सृजन पाल सिंग

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबादमधून सृजन पाल सिंग यांनी शिक्षण घेतलं असून त्यांना 'चतुरस्र विद्यार्थी' म्हणून सुवर्णपदक मिळालं आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या भागांमध्ये पारदर्शक व्यवस्था उभारण्याच्या कामात ते 'बॉस्टन कन्सल्टिंग ग्रुप'सोबत काम करत आहेत. स्वित्झर्लंडमधील सेंट गॅलन सिम्पोसियम यांच्या 'ग्लोबल लीडर ऑफ टुमॉरो' या किताबासाठी त्यांचं नामांकन करण्यात आलं होतं . सृजन भारतातल्या ग्रामीण भागांत जाऊन तिथे कायमस्वरूपी विकासात्मक व्यवस्था तयार करता यावी, यासाठी विविध संस्थांसोबत काम करतात . महत्त्वाच्या नियतकालिकांमधून त्यांचे लेख प्रकाशित झाले असून ते सध्या गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या प्रकल्पात काम करत आहेत.

लेखकाची पुस्तकं

विज्ञानाच्या उज्ज्वल वाटा

भविष्यकालीन विज्ञानाचा वेध घेऊन विद्यार्थ्यांना केलेलं बहुमोल मार्गदर्शन


ए.पी.जे. अब्दुल कलाम
सहलेखक : सृजन पाल सिंग
अनुवाद : प्रणव सखदेव


भारताचे माजी राष्ट्रपती, ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि मुलांचे लाडके ‘शिक्षक’ ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि विख्यात तरुण लेखक सृजन पाल सिंग यांनी सखोल संशोधनातून हे पुस्तक साकारलं आहे. यात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या अतुलनीय कामगिरीने आपण काय साध्य केलं आहे व त्याचे आपल्या भविष्यावर काय परिणाम होणार आहेत, याची रंजक माहिती देण्यात आली आहे. या पुस्तकातून त्यांनी भविष्यकालीन विज्ञानाचा, त्यातील क्षेत्रांचा वेध घेऊन त्याविषयीचं व्यापक चित्र आजच्या विद्यार्थ्यांपुढे उभं केलं आहे. तसंच भविष्यात विज्ञानात मोठ्या प्रमाणावर विकसित होणार्‍या रोबोटिक्स, एरोनॉटिक्स (विमानविद्या), स्पेस सायन्स (अंतराळ विज्ञान), न्यूरोसायन्स (मेंदू विज्ञान) यांसारख्या ‘आउट ऑफ द बॉक्स’ करिअर्सचा सहजसोप्या भाषेत, पण सखोल परिचय करून दिला आहे.



250.00 Add to cart

थोरा-मोठ्यांचं बालपण संच

३ पुस्तकांचा संच


डॉ.गणेश राउत /उल्का राउत


आपण भविष्यात कोण होऊ, काय करू

याची बीजं बरेचदा आपल्या बालपणातल्या,

अत्यंत संवेदनशील मनावर रुजलेली असतात.

मोठ्या व्यक्तीच्या बालपणाची रंजक पद्धतीने

ओळख करून देऊन, प्रेरणा देणारा…

३ पुस्तकांचा संच

कलामांचं बालपण

अभ्यासावरचं कलामांचं प्रेम, शिक्षकांविषयी असलेला आदर,

आई-वडलांविषयी असलेला जिव्हाळा, जिज्ञासूवृत्ती,

कष्टाळूवृत्ती, ध्यास आणि आध्यात्मिक प्रवृत्ती…

एका तपस्वी संशोधकाच्या अनुभवांचं विश्व

बालपणीच्या किश्श्यांमधून उलगडून दाखवणारं पुस्तक…

थोरांचं बालपण

या पुस्तकात राजकारण, विज्ञान, पर्यावरण, कला, साहित्य,

समाजसेवा, अध्यात्म व क्रीडा या विविध क्षेत्रांतील;

४० व्यक्तिमत्त्वांचं बालपण त्यांच्या लहानपणचे प्रभाव

टाकणारे काही प्रसंग, काही आठवणी देत चितारलं आहे.

आमचं बालपण

या पुस्तकामध्ये सहा कलावंत आपल्या शैशवातील

आठवणींना उजाळा देत आहेत. मोठेपणी ज्या कलाक्षेत्रात

विपुल यश कमावलं त्या कलेविषयी गोडी कशी निर्माण

झाली याचं हृदगत ते तुम्हाला सांगत आहेत.



440.00 Add to cart

कलामांचं बालपण


सृजन पाल सिंग

अनुवाद : प्रणव सखदेव


जैनुलब्दीन आणि आशियाम्मा या दांपत्याने १५ ऑक्टोबर १९३१ रोजी भारताला एक ‘रत्न’ दिलं. भारताचं नाव रोशन करणारं हे रत्न म्हणजेच
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम…
प्रख्यात शास्त्रज्ञ आणि भारताचे राष्ट्रपती !
अतिशय लाडक्या अशा या व्यक्तिमत्त्वाचं बालपण या पुस्तकात रंगवलं आहे, त्यांचे निकटचे सहकारी सृजनपाल सिंग यांनी.
अभ्यासावरचं कलामांचं प्रेम, शिक्षकांविषयी असलेला आदर,
आई-वडिलांविषयी असलेला जिव्हाळा, जिज्ञासावृत्ती, कष्टाळू वृत्ती,
स्वप्न पूर्ण करण्याचा असलेला ध्यास आणि आध्यत्मिक प्रवृत्ती…
बालपणीच्या किश्यांमधून डोकावणारे त्यांच्या स्वभावातील
हे सर्व पैलू आजच्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरू शकतात.
त्यामुळे सर्व ‘छोट्यांनी’ अगदी आवर्जून वाचावं असं हे पुस्तक आहे.
एका तपस्वी संशोधकाच्या बालपणीच्या अनुभवांचं विश्व उलगडून दाखवणारं…
कलामांचं बालपण !



150.00 Add to cart

माझा भारत… उज्ज्वल भारत

युवकांसाठी प्रेरणादायी भाषणं


ए.पी.जे. अब्दुल कलाम
सहलेखक : सृजन पाल सिंग
अनुवाद : प्रणव सखदेव


२७ जुलै २०१५… याच दिवशी भारताचे माजी राष्ट्रपती आणि तरुणांचे लाडके शिक्षक डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचं निधन झालं. तरुणांना घडवणं हा त्यांचा ध्यास होता. त्यासाठीच ते आयुष्यभर देशा-परदेशांत तरुणांशी संवाद साधत फिरले. आणि म्हणूनच की काय, नियतीनेही त्यांना मृत्यू दिला तो विद्यार्थ्यांशी संवाद साधतानाच!
कलाम आता आपल्यात नसले, तरी ते विचाररूपाने कायमच आपल्यात असणार आहेत, त्यातून आपल्याला मार्गदर्शन करत राहणार आहेत. त्यांचे विचार अक्षररूपात आपल्यासमोर यावेत यासाठी कलाम यांचा निकटवर्तीय विद्यार्थी आणि सहलेखक सृजन सिंग पाल यांनी त्यांच्या भाषणातील निवडक उतार्‍यांचं संकलन या पुस्तकात केलं आहे.
प्रेम, सकारात्मकता, मूल्यांची जपणूक, जीवनाविषयक तत्त्वज्ञान, स्वप्नं पाहणं आणि परिश्रमाचं महत्त्वं आदी विषयांवरच्या या भाषणांमध्ये कलाम आपल्या आयुष्यातले अनुभव, कथा-कहाण्या आपल्याशी शेअर करतात. त्यातून आपल्याला एक संदेश मिळतो आणि त्यानुसार कृती करायची प्रेरणा मिळते.
या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाच्या विचारांचा प्रसार-प्रचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत – खास करून तरुण पिढीपर्यंत व्हावा म्हणून ही शब्दांजली माझा भारत…उज्ज्वल भारत !



195.00 Add to cart