ज्येष्ठ नागरिक संच


उत्तरायुष्य गुणवत्तापूर्ण जगण्यासाठी 


संचातील पुस्तके:

  • आनंदस्वर ज्येष्ठांसाठीचैतन्यमयी सेकंड इंनिंगसाठी सहज सोपं मार्गदर्शन , लेखिका : रोहिणी पटवर्धन
  • आपल्यासाठी आपणच : लेखिका: रोहिणी पटवर्धन 
  • आजी आजोबा आधार कि अडचण? : लेखक: भा. ल. महाबळ 
  • ज्येष्ठांसाठी ४ गोष्टी युक्तीच्या : लेखक : भा. ल. महाबळ  
  • साठी नंतरचा आहार व आरोग्य : शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी शास्त्रीय दृष्टिकोनातून केलेलं मार्गदर्शन ,लेखक : डॉ वर्षा जोशी 

655.00 Add to cart

आनंदस्वर ज्येष्ठांसाठी

चैतन्यमयी सेकंड इंनिंगसाठी सहज सोपं मार्गदर्शन


डॉ. रोहिणी पटवर्धन यांनी पीएच.डी. (पुणे विद्यापीठ), जाहिरातकलेतील एम.फिल, बी.कॉम एम.कॉम., बॅचलर ऑफ जर्नालिझम, डिप्लोमा इन जेरोन्टोलॉजी (टाटा सामाजिक विज्ञान संस्था), डिप्लोमा इन हायर एज्युकेशन ही शैक्षणिक अहर्ता प्राप्त केली आहे. ‘सनवल्र्ड सोसायटी फॉर सोशल सव्र्हिस’ या संस्थेच्या त्या संस्थापक असून त्यांना ३५ वर्षे अध्यापनाचा अनुभव आहे. त्या सध्या एम.आय.टी. कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या आहेत. त्यांचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांच्या आयोजनामध्ये सहभाग असून त्या प्रभाकर पाध्ये, कमल पाध्ये ट्रस्टच्या विश्वस्त आहेत. डॉ. रोहिणी पटवर्धन यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला त्यामुळे त्यांना शेतीची आवड असून त्या सध्या शेती करतात. त्यांनी ‘मिळून साऱ्याजणी’, ‘हंस’, ‘नवल’ इ. नियतकालिकांमधून कथा व ललित लेखन केले आहे. त्यांना स्वतंत्रपणे भटकंती, वाचन, शास्त्रीय संगीताची आवड आहे. त्यांना २०१६चा टाईम्स ऑफ इंडिया समुहाचा ‘प्रमाण सिनियर्स' पुरस्कार तसंच, २०१६चा अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संघटनेचा ‘वात्सल्य' पुरस्कार मिळाला आहे. डॉ. रोहिणी पटवर्धन यांनी वृद्धकल्याणशास्त्र या वृद्धांशी संबंधित असणाऱ्या विषयावर संशोधन करून पुणे विद्यापीठातून पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे. ‘वृद्धांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेले प्रश्न अतिशय गुंतागुंतीचे आहेत. ते सोडवण्यासाठी ज्येष्ठांनी ‘आपल्यासाठी आपणच’ या तत्त्वाचा स्वीकार करणं आवश्यक आहे’, अशा अगदी वेगळ्या विचारांच्या त्या पुरस्कर्त्या आहेत. सनवर्ल्ड फॉर सिनियर्सच्या माध्यमाद्वारे परिषदा, कार्यशाळा, प्रशिक्षण एकांकिका स्पर्धा आणि व्याख्याने आयोजित करून या तत्त्वाचा त्या अत्यंत तळमळीने प्रसार करतात.

आयुष्याची ‘पहिली इनिंग’ खेळून झाली आहे… जबाबदाऱ्या, कर्तव्यं पार पाडून झाली आहेत. केलेले, झालेले, दिलेले असे सगळे हिशोबही करून झाले आहेत. आता खूप सारा वेळ आहे. आयुष्याच्या संध्याकाळी डोळ्यासमोरून पुर्वायुष्य जातं, आणि जाणवतं… प्रेमाची, हक्काची माणसं जवळ नाहीत किंवा जवळ असूनही नसल्यासारखीच…
मग ‘दुसरी इनिंग’ खेळण्यासाठी खऱ्या अर्थाने आपणच उरतो आपल्यासाठी!
ज्येष्ठत्वाकडे नेणारा हा प्रवास आता सुरू होतो आहे याची जाणीव करून देत, आयुष्याच्या या ‘सेकंड इनिंग’ची सुरुवात किती ‘चैतन्यमयी’ होऊ शकते याचा प्रत्यय देणारं हे पुस्तक आहे. ही ‘सेकंड इनिंग’ सकारात्मकरित्या जगून अर्थपूर्ण कशी करता येईल याबद्दल अत्यंत सहज-सोप्या पद्धतीने
मार्गदर्शन यात मिळतं.
उतारवयातल्या विविध आजारांविषयीची थोडक्यात माहिती, वृद्धकल्याणशास्त्र या अभ्यासाच्या नव्या शाखेचा परिचय, इच्छापत्र व मृत्यूपत्राबद्दलचे समज-गैरसमज, वृद्धाश्रमांची माहिती अशा अनेक कळीच्या विषयांवर लेखिका छोट्या सुटसुटीत लेखांमधून संवाद साधते.
आजकाल आयुर्मान वाढतं आहे आणि त्याला जोडून येणारे मानसिक, शारीरिक क्लेशही वाढत आहेत… मात्र यावर मात करून आयुष्याची ही ‘सेकंड इनिंग’ समृद्ध करता येते… ती कशी करावी याचा तालबद्ध मंत्र देणारं पुस्तक…आनंदस्वर ज्येष्ठांसाठी!


100.00 Add to cart

स्मार्टपणे व्हा कॅशलेस

आपले आर्थिक व्यवहार निर्धास्तपणे `कॅशलेस’ पद्धतीने करण्यासाठी सचित्र मार्गदर्शन


मराठीतल्या आघाडीच्या तरुण लेखकांमध्ये प्रणव सखदेव यांचं नाव घेतलं जातं. त्यांनी अग्रगण्य मराठी दैनिकांत पत्रकार म्हणून काम केलं असून ते मराठी प्रकाशन क्षेत्रामध्ये संपादक व अनुवादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कथा आणि कविता मान्यवर नियतकालिकांमधून प्रकाशित होत असतात. ‘पायऱ्यांचा गेम आणि इतर कविता’ हा कवितासंग्रह, 'निळ्या दाताची दंतकथा’, ‘नाभितून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य' हे कथासंग्रह, व ‘काळेकरडे स्ट्रोक्स', ‘96 मेट्रोमॉल’ या कादंबऱ्या असं त्यांचं साहित्य प्रकाशित झालं आहे. त्यांना अनुवाद-प्रकल्पासाठी २०१५-१६ सालची ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ची अभ्यासवृत्तीही मिळाली आहे. त्यांना लेखनासाठी महत्त्वाची पारितोषिकं मिळाली असून इंग्रजीतल्या गाजलेल्या पुस्तकांचा अनुवाद त्यांनी केला आहे. फिक्शन लेखन करणं ही त्यांची पॅशन असून त्यातून समकालातल्या प्रश्नांचा भिडणं हे त्यांना महत्त्वाचं वाटतं. आजच्या तरुणांची मानसिकता, त्यांचे प्रश्न, विखंडित जगणं व तंत्रज्ञानाचा वाढता वापर या सगळ्याचं प्रतिबिंब त्यांच्या लेखनात पडलेलं दिसून येतं.

देसाई काका-काकूंकडे डेबिट कार्ड तर होतं, पण ते कसं वापरायचं हे त्यांना माहिती नव्हतं. खरंतर, माहिती नसण्यापेक्षा त्यांच्या मनात कार्ड वापरण्याविषयी भीती होती. मग एके दिवशी त्यांना सोसायटीतल्या हास्यक्लबमधल्या देशमुखकाकांनी एक पुस्तक भेट दिलं. या पुस्तकात पुढील विषय सचित्र समजावून सांगितले होते –
* क्रेडिट/डेबिट कार्डाचा वापर करून ऑनलाइन खरेदी कशी करायची? कार्ड स्वाइप करताना काय करायचं?
* रेल्वेचं कवा सिनेमाचं तिकिट ऑनलाइन कसं बुक करायचं?
*ऑनलाइन वीज बिल कसं भरायचं?
* NEFT/ RTGS, UPI इत्यादी सेवा कशा वापरायच्या?
* इंटरनेट बँकिंग व मोबाइल बँकिंगमधल्या सुविधा कोणत्या, त्या कशा वापरायच्या?
* सशक्त पासवर्ड्स कसे तयार करायचे?
* ई-वॉलेट्समध्ये पैसे कसे भरायचे आणि ते कसे वापरायचे?
* लघु व मध्यम उद्योजकांनी कॅशलेस व्यवहार करण्यासाठी कोणती साधनं घ्यायची?
* सुरक्षेच्या दृष्टीने मार्गदर्शक सूचना, इत्यादी
या पुस्तकातल्या टिप्स आणि मार्गदर्शनामुळे देसाई काका-काकू निर्धास्तपणे कॅशलेस व्यवहार करू लागले. तेव्हा त्यांच्यासारखंच आजच्या स्मार्टयुगात या पुस्तकाच्या सोबतीने तुम्हीही स्मार्टपणे व्हा कॅशलेस !


125.00 Add to cart

अष्टपैलू स्मार्टफोन

आपल्या अँड्रॉइड मोबाइलमधील सर्व सोयी-सुविधा व अ‍ॅप्स आत्मविश्वासाने वापरण्यासाठी सचित्र मार्गदर्शन


कॉम्प्यूटर सॉफ्टवेअर व इंटरनेट-वेबसाइट्स या क्षेत्रांत गेल्या दोन दशकांपासून काम करत असून त्यांना सोप्या भाषेत तंत्रज्ञानविषयक लिखाण करायला आवडतं. त्यांनी 'दै. सकाळ'मध्ये 'ई- कल्चर' व 'साप्ताहिक सकाळ'मध्ये 'तंत्रज्ञानात नवे' या स्तंभांचे दीर्घकाळ लेखन केलं आहे. याशिवाय अन्य वृत्तपत्रांत व आकाशवाणीकरताही प्रासंगिक लेखन केलं आहे. ते पुस्तकांचे व लेखांचे ( मराठी व इंग्रजी) अनुवाद, संपादन आणि लेखनही करतात.

श्री. व सौ. देशमुख यांनी मुलांच्या आग्रहाखातर स्मार्टफोन घेतला खरा, पण तो वापरताना काही चुकलं तर कुठेतरी गडबड होईल, या भीतीने ते अँड्रॉइड स्मार्टफोनचा पूर्ण वापर करताना बिचकत होते.
पण थोड्याच दिवसांत, श्री. व सौ. देशमुख स्मार्टफोनला केवळ सरावलेच नाहीत, तर आत्मविश्वासाने फोटो काढून ते वॉट्सअ‍ॅप करू लागले, आणि हवे ते गेम्स, अ‍ॅप्सही डाउनलोड करू लागले! ही किमया घडवली होती, अष्टपैलूू स्मार्टफोन या पुस्तकरूपी मित्राने! या मित्राने त्यांना खालील गोष्टी सचित्र समजावून सांगितल्या :

– बॉक्समधून आलेला नवाकोरा स्मार्टफोन कसा जोडायचा?
– कॉन्टॅक्ट्स सेव्ह कसे करायचे, त्यांचे ग्रुप कसे करायचे?
– एसएमएस, ग्रुप एसएसएस कसे करायचे?
– कार्यक्रमाला जाताना फोन ‘सायलेंट’ कसा करायचा?
– वाय-फाय स्मार्टफोनला कसे जोडून घ्यायचे?
– ईमेल कसा करायचा? त्याला फाइल कशी जोडायची?
– फोटो किंवा व्हिडिओ कसा काढायचा, तो शेअर कसा करायचा?
– वॉट्सअ‍ॅप, फेसबुक इ. अ‍ॅप्स कशी वापरायची?
– वॉलपेपर, थीम्स कशा बदलायच्या?
– आणि अर्थात, ऑनलाइन शॉपिंग कसं करायचं… आणि अनेक!

या पुस्तकातल्या छोट्या-छोट्या, पण अत्यंत महत्त्वाच्या टिप्समुळे श्री. व सौ. देशमुख बिनधास्त स्मार्टफोनमधल्या उपलब्ध सोई-सुविधा वापरू लागले. तेव्हा त्यांच्यासारखंच तुम्हीही या अष्टपैलू स्मार्टफोनचं ‘बोट’ धरा, स्मार्ट व्हा!


125.00 Read more

आपल्यासाठी आपणच

उत्तरायुष्य गुणवत्तापूर्ण जगण्यासाठी


डॉ. रोहिणी पटवर्धन यांनी पीएच.डी. (पुणे विद्यापीठ), जाहिरातकलेतील एम.फिल, बी.कॉम एम.कॉम., बॅचलर ऑफ जर्नालिझम, डिप्लोमा इन जेरोन्टोलॉजी (टाटा सामाजिक विज्ञान संस्था), डिप्लोमा इन हायर एज्युकेशन ही शैक्षणिक अहर्ता प्राप्त केली आहे. ‘सनवल्र्ड सोसायटी फॉर सोशल सव्र्हिस’ या संस्थेच्या त्या संस्थापक असून त्यांना ३५ वर्षे अध्यापनाचा अनुभव आहे. त्या सध्या एम.आय.टी. कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या आहेत. त्यांचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांच्या आयोजनामध्ये सहभाग असून त्या प्रभाकर पाध्ये, कमल पाध्ये ट्रस्टच्या विश्वस्त आहेत. डॉ. रोहिणी पटवर्धन यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला त्यामुळे त्यांना शेतीची आवड असून त्या सध्या शेती करतात. त्यांनी ‘मिळून साऱ्याजणी’, ‘हंस’, ‘नवल’ इ. नियतकालिकांमधून कथा व ललित लेखन केले आहे. त्यांना स्वतंत्रपणे भटकंती, वाचन, शास्त्रीय संगीताची आवड आहे. त्यांना २०१६चा टाईम्स ऑफ इंडिया समुहाचा ‘प्रमाण सिनियर्स' पुरस्कार तसंच, २०१६चा अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संघटनेचा ‘वात्सल्य' पुरस्कार मिळाला आहे. डॉ. रोहिणी पटवर्धन यांनी वृद्धकल्याणशास्त्र या वृद्धांशी संबंधित असणाऱ्या विषयावर संशोधन करून पुणे विद्यापीठातून पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे. ‘वृद्धांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेले प्रश्न अतिशय गुंतागुंतीचे आहेत. ते सोडवण्यासाठी ज्येष्ठांनी ‘आपल्यासाठी आपणच’ या तत्त्वाचा स्वीकार करणं आवश्यक आहे’, अशा अगदी वेगळ्या विचारांच्या त्या पुरस्कर्त्या आहेत. सनवर्ल्ड फॉर सिनियर्सच्या माध्यमाद्वारे परिषदा, कार्यशाळा, प्रशिक्षण एकांकिका स्पर्धा आणि व्याख्याने आयोजित करून या तत्त्वाचा त्या अत्यंत तळमळीने प्रसार करतात.

वय वाढणं म्हणजे नक्की काय असतं? तर वयाबरोबर अनेक शारीरिक आणि मानसिक बदल होणं. या बदलांमुळे थोडंसं गोंधळल्यासारखं होतं. साठीनंतरच्या या टप्प्यात अनेक कौटुंबिक व सामाजिक समस्याही जाणवू लागतात आणि त्यावर समंजस भूमिका घेण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन मिळावं अशी एक गरज वाटू लागते.
आज आपली दैनंदिन जीवनशैली अमूलाग्र बदलली आहे. त्याचबरोबर आयुष्यमानही वाढलं आहे. वाढलेल्या आयुष्याचं नियोजन कसं करावं याचा विचारही ज्येष्ठांनी केलेला नसतो. त्यामुळे अनेक समस्या भेडसावतात.
या दृष्टीने या पुस्तकात ज्येष्ठांचे प्रश्न निर्माण होण्यामागची कारणं कोणती? वृध्दांच्या समस्यांवर काम करणार्‍या संस्था नक्की काय करतात? अशा प्रश्नांची चर्चा केली आहे. याशिवाय ‘वृध्दकल्याणशास्त्र’ या नवीन विद्याशाखेची ओळख करून दिली आहे. तसेच वृध्दनिवासाचे विविध पर्याय, वृध्दाश्रमांचे प्रकार व तेथील सोयी-सुविधांची माहितीही यात आहे.
वृध्दांच्या समस्या वृध्दांनीच सोडवाव्यात, त्यासाठी त्यांनी मानसिकता बदलावी व वृध्दकल्याणासाठी पुढाकार घ्यावा. म्हणजेच ‘आपल्यासाठी आपणच’ हा सर्वस्वी नवा विचार व सकारात्मक दृष्टिकोन या पुस्तकात लेखिकेने मांडला आहे.


120.00 Add to cart

साठीनंतरचा आहार व आरोग्य

शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी शास्त्रीय दृष्टिकोनातून केलेलं मार्गदर्शन


डॉ. वर्षा जोशी यांनी मुंबई विद्यापीठातून बी.एस्सी., भौतिकशासत्रात एम.एस्सी. केलं असून, अमेरिकेतील पर्डू विद्यापीठातून एम.एस., शिवाय पुणे विद्यापीठातून एम.फिल आणि पीएच.डी. केलं आहे. डॉ. वर्षा जोशी यांची भौतिकशास्त्र विषयावरची सोळा पुस्तकं आजवर प्रकाशित झाली आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी मराठी व इंग्रजीतून सर सी.व्ही. रामन यांच्या जीवनावर व संशोधन कार्यावर आधारित पुस्तकं लिहिली आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर व संशोधन कार्यावर आधारित पुस्तकं आणि प्रौढ साक्षरांसाठी पुस्तिकाही मराठीत लिहिली आहे. ‘वाद्यांमधील विज्ञान’, ‘स्वयंपाकघरातील विज्ञान’, ‘सौंदर्यप्रसाधनांच्या दुनियेत’, ‘१२व्या शतकातील खाद्यसंस्कृती’, ‘साठीनंतरचा आहार व आरोग्य’, ‘करामत धाग्या-दोऱ्यांची' अशी त्यांची विज्ञानावर आधारित पुस्तकं प्रकाशित असून त्यांच्या आजवर अनेक आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. त्यांच्या पुस्तकांना अनेक मान्यवर पुरस्कारांनी आणि सन्मानांनी गौरवण्यात आलं आहे.

वैद्यकशास्त्रातील नवनवीन संशोधनांमुळे माणसाची आयुर्मर्यादा वाढली आहे. आज वृद्धत्वाची व्याख्या नव्याने करण्याची वेळ आली आहे. साठीनंतर आयुष्यातली प्रमुख कर्तव्यं बहुतांशपणे पार पडलेली असतात, थोडा निवांतपणाही लाभला असतो. पण त्याचबरोबर आयुष्यातल्या या टप्प्यावर आरोग्याच्या थोड्या कुरबुरीही सुरू होत असतात.

या पार्श्वभूमीवर साठीनंतरही सर्वांना चांगलं आयुष्य जगता यावं हा विचार मनात ठेऊन डॉ. वर्षा जोशी यांनी या पुस्तकाची रचना केली आहे. साठीनंतरच्या व्यक्तींनी कोणता आहार घ्यावा, तो किती व कोणत्या वेळी घ्यावा, कोणते व्यायाम करावेत, यासाठी त्या या पुस्तकात मार्गदर्शन करतात. त्याचप्रमाणे साठीनंतर उदभवू शकणारे ज्ञानेंद्रियांचे आजार कोणते, विस्मरणावर मात करण्यासाठीचे उपाय कोणते, एकटेपणा, नैराश्य व दैनंदिन जीवनातील ताण यावर मात कशी करावी यासाठीही डॉ. वर्षा जोशी मार्गदर्शन करतात. मुख्य म्हणजे हे सर्व त्यांनी शास्त्रीय दृष्टिकोनातून व सोप्या पध्दतीने सांगितलं आहे.

विज्ञान व अध्यात्म यांची सांगड घालून साठीनंतरचं जीवन व्याधीमुक्त व आनंददायी कसं करता येईल यासाठी या पुस्तकातून निश्चितच नवा मूलमंत्र मिळेल.


125.00 Read more

जेष्ठांसाठी ४ गोष्टी युक्तीच्या

कुटुंबातील सामंजस्याकरता…


मराठी साहित्यात ज्येष्ठ विनोदी लेखक म्हणून प्रसिद्ध असलेल्या भा.ल. महाबळ यांनी विपुल लेखन केलेलं आहे. वृत्तपत्रांतून त्यांचे सातत्याने लेख प्रसिद्ध होत असतात. मुंबईच्या माटुंगा परिसरातील 'व्हीजेटीआय’या अभियांत्रिकी महाविद्यालयातून ते वयाच्या ६०व्या वर्षी प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले. १९४९ ते १९५८ या काळात म्हणजे महाबळ सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजच्या आणि नंतर सांगलीच्याच वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. त्यांनी विलिंग्डन कॉलेजातून मी बी.एस्‌सी (ऑनर्स) ही पदवी घेतली, दोन शाळांत शिक्षकाची नोकरी केली आणि नंतर मिरजेच्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी. ई. (सिव्हिल इंजिनीअरिंग) ही पदवी मिळवली. विद्यार्थी असताना त्यांनी, अमृत, आलमगीर, किर्लोस्कर-स्त्री-मनोहर, तारका, रंजन, वाङ्मयशोभा, विविधवृत्त, सकाळ, संजय, सह्याद्री, स्वराज्य, हंस-मोहिनी-नवल, या नियतकालिकातून कथा, लेख, कविता लिहिल्या. त्यांच्या पुस्तकांना राज्य शासनाचे पुरस्कार प्राप्त झाले असून इतरही अनेक महत्त्वाचे पुरस्कार मिळाले आहेत.

आज बदललेल्या जीवनशैलीमुळे एकत्र कुटुंबाचं विभाजन होऊन विभक्त कुटुंबांचं प्रमाण वाढलं आहे. कोणाला वेळ द्यायला किंवा कोणाचा वेळ घ्यायलाही आपल्याकडे फुरसत नसते. तरीही, बरीच कुटुंबं अशी आहेत जी गुण्यागोविंदाने एकत्र राहाता आहेत, एकमेकांशी संवाद ठेवून आहेत. अशा एकत्र कुटुंबातील ज्येष्ठांसाठी भा. ल. महाबळ काही बोलक्या व्यक्तिरेखांमधून व प्रसंगांतून नात्यात जाणवणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी नकळत मार्गदर्शन करून जातात. घरात सशक्त व आनंदी वातावरण निर्माण व्हावं यासाठी घरातील सदस्य — विशेषत: ज्येष्ठ व्यक्ती विधायक व परिपक्व भूमिका बजावू शकतात. कुटुंबातील प्रत्येकाने विचारपूर्वक कृती केल्या व दुसऱ्याचा विचार केला तर कुटुंब कसं सुखी व समाधानी राहू शकतं हे लेखक विविध लेखांमधून पटवून देतात.

नुसतं वयाने ‘ज्येष्ठ’ न राहता वागण्यातून ‘ज्येष्ठ’ होण्यासाठी ज्येष्ठांसाठी चार गोष्टी युक्तीच्या….


140.00 Read more

आजी-आजोबा : आधार की अडचण?


मराठी साहित्यात ज्येष्ठ विनोदी लेखक म्हणून प्रसिद्ध असलेल्या भा.ल. महाबळ यांनी विपुल लेखन केलेलं आहे. वृत्तपत्रांतून त्यांचे सातत्याने लेख प्रसिद्ध होत असतात. मुंबईच्या माटुंगा परिसरातील 'व्हीजेटीआय’या अभियांत्रिकी महाविद्यालयातून ते वयाच्या ६०व्या वर्षी प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले. १९४९ ते १९५८ या काळात म्हणजे महाबळ सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजच्या आणि नंतर सांगलीच्याच वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. त्यांनी विलिंग्डन कॉलेजातून मी बी.एस्‌सी (ऑनर्स) ही पदवी घेतली, दोन शाळांत शिक्षकाची नोकरी केली आणि नंतर मिरजेच्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी. ई. (सिव्हिल इंजिनीअरिंग) ही पदवी मिळवली. विद्यार्थी असताना त्यांनी, अमृत, आलमगीर, किर्लोस्कर-स्त्री-मनोहर, तारका, रंजन, वाङ्मयशोभा, विविधवृत्त, सकाळ, संजय, सह्याद्री, स्वराज्य, हंस-मोहिनी-नवल, या नियतकालिकातून कथा, लेख, कविता लिहिल्या. त्यांच्या पुस्तकांना राज्य शासनाचे पुरस्कार प्राप्त झाले असून इतरही अनेक महत्त्वाचे पुरस्कार मिळाले आहेत.

लेखक भा.ल.महाबळ यांनी अनेक प्रकारे विचारमंथन करून आपापल्या परीने मार्ग काढणारे काही आजी-आजोबा या पुस्तकात उभे केले आहेत. हे आजी-आजोबा अनेकविध कुटुंबातील आजी-आजोबांचे स्थान आणि संबंध यांचे नमुने दाखवतात. दोन्हीपक्षी कुठे काय चुकत असते तेही समोर ठेवतात.
प्रत्येकाने विचार करून, थोडे अंतर्मुख होऊन आपापले काटे-कंगोरे झिजवून घेतले, आपापल्या भूमिका समजून घेतल्या, दुसर्‍याच्या मन:स्थितीचा विचार केला तर कितीतरी संसार सुखा-समाधानाने एकमेकात गुंतून राहू शकतील.
प्रस्तुत पुस्तकातील लेख कुटुंबातील सर्व घटकांना विचार करायला प्रवृत्त करतील व घरात निकोप वातावरण निर्माण होण्यास सहाय्यभूत होतील अशी आशा आहे.


170.00 Add to cart