रस्किन बाँड संच

भावस्पर्शी व रोमांचक कथांचा गुलदस्ता


रस्किन बाँड या एक अँग्लो- इंडियन लेखकचा जन्म 19 मे १९34 रोजी कसौली इथे झाला. चार वर्षांचे असताना त्यांचे आई-वडील विभक्त झाले आणि वडिलांच्या मृत्यूनंतर वयाच्या दहाव्या वर्षी ते आपल्या आजीच्या घरी, देहरादूनला गेले. वयाच्या सोळाव्या वर्षी, त्यांनी पहिली लघुकथा लिहिली आणि त्याला पारितोषिकही मिळालं. तेव्हापासून त्यांची लेखणी अविरत साहित्यनिर्मिती करत राहिली. पुढे त्यांनी दोन वर्षांसाठी इंग्लंडला आपल्या मावशीकडे वास्तव्य केलं आणि तिथेच आपल्या पहिल्या कादंबरी लेखनाला सुरुवात केली. या कादंबरीला वाचक व समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. भारतात परतल्यानंतर त्यांनी विविध नियतकालिकांमध्ये लेखन केलं, तसंच काही नियतकालिकांचं संपादनही केलं. मोठ्यांबरोबरच लहान मुलांसाठीही भरपूर साहित्यनिर्मिती केली. आजवर त्यांच्या कथा - कादंबऱ्यांवर नामवंत दिग्दर्शकांनी चित्रपटही तयार केले आहेत. साहित्यातील भरीव योगदानासाठी त्यांना 'साहित्य अकादमी पुरस्कार', तसंच 'पद्म भूषण पुरस्कार' यांसारखे अनेक मान्यताप्राप्त पुरस्कार मिळाले आहेत.

 

अनुवाद :

नीलिमा भावे यांनी कथा, ललित लेख, वैचारिक लेखन, बाल साहित्य, संशोधनपर लेखन अशा विविध साहित्यप्रकारांत लेखन- मुशाफिरी केली असून त्यांनी बंगालीमधून मराठी अनुवादही केले आहेत. संपादनंही केली आहे. त्याशिवाय त्यांनी विविध नियतकालिकांमधून साहित्य व सामाजिक विषय लेखनही केलं आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनवरील चर्चांमध्ये त्यांनी सहभाग घेतला असून मुलाखतीही घेतल्या आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार आणि इतरही साहित्य संस्थांचे सन्माननीय पुरस्कार मिळाले आहेत.
अनुवाद, चित्रकला आणि लेखन-वाचन यांमध्ये विशेष रस असलेल्या रमा यांनी माधुरी पुरंदरे यांनी पुस्तकं मराठीतून इंग्रजीत भाषांतरित केली आहेत. त्यांना फ्रेंच , इंग्रजी आणि मराठी भाषांमधली ललित साहित्याची पुस्तकं अनुवादित करायला आवडतात. लहान मुलांसाठीही त्या लेखन करतात. आजवर त्यांनी वीसपेक्षा जास्त कलाकृतींची भाषांतरं केली असून त्यांना 'डेली हंट'ने आयोजित केलेल्या कथास्पर्धेत पारितोषिकही मिळालं आहे.


सुप्रसिद्ध अँग्लो-इंडियन लेखक रस्किन बाँड
यांची सगळी जडणघडण झाली ती भारतात. देहरादूनसारख्या हिमालयाच्या कुशीत वसलेल्या निसर्गरम्य प्रदेशात.
त्यामुळे साहजिकच हिमालयातला निसर्ग, तिथलं लोकजीवन, तिथली माणसं,
त्यांचे अनुभव आदी गोष्टी त्यांच्या कथांमधून शब्दरूप घेऊन येतात. त्यांच्या
कथा-कादंबर्‍यांची पन्नासहून अधिक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत! (खर्‍या अर्थाने साहित्य क्षेत्रातले ‘बाँड’च!) त्यांनी थरारकथा, भयकथा, गूढकथा, रहस्यकथा, प्रेमकथा आणि साहसकथा असे कथांचे विविध प्रकार हाताळले असले, तरी भावनाशील व संवेदनशील वृत्तीचा एक समान धागा त्यांच्या सगळ्या कथांमधून जाणवत राहतो. त्यातल्याच ३९ निवडक कथांच्या ६ पुस्तकांची ही पुस्तक-मालिका; खास तुमच्यासाठी !
तुम्ही या पुस्तक मालिकेतली एखादी जरी कथा वाचली ना, तरी तुम्ही ही सगळी पुस्तकं पुन्हा पुन्हा वाचून काढाल; एवढ्या या कथा इंटरेस्टिंग आहेत! या कथा वाचण्यात वाचून तुम्ही रममाण तर व्हालच, त्याचबरोबर तुमचा आजूबाजूच्या जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही ‘ब्रॉडर’ होईल…
तेव्हा, रस्किन बाँड यांच्या या कथा-दुनियेत तुमचं मनापासून वेलकम!


900.00 Add to cart

भारत : समाज आणि राजकारण

यशवंतराव चव्हाण यांचे प्रगट चिंतन


डॉ. जयंत लेले हे कॅनडातील किंग्स्ट्न येथील क्वीन्स विद्यापीठातील राज्यशास्त्र, समाजशास्त्र आणि जागतिक विकास ह्या विषयांचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले असून आता ते तिथेच सन्माननीय प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. डॉ. जयंत लेले हे ‘शास्त्री इंडोकॅनेडिअन इन्स्टिट्यूट’चे उपाध्यक्ष आणि अध्यक्ष होते. त्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय आणि आर्थिक प्रश्नांवर बरंच लिखाण केलं आहे. भारत आणि दक्षिणपूर्ण आशियावरच्या अनेक पुस्तकांचे ते लेखक आणि संपादक आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय विकासावरची त्यांची पुस्तके आणि लेख अनेक विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक म्हणून वापरली जातात.

अनुवाद:


आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी करून देशपातळीवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या यशवंतराव चव्हाणांनी तीन खंडांमधून आत्मचरित्र लिहिण्याचे ठरवले होते. प्रत्यक्षात त्यातील एकच खंड प्रकाशित होऊ शकला. प्रा. जयंत लेले यांच्या प्रदीर्घ मुलाखतसत्रांतून आकारास आलेला प्रस्तुत ग्रंथ म्हणजे एका अर्थाने यशवंतरावांनी लेले यांना सांगितलेले आत्मचरित्र म्हणावे लागते. ‘‘हा मी स्वत:शी करत असलेला संवाद आहे” असे स्वत: यशवंतरावच म्हणतात यात सारे काही आले. यशवंतरावांचे राज्य व राष्ट्र या दोन्ही पातळ्यांवरचे राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक दृष्टिकोन आणि व्यवहार यांचा हा सखोल अभ्यास आहे. विशेष म्हणजे हा अभ्यास जागतिक पातळीवरील स्थित्यंतरांच्या संदर्भात करण्यात आलेला असल्याने तो एकमेवच मानावा लागतो. आपण मनापासून स्वीकारलेली स्वातंत्र्य आणि समता ही तत्त्वे एकीकडे व प्रत्यक्ष राजकीय व्यवहार दुसरीकडे. तर प्रसंगी स्वातंत्र्य आणि समता या तत्त्वांमधील द्वंद्वावर मात करण्याची यशवंतरावांची धडपड लेले यांनी हळुवारपणे उकलली आहे. चव्हाण साहेबांची राजकीय भूमिका व शैली यांच्यासाठी त्यांनी केलेला सैद्धांतिक व्यवहारवाद हा शब्दप्रयोग अत्यंत समर्पक म्हणावा लागेल.

स्वातंत्र्यलढ्याच्या दरम्यान झालेली यशवंतरावांची वैचारिक वाटचाल, स्वातंत्र्योत्तर काळात मुंबई राज्याच्या व द्वैभाषिकाच्या कायदेमंडळात घडलेला प्रशासक, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अविचलपणे राष्ट्रीय व प्रादेशिक हितसंबंधांचा मेळ घालणारा मुत्सद्दी, चिनी आक्रमणामुळे अचानकपणे अंगावर आलेली जबाबदारी पेलणारा खंबीर नेता व विचारवंत असे अनेक पैलू या ग्रंथातून उलगडतात. महाराष्ट्र आणि भारत या दोन्ही स्तरांवरील सहकारी व स्पर्धक यांच्याशी आपल्या मानवी पातळीवरील संबंधांविषयी इतक्या स्पष्टपणे यशवंतराव कधीच बोलले नव्हते. या सर्व गोष्टींचा उपयोग राजकीय आणि सामाजिक क्षेत्रांत वावरणाऱ्यांना तर होईलच पण महाराष्ट्राने यशवंतरावांचा कृतज्ञतापूर्वक अभिमान का बाळगायचा हे देखील समजेल.


600.00 Add to cart

भटकंती संच २ पुस्तकांचा


‘महाराष्ट्र टाइम्स’ दैनिकाचे खास प्रतिनिधी म्हणून जयप्रकाश प्रधान २८ वर्षं कार्यरत होते. राजकीय, सामाजिक व गुन्हेगारीविषयक क्षेत्रांतील त्यांची अनेक बातमीपत्रं साऱ्या महाराष्ट्रात खळबळ निर्माण करणारी ठरली. त्यावर आधारित ‘बातमीमागची बातमी’ हे त्यांचं पुस्तक खूपच लोकप्रिय झालं आहे. ‘पर्यटन’ हा त्यांचा सर्वांत आवडीचा छंद. परदेशातील आगळ्यावेगळ्या स्थळांना, ग्रामीण भागांना भेटी देऊन, तेथील संस्कृती, चालीरीती, जुने अवशेष तसंच लोक, समाज, खाद्यपदार्थ यांची रोचक माहिती मिळवण्यात त्यांना व त्यांची पत्नी जयंती यांना विशेष रस असतो. पृथ्वीवरील सात खंडांवर प्रधान पती-पत्नीचे पाय लागले आहेत. अंटार्क्टिका खंडावर मनुष्यवस्ती नाही. राहिलेल्या सहा खंडांमधील एकूण देशांची संख्या २१०च्या घरात जाते. त्यांपैकी ७८ देश त्यांनी आतापर्यंत पाहिले आहेत. म्हणजे ३५ टक्क्यांपेक्षा थोड्या अधिक जगाची भटकंती त्या दोघांनी पूर्ण केली आहे. हा प्रवास म्हणजे केवळ त्या देशाला, प्रदेशाला भोज्जा किंवा ‘१२ दिवसांत १० देश’ या पद्धतीचा झाला नाही. बहुतेक प्रवास स्वत: आखून किंवा परदेशातील नामांकित आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल किंवा क्रुझ कंपन्यांबरोबर केल्याने, त्यांना वेगळ्याच जगाचं दर्शन घडलं. ‘अजून खूप जग बघायचं आहे, अनुभवायचं आहे,' या इच्छेमुळे दोघांच्याही पायाला लागलेली भिंगरी थांबलेली नाही.

■ कोणत्या देशांची भटकंती आहे या पुस्तकात ?

४ जॉर्जियामधील ऑटम कलर्स, तेथील प्राचीन अवशेष, स्टॅलिनचं जन्मगाव

अझरबैजानमधील इचेरी शेहरसारखा जुना भाग आणि दुसरी दुबई होण्याच्या मार्गावरील नवा भाग ● अर्मेनिया हा विविध युद्धांना बळी पडलेला चिमुकला देश

★ नागोनों काराबाख हा डोंगराच्या कुशीत विसावलेला नयनरम्य देश

युरोपची सांस्कृतिक राजधानी समजला जाणारा स्पेनमधील मलगा प्रांत आणि स्मार्ट सिटी बार्सिलोना

● प्राचीन अवशेषांनी नटलेला ग्रीस

• फ्रान्स आणि स्पेनच्या सीमांमध्ये लपलेला टिकलीएवढा देश ‘अँडोरा’

■ कोणत्या बेटांची सफर आहे या पुस्तकात ?

• स्पेनमधले बॅलेअरिक आणि कॅनरी आयलंडचे अप्रतिम समुद्रकिनारे,

• ११५ लहान-मोठ्या बेटांचा समूह सेशेल्स,

● जागतिक पर्यटकांचं हॉट डेस्टिनेशन हवाई,

• ग्रीस मधली पांढरी निळी बेट, v लहान-मोठ्या १७,५०० बेटांचा मिळून

झालेला व प्राचीन वारसा असलेला इंडोनेशिया १५ नयनरम्य निसर्ग सौंदर्याने नटलेली इटलीमधील लोकप्रिय बेट…..


 

500.00 Add to cart

इति आदि

दैनंदिन चीजवस्तूंचा उगमापासून आजपर्यंतचा कुतूहलजनक प्रवास


निश्चित अशी वैचारिक बैठक असलेले आणि अभ्यासक, संशोधक असा डॉ. अरुण टिकेकरांचा नावलौकिक आहे. अभ्यासपूर्ण आणि संशोधनात्मक लेखन हा टिकेकरांचा मुख्य लेखन-प्रांत असला तरी त्यांनी ललित लेखनासह लेखनाचे अनेक बंध लीलया पेलले आहेत. मात्र, तसं करताना मांडणीतली शिस्त, शब्दप्रयोगातला काटेकोरपणा आणि भाषेतला प्रभावीपणा कधीच कमी होऊ दिला नाही. सकस आशय हेही टिकेकरांच्या लेखनातलं वैशिष्ट्य राहिलं आहे. लेखन, संपादन, संशोधन यांसोबतच टिकेकरांनी आपली रसिकताही जोपासली. शास्त्रीय संगीतात ते मनापासून रमत असत. पं.कुमार गंधर्व हे त्यांचे आवडते गायक होते. क्रिकेट ही त्यांची विशेष आवड होती. आंतरविद्यापीठीय स्तरावरील सामन्यांत ते खेळलेही आहेत. मधुबाला ही त्यांची आवडती अभिनेत्री होती, तर गीता दत्त हिच्या गाण्यातला दर्द त्यांना भिडायचा. टिकेकरांचं व्यक्तिमत्त्व भारदस्त, तर चर्या अभ्यासकाची, गंभीर होती. स्वभावाने ते परखड, तर वृत्तीने अलिप्त होते... पण अशा प्रतिमेपलीकडचेही टिकेकर होते... निरागस, हळुवार, भावुक, चोखंदळ... आपल्या आवडत्या माणसांमध्ये मनापासून रमणाऱ्या टिकेकरांचं १९ जानेवारी २०१६ रोजी अकस्मात निधन झालं.

‘‘वाचक या पुस्तकात गुंततो याला काही कारणं आहेत. एकतर टिकेकरांची रसाळ, गोमटी भाषा. त्यांच्या लेखनाला जुन्या पिढीने कमावलेलं सौष्ठव आहे. इतकी चांगली भाषा हल्ली कुठे वाचायला मिळते? मिळालीच तर त्यात क्लिष्टता, पंडिती जडपणा आणि अभिजात उग्रता असते. पण टिकेकरांच्या या लिखाणात नितांतसुंदर सहजता आहे. ‘माझ्या वाचनात मला ज्या अजबगजब गोष्टी कळल्या त्या तुम्हाला सांगतो,’ असा या लेखनाचा बाज आहे. त्यामुळे वाक्यागणिक नवनवी माहिती आपल्याला कळत जाते आणि आपण या सुग्रास माहितीचा आस्वाद घेऊ लागतो.

दुसरी गोष्ट म्हणजे, टिकेकरांचं वाचन बहुविद्याशाखीय असल्यामुळे त्यांचं लेखन आपल्याला समृद्ध करत जातं. इतिहास, भूगोल, साहित्य, भाषाशास्त्र, समाजशास्त्र, व्युत्पत्तीशास्त्र, मानववंशशास्त्र अशा कितीतरी अभ्यासशाखांतील संबद्ध माहिती ते आपल्याला उलगडून देतात. त्याशिवाय वैद्यक, उद्योग-व्यापार, आहारशास्त्र वगैरेंमधील आवश्यक संदर्भही पुरवतात….

या पुस्तकात रमण्याचं आणखी एक कारण म्हणजे टिकेकरांची मानवी जीवनाविषयीची आतुरता आणि आत्मीयता. मानवी जीवन कसकसं उलगडत गेलं आणि समृद्ध होत गेलं, नाना खाद्यपदार्थ आणि जीवनोपयोगी घरगुती वस्तूंतून ते कसं दिसतं, याचा उलगडा हे पुस्तक वाचताना होतो. विविध धान्य-भाज्या-फळं-पदार्थ-पक्वान्न आणि सुई-आरसा-मच्छरदाणी-पंखा-कात्री-दागिने-भांडीकुंडी अशा जीवनोपयोगी वस्तू यांचा माणसाच्या इतिहासाशी आणि त्याच्या अलीकडच्या विकासाशी असलेला संबंध टिकेकर आपल्याला जोडून दाखवतात….”


500.00 Add to cart

वाचा जाणा करा

९ पुस्तकांचा संच


प्रतिभावान कवी, कादंबरीकार म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या बहुप्रसवा लेखिका कविता महाजन यांनी सर्जनशील लेखनाबरोबर अनुवाद तसंच संपादन क्षेत्रात भरीव काम केलं आहे. त्यांनी मुलांसाठीही गोष्टीची पुस्तकं लिहिली आहेत. त्यांचं प्राथमिक व माध्यमिक शिक्षण नांदेडला झालं आणि त्यानंतर त्यांनी औरंगाबाद इथे कलाविषयक शिक्षण केलं. त्यांनी मराठी साहित्यात एम.ए.देखील केलं. कवितेपासून त्यांनी लेखनाला सुरुवात केली आणि त्यानंतर त्या कादंबरीलेखनाकडे वळल्या. 'ब्र', 'भिन्न' या त्यांच्या कादंबऱ्या विशेष गाजल्या तसंच त्यांनी केलेल्या इस्मत चुगताई यांच्या 'रजई' या लघुकथासंग्रहाच्या अनुवादाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. याशिवाय महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट साहित्य निर्मितीचा पुरस्कार, तसेच इतर अनेक मान-सन्मान त्यांना मिळाले.

सिद्धहस्त लेखिका कविता महाजन यांनी

नाक, कान, डोळे, डोकं, हात-पाय, पोट

यांसारख्या अवयवांची माहिती, त्यांविषयीच्या म्हणी

आणि वाक्प्रचार, शाब्दिक गमतीजमती

इ. गोष्टी रंजक कथारूपात गुंफून सांगितल्या आहेत.

मुलांची भाषिक कौशल्यं विकसित व्हावीत म्हणून

प्रत्येक पुस्तकात मुलांसाठी अभ्यासही दिला आहे.

मैत्रेयीच्या या गोष्टी वाचा, माहिती जाणून घ्या

आणि त्यासोबत थोडा अभ्यासही करा!


450.00 Add to cart

योगदीपिका

जगभरातील ४० भाषांमध्ये अनुवादित झालेलं योगाचार्य अय्यंगार यांचं आंतरराष्ट्रीय कीर्तीचं पुस्तक LIGHT ON YOGA चा मराठी अनुवाद


बेल्लूर कृष्णमाचारी सुंदरराजन अय्यंगार अर्थात, जगविख्यात योगगुरू बी.के.एस. अय्यंगार यांनी 'अय्यंगार योग’ ही योगशास्त्रामधील एक वैशिष्ट्यपूर्ण पद्धती विकसित केली. 'योग’ हा आपल्या जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग आहे, असा नवा विचार रुजवण्यात आणि भारताबरोबर संपूर्ण जगभर योगविद्या लोकप्रिय करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. अय्यंगारांचा जन्म १४ डिसेंबर १९१८ रोजी कर्नाटकमधील बेल्लूर येथे झाला. योगशास्त्राचं सुरुवातीचं शिक्षण त्यांनी त्यांच्या मेहुण्यांकडून म्हैसूर येथे घेतलं. १९३७मध्ये योगशास्त्राचा प्रचार करण्यासाठी पुण्यात वास्तव्यास आल्यानंतर ते योग शिकवू लागले. जगभरातल्या अनेक नामांकित व प्रसिद्ध व्यक्तींनी त्यांच्याकडून योगाभ्यासाचे धडे घेतले आहेत. १९ जानेवारी १९७५ रोजी त्यांनी ‘राममणी अय्यंगार मेमोरिअल योग इन्स्टिट्यूट’ची स्थापना केली. येथे जनसामान्यांना योगासनाचे धडे दिले जातात. त्याचप्रमाणे हे एक महत्त्वाचं योगविद्या संशोधन केंद्रही आहे. अनेक देशी परदेशी विद्यार्थी इथे योगसाधनेसाठी येतात. संपूर्ण जीवन योगविद्येसाठी वाहून घेतलेल्या या योगतपस्व्याचा २० ऑगस्ट २०१४ रोजी वयाच्या ९६व्या वर्षी मृत्यू झाला.

अनुवाद :


योगसाधकांसाठी हे पुस्तक म्हणजे योगविद्येची जणू गीताच !
१९३६पासून बी.के.एस. अय्यंगार यांनी जनसामान्यांना योगविद्येचे धडे दिले. जगभर प्रवास करून त्यांनी प्रात्यक्षिकांद्वारे योगविद्येचा विविध देशात प्रसार केला. या पुस्तकात त्यांनी ‘योग’ म्हणजे काय, त्या मागचं तत्त्वज्ञान कोणतं व त्याची व्याप्ती किती याविषयी समर्पक चर्चा केली आहे.
पुस्तकात आसनांविषयी सखोल विवेचन करून त्या त्या आसनांची छायाचित्रं दिली आहेत. एवूâण २०० आसनं आणि बंध व १४ श्वसनाचे प्रकार (प्राणायाम) विस्तृतपणे दिले आहेत. पुस्तकात त्या त्या जागी दिलेल्या ६०० छायाचित्रांच्या आधारे तुम्ही कोणतंही आसन शिक्षकाच्या मदतीशिवाय बिनधोक करू शकता.
याशिवाय योग, नाडी, चक्र आणि कुंडलिनी या योगशास्त्रातील महत्त्वाच्या संज्ञांच्या व्याख्या देऊन त्यावर थोडक्यात भाष्यही केलं आहे. परिशिष्टामध्ये विशिष्ट आजारांवर प्रभावी ठरणार्‍या आसनांची यादीच दिली आहे. तसेच योगविद्या आत्मसात करण्यामध्ये विशेष रुची असणार्‍या विद्यार्थ्यांसाठी ३०० आठवड्यांचा एक प्रदीर्घ कोर्सच आखून दिला आहे. या कोर्सची विभागणी तीन भागांमध्ये केली आहे.
प्रारंभी सोप्या आसनांपासून सुरुवात करत थोडी अवघड आसनं आणि नंतर कठीण आसनं टप्प्याटप्प्याने कशी करावीत याचं उत्कृष्ट मार्गदर्शन करणारं हे पुस्तक… योगदीपिका !


450.00 Add to cart

हॅपी लग्न.कॉम संच

सुबोध व समंजस समुपदेशन


विजय नागास्वामी यांनी मद्रास मेडिकल कॉलेजमधून एम.बी.बी.एस.ची पदवी संपादित केली असून मानसोपचारशास्त्रात त्यांनी पदव्युत्तर पदविका मिळवली आहे. सुरुवातीची काही वर्षं (१९८४-१९९१) त्यांनी ‘स्किझोफेनिया रिसर्च फाउंडेशन’साठी काम केलं. जागतिक आरोग्य संघटनेसारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांसाठी त्यांनी सल्लागार म्हणूनही काम केलं आहे. १९९१ ते ९७च्या दरम्यान त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात शिरकाव केला आणि चेन्नईमधील एका पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये एच.आर. विभागात काम केलं. १९९७ पासून व्यक्ती, जोडपी आणि कॉर्पोरेटजगताशी निगडित मानसोपचारपद्धतींवर त्यांनी लक्ष केंद्रित केलं. आतापर्यंत त्यांची समुपदेशनावरची अनेक पुस्तकं प्रकाशित झाली असून त्यातील बरीच पुस्तकं ‘बेस्ट सेलर’ ठरली आहेत.

अनुवाद :
शुभदा चौकर या ‘वयम्’ या किशोरांच्या मासिकाच्या मुख्य संपादिका असून त्याआधी त्या २० वर्षं ‘लोकसत्ता’ या आघाडीच्या दैनिकात कार्यरत होत्या. सुमारे १० वर्षं त्यांनी लोकसत्ताच्या शनिवार आणि रविवार पुरवण्यांची जबाबदारी पार पाडली. याशिवाय त्या मुंबई ग्राहक पंचायतीच्या कार्यकारिणी सदस्या असून जुलै, २०१३मध्ये जिनीव्हा येथे जाऊन त्यांनी ‘युनायटेड नेशन्स’मध्ये ग्राहक हक्कांच्या गाइडलाइनमधील सुधारणांवर भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्यांनी दोन फेलोशिप्सअंतर्गत ‘मुंबईतील बारमध्ये काम करणाऱ्या मुलींचे प्रश्न’ आणि ‘महिलांचे प्रजनन स्वास्थ्य’ या विषयांवर संशोधनही केलं आहे.


लग्नाचं नातं कायम बहरत ठेवण्यासाठी एक आश्वासक सोबती…


390.00 Add to cart

सरदार वल्लभभाई पटेल

भारताचा पोलादी पुरूष


बलराज कृष्ण यांनी पत्रकारितेची सुरुवात सिव्हिल आणि मिलिटरी गॅझेट, लाहोर येथून केली. फाळणीनंतर नवी दिल्ली येथे एक्सर्टनल पब्लिसिटी डिव्हिजन, प्रेस इन्फरमेशन ब्युरो (भारत सरकार) आणि ब्रिटिश इन्फरमेशन सर्व्हिसेस करता काम केलं. ‘हिंदुस्थान टाइम्स’च्या श्रीनगर पुरवणीकरता त्यांनी विशेष वार्ताहर म्हणून काम केलं. त्यांनी 'इलस्ट्रेडेट वीकली ऑफ इंडिया’, ‘द टाइम्स ऑफ इंडिया’, ‘इकॉनॉमिक टाइम्स’, ‘द हिंदू’ अशा वृत्तपत्रांसाठी तसंच मासिकांसाठी लेखन केलं. तसंच शिपींग कार्पोरेशन ऑफ इंडिया, मोगल लाईन, इंडो-बर्मा पेट्रोलिअम, अ‍ॅटलास कॉप्को, वॉर्नर हिंदुस्थान, पार्क-डेव्हिस आणि विमको या कंपन्यांच्या मासिकांचं संपादनही केलं.

अनुवाद :
पत्रकारितेच्या क्षेत्रांत सुमारे ३० वर्षांहून अधिक काळ भगवान दातार कार्यरत आहेत. त्यांनी लोकसत्ता, केसरी, लोकमत, तरुणभारत, पुढारी, प्रभात आदी दैनिकात विविध पदांवर काम केलं आहे. तरुणभारत, पुणेच्या संपादकपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली. विविध घटनांच्या वृत्तांकनासाठी पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, जम्मू-काश्मीर, कर्नाटक आदी राज्यांचा त्यांनी दौरा केला असून लोकसभेच्या कामकाजाचे वृत्तांकनही त्यांनी केलं आहे. त्यांनी रामजन्मभूमी प्रकरणाच्या वेळी अयोध्येत उपस्थित राहून वार्तांकन केलं होतं. त्यांनी संरक्षण मंत्रालयाचा वॉर करस्पाँडन्टचा अभ्यासक्रम महू, नासिराबाद, जोधपूर, दिल्ली आणि कोचीन येथून पूर्ण केला आहे. त्यांची ‘टु द लास्ट बुलेट’, ‘शेवट नसलेलं युद्ध’, ‘बी किंमग इंडियन’ ही अनुवादित पुस्तके गाजली. ‘खिल्ली’ हे राजकीय विडंबनपर लेखांचं स्वतंत्र विनोदी पुस्तक आणि आयएस अधिकाऱ्यांच्या कामाबद्दल ‘कलेक्टिव्ह एनर्जी’ या पुस्तकाचं संपादन केलं आहे. ‘सरदार वल्लभभाई पटेल' व ‘फील्ड मार्शल सॅम माणेकशा' ही त्यांनी अनुवादित केलेली पुस्तकं वाचकप्रिय आहेत.


“सततची भीती तुम्हाला सौम्य बनवते.
सौम्यपणा हा गुण आहे; पण त्याच्या अतिरेकाने
तुम्ही एवढे नेभळट बनता की, अन्यायाशी
लढण्याची उर्मीच तुमच्याजवळ उरत नाही.
व्यापक अर्थाने यालाच भित्रेपणा म्हणतात.”
-वल्लभभाई पटेल

सरदार पटेल म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील आणि स्वतंत्र भारताच्या उभारणीतील एक कणखर व्यक्तिमत्त्व! देशातील ५६५ संस्थानं विलीन करून घेऊन सामर्थ्यशाली एकसंध भारत उभा करणं हे पटेलांचं महत्त्वाचं योगदान म्हणता येईल.
सुप्रसिद्ध व जेष्ठ पत्रकार बलराज कृष्णा यांनी या पोलादी पुरुषाचा संपूर्ण जीवनपटच अत्यंत ताकदीने या पुस्तकाद्वारे उभा केला आहे. पटेलांचं बालपण, त्यांचा राजकारणातला प्रवेश, गांधीजींबद्दलची त्यांची आस्था, नेहरूंसोबतचं त्यांचं मित्रत्वाचं नातं तसंच त्यांच्यासोबतचे मतभेद, संस्थानिकांबरोबरच्या वाटाघाटी व संस्थानांचं यशस्वी विलीनीकरण, पटेलांचे राजकीय विचार व त्यांनी वेळोवेळी घेतलेले ठाम व कठोर निर्णय, त्याचप्रमाणे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातले विविध पैलू असा या पुस्तकाचा मोठा आवाका आहे.
एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या पटेलांचं संपूर्ण व्यक्तिमत्त्व व कार्य-कर्तृत्व उलगडून दाखवणारं हे चरित्र वाचकांना निश्चितच रोमहर्षक व प्रेरणादायी वाटेल.


390.00 Add to cart

नरसिंहावलोकन

भारताच्या अर्थव्यवसथेचा कायापालट करणाऱ्या पी.व्ही. नरसिंह राव याचं राजकीय चरित्र


अनुवादक

तरुण कादंबरीकार, अनुवादक म्हणून अवधूत डोंगरे प्रसिद्ध आहेत. त्यांच्या आजवर चार कादंबऱ्या प्रकाशित झालेल्या असून कादंबरीलेखनासोबतच ते एकरेघ (ekregh.blogspot.in) हा ब्लॉगही लिहितात. पत्रकारी स्वरूपाचं लेखनही त्यांनी काही वर्तपानपत्रांतून व नियतकालिकांमधून केलं आहे. व्यवसाय म्हणून ते विविध प्रकारच्या अनुवादाची कामं करतात. त्यांच्या ‘स्वतःला फालतू समजण्याची गोष्ट’ या त्यांच्या कादंबरीला २०१४ सालचा ‘साहित्य अकादमी युवा पुरस्कार’ मिळाला आहे.


पी.व्ही . नरसिंह राव अनपेक्षितरीत्या १ ९९ १ साली भारताचे पंतप्रधान झाले , तेव्हा त्यांच्याकडे आर्थिक संकटात पडलेल्या व हिंसक आंदोलनांनी ग्रस्त झालेल्या देशाची सूत्रं आली . त्यांचा पक्षही तेव्हा त्यांच्यावर विश्वास ठेवत नव्हता.

संसदेत त्यांचा पक्ष अल्पमतात होता , शिवाय त्यांना ‘१० , जनपथ ‘ च्या सावलीत सत्ता चालवावी लागत होती . आणि तरीही राव यांनी भारताला देशात व परदेशात नवी ओळख मिळवून दिली . जगातील मोजक्याच नेत्यांनी इतकी कमी सत्ता असताना इतका मोठा बदल घडवून आणलेला दिसतो.

राव यांच्या यापूर्वी कधीच प्रकाशात न आलेल्या खाजगी कागदपत्रांचा अभ्यास करून आणि शंभरहून अधिक मुलाखती घेऊन विनय सीतापती यांनी हे चरित्र लिहिलं आहे . भारतीय अर्थव्यवस्था , आण्विक कार्यक्रम , परराष्ट्र धोरण व बाबरी मशीद अशा विविध मुद्द्यांवर या चरित्रातून नव्याने प्रकाश टाकण्यात आला आहे . तेलंगणातील एका गावातून केंद्रीय सत्तेपर्यंतचा आणि तिथून पुन्हा अपमानित निवृत्तीपर्यंतचा राव यांचा जीवनप्रवास रेखाटताना ,या पुस्तकात त्यांच्या आंतरिक खळबळीचीही दखल घेण्यात आली आहे . त्यांचं तणावदायक बालपण , त्यांचे भ्रष्ट व्यवहार व प्रेमसंबंध, त्यांचा सततचा एकाकीपणा यांचीही नोंद हे पुस्तक घेतं.

एका प्रतिभाशाली राजनीतीज्ञाची अकथित कहाणी… नरसिंहावलोकन!


 

375.00 Add to cart

युद्धखोर अमेरिका


अतुल कहाते यांनी एमबीए केलं असून माहिती व तंत्रज्ञान या क्षेत्रात ‘सिंटेल’, ‘अमेरिकन एक्स्प्रेस’, ‘डॉयचे बँक’, ‘लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक’, ‘ओरॅकल’ अशा नामांकित कंपन्यांमध्ये सतराहून जास्त वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या बाराव्या वर्षापासूनच त्यांनी वर्तमानपत्रांमध्ये विविध सदरं लिहायला सुरुवात केली. आजपर्यंत त्यांचे चार हजारच्या वर लेख व सदरं प्रसिद्ध मराठी वृत्तपत्र व मासिकांमधून प्रकाशित झाली आहेत. दूरदर्शन व इतर मराठी टीव्ही चॅनेल्सवर अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांनी विशेषज्ञ म्हणून सहभाग घेतला आहे. आयआयटी, सिंबायोसिस, फर्ग्युसन, इंदिरा, गरवारे, एमआयटी इ. अनेक संस्थांमध्ये गेस्ट लेक्चरर म्हणून त्यांनी काम केलं आहे. ‘इंद्रधनू’ - ‘म.टा.’, ‘कॉम्प्यूटर सोसायटी ऑफ इंडिया’, ‘इंदिरा एक्सलन्स अॅदवॉर्ड’ व म.सा.प.चा ‘ग्रंथकार पुरस्कार’ असे अनेक प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

देशाची साखरेची गरज भागवण्यासाठी उद्ध्वस्त केलेली हवाई बेटं…
एका खासगी कंपनीमार्पâत गिळंकृत केलेला हाँडुरस देश…
मुजाहिदींना पुरवलेली शस्त्रास्त्रं आणि बेचिराख केलेला अफगाणिस्तान…
व्हीएतनाममध्ये केलेला नरसंहार…
विनाकारण घुसून सद्दामचा काढलेला काटा आणि इराकचं केलेलं ध्वस्तीकरण…
जगावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी
अमेरिकेने अनेक देशांमध्ये ढवळाढवळ केल्याची
अशी कितीतरी उदाहरणं देता येतील
— कधी त्यांनी तिथली सरकारं उलथवून लावली,
कधी बंडखोरांना शस्त्रास्त्रसाठा पुरवला,
तर कधी थेट आक्रमणंच केली…
सुप्रसिद्ध लेखक अतुल कहाते यांनी अशा
‘अमेरिकापीडित’ १६ देशांच्या ‘केस स्टडीज’
अभ्यासपूर्णरीत्या या पुस्तकात मांडल्या आहेत.
त्याआधारे त्यांनी अमेरिकेच्या वर्चस्ववादाचं विवेचन करून
परखड चिकित्सा केली आहे.
‘लोकशाहीवादी, खुल्या विचारांचा, संपन्न व समृद्ध देश’,
‘नशीब कमावण्याची स्वप्नभूमी’
अशी ओळख असलेल्या अमेरिकेची
आक्रमक बाजू समोर आणणारा पुस्तकरूपी दस्तऐवज…
‘युद्धखोर अमेरिका’!


375.00 Add to cart

हृषीकेश गुप्ते संग्रहिका

३ पुस्तकांत… २ लघुकादंबऱ्या, २ दीर्घ कथा


शिक्षणाने आणि व्यवसायाने केमिकल इंजिनिअर असलेले हृषीकेश गुप्ते हे मराठी साहित्यातले आजचे आघाडीचे तरुण सर्जनशील लेखक आहेत. रायगड जिल्ह्यातील नागोठणे या गावी त्यांच्या जन्म झाला आणि शिक्षणही तिथेच झाले. 2000 सालापासून त्यांनी लेखनाला सुरुवात केली आणि 2008 सालापासून त्यांचं लेखन विविध नियकालिकांमधून प्रसिद्ध झालं. मनातली भीतीची आदिम भावना, माणसाच्या लैंगिक प्रेरणा, त्याच्या भावभावनांची उलघाल ही त्यांच्या लेखनाची मुख्य आशयसूत्रं होतं. गूढ-अद्भुतता, चित्रमय, प्रासादिक व ओघवती भाषा या लेखनवैशिष्ट्यांमुळे त्यांचं लेखन खिळवून ठेवतं. 'दंशकाल’, 'चौरंग' या कादंबऱ्या, 'काळजुगारी’, 'हाकामारी' या लघुकादंबऱ्या आणि 'अंधारवारी’, ‘दैत्यालय’, 'घनगर्द’, 'परफेक्टची बाई, फोल्डिंगचा पुरुष' हे कथासंग्रह अशी त्यांची एकूण साहित्यसंपदा प्रकाशित आहे. विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांनी 'दिल, दिमाग और बत्ती’ या चित्रपटाचं आणि 'हजार वेळा शोले पाहिलेला माणूस’ या स्वलिखित कथेवर आधारित चित्रपटाचं दिग्दर्शनही केलं आहे.

स्थलकालाची रोचक, अद्भुत आणि रम्य सफर

घडवणारी, मराठी रूपककथांच्या दालनात

मोलाची भर घालणारी लघुकादंबरी… काळजुगारी

 

पारंपरिक कथांचे रचनाबंध वापरून

स्त्री-पुरुष संबंधांतले आदिम पदर उलगडणाऱ्या

दोन अनोख्या दीर्घ कथा…परफेक्टची बाई फोल्डिंगचा पुरुष

 

गूढ रहस्याच्या परिघाभोवती क्रौर्य आणि करुणेचे

अस्तर ल्यालेली, अंताला सार्वकालिक सामाजिक आशयाच्या

वेगळ्या उंचीला पोहोचवणारी लघुकादंबरी…हाकामारी


360.00 Add to cart

अयोध्या ते वाराणसी

भाजपच्या प्रवासाची आँखों देखी हकीगत


लालकृष्ण अडवाणी यांनी १९९० मध्ये सोमनाथच्या मंदिरापासून अयोध्येच्या दिशेने काढलेली रथयात्रा मुंबईत आली, तेव्हापासूनच्या या प्रवासाकडे 'दिसलं तसं, बघितलं जसं...' या नजरेने पाहणारा पत्रकार.. पुढे अयोध्येत बाबरी मशीद जमीनदोस्त झाल्यावर १९९२-९३ मध्ये मुंबईत सुरू झालेल्या दंग्यांचा साक्षीदार. उत्तर प्रदेशातील १९९९ पासूनच्या तीन लोकसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१४ मध्ये वाराणसी मतदार संघातील घडामोडींचं प्रत्यक्ष भेट देऊन विश्लेषण. लोकसभा (२०१९ ) बिहार विधानसभा उत्तर प्रदेश ( २०१७ ), गुजरात ( २००७ ) यांचं प्रत्यक्षदर्शी विश्लेषण. 'महाराष्ट्र टाइम्स' या वृत्तपत्राच्या माध्यमातून तीन दशकांहून अधिक काळ पत्रकारिता त्यातून मुंबई महानगराची जडणघडण तसंच शिवसेना यांच्याविषयीच्या कुतुहलाचं अभ्यासात रूपांतर. शिवसेनेच्या पहिल्या तीन दशकांच्या इतिहासाचा प्रथमच विवेचक आढावा घेणारं पुस्तक, 'जय महाराष्ट्र' १९९ ७ मध्ये प्रकाशित. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्याच पुस्तकाचं पुनर्लेखन. राजकारणी, नोकरशहा आणि बिल्डर यांचं साटंलोटं उघड करणारं 'मुंबई ऑन सेल' पुस्तक २०१० मध्ये प्रकाशित. 'म.टा.' मध्ये तीन दशकं राजकीय तसंच सांस्कृतिक बातमीदारीबरोबरच महानगरी, झोत, प्रसंग, बहर, पेनड्राइव्ह अशा विविध सदरांचे लेखन. 'झोत' याच नावानं निवडक व्यक्तिचित्रांचा संग्रह व भेटलेल्या अनेक सुहृदांचा आणि आठवणींचा कोलाज 'मित्रमयजगत' ही पुस्तकं प्रकाशित. सनदी अधिकारी एस. एस. गिल यांच्या 'करप्शन ऑफ पॅथॉलॉजी' या ग्रंथाचा 'भ्रष्टांगण' तर ज्युलियन क्रेडॉल हॉलिक यांनी गंगोत्री ते कोलकाता असा प्रवास करून लिहिलेल्या पुस्तकाचा 'गंगा' याच शीर्षकानं अनुवाद. सध्या 'सकाळ' माध्यम समूहात राजकीय संपादक .

भारतीय जनता पक्षाचा सत्तेपर्यंत पोचण्याचा खऱ्या अर्थाने प्रवास सुरु झाला तो १९९० च्या ‘सोमनाथ ते अयोध्या’ रथयात्रेपासून… तेव्हा ‘भाजप’चं नेतृत्व होतं वाजपेयी अडवाणी यांच्याकडे. नंतर १९९८ पासून सहा वर्षं सत्तेवर राहिल्यानंतर २००४ साली ‘भाजप’ला सत्तेवरून पायउतार व्हावं लागलं… आणि तेव्हापासून पक्षसंघटना ढवळून निघायला सुरुवात झाली . पुढे नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली अधिक आक्रमक होत , ‘भाजप’ ने २०१४ ची लोकसभा निवडणूक लढवली… आणि हा पक्ष पुन्हा सत्तारूढ झाला… व तेथून ‘भाजप २.०’ची सुरुवात झाली . २०१४ च्या निवडणूकीचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे मोदी यांनी ‘वाराणसी’ येथूनही लोकसभेची जागा लढवली आणि त्याच जागेचं प्रतिनिधित्व कायम ठेवलं…
हा सर्व प्रवास ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी ‘दिसलं तसं… बघितलं जसं’ या शैलीत पुस्तकात मांडला आहे. पंचवीस वर्षांचा हा प्रवास सांगता – सांगता अकोलकर दीनदयाळ उपाध्याय, शामा प्रसाद मुखर्जी, जनसंघ… अशा पूर्वेतिहासाचाही आढावा घेतात आणि या सर्व प्रवासाचं वस्तुनिष्ठपणे विश्लेषणही करतात.
भाजपच्या वाटचालीचा समग्रपणे मागोवा घेणारं मराठीतलं महत्वाचं पुस्तक… अयोध्या ते वाराणसी !
340.00 Add to cart

माझ्या धडपडीचा कार्यनामा

उद्योग, व्यवस्थापन… लेखन, समाजकार्य… एक उद्बोधक मुशाफिरी!


B.Tech ( Mumbai ) , M.B.A. ( I.I.M. Calcutta ) , Ph.D. ( Pune ) मुंबईत ५ वर्षे नोकरी ( Tata Economic Consultancy , Mukand Iron ) युक्रांदमधे सहभाग , दोन वर्षे उदगीरमधे पूर्णवेळ काम अभ्यासाचा मुख्य विषय : शेतकऱ्यांपर्यंत नवे तंत्रज्ञान कसे पोहचवावे ? स्त्रीमुक्ती चळवळ , लोकविज्ञान चळवळ यात सहभाग बेरोजगार तरुण आणि जमीन गमावलेले आदिवासी यांच्याबरोबर सत्याग्रहात सहभाग , प्रत्येक वेळी १५ दिवसांचा कारावास . Marketing and Econometric Consultancy Services ( METRIC ) या भारतातील सर्वात मोठ्या आणि २ ९ देशात कारभार असलेल्या व्यवस्थापन सल्लागार संस्थेचे प्रवर्तक आणि २५ वर्षे अध्यक्ष Distinguished Professor , INDSEARCH , Savitribai Phule Pune University . • विविध विषयांवर वैचारिक लेखन. • सध्या ' विचारवेध ' व्यासपीठाचे समन्वयक म्हणून कार्यरत

माझ्या धडपडींचा कार्यनामा ‘आयआयटी’ आणि ‘आयआयएम’ सारख्या प्रतिष्ठित शिक्षण संस्थांमधून साठ – सत्तरच्या दशकांत विद्यार्थी म्हणून घडताना, एक तरूण भवतालच्या समाजाकडेही संवेदनशीलतेने बघत होता…. तर करियर घडवताना, लठ्ठ पगाराच्या विळख्यात अडकून नोकरी एके नोकरी न करता विविध क्षेत्रांत कल्पक संकल्पनांचा अवलंब करत होता… अनेक प्रयोग करत खऱ्या अर्थाने कार्यरत होता. मॅनेजमेन्ट क्षेत्रातील गुरू आणि सामाजिक चळवळीतील पूर्णवेळ कार्यकर्ता अशा दोन ध्रुवांवरच्या भूमिका निभावत विधायक काम करू पाहणारा हा धडपड्या म्हणजे आनंद करंदीकर..
‘इंडसर्च’ या प्रसिद्ध मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या स्थापनेमध्ये त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे . ‘मेट्रिक कन्सल्टन्सी लि.’  ही भारतातील अव्वल दर्जाची मार्केट रिसर्च आणि कन्सल्टन्सी फर्म त्यांनी दूरदृष्टी ठेवून उभारली. या कंपनीच्या माध्यमातून शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागातील युवकांमधील कौशल्य विकसित करून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. सामाजिक कामाच्या आघाडीवर ‘युक्रांद’ , ‘जनवादी महिला संघटना’ , ‘लोकविज्ञान संघटना’ अशा संघटनांसोबत अनेक संघर्षात्मक आणि विधायक कामं त्यांनी केली. या पुस्तकात त्यांनी आपल्या अशाच अनेक धडपडींना स्वतःच्या खास शैलीत शब्दबद्ध केलं आहे. हे सर्व कार्यानुभव वाचतांना जाणवते ती त्यांची काम करण्याची तळमळ, कामाकडे बघण्याचा व्यावसायिक दृष्टिकोन, कमालीची कल्पकता आणि अचंबित करणारा उत्साह !
एका प्रसिद्ध कवीचा मुलगा ही ओळख मागे टाकत दोन टोकांवरच्या प्रवासातील उड्या घेत केलेल्या आनंदी धडपडीचा हा प्रामाणिक लेखाजोखा … अर्थात माझ्या धडपडीचा कार्यनामा !

 

395.00 340.00 Add to cart

स्मॅशिंग डॅशिंग कथा

३ पुस्तकांचा संच


गीतांजली भोसले यांचा जन्म सोलापूरचा , बालपण पुण्यातलं . त्यांनी मुंबई विद्यापीठातून बी.एस.डब्लू . आणि पुणे विद्यापीठातून मास कम्युनिकेशन या पदव्या संपादित केल्या आहेत . आय.टी. क्षेत्रात त्यांनी कॉन्टेन्ट रायटर आणि इंस्ट्रक्शनल डिजायनर म्हणून काही काळ नोकरी केली आणि तिथूनच त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली . पुणे विद्यापीठात त्यांनी सहअध्यापक म्हणून काम केलं आहे. गेल्या काही वर्षांपासून त्या बेल्जियम येथे स्थायिक आहेत . वेगवेगळ्या भाषा शिकण्याची त्यांना विशेष आवड आहे . ' अँटवर्प युनिव्हर्सिटी'मध्ये त्या फ्रेंच भाषा शिकत आहेत . सध्या वाचन आणि भटकंती हे त्यांचे छंद आहेत . विविध देशात फिरून , तिथले अनुभव घेणे , त्या देशातील संस्कृती अभ्यासणे आणि त्यावर लिहिणे यामध्ये त्या विशेष रमतात . त्यांच्या भटकंतीमध्ये इतर देशातील लहान मुलांची पुस्तकं बघत असतांना आपल्या देशातील बालसाहित्यातही काही नवं देण्याच्या उद्देशाने त्यांनी लिखाणाला सुरुवात केली .

कोणत्यातरी भुल्या बिसऱ्या काळातल्या नाहीत .. आज्जी – आजोबांनी सांगितलेल्याही नाहीत … या आहेत मोबाइल युगातल्या स्मार्ट मुला – मुलींच्या रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या ताज्या , खुसखुशीत आणि हॅपनिंग कथा ! साहसी … गुंतवून ठेवणाऱ्या …. कल्पनेच्या जगात घेऊन जाणाऱ्या … वेगळा विचार देणाऱ्या आणि नकळत तुम्हाला आयुष्याचं सार हलकेच सांगून जाणाऱ्या अशा या ६ स्मॅशिंग डॅशिंग कथा …  

१.त्रिकाळ + १ कथा

२. अनन्या मिसिंग केस+ १ कथा

३. कनुस्मृती + १ कथा


 

300.00 Add to cart

योगाचार्य

बी.के.एस. अय्यंगार यांचं चरित्र



अनुवाद : 
‘रोहन प्रकाशन’च्या संपादन विभागात नीता कार्यरत असून संपादन, अनुवाद आणि लेखन क्षेत्रांत त्या गेली दहा वर्षं काम करत आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे आत्मचरित्र– ‘ड्रीम्स फ्रॉम माय फादर', ‘सुपरपॉवर?', ‘सिल्वा माइंड कंट्रोल' आणि ‘त्या दिवशी माझा मृत्यू झाला...' ही त्यांनी अनुवाद केलेली पुस्तकं. ‘सुपरपॉवर?' या त्यांच्या पुस्तकाला ‘नाशिक सार्वजनिक ग्रंथालया’चा सर्वोत्कृष्ट अनुवादाचा पुरस्कार मिळाला असून त्या कथालेखनही करतात. त्यांच्या कथांना पुरस्कारदेखील मिळाले आहेत.


कर्नाटकातल्या एका लहानशा खेड्यातून बी.के.एस. अय्यंगार यांच्या कष्टप्रद जीवनप्रवासाला सुरुवात झाली. कुमारवयापासूनच त्यांना सुप्रसिद्ध योगतज्ज्ञ कृष्णमाचार्य यांचा सहवास लाभला व त्यांच्यात गुरु-शिष्य नातं निर्माण झालं. मात्र हे गुरु-शिष्य संबंध कायमच तणावपूर्ण राहिले, तरी अय्यंगारांनी मोठ्या जिद्दीने कृष्णमाचार्यांकडून योगविद्या शिकून घेतली.

भविष्य घडवण्यासाठी पुणे शहरात आल्यावर अय्यंगारांच्या जीवनाला वेगळं वळण लाभलं. या अनोळखी शहरात जम बसवायला अय्यंगारांना बराच संघर्ष करावा लागला… जणू काही ती त्यांची आणि योगविद्येची कसोटीच होती. आणि त्या संघर्षात ते यशस्वी झाले! त्यांची कीर्ती देशविदेशात पसरली. एवढी की, आंतरराष्ट्रीय पातळीवर योग आणि अय्यंगार हे अतूट समीकरण तयार होऊन ‘अय्यंगार योग’ अशी जणू एक वेगळी शाखाच निर्माण झाली. अय्यंगारांनी निरामय आयुष्यासाठी योग किती महत्त्वाचा आहे हे सर्वसामान्यांच्या मनावर ठसवलं, विविध साधनांचा वापर सुचवून योग लोकप्रिय केला.

रश्मी पालखीवाला या अय्यंगारांच्या निकटवर्तीयांपैकी एक होत. या पुस्तकात त्यांनी अय्यंगार यांच्या जीवनातले चढ-उतार, त्यांचे स्वभावविशेष उत्कटतेने चितारले आहेत, तसंच योगसाधनेकडे पाहायचा गुरुजींचा दृष्टिकोन आणि त्यामागचं त्यांचं तत्त्वज्ञानही विशद केलं आहे.

जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत योगसाधना हा ध्यास असलेल्या हाडाच्या योगशिक्षकाचं चरित्र…योगाचार्य !


A saga of a Maestro, who made study and practice of yoga his life mission. A profound biography of Yogacharya B. K. S. Iyyangar, an Internationally renowned yoga teacher, practitioner and a thinker. This book speaks about his childhood, hardships- he faced, his stern and over-strict guru, his struggle to popularize yoga among common people, his popularity and the respect he earned through out the world. Written by the member of one of his close family friends, Rashmi Palkhiwala, this book is a must-read for everyone who wants to know how Shri. Iyyangar made Yoga the matter of pride in the world.


300.00 Add to cart

भगवद्गीता : गांधीजींच्या चिंतनातून

महात्मा गांधी यांनी जनसामान्यांसाठी भगवद्गीतेचं केलेलं नेमकं विवेचन


 

अनुवाद :

पत्रकारितेच्या क्षेत्रांत सुमारे ३० वर्षांहून अधिक काळ भगवान दातार कार्यरत आहेत. त्यांनी लोकसत्ता, केसरी, लोकमत, तरुणभारत, पुढारी, प्रभात आदी दैनिकात विविध पदांवर काम केलं आहे. तरुणभारत, पुणेच्या संपादकपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली. विविध घटनांच्या वृत्तांकनासाठी पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, जम्मू-काश्मीर, कर्नाटक आदी राज्यांचा त्यांनी दौरा केला असून लोकसभेच्या कामकाजाचे वृत्तांकनही त्यांनी केलं आहे. त्यांनी रामजन्मभूमी प्रकरणाच्या वेळी अयोध्येत उपस्थित राहून वार्तांकन केलं होतं. त्यांनी संरक्षण मंत्रालयाचा वॉर करस्पाँडन्टचा अभ्यासक्रम महू, नासिराबाद, जोधपूर, दिल्ली आणि कोचीन येथून पूर्ण केला आहे. त्यांची ‘टु द लास्ट बुलेट’, ‘शेवट नसलेलं युद्ध’, ‘बी किंमग इंडियन’ ही अनुवादित पुस्तके गाजली. ‘खिल्ली’ हे राजकीय विडंबनपर लेखांचं स्वतंत्र विनोदी पुस्तक आणि आयएस अधिकाऱ्यांच्या कामाबद्दल ‘कलेक्टिव्ह एनर्जी’ या पुस्तकाचं संपादन केलं आहे. ‘सरदार वल्लभभाई पटेल' व ‘फील्ड मार्शल सॅम माणेकशा' ही त्यांनी अनुवादित केलेली पुस्तकं वाचकप्रिय आहेत.


‘महाभारत’ या ग्रंथातील मुगुटमणी म्हणजे ‘भगवद्गीता’! भगवद्गीतेने शतकानुशतकं अनेक विचारवंतांना आणि आध्यात्मिक चिंतकांना भुरळ घातली आहे. अनेकांनी गीतेचा अर्थ आणि रोजच्या आयुष्यातील प्रश्नं यांच्यातील नातं शोधायचा प्रयत्न केला आहे.

पण या पुस्तकाचं वेगळेपण म्हणजे आयुष्यभर ज्यांनी अहिंसेची कास धरली, त्या महात्मा गांधी यांनी या पुस्तकात कौरव-पांडवांतील युद्धाचं रूपक मांडत सांगितलेल्या गीतेवर स्वत:चं विवेचन मांडलंय.

अनासक्ती योग, कर्मयोग आणि सत्यपालन या गीतेतल्या महत्त्वाच्या पैलूंवर प्रकाश टाकत यातल्या सर्व अध्यायांवर असलेलं गांधीजींचं हे चिंतन एक वेगळा आयाम समोर मांडतं. आजच्या काळाशी गीताविचाराचा संदर्भ जोडणारं महात्मा गांधी यांचं प्रगल्भ चिंतन – भगवद्गीता : गांधीजींच्या चिंतनातून


300.00 Add to cart
1 2 4