एक ड्रीम…,मायला


अनंत सामंत


फुल फोकसमध्ये तो बाप्या उभा आहे समोर चबुतऱ्यावर.  काय म्हणून ?” लोकमान्य टिळक ते, भडव्या.  ” तेच ते !शहरात शिरू शकतात ते ? लालूच्या गावाहून आलेल्या मालीशवाल्यांना माहिताय ते कोण आहेत, त्यांना असं गावाबाहेर का काढलंय ते ? “मला असं शहराबाहेर उभं राह्यचं नाहीय. इटस् टाईम आय एन्टर द गेम बॉईज ! मी राडा करणारेय, भेंच्योद. शहर वाचवू शकतील अशा सगळ्याच बाप्यांना हिजड्यांनी शहराबाहेर काढलंय. चबुतऱ्यावर चढवलंय. आता कोणीही कुठेही घुसावं आणि राडा करावा. सातपुतेला मारावं, गरोदर बायकांना मारावं, पोरांना, म्हाताऱ्यांना उडवावं. जाळावं. बॉम्बच्या माळा लावाव्यात. मान वर करून कोणी बघतसुद्धा नाही . चार लाख सदतीस हजार नऊशे ही चिल्लर झाली भेंच्योद . भुकेल्या कुत्र्यांना भुलवणारं खरकटं , आता खरा माल कमवायचाय मला !

200.00 Add to cart

माईन फ्रॉईन्ड


अनंत सामंत


डोळ्यासमोर प्रसंग जिवंतपणे उभे करण्याची विलक्षण ताकद …
वाचकाला खेळवत ठेवणारी लेखनशैली…
भन्नाट तरीही उत्कटतेने भारलेली कथानकं…
वावटळी व्यक्तिरेखा…
अनंत सामंत या सर्व पैलूंचं कोलाज करून एकेक कथानक उभारतात…
अशा सात कथांचं सुपर कोलाज म्हणजेच माईन फ्रॉईन्ड



260.00 Add to cart

शिखरावरून


[taxonomy_list name=”product_author” include=”4237″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”497″]


शिखरावरून.. 
एडमंड हिलरी म्हणजे शेर्पा तेनसिंगसह उत्तुंग एव्हरेस्ट शिखर सर करणारे साहसवीर !
‘एव्हरेस्ट’ व्यतिरिक्त त्यांनी
■ स्नो – कॅट ट्रॅक्टरने दक्षिण ध्रुवावर यशस्वी मार्गक्रमण
■ उत्तर ध्रुवावर रोमहर्षक मोहीम
■ जेट बोटीने बंगालच्या उपसागरातून गंगा नदीचा भाग काढत तिच्या उगमापर्यंत जाण्याचा अचाट उपक्रम…

अशी मानवाला अशक्यप्राय वाटणारी अनेक साहस – शिखरे गाठली. व्यक्तिगत जीवनातही दुःखाचे डोंगर पेलणाऱ्या मृदु – निर्मळ हिलरी यांनी मानवतेचा ओलावा जीवनभर जोपासला. भारताशी अतूट नातं जोडणाऱ्या न्युझिलंडवासी हिलरींनी हिमालयातील लोकांसाठी जे कल्याणकारी कार्य हाती घेतले, ते आजतागायत सुरू आहे. भारतप्रेमी हिलरींनी भारतात ‘हायकमिशनर’चे पदही भूषविले. त्यांच्या साहसी उपक्रमांची माहिती देणारी, त्यांचे रोमहर्षक अनुभव कथन करणारी आणि त्यांचे सार्थ व्यक्तिगत जीवन उलगडणारी ही त्यांची ‘आत्मगाथा’ शिखरावरून !




375.00 Add to cart

No Effort Required

 


[taxonomy_list name=”product_author” include=”4220″]

[taxonomy_list name=”product_author” include=”4221″]


Dhananjay Joshi grew up in Pune. He was born in Akola in 1947. After successfully completing the B.E.(Electronics and Telecommunications) curriculum in Pune Engineering College he came to the U.S. for graduate studies. He has resided in Chicago since then. He completed M.S. in Electrical Engineering and M.S. in Mathematics from the Illinois Institute of Technology. During his Chicago days, Dhananjay has had the blessing of learning under renowned Buddhist Masters from Thailand (Vipassana) and Korea (Zen).
He co-founded the Chicago Meditation Center with Robert and Dixie Ray. He volunteers at the Theosophical Society and contributes to their quarterly – Quest – as a book reviewer. He also offers workshops on “spiritual Tools for End -of-Life ” at the theosophical Society. Currently he teaches Statistics at a local university.


 

300.00 Add to cart

STARUP MANTRA

15 Path-breaking stories that will help you starup


[taxonomy_list name=”product_author” include=”4222″]


Startup is a path to express new ideas , to experiment and see your dreams transform into reality. Innovative thinking, appropriate technology implementation , building a hardworking team and to grow your business in the market, are some critical factors for a successful business. This book talks about these factors through unique stories of highly inspiring young entrepreneurs.

 Highlights of the book : 
  •  A series of interviews of 15 dynamic & young entrepreneurs. From conceptualization to seamless execution and exponential business growth.
  •   Guidance by renowned businessman and inspirational leader – Dr. Suresh Haware.
  • 10 Tips and principles of successful business development.
A Startup Mantra that gives you a detailed outlook on how to build a giant business from a small idea.

 

250.00 Add to cart

अयोध्या ते वाराणसी

भाजपच्या प्रवासाची आँखों देखी हकीगत


प्रकाश आकोलकर


भारतीय जनता पक्षाचा सत्तेपर्यंत पोचण्याचा खऱ्या अर्थाने प्रवास सुरु झाला तो १९९० च्या ‘सोमनाथ ते अयोध्या’ रथयात्रेपासून… तेव्हा ‘भाजप’चं नेतृत्व होतं वाजपेयी अडवाणी यांच्याकडे. नंतर १९९८ पासून सहा वर्षं सत्तेवर राहिल्यानंतर २००४ साली ‘भाजप’ला सत्तेवरून पायउतार व्हावं लागलं… आणि तेव्हापासून पक्षसंघटना ढवळून निघायला सुरुवात झाली . पुढे नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली अधिक आक्रमक होत , ‘भाजप’ ने २०१४ ची लोकसभा निवडणूक लढवली… आणि हा पक्ष पुन्हा सत्तारूढ झाला… व तेथून ‘भाजप २.०’ची सुरुवात झाली . २०१४ च्या निवडणूकीचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे मोदी यांनी ‘वाराणसी’ येथूनही लोकसभेची जागा लढवली आणि त्याच जागेचं प्रतिनिधित्व कायम ठेवलं…
हा सर्व प्रवास ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी ‘दिसलं तसं… बघितलं जसं’ या शैलीत पुस्तकात मांडला आहे. पंचवीस वर्षांचा हा प्रवास सांगता – सांगता अकोलकर दीनदयाळ उपाध्याय, शामा प्रसाद मुखर्जी, जनसंघ… अशा पूर्वेतिहासाचाही आढावा घेतात आणि या सर्व प्रवासाचं वस्तुनिष्ठपणे विश्लेषणही करतात.

भाजपच्या वाटचालीचा समग्रपणे मागोवा घेणारं मराठीतलं महत्वाचं पुस्तक… अयोध्या ते वाराणसी !




340.00 Add to cart

लिव्ह टू राइड

 

मंदार ठाकूरदेसाई


हौस , शिस्त आणि साहस यांनी जर हातात हात घालून एकत्र प्रवास केला तर त्यातून मिळणारा आनंद काही विरळाच … ! मंदार ठाकुरदेसाई यांच्या हौरोची गोष्ट म्हणूनच वेगळी ठरते . सुपरबाइक्सच्या आवडीला त्यांनी प्रोफेशनल बाइकिंगची जोड दिली आवड व हौस ते साहस … आणि साहस ते ध्येयपूर्ती हा त्यांचा प्रवास सुपरबाइक्स इतकाच सुपर ठरला . कमी पल्ल्यांच्या मोहिमांपासून थेट काश्मीर ते कन्याकुमारी अशा थरारक मोहिमा करत त्यांनी सुपरबाइक्सवरुन एक लाख किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला . वयाच्या पंचेचाळीशीपासून सुरू केलेल्या या धाडसी मोहिमांनी त्यांना आनंद तर दिलाच पण सोबत शिस्त , नियोजन कौशल्य , समयसूचकता आणि मित्र परिवार अशा बऱ्याच काही गोष्टीही ह्या मोहिमांतून त्यांना मिळत गेल्या . हौसेला मोल नसतं आणि वयाचं बंधनही नसतं असा आत्मविश्वास देणारं पुस्तक लिव्ह टू राइड !



 

500.00 Add to cart

विश्वामित्र सिण्ड्रोम

 

पंकज भोसले


विसाव्या शतकाच्या अखेरीला जागतिकीकरण नामक काहीतरी झालं आणि त्याचे पडसाद समाजाच्या सर्व थरात उमटले. जग लहान झालं. इंटरनेटच्या माध्यमातून हव्या नको त्या बऱ्याचशा गोष्टी थेट आपल्या दारात येऊन पोचल्या आणि त्यांनी आपल्या जगण्याचं तंत्रच बदलून टाकलं. ‘विश्वामित्र सिण्ड्रोम’मधल्या जोडकथा या अशा मोठ्या बदलाच्या साक्षीदार आहेत. वरवर पाहता त्या मुंबईनजीकच्या एका वस्तीत इंटरनेटवरून अवतरलेल्या पोर्नोग्राफीचा आणि त्यामुळे वरकरणी पापभीरू वाटणाऱ्या  समाजातल्या विविध वृत्तीदर्शनाचा धांडोळा घेतात, पण प्रत्यक्षात तो त्यांचा केवळ एक पैलू आहे. तंत्रज्ञानापासून संगीतापर्यंत आणि राहणीमानापासून नातेसंबंधांपर्यंत आपला भवताल कसा बदलत गेला, याचं हे एकाच वेळी धक्कादायक तरीही गमतीदार असं दर्शन आहे.
पंकज भोसले हा पत्रकार असण्याबरोबर सिनेमा आणि साहित्याचा चाणाक्ष अभ्यासक आहे, एका अस्वस्थ काळाचा निरीक्षक आहे. आणि त्याचं हे टोकदार निरीक्षण ‘विश्वामित्र सिण्ड्रोम’मधल्या कथांना त्यांच्या साऱ्या विक्षिप्तपणासह जिवंत करतं.
गणेश मतकरी

 

350.00 Add to cart

मिट्ट काळोख …लख्ख उजेड

एक व्यसनी गर्दुल्ला ते सफल जीवन…

दत्ता श्रीखंडेचा स्तिमित करणारा जीवन प्रवास


सुमेध वडावाला ( रिसबूड )


उजड काळोख्या वाटेवरून प्रवास करता करता प्रकाशाचे किरण दिसू लागतात काय आणि तो प्रवास एक एक अकल्पनीय वळसे घेत घेत उजेडाकडे झेपावतो काय…. लहानपणापासून दत्ता श्रीखंडेला असलेल्या व्रात्य सवयी अधिक व्रात्य संगती … त्याला जोड दुर्दैवी प्रसंगांची आणि प्रतिकूल परिस्थितीच… मग घरून पळून जाणं, कमाईसाठी लहान-सहान कामं करणं , तिथले खचवून टाकणारे अनुभव घेणं हे सर्व अपरिहार्यपणे आलंच. त्यातूनच मग दत्ता अवैध धंद्यांतील नोकरीत गुरफटत जातो आणि नकळतपणे अधोविश्वात प्रवेश करतो. चोऱ्या, पाकीटमारीचे धंदे, दारू – गर्दच्या व्यसनांचा विळखा, जेलच्या वाऱ्या अशा न संपणाऱ्या दुर्दैवी फेऱ्यांत दत्ता अडकून जातो . काळोख्या गल्ल्यांमधून प्रवास करता करता मिट्ट काळोखाच्या हमरस्त्यावर जाऊन पोचतो… पण एके दिवशी त्याला’ मुक्तांगण’ नावाचं मोकळं पटांगण सापडतं… आणि त्याला स्वतःमधल्याच नवीन दत्ताचा शोध घेण्याची संधी मिळते. मग सुरू होतो लख्ख उजेडाकडे जाण्याचा त्याचा प्रवास !

थक्क करणारी आत्मकथा – मिट्ट काळोख … लख्ख उजेड !



 

375.00 Add to cart

माझ्या धडपडीचा कार्यनामा

उद्योग, व्यवस्थापन… लेखन, समाजकार्य… एक उद्बोधक मुशाफिरी!


[taxonomy_list name=”product_author” include=”3805″]


माझ्या धडपडींचा कार्यनामा ‘आयआयटी’ आणि ‘आयआयएम’ सारख्या प्रतिष्ठित शिक्षण संस्थांमधून साठ – सत्तरच्या दशकांत विद्यार्थी म्हणून घडताना, एक तरूण भवतालच्या समाजाकडेही संवेदनशीलतेने बघत होता…. तर करियर घडवताना, लठ्ठ पगाराच्या विळख्यात अडकून नोकरी एके नोकरी न करता विविध क्षेत्रांत कल्पक संकल्पनांचा अवलंब करत होता… अनेक प्रयोग करत खऱ्या अर्थाने कार्यरत होता. मॅनेजमेन्ट क्षेत्रातील गुरू आणि सामाजिक चळवळीतील पूर्णवेळ कार्यकर्ता अशा दोन ध्रुवांवरच्या भूमिका निभावत विधायक काम करू पाहणारा हा धडपड्या म्हणजे आनंद करंदीकर..
‘इंडसर्च’ या प्रसिद्ध मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या स्थापनेमध्ये त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे . ‘मेट्रिक कन्सल्टन्सी लि.’  ही भारतातील अव्वल दर्जाची मार्केट रिसर्च आणि कन्सल्टन्सी फर्म त्यांनी दूरदृष्टी ठेवून उभारली. या कंपनीच्या माध्यमातून शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागातील युवकांमधील कौशल्य विकसित करून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. सामाजिक कामाच्या आघाडीवर ‘युक्रांद’ , ‘जनवादी महिला संघटना’ , ‘लोकविज्ञान संघटना’ अशा संघटनांसोबत अनेक संघर्षात्मक आणि विधायक कामं त्यांनी केली. या पुस्तकात त्यांनी आपल्या अशाच अनेक धडपडींना स्वतःच्या खास शैलीत शब्दबद्ध केलं आहे. हे सर्व कार्यानुभव वाचतांना जाणवते ती त्यांची काम करण्याची तळमळ, कामाकडे बघण्याचा व्यावसायिक दृष्टिकोन, कमालीची कल्पकता आणि अचंबित करणारा उत्साह !
एका प्रसिद्ध कवीचा मुलगा ही ओळख मागे टाकत दोन टोकांवरच्या प्रवासातील उड्या घेत केलेल्या आनंदी धडपडीचा हा प्रामाणिक लेखाजोखा … अर्थात माझ्या धडपडीचा कार्यनामा !

 

Original price was: ₹395.00.Current price is: ₹340.00. Add to cart

रवींद्रनाथ टागोर

 


अमर चित्र कथा


विसाव्या शतकाच्या सुरुवातीला रवींद्रनाथ टागोर यांच्यामुळे बंगाली साहित्यविश्वात आमूलाग्र बदल घडून आले. टागोर हे प्रतिभावान कवी, चित्रकार, कादंबरीकार आणि मोठे समाजसुधारक होते. त्यांना फक्त पुस्तकी शिक्षण पटत नसे, म्हणूनच विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल निर्माण करण्यासाठी त्यांनी आश्रम व्यवस्थेवर आधारित एक शाळा ‘शांतिनिकेतनमध्ये’ सुरु केली. साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळालेल्या या असामान्य व्यक्तीचे हे प्रेरणादायी जीवनचरित्र !


 

90.00 Add to cart

सुभाषचंद्र बोस

 


अमर चित्र कथा


“जय हिंद! “या सुभाषचंद्र बोस यांच्या युद्धाच्या आरोळीने भारतीयांच्या मनात आशा निर्माण केली. जपानी युद्धकैद्यांच्या छावण्यांमधील भारतीय सैनिक तसेच देशातील स्वातंत्र्यप्रेमी तरुण त्यांच्या आवाहनामुळे प्रेरित झाले होते. संपत्ती आणि सुखसोयींसह जन्माला आलेला हा तेजस्वी विद्वान जन्मजात नेलाही होता. त्यांच्या कल्पना आणि प्रयत्नांनी भारताला ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळवून दिले.


 

90.00 Add to cart

महात्मा गांधी

 


अमर चित्र कथा


मोहनदास करमचंद गांधी… यांचा आदर्शवाद आणि सत्याप्रतीची ठाम निष्ठा याची थट्टा करण्यात आली. त्यांचा साधेपणा आणि विनयशील वृत्ती याकडेही नेहमी उपहासाने पाहिलं गेलं. महात्मा गांधींनी अशा गोष्टींना कधीही प्रत्युत्तर दिलं नाही. त्यांच्यासमोर दांडगी ब्रिटिशसत्ता पार झुकली. या पुस्तकात महात्मा गांधी यांच्या जीवनकर्तृत्त्वाचा आढावा घेतला आहे. बालवयात एका विचारी आणि शांतस्वभाव असलेल्या मुलाचं व्यक्तिमत्त्व बघता बघ पार बदललं. अत्यंत समर्थ, सक्षमवृत्ती आणि निर्धाराचं ते चालतं बोलतं प्रतीक बनले. लक्षावधी लोकांच्या हृदयात स्वातंत्र्याची ज्योत चेतवून त्यांनी भारताचा स्वातंत्र्यलढा बळकट केला.


 

199.00 Add to cart

वीर सावकर

 


अमर चित्र कथा


ब्रिटिश राजसत्तेला हादरवून सोडणारे जे महान क्रांतिकारक भारतभूमीत जन्मले, त्यांमध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. शीयं सहनशीलता, त्याग आणि अपार बुध्दिमत्ता व प्रतिभा या गुणांचे अभूतपूर्व दर्शन त्यांच्या जीवनात घडले. अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये सावरकरांना काळया पाण्याची शिक्षा भोगण्यास ब्रिटिश सत्तेने भाग पाडले. अत्यंत भयावह अशा या शिक्षेला सावरकर कसे सामोरे गेले, त्याची अत्यंत प्रेरणादायक अशी ही चित्रकथा.


 

90.00 Add to cart
1 6 7 8 39