एक होती रितू…


रितू नंदाची अविस्मरणीय कहाणी


[taxonomy_list name=”product_author” include=”499″]

अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”404″]


रितू नंदा…..

राज कपूरची लाडकी लेक आणि उद्योजक राजन नंदा यांची प्रिय पत्नी…. पण एवढीच होती का रितूची ओळख ? तर नाही…

हे पुस्तक वाचल्यावर जाणीव होते की, रितूची ओळख कित्येक कोस या पलीकडची आहे.

सुप्रसिद्ध संपादिका व लेखिका सत्या सरन यांनी रितूच्या आयुष्याचा धांडोळा रसाळ भाषेत सखोलतेने घेतला आहे. शिवाय त्यांनी रितूचे कुटुंब सदस्य, जवळचे नातेवाईक, मित्र-मैत्रिणी, व्यवसायातले सहकारी, इलाज करणारे डॉक्टर्स आणि अनेक सुहृद यांना बोलतं करत तिचं असामान्य कर्तृत्व,

व्यक्तिमत्त्वातले अनेक पैलू, स्वभावातल्या बारीक छटा यांचा उलगडा केला आहे…. यातूनच समजतं….

मृदु मनाची रितू एक उत्तम गृहकर्तव्यदक्ष गृहिणी तर होतीच; पण त्याचबरोबर ती स्वतः एक कल्पक व मेहनती उद्योजिका होती आणि कठीण प्रसंगांना धैर्याने भिडणारी, आयुष्याला सामोरी जाणारी कणखर स्त्री होती.

तिचीच ही प्रेरणादायी कहाणी एक होती रितू…



300.00 Add to cart

अनफर्गेटेबल जगजित सिंग

गझल गायकीच्या दुनियेतील तरल स्वर


[taxonomy_list name=”product_author” include=”499″]
अनुवाद: [taxonomy_list name=”product_author” include=”562″]


जगजित म्हटलं की, कानात आवाज घुमतात गझलांचे…मनाचा ठाव घेणाऱ्या, मन शांत करून जाणाऱ्या आवाजातल्या अनेक गझला ! नेमक्या भावना व्यक्त करत, काही अनपेक्षित सुरावटी गात, कधी पाश्चात्त्य वाद्यांचा आधार घेत जगजितने गझल गायकीचा चेहरामोहराच बदलून टाकला.
सत्या सरन यांनी लिहिलेल्या जगजितच्या या चरित्रात त्याचा विद्यार्थीदशेपासूनचा, स्ट्रगलर ते लोकप्रिय गायक असा प्रवास उल्का राऊत यांनी मराठीत रसाळपणे उलगडला आहे. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायकीने जगजित मैफिलीचं वातावरण भारून टाकत असे. रसिकांच्या डोळ्यांतून अश्रुधारा बरसवणारा जगजित एखादा चुटकुला सांगून त्याच मैफलीत रसिकांना हसायलाही भाग पाडत असे. जगजितचे असे अनेक पैलू या पुस्तकात विविध प्रसंगांतून खुलून येतात. नियतीने जगजित-चित्राला अनेक बरे-वाईट रंग दाखवले. ते दोघं कधी या नियतीला गायनाचा, आध्यात्माचा आधार घेत धिरोदात्तपणे सामोरे गेले, तर कधी कोलमडून गेले.
एक मित्र, मुलगा, वडील, गायक, चित्राचा साथी, नवगायकांसाठी मसीहा अशा अनेक भूमिकांमधून पुस्तकात भेटत जाणारा…अन्फर्गेटेबल जगजित सिंग.


270.00 Add to cart

Mountain-Men SHERPA

True Daredevils of Himalaya


[taxonomy_list name=”product_author” include=”1649″]


Mountains are the source of inspiration for those who brave the bone chilling temperature, endless snowfields, bottomless crevasses, thin layer of oxygen, steep rock walls and unpredictable weather, and make their way to the top of the world.
This journey to the top of the world is next to impossible without the support of Sherpas, sons and daughters of the great Himalayas.. true lifelines of high altitude mountaineering.
Sherpas pave the road in snowfields, bridge the gap on crevasses with ladders, cook the healthiest meals for mountaineers in possibly the harshest weather on the higher altitudes.
They are the rescuers, they are the guides, they are friends, they are the Sherpas!
They know Himalaya better than anyone else.
Nowadays, Sherpas have ventured into several other fields and are triumphing it like never before. Umesh Zirpe, the renowned mountaineer, who has spent significant time with Sherpas, has shed a light on the lives of such Sherpas who have carved their ways from extreme destitute to reaching remarkable heights of glories. Experience the interesting world of Mountain-Men Sherpa.


250.00 Add to cart

भारत : समाज आणि राजकारण

यशवंतराव चव्हाण यांचे प्रगट चिंतन


[taxonomy_list name=”product_author” include=”379″]
अनुवाद: [taxonomy_list name=”product_author” include=”1076″]


आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी करून देशपातळीवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या यशवंतराव चव्हाणांनी तीन खंडांमधून आत्मचरित्र लिहिण्याचे ठरवले होते. प्रत्यक्षात त्यातील एकच खंड प्रकाशित होऊ शकला. प्रा. जयंत लेले यांच्या प्रदीर्घ मुलाखतसत्रांतून आकारास आलेला प्रस्तुत ग्रंथ म्हणजे एका अर्थाने यशवंतरावांनी लेले यांना सांगितलेले आत्मचरित्र म्हणावे लागते. ‘‘हा मी स्वत:शी करत असलेला संवाद आहे” असे स्वत: यशवंतरावच म्हणतात यात सारे काही आले. यशवंतरावांचे राज्य व राष्ट्र या दोन्ही पातळ्यांवरचे राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक दृष्टिकोन आणि व्यवहार यांचा हा सखोल अभ्यास आहे. विशेष म्हणजे हा अभ्यास जागतिक पातळीवरील स्थित्यंतरांच्या संदर्भात करण्यात आलेला असल्याने तो एकमेवच मानावा लागतो. आपण मनापासून स्वीकारलेली स्वातंत्र्य आणि समता ही तत्त्वे एकीकडे व प्रत्यक्ष राजकीय व्यवहार दुसरीकडे. तर प्रसंगी स्वातंत्र्य आणि समता या तत्त्वांमधील द्वंद्वावर मात करण्याची यशवंतरावांची धडपड लेले यांनी हळुवारपणे उकलली आहे. चव्हाण साहेबांची राजकीय भूमिका व शैली यांच्यासाठी त्यांनी केलेला सैद्धांतिक व्यवहारवाद हा शब्दप्रयोग अत्यंत समर्पक म्हणावा लागेल.

स्वातंत्र्यलढ्याच्या दरम्यान झालेली यशवंतरावांची वैचारिक वाटचाल, स्वातंत्र्योत्तर काळात मुंबई राज्याच्या व द्वैभाषिकाच्या कायदेमंडळात घडलेला प्रशासक, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अविचलपणे राष्ट्रीय व प्रादेशिक हितसंबंधांचा मेळ घालणारा मुत्सद्दी, चिनी आक्रमणामुळे अचानकपणे अंगावर आलेली जबाबदारी पेलणारा खंबीर नेता व विचारवंत असे अनेक पैलू या ग्रंथातून उलगडतात. महाराष्ट्र आणि भारत या दोन्ही स्तरांवरील सहकारी व स्पर्धक यांच्याशी आपल्या मानवी पातळीवरील संबंधांविषयी इतक्या स्पष्टपणे यशवंतराव कधीच बोलले नव्हते. या सर्व गोष्टींचा उपयोग राजकीय आणि सामाजिक क्षेत्रांत वावरणाऱ्यांना तर होईलच पण महाराष्ट्राने यशवंतरावांचा कृतज्ञतापूर्वक अभिमान का बाळगायचा हे देखील समजेल.


750.00 Add to cart

पर्वतपुत्र शेर्पा

हिमालयातील खरे खुरे साहसवीर


[taxonomy_list name=”product_author” include=”355″]


शिखर खुणावत असतं…

पण मधे असतात अनेक अडथळे… गोठवणारी थंडी, बर्फाखाली गेलेल्या वाटा, खोल-खोल दऱ्या आणि घळी, विरळ होत जाणारा ऑक्सिजन, खड्या चढणी आणि निसरडे उतार, लहरी निसर्ग…!

या सगळ्यावर मात करायला दोनच गोष्टी गिर्यारोहकाला साथ देत राहतात… एक म्हणजे उद्दिष्ट गाठायची जिद्द आणि दुसरी म्हणजे साहसी सोबती शेर्पा अर्थात गिर्यारोहणाची खरी ‘लाइफ लाइन’ !

बर्फातल्या वाटा मोकळ्या करणारे, घळींवर शिड्या टाकणारे, अडकलेल्या गिर्यारोहकांच्या ‘रेस्क्यू’ला धावणारे, त्यांना सकस आहार मिळावा म्हणून स्वत: रांधून खाऊ घालणारे, मणामणांचं ओझं उचलून नेणारे शेर्पा ! हिमालय त्यांना जसा कळतो, तसा इतर कुणालाही कळत नाही आणि म्हणूनच ते गिर्यारोहकांचे खरे पार्थ ठरतात. हिमालयाचे हे खरेखुरे साहसवीर गिर्यारोहकांच्या यशस्वी मोहिमांमध्येही आनंद घेतात. मुख्य म्हणजे आजकाल शेर्पा इतर व्यवसायांतही मुसंडी मारत असून त्यांतही त्यांची कामगिरी उत्तुंग होत आहे.

सुप्रसिद्ध आणि अनुभवी गिर्यारोहक उमेश झिरपे यांनी या पुस्तकात शेर्पांच्या या खडतर जीवनाचे विविध पैलू रंजकपणे उलगडले आहेत.

शेर्पा म्हणजे केवळ ‘सामान उचलणारे’ नव्हेत, हे सांगून हिमालयातल्या या खऱ्या खुऱ्या साहसवीरांची वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी अधोरेखित करणारं पुस्तक पर्वतपुत्र शेर्पा…!


Sherpa is the lifeline of mountaineering. Agile and fit Sherpas help mountaineers while trekking. They are versatile and are well capable to handle many tasks. They cook, carry your luggage, they clean the ice to make path for mountaineers, they help them in each respect. A veteran mountaineer himself and a disciplined manager of the groups of mountaineers, Umesh Jhirpe has written about Sherpa community, their way of life, culture, religious beliefs, food, and many other things.



225.00 Add to cart

योगाचार्य

बी.के.एस. अय्यंगार यांचं चरित्र


[taxonomy_list name=”product_author” include=”592″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”404″]


कर्नाटकातल्या एका लहानशा खेड्यातून बी.के.एस. अय्यंगार यांच्या कष्टप्रद जीवनप्रवासाला सुरुवात झाली. कुमारवयापासूनच त्यांना सुप्रसिद्ध योगतज्ज्ञ कृष्णमाचार्य यांचा सहवास लाभला व त्यांच्यात गुरु-शिष्य नातं निर्माण झालं. मात्र हे गुरु-शिष्य संबंध कायमच तणावपूर्ण राहिले, तरी अय्यंगारांनी मोठ्या जिद्दीने कृष्णमाचार्यांकडून योगविद्या शिकून घेतली.

भविष्य घडवण्यासाठी पुणे शहरात आल्यावर अय्यंगारांच्या जीवनाला वेगळं वळण लाभलं. या अनोळखी शहरात जम बसवायला अय्यंगारांना बराच संघर्ष करावा लागला… जणू काही ती त्यांची आणि योगविद्येची कसोटीच होती. आणि त्या संघर्षात ते यशस्वी झाले! त्यांची कीर्ती देशविदेशात पसरली. एवढी की, आंतरराष्ट्रीय पातळीवर योग आणि अय्यंगार हे अतूट समीकरण तयार होऊन ‘अय्यंगार योग’ अशी जणू एक वेगळी शाखाच निर्माण झाली. अय्यंगारांनी निरामय आयुष्यासाठी योग किती महत्त्वाचा आहे हे सर्वसामान्यांच्या मनावर ठसवलं, विविध साधनांचा वापर सुचवून योग लोकप्रिय केला.

रश्मी पालखीवाला या अय्यंगारांच्या निकटवर्तीयांपैकी एक होत. या पुस्तकात त्यांनी अय्यंगार यांच्या जीवनातले चढ-उतार, त्यांचे स्वभावविशेष उत्कटतेने चितारले आहेत, तसंच योगसाधनेकडे पाहायचा गुरुजींचा दृष्टिकोन आणि त्यामागचं त्यांचं तत्त्वज्ञानही विशद केलं आहे.

जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत योगसाधना हा ध्यास असलेल्या हाडाच्या योगशिक्षकाचं चरित्र…योगाचार्य !


A saga of a Maestro, who made study and practice of yoga his life mission. A profound biography of Yogacharya B. K. S. Iyyangar, an Internationally renowned yoga teacher, practitioner and a thinker. This book speaks about his childhood, hardships- he faced, his stern and over-strict guru, his struggle to popularize yoga among common people, his popularity and the respect he earned through out the world. Written by the member of one of his close family friends, Rashmi Palkhiwala, this book is a must-read for everyone who wants to know how Shri. Iyyangar made Yoga the matter of pride in the world.


300.00 Add to cart

नेहरू व बोस : समांतर जीवनप्रवास


[taxonomy_list name=”product_author” include=”481″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”351″]


`जवाहरलाल नेहरूंएवढी हानी मला कोणीच पोचवलेली नाही’, असं सुभाषचंद्र बोस यांनी १९३९मध्ये लिहिलं होतं. नेहरूंकडे बोस यांनी शत्रू म्हणून पाहावं एवढे या दोन राष्ट्रवादी नेत्यांमधले संबंध बिघडले होते का? पण मग सुभाषचंद्रांनी आझाद हिंद सेनेतील एका पलटणीचं नाव जवाहरलाल यांच्यावरून का ठेवलं? आणि १९४५मध्ये सुभाषचंद्रांच्या अकाली निधनाची वार्ता ऐकल्यावर जवाहरलाल यांना अश्रू का अनावर झाले? शिवाय, `मी त्यांना लहान भाऊ मानायचो’, असे उदगार नेहरूंनी का काढले?
स्वातंत्र्य चळवळीच्या पार्श्वभूमीवर या दोन उत्तुंग व्यक्तिमत्त्वांच्या जडणघडणीचा शोध रुद्रांग्शू मुखर्जी यांनी या पुस्तकात सखोलतेने घेतला आहे. भिन्न राजकीय विचारधारांमुळे नेहरू व बोस यांच्यात न उमलू शकलेल्या मैत्रीचा अदमास हे पुस्तक बांधतं आणि त्याचसोबत या दोन व्यक्तिमत्त्वांमधीलभेदही अधोरेखित करतं. गांधी नेहरूंकडे आपला राजकीय वारस म्हणून बघत होते, तर सुभाषचंद्रांना मार्गभ्रष्ट पुत्र मानत होते.
आधुनिक भारताच्या घडणीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान असलेल्या दोन परस्परविरोधी व्यक्तिमत्त्वांची लक्षवेधक कहाणी… नेहरू व बोस समांतर जीवनप्रवास !



350.00 Add to cart

थोरा-मोठ्यांचं बालपण संच

३ पुस्तकांचा संच


[taxonomy_list name=”product_author” include=”510,562,378″]


आपण भविष्यात कोण होऊ, काय करू

याची बीजं बरेचदा आपल्या बालपणातल्या,

अत्यंत संवेदनशील मनावर रुजलेली असतात.

मोठ्या व्यक्तीच्या बालपणाची रंजक पद्धतीने

ओळख करून देऊन, प्रेरणा देणारा…

३ पुस्तकांचा संच

कलामांचं बालपण

अभ्यासावरचं कलामांचं प्रेम, शिक्षकांविषयी असलेला आदर,

आई-वडलांविषयी असलेला जिव्हाळा, जिज्ञासूवृत्ती,

कष्टाळूवृत्ती, ध्यास आणि आध्यात्मिक प्रवृत्ती…

एका तपस्वी संशोधकाच्या अनुभवांचं विश्व

बालपणीच्या किश्श्यांमधून उलगडून दाखवणारं पुस्तक…

थोरांचं बालपण

या पुस्तकात राजकारण, विज्ञान, पर्यावरण, कला, साहित्य,

समाजसेवा, अध्यात्म व क्रीडा या विविध क्षेत्रांतील;

४० व्यक्तिमत्त्वांचं बालपण त्यांच्या लहानपणचे प्रभाव

टाकणारे काही प्रसंग, काही आठवणी देत चितारलं आहे.

आमचं बालपण

या पुस्तकामध्ये सहा कलावंत आपल्या शैशवातील

आठवणींना उजाळा देत आहेत. मोठेपणी ज्या कलाक्षेत्रात

विपुल यश कमावलं त्या कलेविषयी गोडी कशी निर्माण

झाली याचं हृदगत ते तुम्हाला सांगत आहेत.



325.00 Add to cart

थोरांचं बालपण


[taxonomy_list name=”product_author” include=”378″]


आपण भविष्यात कोण होऊ, काय करू याची बीजं बरेचदा आपल्या बालपणात पडलेली असतात असं म्हटलं जातं. आणि थोर व्यक्तिमत्त्वांचं बालपण पाहिलं तर त्याची सत्यता पटते. कारण बालपणी आपलं मन अत्यंत संवेदनशील असतं. त्यामुळे या काळात आपल्या मनावर जे अनुभवांचे ठसे उमटतात, जे संस्कार होतात, त्यातून आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीचा पाया रचला जातो.

या पुस्तकात राजकारण, विज्ञान, पर्यावरण, कला, साहित्य, समाजसेवा, अध्यात्म व क्रीडा या विविध क्षेत्रांतील; वल्लभभाई पटेल, होमी भाभा, सालिम अली, झाकीर हुसेन, अगाथा खिस्ती, स्वामी रामतीर्थ, आशा भोसले, सानिया मिर्झा; अशा ४० व्यक्तिमत्त्वांचं बालपण त्यांच्या लहानपणचे प्रभाव टाकणारे काही प्रसंग, काही आठवणी देत चितारलं आहे.

मोठ्या व्यक्तीRच्या बालपणाची रंजक पद्धतीने ओळख करून देऊन,

प्रेरणा देणारं पुस्तक…थोरांचं बालपण !



100.00 Add to cart

सुहाना सफर और…

कवी शैलेंद्र यांचा गीतमय जीवन-प्रवास


[taxonomy_list name=”product_author” include=”488″]


हिंदी चित्रपटसृष्टीतला संगीताचा सुवर्णकाळ जेवढा संगीतकारांच्या अविस्मरणीय रचनांनी गाजला, तेवढाच तो प्रतिभावान गीतकारांच्या आशयसंपन्न काव्याने बहरला.
सामाजिक आणि वैचारिक पाश्र्वभूमीतून आलेल्या या गीतकारांनी प्रेमगीतं, युगुलगीतं आणि मानवी जीवनातल्या सर्वच भावभावना उत्कटतेने व्यक्त करणारी गीतं सर्जनशीलतेने लिहिली आणि त्याचबरोबर सामाजिक जाणिवांचा वेध घेणारी गीतंही संवेदनशीलतेने रचली.
अशा चतुरस्र गीतकारांमध्ये शैलेंद्र हे महत्त्वाचं नाव! ‘ओ सजना बरखा बहार आयी’, ‘दम भर जो उधर मूँह फेरे’, ‘पान खाएँ सैंया हमारो’, ‘जीना इसी का नाम है’, ‘आज फिर जिने की तमन्ना है’, ‘सुहाना सफर और…’ अशी वैविध्यपूर्ण आशयाची गीतं रचून त्यांनी रसिकांना सहजसोप्या शब्दांत विचारप्रवृत्त केलं, गीतांना तत्त्वज्ञानात्मक डूब देऊन प्रगल्भ केलं आणि तरल गीतांनी रिझवलंही…!
या पुस्तकात गीतकार शैलेंद्र यांच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक पैलूंची ओळख करून दिली आहे. तसंच त्यांच्या गीतांच्या चित्रणाची वैशिष्ट्यंही उलगडून सांगितली आहेत. ‘तीसरी कसम’ हा शैलेंद्र यांनी निर्मिलेला चित्रपट म्हणजे त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय… त्या चित्रपटाची पडद्यावरील आणि पडद्यामागील कहाणीही यात वाचायला मिळेल.
प्रसिद्ध चित्रपट-आस्वादक विजय पाडळकर यांनी घेतलेला शैलेंद्र यांच्या गीतमय जीवनप्रवासाचा हा विविधांगी वेध… ‘सुहाना सफर और…!’


Life and work of veteran lyricist in Bollywood – Shailendra! A reader can revisit the golden era of Bollywood music. Shailendra wrote all kinds of songs for successful films. It also tells about many behind the scene memories of various Hindi film songs. While reading about Shailendra, his life, struggles, how he carved his own niche in the industry, his passion of film making etc. This book is a kaleidoscope for film researchers and critics too.


340.00 Add to cart

कलामांचं बालपण


[taxonomy_list name=”product_author” include=”510″]

अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”421″]


जैनुलब्दीन आणि आशियाम्मा या दांपत्याने १५ ऑक्टोबर १९३१ रोजी भारताला एक ‘रत्न’ दिलं. भारताचं नाव रोशन करणारं हे रत्न म्हणजेच
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम…
प्रख्यात शास्त्रज्ञ आणि भारताचे राष्ट्रपती !
अतिशय लाडक्या अशा या व्यक्तिमत्त्वाचं बालपण या पुस्तकात रंगवलं आहे, त्यांचे निकटचे सहकारी सृजनपाल सिंग यांनी.
अभ्यासावरचं कलामांचं प्रेम, शिक्षकांविषयी असलेला आदर,
आई-वडिलांविषयी असलेला जिव्हाळा, जिज्ञासावृत्ती, कष्टाळू वृत्ती,
स्वप्न पूर्ण करण्याचा असलेला ध्यास आणि आध्यत्मिक प्रवृत्ती…
बालपणीच्या किश्यांमधून डोकावणारे त्यांच्या स्वभावातील
हे सर्व पैलू आजच्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरू शकतात.
त्यामुळे सर्व ‘छोट्यांनी’ अगदी आवर्जून वाचावं असं हे पुस्तक आहे.
एका तपस्वी संशोधकाच्या बालपणीच्या अनुभवांचं विश्व उलगडून दाखवणारं…
कलामांचं बालपण !



100.00 Add to cart

गेम चेंजर संच

तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती घडवून मानवी जीवन बदलून टाकणारे… गेम चेंजर


[taxonomy_list name=”product_author” include=”365″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”457″]


सत्य नडेला
मायक्रोसॉफ्टचा बदलता चेहरा
या पुस्तकात नडेलाची वैयक्तिक जडणघडण, त्याची नियुक्ती कशी करण्यात आली, मायक्रोसॉफ्टची आधीची स्थिती, नडेलाने ठामपणे केलेले बदल, त्याचे परिणाम आणि नडेलापुढची आव्हानं इत्यादी गोष्टींचा ऊहापोह करण्यात आला आहे. त्यामुळे एका बाजूला हे पुस्तक म्हणजे सत्य नडेला या व्यक्तिमत्त्वाचं चरित्र आहे, तसंच दुसरीकडे, ते तंत्रज्ञान क्षेत्रात झपाट्याने होणारे बदल, त्यामुळे होत असलेली स्पर्धा यांची मर्मदृष्टी देणारा माहितीपटही आहे.

सुंदर पिचई
गुगलचं भविष्य
या पुस्तकात पिचईच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण, ‘गूगल’मधल्या प्रवेशापासून ते सीईओ पदापर्यंतचा त्याचा विलक्षण प्रवास, त्याने ठामपणे घेतलेले निर्णय, पेललेली आव्हानं, ‘गूगल’ला प्राप्त करुन दिलेलं अत्युच्च स्थान याचा उहापोह रंजकपणे आणि प्रभावीपणे केला आहे. सुंदर पिचई आणि दैनंदिन जगण्याचा भाग बनलेलं ‘गूगल’ यांच्या यशाचं मर्म सांगणारं आणि २१व्या शतकातलं बहुपेडी नेतृत्त्व कसं असावं आणि ते कसं घडतं हे उलगडून दाखवणारं पुस्तक.


300.00 Add to cart

सुंदर पिचई

गुगलचं भविष्य


[taxonomy_list name=”product_author” include=”365″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”457″]


जागतिक स्तरावरची महाकाय टेक कंपनी ‘गूगल’ आणि तिचा चेहरामोहरा पालटून टाकणाऱ्या एका भारतीय तरुण नेतृत्त्वाची ही आहे झंझावाती कहाणी…
तरुण वयाचा सुंदर पिचई तंत्रज्ञानावरचं आपलं निरपवाद प्रभुत्त्व सिद्ध करत ‘गूगल’मध्ये यशाची शिडी झपाट्याने चढत होता. साहजिकच ‘गूगल’च्या ‘सीईओ’पदी पिचईची झालेली निवड स्पर्धक कंपन्यांनाही अनपेक्षित नव्हती. उलटपक्षी त्याच्या नेतृत्त्वाखाली ‘गूगल’ नव्या आव्हानांना कसं तोंड देतं, याचीच उत्सुकता सर्वांना लागली होती. तंत्रज्ञानाच्या प्रभुत्त्वाबरोबरच पिचईकडे भविष्याचा वेध घेणारी ‘व्हिजन’ होती. सोबतीला व्यवस्थापकीय आणि प्रशासकीय कौशल्यांची जोड होती. माणसांना एकत्र घेऊन काम करण्याची हातोटी होती. त्याच बळावर त्याने क्रोम, क्रोम ओएस, अँड्रॉइड वगैरे उत्पादनं विकसित केली. ही उत्पादनं आता जगावर अधिराज्य गाजवत आहेत. पिचईचा ‘मिडास टच’ लाभलेल्या ‘गूगल’ने आता नवी भरारी घेतली आहे.
या पुस्तकात पिचईच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण, ‘गूगल’मधल्या प्रवेशापासून ते सीईओ पदापर्यंतचा त्याचा विलक्षण प्रवास, त्याने ठामपणे घेतलेले निर्णय, पेललेली आव्हानं, ‘गूगल’ला प्राप्त करुन दिलेलं अत्युच्च स्थान याचा उहापोह रंजकपणे आणि प्रभावीपणे केला आहे. सुंदर पिचई आणि दैनंदिन जगण्याचा भाग बनलेलं ‘गूगल’ यांच्या यशाचं मर्म सांगणारं आणि २१व्या शतकातलं बहुपेडी नेतृत्त्व कसं असावं आणि ते कसं घडतं हे उलगडून दाखवणारं पुस्तक
सुंदर पिचई – गूगलचं भविष्य…


195.00 Add to cart

सत्य नडेला

मायक्रोसॉफ्टचा बदलता चेहरा


[taxonomy_list name=”product_author” include=”365″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”457″]


जगावर अधिराज्य गाजवणाऱ्या मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या सीईओ अर्थात मुख्य कार्यकारी अधिकारीपदी जेव्हा सत्य नडेला याची नियुक्ती झाली तेव्हा एकीकडे भारतीयांच्या माना ताठ झाल्या, तर दुसरीकडे तंत्रज्ञान क्षेत्रातल्या अभ्यासकांच्या मनात हा मुरब्बी तंत्रज्ञ मायक्रोसॉफ्टला कोणती नवी दिशा देणार याबद्दल प्रचंड औत्सुक्य निर्माण झालं होतं. कारण तेव्हा गुगल आणि अ‍ॅपल प्रतिस्पर्धी कंपन्यांनी आपला मोर्चा मोबाइल फोन वा टॅब यांकडे वळवला होता.
तर, मायक्रोसॉफ्टने या क्षेत्रात अग्रणी होण्याच्या संधी गमावल्या होत्या. नडेलाने मात्र सूत्रं स्वीकारल्यावर लगेच नव्या बदलांच्या दिशेने पावलं उचलायला सुरुवात केली.
या पुस्तकात नडेलाची वैयक्तिक जडणघडण, त्याची नियुक्ती कशी करण्यात आली, मायक्रोसॉफ्टची आधीची स्थिती, नडेलाने ठामपणे केलेले बदल, त्याचे परिणाम आणि नडेलापुढची आव्हानं इत्यादी गोष्टींचा ऊहापोह करण्यात आला आहे. त्यामुळे एका बाजूला हे पुस्तक म्हणजे सत्य नडेला या व्यक्तिमत्त्वाचं चरित्र आहे, तसंच दुसरीकडे, ते तंत्रज्ञान क्षेत्रात झपाट्याने होणारे बदल, त्यामुळे होत असलेली स्पर्धा यांची मर्मदृष्टी देणारा माहितीपटही आहे.
सर्वसामान्य वापरकर्त्यांना या क्षेत्राची रंजक माहिती देणारं, आयटी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांना भान, प्रेरणा देणारं आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रोफेशनल्सना अंतर्दृष्टी देणारं पुस्तक…
सत्य नडेला : मायक्रोसॉफ्टचा बदलता चेहरा!


175.00 Add to cart

अणुविश्वातील ध्रुव : डॉ. अनिल काकोडकर


[taxonomy_list name=”product_author” include=”583″]


अणुविश्वात डॉ. अनिल काकोडकर यांचं नाव मोठ्या आदराने घेतलं जातं, ते त्यांनी केलेल्या भरीव कार्यामुळे. `ध्रुव’सारखी अणुभट्टी कार्यान्वित करणं असो, किंवा पोखरण अणुचाचण्या असोत – डॉ. काकोडकरांनी अशा कितीतरी महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये बहुमूल्य कामगिरी बजावली. एवढंच नव्हे, तर भारत-अमेरिका यांच्यातल्या अणुकराराच्या मसुद्यात देशहिताच्या दृष्टीने आवश्यक ते बदल करून घेण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.

अणुऊर्जेबरोबरच तंत्रज्ञान-संशोधन या विषयावरही त्यांनी सखोल चिंतन केलं. त्यातूनच भारताला तंत्रज्ञान व संशोधन क्षेत्रात भरारी घ्यायची असेल, तर शिक्षण-व्यवस्थेत आमूलाग्र बदल करणं आवश्यक आहे हे त्यांनी ओळखलं. त्यानुसार त्यांच्या संकल्पनेतून `सिलेज’, `शिक्षण पंढरी’ यांसारखे अनेक उपक्रम राबवले गेले. तसंच एपीजे अब्दुल कलाम यांच्या ‘व्हिजन २०२०’नंतर भारताच्या भविष्यकाळातल्या गरजा व विकास विशद करणारं `व्हिजन २०३५’ डॉक्यूमेंटही त्यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने तयार केलं. सध्या त्यानुसार अनेक उपक्रम व प्रकल्प राबवले जात आहेत.
अणुविश्वाबरोबरच तंत्रज्ञान-संशोधन आणि शिक्षण या क्षेत्रांत `ध्रुव’पद प्राप्त करणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीची व कार्याची ओळख करून देणारं हे चरित्र!


160.00 Add to cart

शौर्य संच

कुशल लष्करी डावपेच आणि अपरिमित शौर्य यांची ओळख करुन देणारी दोन पुस्तकं…


रचना बिश्त-रावत, मेजर जनरल शुभी सूद
अनुवाद : भगवान दातार 


रचना बिश्त-रावत, मेजर जनरल शुभी सूद
भारताला आपलं स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी आजवर १९४७, १९६२, १९६५, १९७१, १९९९ अशी अनेक युद्धं लढावी लागली.
या लढायांत असंख्य लष्करी अधिकारी, जवानांनी आपलं असीम शौर्य सिद्ध केलं. देशासाठी बजावलेल्या या कामगिरीसाठी त्यांतील अनेकांना आजवर विविध सन्मानांनी गौरवण्यात आलं आहे.
अशा काही निवडक सैनिकांच्या वीरतेच्या कहाण्यांची ही २ पुस्तकं…
युद्धभूमीवरील डावपेच व प्रत्यक्ष लढायांच्या तपशिलांसह !



500.00 Add to cart
1 2 3