राशींच्या गमती
- सौंदर्य-राशी
- राशी व आहार
- धनराशी
- तू-तू, मैं-मैं योग
- बारा राशींचे बारा स्वभाव
- सुट्टी आणि राशी
प्रत्येक राशीच्या स्वभाववैशिष्टयांच्या विविधांगी गमती-जमती!
प्रत्येक राशीच्या स्वभाववैशिष्टयांच्या विविधांगी गमती-जमती!
ट्रेकिंग, माउंटेनिअरिंगचे सुरवातीचे धडे
भटकंती करायला कुणाला आवडत नाही?
स्वच्छ मोकळी हवा, झाडं, नद्या पाहत
मनसोक्त फिरणं ही अगदी आनंदाची गोष्ट असते.
डोंगर-दऱ्यांतून किंवा जंगलात भटकायला तुम्हाला आवडतं ना?
ट्रेकिंग करताना कित्ती नवीन गोष्टी कळतात, माहिती आहे?
वेगवेगळ्या प्रकारच्या दगडांपासून…
झाडं-वेली-पक्षी, नद्या, मातीचे प्रकार…
एक नवी दुनियाच तुमच्यासमोर उभी राहते.
गिर्यारोहण म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते,
त्यासाठी कोणती पूर्वतयारी करावी लागते,
कोणत्या साधनांची आवश्यकता असते,
याबाबत निष्णात गिर्यारोहक आणि
एव्हरेस्टसह अनेक गिर्यारोहण मोहिमांचे लिडर
उमेश झिरपे यांनी केलेलं हे मार्गदर्शन…
मुलांसाठी गिर्यारोहण
विविध कला-छंद जोपासण्यासाठी व घर सुशोभित करणाऱ्या विविध कलात्मक वस्तू बनविण्यासाठी सचित्र मार्गदर्शन
कला-छंदांची आवड असली व या कला-छंदातून निर्माण झालेल्या कलात्मक वस्तुंनी जर आपले घर सुशोभित असले, तर ते एक समृद्धतेचेच लक्षण होय. कलाकुसर व छंद यांची आयुष्यभर जोपासना करणार्या प्रथितयश लेखिका प्रतिभा काळे यांनी या नव्या पुस्तकात विविध कलांचे सविस्तरपणे व सोप्या पद्धतीने सचित्र मार्गदर्शन केले आहे. आपल्यातील कला विकसित करण्यासाठी व विविध कलात्मक वस्तू बनविण्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे.
आपल्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात स्वत : साठी वेळ काढणं , छंद जोपासणं यासाठी वेळ असतो कुठे ? त्यामुळे अनेकांची सेवानिवृत्तीनंतर करायच्या कामांची मोठी यादीच तयार असते ! श्री.के. अक्षीकर यांनी सेवानिवृत्तीनंतर वेळेचा सुंदर विनियोग करून आपला आवडीचा छंद जोपासायचं ठरवलं ! त्यांचा हा छंद म्हणजे लेखन ! बारा लेखांच्या या संग्रहात दैनंदिन जीवनातील त्यांची सूक्ष्म निरीक्षणशक्ती , ओघवती लेखनशैली व परिपक्व वैचारिक बैठक याची प्रचीती येते .
आणखी कानोकानी ‘ कलंदर’च्या खुमासदार शैलीतील लिखाणाचं पहिलं संकलन ‘ कानोकानी ‘ आणि आता हे दुसरं ‘ आणखी कानोकानी ‘ . या संग्रहात ‘ कलंदर’ने आचार्य अत्रे , पु.ल.देशपांडे , वि . स . खांडेकर , कुसुमाग्रज , जी . ए . कुलकर्णी , मंगेश पाडगावकर अशा प्रथितयश साहित्यिकांच्या संदर्भात खुसखुशीत लेख लिहून ‘ साहित्यिक खळखळाट ‘ निर्माण केला आहे , तर साहित्यक्षेत्रातील अनेक घटनांची , प्रसंगांची विडंबनात्मक उठाठेवही केली आहे . पुस्तकात कलंदराने आर . के . लक्ष्मण ते मधुबाला अशा कलाक्षेत्रातील अनेकांच्या गुणावगुणांवर मिस्किल लिखाण केले आहे , ‘ नाट्यवर्तुळाचा कानोसा घेतला आहे , मराठी भाषेबाबतची अनास्था चव्हाट्यावर आणली आहे आणि ‘ राजकीय कोलाहला’चा मार्मिक उपहासही केला आहे . पहिल्या ‘ कानोकानी’ला राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट विनोदी वाङ्मयाचा पुरस्कार प्राप्त झाला होता . त्या संग्रहातील तिरकस बाणांनी वाचकांची वाहवा मिळविली . आता ‘ आणखी कानोकानी’मधील आपल्या लक्ष्यांवर ‘ ना – दुखापत ‘ तत्त्वावर सोडलेली निर्विष क्षेपणास्त्रं ‘ विनोदी साहित्याचा अवकाश निश्चितच प्रकाशमान करतील .
‘मानसोल्लास’ या जगातील पहिल्या ज्ञानकोशातील पाककृतींविषयी रंजकमाहिती व तिचा शास्त्रीय मागोवा
भारतीय पाकविद्येला हजारो वर्षांची परंपरा, इतिहास आहे. हजारो वर्षांपूर्वी भारतवर्ष अत्यंत प्रगत स्थितीत होता. त्यातून अमूल्य अशी ग्रंथसंपदाही निर्माण झाली. बाराव्या शतकात राजा सोमेश्वराने संस्कृतमध्ये लिहिलेला आणि जगातला पहिला ज्ञानकोश म्हणून गणला गेलेला ‘अभिलषितार्थचिंतामणी’ अर्थात् मानसोल्लास हा या ग्रंथसंपदेपैकी एक अमूल्य ठेवा आहे. बाराव्या शतकापर्यंत भारतात अन्न आणि पाणी यांचा कशा प्रकारे विचार केला जात होता आणि अन्न शिजविण्याच्या कोणत्या पध्दती रुढ होत्या तसेच कोणत्या पाककृती केल्या जात असत याबाबत सविस्तर माहिती देऊन त्या वेळचा विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनही डॉ.वर्षा जोशी आणि डॉ.हेमा क्षीरसागर यांनी या पुस्तकात सांगितला आहे.
आपल्या खाद्यपरंपरेचे महत्त्व आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन सांगणारे, आपल्या जुन्या ग्रंथातील ज्ञान सर्वांपर्यंत पोचवणारे पुस्तक… ‘बाराव्या शतकातील खाद्यसंस्कृती’
या लोकप्रिय अभिनेत्रीचं बालपण , त्यांची जडण – घडण , त्यांच्या व्यावसायिक व वैयक्तिक जीवनात आलेले चढ – उतार , यश – अपयश याचा पट वेधकरित्या उलगडून दाखवला आहे डॉ . शुभा चिटणीस यांनी , त्यांना प्रत्यक्ष भेटून , त्यांच्याशी संवाद साधून !
प्रगत, सुनियोजित, सुंदर शहरांचं स्वप्न…
काँक्रीटचं जंगल’ म्हटलं की डोळयासमोर उभ्या राहतात आक्राळविक्राळ, कशाही-कुठेही बांधलेल्या इमारती! पण कोणतंही शहर किंवा नगर म्हणजे फक्त उत्तुंग, दाटीवाटीने फोफावलेल्या इमारती आणि भावनाशून्यपणे घडयाळाच्या काटयावर पळणारी माणसं, एवढंच असतं का? शहरांबाबतच्या समाजातील अशा प्रकारच्या प्रचलित नकारात्मक समजुती आणि विस्तारणारं नागरीकरण हा प्रचंड विरोधाभास लेखिकेलाही चक्रावून टाकतो.
या विरोधाभासाचा शोध घेण्याचा, त्यामागची गृहितकं तपासण्याचा, नागरीकरणाची प्रक्रिया समजून घेण्याचा आणि समजावून देण्याचा सकारात्मक व प्रामाणिक प्रयत्न म्हणजेच हे पुस्तक!
लेखिकेच्या दृष्टिकोनातून राज्याच्या आणि राष्ट्राच्या विकासासाठी शहरं निश्चितच महत्त्वाची भूमिका बजावतात. उत्तम सोयी-सुविधांनी युक्त शहरांच्या निर्मितीसाठी आपल्याला गरज आहे ती दूरदृष्टी ठेवून केलेल्या नियोजनाची. ज्याप्रमाणे एखादी वनराई फुलवायला, ती वृध्दिंगत करायला एका कुशल माळयाची व त्याच्या प्रेमळ संगोपनाची गरज असते त्याचप्रमाणे आजच्या काँक्रीटच्या जंगलाचं वनराईत रूपांतर करण्यासाठी आज गरज आहे ती द्रष्टया लोकनेत्यांची आणि व्यापक दृष्टीकोन असणाऱ्या कुशल प्रशासकांची.
या दृष्टीने या पुस्तकातील चर्चा व मुद्दे वाचकांना व संबंधितांना आजच्या बकाल काँक्रीटच्या जंगलाचं रूपांतर सुंदर व नियोजनपूर्ण ‘वनराई’मध्ये करण्यास नक्कीच उद्युक्त करतील.
क्रिकेट: भावलेलं, दिसलेलं आणि त्या पलीकडचं
स्वतःचं स्वप्न साकार करू पाहणार्या काही वाचकांना या पुस्तकातून निश्चितच एक दिशा आणि प्रेरणा मिळेल याची मला खात्री आहेच, पण आपापल्या क्षेत्रात नेतृत्व कसं करावं आणि व्यावसायिक आयुष्यात आंतरराष्ट्रीय दर्जा कसा अंगी बाणवावा, याचेही काही मंत्र मिळून जातील.
— सचिन तेंडुलकर
टेलिव्हिजनच्या पडद्यावर जे दिसत असतं त्यापेक्षाही खूप काही तो तिथूनच आपल्याला दाखवतो. त्याने लेखणी चालवली तर कॉमेंण्ट्री बॉक्समधून त्याने जे सांगितलं त्याच्या कितीतरी पुढे तो आपल्याला घेऊन जातो. कॅमेर्याच्या साक्षीने उलगडणारी गोष्ट त्याच वेळी प्रभावीपणे सांगणं आणि त्याच कथानकावर वृत्तपत्रात लिहिताना चार पावलं पुढे जाऊन वेगळाच दृष्टान्त देणं या दोन्ही क्षमता असणारी माणसं भारतीय माध्यमांमध्ये फारच थोडी आहेत. हर्षा भोगलेचं वेगळेपण नेमकं यातच आहे.
— शेखर गुप्ता
खेळाबाबत प्रेम आणि ज्ञान यांच्या अपूर्व संगमाचे स्पष्ट प्रतिबिंब हर्षाच्या शैलीदार लिखाणात दिसते.
खळबळजनक बातम्या मिळवण्यामागचं रंजक नाट्य
हातात वृत्तपत्र घेतल्यानंतर सर्वप्रथम नजर जाते ती त्या दिवशीच्या ‘एक्सक्लुसिव्ह’ बातमीकडे. या बातम्या नुसत्या मनोरंजक नसतात, उलट या बातम्या समाजमनावर मोठा प्रभाव पाडतात, त्यातून अनेकदा अपेक्षित बदलही घडतात. काही अनिष्ट गोष्टींना पायबंदही होऊ शकतो. अशा ‘एक्सक्लुसिव्ह’ बातम्या पत्रकार मिळवतो तरी कशा? काही बातम्या अगदी सहज गप्पा मारताना मिळून जातात, तर काही ‘स्पेशल सोर्सेस’कडून मिळतात, काही उच्चपदस्थांचा विश्वास संपादन करून मिळवलेल्या असतात, तर काही अगदी अपघाताने…
थोडक्यात काय, कोणतीही विशेष बातमी मिळवण्यामागे पत्रकाराची चिकाटी, कौशल्य, दूरदृष्टी आणि कल्पकता पणाला लागलेली असते !
अशाच काही राजकीय, समाजिक आणि गुन्हेगारी जगतातील गाजलेल्या बातम्या मिळवतानाचे तपशील आणि रंजक नाट्य प्रत्यक्ष बातम्यांसह उलगडून दाखवणारं ‘एक्सक्लुसिव्ह’ पुस्तक…‘बातमीमागची बातमी !’