गेल्या वीस वर्षांतली मला आवडलेली कथा / नीतीन रिंढे

मराठी साहित्यात ‘नवकथे’चा काळ हा कथा या साहित्यप्रकाराच्या बहराचा काळ होता असं म्हटलं जातं. परंतु १९८० नंतर एकीकडे जागतिक पातळीवर विविध भाषांमधले लेखक कथेत वेगवेगळे प्रयोग करून भर टाकत असताना, मराठी कथा मात्र विविध कारणांमुळे दुर्लक्षित राहिली. तिचा प्रवाह हवा तितका खळाळता राहिला नाही. गेल्या काही वर्षांत मात्र पुन्हा एकदा हा साहित्यप्रकार जोम धरू पाहतो आहे. [...]

‘इंदिरा पर्वा’चा विश्वासार्ह लेखाजोखा…

गेल्या अंकातील ‘रोहन क्लासिक्स’मध्ये ‘ऑक्सफर्ड’च्या डॉ. रुकून अडवानी यांनी शिफारस केलेल्या ‘इंदिरा गांधी, आणीबाणी...’ या पुस्तकाचा मी उल्लेख केला होता. ‘पास्ट फॉरवर्ड’प्रमाणे या पुस्तकाचा विषयही माझ्या कुतूहलाचा, जिज्ञासेचा आणि जिव्हाळ्याचा. त्यात या पुस्तकाचे लेखक प्रो.पी.एन. धर हे इंदिरा गांधी यांचे सल्लागार आणि पंतप्रधान कार्यालयातले उच्चस्तरीय अधिकारी.  तेव्हा पुस्तकाविषयी चांगलंच कुतूहल होतं. पुस्तक वाचून मला ते [...]

यशवंतरावांचा राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक पट

संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री राहिलेली आणि पुढे केंद्रात संरक्षण, गृह, परराष्ट्र आणि अर्थ अशी सर्व महत्त्वाची खाती कार्यक्षमतेने सांभाळणारी एकमेव व्यक्ती म्हणजे यशवंतराव चव्हाण. चव्हाण हे जसे मुरब्बी राजकारणी होते व संवेदनशील आणि जाणकार समाजकारणी होते, तसेच ते साहित्य, कला यांत रमणारे, त्याची जाण असणारे आणि साहित्यिक व कलावंतांविषयी मनात आदर बाळगून असलेले नेते होते.साल [...]