे दिल्लीतील वार्ताहर व ब्यूरो चीफ म्हणून कार्यरत होते. त्यांनी राजकीय व आंतरराष्ट्रीय घटनांचे वार्तांकन करण्यासाठी अनेक देशांचे दौरे केलेले आहेत. भारतीय राजकारण, संरक्षण धोरण, आंतरराष्ट्रीय घडामोडी व शिष्टाई या विषयासंबंधी त्यांचं विशेष अध्ययन असून त्यावर त्याचं लिखाण सुरू असतं. १९७१ सालातील भारत-पाकिस्तान युद्धात ‘युद्धवार्ताहर’ म्हणून त्यांनी वार्तांकन केलं आहे. तसंच, त्यांनी ‘आयपीकेएफ’च्या श्रीलंकेतील तमिळ वाघांविरुद्ध लष्करी मोहिमेचे सात वेळा तेथे जाऊन वार्तांकन केलं आहे. ईशान्य भारतातील सशस्त्र बंडखोरी, पंजाबमधील ब्लू स्टार ऑपरेशन, कारगिलचे युद्ध आदी घडामोडींचं वार्तांकन त्यांनी केलं आहे. गेली चाळीस वर्षं ते संसदेच्या कामकाजाचं वार्तांकन करत आहेत. आफ्रिकेतील वसाहतवादाची सांगता झाल्यावर ‘सकाळ’च्या वतीनं दक्षिण आफ्रिकेला भेट देऊन तेथील घटनांचं वार्तांकन करणारे पहिले ‘मराठी पत्रकार’ म्हणून त्यांना ओळखलं जात. विजय नाईक हे ‘प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया'चे माजी सदस्य, ‘एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया’चे माजी सरचिटणीस, लोकसभा व राज्यसभेच्या पत्रकारविषयक सल्लागार समितीचे माजी अध्यक्ष, ‘इंडियन असोसिएशन ऑफ फॉरेन अफेअर्स करस्पॉन्डन्ट्स’ या संस्थेचे विद्यमान निमंत्रक, दक्षिण आशिया मुक्त पत्रकार संघटना व ‘कॉमनवेल्थ जर्नालिस्ट असोसिएशन’चे उपाध्यक्ष, दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल सेन्टर व हॅबिटॅट सेन्टरचे सदस्य अश्या विविध पदांवर त्यांनी काम केलं आहे. याशिवाय त्यांच्या पुस्तकांना राज्य पुरस्कारासारख्या अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे.

देशा-देशांतील संबंध जोपासण्यासाठी, वाद मिटवून सामंजस्य निर्माण करण्यासाठी, व्यापार-वृध्दीसाठी, जटिल प्रश्नांची उकल करण्यासाठी आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘डिप्लोमसी’ला अर्थात शिष्टाईला अनन्यसाधारण महत्त्व असतं. त्याला अनुसरून अनेक भारतीय राजदूत, अधिकारी, नेते आणि मंत्री आपलं कसब पणाला लावत असतात. मात्र, याबाबतचे तपशील गोपनीयतेच्या आवरणामुळे सामान्यजनांपर्यंत पोहोचत नाहीत.
ज्येष्ठ पत्रकार विजय नाईक यांचं राजधानी दिल्लीत गेली पंचेचाळीस वर्षं वास्तव्य आहे. अनेक अधिकृत परदेशी दौर्‍यामध्ये पत्रकार म्हणून केलेलं प्रतिनिधित्व व या वर्तुळातील वावर यांतून आलेले अनुभव, केलेली निरीक्षणं आणि अभ्यास या सर्वांतून त्यांनी साकार केलेल्या या पुस्तकाद्वारे ही कसर भरून निघत आहे.
नाईक यांनी या पुस्तकात दिल्लीतील ‘चाणक्यपुरी’, ‘शांतिपथ’ येथील विविध देशांच्या वकिलाती, दूतावास यांबद्दल ‘क्लोज-अप’ साधणारी माहिती दिली असून पं. नेहरूंनी घातलेल्या परराष्ट्र धोरणाचा पाया, यशवंतराव चव्हाण यांचं योगदान, गुजराल सिध्दान्त यांसारख्या महत्त्वाच्या टप्प्यांचा वेध घेतला आहे. तसंच त्यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणातील मुत्सद्देगिरीच्या नाना तऱ्हांची सविस्तर माहिती दिली असून या क्षेत्रात मराठी व्यक्तींनी केलेल्या भरीव कामगिरीचाही आढावा घेतला आहे.
राजदूत, सचिव, राजकीय नेते व मंत्री आदी परराष्ट्र धोरणाशी संबंधित व्यक्तींच्या मुलाखती, भारत-अमेरिका, भारत-रशिया व इतर राष्ट्रांबरोबरच्या संबंधांवर अनुभवी नेते व राजदूत यांनी केलेलं भाष्य या पुस्तकात समाविष्ट केलं आहे. तसंच या क्षेत्रातले काही गंभीर, तर काही हलके-फुलके मजेशीर प्रसंगही सांगितले आहेत.
थोडक्यात सांगायचं तर, स्वातंत्र्योत्तर काळातील मुत्सद्देगिरीच्या विश्वाचा विविधांगी मागोवा घेणारं मराठीतील किंबहुना हे पहिलंच पुस्तक – साउथ ब्लॉक, दिल्ली – वाचकांना एका वेगळया विश्वाचं अंतरंग उलगडून दाखवेल, हे निश्चित!


450.00 Add to cart

ऑपरेशन ब्लू स्टार

एका थरारक कारवाईचं सत्यकथन खुद्द ऑपरेशन-प्रमुखाकडून…


लेफ्टनंट जनरल कुलदीप सिंग ब्रार – निवृत्त; परम विशिष्ट सेवा मेडल–PVSM, अति विशिष्ट सेवा मेडल–AVSM, आणि वीरचक्र विजेते, यांचा जन्म स्वातंत्र्यापूर्वी १९३४ साली लाहोरमध्ये झाला. ‘डून स्कुल’मध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. त्यांनी आपल्या प्रदीर्घ लष्करी सेवेत अनेक पदांवरून नेतृत्व केलं. त्यांनी इन्फन्ट्री आणि स्वतंत्र रणगाडा ब्रिगेडचं नेतृत्व केलं. इन्फन्ट्री डिव्हिजन आणि कोअर कमांडर म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्व्हिस स्टाफ कॉलेजचेही काही काळ ते प्रमुख होते. ३० सप्टेंबर १९९२ रोजी लष्कराच्या इस्टर्न कमांडचे ते प्रमुख म्हणून निवृत्त झाले. ऑस्ट्रेलियन स्टाफ कॉलेज आणि युनायटेड स्टेटस वॉर कॉलेजमधून त्यांनी पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतलं होतं. शौर्य आणि विशेष सेवेबद्दलचे अनेक उच्च पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. स्वतंत्र भारताच्या लष्करी इतिहासातल्या जवळपास सर्वच घटनांमध्ये त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता.

अनुवाद :
पत्रकारितेच्या क्षेत्रांत सुमारे ३० वर्षांहून अधिक काळ भगवान दातार कार्यरत आहेत. त्यांनी लोकसत्ता, केसरी, लोकमत, तरुणभारत, पुढारी, प्रभात आदी दैनिकात विविध पदांवर काम केलं आहे. तरुणभारत, पुणेच्या संपादकपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली. विविध घटनांच्या वृत्तांकनासाठी पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, जम्मू-काश्मीर, कर्नाटक आदी राज्यांचा त्यांनी दौरा केला असून लोकसभेच्या कामकाजाचे वृत्तांकनही त्यांनी केलं आहे. त्यांनी रामजन्मभूमी प्रकरणाच्या वेळी अयोध्येत उपस्थित राहून वार्तांकन केलं होतं. त्यांनी संरक्षण मंत्रालयाचा वॉर करस्पाँडन्टचा अभ्यासक्रम महू, नासिराबाद, जोधपूर, दिल्ली आणि कोचीन येथून पूर्ण केला आहे. त्यांची ‘टु द लास्ट बुलेट’, ‘शेवट नसलेलं युद्ध’, ‘बी किंमग इंडियन’ ही अनुवादित पुस्तके गाजली. ‘खिल्ली’ हे राजकीय विडंबनपर लेखांचं स्वतंत्र विनोदी पुस्तक आणि आयएस अधिकाऱ्यांच्या कामाबद्दल ‘कलेक्टिव्ह एनर्जी’ या पुस्तकाचं संपादन केलं आहे. ‘सरदार वल्लभभाई पटेल' व ‘फील्ड मार्शल सॅम माणेकशा' ही त्यांनी अनुवादित केलेली पुस्तकं वाचकप्रिय आहेत.

ऑपरेशन ब्लू स्टार ही जगातील सर्वात वादग्रस्त आणि बहुचर्चित लष्करी कारवायांपैकी एक होती असं म्हणता येईल. लेफ्टनंट जनरल के.एस. ब्रार यांनी या कारवाईचं नेतृत्व केलं होतं. लष्कराच्या इतिहासात वादग्रस्त ठरलेल्या अशा या थरारक कारवाईचं स्वत: ब्रार यांनीच केलेलं हे अतिशय अचूक आणि तपशीलवार वृत्तांत-कथन! यात कुठलेही तपशील वगळले नाहीत की कोणतीही अतिशयोक्ती नाही.
लष्करी तुकडयांना काहीवेळा अनपेक्षितपणे घ्यावी लागलेली माघार, अधिकाऱ्यांचे चुकलेले अंदाज, अतिरेक्यांचा चिवटपणा आणि निर्धार अशा सगळयाच तपशीलांचं यात सत्यकथन आहे. कारवाईबाबतच्या व्यूहरचनांचे नकाशे, छायाचित्रं आणि दिलेली अचूक आकडेवारी यामुळे या कथनाला एक विश्वासार्हता प्राप्त झाली आहे. श्वास रोखून धरायला लावणारे प्रसंग आणि मोहिमेतले चढ-उतार यांचं यथार्थ वर्णन या पुस्तकात वाचायला मिळेल.
केवळ शिखांच्याच नव्हे, तर सर्वच भारतीयांच्या मनात खदखदत असलेल्या अनेक प्रश्नांना उत्तरं देत हे पुस्तक अनेक अफवा, गैरसमज आणि असत्य गोष्टींचं निराकरण करतं.
या कारवाईच्या प्रत्येक टप्प्यावरील नियोजनात आणि प्रत्यक्ष कारवाईत ब्रार सहभागी होते. त्यांच्याच शब्दातली ही कहाणी…पूर्णपणे सत्य, अगदी जशी घडली तशी…’ऑपरेशन ब्लू स्टार’!


275.00 Add to cart

भारत : समाज आणि राजकारण

यशवंतराव चव्हाण यांचे प्रगट चिंतन


डॉ. जयंत लेले हे कॅनडातील किंग्स्ट्न येथील क्वीन्स विद्यापीठातील राज्यशास्त्र, समाजशास्त्र आणि जागतिक विकास ह्या विषयांचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले असून आता ते तिथेच सन्माननीय प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. डॉ. जयंत लेले हे ‘शास्त्री इंडोकॅनेडिअन इन्स्टिट्यूट’चे उपाध्यक्ष आणि अध्यक्ष होते. त्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय आणि आर्थिक प्रश्नांवर बरंच लिखाण केलं आहे. भारत आणि दक्षिणपूर्ण आशियावरच्या अनेक पुस्तकांचे ते लेखक आणि संपादक आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय विकासावरची त्यांची पुस्तके आणि लेख अनेक विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक म्हणून वापरली जातात.

अनुवाद:

आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी करून देशपातळीवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या यशवंतराव चव्हाणांनी तीन खंडांमधून आत्मचरित्र लिहिण्याचे ठरवले होते. प्रत्यक्षात त्यातील एकच खंड प्रकाशित होऊ शकला. प्रा. जयंत लेले यांच्या प्रदीर्घ मुलाखतसत्रांतून आकारास आलेला प्रस्तुत ग्रंथ म्हणजे एका अर्थाने यशवंतरावांनी लेले यांना सांगितलेले आत्मचरित्र म्हणावे लागते. ‘‘हा मी स्वत:शी करत असलेला संवाद आहे” असे स्वत: यशवंतरावच म्हणतात यात सारे काही आले. यशवंतरावांचे राज्य व राष्ट्र या दोन्ही पातळ्यांवरचे राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक दृष्टिकोन आणि व्यवहार यांचा हा सखोल अभ्यास आहे. विशेष म्हणजे हा अभ्यास जागतिक पातळीवरील स्थित्यंतरांच्या संदर्भात करण्यात आलेला असल्याने तो एकमेवच मानावा लागतो. आपण मनापासून स्वीकारलेली स्वातंत्र्य आणि समता ही तत्त्वे एकीकडे व प्रत्यक्ष राजकीय व्यवहार दुसरीकडे. तर प्रसंगी स्वातंत्र्य आणि समता या तत्त्वांमधील द्वंद्वावर मात करण्याची यशवंतरावांची धडपड लेले यांनी हळुवारपणे उकलली आहे. चव्हाण साहेबांची राजकीय भूमिका व शैली यांच्यासाठी त्यांनी केलेला सैद्धांतिक व्यवहारवाद हा शब्दप्रयोग अत्यंत समर्पक म्हणावा लागेल.

स्वातंत्र्यलढ्याच्या दरम्यान झालेली यशवंतरावांची वैचारिक वाटचाल, स्वातंत्र्योत्तर काळात मुंबई राज्याच्या व द्वैभाषिकाच्या कायदेमंडळात घडलेला प्रशासक, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अविचलपणे राष्ट्रीय व प्रादेशिक हितसंबंधांचा मेळ घालणारा मुत्सद्दी, चिनी आक्रमणामुळे अचानकपणे अंगावर आलेली जबाबदारी पेलणारा खंबीर नेता व विचारवंत असे अनेक पैलू या ग्रंथातून उलगडतात. महाराष्ट्र आणि भारत या दोन्ही स्तरांवरील सहकारी व स्पर्धक यांच्याशी आपल्या मानवी पातळीवरील संबंधांविषयी इतक्या स्पष्टपणे यशवंतराव कधीच बोलले नव्हते. या सर्व गोष्टींचा उपयोग राजकीय आणि सामाजिक क्षेत्रांत वावरणाऱ्यांना तर होईलच पण महाराष्ट्राने यशवंतरावांचा कृतज्ञतापूर्वक अभिमान का बाळगायचा हे देखील समजेल.


600.00 Add to cart

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *