अयोध्या ते वाराणसी

भाजपच्या प्रवासाची आँखों देखी हकीगत


लालकृष्ण अडवाणी यांनी १९९० मध्ये सोमनाथच्या मंदिरापासून अयोध्येच्या दिशेने काढलेली रथयात्रा मुंबईत आली, तेव्हापासूनच्या या प्रवासाकडे 'दिसलं तसं, बघितलं जसं...' या नजरेने पाहणारा पत्रकार.. पुढे अयोध्येत बाबरी मशीद जमीनदोस्त झाल्यावर १९९२-९३ मध्ये मुंबईत सुरू झालेल्या दंग्यांचा साक्षीदार. उत्तर प्रदेशातील १९९९ पासूनच्या तीन लोकसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१४ मध्ये वाराणसी मतदार संघातील घडामोडींचं प्रत्यक्ष भेट देऊन विश्लेषण. लोकसभा (२०१९ ) बिहार विधानसभा उत्तर प्रदेश ( २०१७ ), गुजरात ( २००७ ) यांचं प्रत्यक्षदर्शी विश्लेषण. 'महाराष्ट्र टाइम्स' या वृत्तपत्राच्या माध्यमातून तीन दशकांहून अधिक काळ पत्रकारिता त्यातून मुंबई महानगराची जडणघडण तसंच शिवसेना यांच्याविषयीच्या कुतुहलाचं अभ्यासात रूपांतर. शिवसेनेच्या पहिल्या तीन दशकांच्या इतिहासाचा प्रथमच विवेचक आढावा घेणारं पुस्तक, 'जय महाराष्ट्र' १९९ ७ मध्ये प्रकाशित. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्याच पुस्तकाचं पुनर्लेखन. राजकारणी, नोकरशहा आणि बिल्डर यांचं साटंलोटं उघड करणारं 'मुंबई ऑन सेल' पुस्तक २०१० मध्ये प्रकाशित. 'म.टा.' मध्ये तीन दशकं राजकीय तसंच सांस्कृतिक बातमीदारीबरोबरच महानगरी, झोत, प्रसंग, बहर, पेनड्राइव्ह अशा विविध सदरांचे लेखन. 'झोत' याच नावानं निवडक व्यक्तिचित्रांचा संग्रह व भेटलेल्या अनेक सुहृदांचा आणि आठवणींचा कोलाज 'मित्रमयजगत' ही पुस्तकं प्रकाशित. सनदी अधिकारी एस. एस. गिल यांच्या 'करप्शन ऑफ पॅथॉलॉजी' या ग्रंथाचा 'भ्रष्टांगण' तर ज्युलियन क्रेडॉल हॉलिक यांनी गंगोत्री ते कोलकाता असा प्रवास करून लिहिलेल्या पुस्तकाचा 'गंगा' याच शीर्षकानं अनुवाद. सध्या 'सकाळ' माध्यम समूहात राजकीय संपादक .

भारतीय जनता पक्षाचा सत्तेपर्यंत पोचण्याचा खऱ्या अर्थाने प्रवास सुरु झाला तो १९९० च्या ‘सोमनाथ ते अयोध्या’ रथयात्रेपासून… तेव्हा ‘भाजप’चं नेतृत्व होतं वाजपेयी अडवाणी यांच्याकडे. नंतर १९९८ पासून सहा वर्षं सत्तेवर राहिल्यानंतर २००४ साली ‘भाजप’ला सत्तेवरून पायउतार व्हावं लागलं… आणि तेव्हापासून पक्षसंघटना ढवळून निघायला सुरुवात झाली . पुढे नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली अधिक आक्रमक होत , ‘भाजप’ ने २०१४ ची लोकसभा निवडणूक लढवली… आणि हा पक्ष पुन्हा सत्तारूढ झाला… व तेथून ‘भाजप २.०’ची सुरुवात झाली . २०१४ च्या निवडणूकीचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे मोदी यांनी ‘वाराणसी’ येथूनही लोकसभेची जागा लढवली आणि त्याच जागेचं प्रतिनिधित्व कायम ठेवलं…
हा सर्व प्रवास ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी ‘दिसलं तसं… बघितलं जसं’ या शैलीत पुस्तकात मांडला आहे. पंचवीस वर्षांचा हा प्रवास सांगता – सांगता अकोलकर दीनदयाळ उपाध्याय, शामा प्रसाद मुखर्जी, जनसंघ… अशा पूर्वेतिहासाचाही आढावा घेतात आणि या सर्व प्रवासाचं वस्तुनिष्ठपणे विश्लेषणही करतात.
भाजपच्या वाटचालीचा समग्रपणे मागोवा घेणारं मराठीतलं महत्वाचं पुस्तक… अयोध्या ते वाराणसी !
340.00 Add to cart

‘ती’चं अवकश

रुढी – परंपरांची चौकट मोडून स्वत : चं क्षितिज शोधणाऱ्या तीन पिढ्या


मुंबई विद्यापीठातून मराठी हा विषय घेऊन वैशंपायन यांनी पीएचडी केली असून मराठी व संस्कृत या विषयांमध्ये एम.ए. केलं आहे. दुर्गा भागवत यांच्या ललित गद्याचा चिकित्सक अभ्यास हा पीएचडीचा विषय होता. गेली दोन दशकं विविध नियतकालिकं आणि दिवाळी अंकांमधून समीक्षा पर्व ललित लेखन करीत आहेत. सरस्वती सन्मान, जनस्थान पुरस्कार, चतुरंग जीवनगौरव पुरस्कार, केशवराव कोठावळे पुरस्कार यांसारख्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार समित्यांवर त्यांनी मानद परीक्षक म्हणून काम केलं असून त्या एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईच्या मानद उपाध्यक्ष म्हणून सध्या कार्यरत आहेत.

स्त्रीजीवनाचा अभ्यास करताना भारतीय समाजातील पुरुषी मनोवृत्तीच्या अनेक खुणा , पितृप्रधानतेचे अनेक पैलू सातत्याने पुढे येतात आणि त्यातील केंद्र बहुधा पुरुषांनी केलेले अत्याचार , स्त्रीचं शोषण हेच असतं . ‘ ती’चं अवकाश या पुस्तकात मात्र बारा जणींच्या अशा बारा कहाण्या आहेत , ज्यातून स्त्रियांनी स्वत : चा वेगळा मार्ग तर शोधला आहेच , पण इतरांना विचारप्रवृत्त करणाऱ्या हकीगतीही सांगितल्या आहेत . आपापल्या कुटुंबातील नातेसंबंधांचा शोध घेताना त्यांनी विशेषत : आपल्या आधीच्या तीन पिढ्यांमधील स्त्रियांनी आपल्या अस्तित्वासाठी केलेला संघर्ष आणि स्वत : साठी मिळवलेला पैस यांचं चित्रण केलं आहे . जवळ जवळ एका शतकातील स्त्रियांचं कुटुंबातील स्थान , त्यांची सामाजिक स्थिती यांचं वास्तव प्रतिबिंब यात दिसतं . वैयक्तिक अनुभवांवर आधारित या कथनांमध्ये सामाजिक इतिहासाबरोबर भावनिक बंधही गुंतलेला आहे व त्यामुळे त्या कहाण्या अधिक रोचक व हृद्य झाल्या आहेत . आजी , आई , आपण स्वत : व आपल्या मुली यांच्या नात्यांमधील हा गोफ सामाजिक इतिहासाचं एक अस्सल साधन तर आहेच , पण स्त्रीअभ्यासाचा एक लक्षणीय पैलू म्हणूनही त्याचं महत्त्व आहे . या बारा जणींचं कर्तृत्व कोणत्या भक्कम आधारावर उभं आहे व त्यांच्या स्वातंत्र्यासाठी कोणती किंमत दिली गेली आहे याचं सम्यक दर्शन या कथनांद्वारे घडतं . या साऱ्या कहाण्या यशस्वितेच्याच आहेत असं नाही , पण आईचा वा आजीचा अयशस्वी संघर्षही पुढच्यांना प्रेरक ठरणारा आहे . वेगवेगळ्या प्रदेशांतून , भिन्न आर्थिक स्तरांतून व भिन्न सांस्कृतिक वातावरणातून आलेल्या याँ लेखिका स्वानुभवकथनाबरोबरच सांस्कृतिक बदलांचंही दर्शन घडवतात . स्त्रीजीवनाच्या , स्त्रीसमस्यांच्या अभ्यासकांना या पुस्तकाने नवी सामग्री पुरवली आहे .


300.00 Read more

Fast Forward



Editor:


“Sharadji has had wide national and international experience in politics and public affairs, going beyond the State of Maharashtra, and this is naturally reflected in his thoughts compiled in this volume. I share many of his views, especially on economic policy, sustainable development and international trade. He is one of our most enlightened leaders deeply committed to harnessing modern science and technology for national development.”

– Manmohan Singh


499.00 Add to cart

भगवद्गीता : गांधीजींच्या चिंतनातून

महात्मा गांधी यांनी जनसामान्यांसाठी भगवद्गीतेचं केलेलं नेमकं विवेचन


 

अनुवाद :

पत्रकारितेच्या क्षेत्रांत सुमारे ३० वर्षांहून अधिक काळ भगवान दातार कार्यरत आहेत. त्यांनी लोकसत्ता, केसरी, लोकमत, तरुणभारत, पुढारी, प्रभात आदी दैनिकात विविध पदांवर काम केलं आहे. तरुणभारत, पुणेच्या संपादकपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली. विविध घटनांच्या वृत्तांकनासाठी पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, जम्मू-काश्मीर, कर्नाटक आदी राज्यांचा त्यांनी दौरा केला असून लोकसभेच्या कामकाजाचे वृत्तांकनही त्यांनी केलं आहे. त्यांनी रामजन्मभूमी प्रकरणाच्या वेळी अयोध्येत उपस्थित राहून वार्तांकन केलं होतं. त्यांनी संरक्षण मंत्रालयाचा वॉर करस्पाँडन्टचा अभ्यासक्रम महू, नासिराबाद, जोधपूर, दिल्ली आणि कोचीन येथून पूर्ण केला आहे. त्यांची ‘टु द लास्ट बुलेट’, ‘शेवट नसलेलं युद्ध’, ‘बी किंमग इंडियन’ ही अनुवादित पुस्तके गाजली. ‘खिल्ली’ हे राजकीय विडंबनपर लेखांचं स्वतंत्र विनोदी पुस्तक आणि आयएस अधिकाऱ्यांच्या कामाबद्दल ‘कलेक्टिव्ह एनर्जी’ या पुस्तकाचं संपादन केलं आहे. ‘सरदार वल्लभभाई पटेल' व ‘फील्ड मार्शल सॅम माणेकशा' ही त्यांनी अनुवादित केलेली पुस्तकं वाचकप्रिय आहेत.


‘महाभारत’ या ग्रंथातील मुगुटमणी म्हणजे ‘भगवद्गीता’! भगवद्गीतेने शतकानुशतकं अनेक विचारवंतांना आणि आध्यात्मिक चिंतकांना भुरळ घातली आहे. अनेकांनी गीतेचा अर्थ आणि रोजच्या आयुष्यातील प्रश्नं यांच्यातील नातं शोधायचा प्रयत्न केला आहे.

पण या पुस्तकाचं वेगळेपण म्हणजे आयुष्यभर ज्यांनी अहिंसेची कास धरली, त्या महात्मा गांधी यांनी या पुस्तकात कौरव-पांडवांतील युद्धाचं रूपक मांडत सांगितलेल्या गीतेवर स्वत:चं विवेचन मांडलंय.

अनासक्ती योग, कर्मयोग आणि सत्यपालन या गीतेतल्या महत्त्वाच्या पैलूंवर प्रकाश टाकत यातल्या सर्व अध्यायांवर असलेलं गांधीजींचं हे चिंतन एक वेगळा आयाम समोर मांडतं. आजच्या काळाशी गीताविचाराचा संदर्भ जोडणारं महात्मा गांधी यांचं प्रगल्भ चिंतन – भगवद्गीता : गांधीजींच्या चिंतनातून


300.00 Add to cart

आधुनिक भारताचे विचारस्तंभ


भारतातले ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ, संशोधक आणि स्तंभलेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी येल, स्टॅनफोर्ड आणि ऑस्लो या विद्यापीठांमधून तसंच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स इथे प्राध्यापक म्हणून काम केलं आहे. पर्यावरणाचा इतिहास, भारतीय क्रिकेटचा सामाजिक इतिहास, भारतीय लोकशाही यांसारख्या विविध विषयांवर त्यांनी मूलभूत लेखन केलं आहे. त्यांच्या पुस्तकांचे आणि निबंधांचे विविध भाषांमध्ये अनुवाद झाले असून ‘न्यू यॉर्क टाइम्स’ने सर्वोत्तम नॉन फिक्शन भारतीय लेखक म्हणून त्यांना नावाजलं होतं. तसंच ‘टाइम’ मासिकाने त्यांची भारतीय लोकशाहीचा सर्वांत नामवंत इतिहासकार असं म्हणून नोंद घेतली होती. आजवर त्यांना अनेक राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय पारितोषिकांनी सन्मानित केलं असून २००९ मध्ये त्यांना पद्मभूषण सन्मानाने गौरवण्यात आलं.

अनुवाद :

१९६५ सालापासून सुमारे २५ वर्षं लाल निशाण पक्ष व कामगार चळवळीत शारदा साठे यांचा सक्रिय सहभाग आहे. १९७५ सालापासून त्या स्त्री मुक्ती चळवळीत कार्यरत आहेत. स्त्री मुक्ती संघटनेच्या त्या संस्थापक सदस्य असून संघटनेच्या ‘प्रेरक ललकारी’ या मुखपत्राच्या त्या मुख्य संपादक आहेत. त्यांनी स्वतंत्र लेखनाबरोबरच विविध विषयांवरील पुस्तकांचा मराठीत अनुवाद केला आहे.


रामचंद्र गुहा यांचं नवं पुस्तक
‘भारत’ ही संकल्पना उलगडणारा ग्रंथ
MAKERS OF MODERN INDIA आता मराठीत
राममोहन रॉय, सय्यद अहमद खान, जोतीराव फुले, ताराबाई शिंदे, बाळ गंगाधर टिळक, रवींद्रनाथ ठाकूर, गोपाळ कृष्ण गोखले, महम्मद अली जीना, भीमराव आंबेडकर, ई.व्ही. रामस्वामी, राममनोहर लोहिया, एम.एस. गोळवलकर, मोहनदास गांधी, कमलादेवी चट्टोपाध्याय, जवाहरलाल नेहरू, जयप्रकाश नारायण, चक्रवर्ती राजगोपालाचारी, व्हेरियर एल्विन, हमीद दलवाई या १९ विचारवंतांच्या व्यक्तिरेखा व वैचारिक भूमिका यांचा एकाच ग्रंथातून परिचय करून देणारं व त्यातून भारताची वैचारिक जडणघडण स्पष्ट करणारं पुस्तक.


800.00 Add to cart

माझा भारत… उज्ज्वल भारत

युवकांसाठी प्रेरणादायी भाषणं



सहलेखक :
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबादमधून सृजन पाल सिंग यांनी शिक्षण घेतलं असून त्यांना 'चतुरस्र विद्यार्थी' म्हणून सुवर्णपदक मिळालं आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या भागांमध्ये पारदर्शक व्यवस्था उभारण्याच्या कामात ते 'बॉस्टन कन्सल्टिंग ग्रुप'सोबत काम करत आहेत. स्वित्झर्लंडमधील सेंट गॅलन सिम्पोसियम यांच्या 'ग्लोबल लीडर ऑफ टुमॉरो' या किताबासाठी त्यांचं नामांकन करण्यात आलं होतं . सृजन भारतातल्या ग्रामीण भागांत जाऊन तिथे कायमस्वरूपी विकासात्मक व्यवस्था तयार करता यावी, यासाठी विविध संस्थांसोबत काम करतात . महत्त्वाच्या नियतकालिकांमधून त्यांचे लेख प्रकाशित झाले असून ते सध्या गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या प्रकल्पात काम करत आहेत.

अनुवाद :
मराठीतल्या आघाडीच्या तरुण लेखकांमध्ये प्रणव सखदेव यांचं नाव घेतलं जातं. त्यांनी अग्रगण्य मराठी दैनिकांत पत्रकार म्हणून काम केलं असून ते मराठी प्रकाशन क्षेत्रामध्ये संपादक व अनुवादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कथा आणि कविता मान्यवर नियतकालिकांमधून प्रकाशित होत असतात. ‘पायऱ्यांचा गेम आणि इतर कविता’ हा कवितासंग्रह, 'निळ्या दाताची दंतकथा’, ‘नाभितून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य' हे कथासंग्रह, व ‘काळेकरडे स्ट्रोक्स', ‘96 मेट्रोमॉल’ या कादंबऱ्या असं त्यांचं साहित्य प्रकाशित झालं आहे. त्यांना अनुवाद-प्रकल्पासाठी २०१५-१६ सालची ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ची अभ्यासवृत्तीही मिळाली आहे. त्यांना लेखनासाठी महत्त्वाची पारितोषिकं मिळाली असून इंग्रजीतल्या गाजलेल्या पुस्तकांचा अनुवाद त्यांनी केला आहे. फिक्शन लेखन करणं ही त्यांची पॅशन असून त्यातून समकालातल्या प्रश्नांचा भिडणं हे त्यांना महत्त्वाचं वाटतं. आजच्या तरुणांची मानसिकता, त्यांचे प्रश्न, विखंडित जगणं व तंत्रज्ञानाचा वाढता वापर या सगळ्याचं प्रतिबिंब त्यांच्या लेखनात पडलेलं दिसून येतं.


२७ जुलै २०१५… याच दिवशी भारताचे माजी राष्ट्रपती आणि तरुणांचे लाडके शिक्षक डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचं निधन झालं. तरुणांना घडवणं हा त्यांचा ध्यास होता. त्यासाठीच ते आयुष्यभर देशा-परदेशांत तरुणांशी संवाद साधत फिरले. आणि म्हणूनच की काय, नियतीनेही त्यांना मृत्यू दिला तो विद्यार्थ्यांशी संवाद साधतानाच!
कलाम आता आपल्यात नसले, तरी ते विचाररूपाने कायमच आपल्यात असणार आहेत, त्यातून आपल्याला मार्गदर्शन करत राहणार आहेत. त्यांचे विचार अक्षररूपात आपल्यासमोर यावेत यासाठी कलाम यांचा निकटवर्तीय विद्यार्थी आणि सहलेखक सृजन सिंग पाल यांनी त्यांच्या भाषणातील निवडक उतार्‍यांचं संकलन या पुस्तकात केलं आहे.
प्रेम, सकारात्मकता, मूल्यांची जपणूक, जीवनाविषयक तत्त्वज्ञान, स्वप्नं पाहणं आणि परिश्रमाचं महत्त्वं आदी विषयांवरच्या या भाषणांमध्ये कलाम आपल्या आयुष्यातले अनुभव, कथा-कहाण्या आपल्याशी शेअर करतात. त्यातून आपल्याला एक संदेश मिळतो आणि त्यानुसार कृती करायची प्रेरणा मिळते.
या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाच्या विचारांचा प्रसार-प्रचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत – खास करून तरुण पिढीपर्यंत व्हावा म्हणून ही शब्दांजली माझा भारत…उज्ज्वल भारत !


195.00 Add to cart

मिशन इंडिया

तरुणांसाठी विकसित भारत एक ध्येय



सहलेखक :
यज्ञस्वामी सुंदर राजन यांचा जन्म १९४३ साली झाला असून ते 'कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री'चे मुख्य सल्लागार आणि 'बिट्स पिलानी' येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्याआधी ते पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार होते. उपग्रह कार्यक्रम, मॅपिंग सिस्टिम्स, उपग्रह हवामानशास्त्र आदी गोष्टींकरता ते इस्रोशीदेखील सलंग्न होते.

अनुवाद :
मराठीतल्या आघाडीच्या तरुण लेखकांमध्ये प्रणव सखदेव यांचं नाव घेतलं जातं. त्यांनी अग्रगण्य मराठी दैनिकांत पत्रकार म्हणून काम केलं असून ते मराठी प्रकाशन क्षेत्रामध्ये संपादक व अनुवादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कथा आणि कविता मान्यवर नियतकालिकांमधून प्रकाशित होत असतात. ‘पायऱ्यांचा गेम आणि इतर कविता’ हा कवितासंग्रह, 'निळ्या दाताची दंतकथा’, ‘नाभितून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य' हे कथासंग्रह, व ‘काळेकरडे स्ट्रोक्स', ‘96 मेट्रोमॉल’ या कादंबऱ्या असं त्यांचं साहित्य प्रकाशित झालं आहे. त्यांना अनुवाद-प्रकल्पासाठी २०१५-१६ सालची ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ची अभ्यासवृत्तीही मिळाली आहे. त्यांना लेखनासाठी महत्त्वाची पारितोषिकं मिळाली असून इंग्रजीतल्या गाजलेल्या पुस्तकांचा अनुवाद त्यांनी केला आहे. फिक्शन लेखन करणं ही त्यांची पॅशन असून त्यातून समकालातल्या प्रश्नांचा भिडणं हे त्यांना महत्त्वाचं वाटतं. आजच्या तरुणांची मानसिकता, त्यांचे प्रश्न, विखंडित जगणं व तंत्रज्ञानाचा वाढता वापर या सगळ्याचं प्रतिबिंब त्यांच्या लेखनात पडलेलं दिसून येतं.


भारत देश बदलण्याची ताकद भारतातल्या
तरुण पिढीत आहे, तीच भारताचं आशास्थान आहे.

तरुणांचे लाडके गुरू डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून देशाच्या प्रत्येक नागरिकापुढे – खासकरून तरुण पिढीपुढे एक मौलिक ध्येय ठेवलं आहे ते म्हणजे, `मिशन इंडिया’चं – विकसित राष्ट्र म्हणून भारताची मान आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावण्याचं, आपलं मानाचं स्थान निर्माण करण्याचं!
हे ध्येय साध्य करण्यासाठी कलाम यांनी विकसित देश म्हणजे काय, त्यांची लक्षणं, त्यांची अर्थव्यवस्था आणि भारताची सद्य:स्थिती यांबद्दल तपशीलवार विवेचन पुस्तकात केलं आहे. तसंच भारत विकसित देश व्हावा यासाठी आपण शेती, रसायन उद्योग आणि बायोटेक्नॉलॉजी, उत्पादननिर्मिती उद्योग, संरक्षण, सेवा क्षेत्र आणि शिक्षण व्यवस्था आदी क्षेत्रांमध्ये कशी प्रगती केली पाहिजे, त्यासाठी भविष्यात कोणती पावलं उचलली पाहिजेत याचा सहजसोप्या शब्दांत उदाहरणासह यात ऊहापोह केला आहे.
भारताच्या भविष्यकालीन विकासाच्या दिशेचं भान देणारं… सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणारं आणि त्यासाठी प्रत्यक्ष कृती करण्यास प्रेरणा देणारं पुस्तक…मिशन इंडिया !


140.00 Add to cart