978-93-82591-27-6 | Gamak Yashache | गमक यशाचे | सामन्यत्वाकडून असामन्यत्वाकडून | अतुल मगून | डॉ . अरुण मांडे | ही आहे एक गोष्ट तुमच्या – आमच्यासारख्याच एका माणसाची . प्रश्न पडलेले असतात यशस्वी तर व्हायचंय , पण त्याची सुरुवात कुठून आणि कशी करायची ? खरंच , यश नशिबावर अवलंबून असतं का ? यशाचा मार्ग काही निवडक लोकांसाठीच असतो का ? …. पण एकदा त्याला बॉसरूपी मार्गदर्शक भेटतो आणि त्याची आयुष्याकडे पाहण्याची दृष्टीच बदलते ! तो मार्गदर्शक त्याला प्रसिद्ध व्यक्तींचे दाखले देतो , समजावून सांगतो की यश प्राप्त करण्याचे कोणतेही शॉर्टकट्स नसतात , यश हे निढळाचा घाम गाळून , भीतीवर मात करून आणि आलेल्या संधीचं सोनं करून मिळवायचं असतं . स्वप्नांचा , इच्छा – आकांक्षांचा पाठलाग करून त्यांना पूर्णत्वाला न्यायचं असतं …. हे पुस्तक तुम्हाला तुमच्या आत दडलेल्या असामान्यत्वाची जाणीव करून देईल ; यशाच्या अनेक शक्यतांनी भरलेली नवी क्षितिजं खुली करून देईल ; अर्थात , तुम्हाला असामान्य होण्याची , काहीतरी करून दाखवण्याची आणि यशोशिखर गाठण्याची आस असेल ; ध्यास असेल , तरच …. ! | Book | Rohan Prakashan | Marathi | 110 |
व्यक्तिमत्त्व विकास
|
100 |
नावीन्यपूर्ण बदल घडवताना
११ भारतीय उद्योजकांनी अशक्य कोटीतल्या गोष्टी शक्य करून दाखवल्या… त्यांचा वेगळ्या वाटेवरचा प्रेरणादायी प्रवास…
पोरस मुंशी
अनुवाद : जॉन कॉलोसो
दुसर्यांच्या उत्पादनाची हुबेहूब नक्कल करणं किंवा त्यात थोडे बदल करणं अशा मानसिकतेतून भारतीय उद्योजक आता बाहेर पडले आहेत. स्वत:ची नावीन्यपूर्ण उत्पादने बाजारात आणणार्या भारतीय उद्योजकांचा उद्योग-क्षितिजावर उदय होऊ लागला आहे. इतकंच नव्हे, तर जागतिक बाजारपेठा काबीज करण्यासाठी नावीन्यपूर्ण बदल घडवतानाही ते दिसत आहेत. भारतीय कंपन्या केवळ जागतिक मापदंडांची पूर्तता करत नाहीत, तर त्या आज स्वत:चे मापदंड निर्माण करू लागल्या आहेत. आज ‘इनोव्हेशन’ हा भारतीय उद्योगाचा परवलीचा शब्द ठरू पाहात आहे. अशक्य कोटीतील वाटाव्या अशा गोष्टी शक्य करून दाखवणार्या ११ भारतीय कंपन्यांचा वेगळ्या वाटेवरचा प्रवास या पुस्तकात तपशिलात दिला आहे. या उपक्रमांनी नावीन्यपूर्ण बदल घडवले आणि उद्योगजगतातील संदर्भ बदलून टाकले आहेत… त्यांच्या कर्तृत्वाचा आलेख देणारे हे नावीन्यपूर्ण पुस्तक सर्वांना निश्चितच रोचक वाटेल, प्रेरणादायी वाटेल… ‘‘नावीन्यपूर्ण बदलांमागील वैचारिक प्रक्रिया या पुस्तकात अधोरेखित केली आहे हेच या पुस्तकाचं वेगळेपण आहे. लेखनपद्धतही अभिनव असल्यामुळे ते मनाला अधिक भिडतं. हे लिखाण प्रेरक असून या आगळ्या वाटा अनेकांना अनुकरणीय वाटतील.’’ – रतन टाटा
Reviews
There are no reviews yet.