406 | 978-93-86493-70-5 | Koradi Sheta…Ole Dole | कोरडी शेतं .. ओले डोळे | आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवा… अंधारात असलेली एक सामाजिक समस्या | Deepti Raut | दीप्ती राऊत | महाराष्ट्राला गेली २५ वर्षं शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा प्रश्न भेडसावतो आहे. सुरुवातीपासून आजपर्यंत रोजच्या बातम्यांपासून विधी मंडळाच्या अधिवेशनापर्यंत, रोजच्या राजकारणापासून ते निवडणुकांच्या राजकारणापर्यंत हा विषय धगधगता राहिला. पण आजही आत्महत्या होत आहेत… या गंभीर समस्येची ‘जाणारा जातो पण मागे जे राहतात त्यांचं काय?’ ही बाजूही तितकीच भीषण आहे.
अनुभवी आणि संवेदनशील पत्रकार दीप्ती राऊत यांनी याच प्रश्नाचा सखोल अभ्यास केला. राज्यभर फिरून त्यांनी अशा अनेक महिलांशी संवाद करत प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेतली. आत्महत्याग्रस्त कुटुंबांची वाताहत प्रत्यक्ष बघितली. परिस्थितीपुढे हतबल झालेल्या अबला त्यांना भेटल्या आणि संकटाशी मुकाबला करत, त्यातून मार्ग काढत जाणाऱ्या अनेक योद्ध्याही त्यांना भेटल्या. सामान्य जनता विचारही करू शकणार नाही अशी ही रोजची लढाई रोजच हरणाऱ्या शेकडो शेतकरी विधवांची होरपळ दाखवणारं आणि दु:खाला जिद्दीने सामोरं जाऊन लढणाऱ्यांची उदाहरणं जगासमोर आणणारं पुस्तक कोरडी शेतं…ओले डोळे ! |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 122 | 21 | 14 | 0.7 | 140 | समाजरंग | Social | सामाजिक | 160 | KoradiShetaCover | Koradi Sheta ole doleBC.jpg |
हॅपी लग्न.कॉम – २
वैवाहिक आयुष्याची पुढची इनिंग नव्या उमेदीने बहरवण्यासाठी…
विजय नागास्वामी
अनुवाद : माधवी खरे/शुभदा चौकार
लग्नाला पाच-सहा वर्षं झाल्यानंतर संसारात जेव्हा तोचतोचपणा वाटू लागतो, जोडीदार नीरस आणि कंटाळवाणा होऊन जातो तेव्हा आपल्या या सर्वांत जवळच्या नात्याला खतपाण्याची गरज लागते. हे खतपाणी म्हणजे नेमकं काय, कशाप्रकारे हे नातं पुन्हा एकदा बहरू शकतं, दृढ आणि सुंदर होऊ शकतं याचं प्रभावी मार्गदर्शन या पुस्तकात आहे.
विजय नागास्वामी यांनी लग्नाच्या नात्यात उद्भवणार्या अनेक नाजूक आणि जटिल समस्यांची ओळख करून दिली आहे. वरवर क्षुल्लक वाटणार्या गोष्टी पुढे जाऊन क्लिष्ट समस्येचं रूप कसं धारण करू शकतात हे त्यांनी अनेक उदाहरणांमधून स्पष्ट केलं आहे.
नवरा व बायको यांचे भिन्न स्वभाव, वेगळया आवडी-निवडी, दोन टोकाची ध्येयं, लुडबुड करणारे त्यांचे नातेवाईक इथपासून ते लैंगिक समस्या आणि विवाहबाह्य संबंध असा एक मोठा पट या पुस्तकात त्यांनी मांडला आहे.
केवळ समाजाला घाबरून किंवा सोयीचं आहे म्हणून लग्न टिकवण्यात अर्थ नाही. तुम्हाला ज्याच्या जोडीने आयुष्याचा आनंद उपभोगायचा आहे, कौटुंबिक सुख वृध्दिंगत करायचं आहे, अशा नात्याला कायम बहरत ठेवण्यासाठी वाचा…
Reviews
There are no reviews yet.