आपल्या मित्र-मैत्रिणीत, पिकनिकला, प्रवासात तसेच वाढदिवस, सण-उत्सव या निमित्ताने एकत्र जमल्यावर तुम्ही छान-छान विनोद खास शैलीत सांगितले तर आनंदी वातावरणात हर्षोत्सवाची भर पडेल. म्हणूनच निखळ आनंद देणारे हे खुसखुशीत विनोदी चुटके खास तुमच्यासाठी!
मुलांनो,
तुम्हाला भेटायला
खास कोण येतय माहितेय?
प्रेऽऽऽमळ भूऽऽत…
हे असं तसं भूत नाहीये बरं का…
हे आहे एज्युकेटेड भूत!
बोला, आहे का काही तुमची इच्छा?
मग नुसतं म्हणा…
ओके…बोके…पक्के…काम शंभर टक्के!
कथा
O भुताशी मैत्री
O शाळेतली भुताटकी
O सर्कशीत भुताटकी
O घरातली भुताटकी
या आहेत लहान मुलांना ‘पुरून उरणाऱ्या’ ताज्या गोष्टी. हातात पडल्या तर मोठी माणसं सुद्धा वाचल्या शिवाय सोडणार नाहीत अशा! यातली कुठलीही गोष्ट तोंडाचा चंबू करून वाचायची गरज नाही. प्रत्येक गोष्टीच्या वाटेत थट्टा विनोद, गमती-जमती यांची कारंजी आहेत. शिवाय मोजक्या जागी सुप्रसिद्ध चित्रकार पुंडलिक वझे यांनी काढून दिलेली खुमासदार प्रसंग चित्र ही आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची रंगत वाढली आहे.
अशा या गोष्टी वाचून झाल्या तरी मनातून जात नाहीत, मनात दडून राहतात-आणि वाटेल तेव्हा पुन्हा बाहेर येतात पुन्हा वाचून पहाव्यात वाटतात. म्हणून तर त्या पुरून उरणार या गोष्टी, नाही का?
सध्याचा जमाना कितीही इंटरनेट आणि ऑनलाइन गेम्सचा असला तरी गोष्ट म्हटली की अजूनही तुमचे डोळे लुकलुकतात ना ? गोष्टींच्या अद्भुत जगात आजही तुम्ही मस्तपैकी रमता की नाही ? म्हणूनच तुमच्या इंटरेस्टचा विचार करून लेखिका गीतांजली भोसले सांगते आहे , खूप सारं मनोरंजन करणाऱ्या आणि थोडासा विचारही करायला लावणाऱ्या ८ कमाल धमाल गोष्टी …
मुलांसाठी भुताच्या धमाल गोष्टी… ४ पुस्तकांचा सप्रेम भेट संच
राजीव तांबे
जगात भुतं नसतात…
असतात फक्त भुतांच्या गोष्टी!
मुलांनो,
तुम्हाला भेटायला
खास कोण येतय माहितेय?
प्रेऽऽऽमळ भूऽऽत…
हे असं तसं भूत नाहीये बरं का…
हे आहे एज्युकेटेड भूत!
बोला, आहे का काही तुमची इच्छा?
मग नुसतं म्हणा…
ओके…बोके…पक्के…काम शंभर टक्के!
या गोष्टी आहेत अल्फाजच्या, गजलच्या, चुटकीच्या आणि बानो शेळी, बदकबीच्याही ! हे सारेच रमलेत आपापल्या विश्वात आणि या सगळ्यांचं विश्वही आहे अगदी रंगीबेरंगी !
आपल्या मुलांचंही बालपण समृद्ध करून जातील असे हे निरागसतेचे सहज-सोप्या शिकवणीचे, कुतूहलाचे आणि हळव्या अनुभवांचे रंग.
गोष्टींमध्ये उतरलेले हे रंग हळूवारपणे छोट्या वाचकांचंही आयुष्य मस्तपैकी सोनेरी रंगात रंगवून जातात…
या आहेत लहान मुलांना ‘पुरून उरणाऱ्या’ ताज्या गोष्टी. हातात पडल्या तर मोठी माणसं सुद्धा वाचल्या शिवाय सोडणार नाहीत अशा! यातली कुठलीही गोष्ट तोंडाचा चंबू करून वाचायची गरज नाही. प्रत्येक गोष्टीच्या वाटेत थट्टा विनोद, गमती-जमती यांची कारंजी आहेत. शिवाय मोजक्या जागी सुप्रसिद्ध चित्रकार पुंडलिक वझे यांनी काढून दिलेली खुमासदार प्रसंग चित्र ही आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची रंगत वाढली आहे.
अशा या गोष्टी वाचून झाल्या तरी मनातून जात नाहीत, मनात दडून राहतात-आणि वाटेल तेव्हा पुन्हा बाहेर येतात पुन्हा वाचून पहाव्यात वाटतात. म्हणून तर त्या पुरून उरणार या गोष्टी, नाही का?
या गोष्टी आहेत अल्फाजच्या, गजलच्या, चुटकीच्या आणि बानो शेळी, बदकबीच्याही ! हे सारेच रमलेत आपापल्या विश्वात आणि या सगळ्यांचं विश्वही आहे अगदी रंगीबेरंगी !
आपल्या मुलांचंही बालपण समृद्ध करून जातील असे हे निरागसतेचे सहज-सोप्या शिकवणीचे, कुतूहलाचे आणि हळव्या अनुभवांचे रंग.
गोष्टींमध्ये उतरलेले हे रंग हळूवारपणे छोट्या वाचकांचंही आयुष्य मस्तपैकी सोनेरी रंगात रंगवून जातात…
‘संस्कारमाला’ ह्या तीन पुस्तकांच्या संचातले ‘मुलांसाठी संत तुकाराम’ हे पुस्तक मधलं आहे. मुलांची भाषा आणि विचार यावर तुकारामाची छाया पडली तर मोठेपणी एक अनुभवविश्व आपोआप उलगडून येईल. आयुष्यभर साथ करतील असे अभंग तुकारामाने लिहिले.
संत ज्ञानेश्वर हा प्रत्येक मराठी माणसाचा अभिमानबिंदू आहे. घरात जे आईला स्थान असते तेच स्थान संत ज्ञानेश्वर माऊलीला आहे. हे सारं समजून घेणं, अगदी लहान वयात, विद्यार्थीदशेत समजून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. मुलांच्या आयुष्यात संत ज्ञानेश्वर अगदी लहान वयात यावा, ज्ञानेश्वरी नेमकी काय आहे हे त्यांना लहान वयातच कळावे म्हणून ह्या पुस्तकात थोडक्यात ज्ञानेश्वरी उलगडून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.
शेरू तसं सांगायला वाघाचं पिल्लू पण खरं तर आम्हा भावंडांपैकीच एक वाटायचा तो आम्हाला. जरा जास्तच लाडका, लाडावलेला. खायला, खेळायला, फिरायला, मस्ती करायला तो आमच्याबरोबर असायचाच; पण गप्पा मारताना, गोष्ट सांगता-ऐकतानाही तो असणं आवश्यक असायचं. निदान त्याला तसं वाटायचं. बोलताना मधे मधे त्याचं नाव घेतलं नाही तर त्याला वाईट वाटायचं. ते त्याच्या चेहर्यावर दिसायचंच. आवडीच्या खेळात त्याचा चेहरा अगदी हसरा व्हायचा, इतका की मिशा वर जायच्या आणि दु:खाची गोष्ट ऐकताना शेरूचे सुस्कारे सगळ्यात मोठयाने ऐकू यायचे. त्याला आमच्या आधीच खाऊ द्यावा लागायचा आणि वर मोठयानीही आपल्या वाटणीतून त्याला आणखी द्यावं असं जणू सांगत तो समोरच बसे. आम्हाला खेळायलाही ओढून नेई. आणि तरी…
संत तुकारामाचा समकालीन संतकवी संत रामदास, हा खर्या अर्थाने राष्ट्रविचाराने आणि राष्ट्रप्रेमाने भारलेला अपूर्व असा संत होऊन गेला. रामदासस्वामींमुळे तर शिवाजीमहाराजांचे स्वराज्यस्थापनेचे स्वप्न साकार होऊ शकले. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संत रामदासस्वामी यांचे संस्कार लहान वयातच व्हायला हवेत म्हणून ह्या तीन पुस्तकांचा संच अभिनव पद्धतीने केला आहे.