“सह्याद्रीचे वारे” has been added to your cart. View cart


सह्याद्रीचे वारे
₹300.00
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री तसेच स्वातंत्र्य चळवळीत सहभागी असलेले आदरणीय द्रष्टे व मुत्सद्दी नेते यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची मूलभूत पायाभरणी केली. सामान्य कुटुंबातून आलेले चव्हाण हे जनसामान्यांचे पुढारी म्हणून ओळखले जातात. त्यांना स्वतःच्या बलस्थानांची आणि मर्यादांची पुरेपूर जाणीव असल्याने त्यांनी तत्त्वनिष्ठ व्यवहारवादाचे पालन केले. लोकशाहीच्या शक्तीवर त्यांचा अतूट विश्वास असल्यामुळे त्यांनी न्यायपूर्ण समाजाच्या बांधणीसाठी आवश्यक असलेल्या धोरणांबाबत पुढाकार घेऊन त्यांना पाठिंबा दिला. चव्हाण एक समतोल विचारवंत, सिद्धहस्त लेखक, प्रतिभावान वक्ते, चाणाक्ष मुत्सद्दी तसेच द्रष्टे प्रशासक होते व त्यांनी लोकहिताच्या अनेक धोरणांवर आपला ठसा उमटवला.
अनलंकृत शैलीत त्यांनी केलेलं लेखन हे मनाला स्पर्श करून जातंच, शिवाय ते आपल्याला समाजकारण, राजकारण यांचं सखोल भानही देतं.
माझा गेल्या तीस वर्षांचा जो अनुभव आहे त्यावरून मी असे पाहिले आहे की, कुठल्याही राजकीय पक्षामध्ये थोडेच लोक असतात. बहुसंख्य जनता ही पक्षाच्या बाहेर असते, असे माझे स्वत:चे मत आहे. आणखी ती जनता काही अमक्याच एका पक्षाशी बांधली गेलेली असते असेही नाही. आपला मार्ग युक्त आहे आणि चांगला आहे, हे या जनतेला पटविण्याची जबाबदारी त्या त्या पक्षावर असते. जो पक्ष हे करतो तो राजकारणामध्ये यशस्वी होतो असा आत्तापर्यंतचा अनुभव आहे आणि हाच अनुभव याच्यापुढेही राहणार आहे असे मी मानतो.”
-यशवंतराव चव्हाण
Want a discount? Become a member, sign up for a subscription plan.
Reviews
There are no reviews yet.