बलराज कृष्ण

बलराज कृष्ण यांनी पत्रकारितेची सुरुवात सिव्हिल आणि मिलिटरी गॅझेट, लाहोर येथून केली. फाळणीनंतर नवी दिल्ली येथे एक्सर्टनल पब्लिसिटी डिव्हिजन, प्रेस इन्फरमेशन ब्युरो (भारत सरकार) आणि ब्रिटिश इन्फरमेशन सर्व्हिसेस करता काम केलं. ‘हिंदुस्थान टाइम्स’च्या श्रीनगर पुरवणीकरता त्यांनी विशेष वार्ताहर म्हणून काम केलं. त्यांनी 'इलस्ट्रेडेट वीकली ऑफ इंडिया’, ‘द टाइम्स ऑफ इंडिया’, ‘इकॉनॉमिक टाइम्स’, ‘द हिंदू’ अशा वृत्तपत्रांसाठी तसंच मासिकांसाठी लेखन केलं. तसंच शिपींग कार्पोरेशन ऑफ इंडिया, मोगल लाईन, इंडो-बर्मा पेट्रोलिअम, अ‍ॅटलास कॉप्को, वॉर्नर हिंदुस्थान, पार्क-डेव्हिस आणि विमको या कंपन्यांच्या मासिकांचं संपादनही केलं.

लेखकाची पुस्तकं

सरदार वल्लभभाई पटेल

भारताचा पोलादी पुरूष


बलराज कृष्णा
अनुवाद : भगवान दातार


“सततची भीती तुम्हाला सौम्य बनवते.
सौम्यपणा हा गुण आहे; पण त्याच्या अतिरेकाने
तुम्ही एवढे नेभळट बनता की, अन्यायाशी
लढण्याची उर्मीच तुमच्याजवळ उरत नाही.
व्यापक अर्थाने यालाच भित्रेपणा म्हणतात.”
-वल्लभभाई पटेल

सरदार पटेल म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील आणि स्वतंत्र भारताच्या उभारणीतील एक कणखर व्यक्तिमत्त्व! देशातील ५६५ संस्थानं विलीन करून घेऊन सामर्थ्यशाली एकसंध भारत उभा करणं हे पटेलांचं महत्त्वाचं योगदान म्हणता येईल.
सुप्रसिद्ध व जेष्ठ पत्रकार बलराज कृष्णा यांनी या पोलादी पुरुषाचा संपूर्ण जीवनपटच अत्यंत ताकदीने या पुस्तकाद्वारे उभा केला आहे. पटेलांचं बालपण, त्यांचा राजकारणातला प्रवेश, गांधीजींबद्दलची त्यांची आस्था, नेहरूंसोबतचं त्यांचं मित्रत्वाचं नातं तसंच त्यांच्यासोबतचे मतभेद, संस्थानिकांबरोबरच्या वाटाघाटी व संस्थानांचं यशस्वी विलीनीकरण, पटेलांचे राजकीय विचार व त्यांनी वेळोवेळी घेतलेले ठाम व कठोर निर्णय, त्याचप्रमाणे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातले विविध पैलू असा या पुस्तकाचा मोठा आवाका आहे.
एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या पटेलांचं संपूर्ण व्यक्तिमत्त्व व कार्य-कर्तृत्व उलगडून दाखवणारं हे चरित्र वाचकांना निश्चितच रोमहर्षक व प्रेरणादायी वाटेल.



450.00 Add to cart