अनंत सामंत लिखित ३ पुस्तकांचा संच


सामंतांच्या जगण्याचे किंवा साहित्याचे वर्गीकरण होऊ शकलेले नाही, कारण कुठल्याही एका बाटलीत भरावे आणि लेबल चिकटवावे असे हे रसायन नाही. त्यांची प्रत्येक कथा, कादंबरी समुद्र आणि मातीमध्ये जगलेल्या त्यांच्या वादळी जीवनाचे चित्र प्रतिबिंबित करते . तंत्रानुसार आधी पटकथा लिहिली जाते, मग ती' शूट  केली जाते. सामंतांच्या लेखणीत दडलेला कॅमेरा आधी 'शूट' करतो मग ते चित्र कागदावर मुद्रित होते. जरी ते स्वतःला' सामान्य माणूस ' म्हणत असले तरी, त्यांच्या साहित्यातील न वाचलेल्या, न पाहिलेल्या विश्वाने वाचकांना आणि समीक्षकांना नेहमीच चकित केले आहे.

डोळ्यासमोर प्रसंग जीवंतपणे उभे करण्याची विलक्षण ताकद,
वाचकाला खेळवत ठेवणारी लेखनशैली…
अनंत सामंत लिखित पुस्तकं
दृष्टी
एक सागरी किल्ला…
एक सागर … एक वादळ आणि चार अंध…
एक विस्मयचकीत करणारी कादंबरी
एक ड्रीम.., मायला!
झोप्पड, दाऊद, हफ्ता आणि मिंट
ही कॉलेजगोईंग चौकडी आणि
त्यांनी घातलेला फुल्ल राडा…
एक बिनधास्त कादंबरी…
 माईन फ्रॉईन्ड 
कथांची मध्यवर्ती कल्पना वेगळी, लेखनातून जाणवणारी उत्कटता
आणि बिनधास्त लेखनशैली…

सात वैशिष्ट्यपूर्ण कथांचा संग्रह…


660.00 575.00 Add to cart

आजोळचे दिवस मालिका


आजोळचे दिवस…एक समृद्ध सांस्कृतिक वारसा



आजोळ कुणाला प्रिय नसतं ?
आजोळ म्हणजे
प्रेम, माया आणि स्मृतींचं भंडार !

विविध क्षेत्रातील

३८

मान्यवर सांगत आहेत आपल्या

आजोळचा सांस्कृतिक वारसा

१. आठवणी आजीच्या २. आठवणी आजोबांच्या

३. आठवणी मामांच्या ४. हे बंध आठवणींचे

४ पुस्तकांची मालिका आजोळचे दिवस


 

695.00 Add to cart

काम तमाम @ वाघा बॉर्डर


मराठीतील महत्त्वाचे 'लिहिते लेखक' असलेल्या सतीश तांबे यांची कथालेखक व संपादक अशी वाचकांना ओळख आहे. वास्तव व कल्पना यांची सरमिसळ, सूक्ष्म विचार आणि चिंतन-मनन यांची बांधेसूद रचना म्हणजे त्यांच्या कथा असतात. म्हणूनच ज्येष्ठ समीक्षक म.द. हातकणंगलेकर यांनी तांबे यांच्या कथांना ' नव (नव) कथांच्या पलीकडे जाणाऱ्या कथा' असं म्हटलं आहे. तांबे यांनी बीएस्सी केल्यानंतर एमए केलं. एमएला ते मराठी आणि सौंदर्यशास्त्र या विषयांमध्ये सर्वाधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाले. त्यांच्या लेखनाची सुरुवात कवितांपासून झाली. नंतर त्यांनी वृत्तपत्रांमधून स्तंभलेखन व सदरलेखन केलं. त्यांची ' साप्ताहिक दिनांक'मधील 'मोकळीक' , तसेच 'आपलं महानगर' या सायंदैनिकातील 'हळक्षज्ञ' आणि 'लगोरी' ही सदरं विशेष गाजली. कथांसोबतच त्यांनी एकांकिका लेखन केलं आहे. तसेच विचक्षण संपादक म्हणूनही काम केलं आहे. 'आजचा चार्वाक' ( १९८९ ते १९९८) हा दिवाळी अंक आणि ‘अबब! हत्ती' (१९९१ ते १९९६) हे लहान मुलांचं मासिक यांच्या संपादनात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या कथासंग्रहांना राज्य शासनाचे पुरस्कार मिळाले असून इतर महत्त्वाचे पुरस्कारही मिळालेले आहेत.

या कथा आपल्याला थेट भिडतात याचे कारणच मुळी त्या आपल्या परिचित परिसरातल्या आहेत. परंतु त्या परिचित वास्तवाला अनपेक्षित छेद देऊन आपल्याला काहीशा गूढ आणि काहीशा रहस्यमय अवास्तवाकडे घेऊन जातात. वाचताना धक्का बसतो, भीतीही वाटते आणि म्हणून उत्कंठाही वाढते. सतत कुठेतरी जाणवत राहते की या ‘अवास्तव वास्तवाला’ आणि त्यातील क्रौर्याला तसेच करुणेला आपल्या मनात खोल स्थान आहे… संशयाने आणि भीतीने, अनिश्चिततेने आणि अस्वस्थतेने आपले दैनंदिन जीवन कसे वेढलेले आहे हे या सर्व कथांमध्ये ठसठसत जाणवत राहते.

कुमार केतकर (प्रस्तावनेतून)

मराठी कथा-साहित्यात सतीश तांबे यांच्या कथेचं स्वतंत्र स्वयंभू घराणं आहे. त्याला महानगरी कथेच्या कोंदणात कोंबू नये. तिचं वळण बौद्धिक आहे. शैली ऐसपैस गजाली सांगणाऱ्या गोष्टींची आहे. तिचं अनुकरण सोपं नाही, कारण ती विशिष्ट विचार प्रक्रियेतून प्रसवलेली असते.

जयंत पवार


 

260.00 Add to cart

डॉ. लिली जोशी लिखित ५ पुस्तकांचा संच


डॉ. लिली जोशी या एम.डी. मेडिसिन आहेत. ज्या काळात ‘लेडी फिजिशियन’ म्हणजे काय हे लोकांना माहीत नव्हतं तेव्हापासून म्हणजे १९७६पासून त्यांनी स्वतंत्र वैद्यकीय व्यवसायाला सुरुवात केली. त्यांचा स्वभाव शांत आणि व्यक्तिमत्त्व हसतमुख असून दुसऱ्याचं ऐकून घेण्याची त्यांची वृत्ती आहे. रुग्णांना बरं वाटावं अशी त्यांची आंतरिक तळमळ असल्याने आणि औषधोपचारांपेक्षा जीवनशैली सुधारण्यावर त्यांचा भर असल्याने यातूनच त्यांनी आरोग्यविषयक लेखनाची सुरुवात केली. त्यांनी रुग्णांसाठी मधुमेह, रक्तदाब, अॅगनिमिया, थायरॉइड विकार अशा अनेक कार्यशाळा घेतल्या आहेत. तसंच व्यायामाचं महत्त्व कृतीतून सांगणारा ‘वॉक विथ डॉक’ हा टेकडीवरचा उपक्रम आणि अशा अनेक अभिनव गोष्टींचं आयोजन केलं आहे. याचबरोबर संस्कृत हा त्यांचा अतिशय आवडीचा विषय आहे. अगदी अलीकडे त्यांनी संस्कृत साहित्यात बी.ए., एम.ए. आणि पी.एच.डी. या पदव्या विशेष गुणवत्तेसह प्राप्त केल्या आहेत. ट्रेकिंग, जिमिंग, शास्त्रीय संगीत, वाचन, लेखन या गोष्टींची त्यांना मनापासून आवड आहे.

१) पर्यटन एक संजीवनी  = रु २००

२)  प्रतिकार शक्ती कशी वाढवाल = रु ७०

३) तुमच्या आमच्या लेकी  = रु १८०

४) आनंदी शरीर आनंदी मन = रु २५०

५) इन द लॉन्ग रन  = रु २५०


रु. ९४० ची पुस्तकं सवलतीत रु.६४०  (टपाल खर्चासह) घरपोच मिळवा!


 

 

940.00 640.00 Add to cart

द क्रिमिनल माइंड सीरीज

मती गुंग करणाऱ्या कुकर्म कथा  (३ पुस्तकांचा संच )


अतुल कहाते यांनी एमबीए केलं असून माहिती व तंत्रज्ञान या क्षेत्रात ‘सिंटेल’, ‘अमेरिकन एक्स्प्रेस’, ‘डॉयचे बँक’, ‘लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक’, ‘ओरॅकल’ अशा नामांकित कंपन्यांमध्ये सतराहून जास्त वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या बाराव्या वर्षापासूनच त्यांनी वर्तमानपत्रांमध्ये विविध सदरं लिहायला सुरुवात केली. आजपर्यंत त्यांचे चार हजारच्या वर लेख व सदरं प्रसिद्ध मराठी वृत्तपत्र व मासिकांमधून प्रकाशित झाली आहेत. दूरदर्शन व इतर मराठी टीव्ही चॅनेल्सवर अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांनी विशेषज्ञ म्हणून सहभाग घेतला आहे. आयआयटी, सिंबायोसिस, फर्ग्युसन, इंदिरा, गरवारे, एमआयटी इ. अनेक संस्थांमध्ये गेस्ट लेक्चरर म्हणून त्यांनी काम केलं आहे. ‘इंद्रधनू’ - ‘म.टा.’, ‘कॉम्प्यूटर सोसायटी ऑफ इंडिया’, ‘इंदिरा एक्सलन्स अॅदवॉर्ड’ व म.सा.प.चा ‘ग्रंथकार पुरस्कार’ असे अनेक प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

माहितीरूप गोष्टीतून गुनेह्गारी मानसिकतेचा वेध घेणारी अतुल कहते लिखित ३ पुस्तकं….

१. डार्क नेट

२. पॉन्झी स्कीम 

३. थेरॅनॉस


 

540.00 500.00 Add to cart

नायरण धारप- संच एक

खिळवून ठेवणारी ३ पुस्तकं


मराठी साहित्य क्षेत्रातील रहस्य-गूढ आणि भयकथा लेखकांतलं अग्रगण्य नाव म्हणजे नारायण धारप! गूढ लेखनाला अनेकदा विज्ञानाची डूब देत ही त्यांनी लेखन केलं आहे. त्यांच्या विज्ञान कथा ही तेवढ्याच ताकदीच्या आणि रंजक असतात. नारायण धारप यांचे नियमित वाचक असणाऱ्यांना त्यांच्या लेखनातला थरार आणि औतुक्य निर्माण करण्याचं सामर्थ्य ठाऊक आहेच. त्यांचे लेखन पुन्हा पुन्हा वाचलं तरी जुनं वाटत नाही किंवा कथेचा शेवट माहीत असला, तरी ज्या वळणवाटांवरून ते वाचकांना शेवटपर्यंत नेतात, त्यामुळे त्यांच्या ताजेपणा तसाच राहतो. धारप यांचा विज्ञान विषयक वाचन त्यांची कल्पकता आणि कथा फुलवत नेण्याच्या तंत्रावची हुकुमत त्यांच्या लेखनात दिसून येते.

विख्यात भयकथा , गूढकथा आणि विज्ञानकथा लेखक नारायण धारप यांची सर्वच वयाच्या वाचकवर्गाला गुंगवून टाकणाऱ्या कथा – कादंबऱ्या

१. स्वप्न्मोहिनी 

२. बहुमनी

३. गोग्रमचा चितार 

400.00 Add to cart

नायरण धारप- संच दोन

खिळवून ठेवणारी ३ पुस्तकं


मराठी साहित्य क्षेत्रातील रहस्य-गूढ आणि भयकथा लेखकांतलं अग्रगण्य नाव म्हणजे नारायण धारप! गूढ लेखनाला अनेकदा विज्ञानाची डूब देत ही त्यांनी लेखन केलं आहे. त्यांच्या विज्ञान कथा ही तेवढ्याच ताकदीच्या आणि रंजक असतात. नारायण धारप यांचे नियमित वाचक असणाऱ्यांना त्यांच्या लेखनातला थरार आणि औतुक्य निर्माण करण्याचं सामर्थ्य ठाऊक आहेच. त्यांचे लेखन पुन्हा पुन्हा वाचलं तरी जुनं वाटत नाही किंवा कथेचा शेवट माहीत असला, तरी ज्या वळणवाटांवरून ते वाचकांना शेवटपर्यंत नेतात, त्यामुळे त्यांच्या ताजेपणा तसाच राहतो. धारप यांचा विज्ञान विषयक वाचन त्यांची कल्पकता आणि कथा फुलवत नेण्याच्या तंत्रावची हुकुमत त्यांच्या लेखनात दिसून येते.

विख्यात भयकथा , गूढकथा आणि विज्ञानकथा लेखक नारायण धारप यांची सर्वच वयाच्या वाचकवर्गाला गुंगवून टाकणाऱ्या कथा – कादंबऱ्या


१. साठे फायकस

२ .चंद्राची सावली

३. अंगारिका


 

600.00 Add to cart

प्रणव सखदेव कथासंग्रह संच

२०२१ चा साहित्य अकादेमी युवा पुरस्कार प्राप्त लेखक प्रणव सखदेव लिखित ३ कथासंग्रहांचा संच


मराठीतल्या आघाडीच्या तरुण लेखकांमध्ये प्रणव सखदेव यांचं नाव घेतलं जातं. त्यांनी अग्रगण्य मराठी दैनिकांत पत्रकार म्हणून काम केलं असून ते मराठी प्रकाशन क्षेत्रामध्ये संपादक व अनुवादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कथा आणि कविता मान्यवर नियतकालिकांमधून प्रकाशित होत असतात. ‘पायऱ्यांचा गेम आणि इतर कविता’ हा कवितासंग्रह, 'निळ्या दाताची दंतकथा’, ‘नाभितून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य' हे कथासंग्रह, व ‘काळेकरडे स्ट्रोक्स', ‘96 मेट्रोमॉल’ या कादंबऱ्या असं त्यांचं साहित्य प्रकाशित झालं आहे. त्यांना अनुवाद-प्रकल्पासाठी २०१५-१६ सालची ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ची अभ्यासवृत्तीही मिळाली आहे. त्यांना लेखनासाठी महत्त्वाची पारितोषिकं मिळाली असून इंग्रजीतल्या गाजलेल्या पुस्तकांचा अनुवाद त्यांनी केला आहे. फिक्शन लेखन करणं ही त्यांची पॅशन असून त्यातून समकालातल्या प्रश्नांचा भिडणं हे त्यांना महत्त्वाचं वाटतं. आजच्या तरुणांची मानसिकता, त्यांचे प्रश्न, विखंडित जगणं व तंत्रज्ञानाचा वाढता वापर या सगळ्याचं प्रतिबिंब त्यांच्या लेखनात पडलेलं दिसून येतं.

प्रणव सखदेव लिखित ३ कथासंग्रह

१) दिमित्री रियाझ केळकरची गोष्ट

२) निळ्या दाताची दंतकथा

३) नाभीतून उगवलेल्या वृक्षाचे


रु. ७४०  ची पुस्तकं सवलतीत रु. ५९५ (टपाल खर्चासह) घरपोच मिळवा!


 

 

740.00 595.00 Add to cart

प्रणव सखदेव कादंबरी संच

२०२१ चा साहित्य अकादेमी युवा पुरस्कार प्राप्त लेखक प्रणव सखदेव लिखित ३ कादंबऱ्यांचा संच


मराठीतल्या आघाडीच्या तरुण लेखकांमध्ये प्रणव सखदेव यांचं नाव घेतलं जातं. त्यांनी अग्रगण्य मराठी दैनिकांत पत्रकार म्हणून काम केलं असून ते मराठी प्रकाशन क्षेत्रामध्ये संपादक व अनुवादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कथा आणि कविता मान्यवर नियतकालिकांमधून प्रकाशित होत असतात. ‘पायऱ्यांचा गेम आणि इतर कविता’ हा कवितासंग्रह, 'निळ्या दाताची दंतकथा’, ‘नाभितून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य' हे कथासंग्रह, व ‘काळेकरडे स्ट्रोक्स', ‘96 मेट्रोमॉल’ या कादंबऱ्या असं त्यांचं साहित्य प्रकाशित झालं आहे. त्यांना अनुवाद-प्रकल्पासाठी २०१५-१६ सालची ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ची अभ्यासवृत्तीही मिळाली आहे. त्यांना लेखनासाठी महत्त्वाची पारितोषिकं मिळाली असून इंग्रजीतल्या गाजलेल्या पुस्तकांचा अनुवाद त्यांनी केला आहे. फिक्शन लेखन करणं ही त्यांची पॅशन असून त्यातून समकालातल्या प्रश्नांचा भिडणं हे त्यांना महत्त्वाचं वाटतं. आजच्या तरुणांची मानसिकता, त्यांचे प्रश्न, विखंडित जगणं व तंत्रज्ञानाचा वाढता वापर या सगळ्याचं प्रतिबिंब त्यांच्या लेखनात पडलेलं दिसून येतं.

प्रणव सखदेव ३ कादंबऱ्या
१) चतुर
२) ९६ मेट्रोमॉल
३)काळेकारडे स्ट्रोक्स


रु. ६६०  ची पुस्तकं सवलतीत रु. ५२० (टपाल खर्चासह) घरपोच मिळवा!


 

 

660.00 520.00 Add to cart

समर्थ मालिका संच


३ पुस्तकांचा संच


मराठी साहित्य क्षेत्रातील रहस्य-गूढ आणि भयकथा लेखकांतलं अग्रगण्य नाव म्हणजे नारायण धारप! गूढ लेखनाला अनेकदा विज्ञानाची डूब देत ही त्यांनी लेखन केलं आहे. त्यांच्या विज्ञान कथा ही तेवढ्याच ताकदीच्या आणि रंजक असतात. नारायण धारप यांचे नियमित वाचक असणाऱ्यांना त्यांच्या लेखनातला थरार आणि औतुक्य निर्माण करण्याचं सामर्थ्य ठाऊक आहेच. त्यांचे लेखन पुन्हा पुन्हा वाचलं तरी जुनं वाटत नाही किंवा कथेचा शेवट माहीत असला, तरी ज्या वळणवाटांवरून ते वाचकांना शेवटपर्यंत नेतात, त्यामुळे त्यांच्या ताजेपणा तसाच राहतो. धारप यांचा विज्ञान विषयक वाचन त्यांची कल्पकता आणि कथा फुलवत नेण्याच्या तंत्रावची हुकुमत त्यांच्या लेखनात दिसून येते.

नारायण धारप यांची ‘समर्थ’ ही एक काल्पनिक व्यक्तिरेखा…

अशोक समर्थ हे एक प्रकारचे ‘पॅरानॉर्मल’ डिटेक्टिव्ह…

सर्वसामान्यांना छळणाऱ्या दुष्ट व अघोरी शक्तींचा आपल्या अलौकिक बुद्धिचातुर्याने ते पाडाव करतात.

त्यांच्या डावपेचात ते भौमितिक आकृत्या, रिंगणं, धुपारे अशा सुरक्षासाधनांचाही वापर करतात…


 

1,500.00 Add to cart

स्मॅशिंग डॅशिंग कथा

३ पुस्तकांचा संच


गीतांजली भोसले यांचा जन्म सोलापूरचा , बालपण पुण्यातलं . त्यांनी मुंबई विद्यापीठातून बी.एस.डब्लू . आणि पुणे विद्यापीठातून मास कम्युनिकेशन या पदव्या संपादित केल्या आहेत . आय.टी. क्षेत्रात त्यांनी कॉन्टेन्ट रायटर आणि इंस्ट्रक्शनल डिजायनर म्हणून काही काळ नोकरी केली आणि तिथूनच त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली . पुणे विद्यापीठात त्यांनी सहअध्यापक म्हणून काम केलं आहे. गेल्या काही वर्षांपासून त्या बेल्जियम येथे स्थायिक आहेत . वेगवेगळ्या भाषा शिकण्याची त्यांना विशेष आवड आहे . ' अँटवर्प युनिव्हर्सिटी'मध्ये त्या फ्रेंच भाषा शिकत आहेत . सध्या वाचन आणि भटकंती हे त्यांचे छंद आहेत . विविध देशात फिरून , तिथले अनुभव घेणे , त्या देशातील संस्कृती अभ्यासणे आणि त्यावर लिहिणे यामध्ये त्या विशेष रमतात . त्यांच्या भटकंतीमध्ये इतर देशातील लहान मुलांची पुस्तकं बघत असतांना आपल्या देशातील बालसाहित्यातही काही नवं देण्याच्या उद्देशाने त्यांनी लिखाणाला सुरुवात केली .

कोणत्यातरी भुल्या बिसऱ्या काळातल्या नाहीत .. आज्जी – आजोबांनी सांगितलेल्याही नाहीत … या आहेत मोबाइल युगातल्या स्मार्ट मुला – मुलींच्या रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या ताज्या , खुसखुशीत आणि हॅपनिंग कथा ! साहसी … गुंतवून ठेवणाऱ्या …. कल्पनेच्या जगात घेऊन जाणाऱ्या … वेगळा विचार देणाऱ्या आणि नकळत तुम्हाला आयुष्याचं सार हलकेच सांगून जाणाऱ्या अशा या ६ स्मॅशिंग डॅशिंग कथा …  

१.त्रिकाळ + १ कथा

२. अनन्या मिसिंग केस+ १ कथा

३. कनुस्मृती + १ कथा


 

300.00 Add to cart

हृषीकेश गुप्ते लिखित ५ पुस्तकांचा संच


शिक्षणाने आणि व्यवसायाने केमिकल इंजिनिअर असलेले हृषीकेश गुप्ते हे मराठी साहित्यातले आजचे आघाडीचे तरुण सर्जनशील लेखक आहेत. रायगड जिल्ह्यातील नागोठणे या गावी त्यांच्या जन्म झाला आणि शिक्षणही तिथेच झाले. 2000 सालापासून त्यांनी लेखनाला सुरुवात केली आणि 2008 सालापासून त्यांचं लेखन विविध नियकालिकांमधून प्रसिद्ध झालं. मनातली भीतीची आदिम भावना, माणसाच्या लैंगिक प्रेरणा, त्याच्या भावभावनांची उलघाल ही त्यांच्या लेखनाची मुख्य आशयसूत्रं होतं. गूढ-अद्भुतता, चित्रमय, प्रासादिक व ओघवती भाषा या लेखनवैशिष्ट्यांमुळे त्यांचं लेखन खिळवून ठेवतं. 'दंशकाल’, 'चौरंग' या कादंबऱ्या, 'काळजुगारी’, 'हाकामारी' या लघुकादंबऱ्या आणि 'अंधारवारी’, ‘दैत्यालय’, 'घनगर्द’, 'परफेक्टची बाई, फोल्डिंगचा पुरुष' हे कथासंग्रह अशी त्यांची एकूण साहित्यसंपदा प्रकाशित आहे. विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांनी 'दिल, दिमाग और बत्ती’ या चित्रपटाचं आणि 'हजार वेळा शोले पाहिलेला माणूस’ या स्वलिखित कथेवर आधारित चित्रपटाचं दिग्दर्शनही केलं आहे.

गूढ-अद्भुतता, चित्रमय, प्रासादिक व ओघवती भाषा ही लेखनवैशिष्टय असलेले लेखक हृषीकेश गुप्ते…

हृषीकेश गुप्ते लिखित ५ पुस्तकांचा संच


१) काळजुगारी :

मराठी साहित्यातील रूपककथांच्या दालनात मोलाची भर घालणारी लघुकादंबरी – काळजुगारी !

२) हाकामारी :

गूढकथेची डूब असणारी, रहस्यकथेला स्पर्शून जाणारी, खिळवून ठेवणारी लघुकादंबरी – हाकामारी !

३) परफेक्टची बाई, फोल्डिंगचा पुरुष :

पारंपरिक कथांचे रचनाबंध वापरून स्त्री-पुरुष संबंधांवर भाष्य करणा‍ऱ्या दोन अनवट दीर्घकथा!

४) घनगर्द :

गूढ मार्गावरून जात ‘घनगर्द’ मनोव्यापारांमध्ये खोल शिरणाऱ्या कथांचा संग्रह…

५) गोठ्ण्यातल्या गोष्टी

व्यक्तिकथा या विस्मृतीत गेलेल्या साहित्यप्रकाराला पुनर्जीवित करणारी अनोखी साहित्यकृती…


रु.९३५ ची पुस्तकं सवलतीत रु. ६९९ (टपाल खर्चासह) घरपोच मिळवा !


 

 

935.00 699.00 Add to cart

ज्येष्ठ नागरिक संच


उत्तरायुष्य गुणवत्तापूर्ण जगण्यासाठी 


संचातील पुस्तके:

  • आनंदस्वर ज्येष्ठांसाठीचैतन्यमयी सेकंड इंनिंगसाठी सहज सोपं मार्गदर्शन , लेखिका : रोहिणी पटवर्धन
  • आपल्यासाठी आपणच : लेखिका: रोहिणी पटवर्धन 
  • आजी आजोबा आधार कि अडचण? : लेखक: भा. ल. महाबळ 
  • ज्येष्ठांसाठी ४ गोष्टी युक्तीच्या : लेखक : भा. ल. महाबळ  
  • साठी नंतरचा आहार व आरोग्य : शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी शास्त्रीय दृष्टिकोनातून केलेलं मार्गदर्शन ,लेखक : डॉ वर्षा जोशी 

655.00 Add to cart

एस. हुसैन झैदी क्राइम सेट


एस. हुसैन झैदी हे शोधपत्रकारिता, तसंच गुन्हेगारी पत्रकारितेतलं मुंबईच्या प्रसारमाध्यमांच्या विश्वातलं विख्यात नाव आहे. एशियन एज वृत्तपत्राचे ते निवासी संपादक होते, तसंच मुंबई मिरर, मिड-डे आणि इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्रांसाठी त्यांनी काम केलं आहे. ‘ब्लॅक फ्रायडे’, ‘डोंगरी टू दुबई’ ही त्यांची काही बेस्टसेलर्स पुस्तकं. त्यांच्या पुस्तकांवर आधारित असलेले चित्रपटही विशेष गाजले. एचबीओ वाहिनीकरता ‘टेरर इन मुंबई’ या चित्रपटासाठी झैदी यांनी साहायक निर्माता म्हणून काम केलं आहे. हा चित्रपट २६/११च्या मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेवर आधारित होता.

अनुवाद:
अनुवाद, चित्रकला आणि लेखन-वाचन यांमध्ये विशेष रस असलेल्या रमा यांनी माधुरी पुरंदरे यांनी पुस्तकं मराठीतून इंग्रजीत भाषांतरित केली आहेत. त्यांना फ्रेंच , इंग्रजी आणि मराठी भाषांमधली ललित साहित्याची पुस्तकं अनुवादित करायला आवडतात. लहान मुलांसाठीही त्या लेखन करतात. आजवर त्यांनी वीसपेक्षा जास्त कलाकृतींची भाषांतरं केली असून त्यांना 'डेली हंट'ने आयोजित केलेल्या कथास्पर्धेत पारितोषिकही मिळालं आहे.


राजकारण, कल्पनातीत दगाबाजी आणि अविश्वसनीय थरार याची गुंफण असणारा एस. हुसैन झैदी क्राइम सेट!
१) इलेवन्थ अवर = रु. २५०
२) मुंबई अवेंजर्स = रु. ३९०
३) एन्डगेम = रु. २४०

एकूण संच ८८० रु. घरपोच


880.00 Add to cart

यशवंतराव चव्हाण संच

३ बहुमोल पुस्तकांचा संच


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री तसेच स्वातंत्र्य चळवळीत सहभागी असलेले आदरणीय द्रष्टे व मुत्सद्दी नेते यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची मूलभूत पायाभरणी केली. सामान्य कुटुंबातून आलेले चव्हाण हे जनसामान्यांचे पुढारी म्हणून ओळखले जातात. त्यांना स्वतःच्या बलस्थानांची आणि मर्यादांची पुरेपूर जाणीव असल्याने त्यांनी तत्त्वनिष्ठ व्यवहारवादाचे पालन केले. लोकशाहीच्या शक्तीवर त्यांचा अतूट विश्वास असल्यामुळे त्यांनी न्यायपूर्ण समाजाच्या बांधणीसाठी आवश्यक असलेल्या धोरणांबाबत पुढाकार घेऊन त्यांना पाठिंबा दिला. चव्हाण एक समतोल विचारवंत, सिद्धहस्त लेखक, प्रतिभावान वक्ते, चाणाक्ष मुत्सद्दी तसेच द्रष्टे प्रशासक होते व त्यांनी लोकहिताच्या अनेक धोरणांवर आपला ठसा उमटवला. अनलंकृत शैलीत त्यांनी केलेलं लेखन हे मनाला स्पर्श करून जातंच, शिवाय ते आपल्याला समाजकारण, राजकारण यांचं सखोल भानही देतं.

महाराष्ट्राच्या लोकप्रिय सुपुत्राचा परिचय, त्यांनी केलेल्या राजकीय क्षेत्रातील योगदानाची माहिती आजच्या पिढीला विशेषत: तरुणांना व्हावी या दृष्टीने यशवंतरावांच्याच लेखणीतून साकार झालेली तीन पुस्तकं- ‘कृष्णाकांठ’, ‘भूमिका’ व ‘ॠणानुबंध’ रोहन प्रकाशनातर्फे पुनर्प्रकाशित करण्यात आली आहेत.
कृष्णाकांठ म्हणजे यशवंतरावांचा बालपणापासून त्यांच्या राजकीय जडणघडणीपर्यंतचा लक्षवेधक प्रवास! त्यांचं बालपण, स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचा सहभाग, पहिला तुरुंगवास, त्यांचं वकिलीचं शिक्षण, वेणूताईंबरोबरची विवाहगाठ आणि राजकारणातील त्यांचा प्रवेश अशा रोमांचक आणि प्रेरणादायी अनुभवांचा पट यशवंतराव त्यांच्या सहज-सुंदर शैलीतून कृष्णाकांठद्वारे उलगडतात.
‘भूमिका’ हे पुस्तक म्हणजे यशवंतरावांच्या कारकिर्दीचं पुढचं पर्व म्हणता येईल. यशवंतरावांचे राजकीय, सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक प्रश्नांसंबंधीचे विचार या पुस्तकातील विविध लेखांतून वाचायला मिळतात.
यशवंतरावांचा चिंतनाचा प्रमुख विषय जरी राजकारण हा असला तरी गतकाळाकडे वळून बघताना वैयक्तिक जीवनातील काही आठवणी, व्यक्ती व प्रसंग त्यांच्या मनात घर करून राहिले होते. काही जवळची माणसं, स्थळं, भावना व विचार यांच्याशी यशवंतरावांचा एक ऋणानुबंध निर्माण झाला होता. त्या साऱ्याचं ओघवतं शब्दांकन म्हणजे ‘ऋणानुबंध’ हे पुस्तक!


800.00 Add to cart

विश्राम गुप्ते त्रिधारा

चेटूक – ऊन – ढग


विश्राम गुप्ते हे मराठीतले आघाडीचे कादंबरीकार, समीक्षक आणि अनुवादक म्हणून प्रसिद्ध आहेत. धर्म, स्त्री-पुरुष नातेसंबंध, मानवी मन, कुटुंबव्यवस्था हे त्यांच्या चिंतनाचे विषय असून यांबद्दल ते आपल्या कादंबरी तसंच ललितेतर लेखनातून चिकित्सा करत असतात. अभिजात साहित्याबरोबरच मराठीतल्या नव्याने लिहणाऱ्या तरुण लेखकांचं लेखन ते आस्थेने वाचतात. त्याबद्दलही ते चिकित्सक दृष्टिकोन ठेवून टीकात्मक लिहितात. त्यांच्या पुस्तकांना राज्य शासनाच्या पुरस्कारांबरोबरच इतरही महत्त्वाचे पुरस्कार मिळाले आहेत.

प्रेम…

एक संकल्पना,

कौटुंबिक नातेसंबंध,

आणि

व्यक्तिगत जाणिवांचा

खोलवर शोध…

हे आहे

या त्रिधारेचे सूत्र.

अभिजात

कथनवैशिष्ट्यं असलेली

विश्राम गुप्ते लिखित

संग्राह्य कादंबरीत्रयी…


1,025.00 Add to cart
1 2