शरद पवार

भारतीय राजकारणात गेल्या ६० वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेले नेते. महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार अतिशय महत्वाची भूमिका बजावत आले आहेत. त्यांनी त्यांच्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत अनेक महत्वाची पदं भूषवली आहेत. ती म्हणजे- तीनदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीपद, संरक्षण मंत्री आणि केंद्रीय कृषिमंत्री. १९९९मध्ये त्यांनी राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. २००५ ते २००८ शरद पवार BCCIचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. २०१० ते २०१२ या काळात त्यांनी ICCचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं. गेली अनेक वर्षं राजकारणाशिवाय सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात ते उल्लेखनीय काम करत आहेत. ते अतिशय जाणकार वाचक असून राजकारण, समाजकारणाशिवाय मराठी साहित्यातील नवीन लेखन नेहमी वाचत असतात.

लेखकाची पुस्तकं

स्पर्धा काळाशी

भाषणे व मुक्त संवाद


[taxonomy_list name=”product_author” include=”533″]


आर्थिक सुधारणा आणि उदारीकरण कार्यक्रमास १९९१ साली आम्ही जो प्रारंभ केला त्या संदर्भात शरदजींच्या असलेल्या बांधीलकीचे मला या ठिकाणी स्मरण होते. किंबहुना आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण घडवून आणण्यासाठी १९८०च्या दशकात राजीव गांधी यांनी उचललेल्या अनेक धाडसी पावलांना शरदजींनी पाठिंबाच दर्शविला होता.
महाराष्ट्राच्याही पलीकडे राजकारण आणि सार्वजनिक जीवनाच्या प्रांतात — राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यापक अनुभव शरदजींच्या गाठीशी आहे. प्रस्तुत ग्रंथात संकलित केलेल्या त्यांच्या विचारांमध्ये त्या अनुभवांचे प्रतिबिंब स्वाभाविकपणेच डोकावते. अनेक बाबतीतील त्यांच्या भूमिकेशी सुसंवादी अशीच माझी भूमिका असते. विशेषत: आर्थिक धोरण, सातत्यशील विकास आणि आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक बाबी यांचा निर्देश या संदर्भात करता येईल. आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाचे उपयोजन राष्ट्रीय विकासासाठी करण्याबाबत दृढबांधीलकी असणार्‍या आमच्या काही अत्यंत प्रगल्भ नेत्यांमध्ये शरदजींची गणना होते. एक आर्थिक महासत्ता म्हणून भारत उदयास येऊ शकतो, या त्यांच्या मताशी मी सहमत आहे.
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग


500.00 Add to cart