फॉन्ट साइज वाढवा

शत्रुसेनेचा पाहुणा

‘जर तुमच्याच सेनेकडून तुमच्यावर गोळी चालवली जाणार असेल, तर ती दयनीय गोष्ट ठरेल.’
‘ते तुमचं कुविख्यात जंगल पोस्ट,’ ब्रिगेडिअर नूर भारतीय सेनेच्या एका चौकीकडे निर्देश करत म्हणाले. ‘पीर पंजल’ पर्वतराजीच्या वरच्या भागात असलेली ती चौकडी भारताच्या जम्मू-काश्मीर भागातील पूँच शहराच्या जवळच आहे. त्या पर्वतराजीच्या पायथ्याच्या भागातून आमची लष्करी जीप जात होती. जीपच्या खिडकीतून डोकं बाहेर काढत मी त्या डोंगरांकडे पाहत होतो. त्यांनी त्या चौकीला ‘कुविख्यात’ म्हटलं, कारण त्यांच्या मते, त्या चौकीतील भारतीय जवान जंगलभागातील गर्द झाडांच्या पडलेल्या पालापाचोळ्यात लपून पाकिस्तानी जवानांवर आणि गावांवर गोळीबार करत होते आणि त्यामुळे प्राणहानी संभवत होती आणि मोठा नाशही होत होता.
‘ते तसं का करत असतील?’ त्यावर मी विचारलं.
‘मर्जी उनकी,’ नूर यांनी प्रतिक्रिया दिली. पुढे म्हणाले, ‘जो चाहे कर सकते हैं, कदर नही करते.’
नूर चुकीचं बोलत नव्हते. ‘एलओसी’वरील जवान बरेच वेळा विनाकारण गोळीबार करत असतात. जम्मू-काश्मीरलगतच्या ‘आंतरराष्ट्रीय सीमे’वर (‘इंटरनॅशनल बॉर्डर’ –‘आयबी’वर) मात्र युद्ध-प्रसंगांचा अपवाद वगळता सहसा असं होत नाही. परंतु ब्रिगेडिअर नूर ‘एलओसी’बाबत एक गोष्ट सांगत नव्हते – ती अशी की, दोन्ही बाजूने तसं केलं जातं. ‘मन मानेल’ तेव्हा गोळीबार करण्याची प्रेरणा होण्यामागील मूळ कारणं अनेक आहेत; त्यांपैकी काही म्हणजे, निव्वळ कंटाळा येणं आणि नैतिकदृष्ट्या वर्चस्व असल्याचं दर्शवून देण्याच्या लष्करी संस्कृतीतून उद्भवणारी कारणं.
काही वेळा कारणं निव्वळ ‘वैयक्तिक’ असू शकतात. निवृत्त पाकिस्तानी जनरल सिकंदर अफझल यांनी एकदा मला सांगितलं की, ‘जवान एकसुरीपणा घालवण्यासाठी अनेक गोष्टी करतात. सीमेपलीकडील जवानांनी सुकण्यासाठी वाळत घातलेल्या कपड्यांना गोळीबार करून छिद्र पाडणं, हा त्यांतलाच एक प्रकार. मनोरंजनासाठी त्यांच्याकडे फारच कमी मार्ग असतात.’ आणि काही वेळा जवान केवळ गंमत म्हणून गोळीबार करतात, त्यात दुसऱ्या बाजूकडील कुणाला इजा पोहोचवण्याचा उद्देश नसतो. वरिष्ठ पाकिस्तानी जनरल गाझी १९८०च्या दशकातील गोष्टींचा संदर्भ देऊन खिलाडूपणा आणि मौज म्हणून केलेल्या गोष्टींची परिणती ‘शस्त्रसंधी उल्लंघना’त कशी होते, त्याबद्दल सांगत होते – ‘(….) फालतू प्रसंग, जसे की, तुमच्याकडे भेटीसाठी कुणी आलेले असतात, उदाहरणार्थ, वरिष्ठ अधिकारी, कॉलेजचे विद्यार्थी किंवा कुटुंबातील लोक (…) तुम्हाला त्यांना प्रत्यक्ष गोळीबार कसा केला जातो, ते दाखवावंसं वाटतं आणि नाट्यमय गोष्टी मंचित केल्या जातात आणि तुम्ही शस्त्रसंधी उल्लंघनाची सुरुवात करून जाता. तो ‘गेम्समनशिप’चाच प्रकार असतो. दोन्ही बाजूंनी अशा गोष्टी केल्या जातात, आणि जेव्हा एका बाजूने अशी गोष्ट केली जाते, तेव्हा दुसरी बाजू त्याला अटकाव म्हणून उत्तर देते.’

LOC

श्रीनगरमधील माजी कोअर कमांडर जनरल हसनैन म्हणतात, “एलओसी’वर ‘नैतिक वर्चस्वा’ची एक संकल्पना असते – म्हणजे, ‘माझी सेना श्रेष्ठतर आहे’ आणि ‘नीतिधैर्य, प्रशिक्षण आणि क्षमता या बळावर मी तुझ्यापेक्षा वरचढ ठरतो’. हा मर्दानी खेळ असतो, प्रतिस्पर्ध्याच्या नजरेला नजर भिडवत खेळण्याचा.’’ अशाच गोष्टींमध्ये भर घालणारी एक गोष्ट निवृत्त भारतीय ब्रिगेडिअर अरुण सहगल यांनी सांगितली – ‘तुमचं वर्चस्व आणि तुमची त्या भागातील स्थिती, आणि सततच्या गोळीबाराद्वारे दुसऱ्याला दबावाखाली ठेवणं, यांतून तुम्ही तुमच्या नैतिक वर्चस्वाबाबत आश्वस्त करत असता.’

मी जर का तेव्हाच ‘जेएनयू’मध्ये परतून अभ्यासकांच्या संमेलनात बोलत असतो, तर त्यांना मी ‘मन मानेल’ तेव्हा, अर्थात ‘अॅट विल’ गोळीबार करण्याची संकल्पना समजावून सांगितली असती आणि ती ‘स्वायत्त लष्करी कारणां’च्या (ऑटॉनमस मिलिटरी फॅक्टर्सच्या) संकल्पनेच्या आधारे समजावून सांगितली असती. आणि याकडेही निर्देश केला असता की, अशा गोष्टी सामान्यत: दोन्ही बाजूला घडत असतात. अर्थात, आता मी ‘एलओसी’च्या पलीकडील शत्रुसेनेसोबत असल्याने मी अभ्यासकाची परिभाषा टाळत होतो. मात्र, जेव्हा नूर यांनी ‘तुमचं कूविख्यात जंगल पोस्ट’ अशा शब्दप्रयोगाचा वापर केला, तेव्हा मात्र माझ्या मनात संमिश्र भावना दाटून आल्या होत्या आणि ‘स्वदेश-निष्ठेबाबतच्या माझ्या भावनांची कसोटी’ तात्पुरती बाजूला ठेवावी लागली; तरीदेखील तेव्हा मनात एकीकडे, भारताबाबतची उत्स्फुर्तपणे दाटून आलेली ओढ, मैत्रभावना होती आणि त्याच वेळी पाकिस्तानी बाजूबाबत कोणतीही वैरभावना नव्हती. इथे मी पाकिस्तानी सेनेसोबत प्रवास करत होतो. त्यांच्या अतिथीभवनात झोपत होतो, त्यांच्याच जीपमधून फिरत होतो. त्यांचे सशस्त्र सैनिक दिवस-रात्र माझ्या अवतीभवती असायचे; याचसाठी की, मला कुणाकडूनही इजा होऊ नये – म्हणजे, भारतीय सेनेसह कुणाकडूनही. परंतु मी भारतीय आहे, आणि तिथे सीमारेषेच्या पलीकडेही मला अर्थातच, भारतीय म्हणूनच वागणूक दिली जात होती. असं असताना, तात्पुरत्या यजमानाप्रती मी निष्ठा राखणं क्षणभरासाठी तरी योग्य ठरलं असतं का? पुढील काळात जेव्हा ‘बट्टल सेक्टर’मध्ये ‘शस्त्रसंधी उल्लंघन’ झाल्याची बातमी माझ्या कानावर येईल, तेव्हा जे मारले गेले असतील, त्यांत माझ्या माजी यजमानांपैकी कुणीतरी असावं, अशी माझी इच्छा असायला पाहिजे की नको? ‘लष्करामधील कुणाचीही प्राणहानी झाली नाही’ अश्या प्रकारची वृत्तं वाचून मला दिलासा वाटावा की नाही? भारतीय जवानांवर गोळीबार करणं हे त्यांचं काम होतं आणि बहुतांश वेळा भारतीय जवानांची हत्या करणं हाच त्या कामाचा अर्थ होत होता. असं असताना, जेव्हा मी पाकिस्तानी अधिकाऱ्यांना शुभेच्छा व्यक्त करताना ‘गुड लक विथ युअर वर्क’ असं म्हणत होतो, तेव्हा त्याचा अर्थ काय होत होता? त्यांना त्यांच्या मोहिमेत यश मिळावं, अशी माझी इच्छा होती का?

थोडक्यात, मानसशास्त्रीय आणि नैतिकदृष्ट्या मी कुणाची बाजू घ्यायला पाहिजे? ज्या ‘जीप’मधून मी पाकिस्तानी सैनिकांसोबत प्रवास करत होतो त्या ‘जीप’वर जे गोळीबार करू शकत होते, अशा ‘जंगल पोस्ट’चं रक्षण करणाऱ्या भारतीय सैनिकांची, की त्या पाकिस्तानी सैनिकांची जे ‘जंगल पोस्ट’वरील भारतीय सैनिकांच्या गोळीला मी बळी पडू नये, याची शाश्वती राखत होते. अशी द्विधा मन:स्थिती इतर अनेक पेचांसह निर्माण झाली होती – माझं भारतीय असणं, पाकिस्तानी सेनेकडून माझी काळजी घेतली जाणं आणि मुळात त्या स्थितीतच व्यस्तसंगती (अॅब्सर्डिटी) सामावलेली होती, याची जाणीव होणं.

वरपांगी पाहता, हे सारं अत्यंत सरळसोपं वाटेल, परंतु प्रत्यक्षात तसं नव्हतं. एका स्तरावर, मोठी अस्तित्ववादी द्विधा निर्माण झाली होती, ज्यामुळे मी माझ्या मनातील राष्ट्रवादी व देशभक्तिपर भावनांबाबत चांगलाच गोंधळात पडलो होतो. परंतु अधिक गोंधळात यामुळे पडलो होतो की, ऐहिक गोष्टींबाबत अनुभवातीत दृष्टिकोनातून पाहिल्यागत वाटत होतं आणि त्याच वेळी जे काही वाट्याला आलं होतं, त्यासह जगणंही भाग होतं…

  • द ‘एलओसी’
  • लेखक : हॅपीमॉन जेकब
  • अनुवाद : मिलिंद चंपानेरकर

पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल एप्रिल २०२१


हे पुस्तक खरेदी करण्यासाठी…

द ‘एलओसी’

नियंत्रण रेषेच्या दोन्ही बाजूंनी भारतीय व पाकिस्तानी सैन्यासोबत
केलेल्या सहप्रवासाची कहाणी

हॅपीमॉन जेकब यांनी २०१८मध्ये भारत पाकिस्तान या दोन देशांमधील ‘ताबा नियंत्रण रेषे’च्या अर्थात ‘एलओसी’च्या दोन्ही बाजूंनी प्रवास केला. भारतीय आणि पाकिस्तानी सैन्यदलासोबत त्यांनी केलेला सहप्रवास, दोन्हीकडील अनेक निवृत्त व सेवेतील लष्करी अधिकाऱ्यांसोबत केलेल्या चर्चा, आणि सीमाभागातील ‘शस्त्रसंधी उल्लंघन’-ग्रस्त लोकांशी साधलेला संवाद यांबद्दलचे तपशील हॅपीमॉन यांनी या पुस्तकातून दिले आहेत. दोन देशांमध्ये लोकसहभागाने शांतता प्रस्थापित व्हावी हा हॅपीमॉन यांचा मूळ उद्देश आहे. पूर्वग्रहांचे अडथळे पार करून दोन्ही देशांच्या लष्करासह सर्व प्रकारच्या लोकांशी संवाद साधण्याचं अवघड असं काम गेली कित्येक वर्षं ते करत आहेत, त्याचप्रमाणे अनेक ‘ट्रॅक टू’ संवादांतील सहभागाद्वारे शांतता प्रयत्नाच्या प्रक्रियेत सातत्याने सहभागी राहिले आहेत. ते आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्यातकीर्त अभ्यासक आहेत. दीर्घ अनुभव आणि वस्तुनिष्ठ दृष्टिकोन यांतून नवी अंतर्दृष्टी देणारं पुस्तक…

The LOC

325.00Add to cart


साहित्य अकादमी प्राप्त अनुवादक मिलिंद चंपानेरकर यांची आणखी काही पुस्तकं

द ग्रेप्स ऑफ रॉथ

विस्थापित-स्थलांतरितांच्या जीवनावरील जगप्रसिद्ध कादंबरी


जॉन स्टाइनबेक
अनुवाद: मिलिंद चंपानेरकर


लोकाभिमुख अमेरिकन लेखक म्हणून नावाजलेल्या नोबेल पुरस्कारप्राप्त जॉन स्टाइनबेक यांच्या ‘द ग्रेप्स ऑफ रॉथ’ या १९३९ मध्ये सर्वप्रथम प्रकाशित झालेल्या दीर्घ कादंबरीने अमेरिकेतील विस्थापित-स्थलांतरितांच्या समस्येला वाचा फोडली आणि समाज ढवळून निघाला. या वास्तववादी कादंबरीद्वारे त्यांनी या समस्येच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक पैलूंवर मोठ्या सर्जनशीलतेने आणि मानवी दृष्टिकोनातून भाष्य केलं. ही कादंबरी १९३०च्या दशकातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवरील असली, तरी भारतातील विस्थापितांच्या समस्यांबाबत आजही विचारप्रवृत्त करू शकेल अशी आहे.

भांडवलकेंद्री मोठ्या शेतीच्या धोरणाच्या पुरस्कारार्थ मध्य अमेरिकेतील लाखो लहान-मध्यम शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनींवरुन हुसकावून लावलं गेलं… पश्चिम अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील कापसाच्या, द्राक्ष-संत्र्याच्या बगिच्यांमध्ये काम मिळेल, या आशेने या विस्थापित कुटुंबांनी दोन हजार मैलांचा खडतर प्रवास करून केलेलं स्थलांतर… त्या प्रक्रियेत वाट्याला आलेलं दैन्य, निर्वासित छावण्यांमधील भीषण अमानवी जीवन आणि उद्धवस्थता…
आणि याच प्रक्रियेदरम्यान त्यांच्या जाणिवेत घडून आलेले सूक्ष्म बदल आणि आत्मिक क्षोभाची भावना…
एक विशाल बहुपेडी पट उलगडून दर्शविणारी ही एक हृदयस्पर्शी कादंबरी.

सर्जनशील रचना आणि आगळी संवादशैली या प्रमुख वैशिष्टयांनिशी साहित्य क्षेत्रात नवे मापदंड निर्माण करणाऱ्या या कादंबरीचा ‘साहित्य अकादमी’ पुरस्कारप्राप्त मिलिंद चंपानेरकर यांनी साधलेला हा तितकाच प्रयोगशील असा मराठी अनुवाद.

लोकांच्या समस्या लोकांसाठी लोकभाषेत व्यक्त करणारी ‘द ग्रेप्स ऑफ रॉथ’.


700.00 Add to cart

लोककवी साहिर लुधियानवी

जनाभिमुख काव्य, गीतं व जीवनाचा मागोवा


अक्षय मनवानी
अनुवाद : मिलिंद चंपानेरकर


‘ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है…’, ‘जिन्हे ना़ज है हिंद पर वो कहाँ है…’, ‘वो सुबह कभी तो आएगी…’, `तुम न जाने किस जहाँ मे…’, `मांग के साथ तुम्हारा… , `औरत ने जनम दिया मर्दों को…, `फैली हुई है…’, `आसमाँ पे है खुदा…’, `मन रे तू काहे ना धीर धरे…’, `संसार से भागे फिरते हो…’, ‘अल्ला तेरो नाम…’, ‘अभी न जाओ छोडकर…’, यासारखी चित्रपट-गीतं असोत किंवा ‘परछाइयाँ’, ‘ताज महल’, ‘तरहे-नौ’ यांसारख्या कविता आणि ‘तल्खियाँ’, ‘आओ कि कोई ख्वाब बुनें’ यांसारखे कवितासंग्रह असोत, साहिर आपल्या कवितांमधून गीतांचं सर्जन करत राहिले आणि आपल्या गीतांमधून कवितांची प्रतिभा प्रसवत राहिले. कधी त्यांनी सामाजिक वास्तवावर कठोर भाष्य केलं, कधी जीवनाचं तत्त्वज्ञान सांगितलं, तर कधी स्त्री-पुरुष नातेसंबंधांमधले विविध पदर हळुवारपणे उलगडून दाखवले.
या प्रतिभासंपन्न कवीच्या व्यक्तिमत्त्वाचा, त्याच्या जीवननिष्ठांचा, गीत-कवितांचा आणि लेखन प्रेरणांचा सूक्ष्म वेध लेखक अक्षय मनवानी यांनी या पुस्तकात घेतला आहे. तसंच अमृता प्रीतमसह अनेकांचा साहिर यांच्यावर कसा प्रभाव पडला याचा शोधही घेतला आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या प्रेरणास्रोतांचाही वेध घेतला आहे. अनेक संबंधित व्यक्तींच्या भेटीगाठी घेऊन मनवानी यांनी विपुल संशोधन केलं आहे. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक मिलिंद चंपानेरकर यांनी या पुस्तकाचा तितक्याच समर्थपणे मराठी अनुवाद साकारला आहे.
आपल्या काव्यप्रतिभेने रसिकांच्या मनात कायमचं घर केलेल्या एका मनस्वी कवीची ही जीवनगाथा… लोककवी साहिर लुधियानवी


400.00 Add to cart

भारतातील डाव्या चळवळींचा मागोवा

इतिहास, आव्हानं आणि नवसंजीवनीच्या शक्यता


प्रफुल्ल बिडवई
अनुवाद : मिलिंद चंपानेरकर 


लोकशाही सुदृढ व्हायची तर जनसामान्यांना देशात प्रदीर्घ काळ टिकून असलेल्या लोकाभिमुख विचारप्रवाहांची, चळवळींची सर्वांगीण माहिती असणं आवश्यक असतं…
या पुस्तकात भारतातील गेल्या १०० वर्षांतील डाव्या चळवळींचा आढावा घेण्यात आला आहे. हे पुस्तक त्याविषयी केवळ समग्र माहिती देणारं नाही, तर त्याबद्दलचं वाचकांना सर्वांगीण आकलन साध्य व्हावं, या कळकळीने लिहिलेलं आहे. उदाहरणार्थ, या पुस्तकात प्रफुल्ल बिडवई यांनी केवळ डाव्या संसदीय पक्षांच्या निवडणुकीतील (लोकसभा, विधानसभा) कामगिरीचा आढावा घेतलेला नाही; तर त्या त्या वेळी विविध पुरोगामी जनसंघटनांच्या चळवळींनी वेâलेली कामगिरी, अशा निवडणुकींमध्ये कोणते मुद्दे महत्त्वाच होते, विविध राजकीय शक्तींचं आणि समाजातील घटकांचं संघटन कसं केलं गेलं (डावे, मध्यममार्गी आणि प्रस्थापित उजवे पक्ष, सर्वांद्वारे), तेव्हा आंतरराष्ट्रीय परिस्थिती कशी होती, कोणत्या आंतरराष्ट्रीय, साम्राज्यवादी शक्ती सशक्त होत्या वा देशातील कोणते वर्ग जोरावर होते याचे तपशील दिलेले आहेत आणि त्यामुळेच देशातील वेळोवेळीच्या राजकारणाचं खरं स्वरूप समजून घेण्यास अंतर्दृष्टी लाभते. तत्कालीन परिस्थितीचा संदर्भ स्पष्ट होऊन चळवळीच्या वाटचालीचं, चढ-उताराचं केवळ समग्र नाही, तर सर्वांगीण आकलन साध्य होतं.


800.00 Add to cart

लोकशाहीवादी अम्मीस…दीर्घपत्र


सईद मिर्झा
अनुवाद: मिलिंद चंपानेरकर 


‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है?’ या व आपल्या अन्य चित्रपटांद्वारे चित्रपट-दिग्दर्शक सईद मिर्झा यांनी समांतर चित्रपट चळवळीवर आपला आगळा ठसा उमटवला. या माध्यमात रचनेचे, कथनपद्धतीचे आगळे प्रयोग साध्य केले. ‘अम्मी: लेटर टू ए डेमॉक्रेटिक मदर’ या आपल्या पहिल्याच इंग्रजी साहित्यकृतीद्वारे त्यांनी रुपबंधाच्या दृष्टीने आगळा प्रयोग साधण्याचा प्रयत्न केला आहे. दीर्घपत्राचा रूपबंध घेऊन त्या अंतर्गतच कादंबरी, परिकथा, आत्मकथन, समाजचित्र रेखाटन, राजकीय वाद-संवाद, संस्कृती विचार, प्रवासवर्णन, चित्रपट-संहिता अशा अनेकविध रूपबंधांचं त्यांनी सर्जनशीलतेने संमिश्रण साधलं आहे. ‘लोकशाहीवादी अम्मीस… दीर्घपत्र’ म्हणजे अर्थातच या इंग्रजी साहित्यकृतीचा मिलिंद चंपानेरकर यांनी केलेला अनुवाद. स्वातंत्र्यानंतर विविध धर्मियांनी धर्मनिरपेक्ष लोकशाहीची संकल्पना स्वीकारून स्वदेशाशी कसं मनोभावे नातं जोडलं, यावर मिर्झा साध्यासाध्या घटनांद्वारे प्रकाश टाकतात. विस्मृतीत गेलेल्या वा दडपल्या गेलेल्या सांस्कृतिक ‘अवशेषां’चा सूक्ष्मतेने मागोवा घेता घेता ते समकालीन घटनांचीही चर्चा साधतात. काळ आणि अवकाशाच्या संदर्भात सतत मागेपुढे नेत ते वाचकाला आगळं भान देऊ पाहतात. भारतासह अन्य अनेक देशातील जनसामान्यांच्या मनातील हुंकार ऐकवू पाहणार्‍या या पुस्तकात केवळ सहज ‘स्मित-हास्या’द्वारे परस्पर संवाद साधणारे जनसामान्य जागोजागी आढळतात; त्याद्वारे या साहित्यकृतीला ‘गुढानुभूती’चं आगळंच परिमाण लाभतं! व्यापक जनजीवनाच्या अनेक पैलूंच्या दर्शनाद्वारे वाचकाला अलगद हिंदोळे देत आगळा मानसिक प्रवास घडवणारी ही एक आगळीच साहित्यकृती ठरते— ‘लोकशाहीवादी अम्मीस… दीर्घपत्र’


Original price was: ₹320.00.Current price is: ₹270.00. Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *