प्रेरणादायी व्यक्ती कथा संच
अमर चित्र कथा
रोहन प्रकाशन घेऊन येत आहे अमर चित्र कथा आता मराठीत
१. वीर सावरकर
२.महात्मा गांधी
३. रवींद्रनाथ टागोर
४. सुभाषचंद्र बोस
अमर चित्र कथा
रोहन प्रकाशन घेऊन येत आहे अमर चित्र कथा आता मराठीत
१. वीर सावरकर
२.महात्मा गांधी
३. रवींद्रनाथ टागोर
४. सुभाषचंद्र बोस
अमर चित्र कथा
रोहन प्रकाशन घेऊन येत आहे अमर चित्र कथा आता मराठीत
१. अल्बर्ट आईन्स्टाईन
२. विक्रम साराभाई
३. ए. पी. जे अब्दुल कलाम
४. जे. आर. डी टाटा
अमर चित्र कथा
रोहन प्रकाशन घेऊन येत आहे अमर चित्र कथा आता मराठीत
१. गणपती
२. हुशार बिरबल
३. सोनेरी मुंगूस
४. हत्तींच्या गोष्टी
अमर चित्र कथा
रोहन प्रकाशन घेऊन येत आहे अमर चित्र कथा आता मराठीत
१२ पुस्तकांचा संच
१. पौराणिक व जातक कथा
२. वैज्ञानिक व उद्योजक गाथा
३. प्रेरणादायी व्यक्ती कथा
यशवंतराव चव्हाण यांचे विचार व साहित्य ६ पुस्तकांचा संच
१) कृष्णाकांठ
२) भूमिका
३) सह्याद्रीचे वारे
४) ऋणानुबंध
५) भारत समाज आणि राजकारण
६) माझ्या विद्यार्थी मित्रानो
रु १,९९५ चा संच सवलतीत १,५५५ मध्ये घरपोच.
संपादन :
राज्यात जवळपास २०० साखर कारखाने….
ऑक्टोबर ते एप्रिल असा ६-७ महिन्यांचा गळीत हंगाम ….
त्या काळात कारखान्यातील परिसरात ऊसाच्या फडांवर लाखो मजूरकुटुंब पोटापाण्यासाठी आपली घरं, शेती, गावं सोडून येतात. या हंगामात स्त्रियांना सोसाव्या लागणाऱ्या आरोग्य समस्या, मुलांच्या शिक्षण समस्या, आर्थिक समस्या असे अनेक गंभीर प्रश्न या स्थलांतरित मजुरांसमोर आ वासून उभे असतात. जीवनकोंडीच जणू! याच समस्यांचा सखोल अभ्यास गेल्या ५ वर्षांत टाटा ट्रस्टस्तर्फे ‘टीम आशा’ने सोमेश्वर साखर कारखाना परिसरात केला. त्या आधारेच अनेक जटील प्रश्नांची चर्चा या पुस्तकात केलेली आहे.
शिक्षण, कामगार, मानव अधिकार, शेती अशा क्षेत्रांतील कार्यकर्ते, अभ्यासक, विचारवंत आणि धोरणकर्ते यांच्यापर्यंत हा विषय पोचवून ऊसतोडणी मजुरांची जीवनकोंडी सुटावी यासाठीच हा एक विधायक प्रयत्न….
रेडलाइट एरिया म्हटलं की, अनेकांची नाकं मुरडली जातात…. ‘कुलटा’, ‘किटाळ’, ‘वेश्या’, ‘रंडी’… असे अनेक शब्द वापरून तिथल्या स्त्रियांना हिणवलं जातं. पण व्यापकदृष्ट्या, समाजाच्या वासना शमवणाऱ्या या स्त्रियांच्या नशिबी काय येतं… दुःख- दैन्य आणि नरकासम भोगवटा !
अशी अनेक आयुष्यं जवळून बघितलेल्या समीर गायकवाड यांनी या स्त्रियांनाच या पुस्तकाच्या नायिका केलं आहे. त्यांनी या स्त्रियांची घुसमट, त्यांच्या इच्छा-आकांक्षा, त्यांची परिस्थिती- शरणता, हतबलता, त्यांचे हुंकार, त्यांच्या आर्त हाका, त्यांच्या भावभावना आणि त्यांची तगमग हे सारं या पुस्तकात संवेदनशीलरीत्या टिपलं आहे.
खुलूस म्हणजे निर्मळ सच्चेपण, आस्था आणि निष्ठा… या स्त्रियांचं जगणं त्याच सच्चेपणाने चितारणारं हे पुस्तक…. रेड लाइट डायरीज… खुलूस !
राजकारण, कल्पनातीत दगाबाजी आणि अविश्वसनीय थरार याची गुंफण असणारा एस. हुसैन झैदी क्राइम सेट!
१) इलेवन्थ अवर = रु. २५०
२) मुंबई अवेंजर्स = रु. ३९०
३) एन्डगेम = रु. २४०
एकूण संच ८८० रु. घरपोच
बारीक बारीक आवाज वाढत चाललेत या स्नेहा अवसरीकर यांच्या पहिल्यावहिल्या कथासंग्रहात माणसामाणसांतल्या नात्यांचे विविध अविष्कार पाहायला मिळतात.
कुठे काका-पुतण्यातल्या पारंपारिक नात्याच्या पलीकडे जाणारं, आपल्या पुतण्याबरोबरचं आत्मीय नातं जपणारे केशवकाका तर कुठे स्वतःच्या एकाकी आयुष्याचं प्रतिबिंब एका कबुतराच्या पिल्लात पाहून त्याच्याशी नातं जोडणाऱ्या वृंदाताई. कधी आपल्या दिवंगत सावत्र सासूचा केवळ फोटो पाहून तिच्याशी नातं जुळवलेली नंदी तर कधी स्वतःच्या अस्तित्वाचं भान आल्यावर स्वतःशीच नातं जोडणारी ‘मी’.
नवऱ्याला आलेल्या त्याच्या मैत्रिणीच्या मेल्स वाचून हादरून गेलेली एखादी सुभद्रा अखेर कुठलीच नाती संपूर्णपणे आपली असणार नाहीत, हे समजून घेते तर एखादी रश्मी काही नाती निर्घृणपणे तोडावी लागतात, याचं भान ठेवून ईश्वरबरोबरच आपलं नातं मर्यादित अंतरावर राखण्याची शहाणीव दाखवते. एकीकडे युनियनद्वारे संपूर्ण भारतातल्या रेडिओ स्टेशन्सवर काम करणाऱ्या स्टाफशी नातं जोडू पाहणारी राधिका तर दुसरीकडे रेडिओतल्या आपल्या सहकाऱ्याबरोबर निर्माण झालेलं अबोल, अस्फुट नातं मनातच ठेवत त्याच्यापासून दूर होणारी इशा ….
आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर उमलणाऱ्या आणि मिटणाऱ्या…. अशा या तरल नात्यांच्या कथा वाचकांच्या मनात त्यांच्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगांच्या स्मृती जाग्या करतील.
सुबोध जावडेकर
बीएसएफ’चे स्पेशल डायरेक्टर जनरल सोमेश कुमार यांना संरक्षण देण्याचं काम या गुरू-चेल्यावर सोपवण्यात आलं आहे. कुमार हे माजी पंतप्रधान परमेश्वर नायडू यांना भेटायला येण्याच्या मार्गावर आहेत. नायडूंच्या गाडीला अपघात झाल्यामुळे
ते हॉस्पिटलमध्ये आहेत. कुमारांच्या गाड्यांच्या ताफ्यावर अतिरेकी हल्ला करतात आणि कुमारांना ठार मारण्यात ते यशस्वी होतात. ‘मोसाद’मधल्या मित्राकडून टीप मिळाल्यावर गुरू-चेला मुंब्याला पोचतात. इथे एका भाड्याच्या घरात अल मुकादम हा मुख्य संशयित लपून बसला आहे. तो त्यांच्या हातावर तुरी देतो, पण तत्पूर्वी तो दुसरा तिसरा कोणी नसून आयुब म्हणजे मजहर खान या त्यांच्या खबऱ्याचा भाऊ आहे, हे विक्रांतच्या लक्षात येतं. केसमधली गुंतागुंत वाढत जात असताना मेजर डॅनिएल; म्हणजे नायडूंची मुलगी वैशाली हिचा प्रियकर, त्यांच्याशी संपर्क साधतो. नायडूंच्या अपघातामागे काहीतरी काळंबेरं असल्याचा दावा तो करतो.
राजकारण, कल्पनातीत दगाबाजी आणि अविश्वसनीय थरार याची गुंफण अर्थात….एन्डगेम
ही थरारक कथा आहे, देशविघातक कारस्थानं करणाऱ्यांना पृथ्वीतलाच्या कोपऱ्या कोपऱ्यांतून हुडकून काढण्यासाठी केलेल्या एका धाडसी ऑपरेशनची!
मुंबईवर २६/११चा भीषण दहशतवादी हल्ला झाला, तेव्हा देशाच्या सुरक्षेबद्दल, सुरक्षाव्यवस्थांच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्न उपस्थित झाले. सर्वसामान्यांच्या मनातले ते प्रश्न, सुरक्षादलांच्या मनातली खदखद आणि तीव्र संताप यांना केंद्रबिंदू मानून एक धाडसी गट महत्वाकांक्षी ऑपरेशन आखतं, अशी एकंदर या थरारनाट्याची मध्यवर्ती कल्पना आहे.
या ऑपरेशननुसार २६/११च्या मास्टरमाइंडचा देश-विदेशात शोध घेतला जातो. त्यासाठी टर्की, दुबई, इंग्लंड, स्वीडन, सिंगापूर, पाकिस्तान आणि अर्थात भारतातही जोरदार चक्र फिरवली जातात आणि दहशतवाद्यांना जेरबंद केलं जातं. सत्यघटनांच्या तपशिलांभोवती गुंफलेल्या या काल्पनिक कथानकातील बौद्धिक डावपेच मती गुंगवून टाकतात…
पानापानांवर वाचकांना खिळवून ठेवणारा थरार… मुंबई अॅव्हेंजर्स