प्रेरणादायी व्यक्ती कथा संच

 


अमर चित्र कथा


रोहन प्रकाशन घेऊन येत आहे अमर चित्र कथा आता मराठीत


१. वीर सावरकर

२.महात्मा गांधी

३. रवींद्रनाथ टागोर

४. सुभाषचंद्र बोस

469.00 Add to cart

वैज्ञानिक व उद्योजक गाथा संच २

 


अमर चित्र कथा


रोहन प्रकाशन घेऊन येत आहे अमर चित्र कथा आता मराठीत


१. अल्बर्ट आईन्स्टाईन

२. विक्रम साराभाई

३. ए. पी. जे अब्दुल कलाम

४. जे. आर. डी टाटा

478.00 Add to cart

अमर चित्र कथा १२ पुस्तकांचा संच

 


अमर चित्र कथा


रोहन प्रकाशन घेऊन येत आहे अमर चित्र कथा आता मराठीत
१२ पुस्तकांचा संच


१. पौराणिक व जातक कथा

२. वैज्ञानिक व उद्योजक गाथा
३. प्रेरणादायी व्यक्ती कथा


 

1,307.00 Add to cart

यशवंतराव चव्हाण ६ पुस्तकांचा संच


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री तसेच स्वातंत्र्य चळवळीत सहभागी असलेले आदरणीय द्रष्टे व मुत्सद्दी नेते यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची मूलभूत पायाभरणी केली. सामान्य कुटुंबातून आलेले चव्हाण हे जनसामान्यांचे पुढारी म्हणून ओळखले जातात. त्यांना स्वतःच्या बलस्थानांची आणि मर्यादांची पुरेपूर जाणीव असल्याने त्यांनी तत्त्वनिष्ठ व्यवहारवादाचे पालन केले. लोकशाहीच्या शक्तीवर त्यांचा अतूट विश्वास असल्यामुळे त्यांनी न्यायपूर्ण समाजाच्या बांधणीसाठी आवश्यक असलेल्या धोरणांबाबत पुढाकार घेऊन त्यांना पाठिंबा दिला. चव्हाण एक समतोल विचारवंत, सिद्धहस्त लेखक, प्रतिभावान वक्ते, चाणाक्ष मुत्सद्दी तसेच द्रष्टे प्रशासक होते व त्यांनी लोकहिताच्या अनेक धोरणांवर आपला ठसा उमटवला. अनलंकृत शैलीत त्यांनी केलेलं लेखन हे मनाला स्पर्श करून जातंच, शिवाय ते आपल्याला समाजकारण, राजकारण यांचं सखोल भानही देतं.

 

यशवंतराव चव्हाण यांचे विचार व  साहित्य ६ पुस्तकांचा संच
१) कृष्णाकांठ
२) भूमिका
३) सह्याद्रीचे वारे
४) ऋणानुबंध
५) भारत समाज आणि राजकारण
६) माझ्या विद्यार्थी मित्रानो

रु १,९९५ चा संच सवलतीत १,५५५ मध्ये घरपोच.


1,995.00 1,555.00 Add to cart

जीवनकोंडी


संपादन : 

परेश जयश्री मनोहर मूळचा भटक्या आहे , मनाच्या कोअरमध्ये कार्यकर्ता .... भारत ज्ञान विज्ञान समुदाय संघटनेसोबत गेली वीस वर्षं काम करतोय . सामाजिक कामाला वाहिलेल्या टाटा ट्रस्टच्या Deta Driven Governance टीममध्ये प्रोग्रॅम मॅनेजर म्हणून नोकरी करतो . भवताल बघत असतो , अस्वस्थ असतो , व्यक्त होतो आणि कामही करतो .


राज्यात जवळपास २०० साखर कारखाने….

ऑक्टोबर ते एप्रिल असा ६-७ महिन्यांचा गळीत हंगाम ….

त्या काळात कारखान्यातील परिसरात ऊसाच्या फडांवर लाखो मजूरकुटुंब पोटापाण्यासाठी आपली घरं, शेती, गावं सोडून येतात. या हंगामात स्त्रियांना सोसाव्या लागणाऱ्या आरोग्य समस्या, मुलांच्या शिक्षण समस्या, आर्थिक समस्या असे अनेक गंभीर प्रश्न या स्थलांतरित मजुरांसमोर आ वासून उभे असतात. जीवनकोंडीच जणू! याच समस्यांचा सखोल अभ्यास गेल्या ५ वर्षांत टाटा ट्रस्टस्तर्फे ‘टीम आशा’ने सोमेश्वर साखर कारखाना परिसरात केला. त्या आधारेच अनेक जटील प्रश्नांची चर्चा या पुस्तकात केलेली आहे.

शिक्षण, कामगार, मानव अधिकार, शेती अशा क्षेत्रांतील कार्यकर्ते, अभ्यासक, विचारवंत आणि धोरणकर्ते यांच्यापर्यंत हा विषय पोचवून ऊसतोडणी मजुरांची जीवनकोंडी सुटावी यासाठीच हा एक विधायक प्रयत्न….


250.00 Add to cart

रेड लाइट डायरीज…ख़ुलूस


समीर रावसाहेब गायकवाड सोलापूर येथे वास्तव्यास. उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी हे मूळ गाव. शिवाजी विद्यापीठातून प्रथम क्रमांकाने एम.ए. (मराठी) उत्तीर्ण झाल्यानंतर सेट-नेट परीक्षांमध्ये उत्तीर्ण होऊनही प्राध्यापकी पेशा न स्वीकारता शेती, व्यवसायावर उदरनिर्वाह. विविध विषयांवर लिहिताना भिन्न साहित्यप्रकारात लेखन. विख्यात दैनिकांत, नियतकालिकांत विपुल स्तंभलेखन. सातत्यपूर्वक ब्लॉगलेखन. वेश्यांच्या जीवनाचे अप्रकाशित पैलू समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न, संलग्न माहिती विविध सरकारी यंत्रणांना पुरवतानाच या समस्येकडे समाजाचे भान वळवण्यासाठी समाज माध्यमांत हेतूतः लेखन. साहित्यनिर्मिती करत असतानाच सामाजिक जाणिवांतून घटनांवर पोटतिडकीने परखड भाष्य.  

रेडलाइट एरिया म्हटलं की, अनेकांची नाकं मुरडली जातात…. ‘कुलटा’, ‘किटाळ’, ‘वेश्या’, ‘रंडी’… असे अनेक शब्द वापरून तिथल्या स्त्रियांना हिणवलं जातं. पण व्यापकदृष्ट्या, समाजाच्या वासना शमवणाऱ्या या स्त्रियांच्या नशिबी काय येतं… दुःख- दैन्य आणि नरकासम भोगवटा !

अशी अनेक आयुष्यं जवळून बघितलेल्या समीर गायकवाड यांनी या स्त्रियांनाच या पुस्तकाच्या नायिका केलं आहे. त्यांनी या स्त्रियांची घुसमट, त्यांच्या इच्छा-आकांक्षा, त्यांची परिस्थिती- शरणता, हतबलता, त्यांचे हुंकार, त्यांच्या आर्त हाका, त्यांच्या भावभावना आणि त्यांची तगमग हे सारं या पुस्तकात संवेदनशीलरीत्या टिपलं आहे.

खुलूस म्हणजे निर्मळ सच्चेपण, आस्था आणि निष्ठा… या स्त्रियांचं जगणं त्याच सच्चेपणाने चितारणारं हे पुस्तक…. रेड लाइट डायरीज… खुलूस !


300.00 Add to cart

एस. हुसैन झैदी क्राइम सेट


एस. हुसैन झैदी हे शोधपत्रकारिता, तसंच गुन्हेगारी पत्रकारितेतलं मुंबईच्या प्रसारमाध्यमांच्या विश्वातलं विख्यात नाव आहे. एशियन एज वृत्तपत्राचे ते निवासी संपादक होते, तसंच मुंबई मिरर, मिड-डे आणि इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्रांसाठी त्यांनी काम केलं आहे. ‘ब्लॅक फ्रायडे’, ‘डोंगरी टू दुबई’ ही त्यांची काही बेस्टसेलर्स पुस्तकं. त्यांच्या पुस्तकांवर आधारित असलेले चित्रपटही विशेष गाजले. एचबीओ वाहिनीकरता ‘टेरर इन मुंबई’ या चित्रपटासाठी झैदी यांनी साहायक निर्माता म्हणून काम केलं आहे. हा चित्रपट २६/११च्या मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेवर आधारित होता.

अनुवाद:
अनुवाद, चित्रकला आणि लेखन-वाचन यांमध्ये विशेष रस असलेल्या रमा यांनी माधुरी पुरंदरे यांनी पुस्तकं मराठीतून इंग्रजीत भाषांतरित केली आहेत. त्यांना फ्रेंच , इंग्रजी आणि मराठी भाषांमधली ललित साहित्याची पुस्तकं अनुवादित करायला आवडतात. लहान मुलांसाठीही त्या लेखन करतात. आजवर त्यांनी वीसपेक्षा जास्त कलाकृतींची भाषांतरं केली असून त्यांना 'डेली हंट'ने आयोजित केलेल्या कथास्पर्धेत पारितोषिकही मिळालं आहे.


राजकारण, कल्पनातीत दगाबाजी आणि अविश्वसनीय थरार याची गुंफण असणारा एस. हुसैन झैदी क्राइम सेट!
१) इलेवन्थ अवर = रु. २५०
२) मुंबई अवेंजर्स = रु. ३९०
३) एन्डगेम = रु. २४०

एकूण संच ८८० रु. घरपोच


880.00 Add to cart

बारीक बारीक आवाज वाढत चाललेत


शिक्षण: बी.कॉम., बी.पी.एड. अखिल भारतीय विद्यापीठ स्तरावर खेळाडू म्हणून विविध स्पर्धामधून सहभाग वृत्तपत्रविद्या पदविका अभ्यासक्रमात शिवाजी विद्यापीठात सर्वप्रथम. → 'संचार, सोलापूर 'तरुण भारत' अशा वृत्तपत्रांमधून काम केल्यावर 'अंतर्नाद' मासिकाच्या संपादकीय विभागात सलग १० वर्ष कार्यरत. 'साहित्यसूची' मासिकात सदर लेखन तसंच संपादन. मनोविकास प्रकाशनात संपादक तसेच त्यांच्या 'इत्यादि' या दिवाळी अंकांच संपादन. आकाशवाणीत नैमित्तिक निवेदक, आकाशवाणी, दूरचित्रवाणीच्या कार्यक्रमासाठी अनेक विषयांवर लेखन, निवेदन तसेच अनेक मान्यवरांच्या मुलाखती. 'सप्तसूर माझे' या संगीतकार अशोक पत्की यांच्या आत्मचरित्राचं नेहा वैशंपायन यांच्यासह शब्दांकन. वृत्तपत्रं, मासिकं, दिवाळी अंकांतून सातत्याने लेखन वेगवेगळ्या माध्यमांसाठी अनेक मान्यवर लेखकांच्या शंभराहून अधिक मुलाखती. 'ललित'मध्ये दशकातील साहित्यिक या मालेत समकालीन महत्त्वाच्या युवा साहित्यिकांच्या मुलाखतींचे सदर. सध्या 'अक्षरधारा' या दिवाळी वार्षिकाचे संपादन. चित्रकला, संगीताची विशेष आवड.

बारीक बारीक आवाज वाढत चाललेत या स्नेहा अवसरीकर यांच्या पहिल्यावहिल्या कथासंग्रहात माणसामाणसांतल्या नात्यांचे विविध अविष्कार पाहायला मिळतात.

कुठे काका-पुतण्यातल्या पारंपारिक नात्याच्या पलीकडे जाणारं, आपल्या पुतण्याबरोबरचं आत्मीय नातं जपणारे केशवकाका तर कुठे स्वतःच्या एकाकी आयुष्याचं प्रतिबिंब एका कबुतराच्या पिल्लात पाहून त्याच्याशी नातं जोडणाऱ्या वृंदाताई. कधी आपल्या दिवंगत सावत्र सासूचा केवळ फोटो पाहून तिच्याशी नातं जुळवलेली नंदी तर कधी स्वतःच्या अस्तित्वाचं भान आल्यावर स्वतःशीच नातं जोडणारी ‘मी’.

नवऱ्याला आलेल्या त्याच्या मैत्रिणीच्या मेल्स वाचून हादरून गेलेली एखादी सुभद्रा अखेर कुठलीच नाती संपूर्णपणे आपली असणार नाहीत, हे समजून घेते तर एखादी रश्मी काही नाती निर्घृणपणे तोडावी लागतात, याचं भान ठेवून ईश्वरबरोबरच आपलं नातं मर्यादित अंतरावर राखण्याची शहाणीव दाखवते. एकीकडे युनियनद्वारे संपूर्ण भारतातल्या रेडिओ स्टेशन्सवर काम करणाऱ्या स्टाफशी नातं जोडू पाहणारी राधिका तर दुसरीकडे रेडिओतल्या आपल्या सहकाऱ्याबरोबर निर्माण झालेलं अबोल, अस्फुट नातं मनातच ठेवत त्याच्यापासून दूर होणारी इशा ….

आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर उमलणाऱ्या आणि मिटणाऱ्या…. अशा या तरल नात्यांच्या कथा वाचकांच्या मनात त्यांच्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगांच्या स्मृती जाग्या करतील.

सुबोध जावडेकर


250.00 Add to cart

एन्डगेम


एस. हुसैन झैदी हे शोधपत्रकारिता, तसंच गुन्हेगारी पत्रकारितेतलं मुंबईच्या प्रसारमाध्यमांच्या विश्वातलं विख्यात नाव आहे. एशियन एज वृत्तपत्राचे ते निवासी संपादक होते, तसंच मुंबई मिरर, मिड-डे आणि इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्रांसाठी त्यांनी काम केलं आहे. ‘ब्लॅक फ्रायडे’, ‘डोंगरी टू दुबई’ ही त्यांची काही बेस्टसेलर्स पुस्तकं. त्यांच्या पुस्तकांवर आधारित असलेले चित्रपटही विशेष गाजले. एचबीओ वाहिनीकरता ‘टेरर इन मुंबई’ या चित्रपटासाठी झैदी यांनी साहायक निर्माता म्हणून काम केलं आहे. हा चित्रपट २६/११च्या मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेवर आधारित होता.

अनुवाद:
अनुवाद, चित्रकला आणि लेखन-वाचन यांमध्ये विशेष रस असलेल्या रमा यांनी माधुरी पुरंदरे यांनी पुस्तकं मराठीतून इंग्रजीत भाषांतरित केली आहेत. त्यांना फ्रेंच , इंग्रजी आणि मराठी भाषांमधली ललित साहित्याची पुस्तकं अनुवादित करायला आवडतात. लहान मुलांसाठीही त्या लेखन करतात. आजवर त्यांनी वीसपेक्षा जास्त कलाकृतींची भाषांतरं केली असून त्यांना 'डेली हंट'ने आयोजित केलेल्या कथास्पर्धेत पारितोषिकही मिळालं आहे.


बीएसएफ’चे स्पेशल डायरेक्टर जनरल सोमेश कुमार यांना संरक्षण देण्याचं काम या गुरू-चेल्यावर सोपवण्यात आलं आहे. कुमार हे माजी पंतप्रधान परमेश्वर नायडू यांना भेटायला येण्याच्या मार्गावर आहेत. नायडूंच्या गाडीला अपघात झाल्यामुळे

ते हॉस्पिटलमध्ये आहेत. कुमारांच्या गाड्यांच्या ताफ्यावर अतिरेकी हल्ला करतात आणि कुमारांना ठार मारण्यात ते यशस्वी होतात. ‘मोसाद’मधल्या मित्राकडून टीप मिळाल्यावर गुरू-चेला मुंब्याला पोचतात. इथे एका भाड्याच्या घरात अल मुकादम हा मुख्य संशयित लपून बसला आहे. तो त्यांच्या हातावर तुरी देतो, पण तत्पूर्वी तो दुसरा तिसरा कोणी नसून आयुब म्हणजे मजहर खान या त्यांच्या खबऱ्याचा भाऊ आहे, हे विक्रांतच्या लक्षात येतं. केसमधली गुंतागुंत वाढत जात असताना मेजर डॅनिएल; म्हणजे नायडूंची मुलगी वैशाली हिचा प्रियकर, त्यांच्याशी संपर्क साधतो. नायडूंच्या अपघातामागे काहीतरी काळंबेरं असल्याचा दावा तो करतो.

राजकारण, कल्पनातीत दगाबाजी आणि अविश्वसनीय थरार याची गुंफण अर्थात….एन्डगेम


240.00 Add to cart

मुंबई अव्हेंजर्स


एस. हुसैन झैदी हे शोधपत्रकारिता, तसंच गुन्हेगारी पत्रकारितेतलं मुंबईच्या प्रसारमाध्यमांच्या विश्वातलं विख्यात नाव आहे. एशियन एज वृत्तपत्राचे ते निवासी संपादक होते, तसंच मुंबई मिरर, मिड-डे आणि इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्रांसाठी त्यांनी काम केलं आहे. ‘ब्लॅक फ्रायडे’, ‘डोंगरी टू दुबई’ ही त्यांची काही बेस्टसेलर्स पुस्तकं. त्यांच्या पुस्तकांवर आधारित असलेले चित्रपटही विशेष गाजले. एचबीओ वाहिनीकरता ‘टेरर इन मुंबई’ या चित्रपटासाठी झैदी यांनी साहायक निर्माता म्हणून काम केलं आहे. हा चित्रपट २६/११च्या मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेवर आधारित होता.

अनुवाद:
अनुवाद, चित्रकला आणि लेखन-वाचन यांमध्ये विशेष रस असलेल्या रमा यांनी माधुरी पुरंदरे यांनी पुस्तकं मराठीतून इंग्रजीत भाषांतरित केली आहेत. त्यांना फ्रेंच , इंग्रजी आणि मराठी भाषांमधली ललित साहित्याची पुस्तकं अनुवादित करायला आवडतात. लहान मुलांसाठीही त्या लेखन करतात. आजवर त्यांनी वीसपेक्षा जास्त कलाकृतींची भाषांतरं केली असून त्यांना 'डेली हंट'ने आयोजित केलेल्या कथास्पर्धेत पारितोषिकही मिळालं आहे.


ही थरारक कथा आहे, देशविघातक कारस्थानं करणाऱ्यांना पृथ्वीतलाच्या कोपऱ्या कोपऱ्यांतून हुडकून काढण्यासाठी केलेल्या एका धाडसी ऑपरेशनची!
मुंबईवर २६/११चा भीषण दहशतवादी हल्ला झाला, तेव्हा देशाच्या सुरक्षेबद्दल, सुरक्षाव्यवस्थांच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्न उपस्थित झाले. सर्वसामान्यांच्या मनातले ते प्रश्न, सुरक्षादलांच्या मनातली खदखद आणि तीव्र संताप यांना केंद्रबिंदू मानून एक धाडसी गट महत्वाकांक्षी ऑपरेशन आखतं, अशी एकंदर या थरारनाट्याची मध्यवर्ती कल्पना आहे.
या ऑपरेशननुसार २६/११च्या मास्टरमाइंडचा देश-विदेशात शोध घेतला जातो. त्यासाठी टर्की, दुबई, इंग्लंड, स्वीडन, सिंगापूर, पाकिस्तान आणि अर्थात भारतातही जोरदार चक्र फिरवली जातात आणि दहशतवाद्यांना जेरबंद केलं जातं. सत्यघटनांच्या तपशिलांभोवती गुंफलेल्या या काल्पनिक कथानकातील बौद्धिक डावपेच मती गुंगवून टाकतात…

पानापानांवर वाचकांना खिळवून ठेवणारा थरार… मुंबई अॅव्हेंजर्स


390.00 Add to cart

युक्रेन युद्ध


आशिष काळकर : २००५ साली मुंबई विद्यापीठातून वास्तुविशारद पदवी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण. २००६ सालापासून भारत, आखाती देश, सिंगापूर, ओमान अशा अनेक देशांमधल्या वेगवेगळ्या प्रकल्पांवरचा कामाचा अनुभव. आंतरराष्ट्रीय कन्सल्टन्सी कंपन्यांच्या कामाच्या निमित्ताने चीन, युरोप, आशिया, आखाती देश अशा अनेक ठिकाणी भटकंतीचा अनुभव.२०१६ सालापासून ब्लॉगच्या माध्यमातून ललितलेख, स्वानुभवावर आधारित व्यक्तिचित्रणं, आंतरराष्ट्रीय भू-राजकीय विषय, भटकंतीचे अनुभव अशा विविध विषयांवर लिखाण. रोहन प्रकाशनच्या वेबसाईटवर प्रकाशित झालेलं 'अरबस्तानच्या अनवट वाटा' हे प्रवासवर्णनात्मक सदर.आखाती देशांमधल्या वेगवेगळ्या प्रकल्पांवर काम करण्याच्या निमित्ताने ऊर्जा व्यापार, या व्यापाराच्या अनुषंगाने चालत असलेलं राजकारण आणि आखाती देशांची भू-राजकीय परिस्थिती या विषयांचा सखोल अभ्यास. ईमेल - ashish.kalkar1982@gmail.com

लेखक आशिष काळकर यांनी या पुस्तकात रशिया-युक्रेन लढा अतिशय अभ्यासपूर्ण रीतीने मांडून युद्धाला कारणीभूत झालेली पार्श्वभूमी विस्तृतपणे चितारली आहे. त्यांनी युक्रेनच्या आजपर्यंतच्या इतिहासाचे माहितीपूर्ण विवेचन करून हा संघर्ष जागतिक ऊर्जा स्पर्धेशी कसा निगडित आहे,   हा महत्त्वाचा पैलू चर्चिला आहे. दोन्ही पक्षांनी शांततापूर्ण मार्ग अनुसरुन संवादातून वादग्रस्त प्रश्न सोडवावेत अशी समतोल भूमिका भारताने घेतली आहे. या युद्धाच्या अनुषंगाने भारताचे भूराजकीय महत्त्व     वाढीस लागल्याचं दिसून येतं. या गंभीर संघर्षावरील हे पुस्तक जसं समयोचित आहे तसंच ते उद्बोधकही ठरेल, असा मला विश्वास वाटतो.
– सुधीर देवरे
(भारताचे युक्रेनमधले पहिले राजदूत व माजी सचिव, विदेश मंत्रालय, नवी दिल्ली)
संपूर्ण जगावर परिणाम करणार्‍या युक्रेन युद्धाचा उगम, अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे मानस, युक्रेनला स्वतंत्र ठेवण्यासाठी अध्यक्ष व्होल्देमीर झेलेन्स्की यांनी चालविलेला निकराचा लढा आणि त्या निमित्ताने सुरू असलेली ऊर्जास्रोतांची खेळी इत्यादी विषयांचा या पुस्तकात लेखक आशिष काळकर यांनी घेतलेला धांडोळा खिळवून ठेवतो. त्यात इतिहासाचे निरनिराळे भू-व्यूहात्मक पदर काळकर यांनी उलगडून दाखवले आहेत. त्याच बरोबर अमेरिका, युरोप व नाटो संघटनेने रशियाच्या विघटनानंतर युरोपीय महासंघाचा झपाट्याने केलेला विस्तार पुतीन यांची झोप उडविणारा कसा ठरला, याचाही आलेख उत्तमरीत्या मांडला आहे. रशियाला सोव्हिएत काळातील पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्याचे पुतीन यांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरेल का? ऊर्जास्रोतांसाठी जग    इतर काही पर्याय शोधेल का? अशा महत्त्वाच्या प्रश्नांचाही वेध काळकर यांनी त्यांच्या या पुस्तकात घेतला आहे.   एकंदर विषयाची मांडणी स्तुत्य व अभिनंदनीय आहे.
– विजय नाईक
(आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीच्या वर्तुळात अनेक वर्षं कार्यरत असलेले दिल्लीस्थित पत्रकार)
300.00 250.00 Add to cart
1 2 49