अभिजित घोरपडे

अभिजित घोरपडे यांनी पुणे विद्यापीठातून भूशास्त्र विषयातील पदवी घेतली. त्यानंतर आय.आय.टी.(मुंबई) मधील शिक्षण सोडून त्यांनी पत्रकारितेचं शिक्षण घेतलं. इंडॉलॉजी, पर्यावरण व शाश्वत विकास, हवामान बदल या विषयांचं त्यांनी प्रशिक्षण घेतलं आहे आणि हे विषय त्यांचे आस्थेचे आहेत. हवामान, पर्यावरण, पाणी, ग्लोबल वॉर्मिंग व शाश्वत विकास हे विषय सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने त्यांचे लेखन सुरू असतं. त्याद्वारे मराठी पत्रकारितेत पूर्वी अपवादानेच पाहायला मिळणारे हवामान-पर्यावरण यासारखे विषय केंद्रस्थानी आणण्यात त्यांचा ‘खारीचा वाटा’ आहे.
पत्रकारितेतील लेखनाबद्दल देशातील प्रतिष्ठेचा ‘रामनाथ गोएंका अॅ वॉर्ड फॉर एक्सलन्स इन जरनॅलिझम’ हा पुरस्कार त्यांना मिळाला असून इतरही महत्त्वाचे पुरस्कार मिळाले आहेत.
केवळ लिहूनच समाधान न मानता व्याख्याने, सादरीकरण, कार्यशाळा यांच्या माध्यमातून हे सर्व विषय लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करतात. याचबरोबर मुलांना अर्थातच वेगळ्या आणि रंजक पद्धतीने भूगोल शिकविण्याचा आनंद घेतात.

लेखकाची पुस्तकं

संथ वाहते … ?

जीवनदायी ‘ नद्यांचे आजचे वास्तव


अभिजित घोरपडे


ज्यांनी मानवी संस्कृतीला आधार दिला , त्या नद्यांना आपण एकीकडे आई म्हणत म्हणत पूर्णपणे विद्रूप करून टाकले ; इतके की आता त्यांना खरा चेहराच उरला नाही . नद्या अशाप्रकारे बिघडल्याने आपल्यासाठी आपत्ती बनून राहिल्या आहेत . त्यांचे स्वास्थ्य बिघडल्याने पिण्याच्या पाणी , शेती , सभोवतालचे पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेवरही खोलवर परिणाम झाले आहेत . उत्तर महाराष्ट्रातील पांजरेपासून मराठवाड्यातील मांजरेपर्यंत आणि कोकणातील पाताळगंगेपासून चंद्रपूरच्या इरई नदीपर्यंत राज्यभर हेच चित्र पाहायला मिळत आहे . त्यांच्यामुळे निर्माण झालेल्या समस्या दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत आहेत . त्यामुळेच नद्या सुधारायच्या असतील तर काळजीपूर्वक आणि तातडीने पावले उचलावी लागतील ! भारतातील व जगभरातील नद्यांच्या हासाचा आढावा घेऊन लेखक अभिजित घोरपडे यांनी महाराष्ट्रातील नद्यांच्या आजच्या वास्तवाचा , प्रत्यक्ष त्यांच्या पात्रात उतरून सर्वंकष वेध घेतला आहे .


125.00 Add to cart