शाश्वती नंदी

शाश्वती नंदी यांचा जन्म ८ ऑगस्ट १९६६ रोजी झाला. त्या विज्ञानाच्या पदवीधर, त्यांचं संपूर्ण शिक्षणा कोलकाता येथून झालं. पश्चिम बंगाल मानवाधिकार कमिशनमध्ये विशेष पदावर कार्यरत. त्यांची पहिली कादंबरी 'वसंत अफुरान' 'शारदीय' मध्ये प्रकाशित. त्याशिवाय भरपूर कथालेखन. 'वृष्टीर गंध', 'गोल्डफिश', 'अमलताश' यांसारख्या 'देश' आणि 'आनंदबाजार' पत्रिकेत प्रकाशित झालेल्या कथांना वाचकांची पसंती. त्यांच्या 'स्वप्न बलाका' या पहिल्या कथासंग्रहास २०१० सालचा शहीद प्रद्योतकुमार स्मृती उत्कर्ष पुरस्कार प्राप्त झाला आहे. दुसरा कथासंग्रह 'जोखन वृष्टी एलो' २०१३ साली प्रकाशित. 'दैत्यर बागान' या कादंबरीसाठी त्यांना कोलकाता विश्व विद्यालयाचा 'लीला पुरस्कार' प्राप्त झाला. त्यांच्या कथांवर आधारित तीन नाटकं कोलकाता आकाशवाणीवरून प्रसारित.

लेखकाची पुस्तकं

दैत्येर बागान… अर्थात दैत्याचा बगीचा

शाश्वती नंदी
अनुवाद : सुमती जोशी


हा माणूस किती मोठा क्रिमिनल आहे, ते त्याच्याकडे बघून कधीच समजलं नसतं. अनेक दिवस त्याने सगळ्यांना मूर्ख बनवलं. दिवसेंदिवस माती उकरत राहिला, कुदळीचे घाव घालत राहिला, माती दाबून-पसरून त्या कबरींवर फुलझाडं लावत गेला. रोपं रुजली, मोठी झाली, फुलंही येऊ लागली. रंगीबेरंगी फुलांच्या पाकळ्या विखुरल्या जात होत्या. तिथे पाकळ्यांची रंगीबेरंगी अल्पना सजवली जात होती. ते बघून लोक मुग्ध होत होते पण बागेतल्या त्या मातीखाली थरावर थर रचून काय दडवलं जात होतं?…ख्यातनाम बंगाली साहित्यिक शाश्वती नंदी यांनी साकारलेली सत्य घटनेवर आधारित एक खिळवून ठेवणारी थरारक कादंबरी… दैत्येर बागान !

195.00 Add to cart