बाणी बसू याचा जन्म ११ मार्च १९३९ रोजी झाला. प्रसिद्ध लेखिका, कवयित्री, अनुवादिका, समीक्षक, बालसाहित्यिक आणि प्राध्यापिका म्हणून त्या बंगालमध्ये ओळखल्या जातात. ‘आनंदमेला' आणि 'देश' या नियतकालिकांमधून त्यांनी आपल्या लेखनाची सुरुवात केली. त्यांच्या अनेक कथा व कादंबऱ्यांवर चित्रपट व टीव्ही सिरिअल्स बनवल्या गेल्या आहेत. त्यांना ‘ताराशंकर अवॉर्ड’, ‘आनंद पुरस्कार', 'सुशीलादेवी बिर्ला पुरस्कार', ‘साहित्य सेतू' आणि ‘साहित्य अकादमी' असे अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
सुमती जोशी यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९४९चा. त्यांचं वास्तव्य मुंबई येथे आहे. दादरच्या आय.इ.एस. मुलींच्या शाळेतून त्या प्रथम क्रमांकाने एस.एस्सी. उत्तीर्ण झाल्या. त्यांनी मायक्रोबायॉलॉजी या विषयात मुंबई विद्यापीठातून बी. एससी. केलं आहे. एन.टी.एस. च्या विद्यार्थ्यांना जीवशास्त्र या विषयाचं गेली एकवीस वर्षं अध्यापन करत आहेत. वयाच्या अठ्ठावनाव्या वर्षी त्यांनी बंगाली भाषा शिकायला सुरुवात केली. दर वर्षी एक याप्रमाणे आद्य, मध्य आणि अंत्य या तीन परीक्षा विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झाल्या. शेवटच्या परीक्षेत म्हणजे वयाच्या साठीत त्या प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. २०१० सालापासून त्यांनी बंगाली साहित्याचा अनुवाद करण्यास सुरुवात केली. आधुनिक बंगाली साहित्यातले गेल्या अर्धशतकातले उत्तम लेखक आणि त्यांच्या कलाकृतींचा आनंद मराठी वाचकांना घेता यावा हा त्यांचा अनुवाद करण्यामागील उद्देश आहे. आजपर्यंत त्यांनी अनुवादित केलेले अनेक कथा संग्रह, कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत. 'उत्क्रांती' या पुस्तकासाठी त्यांना विज्ञान विभागातला राज्य पुरस्कारही (२०१०) प्राप्त झाला आहे.
बाणी बसू या बंगालमधील एक प्रतिथयश लेखिका, कवयित्री, समीक्षक आणि अनुवादिका आहेत. त्या अनेक वर्षं इंग्रजीच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. बसू यांच्या आजवर अनेक कादंबऱ्या, कथासंग्रह आणि लहान मुलांसाठीचं लेखन प्रसिद्ध झालं आहे. ‘खनामिहिरेर ढिपी’ या त्यांच्या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला आहे. प्रत्येक लेखकाची स्वतःची अशी वेगळी शैली असते. बसू यांच्या साहित्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं लेखन कधीही एकसूरी वाटत नाही. त्यांच्या लेखनात भाषेची आणि कल्पनेची पुनरुक्ती दिसत नाही. त्या जेव्हा लेखन करतात तेव्हा त्यांच्या मनात वाचकांच्या इच्छापूर्तीचा विचार नसतो. वाचकांना आवडेल, असं लेखन करणं त्यांना अमान्य नाही; पण निव्वळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्या मार्गाचा अवलंब त्या करत नाहीत. ‘गल्पेर बागान’ आणि ‘गोल्पे विभोर’ या दोन्ही कथासंग्रहात याचा प्रत्यय येतो. कथांमधील परावर्तित झालेली त्यांची विचारांची सखोलता, सूक्ष्मता आणि तरलता यामुळे वाचकाला लेखिकेच्या प्रतिभासंपन्नतेचं आणि संवेदनक्षम मनाचं दर्शन घडतं. वाचकांना गुंतवून ठेवणारे आणि बंगाली, संस्कृतीची मोहवती झलक देणारे दोन कथासंग्रह… गल्पेर बागान व गोल्पे विभोर
बाणी बसू या बंगालमधील एक प्रतिथयश लेखिका, कवयित्री, समीक्षक आणि अनुवादिका आहेत. त्या अनेक वर्षं इंग्रजीच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. बसू यांच्या आजवर अनेक कादंबऱ्या, कथासंग्रह आणि लहान मुलांसाठीचं लेखन प्रसिद्ध झालं आहे. ‘खनामिहिरेर ढिपी’ या त्यांच्या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला आहे. प्रत्येक लेखकाची स्वतःची अशी वेगळी शैली असते. बसू यांच्या साहित्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं लेखन कधीही एकसूरी वाटत नाही. त्यांच्या लेखनात भाषेची आणि कल्पनेची पुनरुक्ती दिसत नाही. त्या जेव्हा लेखन करतात तेव्हा त्यांच्या मनात वाचकांच्या इच्छापूर्तीचा विचार नसतो. वाचकांना आवडेल, असं लेखन करणं त्यांना अमान्य नाही; पण निव्वळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्या मार्गाचा अवलंब त्या करत नाहीत. ‘गल्पेर बागान’ आणि ‘गोल्पे विभोर’ या दोन्ही कथासंग्रहात याचा प्रत्यय येतो. कथांमधील परावर्तित झालेली त्यांची विचारांची सखोलता, सूक्ष्मता आणि तरलता यामुळे वाचकाला लेखिकेच्या प्रतिभासंपन्नतेचं आणि संवेदनक्षम मनाचं दर्शन घडतं. वाचकांना गुंतवून ठेवणारे आणि बंगाली, संस्कृतीची मोहवती झलक देणारे दोन कथासंग्रह… गल्पेर बागान व गोल्पे विभोर
Papar back
book
Rohan Prakashan
Marathi
182
अंतरभारती
litreture
कथासंग्रह
275
Weight
300 g
Dimensions
21.7 × 14.1 × 1.2 cm
Reviews
There are no reviews yet.
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
सत्यजित रे या विश्वकीर्तीवंत दिग्दर्शकाने पथेर पांचाली, चारुलता, अरण्येर दिनरात्री, शोनार केल्ला आणि जलसाघर हे गाजलेले चित्रपट बनविले. सत्यजित रे यांचा १९२१—१९९२ हा कालखंड होता.
१९९२ साली अॅकेडेमी ऑफ मोशन पिक्चर आर्टस अॅन्ड सायन्सने त्यांना जीवनगौरव म्हणून ‘ऑस्कर’ पुरस्कार दिला. त्याच वर्षी भारत सरकारनं ‘भारतरत्न’ देऊन त्यांचा सन्मान केला.
सत्यजित रे हे एक नामवंत लेखकही होते. त्यांनी बंगालीत लिहिलेल्या लघु कथा, लघु कादंबऱ्या, कविता आणि लेख मुलांच्या ‘संदेश’ या मासिकात १९६१ साली प्रसिद्ध होऊ लागले आणि तेव्हापासून ते प्रचंड लोकप्रिय झाले. त्यांनी निर्माण केलेल्या व्यक्तिरेखांपैकी ‘गुप्तहेर फेलूदा’ व ‘शास्त्रज्ञ प्रोफेसर शंकू’ या साहित्यात अजरामर झाल्या आहेत व बंगाली जीवनाचा एक अविभाज्य भाग होऊन बसल्या आहेत.
'रोहन'चे एक ‘कलंदर’ लेखक. पत्रकारिता, अनुवाद, सदर लेखन ते ललित लेखनामध्ये अनेक वर्षं मुशाफिरी केलेला ‘ज्येष्ठ लेखक’ म्हणून परिचित होते. त्यांना व्यासंगी पत्रकारितेचा चार दशकाहून अधिक अनुभव होता. तसंच त्यांना पालिका बैठकीपासून आंतरराष्ट्रीय शिखर परिषदांचे वृत्तांत देण्यापर्यंतचा समृद्ध अनुभव होता. दैनिक सकाळ, तरुण भारत व केसरी या वृत्तपत्रांतून काम केल्यानंतर ते महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्रात दाखल झाले. महाराष्ट्र टाइम्सचे दिल्ली प्रतिनिधी म्हणून त्यांनी ११ वर्षं काम केलं. तेथून त्यांनी लिहलेली 'राजधानीतून' ही वार्तापत्रं विशेष गाजली. त्यानंतर अनेक वर्षं त्यांनी ‘मटा’चे कार्यकारी संपादक म्हणून काम केलं. 'कलंदर' या टोपण नावाने 'कानोकानी' हे त्याचं सदरही विशेष लोकप्रिय झालं. अनुवाद क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केली असून त्यामध्ये इंदिरा गांधी (पुपुल जयकर), शेषन (के. गोविंदन कुट्टी), इंदिरा अंतिम पर्व (पी. सी. अलेक्झांडर), लता मंगेशकर (हरीश भिमानी), फॅन्टॅस्टिक फेलूदा (सत्यजित रे पुस्तकांची मालिका), लाल बहादूर शास्त्री (पी. एन. धर), कस्तुरबा : एक शलाका (अरुण गांधी), आर. डॉक्युमेंट (आयर्विंग वॉलेस) यांचा समावेश होतो. हे सर्व अनुवाद त्यांना उत्कृष्ट तर होतेच, परंतु ते लोकप्रियही झाले.
सर्वोत्कृष्ट अनुवादासाठी साहित्य अकादमी, राज्य सरकार व अनुवाद सुविधा केंद्र यांचे पुरस्कार त्यांना लाभले. 'कानोकानी' या पुस्तकाला मसापचा चि. वि. जोशी पुरस्कार लाभला.
फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथां’ना सर्व वयोगटातील वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने ‘रोहन प्रकाशन’ घेऊन आलं आहे – फेलूदाच्या एकूण ३५ कथांपैकी शेवटच्या ११ थरारक कथांचे ४ नवीन संग्रह; त्यातल्या या २ कथा…
१. ‘भारत ऑपेरा’ या नाटक कंपनीत काम करणारे इंद्रनारायण आचार्य एके दिवशी फेलूदाकडे मदत मागायला येतात. इतर कंपन्यांचे मालक आपल्या कंपनीत येण्यासाठी आचार्यांना मोठमोठ्या ऑफर्स देत असतात. त्यामुळे त्यांची मन:स्थिती द्विधा झालेली असते. कारण भारत ऑपेराने त्यांना मानसन्मान दिलेला असतो, त्यांची काळजी घेतलेली असते. हा दोन गटांचा संघर्ष कोणत्याही थराला जाईल, अशी भीती आचार्य यांना वाटत असते; होतंही तसंच! आणि मग आचार्यांच्या खुनाचं प्रकरण अधिकच गूढ-गहिरं होत जातं…
२. ख्यातनाम चित्रपटकर्ता पुलक घोषाल यांनी लालमोहनबाबूंच्या एका कादंबरीवर चित्रपट तयार करायचं ठरवलेलं असतं. त्यात लालमोहनबाबूंना लहानशी भूमिकाही दिलेली असते. शूटिंग दार्जिलिंगला असल्याने लालमोहनबाबू फेलूदा आणि तपेशलाही सुट्टी घालवण्यासाठी तिथे घेऊन जातात. फेलूदाही एकही काम न स्वीकारता, सुट्टीची मजा लुटायची असं ठरवतो. पण ज्या घरात त्यांचं शूटिंग होणार असतं, त्या घराच्या मालकाचा खून होतो आणि मग फेलूदाला दार्जिलिंगमधील खुनाचं रहस्य सोडवावंच लागतं!
सत्यजित रे या विश्वकीर्तीवंत दिग्दर्शकाने पथेर पांचाली, चारुलता, अरण्येर दिनरात्री, शोनार केल्ला आणि जलसाघर हे गाजलेले चित्रपट बनविले. सत्यजित रे यांचा १९२१—१९९२ हा कालखंड होता.
१९९२ साली अॅकेडेमी ऑफ मोशन पिक्चर आर्टस अॅन्ड सायन्सने त्यांना जीवनगौरव म्हणून ‘ऑस्कर’ पुरस्कार दिला. त्याच वर्षी भारत सरकारनं ‘भारतरत्न’ देऊन त्यांचा सन्मान केला.
सत्यजित रे हे एक नामवंत लेखकही होते. त्यांनी बंगालीत लिहिलेल्या लघु कथा, लघु कादंबऱ्या, कविता आणि लेख मुलांच्या ‘संदेश’ या मासिकात १९६१ साली प्रसिद्ध होऊ लागले आणि तेव्हापासून ते प्रचंड लोकप्रिय झाले. त्यांनी निर्माण केलेल्या व्यक्तिरेखांपैकी ‘गुप्तहेर फेलूदा’ व ‘शास्त्रज्ञ प्रोफेसर शंकू’ या साहित्यात अजरामर झाल्या आहेत व बंगाली जीवनाचा एक अविभाज्य भाग होऊन बसल्या आहेत.
'रोहन'चे एक ‘कलंदर’ लेखक. पत्रकारिता, अनुवाद, सदर लेखन ते ललित लेखनामध्ये अनेक वर्षं मुशाफिरी केलेला ‘ज्येष्ठ लेखक’ म्हणून परिचित होते. त्यांना व्यासंगी पत्रकारितेचा चार दशकाहून अधिक अनुभव होता. तसंच त्यांना पालिका बैठकीपासून आंतरराष्ट्रीय शिखर परिषदांचे वृत्तांत देण्यापर्यंतचा समृद्ध अनुभव होता. दैनिक सकाळ, तरुण भारत व केसरी या वृत्तपत्रांतून काम केल्यानंतर ते महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्रात दाखल झाले. महाराष्ट्र टाइम्सचे दिल्ली प्रतिनिधी म्हणून त्यांनी ११ वर्षं काम केलं. तेथून त्यांनी लिहलेली 'राजधानीतून' ही वार्तापत्रं विशेष गाजली. त्यानंतर अनेक वर्षं त्यांनी ‘मटा’चे कार्यकारी संपादक म्हणून काम केलं. 'कलंदर' या टोपण नावाने 'कानोकानी' हे त्याचं सदरही विशेष लोकप्रिय झालं. अनुवाद क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केली असून त्यामध्ये इंदिरा गांधी (पुपुल जयकर), शेषन (के. गोविंदन कुट्टी), इंदिरा अंतिम पर्व (पी. सी. अलेक्झांडर), लता मंगेशकर (हरीश भिमानी), फॅन्टॅस्टिक फेलूदा (सत्यजित रे पुस्तकांची मालिका), लाल बहादूर शास्त्री (पी. एन. धर), कस्तुरबा : एक शलाका (अरुण गांधी), आर. डॉक्युमेंट (आयर्विंग वॉलेस) यांचा समावेश होतो. हे सर्व अनुवाद त्यांना उत्कृष्ट तर होतेच, परंतु ते लोकप्रियही झाले.
सर्वोत्कृष्ट अनुवादासाठी साहित्य अकादमी, राज्य सरकार व अनुवाद सुविधा केंद्र यांचे पुरस्कार त्यांना लाभले. 'कानोकानी' या पुस्तकाला मसापचा चि. वि. जोशी पुरस्कार लाभला.
फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथां’ची मालिका सर्व वयोगटाच्या वाचकांमध्ये लोकप्रिय झाल्याने ‘रोहन प्रकाशन’ पुन्हा एकदा घेऊन आलं आहे – याच फॅन्टॅस्टिक फेलूदाच्या आणखी १२ थरारक कथांचे ४ संग्रह; त्यातल्या या ३ कथा…
१. फेलूदाला हिरो मानणार्या आपल्या पुतणीला, रुनाला एकदा अंबर सेन सांगतात की, एकदा तरी मी फेलूदाला हरवून दाखवेनच! म्हणून ते एक नाटक रचून घरातल्यांनाही त्यात सामील करून घेतात, आणि ‘गायब झालेले अंबर सेन’ शोधताना फेलूदाला उलगडतं या नाटकात दडलेलं अनपेक्षित रहस्य!
२.शंकरप्रसाद चौधरींकडे मौल्यवान अशा ‘जहांगीरच्या सुवर्णमुद्रा’ असल्याचं रहस्य चौधरींच्या जवळच्या तीन व्यक्तींनाच माहीत असतं. त्यातली एक मुद्रा चोरीला जाते. कोण असेल चोर? कसं पकडेल फेलूदा या सुवर्णमुद्रा चोरणार्याला?
३. केदारनाथच्या पर्वतातल्या एका संन्याशाकडे असते एकच ऐहिक गोष्ट – त्यांना सन्मानाने दिलेलं मौल्यवान रत्नजडित पेंडन्ट! पण त्यावर अनेकांचा डोळा असतो… फेलूदाला या प्रकरणातून बाजूला काढण्यासाठी त्याच्यावर जीवघेणे हल्ले होतात; पण ‘केदारनाथची किमया’ घडते अन् फेलूदा चातुर्याने या प्रकरणाचा छडा लावतो…!
आर.के. नारायण यांचा जन्म १० ऑक्टोबर १९०६ रोजी चेन्नई येथे झाला. त्यांचं बालपण चेन्नई येथे त्यांच्या आजोळी व्यतीत झालं. त्यांच्या वडिलांची ‘महाराजा हायस्कुल’, म्हैसूर येथे बदली झाल्यानंतर ते आपल्या कुटुंबासह म्हैसूर येथे वास्तव्यास आले.
त्यांनी लेखनाची सुरुवात त्यांच्या १९३५ सालच्या ‘स्वामी अँड फ्रेंड्स’ या पुस्तकाने केली. ‘मालगुडी’ या काल्पनिक गावातील सर्वसामान्य माणसांचं आयुष्य सहज, ओघवत्या शैलीतून आणि मार्मिक विनोदातून चितारणं ही त्यांची खासियत !
त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. ‘गाइड’ या त्यांच्या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार आणि रॉयल सोसायटी ऑफ लिटरेचरतर्फे दिलं जाणारं ए.सी. बेन्सन मेडल प्राप्त झालं. अनेक विख्यात विद्यापीठांकडून त्यांना डी.लिट्. ही पदवी बहाल करण्यात आली. १९६४ साली त्यांना पद्मभूषण तर २००० साली पद्मविभूषण सन्मान प्राप्त झाला. १९८९मध्ये त्यांना राज्यसभेचं सभासदत्व बहाल करण्यात आलं. या महान लेखकाचा १३ मे २००१ रोजी वयाच्या ९४व्या वर्षी मृत्यू झाला.
पुणे विद्यापिठाच्या 'संस्कृत प्रगत अध्ययन केंद्रा'त संस्कृत आणि 'ललित कला केंद्रा'त संस्कृत व आनुषंगिक विषयांचं सरोज देशपांडे यांनी अनेक वर्षं अध्यापन केलं. जिज्ञासू तसेच जाणकार अशा सरमिसळ वाचक-वर्गासाठी 'संस्कृत साहित्यशास्त्राची तोंडओळख' हे त्यांनी पुस्तकही लिहिलं आहे. अनुवाद करणं हा त्यांचा छंद असून त्यांनी आजवर अनेक महत्त्वाच्या पुस्तकांचे अनुवाद केले आहेत. ’अशी काळवेळ’ या मराठीत अनुवादित केलेल्या पुस्तकासाठी त्यांना २०१० साली साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.
‘मालगुडी डेज’ आणि ‘स्वामी’ यांसारख्या दूरदर्शन मालिकांमुळे आर.के. नारायण प्रसिद्धीझोतात आले. त्यांच्या ‘गाइड’ या कादंबरीवर आधारित असलेला ‘गाइड’ हा चित्रपट विशेष गाजला. आर.के. नारायण यांची खासियत म्हणजे अत्यंत सामान्य माणसाचं रोजच्या आयुष्याचं चित्रण सहज, ओघवत्या आणि मार्मिक विनोदातून रेखाटायची कला! त्यांच्या कथा एकाच वेळी मनाला स्पर्शूनही जातात आणि निखळ विनोदानी हास्याची कारंजीही उडवतात.
अशाच गाजलेल्या पुस्तकांपैकी काही निवडक पुस्तकांचा मराठी अनुवाद ‘रोहन प्रकाशन’तर्फे प्रसिद्ध करत आहोत.
व्यवसायाने शिक्षक असणार्या एका शिक्षकाची आणि त्याच्या पत्नीची ही खूप सुंदर व गूढगम्य प्रेमकथा आहे. हलक्याफुलक्या आणि विनोदी शैलीत कथेची सुरुवात होते आणि अचानक कथेमध्ये एक अनपेक्षित वळण येते. ‘मृत्यू’ या संकल्पनेचा काहीशा विनोदी पद्धतीने आणि त्याचवेळी प्रगल्भपणे विचार करायला लावणारे अनेक किस्से लेखकाने या पुस्तकात रेखाटले आहेत. पत्नी-पत्नीमधील प्रेमळ सहजीवन, या नात्यामधील नाजूक गुंतागुंत आणि मृत्यू-जीवन यामधील सीमारेषा गडद करणारा शेवट वाचकांच्या हृदयाचा ठाव घेईल…
मराठीतल्या आघाडीच्या तरुण लेखकांमध्ये प्रणव सखदेव यांचं नाव घेतलं जातं. त्यांनी अग्रगण्य मराठी दैनिकांत पत्रकार म्हणून काम केलं असून ते मराठी प्रकाशन क्षेत्रामध्ये संपादक व अनुवादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कथा आणि कविता मान्यवर नियतकालिकांमधून प्रकाशित होत असतात. ‘पायऱ्यांचा गेम आणि इतर कविता’ हा कवितासंग्रह, 'निळ्या दाताची दंतकथा’, ‘नाभितून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य' हे कथासंग्रह, व ‘काळेकरडे स्ट्रोक्स', ‘96 मेट्रोमॉल’ या कादंबऱ्या असं त्यांचं साहित्य प्रकाशित झालं आहे. त्यांना अनुवाद-प्रकल्पासाठी २०१५-१६ सालची ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ची अभ्यासवृत्तीही मिळाली आहे. त्यांना लेखनासाठी महत्त्वाची पारितोषिकं मिळाली असून इंग्रजीतल्या गाजलेल्या पुस्तकांचा अनुवाद त्यांनी केला आहे.
फिक्शन लेखन करणं ही त्यांची पॅशन असून त्यातून समकालातल्या प्रश्नांचा भिडणं हे त्यांना महत्त्वाचं वाटतं. आजच्या तरुणांची मानसिकता, त्यांचे प्रश्न, विखंडित जगणं व तंत्रज्ञानाचा वाढता वापर या सगळ्याचं प्रतिबिंब त्यांच्या लेखनात पडलेलं दिसून येतं.
खूप वर्षांनी भेटलेले मित्रं सोशल मीडियामुळे ‘कनेक्टेड’ असले, तरी प्रत्यक्षात मात्र बरेच बदललेले असतात. हा ताण त्यांच्या मैत्रीची ‘छत्री’ कशीबशी पेलत राहते…
आर्थिक मंदी, ‘आयटी’तले लेऑफ यांमुळे कोलमडू लागलेलं एका जोडप्याचं आयुष्य एक साधा ‘भाजीवाला’ सावरू पाहतो, अन् अचानक गायब होऊन जातो…
आचकट बोलणार्या ‘ट’च्या मनात कितीतरी वर्षं एक जखम ठसठसत असते, आणि ती जेव्हा उघडी पडते तेव्हा एक ‘टची गोष्ट’ समोर येते…
आधुनिक जगण्याच्या रेट्यात आर्यन-संजिताची मनं एकमेकांपासून एवढी दुरावत जातात, की संबंधांचं ‘अॅबॉर्शन’ होणार आहे हे त्यांना समजत नाही…
एका साध्याशा पोस्टमुळे सुरू झालेल्या चर्चेतून जेव्हा ‘अभ्र्यांमागे दडलेल्या फँड्री’चा भेसूर चेहरा समोर येतो तेव्हा सुन्न व्हायला होतं…
आपण कुठून आलो, या प्रश्नाचा शोध घेत जेव्हा एक गर्भ भूत-वर्तमान-भविष्य अशा तिन्ही काळात संचार करू लागतो, तेव्हा ‘नाभितून उगवलेल्या वृक्षाच्या रहस्या’चा गुंतागुंतीचा गोफ विणला जातो…
जगण्यातल्या ताणांचा, पेचांचा-गुंत्यांचा आणि प्रश्नांचा सखोल वेध घेणार्या, वास्तव-कल्पित व मिथककथा यांच्या बांधणीतून तयार झालेल्या ‘आजच्या काळाच्या’ आठ कथांचा संग्रह!
आर.के. नारायण यांचा जन्म १० ऑक्टोबर १९०६ रोजी चेन्नई येथे झाला. त्यांचं बालपण चेन्नई येथे त्यांच्या आजोळी व्यतीत झालं. त्यांच्या वडिलांची ‘महाराजा हायस्कुल’, म्हैसूर येथे बदली झाल्यानंतर ते आपल्या कुटुंबासह म्हैसूर येथे वास्तव्यास आले.
त्यांनी लेखनाची सुरुवात त्यांच्या १९३५ सालच्या ‘स्वामी अँड फ्रेंड्स’ या पुस्तकाने केली. ‘मालगुडी’ या काल्पनिक गावातील सर्वसामान्य माणसांचं आयुष्य सहज, ओघवत्या शैलीतून आणि मार्मिक विनोदातून चितारणं ही त्यांची खासियत !
त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. ‘गाइड’ या त्यांच्या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार आणि रॉयल सोसायटी ऑफ लिटरेचरतर्फे दिलं जाणारं ए.सी. बेन्सन मेडल प्राप्त झालं. अनेक विख्यात विद्यापीठांकडून त्यांना डी.लिट्. ही पदवी बहाल करण्यात आली. १९६४ साली त्यांना पद्मभूषण तर २००० साली पद्मविभूषण सन्मान प्राप्त झाला. १९८९मध्ये त्यांना राज्यसभेचं सभासदत्व बहाल करण्यात आलं. या महान लेखकाचा १३ मे २००१ रोजी वयाच्या ९४व्या वर्षी मृत्यू झाला.
पुणे विद्यापिठाच्या 'संस्कृत प्रगत अध्ययन केंद्रा'त संस्कृत आणि 'ललित कला केंद्रा'त संस्कृत व आनुषंगिक विषयांचं सरोज देशपांडे यांनी अनेक वर्षं अध्यापन केलं. जिज्ञासू तसेच जाणकार अशा सरमिसळ वाचक-वर्गासाठी 'संस्कृत साहित्यशास्त्राची तोंडओळख' हे त्यांनी पुस्तकही लिहिलं आहे. अनुवाद करणं हा त्यांचा छंद असून त्यांनी आजवर अनेक महत्त्वाच्या पुस्तकांचे अनुवाद केले आहेत. ’अशी काळवेळ’ या मराठीत अनुवादित केलेल्या पुस्तकासाठी त्यांना २०१० साली साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.
‘मालगुडी डेज’ आणि ‘स्वामी’ यांसारख्या दूरदर्शन मालिकांमुळे आर.के. नारायण प्रसिद्धीझोतात आले. त्यांच्या ‘द गाइड’ या कादंबरीवर आधारित असलेला ‘गाइड’ हा चित्रपट विशेष गाजला. आर.के. नारायण यांची खासियत म्हणजे अत्यंत सामान्य माणसाचं रोजच्या आयुष्याचं चित्रण सहज, ओघवत्या आणि मार्मिक विनोदातून रेखाटायची कला! त्यांच्या कथा एकाच वेळी मनाला स्पर्शूनही जातात आणि निखळ विनोदानी हास्याची कारंजीही उडवतात.
अशाच गाजलेल्या पुस्तकांपैकी काही निवडक पुस्तकांचा मराठी अनुवाद ‘रोहन प्रकाशन’तर्फे प्रसिद्ध करत आहोत.
Reviews
There are no reviews yet.