दीप्ती राऊत

दीप्ती राऊत या पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. लोकांच्या प्रश्नांवर त्या वैशिष्ट्यपूर्ण वार्तांकन करतात. ‘ग्राउंड रिपोर्टस्’च्या माध्यमातून विविध समाजसमूहांचे अंधारातील जगणं प्रकाशात आणणं, शासकीय व्यवस्थेतील कच्चे दुवे मांडणं आणि सामाजिक बदलासाठी खारीचा वाटा उचलणं हे त्यांचे स्वप्न आहे. त्यांना दै. लोकसत्तामध्ये वार्ताहर म्हणून तसेच आयबीएन-लोकमत या वृत्तवाहिनीत नाशिक ब्युरो चीफ, आणि दिव्य मराठी या दैनिकात विशेष प्रतिनिधी या माध्यमातूनवार्तांकनाचा अनुभव आहे.
त्या ‘नॅशनल टेलिव्हिजन अ‍ॅवॉर्ड', ‘रामनाथ गोएंका अ‍ॅवॉर्ड', ‘मटा गौरव सन्मान', ‘वरुणराज भिडे उत्कृष्ट पत्रकार', इत्यादी पुरस्कारांनी सन्मानित आहेत.

लेखकाची पुस्तकं

कोरडी शेतं… ओले डोळे

आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवा… अंधारात असलेली एक सामाजिक समस्या


दीप्ती राऊत


महाराष्ट्राला गेली २५ वर्षं शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा प्रश्न भेडसावतो आहे. सुरुवातीपासून आजपर्यंत रोजच्या बातम्यांपासून विधी मंडळाच्या अधिवेशनापर्यंत, रोजच्या राजकारणापासून ते निवडणुकांच्या राजकारणापर्यंत हा विषय धगधगता राहिला. पण आजही आत्महत्या होत आहेत… या गंभीर समस्येची ‘जाणारा जातो पण मागे जे राहतात त्यांचं काय?’ ही बाजूही तितकीच भीषण आहे.

अनुभवी आणि संवेदनशील पत्रकार दीप्ती राऊत यांनी याच प्रश्नाचा सखोल अभ्यास केला. राज्यभर फिरून त्यांनी अशा अनेक महिलांशी संवाद करत प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेतली. आत्महत्याग्रस्त कुटुंबांची वाताहत प्रत्यक्ष बघितली. परिस्थितीपुढे हतबल झालेल्या अबला त्यांना भेटल्या आणि संकटाशी मुकाबला करत, त्यातून मार्ग काढत जाणाऱ्या अनेक योद्ध्याही त्यांना भेटल्या.

सामान्य जनता विचारही करू शकणार नाही अशी ही रोजची लढाई रोजच हरणाऱ्या शेकडो शेतकरी विधवांची होरपळ दाखवणारं आणि दु:खाला जिद्दीने सामोरं जाऊन लढणाऱ्यांची उदाहरणं जगासमोर आणणारं पुस्तक कोरडी शेतं…ओले डोळे !


160.00 Add to cart