MY BARC DAYS


[taxonomy_list name=”product_author” include=”4222″]


My BARC Days is a memoir of Dr. Suresh Haware’s inspirational journey from a remote village in India to becoming a nuclear scientist in India’s premier research organization Bhabha Atomic Research Centre (BARC). The book brings forth the author’s perspective of looking at difficulties as challenges and opportunities, and his intense passion for knowledge and research. His experiences span political events that affected the common man in India, days spent in educational institutions, work in BARC and also a Himalayan pilgrimage. Through detailed descriptions, the book gives a thorough understanding of life and work at BARC including a few milestones in the nation’s nuclear journey.


 

399.00 Add to cart

अफ़साना लिख रही हूँ

चित्रपट कथानक आणि गाणी यांच्यातील परस्पर मेळ उलगडणारे अफसाने


डॉ. मृदुला दाढे


एक जमाना होता जेव्हा हिंदी चित्रपटांत ‘गाणी’ हा एक अविभाज्य घटक असे. काही चित्रपटांतील काही गाणी तर कथानक पुढे नेण्याचा भार उचलत… कथानकाचा भागच जणू!
अशी गीतं रचताना, ती संगीतबद्ध करताना व ती चित्रित करताना त्यात कथेचं प्रतिबिंब पडेल असं पाहिलं जाई.
चित्रपटसंगीताच्या अभ्यासिका डॉ. मृदुला दाढे यांनी या पुस्तकात आपल्या भावविश्वात अढळपद मिळवलेल्या अशा १५ चित्रपटांची निवड केली आहे. त्या चित्रपटांच्या कथेला समर्थ जोड देणाऱ्या गीतांचं चित्रपटातलं स्थान, त्यांची सौंदर्यस्थळं, त्यांची सांगीतिक बलस्थानं डॉ. मृदुला यांनी पारखी नजरेने पुस्तकात उलगडून दाखवली आहेत. गीतकाराची तरलता, संगीतकाराची सर्जनशीलता अनेक ‘अफसाने’ या रसग्रहणात आढळत जातील. चित्रपट कथानक आणि गाणी यांच्यातील मेळ उलगडणारं…
अफ़साना लिख रही हूँ! 



260.00 Add to cart

अमर चित्र कथा १२ पुस्तकांचा संच

 


अमर चित्र कथा


रोहन प्रकाशन घेऊन येत आहे अमर चित्र कथा आता मराठीत
१२ पुस्तकांचा संच


१. पौराणिक व जातक कथा

२. वैज्ञानिक व उद्योजक गाथा
३. प्रेरणादायी व्यक्ती कथा


 

1,307.00 Add to cart

अल्बर्ट आईन्स्टाईन

 


अमर चित्र कथा


अल्बर्ट खूपच लहान होता तेव्हा अभ्यासाबद्दल आवड नसल्यामुळे त्याचे पालक व शिक्षक निराश झाले. मुख्य म्हणजे, त्याला भाषणात अडचणी आल्या आणि दुर्लक्ष केले. अल्बर्टला शाळेत ज्या प्रकारचे शिक्षण मिळत होते त्याचा राग होता तारखा आणि मजकूर लक्षात ठेवणे इ. परंतु तो जसजसा मोठा होत गेला तसतसा लवकरच हे स्पष्ट झाले की, अल्बर्ट सामान्य व्यक्ती नव्हता. १९०५ हे साल त्याच्यासाठी “जादुई वर्ष” म्हणून ओळखले जाते, त्यावर्षी त्यांनी एक नव्हे तर चार नवीन संशोधन पेपर चार भित्र विषयांवर प्रकाशित केले. एका रात्रीत तो, त्याच्या पिढीतील सर्वात प्रसिद्ध वैज्ञानिक झाला.


 

90.00 Add to cart

आपत्तीचक्र… बोध किल्लारी भूकंपाचा

किल्लारी भूकंप..
तीस वर्षानंतरचा किल्लारी परिसर
पुनर्वसनाचा ताळेबंद

आपत्तीचक्राचा विळखा


अतुल देऊळगावकर


३० सप्टेंबर १९९३ची रात्र किल्लारी आणि परिसरातल्या रहिवाश्यांसाठी काळरात्रच ठरली! भूकंपांच्या हादऱ्यांनी काही क्षणांत होत्याचं नव्हतं झालं… जगाचं लक्ष वेधलं गेलं… काही तासांत तत्कालीन मुख्यमंत्र्यासह सगळं प्रशासन कामाला लागलं, मदतीचा ओघ सुरू झाला आणि नंतर ‘भव्य’ पुनर्वसनही झालं….

लेखक, पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी या भूकंपानंतर झालेलं बचतकार्य, मदतकार्य, पीडितांची अवस्था, त्यांची मानसिकता आणि पुनर्वसनाची प्रक्रिया अशा अनेक गोष्टी या पुस्तकात सविस्तर चित्रित केल्या आहेत. तसंच किल्लारी भूकंपाला आता काही वर्षं झाल्यानंतर तिथल्या पुनर्वसनाच्या स्थितीचाही चिकित्सक लेखाजोखा मांडला आहे.

या निमित्ताने देऊळगावकर यांनी आपत्ती ही दैनंदिन घटना झालेल्या आजच्या काळात जोखीम निवारण व उत्कृष्ट व्यवस्थापन करण्यासाठी सूत्ररूप सुचवण्या केल्या आहेत. त्यामुळे हे पुस्तक केवळ किल्लारीपुरते मर्यादित राहत नाही, तर आपल्याला आपत्ती व्यवस्थापनाकडे एका व्यापक मानवतावादी दृष्टिकोनातून पाहायला लावते.

हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाची निकड अधोरेखित करणारं, डोळ्यांत अंजन घालणारं पुस्तक….

आपत्तीचक्र… बोध किल्लारी भूकंपाचा!



 

430.00 Add to cart

आपलं विश्व

विश्वाच्या उत्पत्तीच्या रंजक इतिहासापासून भविष्यात विश्व कसं असेल इथपर्यंत


सुकल्प कारांजेकर


“आपलं विश्व आणि त्याची नवलकथा’ या आगळ्यावेगळ्या सचित्र ग्रंथात सुकल्प कारंजेकर यांनी विश्वाच्या उत्पत्तीपासून त्याच्या भवितव्यापर्यंत विविधांगी विश्ववेध घेतलेला आहे. विश्वशास्त्रासारख्या अद्भुत विषयाचा हा सुबोध, पण अभ्यासपूर्ण परिचय आहे. त्याला विज्ञानाची बैठक आहे, पण त्यात कथनातील कोरडेपणा वा तंत्रशरणता नाही. केवळ विज्ञानाच्या नव्हे, तर साहित्य-तत्त्वज्ञानाच्या अंगानेसुद्धा हजारो वर्षांची विश्वकहाणी ते रंजक पद्धतीने मांडत जातात. या मांडणीत आंतरविद्याशाखीयतेचा प्रत्यय येतो. नाविन्यपूर्ण आणि दर्जेदार ग्रंथनिर्मितीवर भर देणाऱ्या ‘रोहन प्रकाशना’ने हाती ठेवलेली ही ‘सुकल्पित’ नवलकथा खचितच वाचक- विश्वाच्या पसंतीला उतरेल.

-राजा दीक्षित

सुप्रतिष्ठित प्राध्यापक (Emeritus Professor)
अध्यक्ष व प्रमुख संपादक, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ

 

विश्वाचा उगम कसा झाला असेल ?

विश्वाच्या या अफाट पसाऱ्यात आपलं स्थान काय ? हे प्रश्न हजारो वर्षांपासून माणसाच्या सोबत आहेत.

त्याची उत्तरंही वेगवेगळ्या संस्कृती सभ्यतांमध्ये उत्पत्तीकथांमार्फत द्यायचा प्रयत्न झाला, तर आधुनिक काळात माणसाने ही कोडी विज्ञानाच्या साहाय्याने सोडवली…. आणि अजूनही ही प्रक्रिया सुरूच आहे…..

थोडक्यात, विश्व समजून घेण्याचा माणसाचा प्रवास हजारो वर्षांपासूनचा आहे.

या प्रवासाचीच ही उद्बोधक गोष्ट….

कुमारांपासून मोठ्यांपर्यंत; सगळ्यांचं कुतूहल शमवणारं….

मायमराठीत, सोप्या पद्धतीने अनेक वैज्ञानिक संकल्पना समजावून सांगणारं…

रंजक आणि तितकीच सखोल माहिती देणारं…
आपल्याकडे असलंच पाहिजे असं ‘मस्ट रीड’ पुस्तक… आपलं विश्व


 

Original price was: ₹1,095.00.Current price is: ₹895.00. Add to cart

इलेव्हन्थ अवर


एस. हुसैन झैदी
अनुवाद: रमा हर्डीकर-सखदेव


मुंबईत २६/११ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या जखमांचे घाव अजून भरलेले नाहीत.
दिल्लीत पोलीस सुपरींटेंडंट विक्रम सिंग भारतभेटीला आलेल्या पाकिस्तानी उच्चायुक्ताला रागाच्या भरात कानाखाली वाजवतो…त्याच्या या धारीष्ट्र्यामुळे त्याला निलंबित केलं जातं…त्याचवेळी भोपाळच्या तुरुंगातून पाच दहशतवादी फरार होतात…मुंबईत त्यांच्या शोधमोहिमेवर विक्रांत सिंगलाच अनौपचारिकपणे नेमलं जातं. शोधकार्याला प्रचंड वेगाने सुरुवात होते. आणि हे सारं घडत असताना दूर कुठे तरी भर समुद्रात लक्षद्वीपला जाणाऱ्या क्रूजचं सोमाली चाच्यांकडून अपहरण होतं…काही ‘खास’ मागण्यांसाठी!
या सगळ्या गोष्टींतून सुरु होते, ती वेगवान घटनांची मालिका… या मालिकेत दिल्लीपासून मुंबईपर्यंत आणि भोपाळपासून लक्षद्वीपपर्यंत अनेक घटनांचे दुवे जोडले गेलेले असतात. उच्चपदस्थ नेते, पोलीस व लष्करी अधिकारी आणि काही ‘विशेष’ माणसं या शोधचक्रात गुंततात. त्यांच्या जोडीने नकळतपणे वाचकही या थरारमोहिमेत गुंतत जातो.
अपहरणकर्त्यांच्या मागण्या असतात तरी काय? त्यांचं कारस्थान काय असतं? उद्धटपणाच्या वागणुकीनंतरही या मोहिमेत विक्रमला सहभागी का करून घेतलं जातं? शोधमोहीम थांबते तरी कुठे?
हुसैन झैदी यांच्या खास शैलीत रंगत जाणारा थरारक आणि गूढ शोधमोहिमेचा विलक्षण प्रवास इलेव्हन्थ अवर…



250.00 Add to cart

ए.पी.जे. अब्दुल कलाम

 


अमर चित्र कथा


डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम है एक वैज्ञानिक, लेखक, कवी, शिक्षक, दूरदर्शी आणि भारताचे ११ वे राष्ट्रपती होते आणि त्याहीपेक्षा खूप काही होते. अलीकडील काळातील सर्वात प्रिय आणि प्रशंसनीय पुरुषांपैकी एक असलेले डॉ. कलाम हे दयाळू आणि सौम्य माणूस होते. ज्यांचा भारताच्या लोकांवर विशेषत: तरूणांच्या सामर्थ्यावर दृढ विश्वास होता. एक असा माणूस होता जो अकल्पनीय उंबीवर पोहोचला परंतु त्यांचे पाय हे नेहमी जमिनीवरच होते. ज्या माणसाने ज्याला स्पर्श केला त्या प्रत्येक गोष्टीत स्वतःची उत्कृष्टता आणि आणि नम्रता आणली. त्यानेच आपल्याला समर्पण आणि परिश्रम करण्याच्या शक्तीचे दर्शन दिले त्याने आपल्याला स्वप्नांची शक्ती दाखवून दिली. ते म्हणयचे, “स्वप्ने ती नाहीत जी आपण झोपेमध्ये पाहतो. स्वप्ने म्हणजे ती जी आपल्याला झोपू देत नाहीत.’ त्यांची जीवनकहाणी याचीच साक्ष देते.


 

199.00 Add to cart

एन्डगेम


एस. हुसैन झैदी
अनुवाद:रमा हर्डीकर-सखदेव


बीएसएफ’चे स्पेशल डायरेक्टर जनरल सोमेश कुमार यांना संरक्षण देण्याचं काम या गुरू-चेल्यावर सोपवण्यात आलं आहे. कुमार हे माजी पंतप्रधान परमेश्वर नायडू यांना भेटायला येण्याच्या मार्गावर आहेत. नायडूंच्या गाडीला अपघात झाल्यामुळे

ते हॉस्पिटलमध्ये आहेत. कुमारांच्या गाड्यांच्या ताफ्यावर अतिरेकी हल्ला करतात आणि कुमारांना ठार मारण्यात ते यशस्वी होतात. ‘मोसाद’मधल्या मित्राकडून टीप मिळाल्यावर गुरू-चेला मुंब्याला पोचतात. इथे एका भाड्याच्या घरात अल मुकादम हा मुख्य संशयित लपून बसला आहे. तो त्यांच्या हातावर तुरी देतो, पण तत्पूर्वी तो दुसरा तिसरा कोणी नसून आयुब म्हणजे मजहर खान या त्यांच्या खबऱ्याचा भाऊ आहे, हे विक्रांतच्या लक्षात येतं. केसमधली गुंतागुंत वाढत जात असताना मेजर डॅनिएल; म्हणजे नायडूंची मुलगी वैशाली हिचा प्रियकर, त्यांच्याशी संपर्क साधतो. नायडूंच्या अपघातामागे काहीतरी काळंबेरं असल्याचा दावा तो करतो.

राजकारण, कल्पनातीत दगाबाजी आणि अविश्वसनीय थरार याची गुंफण अर्थात….एन्डगेम



240.00 Add to cart

एस. हुसैन झैदी क्राइम सेट


एस. हुसैन झैदी
अनुवाद: रमा हर्डीकर-सखदेव


राजकारण, कल्पनातीत दगाबाजी आणि अविश्वसनीय थरार याची गुंफण असणारा एस. हुसैन झैदी क्राइम सेट!
१) इलेवन्थ अवर = रु. २५०
२) मुंबई अवेंजर्स = रु. ३९०
३) एन्डगेम = रु. २४०

एकूण संच ८८० रु. घरपोच



880.00 Add to cart

गणपती

 


गणपती बाप्पाचं नाव घेतलं, की डोळ्यांपुढे बाप्पाचं गोजिरवाणं रूप उभं राहतं. भारतात सर्वत्र गणपती विघ्नहर्ता म्हणून पूजनीय आहे. म्हणूनच प्रत्येक शुभकार्यारंभी समस्यांचं निवारण करणाऱ्या लाडक्या बाप्पाला वंदन केलं जातं. मनोभावे त्याची पूजा केली जाते. गणपतीच्या जन्माची कथाही रंजक आहे. बाप्पाच्या जन्मानंतर लगेचच त्याचं आणि भगवान शंकराचं युद्ध झालं होतं, त्यात कोण विजयी ठरलं? काय घडलं? हे सांगणारी लाडक्या बाप्पाच्या जन्माची ही चित्ररुपी कथा!


90.00 Add to cart

गल्पेर बागान

 


बाणी बसू

अनुवाद : सुमती जोशी


बाणी बसू या बंगालमधील एक प्रतिथयश लेखिका, कवयित्री, समीक्षक आणि अनुवादिका आहेत. त्या अनेक वर्षं इंग्रजीच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. बसू यांच्या आजवर अनेक कादंबऱ्या, कथासंग्रह आणि लहान मुलांसाठीचं लेखन प्रसिद्ध झालं आहे. ‘खनामिहिरेर ढिपी’ या त्यांच्या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला आहे. प्रत्येक लेखकाची स्वतःची अशी वेगळी शैली असते. बसू यांच्या साहित्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं लेखन कधीही एकसूरी वाटत नाही. त्यांच्या लेखनात भाषेची आणि कल्पनेची पुनरुक्ती दिसत नाही. त्या जेव्हा लेखन करतात तेव्हा त्यांच्या मनात वाचकांच्या इच्छापूर्तीचा विचार नसतो. वाचकांना आवडेल, असं लेखन करणं त्यांना अमान्य नाही; पण निव्वळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्या मार्गाचा अवलंब त्या करत नाहीत. ‘गल्पेर बागान’ आणि ‘गोल्पे विभोर’ या दोन्ही कथासंग्रहात याचा प्रत्यय येतो. कथांमधील परावर्तित झालेली त्यांची विचारांची सखोलता, सूक्ष्मता आणि तरलता यामुळे वाचकाला लेखिकेच्या प्रतिभासंपन्नतेचं आणि संवेदनक्षम मनाचं दर्शन घडतं. वाचकांना गुंतवून ठेवणारे आणि बंगाली, संस्कृतीची मोहवती झलक देणारे दोन कथासंग्रह… गल्पेर बागान व गोल्पे विभोर



 

275.00 Add to cart

गांधीवादाचा केमिकल लोचा आणि इतर कथा


लक्ष्मीकांत देशमुख


लक्ष्मीकांत देशमुख यांच्या या संग्रहातील कथांना तसा कुठलेही स्थानवैशिष्ट्य असलेला एक विशिष्ट असा परिसर नाही. त्या एकूणच भारतीय आणि जागतिकही पटलावरही घडतात. विशेषतः सांस्कृतिक बहुविधता हा आशय असणाऱ्या अनेक कथा या संग्रहात आहेत. ही बहुविधता हेच भारतीय समाजाचे वैशिष्ट्य आहे. जाती-धर्माच्या सीमारेषा ओलांडून सर्वांच्या मनाला भिडणारे संगीत, परस्परांमधला सद्भाव, सामाजिक सलोखा राखणारे समाजमन, परधर्मीयांच्या श्रद्धांचा आदर करणारी सामान्य माणसे असा या संग्रहातील कथांचा ऐवज आहे.

भारतीय समाजातला मुस्लिम हा समाजघटक) आपल्या कथात्म साहित्यात अभावानेच आढळतो. ती उणीव यातील कथांनी भरून काढली आहे. या कथांमध्ये चित्रित झालेल्या समाजजीवनात भिन्न धर्मीयांचे अस्तित्वही ठळकपणे जाणवते. म्हणून या कथा व्यापक अर्थाने समाजजीवन कवेत घेताना दिसतात. कथात्म साहित्यातूनही लेखकाचा विचार डोकावतो.

एका प्रागतिक अशा समाजाचे रेखांकन करणाऱ्या या कथा आहेत. विशेषतः सहिष्णुतेचा संकोच होत असलेल्या, एकारलेल्या काळात या कथांचे महत्त्व नक्कीच अधोरेखित होणारे आहे.

– आसाराम लोमटे


 

295.00 Add to cart

गायनाचे रंगी

 


नीला भागवत


नीला भागवत या ग्वाल्हेर घराण्याच्या ख्याल गायिका म्हणून ख्यातकीर्त… परंतु चौकटीबाहेर पडून शास्त्रीय गायनात अभिव्यक्तीचे नवनवे प्रयोग करणाऱ्या कलाकार म्हणून असलेली त्यांची ओळख काकणभर जास्तच भरते.

ख्याल गायनात परंपरेने चालत आलेल्या बंदिशी बहुतांश वेळा ‘सौतन-साँस-नणंद’ या ‘पुरुषसत्ताक विचारांचं उदात्तीकरण’ म्हणून गणना होऊ शकणाऱ्या चौकटीत अडकलेल्या दिसतात. नीला भागवत यांनी मात्र निर्मळ मानवी सहभावनेच्या विचारांच्या बंदिशी रचण्याचे प्रयोग केले आहेत.

या पुस्तकात या प्रयोगांविषयी, त्यांतील अनुभवांविषयी त्या विस्ताराने सांगतात. त्याचप्रमाणे त्यांना ज्या संतसाहित्यातील प्रेम, करुणा, समता, एकता, मानवधर्म अशा भावनांनी प्रभावित केले, त्या प्रभावातून त्यांनी निर्माण केलेल्या संगीताविषयीही त्या आपले विचार मांडतात.
गायनाचे रंगी संगीत क्षेत्रातील त्यांची प्रेरणास्थानं, गुरु यांचीही त्यांनी कृतज्ञ भावनेने व्यक्तिचित्रणं पुस्तकात साकारली आहेत.

शास्त्रीय संगीताचा चौकटीबाहेर जाऊन बहुपेडी विचार करणारं पुस्तक… गायनाचे रंगी



295.00 Add to cart

गोल्पे विभोर

 


बाणी बसू

अनुवाद : सुमती जोशी


बाणी बसू या बंगालमधील एक प्रतिथयश लेखिका, कवयित्री, समीक्षक आणि अनुवादिका आहेत. त्या अनेक वर्षं इंग्रजीच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. बसू यांच्या आजवर अनेक कादंबऱ्या, कथासंग्रह आणि लहान मुलांसाठीचं लेखन प्रसिद्ध झालं आहे. ‘खनामिहिरेर ढिपी’ या त्यांच्या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला आहे. प्रत्येक लेखकाची स्वतःची अशी वेगळी शैली असते. बसू यांच्या साहित्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं लेखन कधीही एकसूरी वाटत नाही. त्यांच्या लेखनात भाषेची आणि कल्पनेची पुनरुक्ती दिसत नाही. त्या जेव्हा लेखन करतात तेव्हा त्यांच्या मनात वाचकांच्या इच्छापूर्तीचा विचार नसतो. वाचकांना आवडेल, असं लेखन करणं त्यांना अमान्य नाही; पण निव्वळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्या मार्गाचा अवलंब त्या करत नाहीत. ‘गल्पेर बागान’ आणि ‘गोल्पे विभोर’ या दोन्ही कथासंग्रहात याचा प्रत्यय येतो. कथांमधील परावर्तित झालेली त्यांची विचारांची सखोलता, सूक्ष्मता आणि तरलता यामुळे वाचकाला लेखिकेच्या प्रतिभासंपन्नतेचं आणि संवेदनक्षम मनाचं दर्शन घडतं. वाचकांना गुंतवून ठेवणारे आणि बंगाली, संस्कृतीची मोहवती झलक देणारे दोन कथासंग्रह… गल्पेर बागान व गोल्पे विभोर



 

275.00 Add to cart

जीवनकोंडी


संपादन : परेश जयश्री मनोहर

संतोष शेंडकर


राज्यात जवळपास २०० साखर कारखाने….

ऑक्टोबर ते एप्रिल असा ६-७ महिन्यांचा गळीत हंगाम ….

त्या काळात कारखान्यातील परिसरात ऊसाच्या फडांवर लाखो मजूरकुटुंब पोटापाण्यासाठी आपली घरं, शेती, गावं सोडून येतात. या हंगामात स्त्रियांना सोसाव्या लागणाऱ्या आरोग्य समस्या, मुलांच्या शिक्षण समस्या, आर्थिक समस्या असे अनेक गंभीर प्रश्न या स्थलांतरित मजुरांसमोर आ वासून उभे असतात. जीवनकोंडीच जणू! याच समस्यांचा सखोल अभ्यास गेल्या ५ वर्षांत टाटा ट्रस्टस्तर्फे ‘टीम आशा’ने सोमेश्वर साखर कारखाना परिसरात केला. त्या आधारेच अनेक जटील प्रश्नांची चर्चा या पुस्तकात केलेली आहे.

शिक्षण, कामगार, मानव अधिकार, शेती अशा क्षेत्रांतील कार्यकर्ते, अभ्यासक, विचारवंत आणि धोरणकर्ते यांच्यापर्यंत हा विषय पोचवून ऊसतोडणी मजुरांची जीवनकोंडी सुटावी यासाठीच हा एक विधायक प्रयत्न….


250.00 Add to cart
1 5 6 7 39