511 | 978-93-92374-03-6 | Emozeal | इमोझील | मनोबल उंचावणाऱ्या कथा | Dr. Mahesh Abhyankar | Arati Bharj | डॉ.महेश अभ्यंकर | आरती भार्ज | मनोबल उंचावणाऱ्या कथा करोनाच्या संकटकाळात जागतिक स्तरावरील मानवी जीवनाला एक नवीन वळण मिळाले . सर्व स्तरांतील जनतेपुढे नवी आव्हानं उभी राहिली . आणि त्याचबरोबर जीवनातील प्रत्येक आव्हान हे आत्मपरीक्षणाची एक संधी असते , हेही या काळात प्रकर्षाने जाणवून गेलं . जगातील जवळपास प्रत्येक व्यक्तीने कमी अधिक प्रमाणात मानसिक दोलायमान स्थिती अनुभवली . सामान्य दिसणाऱ्या लोकांनी ह्या असामान्य परिस्थितीला कसे तोंड दिले , अडखळत , धडपडत का असेना , पण या काळात त्यांनी नव्या दिशा शोधल्या , असे सर्व दर्शविणाऱ्या कहाण्या म्हणजेच ‘ इमोझील ‘ अर्थात मनोबल उंचावणाऱ्या कथा . वैद्यकीय सल्लागार डॉ . महेश अभ्यंकर आणि मानसिक विकास सल्लागार आरती भार्ज ह्यांनी ह्या काळात केलेल्या समुपदेशनावर आधारित या बारा कथा आहेत . या कहाण्या कुठल्याही कठीण काळात मार्गदर्शक ठरतील अशा आहेत . SP ह्या कथांतील पात्रांकडून तुम्हाला नवी उमेद , आयुष्य जगण्यासाठी नवीन दिशा मिळत राहील . नवनिर्माण करण्याची शक्ती आपल्याकडे आहे याची जाणीव होईल . ‘ आपल्यातील सुप्त मानसिक बळ ओळखा आणि सजगतेने कार्यरत राहा …. ‘ हेच सूत्र आपलं मनोरंजन करता करता सांगणारा कथासंग्रह ‘ इमोझील ‘ . आयुष्य एक निरंतर प्रवास , आशा , अपेक्षा , भावना आणि भास एक दिवस सूर्योदय आपला असेल मनात ठेवावा नेहमी हा विश्वास ! | Papar Back | Book | Rohan Prakashan | Marathi | १९४ | कथासंग्रह | 250 |
महात्म्याच्या प्रतीक्षेत
आर.के. नारायण
अनुवाद : उल्का राऊत
‘मालगुडी डेज’ आणि ‘स्वामी’ यांसारख्या दूरदर्शन मालिकांमुळे आर.के. नारायण प्रसिद्धीझोतात आले. त्यांच्या ‘गाइड’ या कादंबरीवर आधारित असलेला ‘गाइड’ हा चित्रपट विशेष गाजला. आर.के. नारायण यांची खासियत म्हणजे अत्यंत सामान्य माणसाचं रोजच्या आयुष्याचं चित्रण सहज, ओघवत्या आणि मार्मिक विनोदातून रेखाटायची कला! त्यांच्या कथा एकाच वेळी मनाला स्पर्शूनही जातात आणि निखळ विनोदानी हास्याची कारंजीही उडवतात.
अशाच गाजलेल्या पुस्तकांपैकी काही निवडक पुस्तकांचा मराठी अनुवाद ‘रोहन प्रकाशन’तर्फे प्रसिद्ध करत आहोत.
देशाच्या स्वातंत्र्यलढ्याशी कोणतंही कर्तव्य नसलेला श्रीराम भारतीच्या प्रेमात पडतो आणि तिच्यामुळे स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतो. निवांत व सुखासीन आयुष्य जगणारा श्रीराम तिला भेटल्यानंतर त्याने विचारही केला नसेल अशा प्रकारचं आयुष्य जगतो.
भारती बुद्धिमान, तडफदार आणि देशाला वाहून घेतलेली व्यक्ती आहे. त्याउलट हा सामान्य, दिशाहीन आणि कोणतंही ध्येय नसलेला! त्यामुळे दोघांमध्ये होणाऱ्या संवादात एक प्रकारची खुसखुशीत जुगलबंदी वाचायला मिळते.
आर.के. नारायण यांनी गांधीजीची व्यक्तिरेखा या कादंबरीत विविध पैलूंमधून रेखाटली आहे. एकाचवेळी गांधीजी स्वातंत्र्य लढ्यातले लोकप्रिय लोकनेते आहेत, भारतीचे सर्वेसर्वा आहेत तर श्रीरामच्या दृष्टीने त्याच्या व भारतीच्या लग्नाला संमती देणारी एक महत्त्वाची व्यक्ती आहे. अशा सर्वच व्यक्तिरेखांचं रंगतदार चित्रण आर. के. नारायण या कादंबरीत प्रभावीपणे करतात आणि त्याचबरोबर अनेक घटना व प्रसंगांद्वारे कथेतील उत्कंठाही वाढवत नेतात.
Reviews
There are no reviews yet.