हॅपी लग्न.कॉम संच
सुबोध व समंजस समुपदेशन
विजय नागास्वामी
अनुवाद : माधवी खरे/शुभदा चौकार
लग्नाचं नातं कायम बहरत ठेवण्यासाठी एक आश्वासक सोबती…
सुबोध व समंजस समुपदेशन
विजय नागास्वामी
अनुवाद : माधवी खरे/शुभदा चौकार
लग्नाचं नातं कायम बहरत ठेवण्यासाठी एक आश्वासक सोबती…
एस. हुसैन झैदी
अनुवाद: रमा हर्डीकर- सखदेव
ही थरारक कथा आहे, देशविघातक कारस्थानं करणाऱ्यांना पृथ्वीतलाच्या कोपऱ्या कोपऱ्यांतून हुडकून काढण्यासाठी केलेल्या एका धाडसी ऑपरेशनची!
मुंबईवर २६/११चा भीषण दहशतवादी हल्ला झाला, तेव्हा देशाच्या सुरक्षेबद्दल, सुरक्षाव्यवस्थांच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्न उपस्थित झाले. सर्वसामान्यांच्या मनातले ते प्रश्न, सुरक्षादलांच्या मनातली खदखद आणि तीव्र संताप यांना केंद्रबिंदू मानून एक धाडसी गट महत्वाकांक्षी ऑपरेशन आखतं, अशी एकंदर या थरारनाट्याची मध्यवर्ती कल्पना आहे.
या ऑपरेशननुसार २६/११च्या मास्टरमाइंडचा देश-विदेशात शोध घेतला जातो. त्यासाठी टर्की, दुबई, इंग्लंड, स्वीडन, सिंगापूर, पाकिस्तान आणि अर्थात भारतातही जोरदार चक्र फिरवली जातात आणि दहशतवाद्यांना जेरबंद केलं जातं. सत्यघटनांच्या तपशिलांभोवती गुंफलेल्या या काल्पनिक कथानकातील बौद्धिक डावपेच मती गुंगवून टाकतात…
पानापानांवर वाचकांना खिळवून ठेवणारा थरार… मुंबई अॅव्हेंजर्स
डॉ. रवी बापट
सुनीती जैन
ही सारी कहाणी आहे केईएम हॉस्पिटलमधील ‘वॉर्ड नंबर पाचची’. वैद्यकीय व्यवसायात असताना डॉ.बापट यांना आलेले अनुभव, उपचारादरम्यान भेटलेले विविध प्रकारचे रुग्ण, डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉईज…
डॉक्टरने रुग्णाकडे केवळ शास्त्रीय दृष्टिकोनातून आणि पुस्तकी ज्ञानातून पाहणं पुरेसं नाही. रुग्णाचं मन, त्याचा स्वभाव, त्याच्या भोवतालचं वातावरण हे समजून घेवून त्यांच्याशी संवाद साधून मगच उपचार करणं डॉ.बापट यांना गरजेचं वाटलं. शरद पवार ते सतीश राजे, दादा कोंडके ते दत्तू मिस्त्री, रुग्ण कुणीही असो त्याची पत-प्रतिष्ठा न पाहता शल्यचिकित्सक डॉक्टर बापटांनी सारख्याच आपुलकीने उपचार केले. अशा सर्व अनुभवांविषयी…
व्यवसायाशी संबंधित प्रत्येकासाठी!
डॉ. अनिल लांबा
अनुवाद :वीरेंद्र ताटके
सुप्रसिध्द चार्टर्ड अकौंटंट आणि प्रशिक्षक डॉ. अनिल लांबा यांनी या पुस्तकात आर्थिक व्यवहाराचे निर्णय सजगपणे घेऊन आर्थिक अडचणीत न येता व्यवसायात यशस्वी कसं व्हावं हे व्यवहारातल्या साध्या-सोप्या उदाहरणांमधून समजावून सांगितलं आहे.
हे सांगताना डॉ. लांबा यांनी योग्य वित्तव्यवस्थापन कसं करावं, नफा-तोटा-पत्रक, बॅलन्स शीट कशी समजून घ्यावी, मार्जिनल कॉस्टिंग, टॉप लाइन व बॉटम लाइन, लीव्हरेज आदींसारखे किचकट वाटणारे विषयही सहजसोप्या शब्दांत रंजक पध्दतीने विशद केले आहेत.
त्यामुळे स्वत:चा व्यवसाय असलेले व्यावसायिक, छोटे-मोठे व्यापारी व उद्योजक, बँक अधिकारी, विद्यार्थी तसेच या विषयात रस असलेले जिज्ञासू अशा सर्वांसाठी हे पुस्तक मार्गदर्शक आणि उपयुक्त ठरेल, हे निश्चित!
”आज ना उद्या प्रत्येकाला हे नक्की पटेल की कोणताही
व्यवसाय यशस्वी होण्यासाठी बॅलन्स शीट आणि
वित्तव्यवस्थापन समजून घेणं महत्त्वाचं असतं.”
-अनिल लांबा
चित्रपटसृष्टीला सुवर्णकाळ बहाल करणा-या संगीतकारांची वैशिष्टयं आणि त्यांच्या अजरामर गाण्यातील सौंदर्यस्थळं…
मृदुला दाढे जोशी
हिंदी चित्रपटसृष्टीचा अर्थात चित्रपटगीतांचा सुवर्णकाळ…
या कालखंडावर आपली नावं सुवर्णाक्षरांनी कोरणारे संगीतकार कोणते?
प्रत्येक संगीतकाराचा बाज वेगळा कसा? त्याची वैशिष्ट्यं कोणती?
त्यांची अजरामर गाणी कोणती?
त्या गाण्यांच्या चालींची, ऑर्केस्ट्रेशनची वैशिष्ट्यं कोणती?
त्यातील हरकतींचं, केलेल्या प्रयोगांचं महत्त्व काय?
त्यांतील कोणत्या जागा म्हणजे त्या गाण्यांची सौंदर्यस्थळं म्हणता येतील?
एकंदर सांगायचं तर, ही गाणी आपल्यावर
४०-५०-६० वर्षं कसं काय गारूड करू शकतात
हे नेमकेपणे सांगून, रसिकतेने केलेलं विश्लेषण म्हणजेच…
हिंदी चित्रपट संगीताच्या मर्मज्ञ
मृदुला दाढे-जोशी लिखित एक आस्वादात्मक पुस्तक
रहें ना रहें हम…
विश्राम गुप्ते त्रिधारेतील पहिलं पुस्तक
विश्राम गुप्ते
वसंताच्या प्रेमात वेडी झालेली कविहृदयाची राणी, दिघ्यांच्या घराचा उंबरठा ओलांडते खरी; पण लग्नानंतर काही दिवसातच तिला प्रीती सुकून गेल्यासारखी वाटते. आपल्या जीवनात वसंत फुलवणारा तिला वैशाखवणव्यासारखा वाटू लागतो. चेटूक झाल्यागत ती उदात्त प्रीतीचा शोध घेऊ लागते आणि सुरुवात होते संघर्षाला…
म्हंटलं तर या कादंबरीचं हे थोडक्यात आशयसूत्र असलं, तरी त्यात बहुस्तरीय सूत्रांचा पेड विणण्यात आला आहे. त्यात स्वातंत्र्योतर काळातील नागपूरचं मानववंशशास्त्रीय विवेचन येतं, तसंच मानवी जीवनाच्या अपूर्णतेवर चिंतनशील भाष्यही येतं.
जागतिक वाङमयात अभिजात ठरलेल्या अॅना कॅरनिना व मादाम बोव्हारी या कादंबऱ्यांची बरीच कथन वैशिष्ट्य यात एकवटलेली दिसली, तरी ‘चेटूक’चा प्रवास हा समांतरपणे होताना दिसतो. तीत प्रीती म्हणजे काय? ती शारीर कि अशारीर? केवळ भावुकतेवर मानवी व्यवस्था सुफल होऊ शकते का? असे प्रश्न निर्माण करण्यात आले आहेत.
गुतंवून ठेवणारी, अस्वस्थ आणि अंतर्मुख करणारी कादंबरी चेटूक…
शेअर बाजार समजून घेताना
डॉ. अनिल लांबा
अनुवाद: विरेंद्र ताटके
चार्टर्ड अकाउंटंट, विख्यात लेखक आणि अर्थविषयक सल्लागार अनिल लांबा यांनी या पुस्तकात शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक अशा मूलभूत गोष्टींचं सहज-सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केलं आहे.
या पुस्तकातून तुम्हाला काय मिळेल?…
१. शेअर्सची खरेदी-विक्री कशी आणि कधी करायची?
२. रेशो अॅनालिसिस म्हणजे काय?
३. कंपन्यांचा ताळेबंद (Balance sheet) कसा पाहायचा?
४. ट्रेडिंग करताना काय काळजी घ्यायची?
५. जास्तीत जास्त परतावा (Returns) कसा मिळवायचा?
६. ईपीएस (Earning per share) म्हणजे काय?
याशिवाय शेअर बाजारातल्या संकल्पनांची उपयुक्त माहिती आणि बरंच काही…
शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना तसंच त्याकडे उत्पन्नाचं साधन म्हणून पाहणाऱ्या प्रत्येकाला जाणकार मित्राप्रमाणे मार्गदर्शन करणारं खास पुस्तक… फ्लर्टिंग विथ स्टॉक्स!
[taxonomy_list name=”product_author” include=”408″]
अनुवाद: [taxonomy_list name=”product_author” include=”352″]
महत्त्वपूर्ण राजकीय घटना-घडामोडींनी, निर्णयांनी आणि व्यक्तित्वांनी १९७० चे दशक व्यापून टाकले होते. या सर्वांचा या पुस्तकात एका अंतस्थाने अतिशय तारतम्याने आढावा घेतला आहे. तसेच भारतातील लोकशाहीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन केले आहे. आणीबाणी लागू करतानाची परिस्थिती, उच्च पातळीवरील निर्णयप्रक्रिया, पडद्यामागील गुप्त हालचाली, संजय गांधी व चौकडीच्या कारवाया आणि इंदिरा गांधींची याबाबतची भूमिका, जयप्रकाश नारायण यांच्याशी गोपनीय वाटाघाटी, तसेच या दशकातील बांगला देशाची निर्मिती, सिमला करार, सिक्कीमचे विलिनीकरण इ. अभूतपूर्व घटनांमागील तपशील रंजक तितकाच उद्बोधक! पुस्तकाचे लेखक पी.एन.धर हे इंदिराजींचे सल्लागार व यावेळचे पंतप्रधान कार्यालयाचे प्रमुख होते. इतिहासाच्या पानात दडलेले सत्य सांगणारे, इंदिराजींच्या राजकीय जीवनाचे बरे-वाईट पैलू उलगडणारे आणि आतापर्यंत अज्ञात असलेली माहिती उघड करत परिस्थितीचा सर्वंकश परामर्श घेणारे महत्त्वपूर्ण पुस्तक.
इस्लाम, अमेरिका आणि दहशतविरोधी युद्ध यांबाबतचं साक्षेपी विवेचन
महमूद ममदानी
अनुवाद : पुष्पा भावे, मिलिंद चंपानेरकर
चांगला’ मुसलमान कोण? ‘वाईट’ मुसलमान कोण? – हे कुणी ठरवलं? कसं ठरवलं? का ठरवलं? मुळात ‘गुड मुस्लीम’, ‘बॅड मुस्लीम’ या संकल्पनांचा व ‘राजकीय ओळखीं’चा उद्भवच कसा झाला? अशा अनेक प्रश्नांच्या अंगाने ‘शीत युद्धा’नंतरच्या काळातील जागतिक राजकारणाचं अभ्यासपूर्ण व मार्मिक विश्लेषण करणाऱ्या ‘गुड मुस्लीम-बॅड मुस्लीम’ या महमूद ममदानी लिखित मूळ इंग्रजी पुस्तकाचा हा अनुवाद.
महमूद ममदानी हे एक जागतिक कीर्तीचे अभ्यासक आणि मानववंश शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या मते, पाश्चात्त्यांनी जाणीवपूर्वक अशा स्वरूपाच्या सुलभ व्याख्या केल्या की, पाश्चात्त्य संकल्पनांनी संस्कारित तो म्हणजे ‘गुड मुस्लीम’ आणि आधुनिक-पूर्व विचारांना धरून ठेवणारा वा कडव्या विचारांचा तो ‘बॅड मुस्लीम’. एकंदरीतच, १९६०च्या दशकातील व्हिएतनाम युध्द ते ‘९/११’च्या घटनेनंतरचा काळ या दरम्यान अमेरिका व त्यांच्या पाश्चात्य मित्रराष्ट्रांनी आपल्या राजकीय उद्दिष्टांसाठी मुस्लीम समाजसमूहांची ‘धार्मिक ओळख’ आणि ‘राजकीय ओळख’ यांची कशी हेतुपुरस्सर सरमिसळ केली आणि त्याचे किती विपरीत परिणाम संभवले, त्याचा उलगडा ममदानी या पुस्तकाद्वारे करू पाहतात. प्रदीर्घ संशोधन व विश्वासार्ह संदर्भांच्या आधारे त्यांनी हे पुस्तक सिध्द केलं आहे.
जागतिक राजकारणातील अनेक अज्ञात गोष्टींवर, घटनांवर नव्याने प्रकाश टाकून अनेक गैरसमजुती दूर करू पाहणारं आणि जागतिक शांततेच्या दृष्टीने सर्वांनाच विचारप्रवृत्त करू पाहणारं असं हे पुस्तक…
‘गुड मुस्लीम बॅड मुस्लीम!
स्व.यशवंतराव चव्हाण यांची दीक्षान्त समारंभातील भाषणे
[taxonomy_list name=”product_author” include=”456″]
मुत्सद्दी राजकारणी, विचारवंत आणि एक रसिक व्यक्तिमत्त्व म्हणून चिरपरिचित असलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते देशभरातील विविध विद्यापीठांचे दीक्षान्त समारंभ संपन्न झाले. तेथे केलेल्या शिक्षणाविषयीच्या चिंतनशील भाषणांचं संपादित पुस्तक म्हणजेच – `माझ्या विद्यार्थी-मित्रांनो…’
या पुस्तकातली सगळी भाषणं यशवंतरावांनी उच्च शिक्षण देणारया विद्यापीठांमध्ये दिलेली असली, तरीही त्यात ते प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचं महत्त्व ठळकपणे अधोरेखित करतात. शिक्षणाचा हेतू व्यक्तीचा विकास करणं एवढाच मर्यादित नसून त्यातून समाजाचाही विकास व्हायला हवा, ही त्यांची धारणा ते यात मांडतात. म्हणूनच समाजाच्या फार मोठ्या विभागाला शिक्षणाची गरज असल्याचं प्रतिपादन ते वेळोवेळी करतात, जे आजघडीलाही तितकंच लागू होतं.
शहरी व ग्रामीण शिक्षणातील तफावत, विकसित देशांसोबत जाण्यासाठी आवश्यक असणारे आधुनिक शिक्षण, उच्च शिक्षण घेतलेल्यांची समाजाप्रति असणारी जबाबदारी यांसारख्या अनेक महत्त्वाच्या विषयांची मांडणी यशवंतराव एखाद्या कसलेल्या शिक्षणतज्ज्ञाप्रमाणे करतात. विशेष म्हणजे ही मांडणी करताना स्नातक अर्थात नव-पदवीधरांविषयी म्हणजेच देशाच्या तरुण उच्चशिक्षित पिढीविषयी त्यांना वाटणारं प्रेम आणि आशावाद त्यांच्या शब्दाशब्दांतून व्यक्त होताना दिसतो.
अॅड. निशा शिवूरकर
महात्मा गांधी आणि स्त्री-पुरुष समता … दैनंदिन जगण्यातील घरकामाची वाटणी, स्वयंपाक, पती व्यसनी असणे, आळशी असणे, वर्चस्व गाजवणारा असणे, विवाहानंतर मुलीच्या आई-वडिलांची भूमिका अशा अनेक प्रश्नांवर गांधीजींनी आपली मते मांडली आहेत व ती सारी मते पितृसत्ताक रचनेच्या विरोधी आहेत व स्त्री-पुरुषांच्या सर्वंकष समानतेवर आधारलेली आहेत. स्त्रीच्या स्वतंत्र व स्वायत्त व्यक्तित्वाचे मूल्य गांधींच्या विवेचनाचा आधार आहे हे यातून वारंवार स्पष्ट होते. शिवूरकर यांनी दिलेल्या दाखल्यांमुळे गांधी आधुनिक नाहीत असे आग्रहाने सांगणाऱ्यांना गांधीचा आधुनिक मूल्यांचा आग्रह परस्पर उत्तर देणारा आहे… …निशा शिवूरकर या पेशाने वकील असल्याने त्यांच्या लिखाणातील युक्तिवादावर त्याचा प्रभाव जाणवतो. अर्थातच इथला त्यांचा युक्तिवाद प्रतिस्पर्ध्याला खोटे ठरवण्याच्या संदर्भातील नाही. कोणालाही खोडून काढणे किंवा निरुत्तर करणे हे त्यांच्या लेखनाचे उद्दिष्टच नाही. त्यांच्या वाचनातून, चितनातून, मननातून त्यांना जाणवलेले गांधी त्यांनी सुसंगतपणे मांडले आहेत. समतेच्या संदर्भात आणि विशेषतः स्त्री-पुरुषांच्या समतेसंदर्भात तिचे सर्व पैलू त्यांनी विचारात घेतले आहेत. त्यांच्या निष्कर्षांना गांधीवचनांचा भक्कम आधार आहे. स्त्री-पुरुष समता, समानता, स्त्रियांचे स्वातंत्र्य, विवाह, संततिनियमन, सामाजिक काम, ब्रह्मचर्य यावरच्या लिखाणातून त्यांनी ‘रॅडिकल गांधी’ उभा केला आहे. या पुस्तकाचे योगदान यातच सामावले आहे….
किशोर बेडकीहाळ (प्रस्तावनेतून…) ज्येष्ठ विचारवंत
संग्राम गायकवाड
समाजातील नीतिमत्ता कशी व्यक्त होते? एकाच पातळीवर नाही, तर पूर्ण समाजाचा छेद घेत हे दाखवायचा एक उत्कृष्ट प्रयत्न लेखक करतो. वेगवेगळे लोक, त्यांचे आपापले दृष्टिकोन. त्यांच्या एकत्र नाचातून घडणारे समाजजीवन. उदाहरण आहे एका आयकर धाडीचे. मध्यमवर्गीयांना आवडणारी घटना. कोणी ‘मोठा’ ठेचला जातो आहे! पण असे होत नाही. कोणालाच फार समाधान न देणारे चित्र घडत जाते. उथळपणे ‘याला जीवन ऐसे नाव’ म्हणून गप्प बसावे का? की जॉन स्टाइनबेकसारखे There is just stuff people do म्हणावे ?
वाचकाला निवडीचे पूर्ण स्वातंत्र्य देत लेखक मंद स्मित देतो!
नंदा खरे
अरुणा सबाने
एखादा निर्णय चुकीचा ठरतो आणि आयुष्य हातातून पूर्णपणे निसटू लागतं… या परिस्थितीतून काही जण सावरतात तर, काही जण उद्ध्वस्त होतात. ही गोष्ट अशाच उद्ध्वस्तांची आणि सावरलेल्यांचीही…
अनूला तिचं लग्न झाल्यानंतर कळत, तिचा नवरा शरद समलैंगिक आहे…. तिचं संपूर्ण भावविश्वच कोसळू लागतं… आणि पुढे आयुष्य उद्ध्वस्त होतं. त्यांची मुलगी सुचिता बापावरचा हा ‘ठपका’ घेऊन सासरी कायम जाच सहन करत राहते. स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्याच्या लढाईत एका वळणावर मानसिक आजाराची बळी ठरते. मात्र, शलाका तिला एक खंबीर साथ देते आणि त्यातून तिच्या आयुष्याला सकारात्मक वळण मिळतं… ती सावरते.
हे झालं कादंबरीचं कथासूत्र. पण या कादंबरीतून लेखिका अरुणा सबाने जो कळीचा प्रश्न उभा करतात, तो म्हणजे समलैंगिकता समाजमान्य असती तर, अनू काय किंवा शरद काय किंवा सुचिता काय… या तिघांच्याही आयुष्याची होरपळ वाचली नसती का? समलैंगिकता आणि मानसिक आजार अशा आजच्या महत्त्वाच्या समस्यांवर आणि निषिद्ध समजल्या जाणाऱ्या विषयांवर थेट पण संयत भाषेत चर्चा करणारी कादंबरी दुभंगलेले जीवन.
व्यक्ती, कार्य आणि कर्तृत्व
डॉ. त्र्यं. कृ. टोपे
भारतात होऊन गेलेल्या अनेक सुधारकांमधलं अग्रगण्य नाव म्हणजे न्या. महादेव गोविंद रानडे! रानडे यांचं कार्य आर्थिक, राजकीय, धार्मिक व सामाजिक अशा सर्वच क्षेत्रांत असल्यामुळे ते महत्त्वाचं ठरतं. सर्वांगीण व सर्वंकष समाजसुधारणेचं स्वप्न रानडे यांनी एकोणिसाव्या शतकातच पाहिलं होतं.
न्या. रानडे हे प्राचार्य डॉ. त्र्यं. कृ. टोपे यांचे दैवत होते. या पुस्तकात टोपे यांनी रानडेंचं बालपण, शिक्षण, कौटुंबिक जीवन व कार्य-कर्तृत्व एवढाच जमा-खर्च न देता त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंवर प्रकाश टाकत अतिशय समग्रपणे त्यांचं व्यक्तिमत्त्व रेखाटलं आहे. रानडे यांच्यावरील वैचारिक प्रभाव, त्यांची स्वभाववैशिष्टयं, त्यांनी केलेल्या समाजसुधारणा, त्यावेळचं समाजजीवन, कोणत्याही कार्यामागची त्यांची मनोभूमिका, न्यायाधीश म्हणून त्यांची कारकीर्द आणि त्यांच्यावर झालेली समकालीनांची टीका असं व्यापक चित्रण टोपे यांनी या पुस्तकात अभ्यासपूर्णरीत्या केलं आहे.
न्या. रानडे यांच्यासारख्या समाजसुधारकांचं कार्य-कर्तृत्व व आदर्श तरुणांसमोर येणं आजच्या काळाची गरज आहे. त्या दृष्टीने डॉ. टोपे यांनी लिहिलेलं हे चरित्र मोलाची कामगिरी बजावतं.
[taxonomy_list name=”product_author” include=”4222″]
My BARC Days is a memoir of Dr. Suresh Haware’s inspirational journey from a remote village in India to becoming a nuclear scientist in India’s premier research organization Bhabha Atomic Research Centre (BARC). The book brings forth the author’s perspective of looking at difficulties as challenges and opportunities, and his intense passion for knowledge and research. His experiences span political events that affected the common man in India, days spent in educational institutions, work in BARC and also a Himalayan pilgrimage. Through detailed descriptions, the book gives a thorough understanding of life and work at BARC including a few milestones in the nation’s nuclear journey.
मुलांसाठी भुताच्या धमाल गोष्टी… ४ पुस्तकांचा सप्रेम भेट संच
राजीव तांबे
जगात भुतं नसतात…
असतात फक्त भुतांच्या गोष्टी!
मुलांनो,
तुम्हाला भेटायला
खास कोण येतय माहितेय?
प्रेऽऽऽमळ भूऽऽत…
हे असं तसं भूत नाहीये बरं का…
हे आहे एज्युकेटेड भूत!
बोला, आहे का काही तुमची इच्छा?
मग नुसतं म्हणा…
ओके…बोके…पक्के…काम शंभर टक्के!