अवधूत डोंगरे

तरुण कादंबरीकार, अनुवादक म्हणून अवधूत डोंगरे प्रसिद्ध आहेत. त्यांच्या आजवर चार कादंबऱ्या प्रकाशित झालेल्या असून कादंबरीलेखनासोबतच ते एकरेघ (ekregh.blogspot.in) हा ब्लॉगही लिहितात. पत्रकारी स्वरूपाचं लेखनही त्यांनी काही वर्तपानपत्रांतून व नियतकालिकांमधून केलं आहे. व्यवसाय म्हणून ते विविध प्रकारच्या अनुवादाची कामं करतात. त्यांच्या ‘स्वतःला फालतू समजण्याची गोष्ट’ या त्यांच्या कादंबरीला २०१४ सालचा ‘साहित्य अकादमी युवा पुरस्कार’ मिळाला आहे.

लेखकाची पुस्तकं

नरसिंहावलोकन

भारताच्या अर्थव्यवसथेचा कायापालट करणाऱ्या पी.व्ही. नरसिंह राव याचं राजकीय चरित्र


[taxonomy_list name=”product_author” include=”3808″]

अनुवादक [taxonomy_list name=”product_author” include=”351″]


पी.व्ही . नरसिंह राव अनपेक्षितरीत्या १ ९९ १ साली भारताचे पंतप्रधान झाले , तेव्हा त्यांच्याकडे आर्थिक संकटात पडलेल्या व हिंसक आंदोलनांनी ग्रस्त झालेल्या देशाची सूत्रं आली . त्यांचा पक्षही तेव्हा त्यांच्यावर विश्वास ठेवत नव्हता.

संसदेत त्यांचा पक्ष अल्पमतात होता , शिवाय त्यांना ‘१० , जनपथ ‘ च्या सावलीत सत्ता चालवावी लागत होती . आणि तरीही राव यांनी भारताला देशात व परदेशात नवी ओळख मिळवून दिली . जगातील मोजक्याच नेत्यांनी इतकी कमी सत्ता असताना इतका मोठा बदल घडवून आणलेला दिसतो.

राव यांच्या यापूर्वी कधीच प्रकाशात न आलेल्या खाजगी कागदपत्रांचा अभ्यास करून आणि शंभरहून अधिक मुलाखती घेऊन विनय सीतापती यांनी हे चरित्र लिहिलं आहे . भारतीय अर्थव्यवस्था , आण्विक कार्यक्रम , परराष्ट्र धोरण व बाबरी मशीद अशा विविध मुद्द्यांवर या चरित्रातून नव्याने प्रकाश टाकण्यात आला आहे . तेलंगणातील एका गावातून केंद्रीय सत्तेपर्यंतचा आणि तिथून पुन्हा अपमानित निवृत्तीपर्यंतचा राव यांचा जीवनप्रवास रेखाटताना ,या पुस्तकात त्यांच्या आंतरिक खळबळीचीही दखल घेण्यात आली आहे . त्यांचं तणावदायक बालपण , त्यांचे भ्रष्ट व्यवहार व प्रेमसंबंध, त्यांचा सततचा एकाकीपणा यांचीही नोंद हे पुस्तक घेतं.

एका प्रतिभाशाली राजनीतीज्ञाची अकथित कहाणी… नरसिंहावलोकन!



 

375.00 Add to cart

मेट्रोमॅन श्रीधरन

कोकण रेल्वे, दिल्ली मेट्रो अशा महाकाय प्रकल्पांचे शिल्पकार ई.श्रीधरन यांचा कर्तृत्वपट


[taxonomy_list name=”product_author” include=”580″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”351″]


भारताच्या नागरी वाहतूकसेवेचा चेहरामोहरा पालटून टाकणार्‍या एका निष्ठावान अभियंत्याची…ई.श्रीधरन यांची ही कर्तृत्वगाथा !
अनेक आव्हानात्मक प्रकल्पांतील त्यांच्या कार्यशैलीमुळे श्रीधरन यांचं नाव पारदर्शकता, काटेकोरपणा आणि कार्यक्षमता या गुणांशी समानार्थी बनलं.
अशक्यप्राय वाटणाऱ्या प्रकल्पांना श्रीधरन यांचा `मिडास टच’ लाभला आणि `कोकण रेल्वे’, `दिल्ली मेट्रो’ यांसारखे अवाढव्य प्रकल्प जलदगतीने साकारले गेले. कोची मेट्रो प्रकल्पाची धुराही त्यांच्याकडे आली. भारतीय रेल्वे सेवा, `कलकत्ता मेट्रो प्रकल्प’ यांतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
असे अवघड प्रकल्प कार्यक्षमतेने साकारताना त्यांचा दिवसातील काम करण्याचा अवधी असायचा फक्त आठ तास…त्यांच्या कार्यशैलीचं हे आणखी एक वैशिष्ट्य!
अत्याधुनिक तंत्रज्ञानाला इच्छाशक्ती आणि पराकोटीची कर्तव्यनिष्ठा यांची जोड मिळाली तर `मिरॅकल्स’ घडू शकतात, असा विश्वास देणारा हा प्रेरक कर्तृत्वपट मेट्रोमॅन श्रीधरन…


250.00 Add to cart

राजीव गांधी हत्या… एक अंतर्गत कट?


[taxonomy_list name=”product_author” include=”575″]

अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”351″]


भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची २१ मे १९९१ रोजी निवडणूक प्रचारादरम्यान निघृण हत्या झाली. निवडणुकीनंतर ते सत्तेत येतील या भीतीने श्रीलंकेतील एलटीटीई या संघटनेने राजीव यांची हत्या केली असावी, असं मानलं जातं आहे. परंतु या मूळ गृहीतकावर प्रश्नचिन्ह उपास्थित केलं, तर वेगळीच परिस्थिती समोर येते. लेखक व पत्रकार फराझ अहमद यांनी या पुस्तकातून या गृहीतकावर प्रश्नचिन्ह निर्माण करून राजीव गांधी हत्या प्रकरणातील वेगवेगळ्या कंगोर्‍यांवर प्रकाश टाकला आहे. राजीव गांधींच्या मृत्यूनंतर काँग्रेस पक्ष सत्तेत आला हे खरं, पण सहानुभूतीचं वातावरण निर्माण होऊनही पक्षाला स्पष्ट बहुमतही मिळवता आलं नव्हतं; हे लक्षात घेतलं, तर राजीव गांधी यांच्या सत्तेत परत येण्याची भीती एलटीटीईला वाटत होती, ही मांडणीच कोसळते. याचा ऊहापोह फराझ पुस्तकात करतात. मग त्यांची हत्या का झाली असावी, याचा शोध घ्यायचाही ते प्रयत्न करतात.
राजीव गांधी यांच्या हत्येचा कथित मुख्य सूत्रधार शिवरासनने हत्येनंतर भारतातच थांबण्याचा निर्णय का घेतला? त्याला भारतातच कोणी थांबवून घेतलं? आपल्या सुरक्षेसाठी तो कोणावर विसंबून होता? जाफन्याला परतायची त्याला का भीती वाटत होती? असे प्रश्न या पुस्तकात लेखकाने उपस्थित केले आहेत.
राजीव गांधी यांचा मृत्यू झाल्यामुळे कोणाचा राजकीय फायदा झाला याचाही शोध हे पुस्तक घेतं. फराझ यांनी असा दावा केला आहे की, तत्कालीन राजकीय परिस्थितीतीच राजीव गांधींच्या हत्येमागील खर्‍या कटावर पांघरूण घालण्यासाठी जबाबदार होती.
जगभरातल्या भयंकर हत्याकांडांपैकी एक असलेल्या या प्रकरणाची दुसरी बाजू मांडण्याचा आणि त्याबाबतचे प्रश्न उपस्थित करण्याचा हा प्रयत्न… अर्थात् राजीव गांधी हत्या… एक अंतर्गत कट?



300.00 Add to cart

जुगलबंदी

अनुवाद : अवधूत डोंगरे


आज भारतीय राजकारणात महत्त्वाची राजकीय शक्ती म्हणून उदयाला आलेल्या भारतीय जनता पक्षाची पायाभरणी कुणी व कशी केली, १९८४च्या सार्वत्रिक निवडणुकीत दोन जागा मिळवणारा पक्ष पुढे चढत्या कमानीने कसा विस्तारत गेला, तसंच १९९८ ते २००४ या काळात आणि २०१४ सालानंतर सत्तेचा सोपान कसा चढला, या सर्व प्रश्नांचा वेध घेत ‘भाजप’च्या जडणघडणीचा विस्तृत पट या पुस्तकात राज्यशास्त्रज्ञ विनय सीतापती यांनी मांडला आहे. हे करताना त्यांनी अटल बिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी या त्यातल्या दोन प्रमुख नेत्यांच्या एकमेकांत गुंतलेल्या जीवनक्रमाचं सूत्र मध्यवर्ती ठेवलं आहे.

वाजपेयी व अडवाणी यांच्या व्यक्तिमत्त्वांमध्ये व धारणांमध्ये भेद असतानाही त्यांनी सहा दशकं आवश्यक तो सांघिक दृष्टिकोन स्वीकारून काम केलं. त्यांच्यात सुप्त स्पर्धा असली तरी परस्परांविषयीचं बंधुप्रेम, आदर, व्यावसायिक एकजूट आणि ऐक्यावर भर देणारी विचारप्रवृत्ती यांमुळे ते एकमेकांसोबत राहिले. त्यांची ही भागीदारी कथन करताना लेखक मोदींपूर्वीचा भाजप कसा होता आणि तो का विजयी झाला, याचा सखोल ऊहापोह या पुस्तकामध्ये करतात.

खाजगी कागदपत्रं, पक्षांचे दस्तऐवज, नियतकालिकांतील लेख, वर्तमानपत्रं आणि दोनशेहून अधिक मुलाखती यांचे दाखले देत विपुल संशोधनावर आधारलेलं… भारतीय राजकारणात रस असलेल्या प्रत्येकाला मर्मदृष्टी देणारं पुस्तक… जुगलबंदी!


 

595.00 Add to cart