विजय गोखले

भारतीय परराष्ट्र सेवेत चार दशकांहून अधिक काळ कार्यरत असलेले विजय गोखले जानेवारी २०२० मध्ये परराष्ट्र सचिव म्हणून निवृत्त झाले. त्यांच्या कारकिर्दीतला बराचसा काळ त्यांनी चीनशी संबंधित विषयांवर काम करण्यात व्यतीत केला. हाँगकाँग, तैपेई आणि बीजिंग इथे त्यांनी केलेल्या शिष्टाईच्या कामगिऱ्या आणि नवी दिल्लीमध्ये विविध पातळ्यांवर केलेलं काम यांमुळे त्यांना चिनी मुत्सद्दी अधिकाऱ्यांच्या वाटाघाटीच्या पद्धतींबद्दलची मर्म समजली. २००० सालापासून विविध मुद्द्यांवर चीनशी बोलणी करण्याचा त्यांना वैयक्तिक अनुभव होता, त्यांपैकी काही मुद्द्यांची मांडणी त्यांनी या पुस्तकात केली आहे. सध्या ते पुण्यामध्ये आपल्या पत्नीसह वास्तव्यास असून चीनबद्दलचा अभ्यास करत आहेत.

लेखकाची पुस्तकं

भारत-चीन संबंधांची प्रदीर्घ खेळी


विजय गोखले


चीनच्या धूर्त धोरणीपणामुळे शिष्टाईच्या प्रांतात भारत चीनकडे – विशेषतः १९६२च्या युद्धानंतर संशयाच्या नजरेने पाहत आला आहे. असं असूनही या उभय देशांच्या संबंधांचं सखोल आकलन फार कमी वेळा मांडण्यात आलं. काही घटना-प्रसंगांमुळे तत्कालीन चर्चा-वादविवाद झाले, अजूनही ते होत असतात, पण त्याच्या खोलात फारसं कुणी जात नाही.

भारताचे माजी परराष्ट्र सचिव तसंच चीनमध्ये भारताचे राजदूत म्हणून काम केलेल्या विजय गोखले यांनी या पुस्तकात उभय देशांमध्ये झालेल्या वाटाघाटींचा, त्यामधील बदलांचा वेध घेतला आहे. भारत-चीन यांच्यामध्ये भारतीय स्वातंत्र्योत्तर काळापासून ते आजपर्यंत सहा महत्त्वाच्या वाटाघाटींच्या खेळ्या झाल्या. या प्रदीर्घ वाटाघाटींच्या परिप्रेक्ष्यातून भारत-चीन संबंधांचा चिकित्सक ऊहापोह ते करतात, तसंच सद्यस्थितीकडेही पाहतात.

भारताशी शिष्टाईच्या पातळीवर वाटाघाटी करताना चीन कोणते डावपेच आखतो, कोणत्या क्लृप्त्या लढवतो आणि कोणती साधनं वापरतो, याचा शोध गोखले पुस्तकात घेतात. त्याचा फायदा पुढील काळातील वाटाघाटींमध्ये भारतीय अधिकाऱ्यांना व्हावा, तसंच नागरिकांमध्ये या विषयाबद्दल जनजागृती व्हावी, हा त्यामागचा प्रमुख उद्देश आहे. सातत्याने बदलणाऱ्या भारत-चीन संबंधांचा विश्लेषणात्मक मागोवा घेणारं पुस्तक… भारत-चीन संबंधांची प्रदीर्घ खेळी


 

300.00 Add to cart