कुमारांच्या जाणिवा विस्तारणारी थोरांची ओळख

पृथ्वीच्या पाठीवर माणसाचं पहिलं अस्तित्व उमटलं तेव्हापासून आजपर्यंत भौतिक, सांस्कृतिक, बौद्धिक, वैचारिक, सामाजिक, राजकीय, वैज्ञानिक अशा अनेक अंगांनी मानववंशाची प्रगती होत राहिली आहे. अर्थात ही प्रगती आपसूक झालेली नाही. प्रखर बुद्धिमत्ता, व्यासंग आणि ध्येयनिष्ठा आणि उत्कट सामाजिक भान असणाऱ्या अनेक स्त्री-पुरुषांच्या कर्तृत्वामुळे अचंबित व्हायला लावणारा हा प्रवास शक्य झाला आहे. निरनिराळ्या क्षेत्रात इतिहास घडविणाऱ्या या [...]

‘असा घडला भारत’ या ग्रंथामधील निवडक भाग

१५ ऑगस्ट १९४७ स्वातंत्र्याची पहाट… ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून भारताचं वसाहतीकरण साधल्यावर इ.स. १८५८मध्ये भारतीय वसाहतीची सूत्रं अधिकृतपणे पूर्णत: इंग्लंडच्या राजाकडे सोपवली गेली होती. अखंड भारतावर साम्राज्यवादी सत्ता लादणाऱ्या ब्रिटिश सरकारने प्रदीर्घ अशा स्वातंत्र्य लढ्यानंतर आणि हजारो स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानानंतर अखेरीस १८ जुलै, १९४७ रोजी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये ‘१४ ऑगस्ट, १९४७च्या मध्यरात्री भारताला स्वातंत्र्य बहाल केलं [...]

‘भारत : समाज आणि राजकारण’ – प्रास्ताविक : गोविंद तळवळकर

आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी करून देशपातळीवर आपल्या कर्तृत्त्वाचा ठसा उमटवणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांच्या प्रदीर्घ मुलाखतसत्रांतून साकार झालेलं ‘भारत : समाज आणि राजकारण' हे पुस्तक आम्ही नुकतंच प्रसिद्ध केलं आहे. सुप्रसिद्ध अभ्यासक प्रा. जयंत लेले यांनी घेतलेल्या अनेक मुलाखतींचं रचनाबद्ध संकलित व संपादित स्वरूप म्हणजेच हा ग्रंथ होय. या पुस्तकाला दिवंगत विचारवंत गोविंद तळवळकर यांचं प्रास्ताविक लाभलं [...]

बहुश्रुत करणारं रंगतदार पुस्तक

दिल्ली या राजधानीच्या शहरात पत्रकारिता करणे हे एक मोठे आव्हान असते. कारण एकतर सध्या देशाचा कारभार तेथून चालतो. आणि त्यासाठी नानाविध राज्यांतील, प्रांतांतील, लोकप्रतिनिधी, राजकारणी, शासकीय अधिकारी यांचा तेथे वावर चालू राहतो. त्यांच्यात मिसळायचे, त्यांच्याकडून बातम्या मिळवायच्या हे काम तसे सोपे नाही. त्यासाठी इंग्रजी, हिंदी आदी भाषांवर चांगले प्रभुत्व असावयास हवे. अर्थात, दिल्लीत काम करत [...]