MN_April21

Reading Time: 8 Minutes (832 words)

फॉन्ट साइज वाढवा

२३ एप्रिल हा दिवस ‘जागतिक पुस्तक दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने तरुण ग्रंथप्रेमी, विचक्षण वाचक अभिषेक धनगर यांनी ‘माझी निवड’ स्तंभासाठी लिहिलेला हा मर्मग्राही लेख…

‘कुठल्याही कथेची तीन मुख्य तत्त्वं असतात. पहिलं तत्त्व म्हणजे घटना, दुसरं कथांतर्गत पात्रांची चरित्रं आणि त्यांच्या भूमिका आणि तिसरं तत्त्व म्हणजे अवकाश-काळ. यातील पहिल्या दोन तत्त्वांसंबंधी काहीतरी मौलिक करून दाखवण्याची शक्यता बहुधा गुणाढ्याच्या बृहत्कथेनंतरच संपून गेलीय आणि तिसऱ्या तत्त्वाबद्दल बोलायचं तर लेखकाची कल्पना अवकाश-काळाच्या सर्व सीमा ओलांडून पुढे जाण्यास सक्षम आहे.’

वरील अवतरण हे मनोहर श्याम जोशी यांच्या ‘क्याप’ या कादंबरीची सुरुवात आहे. या अवतरणातून ध्वनित होतं तसा हा प्रस्तावनेचा भाग नाही, तर तो कादंबरीच्या संहितेचाच भाग आहे. ‘क्याप’ कादंबरीची अशी सुरुवात कादंबरीचा रूपबंध समजण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अशी आहे.

दोन हजार वर्षांपूर्वी गुणाढ्याने ‘बृहत्कथे’ची रचना केली; पण काळाच्या ओघात अनेक उत्तम ग्रंथांप्रमाणे बृहत्कथा लुप्त झाली. आज बृहत्कथेचे अवशेष सोमदेवाने रचलेल्या ‘कथासरित्सागर’ आणि क्षेमेन्द्राच्या ‘बृहत्कथा-मंजिरी’ या दोन ग्रंथांतून आपल्याला वाचायला मिळतात. ‘कथासरित्सागर’ हे मूळ पैशाची भाषेतील बृहत्कथेचे उत्कृष्ट असे संस्कृत रूपांतर समजलं जातं. त्यामुळे ते बृहत्कथेचं संस्कृत रूपांतर असल्याने आद्य लेखकाचा मान साहजिकपणे गुणाढ्याकडे जातो. कैलासस्थित श्रीशंकर पार्वतीचं मन रिझवण्यासाठी तिला गोष्ट सांगू लागतो. त्या कथेतील एक पात्र दुसरी एक उपकथा सांगू लागतं. पुन्हा त्या उपकथेतून अजून एका कथेची उत्पत्ती होते आणि कथा-उपकथांची ही मालिका अशाच तऱ्हेने पुढे जात जात पुन्हा मुख्य कथानकाच्या धाग्यावर अलगद येऊन मुख्य कथेला गती येते. अशी चक्राकार रचना असणाऱ्या शेकडो कथा गुणाढ्याने रचल्या. उपरोक्त अवतरणात म्हटल्याप्रमाणे कथेच्या मूलभूत तत्त्वांत काहीतरी मौलिक करून दाखवण्यासाठी गुणाढ्याने कसलाही अवकाश रिता ठेवलेला नाही. मनोहर श्याम जोशी कथेच्या सुरुवातीलाच वाचकाला याचं स्मरण करून देतात की, गुणाढ्याने आम्हा सर्वच आधुनिक कथालेखकांसमोर हा पेच उभा केला आहे. तरीही मी ही कथा सांगणार आहे, असं सांगून गुणाढ्याचं आव्हान स्वीकारल्याचं सूचित करतात.

‘क्याप’च्या कथानकाची सुरुवात ही दुहेरी खुनाच्या तपासापासून होते. वाल्मीकीनगर इथे भैरव मंदिराजवळ पोलीस डी.आय.जी. मेधातीथी जोशी आणि माफिया सरगना हरध्यानु हे एकमेकांच्या जीवावर उठलेले दोन शत्रू मृतावस्थेत आढळतात. दोन्ही मृतांचं शवविच्छेदन केल्यानंतर त्यात दोघांचा खून झाला असल्याची कुठलीच चिन्हं आढळत नाहीत. दोघंही एकमेकांचे शत्रू असले तरी दोघांनीही एकाच वेळी एकमेकांना कसं मारलं असावं? आणि मारलं असेल तर कशा प्रकारे? की त्या दोघांचाही खून कुणी तिसऱ्याच व्यक्तीने केला असावा? हे सर्व प्रश्न अनुत्तरित राहिल्याने वृत्तपत्रांतूनही या प्रकरणाला ‘भैरव-कांड’ या नावाने मोठी प्रसिद्धी मिळते. इथं निवेदक वाचकाला सांगतो की, दुहेरी खुनाचं हे रहस्य समजावून घ्यायचं असेल तर आपल्याला इतिहासात मागे डोकावून हे भैरव-कांड जिथे घडलं त्या शहराच्या वसण्याची कथा समजून घ्यायला हवी. कारण, भैरव-कांड कथेचा उगमच मुळी तिथून होतो. निवेदक आता चौदाव्या शतकातील शहराच्या वसण्याची कथा सांगू लागतो. पण हे रहस्य पूर्णांशाने उलगडायचं असेल, तर केवळ शहराची कथा पुरेशी नसून ज्या भैरव मंदिराजवळ हे खुनाचं नाट्य घडलं आणि ज्याच्या नावाने हे प्रकरण ओळखलं जाऊ लागलं त्या मंदिराच्या स्थापनेची कथा समजावून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. मंदिराच्या स्थापनेनंतर कथा पुन्हा मूळपदावर येत आहे असं वाटत असतानाच निवेदक स्वत:च्या जीवनाबद्दल सांगू लागतो.

‘क्याप’च्या कथेचा मोठा अवकाश निवेदकाच्या जीवनाने व्यापला आहे. मागास जातीत जन्माला आलेला नायक, त्याचं काकांकडून आलेल्या वैचारिक वारशाच्या रूपात कम्युनिस्ट असणं, नायकाचं ब्राम्हण मुलीच्या प्रेमात पडणं आणि नायिकेच्या दुर्दैवी मृत्यूनंतर नायकाचं आपल्या मूळ गावी येऊन स्थानिक राजकारणात सक्रिय होणं, कम्युनिझमच्या प्रसारासोबत कार्ल मार्क्सच्या नावाने मठाची स्थापना करणं, अशा प्रकारे ही कथा पुढे जात राहते. या स्थानिक राजकारणामुळेच भैरव-कांड घडल्याचं निवेदक सांगतो. पण हे कांड कुणी घडवलं या रहस्याचं काय करायचं? दोन शत्रू मृतावस्थेत सापडतात. दोघांचेही खून झाल्याची कसलीच चिन्हं शवविच्छेदनात आढळत नाहीत. मग भैरव-कांड घडलं कशामुळे? याचा उलगडा यथावकाश होतो. या कथेच्या सुरुवातीलाच लेखक सूचित करतो तशी ही कथा प्राचीन आख्यानांचा रूपबंध घेऊनच पुढे पुढे जात राहते. तरी लेखक पुन्हा स्वत:ला गुणाढ्याने आखलेल्या रेषेच्या आतच उभं असल्याचं पाहतो. परंतु या कादंबरीतून लेखकाने गुणाढ्याने आखलेल्या रेषेबाहेर झेपावण्याची क्षमता असणारी लांब उडी घेतली आहे हेही निश्चितपणे सांगता येते. ती कशी ते पाहू –

  1. प्राचीन आख्यायिकांमध्ये अद्भुत कथा सांगत असल्याची वाचकाला सतत जाणीव करून दिलेली असते. मनोहर श्याम जोशींची कथा वास्तवाच्या पक्क्या पायावर उभी आहे.
  2. प्राचीन आख्यायिकांत अभावानेच आढळणारा विनोद आणि मानवी जीवनातल्या शोकांतिकेकडेही विनोदी दृष्टीने पाहत तिची तीव्रता सौम्य करण्याचं कसब मनोहर श्याम जोशींच्या कथेत आहे.
  3. प्राचीन आख्यायिकांच्या स्वत:च्या अशाही काही मर्यादा आहेत. कथेला औत्सुक्याच्या शिखरावर असताना शापवाणी/ आकाशवाणी / पूर्वजन्माचं स्मरण अशा दुर्बल युक्तीने अकस्मात कथेचा अंत होऊन रसभंग होतो. असे कच्चे दुवे मनोहर श्याम जोशींच्या कथेत आढळत नाहीत.
  4. निखळ कथा सांगणं आणि कथा सांगण्याचा मनमुराद आनंद घेणं या दोन्ही गोष्टी साध्य करतानाच मनोहर श्याम जोशी समकालीन जीवनावर महत्त्वपूर्ण भाष्य करतात. जाती-व्यवस्था आणि सामाजिक रचना, क्रांतीचं स्वप्न पाहणाऱ्या बौद्धिक जीवांची कृतिहीन माथेफोड, जीवनाच्या मूलभूत प्रेरणांकडे दुर्लक्ष करत पूर्वग्रहांच्या गर्तेत अडकत चाललेल्या तरुणांची शोकांतिका हे गंभीर प्रश्नही जोशीजी या कथेतून उभे करतात.

-अभिषेक धनगर

क्याप / मनोहर श्याम जोशी / साहित्य अकादमी प्रकाशन

  • मला आवडलेली इतर काही पुस्तकं
    • पासोडी / लेखक- नीतीन रिंढे / पपायरस प्रकाशन
    • ग्रेप्स ऑफ रॉथ / लेखक- जॉन स्टाइनबेक / अनुवाद : मिलिंद चंपानेरकर, रोहन प्रकाशन
    • आडवाटेची पुस्तकं / लेखक- निखिलेश चित्रे / लोकवाङ्मय गृह प्रकाशन
    • झेन अॅण्ड द आर्ट ऑफ मोटरसायकल मेंटेनन्स/ लेखक- रॉबर्ट पिरसिग / अनुवाद :सरोज देशपांडे / रोहन प्रकाशन
    • लोकसाहित्याची रूपरेखा / लेखिका- दुर्गा भागवत / वरदा प्रकाशन
    • अक्षरनिष्ठांची मांदियाळी / लेखक- अरुण टिकेकर / रोहन प्रकाशन

पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल एप्रिल २०२१


लक्षणीय कथा-कादंबऱ्या

द ग्रेप्स ऑफ रॉथ

विस्थापित-स्थलांतरितांच्या जीवनावरील जगप्रसिद्ध कादंबरी


जॉन स्टाइनबेक यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९०२ रोजी कॅलिफोर्नियातील सलिनास इथे झाला. कॅलिफोर्नियाच्या खोऱ्यातील सुपीक भागात वसलेलं सलिनास हे टुमदार छोटेखानी शहर पॅसिफिक समुद्राच्या किनाऱ्यापासून सुमारे अवघं २५ मैल दूर असून पुढील काळात स्टाइनबेक यांनी सर्जनशील लेखन सुरू केलं. त्यांच्या अनेक कादंबऱ्यांना सलिनास आणि पॅसिफिकचा किनारा दोहोंची पार्श्वभूमी असल्याचं आढळून येतं. १९१९मध्ये स्टाइनबेक यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला. मात्र, जरी त्यांनी तिथे साहित्य आणि लेखनासंदर्भातील अभ्यासक्रम पार पाडण्यासाठी अधूनमधून प्रवेश घेतला, तरी १९२५मध्ये कोणतीही पदवी घेतल्याविनाच ते विद्यापीठातून बाहेर पडले. पुढील पाच वर्षं न्यू यॉर्कमध्ये पत्रकारिता व मोलमजुरी करून त्यांनी आपला चरितार्थ साधला. स्टाइनबेक यांनी आपल्या साहित्यिक कारकीर्दीत अविरत प्रयोग केले आणि वेगवेगळे मार्ग चोखाळून पाहिले. १९३०च्या दशकात त्यांनी कॅलिफोर्नियातील मजूरवर्गाचं जीवन टिपणाऱ्या पुढील तीन सशक्त कादंबऱ्या - ‘इन ड्युबिअस बॅटल' (१९३६), ‘ऑफ माइस अँड मेन' (१९३७) आणि त्यांची सर्वोत्तम अशी समजली जाणारी कादंबरी ‘द ग्रेप्स ऑफ रॉथ' (१९३९) यांची निर्मिती केली. त्यानंतरही त्यांनी आपलं लेखन अविरत सुरू ठेवलं. त्यांच्या आयुष्याचं अखेरचं दशक त्यांनी आपल्या तिसऱ्या पत्नीसह न्यूयॉर्क शहर आणि सेग हार्बर इथे व्यतीत केलं. तिच्यासोबत त्यांनी विविध ठिकाणी बराच प्रवास केला. १९६२मध्ये जॉन स्टाइनबेक यांना ‘नोबेल पुरस्कारा'ने गौरवलं गेलं. २० डिसेंबर १९६८ रोजी या थोर साहित्यिकाचं निधन झालं.

अनुवाद:
गंभीर वृत्तीचे अनुवादक, संपादक व लेखक म्हणून मिलिंद चंपानेरकर विख्यात आहेत. त्यांनी आजवर ‘लोककवी साहीर लुधियानवी' (मूळ लेखक : अक्षय मनवानी), ‘त्या दहा वर्षांतील गुरू दत्त' (मूळ लेखक - सत्य सरन), ‘सुन मेरे बंधू रे - एस.डी. बर्मन यांचं जीवनसंगीत' (मूळ लेखक - सत्या सरन), ‘वहिदा रेहमान... हितगुजातून उलगडलेली', (मूळ लेखक- नसरीन मुन्नी कबीर), ‘ए.आर. रहमान : संगीतातील वादळ' (मूळ लेखक - कामिनी मथाई), ‘भारतातील डाव्या चळवळीचा मागोवा’ (मूळ लेखक - प्रफुल्ल बिडवई), ‘गुड मुस्लीम बॅड मुस्लीम' (मूळ लेखक - महमूद ममदानी, सह-अनुवादक - पुष्पा भावे) यांसारख्या महत्त्वाच्या पुस्तकांचा अनुवाद केला असून ‘यांनी घडवलं सहस्रक' आणि ‘असा घडला भारत' या महद्ग्रंथांसाठी सह-संपादन, संशोधन व लेखन केलं आहे. त्यांनी दैनिक ‘इंडियन एक्स्प्रेस'साठी १९९१-२००० या कालावधीमध्ये पत्रकारिता केली आहे. गेली तीन दशकं त्यांनी विविध मराठी दैनिक आणि नियतकालिकांमधून समाजाभिमुख साहित्य, नाट्य व चित्रपटविषयक समीक्षापर लेखन आणि त्याचप्रमाणे, सामाजिक-राजकीय विषयांवर विश्लेषणात्मक लेखन केलं आहे. त्यांना ‘लोकशाहीवादी अम्मीस...दीर्घपत्र' या अनुवादित पुस्तकासाठी सर्वोत्कृष्ट अनुवादाचा २०१६ सालचा ‘साहित्य अकादमी' पुरस्कार प्राप्त झाला आहे.

लोकाभिमुख अमेरिकन लेखक म्हणून नावाजलेल्या नोबेल पुरस्कारप्राप्त जॉन स्टाइनबेक यांच्या ‘द ग्रेप्स ऑफ रॉथ’ या १९३९ मध्ये सर्वप्रथम प्रकाशित झालेल्या दीर्घ कादंबरीने अमेरिकेतील विस्थापित-स्थलांतरितांच्या समस्येला वाचा फोडली आणि समाज ढवळून निघाला. या वास्तववादी कादंबरीद्वारे त्यांनी या समस्येच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक पैलूंवर मोठ्या सर्जनशीलतेने आणि मानवी दृष्टिकोनातून भाष्य केलं. ही कादंबरी १९३०च्या दशकातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवरील असली, तरी भारतातील विस्थापितांच्या समस्यांबाबत आजही विचारप्रवृत्त करू शकेल अशी आहे.

भांडवलकेंद्री मोठ्या शेतीच्या धोरणाच्या पुरस्कारार्थ मध्य अमेरिकेतील लाखो लहान-मध्यम शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनींवरुन हुसकावून लावलं गेलं… पश्चिम अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील कापसाच्या, द्राक्ष-संत्र्याच्या बगिच्यांमध्ये काम मिळेल, या आशेने या विस्थापित कुटुंबांनी दोन हजार मैलांचा खडतर प्रवास करून केलेलं स्थलांतर… त्या प्रक्रियेत वाट्याला आलेलं दैन्य, निर्वासित छावण्यांमधील भीषण अमानवी जीवन आणि उद्धवस्थता…
आणि याच प्रक्रियेदरम्यान त्यांच्या जाणिवेत घडून आलेले सूक्ष्म बदल आणि आत्मिक क्षोभाची भावना…
एक विशाल बहुपेडी पट उलगडून दर्शविणारी ही एक हृदयस्पर्शी कादंबरी.

सर्जनशील रचना आणि आगळी संवादशैली या प्रमुख वैशिष्टयांनिशी साहित्य क्षेत्रात नवे मापदंड निर्माण करणाऱ्या या कादंबरीचा ‘साहित्य अकादमी’ पुरस्कारप्राप्त मिलिंद चंपानेरकर यांनी साधलेला हा तितकाच प्रयोगशील असा मराठी अनुवाद.

लोकांच्या समस्या लोकांसाठी लोकभाषेत व्यक्त करणारी ‘द ग्रेप्स ऑफ रॉथ’.


700.00 Add to cart

विश्राम गुप्ते त्रिधारा

चेटूक – ऊन – ढग


विश्राम गुप्ते हे मराठीतले आघाडीचे कादंबरीकार, समीक्षक आणि अनुवादक म्हणून प्रसिद्ध आहेत. धर्म, स्त्री-पुरुष नातेसंबंध, मानवी मन, कुटुंबव्यवस्था हे त्यांच्या चिंतनाचे विषय असून यांबद्दल ते आपल्या कादंबरी तसंच ललितेतर लेखनातून चिकित्सा करत असतात. अभिजात साहित्याबरोबरच मराठीतल्या नव्याने लिहणाऱ्या तरुण लेखकांचं लेखन ते आस्थेने वाचतात. त्याबद्दलही ते चिकित्सक दृष्टिकोन ठेवून टीकात्मक लिहितात. त्यांच्या पुस्तकांना राज्य शासनाच्या पुरस्कारांबरोबरच इतरही महत्त्वाचे पुरस्कार मिळाले आहेत.

प्रेम…

एक संकल्पना,

कौटुंबिक नातेसंबंध,

आणि

व्यक्तिगत जाणिवांचा

खोलवर शोध…

हे आहे

या त्रिधारेचे सूत्र.

अभिजात

कथनवैशिष्ट्यं असलेली

विश्राम गुप्ते लिखित

संग्राह्य कादंबरीत्रयी…


1,050.00 Add to cart

96 मेट्रोमॉल


मराठीतल्या आघाडीच्या तरुण लेखकांमध्ये प्रणव सखदेव यांचं नाव घेतलं जातं. त्यांनी अग्रगण्य मराठी दैनिकांत पत्रकार म्हणून काम केलं असून ते मराठी प्रकाशन क्षेत्रामध्ये संपादक व अनुवादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कथा आणि कविता मान्यवर नियतकालिकांमधून प्रकाशित होत असतात. ‘पायऱ्यांचा गेम आणि इतर कविता’ हा कवितासंग्रह, 'निळ्या दाताची दंतकथा’, ‘नाभितून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य' हे कथासंग्रह, व ‘काळेकरडे स्ट्रोक्स', ‘96 मेट्रोमॉल’ या कादंबऱ्या असं त्यांचं साहित्य प्रकाशित झालं आहे. त्यांना अनुवाद-प्रकल्पासाठी २०१५-१६ सालची ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ची अभ्यासवृत्तीही मिळाली आहे. त्यांना लेखनासाठी महत्त्वाची पारितोषिकं मिळाली असून इंग्रजीतल्या गाजलेल्या पुस्तकांचा अनुवाद त्यांनी केला आहे. फिक्शन लेखन करणं ही त्यांची पॅशन असून त्यातून समकालातल्या प्रश्नांचा भिडणं हे त्यांना महत्त्वाचं वाटतं. आजच्या तरुणांची मानसिकता, त्यांचे प्रश्न, विखंडित जगणं व तंत्रज्ञानाचा वाढता वापर या सगळ्याचं प्रतिबिंब त्यांच्या लेखनात पडलेलं दिसून येतं.

काळेकरडे स्ट्रोक्स’नंतरची प्रणव सखदेव यांची ही दुसरी कादंबरी. रूढार्थाने ‘काळेकरडे स्ट्रोक्स’ वास्तववादी कादंबरी आहे तर ‘96 मेट्रोमॉल’ ही अद्भुतिका! दोन्ही कादंबऱ्यांचे प्रोटॅगनिस्ट युवक असले, तरीही दोघांचे जीवनमार्ग पूर्णत: भिन्न आहेत, त्यांचं जग भिन्न आहे, त्यांतले घटना-प्रसंग, अनुभवविश्व भिन्न आहे. त्यामुळेच या दोन्ही कादंबऱ्या एकाच लेखकाच्या असल्या तरी त्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहणं भाग आहे!

‘96 मेट्रोमॉल’मधला मयंक एका काल्पनिक जगात प्रवेश करतो; हे जग असतं वस्तूंचं – आपण रोज वापरत असलेल्या वस्तूचं ! मयंकचा या वस्तूंशी जसजसा संबंध येऊ लागतो तसतसं त्या वस्तूच मयंकला वापरू लागतात! आणि यातूनच घडत जाते आजच्या उपभोगवादी जगण्यावर अद्भुतिकेतून भाष्य करणारी लघुकादंबरी…96 मेट्रोमॉल !


This novel is a work of fantasy. It speaks about the growing consumerism, self centered and individualistic approach


170.00 Add to cart

झुरांगलिंग


हृषीकेश पाळंदे याचा जन्म १९८५ सालचा. तो पुण्यातच शिकला आणि वाढला. आर्किटेक्चरची डिग्री अर्धवट सोडून त्याने बी.एस्सी. स्टॅटिस्टिक्स केलं. त्यानंतर एम.एस्सी व डिप्लोमा इन जर्नालिझम हे दोन्ही कोर्सेसही त्याने अर्धवट सोडून दिले. त्यानंतर कुठलीच नोकरी नीट केली नाही. अर्धवट सोडणं, हे त्याचं लक्षण बनलं. 'काय करणारेस तू पुढे?' या प्रश्नाला कंटाळून कुटुंब आणि पुण्याला सोडून २०११ साली अहमदाबाद ते जम्मू असा १९०० किमीचा एकांडा सायकलप्रवास त्याने केला. या सफरीत त्याला स्वत:बद्दल आणि आयुष्याबद्दल अनेक इंटरेस्टिंग प्रश्न पडले. तो डोक्यातला गुंता त्याने 'दोन चाकं आणि मी' या प्रवासवर्णनपर पुस्तकातून लिहिला. डोक्यातल्या प्रश्नांच्या चक्राला वाहिलेल्या 'बयो' आणि 'भरकटेश्वर' या दोन कादंबऱ्याही लिहिल्या. त्यानं अजूनतरी लिखाणाला सोडलं नाहीये. सध्या तो कोकणात राहतोय. चंगळवादाची झापडं लावून बसलेल्या जगात तो मिनिमलिस्ट जीवनशैलीनी जगू बघतोय . बुद्धाने सांगितलेल्या मध्यमार्गावर सध्या तो बरंच काही वाचतोय, त्यावर उलटसुलट विचार करतोय.

टडंगऽऽऽ टडंगऽऽऽ

मी आहे एक लेखकदेव…

एकदा काय झालं, पुण्यनगरीतल्या त्याच त्या रूटीनला वैतागून मी दूर हिमालयाच्या मुख्य रांगेच्याही पलीकडच्या रम्य प्रदेशात गेलो. हा लदाखी प्रदेश रूक्ष, बोडक्या मातकट पर्वतांचा. हिवाळ्यात तयार होणाऱ्या शुभ्र हिमगालिच्यांचा, खळाळ वाहणाऱ्या नद्यांचा, दरीतल्या हिरवाईचा, डोक्यावर असणाऱ्या गर्द निळ्याभोर आभाळाचा आणि त्याखाली ध्यानस्थ बसलेल्या बुद्धाचा! तिथे मी खूप दिवस मुक्काम ठोकला. सामान्य टुरिस्ट म्हणून गेलो नसल्याने मनसोक्त भटकत असतांना मी एक गोष्ट ऐकली. मग झालं काय की, त्या गोष्टीतल्या घटनांच्या प्रवाहाचा माग काढता काढता त्यात अनेक प्रवाह मिसळत गेले. म्हणजे अनिता-लोब्झांग, झुरांग-निस्सू, मेमेले…अशा जिवंत माणसांचा, अवलोकितेश्वर-तारादेवी या देवांचा आणि लिंग केसरसारख्या आख्यायिकांचाही! या प्रवाहात मी पाहिलेलं, न पाहिलेलं, माझ्या डोक्यातलं, मनातलं..असं सगळंच वाहत वाहत आलं. थोडक्यात काय तर, या लेखकदेवानी एक गोष्टच विणून टाकली वाचकदेवासाठी… अस्तित्वातल्या आणि नास्तित्वातल्या घटनांची… झुरांगलिंग !


300.00 Add to cart

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *