395 | 978-93-86493-65-1 | Nehru Va Bose : samantar Jeevanpravas | नेहरू व बोस : समांतर जीवनप्रवास | Rudrangshu Mukherjee | रुद्रांग्शू मुखर्जी | Avdhoot Dongare | अवधूत डोंगरे | `जवाहरलाल नेहरूंएवढी हानी मला कोणीच पोचवलेली नाही’, असं सुभाषचंद्र बोस यांनी १९३९मध्ये लिहिलं होतं. नेहरूंकडे बोस यांनी शत्रू म्हणून पाहावं एवढे या दोन राष्ट्रवादी नेत्यांमधले संबंध बिघडले होते का? पण मग सुभाषचंद्रांनी आझाद हिंद सेनेतील एका पलटणीचं नाव जवाहरलाल यांच्यावरून का ठेवलं? आणि १९४५मध्ये सुभाषचंद्रांच्या अकाली निधनाची वार्ता ऐकल्यावर जवाहरलाल यांना अश्रू का अनावर झाले? शिवाय, `मी त्यांना लहान भाऊ मानायचो’, असे उदगार नेहरूंनी का काढले? स्वातंत्र्य चळवळीच्या पार्श्वभूमीवर या दोन उत्तुंग व्यक्तिमत्त्वांच्या जडणघडणीचा शोध रुद्रांग्शू मुखर्जी यांनी या पुस्तकात सखोलतेने घेतला आहे. भिन्न राजकीय विचारधारांमुळे नेहरू व बोस यांच्यात न उमलू शकलेल्या मैत्रीचा अदमास हे पुस्तक बांधतं आणि त्याचसोबत या दोन व्यक्तिमत्त्वांमधीलभेदही अधोरेखित करतं. गांधी नेहरूंकडे आपला राजकीय वारस म्हणून बघत होते, तर सुभाषचंद्रांना मार्गभ्रष्ट पुत्र मानत होते. आधुनिक भारताच्या घडणीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान असलेल्या दोन परस्परविरोधी व्यक्तिमत्त्वांची लक्षवेधक कहाणी… नेहरू व बोस समांतर जीवनप्रवास ! |
Hard Bound | Books | Rohan Prakashan | Marathi | 262 | 21.5 | 14 | 1.5 | 320 | Political | राजकीय | Biographical | चरित्र-आत्मचरित्र | 350 | Nehru_BoseCover | Nehru_BosecoverBC.jpg |
सरदार वल्लभभाई पटेल
भारताचा पोलादी पुरूष
[taxonomy_list name=”product_author” include=”428″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”430″]
“सततची भीती तुम्हाला सौम्य बनवते.
सौम्यपणा हा गुण आहे; पण त्याच्या अतिरेकाने
तुम्ही एवढे नेभळट बनता की, अन्यायाशी
लढण्याची उर्मीच तुमच्याजवळ उरत नाही.
व्यापक अर्थाने यालाच भित्रेपणा म्हणतात.”
-वल्लभभाई पटेल
सरदार पटेल म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील आणि स्वतंत्र भारताच्या उभारणीतील एक कणखर व्यक्तिमत्त्व! देशातील ५६५ संस्थानं विलीन करून घेऊन सामर्थ्यशाली एकसंध भारत उभा करणं हे पटेलांचं महत्त्वाचं योगदान म्हणता येईल.
सुप्रसिद्ध व जेष्ठ पत्रकार बलराज कृष्णा यांनी या पोलादी पुरुषाचा संपूर्ण जीवनपटच अत्यंत ताकदीने या पुस्तकाद्वारे उभा केला आहे. पटेलांचं बालपण, त्यांचा राजकारणातला प्रवेश, गांधीजींबद्दलची त्यांची आस्था, नेहरूंसोबतचं त्यांचं मित्रत्वाचं नातं तसंच त्यांच्यासोबतचे मतभेद, संस्थानिकांबरोबरच्या वाटाघाटी व संस्थानांचं यशस्वी विलीनीकरण, पटेलांचे राजकीय विचार व त्यांनी वेळोवेळी घेतलेले ठाम व कठोर निर्णय, त्याचप्रमाणे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातले विविध पैलू असा या पुस्तकाचा मोठा आवाका आहे.
एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या पटेलांचं संपूर्ण व्यक्तिमत्त्व व कार्य-कर्तृत्व उलगडून दाखवणारं हे चरित्र वाचकांना निश्चितच रोमहर्षक व प्रेरणादायी वाटेल.