सी.पी. श्रीवास्तव

चंद्रिका प्रसाद श्रीवास्तव यांचा जन्म ८ जुलै १९२० रोजी झाला. लखनौ येथून एम.ए. व एलएल.बी. पदवी त्यांनी प्रथम वर्गात संपादन केली. आय.ए.एस. झाल्यावर केंद्र सरकारच्या वाणिज्य खात्यात रुजू झाल्या. १९५३ पासून त्यांनी नौकानयन खात्यात विविध पदांवर काम केलं. १९६१मध्ये शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती. १९६४ ते १९६६ या काळात पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांचे संयुक्त सचिव, अर्थात या काळातील सर्व महत्त्वाच्या राजकीय घटनांचे साक्षीदार. ऐतिहासिक ताश्कंद शिखर परिषदेच्या वेळी ते शास्त्रींच्या समवेत उपस्थित होते. नौकानयनविषयक अनेक भारतीय व जागतिक संघटनांचे ते सदस्य आहेत. १९७२मध्ये भारत सरकारने त्यांचा ‘पद्मभूषण' हा किताब देऊन त्यांचा गौरव केला. स्वीडन, नॉर्वे व स्पेन या देशांच्या सरकारांनी त्यांना विविध किताब देऊन सन्मानित केले आहे. इंग्लंडच्या राणीने के.सी.एम.जी. हा किताब देऊन त्यांचा बहुमान केला आहे.

लेखकाची पुस्तकं

लालबहादुर शास्त्री

राजकारणातील मर्यादापुरषोत्तम


सी.पी. श्रीवास्तव
अनुवाद :अशोक जैन


काश्मीरमध्ये आंदोलनाचा उद्रेक झाला असताना प. नेहरूंनी शास्त्रींना तेथे तातडीने पाठविले होते. श्रीनगर येथे गोठवणारी थंडी असल्याने प. नेहरूंनी स्वत:चा ओव्हरकोट शास्त्रींना दिला. जणू पुढील जबाबदारी शास्त्रींच्या खांद्यावर येणार याचेच ते सूचक होते ! पंतप्रधान म्हणून शास्त्रींनी आपला स्वतंत्र, तेजस्वी ठसा उमटवला. १९६२च्या चीन युद्धातील मानहानिकारक पराभवाच्या पार्श्‍वभूमीवर,१९६५च्या भारत-पाक युद्धात शास्त्रींनी देशास खंबीर व यशस्वी नेतृत्व दिले आणि देशाची प्रतिमा झळाळून निघाली. ‘जय जवान, जय किसान’च्या मंत्राने सारा देश भारावून गेला. ताश्कंद शिखर परिषदेत मुत्सद्देगिरीने पावले टाकून त्यांनी अखेर अयुब खानना झुकविले. शास्त्रींनी यशाचे अत्युच्च शिखर गाठले, पण आकस्मिक त्यांचे अवतारकार्य संपुष्टात आले !

…तीच ही कहाणी तीस वर्षांनंतर दप्तरमुक्त झालेल्या अनेक सत्य घटनांच्या साक्षीने लिहिलेली प्रभावी, प्रेरक नि पारदर्शक व आजही भारावून टाकणारी जीवनगाथा!


Biography of Shri.Lal Bahadur Shastri


320.00 Add to cart