अनंत सामंत लिखित ३ पुस्तकांचा संच
सात वैशिष्ट्यपूर्ण कथांचा संग्रह…
सामंतांच्या जगण्याचे किंवा साहित्याचे वर्गीकरण होऊ शकलेले नाही, कारण कुठल्याही एका बाटलीत भरावे आणि लेबल चिकटवावे असे हे रसायन नाही. त्यांची प्रत्येक कथा, कादंबरी समुद्र आणि मातीमध्ये जगलेल्या त्यांच्या वादळी जीवनाचे चित्र प्रतिबिंबित करते . तंत्रानुसार आधी पटकथा लिहिली जाते, मग ती' शूट केली जाते. सामंतांच्या लेखणीत दडलेला कॅमेरा आधी 'शूट' करतो मग ते चित्र कागदावर मुद्रित होते. जरी ते स्वतःला' सामान्य माणूस ' म्हणत असले तरी, त्यांच्या साहित्यातील न वाचलेल्या, न पाहिलेल्या विश्वाने वाचकांना आणि समीक्षकांना नेहमीच चकित केले आहे.
सात वैशिष्ट्यपूर्ण कथांचा संग्रह…
फुल फोकसमध्ये तो बाप्या उभा आहे समोर चबुतऱ्यावर. काय म्हणून ?” लोकमान्य टिळक ते, भडव्या. ” तेच ते !शहरात शिरू शकतात ते ? लालूच्या गावाहून आलेल्या मालीशवाल्यांना माहिताय ते कोण आहेत, त्यांना असं गावाबाहेर का काढलंय ते ? “मला असं शहराबाहेर उभं राह्यचं नाहीय. इटस् टाईम आय एन्टर द गेम बॉईज ! मी राडा करणारेय, भेंच्योद. शहर वाचवू शकतील अशा सगळ्याच बाप्यांना हिजड्यांनी शहराबाहेर काढलंय. चबुतऱ्यावर चढवलंय. आता कोणीही कुठेही घुसावं आणि राडा करावा. सातपुतेला मारावं, गरोदर बायकांना मारावं, पोरांना, म्हाताऱ्यांना उडवावं. जाळावं. बॉम्बच्या माळा लावाव्यात. मान वर करून कोणी बघतसुद्धा नाही . चार लाख सदतीस हजार नऊशे ही चिल्लर झाली भेंच्योद . भुकेल्या कुत्र्यांना भुलवणारं खरकटं , आता खरा माल कमवायचाय मला !
आम्ही चौघंही अंध आहोत. कबुल आहे. पण ठरल्याप्रमाणे आज आम्हाला अलिबागचा किल्ला बघायचाय. उद्या मुरूडचा जंजिरा बघायचाय. तुम्ही दाखवू शकत नसलात तर सांगा, आम्ही आमची सोय करू. आम्हाला हातपाय आहेत. धडधाकट शरीर आहे. आम्ही चालू शकतो, पोहू शकतो. आम्ही स्वतः बघू ना दोन्ही किल्ले !
एक सागरी किल्ला… एक सागर… एक वादळ… आणि चार अंध !