सईद मिर्झा

भारतातील ' समांतर चित्रपट प्रवाहा'तील एक अग्रणी व पुरोगामी चित्रपट दिग्दर्शक म्हणून सर्वज्ञात असलेल्या सईद मिर्झ यांनी पुण्याच्या एफटीआयआय ' मधून प्रशिक्षण घेऊन आपल्या दिग्दर्शकीय कारकिर्दीला सुरुवात केली . देशातील राजकीय - सामाजिक समस्यांबाबत वस्तुनिष्ठपणे आणि विश्लेषणात्मक पद्धतीने भाष्य करणारे आगळे समाजाभिमुख व सर्जनशील दिग्दर्शक म्हणून त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त केली . ' अरविंद देसाई की अजीब दास्तान ' ( ( १ ९ ७८ ) , ' अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है ' ( १ ९ ८० ) , ' मोहन जोशी हाजीर हो ' ( १ ९ ८४ ) , ' सलिम लंगडे पे मत रो ' ( १ ९ ८ ९ ) , ' नसीम ' ( १ ९९ ५ ) आदी चित्रपटांद्वारे त्यांनी जनसामान्यांच्या व उपेक्षित घटकांच्या मनात दबलेल्या तणावांचा , अवहेलनेचा व समाजातील अंतर्विरोधांचा संवदेनशीलतेने मागोवा घेतला . त्याचप्रमाणे ' नुक्कड ' व ' इंतजार ' या आपल्या दूरदर्शनवरील मालिकांद्वारे उपेक्षित घटकांतील समुहजाणीवेचं आगळं दर्शन घडवलं . १ एप्रिल , २०११ रोजी ' एफटीआयआय'चे अध्यक्ष म्हणून सूत्रं स्वीकारणाऱ्या सईद मिर्झ यांनी यापूर्वीही तेथील विद्यार्थ्यांना वेळोवेळी मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे .

लेखकाची पुस्तकं

लोकशाहीवादी अम्मीस…दीर्घपत्र


भारतातील ' समांतर चित्रपट प्रवाहा'तील एक अग्रणी व पुरोगामी चित्रपट दिग्दर्शक म्हणून सर्वज्ञात असलेल्या सईद मिर्झ यांनी पुण्याच्या एफटीआयआय ' मधून प्रशिक्षण घेऊन आपल्या दिग्दर्शकीय कारकिर्दीला सुरुवात केली . देशातील राजकीय - सामाजिक समस्यांबाबत वस्तुनिष्ठपणे आणि विश्लेषणात्मक पद्धतीने भाष्य करणारे आगळे समाजाभिमुख व सर्जनशील दिग्दर्शक म्हणून त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त केली . ' अरविंद देसाई की अजीब दास्तान ' ( ( १ ९ ७८ ) , ' अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है ' ( १ ९ ८० ) , ' मोहन जोशी हाजीर हो ' ( १ ९ ८४ ) , ' सलिम लंगडे पे मत रो ' ( १ ९ ८ ९ ) , ' नसीम ' ( १ ९९ ५ ) आदी चित्रपटांद्वारे त्यांनी जनसामान्यांच्या व उपेक्षित घटकांच्या मनात दबलेल्या तणावांचा , अवहेलनेचा व समाजातील अंतर्विरोधांचा संवदेनशीलतेने मागोवा घेतला . त्याचप्रमाणे ' नुक्कड ' व ' इंतजार ' या आपल्या दूरदर्शनवरील मालिकांद्वारे उपेक्षित घटकांतील समुहजाणीवेचं आगळं दर्शन घडवलं . १ एप्रिल , २०११ रोजी ' एफटीआयआय'चे अध्यक्ष म्हणून सूत्रं स्वीकारणाऱ्या सईद मिर्झ यांनी यापूर्वीही तेथील विद्यार्थ्यांना वेळोवेळी मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे .

अनुवाद:
गंभीर वृत्तीचे अनुवादक, संपादक व लेखक म्हणून मिलिंद चंपानेरकर विख्यात आहेत. त्यांनी आजवर ‘लोककवी साहीर लुधियानवी' (मूळ लेखक : अक्षय मनवानी), ‘त्या दहा वर्षांतील गुरू दत्त' (मूळ लेखक - सत्य सरन), ‘सुन मेरे बंधू रे - एस.डी. बर्मन यांचं जीवनसंगीत' (मूळ लेखक - सत्या सरन), ‘वहिदा रेहमान... हितगुजातून उलगडलेली', (मूळ लेखक- नसरीन मुन्नी कबीर), ‘ए.आर. रहमान : संगीतातील वादळ' (मूळ लेखक - कामिनी मथाई), ‘भारतातील डाव्या चळवळीचा मागोवा’ (मूळ लेखक - प्रफुल्ल बिडवई), ‘गुड मुस्लीम बॅड मुस्लीम' (मूळ लेखक - महमूद ममदानी, सह-अनुवादक - पुष्पा भावे) यांसारख्या महत्त्वाच्या पुस्तकांचा अनुवाद केला असून ‘यांनी घडवलं सहस्रक' आणि ‘असा घडला भारत' या महद्ग्रंथांसाठी सह-संपादन, संशोधन व लेखन केलं आहे. त्यांनी दैनिक ‘इंडियन एक्स्प्रेस'साठी १९९१-२००० या कालावधीमध्ये पत्रकारिता केली आहे. गेली तीन दशकं त्यांनी विविध मराठी दैनिक आणि नियतकालिकांमधून समाजाभिमुख साहित्य, नाट्य व चित्रपटविषयक समीक्षापर लेखन आणि त्याचप्रमाणे, सामाजिक-राजकीय विषयांवर विश्लेषणात्मक लेखन केलं आहे. त्यांना ‘लोकशाहीवादी अम्मीस...दीर्घपत्र' या अनुवादित पुस्तकासाठी सर्वोत्कृष्ट अनुवादाचा २०१६ सालचा ‘साहित्य अकादमी' पुरस्कार प्राप्त झाला आहे.


‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है?’ या व आपल्या अन्य चित्रपटांद्वारे चित्रपट-दिग्दर्शक सईद मिर्झा यांनी समांतर चित्रपट चळवळीवर आपला आगळा ठसा उमटवला. या माध्यमात रचनेचे, कथनपद्धतीचे आगळे प्रयोग साध्य केले. ‘अम्मी: लेटर टू ए डेमॉक्रेटिक मदर’ या आपल्या पहिल्याच इंग्रजी साहित्यकृतीद्वारे त्यांनी रुपबंधाच्या दृष्टीने आगळा प्रयोग साधण्याचा प्रयत्न केला आहे. दीर्घपत्राचा रूपबंध घेऊन त्या अंतर्गतच कादंबरी, परिकथा, आत्मकथन, समाजचित्र रेखाटन, राजकीय वाद-संवाद, संस्कृती विचार, प्रवासवर्णन, चित्रपट-संहिता अशा अनेकविध रूपबंधांचं त्यांनी सर्जनशीलतेने संमिश्रण साधलं आहे. ‘लोकशाहीवादी अम्मीस… दीर्घपत्र’ म्हणजे अर्थातच या इंग्रजी साहित्यकृतीचा मिलिंद चंपानेरकर यांनी केलेला अनुवाद. स्वातंत्र्यानंतर विविध धर्मियांनी धर्मनिरपेक्ष लोकशाहीची संकल्पना स्वीकारून स्वदेशाशी कसं मनोभावे नातं जोडलं, यावर मिर्झा साध्यासाध्या घटनांद्वारे प्रकाश टाकतात. विस्मृतीत गेलेल्या वा दडपल्या गेलेल्या सांस्कृतिक ‘अवशेषां’चा सूक्ष्मतेने मागोवा घेता घेता ते समकालीन घटनांचीही चर्चा साधतात. काळ आणि अवकाशाच्या संदर्भात सतत मागेपुढे नेत ते वाचकाला आगळं भान देऊ पाहतात. भारतासह अन्य अनेक देशातील जनसामान्यांच्या मनातील हुंकार ऐकवू पाहणार्‍या या पुस्तकात केवळ सहज ‘स्मित-हास्या’द्वारे परस्पर संवाद साधणारे जनसामान्य जागोजागी आढळतात; त्याद्वारे या साहित्यकृतीला ‘गुढानुभूती’चं आगळंच परिमाण लाभतं! व्यापक जनजीवनाच्या अनेक पैलूंच्या दर्शनाद्वारे वाचकाला अलगद हिंदोळे देत आगळा मानसिक प्रवास घडवणारी ही एक आगळीच साहित्यकृती ठरते— ‘लोकशाहीवादी अम्मीस… दीर्घपत्र’


320.00 270.00 Read more