Featured

डायबेसिटी थोपवण्यासाठी


डायबेसिटी + स्थूलता = डायबेसिटी


डॉ. प्रदीप तळवलकर


‘डायबेसिटी’ हा शब्द आपण ऐकला आहे का? बहुतेक नसावा….

सर्वसामान्यांच्या आज दोन प्रमुख आरोग्य समस्या म्हणजे डायबेटिस (मधुमेह) आणि ओबेसिटी (स्थूलत्व)…

या दोन्ही समस्या अनेक वेळा एकमेकांशी निगडित असतात, मग या दोन समस्यांच्या नावातून जगभर नवी संज्ञा निर्माण झाली…’डायबेसिटी’! आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मुंबईस्थित मधुमेहतज्ज्ञ डॉ. प्रदीप तळवलकर यांनी नेमक्या याच आरोग्य समस्यांना केंद्रबिंदू मानून या पुस्तकाची रचना केली आहे. त्यातूनच पुस्तकाचं नामकरण झालं… डायबेसिटी थोपवण्यासाठी.

पुस्तकाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे स्थूलता व मधुमेह टाळण्यासाठी किंवा त्यापासून मुक्तता मिळवण्यासाठी केलेलं मार्गदर्शन. त्याचप्रमाणे पुस्तकात मधुमेहाची सर्वसाधारण माहिती ते ‘लेटेस्ट’ उपलब्ध माहिती दिली असून त्याबरोबर आहार नियोजन, व्यायाम, औषधोपचार आणि इतर सर्व मार्गदर्शनही केलं आहेच.

एक अत्याधुनिक व परिपूर्ण मार्गदर्शक पुस्तक डायबेसिटी थोपवण्यासाठी.


 

340.00 Add to cart
SaleFeatured

कूस


ज्ञानेश्वर प्रकाश जाधवर


ऊस तोडणीसाठी स्थलांतरित होणाऱ्या मजुरांमध्ये निम्मे प्रमाण महिलांचे आहे. दोन जणांचा मिळूनच ‘कोयता’ होतो. ऊस तोडणीच्या काळात पाळीच्या दिवसातही महिला कष्टप्रद काम करतात. पाळीची कटकट नको म्हणून गर्भाशय काढून टाकण्याचा दुःसह मार्ग असंख्य महिलांनी असाहायपणे स्वीकारला. या महिलांनी जे भोगले त्याचे यथार्थ चित्रण ‘कूस’ या कादंबरीत आले आहे. हा विषय कथात्म साहित्यात आणताना ज्ञानेश्वर जाधवर यांनी आपल्याकडील अनुभवांचे आंतरिकीकरण करून तपशीलांना सघन असा अर्थ प्राप्त करून दिला आहे. या कादंबरीत सुरेखा या व्यक्तिरेखेचा संघर्ष प्रभावीपणे आला आहे. एका अर्थाने अशा असंख्य सुरेखा जगण्याच्या चरकात पिळून निघतात आणि त्यांच्या आयुष्याचेच चिपाड होते. एका सुरेखाची ही प्रातिनिधिक कहाणी म्हणजे जणू राबणाऱ्या बाईच्या वाट्याला आलेल्या अंतहीन यातनांचे दर्शन आहे. जिथे कादंबरी संपते तिथून ती वाचकांच्या मनात सुरू होते…

-आसाराम लोमटे, सुप्रसिद्ध साहित्यिक

ज्ञानेश्वर जाधवर यांनी पिढ्या न् पिढ्या कष्ट करणाऱ्या ऊस तोडणी मजुरांच्या कुटुंबांचं दैनंदिन जीवन, त्यांना करावा लागणारा संघर्ष, स्थानिक राजकारणी, मुकादम मजुरांमधील संवाद, कोपीमध्ये झालेलं बाळंतपण, जगण्याची प्रत, निवडणुका, अलीकडच्या काळात गर्भाशय काढून टाकण्याच्या घटना…. असा एक व्यापक पट ‘कस’ या कादंबरीत त्यांनी शब्दबद्ध केला आहे. ऊस तोडणीच्या कामात खाडा झाला की आर्थिक नुकसान होतं आणि पतलेली उचल फिटत नाही त्यामुळे नवऱ्याची मारझोड सुरू होते आणि अंतिमतः त्याची परिणती गर्भाशय काढण्यापर्यंत जाते! शहरी पांढरपेशी माणसाला विचार करायला लावणारं हे सत्य कादंबरीतून वाचताना अंगावर अक्षरशः शहारे आणतं. २१व्या शतकात समाजाचा आर्थिक स्तर उंचावला जात असताना ऊस तोडणी मजुरांच्या हालअपेष्टांनी भरलेल्या आयुष्यावर प्रकाश टाकणारी ही कादंबरी आपण अजूनही किती मागे आहोत तेच दर्शवते.

-शेखर गायकवाड, साखर आयुक्त, महाराष्ट्र राज्य


 


Original price was: ₹360.00.Current price is: ₹270.00. Add to cart
SaleFeatured

स्टोरी टेलर


गजेंद्र अहिरे


स्टोरी’ टेलर’ हे पुस्तक म्हणजे एका मनस्वी दिग्दर्शकाचा सर्जनशील प्रवास होय. दिग्दर्शक म्हणून वीस वर्षांच्या कारकिर्दीत गजेंद्र अहिरे यांनी दिग्दर्शित केलेल्या साठ चित्रपटांपैकी

१२ निवडक चित्रपटांच्या निर्मितीमागच्या कथा हे पुस्तक सांगतं.

कथालेखन, निर्मात्याचा शोध, कलाकार निवड, प्रत्यक्ष चित्रीकरण, संकलन, प्रसिद्धी अशा अनेक आघाड्यांवर चित्रपट दिग्दर्शकासमोर असलेली आव्हानं या पुस्तकातून आपल्याला समजतात.

प्रत्येक चित्रपटाच्या निर्मितीशी अनेक रंजक किस्से आणि बरे-वाईट अनुभव यांचं नातं जुळलेलं असतं… ते किस्से, ते अनुभव सांगता सांगता गजेंद्र दिग्दर्शक म्हणून या सगळ्या सिनेमांच्या ‘मेकिंग ‘कडे पुन्हा एकदा बघतात आणि स्वतःला तपासतात. त्याचप्रमाणे या क्षेत्रातील आघाडीचे कलाकारही पुस्तकात या स्टोरी’ टेलर ‘विषयी मनमोकळेपणे बोलतात.

एकंदर सांगायचं तर, सिनेरसिक आणि अभ्यासक यांच्या हाती या पुस्तकाच्या निमित्ताने मोठा ऐवज पडणार आहे. तो ऐवज चित्रपटरसिकांना रंजक तर वाटेलच; पण त्याचबरोबर चित्रपटनिर्मिती क्षेत्रात येऊ इच्छिणारे आणि चित्रपटनिर्मितीच्या वेगवेगळ्या विभागांत प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी, तसेच या क्षेत्रातले नवोदित अशा सगळ्यांसाठी स्टोरी’ टेलर’ जणू संग्राह्य असं ‘गाइड’ही ठरणार आहे.



 

Original price was: ₹595.00.Current price is: ₹540.00. Add to cart
Featured

काम तमाम @ वाघा बॉर्डर


सतीश तांबे


या कथा आपल्याला थेट भिडतात याचे कारणच मुळी त्या आपल्या परिचित परिसरातल्या आहेत. परंतु त्या परिचित वास्तवाला अनपेक्षित छेद देऊन आपल्याला काहीशा गूढ आणि काहीशा रहस्यमय अवास्तवाकडे घेऊन जातात. वाचताना धक्का बसतो, भीतीही वाटते आणि म्हणून उत्कंठाही वाढते. सतत कुठेतरी जाणवत राहते की या ‘अवास्तव वास्तवाला’ आणि त्यातील क्रौर्याला तसेच करुणेला आपल्या मनात खोल स्थान आहे… संशयाने आणि भीतीने, अनिश्चिततेने आणि अस्वस्थतेने आपले दैनंदिन जीवन कसे वेढलेले आहे हे या सर्व कथांमध्ये ठसठसत जाणवत राहते.

कुमार केतकर (प्रस्तावनेतून)

मराठी कथा-साहित्यात सतीश तांबे यांच्या कथेचं स्वतंत्र स्वयंभू घराणं आहे. त्याला महानगरी कथेच्या कोंदणात कोंबू नये. तिचं वळण बौद्धिक आहे. शैली ऐसपैस गजाली सांगणाऱ्या गोष्टींची आहे. तिचं अनुकरण सोपं नाही, कारण ती विशिष्ट विचार प्रक्रियेतून प्रसवलेली असते.

जयंत पवार


 


260.00 Add to cart
SaleFeatured

प्रणव सखदेव कथासंग्रह संच

२०२१ चा साहित्य अकादेमी युवा पुरस्कार प्राप्त लेखक प्रणव सखदेव लिखित ३ कथासंग्रहांचा संच


प्रणव सखदेव


प्रणव सखदेव लिखित ३ कथासंग्रह

१) दिमित्री रियाझ केळकरची गोष्ट

२) निळ्या दाताची दंतकथा

३) नाभीतून उगवलेल्या वृक्षाचे


रु. ७४०  ची पुस्तकं सवलतीत रु. ५९५ (टपाल खर्चासह) घरपोच मिळवा!


 

 

Original price was: ₹740.00.Current price is: ₹595.00. Add to cart
SaleFeatured

प्रणव सखदेव कादंबरी संच

२०२१ चा साहित्य अकादेमी युवा पुरस्कार प्राप्त लेखक प्रणव सखदेव लिखित ३ कादंबऱ्यांचा संच


प्रणव सखदेव


प्रणव सखदेव ३ कादंबऱ्या
१) चतुर
२) ९६ मेट्रोमॉल
३)काळेकारडे स्ट्रोक्स


रु. ६६०  ची पुस्तकं सवलतीत रु. ५२० (टपाल खर्चासह) घरपोच मिळवा!


 

 

Original price was: ₹660.00.Current price is: ₹520.00. Add to cart

निळ्या रंगाचे राजवर्खी फुलपाखरू


शोभा भालेकर


एकूण आठ कथांचा हा वाचनीय असा कथासंग्रह. या कथा अतिशय तरल आणि जीवन जगायला शिकवणाऱ्या आहेत. आपल्या रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, पात्र या कथांमध्ये भेटत राहतात. गुंगवून टाकणाऱ्या शैलीतून लेखिका शोभा भालेकर घराघरातल्या अनेक बोलक्या कहाण्या सांगतात. काही पात्रांमध्ये आपण आपल्यालाच शोधत राहतो तर काही प्रसंग जे आपल्याही आयुष्यात घडून गेलेले असतात त्यांचाही आपल्याला पुनःप्रत्यय येत राहतो, तसे प्रसंग नव्याने समोर आल्यामुळे आपण काहीसे चकितही होतो. आपण थोड्या सकारात्मकतेने, संवेदनशीलतेने जर आयुष्य बघू लागलो तर किती सुंदर, लोभसपणे जगता येऊ शकेल याची प्रचीती नकळतपणे कथांमधून येत जाते. प्रत्येक वाचकाला गुंतवून ठेवणारा विविधरंगी कथांचा संग्रह….

निळ्या रंगाचे राजवर्खी फुलपाखरू !

250.00 Add to cart

The startup business Guide


Don’t Be a Job Seeker, Be a Job Creator


Suresh Hawre


Have you ever thought of starting a new age business and taking it to greater heights?

Well, if you are the one, you have picked up the right book!

The Startup Business Guide is a book which wil answer all your queries, give you information about all that is needed to ideate, implement and grow a startup business.

The SALIENT FEATURES of the book:

✓ Building and Validating a Business Idea

✓ Developing a Business Plan Building the Right Team

✓ Understanding the Technology Aspects

✓ Scalability of the Startup ✓ Five Factors of a Successful Startup

Author Dr. Suresh Haware with his vast experience, guides you through the startup scene in India and Maharashtra. He also explains various Central and State Government initiatives for promotion of the Startup Businesses.


The Startup Business Guide is your true guide in your journey,
from a job seeker to be a job creator!

300.00 Add to cart

समर्थ मालिका संच


३ पुस्तकांचा संच


नारायण धारप


नारायण धारप यांची ‘समर्थ’ ही एक काल्पनिक व्यक्तिरेखा…

अशोक समर्थ हे एक प्रकारचे ‘पॅरानॉर्मल’ डिटेक्टिव्ह…

सर्वसामान्यांना छळणाऱ्या दुष्ट व अघोरी शक्तींचा आपल्या अलौकिक बुद्धिचातुर्याने ते पाडाव करतात.

त्यांच्या डावपेचात ते भौमितिक आकृत्या, रिंगणं, धुपारे अशा सुरक्षासाधनांचाही वापर करतात…


 

1,500.00 Add to cart

समर्थांचा विजय

नारायण धारप


‘समर्थ’ ही व्यक्तिरेखा संपूर्ण काल्पनिक आहे; एका आदर्श मानवाचे ते मनोचित्र आहे. मला अशी एक दाट शंका येते, की बहुतेक प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यात कोठे ना कोठे तरी अशा एखाद्या माणसाचा सहवास घडलेला असतो, ज्याची आठवण वारंवार येते. जो आपला मित्र असावा, आपल्या निकट ) सहवासात असावा, तशी तीव्र इच्छा होते. अशा आदर्श व्यक्तींचा ‘समर्थ’ हा केंद्रबिंदू आहे. आदर्श मानवात जे जे अपेक्षित आहे, ते ते त्यांच्यात आहे. आदर्श हे नेहमीच असाध्य असते व कालातीत असते. यासाठीच ‘समर्थां’ना जन्म-शिक्षण-प्रौढत्व अशा साखळीत गुंतवलेले नाही. मानवातले हे अद्वितीयत्व आयुष्यात केव्हातरी नजरेसमोर चमकून जाते. समर्थ कथांच्या वाचनाने त्या आठवणी नकळत हिंदकळल्या जात असतील. समर्थांबद्दल वाटणाऱ्या आपुलकीचे रहस्य यातच असेल.” – नारायण धारप

समर्थ मालिका

समर्थ कथा नव्या स्वरुपात !


 

600.00 Add to cart

समर्थांना आव्हान


नारायण धारप


‘समर्थ’ ही व्यक्तिरेखा संपूर्ण काल्पनिक आहे; एका आदर्श मानवाचे ते मनोचित्र आहे. मला अशी एक दाट शंका येते, की बहुतेक प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यात कोठे ना कोठे तरी अशा एखाद्या माणसाचा सहवास घडलेला असतो, ज्याची आठवण वारंवार येते. जो आपला मित्र असावा, आपल्या निकट ) सहवासात असावा, तशी तीव्र इच्छा होते. अशा आदर्श व्यक्तींचा ‘समर्थ’ हा केंद्रबिंदू आहे. आदर्श मानवात जे जे अपेक्षित आहे, ते ते त्यांच्यात आहे. आदर्श हे नेहमीच असाध्य असते व कालातीत असते. यासाठीच ‘समर्थां’ना जन्म-शिक्षण-प्रौढत्व अशा साखळीत गुंतवलेले नाही. मानवातले हे अद्वितीयत्व आयुष्यात केव्हातरी नजरेसमोर चमकून जाते. समर्थ कथांच्या वाचनाने त्या आठवणी नकळत हिंदकळल्या जात असतील. समर्थांबद्दल वाटणाऱ्या आपुलकीचे रहस्य यातच असेल.” – नारायण धारप

समर्थ मालिका

समर्थ कथा नव्या स्वरुपात !


 

500.00 Add to cart

समर्थांची ओळख


नारायण धारप


‘समर्थ’ ही व्यक्तिरेखा संपूर्ण काल्पनिक आहे; एका आदर्श मानवाचे ते मनोचित्र आहे. मला अशी एक दाट शंका येते, की बहुतेक प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यात कोठे ना कोठे तरी अशा एखाद्या माणसाचा सहवास घडलेला असतो, ज्याची आठवण वारंवार येते. जो आपला मित्र असावा, आपल्या निकट ) सहवासात असावा, तशी तीव्र इच्छा होते. अशा आदर्श व्यक्तींचा ‘समर्थ’ हा केंद्रबिंदू आहे. आदर्श मानवात जे जे अपेक्षित आहे, ते ते त्यांच्यात आहे. आदर्श हे नेहमीच असाध्य असते व कालातीत असते. यासाठीच ‘समर्थां’ना जन्म-शिक्षण-प्रौढत्व अशा साखळीत गुंतवलेले नाही. मानवातले हे अद्वितीयत्व आयुष्यात केव्हातरी नजरेसमोर चमकून जाते. समर्थ कथांच्या वाचनाने त्या आठवणी नकळत हिंदकळल्या जात असतील. समर्थांबद्दल वाटणाऱ्या आपुलकीचे रहस्य यातच असेल.” – नारायण धारप

समर्थ मालिका

समर्थ कथा नव्या स्वरुपात !


 

400.00 Add to cart

आजोळचे दिवस मालिका


आजोळचे दिवस…एक समृद्ध सांस्कृतिक वारसा


अरुण शेवते


आजोळ कुणाला प्रिय नसतं ?
आजोळ म्हणजे
प्रेम, माया आणि स्मृतींचं भंडार !

विविध क्षेत्रातील

३८

मान्यवर सांगत आहेत आपल्या

आजोळचा सांस्कृतिक वारसा

१. आठवणी आजीच्या २. आठवणी आजोबांच्या

३. आठवणी मामांच्या ४. हे बंध आठवणींचे

४ पुस्तकांची मालिका आजोळचे दिवस


 

695.00 Add to cart

आठवणी मामांच्या


संपादन: अरुण शेवते


काही नाती ही जन्मत:च मुरलेल्या स्वरूपात जुळली जातात. अगदी मुरांब्यासारखी! ही नाती ऊब, प्रेम किंवा मायेचा ओलावा अंगा-खांद्यावर घेऊनच आलेली असतात. विश्वासाचा भक्कम पाया असतो या नात्यांना!

म्हणूनच कधी राग आणि गैरसमजुतीचं एखादं वादळ आलं आणि नात्यांचे धागे थोडे हेलकावले, तरी ते उसवत नाहीत किंवा तुटत नाहीत. कधी गोंजारून तर कधी फटकारुन ही नाती आयुष्य घडवणारे धडेही देत असतात. या नात्यांतून भरारी घ्यायला ऊर्जा मिळत असते आणि नंतर भरभरून कौतुकही मिळत असतं.

आजोळची नाती ही अशी असतात, मग ती आईकडची असोत किंवा वडलांकडची! ‘आजोळचे दिवस’ या मालिकेत विविध क्षेत्रांतल्या मान्यवरांनी याच नात्यांचे विविध पदर उलगडले आहेत.

मालिकेतील हे पुस्तक आहे मामासोबतच्या मैत्रीचं… नात्याचं ! मामा-भाचरांच्या नात्यांत एक वडिलकी आणि मैत्र याचं मिश्रण असतं. म्हणूनच हे नातं नेहमी तरूण राहतं. मामांच्या बहुपेडी आठवणी सांगत आहेत… बाळासाहेब थोरात, अमृता सुभाष, प्रदीप चंपानेरकर, किशोर मेढे, राजेंद्र मलोसे, प्राची रेगे, सुचिता घोरपडे आणि अश्विनी देसाई !

140.00 Add to cart

आठवणी आजीच्या


संपादन: अरुण शेवते


काही नाती ही जन्मत:च मुरलेल्या स्वरूपात जुळली जातात. अगदी मुरांब्यासारखी! ही नाती ऊब, प्रेम किंवा मायेचा ओलावा अंगा-खांद्यावर घेऊनच आलेली असतात. विश्वासाचा भक्कम पाया असतो या नात्यांना!

म्हणूनच कधी राग आणि गैरसमजुतीचं एखादं वादळ आलं आणि नात्यांचे धागे थोडे हेलकावले, तरी ते उसवत नाहीत किंवा तुटत नाहीत. कधी गोंजारून तर कधी फटकारुन ही नाती आयुष्य घडवणारे धडेही देत असतात. या नात्यांतून भरारी घ्यायला ऊर्जा मिळत असते आणि नंतर भरभरून कौतुकही मिळत असतं.

आजोळची नाती ही अशी असतात, मग ती आईकडची असोत किंवा वडलांकडची! ‘आजोळचे दिवस’ या मालिकेत विविध क्षेत्रांतल्या मान्यवरांनी याच नात्यांचे विविध पदर उलगडले आहेत.

मालिकेतील हे पुस्तक आहे, आजीच्या आठवणींचं । आजीच्या तलम प्रेमाची सर कशालाच येत नाही. मऊ दुलईची ऊब देणाऱ्या पण प्रसंगी कणखरही होणाऱ्या आजीच्या बटव्यात बराच काही खजिना असतो. त्याच विषयीचे अनुभव सांगत आहेत…. मोनिका गजेंद्रगडकर, शुभदा चौकर, राधिका आपटे, शाहू पाटोळे, नितीन आरेकर, अनिल साबळे व राजीव खांडेकर।

140.00 Add to cart

आठवणी आजोबांच्या


संपादन: अरुण शेवते


काही नाती ही जन्मत:च मुरलेल्या स्वरूपात जुळली जातात. अगदी मुरांब्यासारखी! ही नाती ऊब, प्रेम किंवा मायेचा ओलावा अंगा-खांद्यावर घेऊनच आलेली असतात. विश्वासाचा भक्कम पाया असतो या नात्यांना!

म्हणूनच कधी राग आणि गैरसमजुतीचं एखादं वादळ आलं आणि नात्यांचे धागे थोडे हेलकावले, तरी ते उसवत नाहीत किंवा तुटत नाहीत. कधी गोंजारून तर कधी फटकारुन ही नाती आयुष्य घडवणारे धडेही देत असतात. या नात्यांतून भरारी घ्यायला ऊर्जा मिळत असते आणि नंतर भरभरून कौतुकही मिळत असतं.

आजोळची नाती ही अशी असतात, मग ती आईकडची असोत किंवा वडलांकडची! ‘आजोळचे दिवस’ या मालिकेत विविध क्षेत्रांतल्या मान्यवरांनी याच नात्यांचे विविध पदर उलगडले आहेत.

मालिकेतील हे पुस्तक आहे, आजोबांच्या आठवणीचं । आजोबा म्हणजे घरातल्या प्रत्येकाचं विसंबून राहण्याचं हक्काचं ठिकाण! आजोबांचे अनुभवाचे चार बोल, त्यांची पाठीवर पडलेली थाप आत्मविश्वास देत असते. आजोबांच्या आठवणींचे पदर उलगडत आहेत… विश्वास पाटील, विजयराज बोधनकर, अन्वर हुसेन, सुनील मेहता, उदय निरगुडकर, लक्ष्मण खेडकर ।

 

120.00 Add to cart
1 4 5 6 39