बहुगुणी मसाले


देशी आणि परदेशी मसाल्यांचा इतिहास विज्ञान व दैनंदिन वापर


डॉ. वर्षा जोशी यांनी मुंबई विद्यापीठातून बी.एस्सी., भौतिकशासत्रात एम.एस्सी. केलं असून, अमेरिकेतील पर्डू विद्यापीठातून एम.एस., शिवाय पुणे विद्यापीठातून एम.फिल आणि पीएच.डी. केलं आहे. डॉ. वर्षा जोशी यांची भौतिकशास्त्र विषयावरची सोळा पुस्तकं आजवर प्रकाशित झाली आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी मराठी व इंग्रजीतून सर सी.व्ही. रामन यांच्या जीवनावर व संशोधन कार्यावर आधारित पुस्तकं लिहिली आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर व संशोधन कार्यावर आधारित पुस्तकं आणि प्रौढ साक्षरांसाठी पुस्तिकाही मराठीत लिहिली आहे. ‘वाद्यांमधील विज्ञान’, ‘स्वयंपाकघरातील विज्ञान’, ‘सौंदर्यप्रसाधनांच्या दुनियेत’, ‘१२व्या शतकातील खाद्यसंस्कृती’, ‘साठीनंतरचा आहार व आरोग्य’, ‘करामत धाग्या-दोऱ्यांची' अशी त्यांची विज्ञानावर आधारित पुस्तकं प्रकाशित असून त्यांच्या आजवर अनेक आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. त्यांच्या पुस्तकांना अनेक मान्यवर पुरस्कारांनी आणि सन्मानांनी गौरवण्यात आलं आहे.

हळद, लवंग, दालचिनी, मिरी, हिंग…. अशा विविध मसाल्यांविना आपलं खाद्यजीवन (परिणामी सगळं आयुष्यच!) ‘बेचव’ होईल, असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही! विज्ञानविषयक लेखन करणाऱ्या ज्येष्ठ लेखिका डॉ. वर्षा जोशी यांनी या पुस्तकात आपल्या खाद्यजीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या या मसाल्यांचे रासायनिक गुणधर्म, आरोग्याला होणारे फायदे, त्यांचा वापर कसा करायचा याबद्दलची उपयुक्त माहिती अभ्यासपूर्ण आणि रंजकरीत्या सांगितली आहे. तसंच आपल्या खाद्यसंस्कृतीत अलीकडे ‘मिसळून गेलेल्या’ परदेशी हर्ब्सचाही आढावा घेतला आहे. त्यामुळे हे पुस्तक ‘मसालेदार’ तर आहेच,

पण ते आपल्या मनात मसाल्यांच्या वापराबद्दल वैज्ञानिक दृष्टिकोनही जागवतं. भारतीय पाकसंस्कृतीचा ‘प्राण’ असलेल्या मसाल्यांची ‘ऑथेंटिक’ माहिती देणारं पुस्तक….बहुगुणी मसाले!


 

225.00 Add to cart

हिराबाई बडोदेकर


गायनकलेतील तारषड्ज


डॉ. शुभदा कुलकर्णी
  • प्राणिशास्त्रात पदवी डिस्टिंक्शन, कायद्यातील पदव्युत्तर शिक्षण
  • त्यानंतर एच.डी.एफ.सी. या वित्तसंस्थेत सतरा वर्ष नोकरी
  • १९९९ मध्ये स्वयंनिवृत्ती घेऊन संगीताचे अध्ययन, अध्यापन आणि संशोधन, लिखाण D एम.ए. (संगीत) परीक्षेत सुवर्णपदक आणि मानहिराच्या मानकरी,
  • सी. रामचंद्र, कल्याणजी, उषा उमरणी इत्यादी पारितोषिके
  • केंद्र सरकारची 'संगीताचा मानसिक आरोग्यावर परिणाम' या विषयावरील संशोधनासाठी सीनियर रिसर्च फेलोशिप आणि नंतर त्यावर प्रबंध लिखाण
  • पं. भास्कर चंदावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली लिंगभावीय संदर्भातून विसाव्या आणि एकविसाव्या शतकातील गायिकांचे कार्य' या विषयावरील पीएच. डी. त्या प्रबंधावर आधारित 'गायिका आणि गायकी' हे पुस्तक (२०११) प्रकाशित (अमलताश पब्लिशर्स)
  • २०१० साली 'महाराष्ट्रातील संगीत परंपरा' पुस्तक प्रकाशित ( डायमंड प्रकाशन)
  • 'विज्ञानातील का व कसे' या पुस्तकाचे डॉ. प्र. न. जोशींबरोबर सहलेखन
  • 'स्पर्शज्ञान' या ब्रेल पाक्षिकातून संगीतावर शंभरहून अधिक लेख 'महाराष्ट्राचे शिल्पकार' या चरित्रकोशातील संगीत खंडात पन्नासहून अधिक लेख
  • सकाळ स्वरसमूहाचे त्रैमासिक 'स्वररंगमधून संगीतावर लेखमाला 'संगीत कलाविहार' या १४० वर्षांची परंपरा असलेल्या मासिकाच्या एका अंकाचं अतिथी संपादन
  • 'समग्र मराठी भावसंगीत' प्रकल्प पूर्ण
  • पद्मगंधा, लोकसत्ता आदी दिवाळी अंकांतून कथालेखन
  •  'तवायफनामा' या सबा दिवानलिखित पुस्तकाचा अनुवाद मेहता प्रकाशनातर्फे प्रकाशनाच्या वाटेवर उत्क्रांती शास्त्रज्ञ चार्ल्स डार्विनच्या आत्मचरित्राचा अनुवाद - अप्रकाशित 'म्युझिकल जर्नी ऑफ कुमार गंधर्व' या राघव मेनन लिखित पुस्तकाचा अनुवाद अप्रकाशित -
  • ६-७ विद्यार्थ्यांना २२ वर्ष संगीताचं एकास एक पद्धतीचं अध्यापन संगीत रसास्वादाच्या कार्यशाळा प्रयास, वनस्थळी, नीहार (आता मानव्य) सारख्या सामाजिक संस्थांमधून काम व लिखाण २०२३ सालचा डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानचा संगीतातील लिखाण व संशोधनातल्या प्रदीर्घ योगदानाबद्दल दिला जाणारा 'वसंतोत्सव' पुरस्कार कबीर भजनं व शास्त्रीय गायनाचं बैठकीत सादरीकरण कंठसंगीतातील गुरू : पं. गोविंदराव देसाई, विदुषी शशिकला शिरगोपीकर, पं. विजय सरदेशमुख

ही कथा आहे एका सावळ्याशा कृश मुलीची.. शंभर वर्षांपूर्वी, विसाव्या शतकाच्या आरंभी आपल्या गायनकलेच्या जोरावर पुरुषसत्ताक कलाविश्वात स्त्रियांसाठी एक सन्माननीय राजमार्ग निर्माण करणाऱ्या एका दीपकळीची… ‘गानहिरा’ हिराबाई बडोदेकर यांची.

सभ्य घरांतील स्त्रिया जेव्हा जाहीरपणे गात नव्हत्या त्या काळात तिकीट लावून आपला जाहीर जलसा करणारी ही पहिली धाडसी गायिका ! आपल्या गाण्याच्या हिमतीवर २० जणांच्या चमूला घेऊन पहिला ‘फॉरेनचा दौरा करणारी, भारताबाहेर पाऊल टाकणारी ही पहिलीच गायिका. ख्याल, ठुमरी, नाट्यसंगीत, भावगीत या सर्व क्षेत्रांत आपली मोहर उमटवून ‘सात्त्विक, सोज्वळ गायिकेचा’ आदर्श घालून देऊन ‘स्त्रियांचे घराणे’ निर्माण करणाऱ्या हिराबाई बडोदेकर.

डॉ. शुभदा कुलकर्णी यांनी हिराबाई बडोदेकर यांच्या आयुष्यावर हे ललित चरित्र लिहिताना केवळ एका कलाकार स्त्रीचे वैयक्तिक आयुष्य नव्हे, तर ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्योत्तर काळापर्यंतच्या हिंदुस्थानी संगीतजगताचा एक आलेख मांडला आहे. सत्य आणि कल्पित यांचा हा ‘ख्याल’ आहे… हिराबाईंच्या गाण्यासारखाच सुरेल !

– डॉ. चैतन्य कुंटे


 

325.00 Add to cart

जयप्रकाश प्रधान ७ पुस्तकांचा भटकंती संच


‘महाराष्ट्र टाइम्स’ दैनिकाचे खास प्रतिनिधी म्हणून जयप्रकाश प्रधान २८ वर्षं कार्यरत होते. राजकीय, सामाजिक व गुन्हेगारीविषयक क्षेत्रांतील त्यांची अनेक बातमीपत्रं साऱ्या महाराष्ट्रात खळबळ निर्माण करणारी ठरली. त्यावर आधारित ‘बातमीमागची बातमी’ हे त्यांचं पुस्तक खूपच लोकप्रिय झालं आहे. ‘पर्यटन’ हा त्यांचा सर्वांत आवडीचा छंद. परदेशातील आगळ्यावेगळ्या स्थळांना, ग्रामीण भागांना भेटी देऊन, तेथील संस्कृती, चालीरीती, जुने अवशेष तसंच लोक, समाज, खाद्यपदार्थ यांची रोचक माहिती मिळवण्यात त्यांना व त्यांची पत्नी जयंती यांना विशेष रस असतो. पृथ्वीवरील सात खंडांवर प्रधान पती-पत्नीचे पाय लागले आहेत. अंटार्क्टिका खंडावर मनुष्यवस्ती नाही. राहिलेल्या सहा खंडांमधील एकूण देशांची संख्या २१०च्या घरात जाते. त्यांपैकी ७८ देश त्यांनी आतापर्यंत पाहिले आहेत. म्हणजे ३५ टक्क्यांपेक्षा थोड्या अधिक जगाची भटकंती त्या दोघांनी पूर्ण केली आहे. हा प्रवास म्हणजे केवळ त्या देशाला, प्रदेशाला भोज्जा किंवा ‘१२ दिवसांत १० देश’ या पद्धतीचा झाला नाही. बहुतेक प्रवास स्वत: आखून किंवा परदेशातील नामांकित आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल किंवा क्रुझ कंपन्यांबरोबर केल्याने, त्यांना वेगळ्याच जगाचं दर्शन घडलं. ‘अजून खूप जग बघायचं आहे, अनुभवायचं आहे,' या इच्छेमुळे दोघांच्याही पायाला लागलेली भिंगरी थांबलेली नाही.

जयप्रकाश प्रधान लिखित ७ पुस्तकांचा भटकंती संच


१) ऑफबीट भटकंती भाग १ : २५० रु
२) ऑफबीट भटकंती भाग २ : ३०० रु
३) ऑफबीट भटकंती  भाग ३ : २५० रु
४) जे’पीज भटकंती टिप्स – २०० रु
५) एन्ड ऑफ द वर्ल्ड भटकंती : २५० रु
६) भटकंती आगळ्या वेगळ्या देशांची : २५० रु
७) भटकंती सप्तरंगी बेटांची : २५० रु


एकूण संच  रु १,८५० सवलतीत रु १,२९५ मध्ये (टपाल खर्चासहित) घरपोच.   


 

1,850.00 1,295.00 Add to cart

गांधीवादाचा केमिकल लोचा आणि इतर कथा


लक्ष्मीकांत देशमुख हे निवृत्त प्रशासकीय IAS अधिकारी २०१८मध्ये बडोदा येथे भरलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांची आजवर एकतीस मराठी, पाच इंग्रजी व दोन हिंदी पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. आजही त्यांचा लेखनप्रवास अव्याहतपणे चालू आहे. त्यांना राज्य शासनाचे तीन, महाराष्ट्र साहित्य परिषद-पुणेचे पाच महाराष्ट्र साहित्य परिषद-औरंगाबादचे दोन आणि अन्य वाङ्मयीन संस्थांचे विविध साहित्य पुरस्कार प्राप्त झाले आहेत. 'भारतीय संविधान' हा त्यांचा श्रद्धेचा तसेच अभ्यासाचा विषय व ते विचार आपल्या दैनंदिन जीवनात जगण्याचा प्रयत्न... मुस्लिम समाज व त्यांचं जीवन, उर्दू भाषा, LGBTQ समाजाचं जगणं व त्यांचे प्रश्न समजून घेणं, आंतर भारतीच्या विचारांचा प्रसार आणि मराठी भाषेच्या विकासासाठी काम करणं हे देशमुखांच्या आजच्या जगण्याचा अपरिहार्य भाग झाले आहेत. इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये सक्तीने मराठीचा कायदा मंजूर करून घेण्यात पुढाकार..... मराठी भाषा विद्यापीठ आणि मराठी भाषा विकास प्राधिकरण कायद्यासाठी पाठपुरावा... 'मराठीच्या भल्यासाठी' या मराठीच्या विकास करणाऱ्या संस्थेचे कार्याध्यक्ष.... अशा सर्व विधायक कामात गर्क राहता राहता देशमुख बॅडमिंटन व टेबल टेनिस या खेळांची आवड जोपासतात... खेळ-खेळाडू यांच्याविषयी आत्मीयता बाळगतात आणि त्यांचं जीवनचरित्र वाचण्यात रस घेतात. त्याचप्रमाणे बॉलिवूड स्टार्स, गोल्डन इराचं फिल्म संगीत, संगीतकार, गीतकार यांत मनापासून रमतात.

लक्ष्मीकांत देशमुख यांच्या या संग्रहातील कथांना तसा कुठलेही स्थानवैशिष्ट्य असलेला एक विशिष्ट असा परिसर नाही. त्या एकूणच भारतीय आणि जागतिकही पटलावरही घडतात. विशेषतः सांस्कृतिक बहुविधता हा आशय असणाऱ्या अनेक कथा या संग्रहात आहेत. ही बहुविधता हेच भारतीय समाजाचे वैशिष्ट्य आहे. जाती-धर्माच्या सीमारेषा ओलांडून सर्वांच्या मनाला भिडणारे संगीत, परस्परांमधला सद्भाव, सामाजिक सलोखा राखणारे समाजमन, परधर्मीयांच्या श्रद्धांचा आदर करणारी सामान्य माणसे असा या संग्रहातील कथांचा ऐवज आहे.

भारतीय समाजातला मुस्लिम हा समाजघटक) आपल्या कथात्म साहित्यात अभावानेच आढळतो. ती उणीव यातील कथांनी भरून काढली आहे. या कथांमध्ये चित्रित झालेल्या समाजजीवनात भिन्न धर्मीयांचे अस्तित्वही ठळकपणे जाणवते. म्हणून या कथा व्यापक अर्थाने समाजजीवन कवेत घेताना दिसतात. कथात्म साहित्यातूनही लेखकाचा विचार डोकावतो.

एका प्रागतिक अशा समाजाचे रेखांकन करणाऱ्या या कथा आहेत. विशेषतः सहिष्णुतेचा संकोच होत असलेल्या, एकारलेल्या काळात या कथांचे महत्त्व नक्कीच अधोरेखित होणारे आहे.

– आसाराम लोमटे


 

295.00 Add to cart

MY BARC DAYS


Dr. Suresh Haware is a renowned businessman and an inspirational leader. He has completed his B. Tech in Chemical Engineering from Nagpur University. Further, he completed his masters in Nuclear Engineering from Bhabha Atomic Research Centre. He has received M. A. in history and recently he completed his Ph.D. on a rather niche topic - 'Affordable Nano Housing' from Mumbai University. He is a Merit holder and a Gold medalist from Nagpur University. He has served as a nuclear scientist in Department of Atomic Research for 27 years. His 37 published research papers in nuclear engineering exemplifies his capacity for meticulous work. He has led a team of nuclear scientists to represent International Atomic Energy Agency (IAEA), a nuclear engineering meet in Vienna. For last 25 years, he has been in the construction industry and leading the mighty empire of Haware Group of Companies. He is a recipient of numerous national and international awards for his excellent contribution in the construction industry. He likes to contribute in various social welfare projects too. He is an ex- trustee of J.N.P.T. and was also a Chairman of Shri Saibaba Sansthan Trust, Shirdi. He was given a status of Minister of State, Maharashtra Government. He has authored 14 books so far on business and social interest related subjects. He loves mountaineering & completed Everest Base Camp Trek and Island Peak Expedition.

My BARC Days is a memoir of Dr. Suresh Haware’s inspirational journey from a remote village in India to becoming a nuclear scientist in India’s premier research organization Bhabha Atomic Research Centre (BARC). The book brings forth the author’s perspective of looking at difficulties as challenges and opportunities, and his intense passion for knowledge and research. His experiences span political events that affected the common man in India, days spent in educational institutions, work in BARC and also a Himalayan pilgrimage. Through detailed descriptions, the book gives a thorough understanding of life and work at BARC including a few milestones in the nation’s nuclear journey.


 

399.00 Add to cart

साहित्य: अभिजात आणि लोकप्रिय

 


डॉ. गंधे यांचा प्रस्तुत ग्रंथ म्हणजे समीक्षास्वरांची रंगलेली एक सुंदर बैठक होय. या बैठकीमुळे समीक्षेमध्ये स्वारस्य असणारा वाचक ज्ञानसंपन्न होईलच. त्याचबरोबर ह्या आगळ्यावेगळ्या वाटेच्या समीक्षेमुळे तो प्रमुदितही होईल. याचे कारण स्वतः डॉ. गंधे यांची समीक्षालेखनाची बैठक काहीशी अपारंपरिक आहे. डॉ. गंधे यांना समीक्षाविषय सुचतात आणि त्या विषयाची मांडणी मात्र ते खूप विचार करून स्वतःची संशोधितात. याच्या परिणामी डॉ. गंधे यांचा प्रस्तुत ‘साहित्य : अभिजात आणि लोकप्रिय’ हा ग्रंथ आगळावेगळा झालेला आहे. म्हणूनच समीक्षेच्या नव्या अभ्यासकांनी तो मन:पूर्वक वाचून जाणून घ्यावा अशी माझी शिफारस आहे.
डॉ. द. दि. पुंडे


 

240.00 Add to cart

प्रेरणादायी व्यक्ती कथा संच

 


अमर चित्र कथा


रोहन प्रकाशन घेऊन येत आहे अमर चित्र कथा आता मराठीत


१. वीर सावरकर

२.महात्मा गांधी

३. रवींद्रनाथ टागोर

४. सुभाषचंद्र बोस

469.00 Add to cart

वैज्ञानिक व उद्योजक गाथा संच २

 


अमर चित्र कथा


रोहन प्रकाशन घेऊन येत आहे अमर चित्र कथा आता मराठीत


१. अल्बर्ट आईन्स्टाईन

२. विक्रम साराभाई

३. ए. पी. जे अब्दुल कलाम

४. जे. आर. डी टाटा

478.00 Add to cart

अमर चित्र कथा १२ पुस्तकांचा संच

 


अमर चित्र कथा


रोहन प्रकाशन घेऊन येत आहे अमर चित्र कथा आता मराठीत
१२ पुस्तकांचा संच


१. पौराणिक व जातक कथा

२. वैज्ञानिक व उद्योजक गाथा
३. प्रेरणादायी व्यक्ती कथा


 

1,307.00 Add to cart

यशवंतराव चव्हाण ६ पुस्तकांचा संच


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री तसेच स्वातंत्र्य चळवळीत सहभागी असलेले आदरणीय द्रष्टे व मुत्सद्दी नेते यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची मूलभूत पायाभरणी केली. सामान्य कुटुंबातून आलेले चव्हाण हे जनसामान्यांचे पुढारी म्हणून ओळखले जातात. त्यांना स्वतःच्या बलस्थानांची आणि मर्यादांची पुरेपूर जाणीव असल्याने त्यांनी तत्त्वनिष्ठ व्यवहारवादाचे पालन केले. लोकशाहीच्या शक्तीवर त्यांचा अतूट विश्वास असल्यामुळे त्यांनी न्यायपूर्ण समाजाच्या बांधणीसाठी आवश्यक असलेल्या धोरणांबाबत पुढाकार घेऊन त्यांना पाठिंबा दिला. चव्हाण एक समतोल विचारवंत, सिद्धहस्त लेखक, प्रतिभावान वक्ते, चाणाक्ष मुत्सद्दी तसेच द्रष्टे प्रशासक होते व त्यांनी लोकहिताच्या अनेक धोरणांवर आपला ठसा उमटवला. अनलंकृत शैलीत त्यांनी केलेलं लेखन हे मनाला स्पर्श करून जातंच, शिवाय ते आपल्याला समाजकारण, राजकारण यांचं सखोल भानही देतं.

 

यशवंतराव चव्हाण यांचे विचार व  साहित्य ६ पुस्तकांचा संच
१) कृष्णाकांठ
२) भूमिका
३) सह्याद्रीचे वारे
४) ऋणानुबंध
५) भारत समाज आणि राजकारण
६) माझ्या विद्यार्थी मित्रानो

रु १,९९५ चा संच सवलतीत १,५५५ मध्ये घरपोच.


1,995.00 1,555.00 Add to cart

जीवनकोंडी


संपादन : 

परेश जयश्री मनोहर मूळचा भटक्या आहे , मनाच्या कोअरमध्ये कार्यकर्ता .... भारत ज्ञान विज्ञान समुदाय संघटनेसोबत गेली वीस वर्षं काम करतोय . सामाजिक कामाला वाहिलेल्या टाटा ट्रस्टच्या Deta Driven Governance टीममध्ये प्रोग्रॅम मॅनेजर म्हणून नोकरी करतो . भवताल बघत असतो , अस्वस्थ असतो , व्यक्त होतो आणि कामही करतो .


राज्यात जवळपास २०० साखर कारखाने….

ऑक्टोबर ते एप्रिल असा ६-७ महिन्यांचा गळीत हंगाम ….

त्या काळात कारखान्यातील परिसरात ऊसाच्या फडांवर लाखो मजूरकुटुंब पोटापाण्यासाठी आपली घरं, शेती, गावं सोडून येतात. या हंगामात स्त्रियांना सोसाव्या लागणाऱ्या आरोग्य समस्या, मुलांच्या शिक्षण समस्या, आर्थिक समस्या असे अनेक गंभीर प्रश्न या स्थलांतरित मजुरांसमोर आ वासून उभे असतात. जीवनकोंडीच जणू! याच समस्यांचा सखोल अभ्यास गेल्या ५ वर्षांत टाटा ट्रस्टस्तर्फे ‘टीम आशा’ने सोमेश्वर साखर कारखाना परिसरात केला. त्या आधारेच अनेक जटील प्रश्नांची चर्चा या पुस्तकात केलेली आहे.

शिक्षण, कामगार, मानव अधिकार, शेती अशा क्षेत्रांतील कार्यकर्ते, अभ्यासक, विचारवंत आणि धोरणकर्ते यांच्यापर्यंत हा विषय पोचवून ऊसतोडणी मजुरांची जीवनकोंडी सुटावी यासाठीच हा एक विधायक प्रयत्न….


250.00 Add to cart
1 2 49